Skip to main content

मयत नातेवाईकाच्या कर्जफेडीची समस्या कशी सोडवावी ?

या धागा लेखाचे नाव भविष्यात, वारसदारांकडून कर्ज परतफेडीच्या समस्या असे काही ठेवावे का या विचारात आहे, वारसदारांकडून कर्जपरत फेडी सोबत; दिवाळखोरी जाहीर करण्याच्या अधिकृत पद्धतीची चर्चा सुद्धा तुर्तास याच घाग्यात करुयात.

कुणा नवागताने खालील एक समस्या मराठी विकिपीडियाच्या मदतकेंद्रावर मांडली आहे. मराठी विकिपीडियाशी संबंधीत नसलेल्या समस्या विषयक चर्चा मराठी विकिपीडियाच्या कक्षेत येत नाहीत समस्या मिपावर चर्चा करण्यासाठी अधिक सोईची वाटली म्हणून चर्चेस घेण्याचा विचार केला.

माझ्या वडीलांचे १९८८ पासून ट्रक साठी घेतलेले बँकेचे जुने कर्ज थकबाकी आहे. वडील आता मयत झाले असुन माझी कर्ज फेडण्याची क्षमता नाही मग मी काय करावे?
संदर्भ

इंटरनेटवर अद्यापही मार्गदर्शक वकील मंडळींची आणि पुरेशा विश्वासार्ह माहितीची कमतरता आहे तेव्हा मार्गदर्शन हवे असणार्‍यांनी वकीलांना/ तज्ञांना भेटून मार्गदर्शन घेतले पाहीजे, पण माझ्या सहित बहुतेकांना अशा समस्यांचे विषय नवखे असतात. संभाव्य तोडगे काय असू शकतात हे नेमकेपणाने सांगणे कठीण असले तरी माहितीची अल्पप्रमाणात का होईना देवाण घेवाण होते. हा विषय मला स्वतःसही आणि चर्चेत सहभागी इतरांनाही नेमकेपणाने ठाऊक नसण्याची शक्यता लक्षात घेऊन उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत) नमुद/लागू करत आहे.

माझ्या अंदाजानुसार काही किमान स्वरुपाची माहिती असावी
१) कर्ज थकीत आहे म्हणुन व्यक्तींकडून गुलामी, वेठबिगारी किंवा कर्जबाजारी व्यक्तींची खरेदी विक्री करता येत नाही, शिवाय व्यवसाय स्वातंत्र्य हा मुलभूत अशिकार आहे. ह्या संबंधाने किमान मानवाधिकारांची माहिती खासकरुन ग्रामीण, आदीवासी आणि गरीबांना असावयास हवी

२) प्रायव्हेट लिमिटेड/लिमिटेड कंपनी असेल तर कंपनीचा तोटा नुकसानामुळे व्यक्तीगत मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता कमी असते. अर्थात भागीदारी अथवा व्यक्तिगत प्रोप्रायटरी व्यवसाय करणार्‍यांना याचा फायदा होत नाही त्यांच्या तारण आणि व्यक्तिगत मालमत्तातून देणी भागवावी लागू शकतात

३) मयत (मृत) व्यक्तीच्या नावाने कर्जाचा दावा आला तर वारसदारांनी

३.१) मृत व्यक्तिच्या नावाने असलेले कर्ज -तो जर गॅरंटर/हमीदार नसेल तर- वारसदाराच्या व्यक्तिगत उत्पन्नातून/ त्याच्या स्वतःच्या व्यक्तिगत कमाईवर घेतलेल्या मालमत्तेतून वळते करता येत नसावे (चुभूदेघे) समजा उपरोक्त मुलगा कुठे नौकरी करतो आहे आणि त्याने स्व कमाईतून प्रॉपर्टी घेतली आहे अथवा वडीलांनी सुद्धा गिफ्ट म्हणुन दिलेली प्रॉपर्टी आहे तर तांत्रिक दृष्ट्या अशा उत्पन्न अथवा प्रॉपर्टीवर टाच येणे कठीण असावे, किंवा मयत व्यक्तीची जोडीदार पत्नी अथवा पती यांची व्यक्तिगत नावावरची मालमत्ता सुद्धा स्वतंत्र असावी त्यातून कर्जाची रक्कम परस्पर वळती करणे शक्य नसावे.

३.२) मृत व्यक्तीची त्याच्या वाट्यास आलेली अथवा मृत व्यक्तीच्या कमाईतून झालेली मालमत्तेतून मात्र वारसदारांना देणी भागवावी लागू शकतात, देणि देऊन उरलेली मालमत्ताच केवळ वारसदारांना घेता येत असावी. (हिंदू एकत्रकुटूंब पद्धतीतील (मयत झालेल्या) कर्त्याने केलेल्या कर्जाबाबत काय होते यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा -इथे केवळ कायदे विषयक बाजूवर चर्चा करावी- अस्मीतांच्या विषयावर अवांतर नको)

३.३) मृतव्यक्तिच्या मालमत्तेतून देणी भागवण्यापुर्वी कर्ज खरोखर अस्तीत्वात आहे का याची खात्री करण्याच्या दृष्टीने सविस्तर कागदपत्रे मागून घेऊन अभ्यासून कर्जाऊ देणे खरोखर अस्तीत्वात आहे याची खात्री करावी.

३.४) मृतव्यक्तिच्या मालमत्तेतून देणी भागवण्यापुर्वी कर्ज झालेल्या व्यवसायात अजून कुणि भागीदार नव्हता याची खात्री करावी तसा भागीदार असल्यास मृतव्यक्तीच्या नावाने खरोखरच किति देणे होते याची स्वतंत्र वकीलांकडून स्वतंत्र खात्री करुन घ्यावी.

३.५) मृतव्यक्तिच्या मालमत्तेतून देणी भागवण्यापुर्वी वारसदारांनी आपण खरोखरच वारसदार आहोत आणि मृताची मालमत्ता मृत्यूपत्राने किंवा इतर कारणाने इतर कुणाच्या नावाने होणार नाही याची खात्री करुन घ्यावी.

लेख्नन चालू

रेड बुल Wed, 13/04/2016 - 16:12

मराठी विकिपीडियाच्या कक्षेत येत नाहीत समस्या मिपावर चर्चा करण्यासाठी अधिक सोईची वाटली म्हणून चर्चेस घेण्याचा विचार केला.
बरं मग ?

माहितगारमराठी Wed, 13/04/2016 - 17:14

In reply to by रेड बुल

:) कै नै मिपावर तांत्रिक कारणाने नवा घागा काढले जाणे बंद होते, गरजवंताला कुठूनतरी मदत पोहोचावी म्हणून धागा इकडे काढला. मिपावर आता धागा पोस्ट झाला आहे तेव्हा ऐसिच्या संपदकांनी हा धागा लेख वगळल्यास हरकत नसावी. आभार ;

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 14/04/2016 - 06:41

In reply to by नितिन थत्ते

असं सांगितलं तर त्याकडे दुर्लक्ष करण्याचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य ऐसीवर आहे. घ्यायचं वापरून!

माहितगारमराठी Thu, 14/04/2016 - 07:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणे हा धागा ऐसिवर (दुवा) फेब्रुवारी मध्ये ऐसिवर काढला गेला असावा.

त्यावर एका प्रतिसादातून एका लेखिकेने खालील टिका प्रतिसादातून केली

हाम्रिकावासीय डाव्या फॅसिस्टांचे २० जानेवारी २०१७ नंतर कसे होणार.
तिकडे ट्रंप आणि इकडे मोदी.

जाये तो जाये कहां, सौदी मे जगाह है क्या?
संदर्भ १ संदर्भ २

फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणे या विषयावर युरोमेरीकेत बसून भरभरुन लिहिणार्‍यांचा उपहास करणारा प्रतिसाद त्याच धागा लेखासाठी होता, तो सहन न झालेल्या संपादकांनी तो प्रतिसाद मनातले छोटे मोठे प्रश्न या सदाहरीत धाग्यावर स्थानांतरीत केला !

ह्याला काय अभिव्यक्ति स्वातंत्र्यांच्या ऐश्या टिमक्यांमागचे वास्तव म्हणायचे ?

थत्तेंना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची साशंकता असल्या शिवायच का त्यांनी प्रश्न विचारला ?

माझ्या प्रतिसादांचे ऐतिहासिक दस्त म्हणुन मुल्य लक्षात घेताय का संपादक मंडळी?

'न'वी बाजू Fri, 15/04/2016 - 17:06

In reply to by अनु राव

दस्त??? आणि ऐतिहासिक?

(बाकी, दस्ताला 'मूल्य' आहे बोले तो चांगलाच (दस्त)'ऐवज' असला पाहिजे.)

(अतिअवांतर: 'ऐवज'चा क्र. २चा अर्थ ("सुस्थिति; टिकाऊपणा; भक्कमपणा; दमदारपणा.") जमेस धरता, 'दस्त' हा 'ऐवज' कसा काय असू शकतो? पण त्यापुढचा क्र. ३चा अर्थ ("तत्त्वांश; सामर्थ्य; उत्साह; उमेद; पाणी.") जमेस धरता ठीकच वाटते. थोडक्यात काय, मराठीत कोठल्याही शब्दाचा कसाही अर्थ निघू शकतो, आणि प्रसंगी तो दुसर्‍या एखाद्या वेळेस घेतलेल्या अर्थाच्या बरोबर विरुद्धही असू शकतो. क्यू. ई. डी.; मामला खतम. असो.)

अनु राव Wed, 13/04/2016 - 17:21

मिपावर आता धागा पोस्ट झाला आहे तेव्हा ऐसिच्या संपदकांनी हा धागा लेख वगळल्यास हरकत नसावी. आभार ;

ह्या वाक्याचा अर्थ नक्की काय?

माहितगारमराठी Wed, 13/04/2016 - 17:35

In reply to by अनु राव

ऐसि हे संकेतस्थळ नाकाने कांदे सोलत फाटेफोड नवअभिजनवाद्यांचा गड झाला असल्याचे माझे व्यक्तिगत मत बनत चालले आहे, सामान्य मराठी माणसासाठी मदत करणारा धागा इथे तसा अस्थानीच होता ह्याची पहिल्या प्रतिसादाने पुनश्च खात्री केल्यासारखे वाटले कारण तसे नसते तर धागा लेखात मिपाचे नाव आहे अथवा अऊन इतर कोणत्या संस्थळाचे नाव आहे या बद्दल नाकाने कांदे सोलण्यापेक्षा धागा लेखातील उर्वरीत उद्देशाबद्दल काही व्हावयास हवे होते, या वेळी मिपा हा शब्द वगळण्याचे राहीले जिथे राहीलेले नव्हते अशा ऐसिवर काढलेल्या अश्या रचनात्मक विवीध विषयांवर धाग्यांवर हल्ली नाकाने कांदे सोलत फाटेफोडनेच सुरवात होते, लिहिणे आणि वाद वाढवणे बेकार आहे आहे संपादकांनी धागा अवश्य उडवावा

अनु राव Wed, 13/04/2016 - 17:35

In reply to by माहितगारमराठी

ओके माम. मला जो तुमच्या वाक्याचा अर्थ लागला होता तोच तुमच्या मनात होता हे कळल्यानी बरे वाटले.

माहितगारमराठी Thu, 14/04/2016 - 07:55

In reply to by नितिन थत्ते

कोण भेटलं नाय काय ? धागा काय विनोदी अवांतरांसाठी उघडला नव्हता त्यामुळे संपादकांना वगळण्याची विनंती केली गेली.

नाही तेव्हा कात्री लावणार्‍या ऐश्या संपादक मंडळींनो कात्री कौशल्य वापरणार्‍या ऐश्या संपादकांनो धाग्याला कात्री लावून तुमच्या कौशल्याचा सराव करण्याची सुवर्ण संधी मुळीच घालवू नका. कसंच कसचं होत असेल तर कुणा भावी संपादकांचे प्रमोशन करुन त्यांच्या कडून हा सराव अवश्य करुन घ्यावा.

गब्बर सिंग Thu, 14/04/2016 - 09:02

In reply to by माहितगारमराठी

ऐसि हे संकेतस्थळ नाकाने कांदे सोलत फाटेफोड नवअभिजनवाद्यांचा गड झाला असल्याचे माझे व्यक्तिगत मत बनत चालले आहे

(०) हा निष्कर्ष आहे हे गृहित धरतो.
(१) नवअभिजनवादी अस्तित्वातच नसावेत का ?
(२) नवअभिजनवाद हा प्रतिबंधित/निष्कासित केला जावा का ?
(३) वरील (१) व (२) पैकी एकाचेही उत्तर हो असे असेल तर - वैविध्यावर आक्रमण होत नैय्ये का ?
(४) या संस्थळावर माझी अनेकांशी वादावादी होते. माझ्या अतिक्रूर, व डोक्यात जाणार्‍या प्रतिसादांना सुद्धा इथे सहन केले जाते हे तुम्हास माहीती नाही का ? माझी या संस्थळावर सौम्य वा तीव्र शब्दात खडाजंगी (काही वेळा संपादक मंडलाशी व/वा व्यवस्थापकांशी) झालेली तुम्ही वाचली नाहीत की तुम्हाला वाचायची नसल्यामुळे तुम्ही थेट निष्कर्ष काढलात ?
(५) मी संपादक वा व्यवस्थापक मंडलाचा सभासद नाही हे स्पष्टपणे नमूद करू इच्छितो.
(६) Dissent ला इतके सहन करणारे दुसरे संस्थळ कोणते आहे ??

राही Thu, 14/04/2016 - 09:16

In reply to by माहितगारमराठी

इतर काही संस्थळांवर मालक/व्यवस्थापक/संपादकांविरुद्ध 'ब्र'ही काढलेला चालत नाही हे अनेकदा दिसले आहे. इथे मात्र कोणीही उठून त्यांचे वाभाडे काढताना दिसतो. ऐसीइतके सहनशील संस्थळ दुसरे नसावे. इथे प्रतिसाद सहसा डिलीट होत नाहीत. तसे करण्याची बहुतेक वेळा वेळच येत नाही कारण इथे कुणी आक्रस्ताळेपणा करीत नाही.
इतके बोलल्यावर सामान्य सदस्य म्हणून माझे म्हणणे संपवीत आहे.

माहितगारमराठी Thu, 14/04/2016 - 10:26

In reply to by अनु राव

म्हणुन तर मिपाकरांची टोळधाड आली आहे ऐसीवर

म्याडम आपुन मिपापरभी आवाहन बहोत साल के बाद गया, उसके बाद ऐसिपर दो दो व्यक्तंयोंके लिहीत आमंत्रण संदेश के बादीच आया, और हमारे जसे नॉन-भाडोत्री आमंत्रित यंहा कुछ तो होंगे की नही ?, या बाकी सभ भाडोत्री और हमकु भाडा नही देना पडना करके कंजुसी ऐसे कुछ नहीए ना करके डाउट्ट आता रहैता करके !

वैमानिक हत्ती Thu, 14/04/2016 - 10:53

In reply to by राही

इतर काही संस्थळांवर मालक/व्यवस्थापक/संपादकांविरुद्ध 'ब्र'ही काढलेला चालत नाही हे अनेकदा दिसले आहे. इथे मात्र कोणीही उठून त्यांचे वाभाडे काढताना दिसतो. ऐसीइतके सहनशील संस्थळ दुसरे नसावे

चुकीचे मत आहे हे. उलट ऐसीच्या मालक्/व्यवस्थापक्/संपादकांसारखे बेरकी आणि आतल्या गाठीचे कोणी नसेल. आपण सहनशील आहोत अस्स टेंभा मिरविणे यांना चांगलेच जमते.यांना पटत नाहीत अशा श्रेणी मी दिल्या तर त्यांना चालले नाही आणि माझी श्रेणी द्यायची सोय काढून घेतली आहे यांनी. वा रे सहनशील आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले. सगळ्यात चोर लोक आहेत हे.

राही Thu, 14/04/2016 - 09:36

कर्ज ट्रन्स्फर होत नसते. त्याच्यासाठी ठेवलेले तारण जे ट्रान्स्फरेबल असते, ते कायदेशीर वारसांकडे वर्ग होताना जर ते स्थावर(जंगमही उदा. मुदत ठेवीच्या पावत्या.) असेल तर आधी त्यावरचे इतरांचे दावे तपासले जाणारच. त्यावरची देणी चुकवल्याशिवाय त्याचा मालकीहक्क वारसांना मिळणार नाही. वारसांपैकी कोणी कोसाय्नर असेल तर देणी चुकवण्याची त्याची जबाबदारी असते. बाकी धनकोसाठी धंद्यातली भागीदारी वगैरे तपासणे ह्या अगदी प्रथमिक गोष्टी असतात. धनकोकडे सगळ्या ऋणकोंची नोंद असतेच. जर तो खाजगी सावकार असेल तरच तो दहशतीद्वारे अनेकांपैकी एकच एक ऋणकोच्या मागे लागू शकतो. अन्यथा नाही.

माहितगारमराठी Thu, 14/04/2016 - 12:21

In reply to by राही

विषयाला धरुन असलेल्या प्रतिसादाबाबत सर्वप्रथम आभार,

कर्ज ट्रन्स्फर होत नसते. त्याच्यासाठी ठेवलेले तारण जे ट्रान्स्फरेबल असते, ते कायदेशीर वारसांकडे वर्ग होताना जर ते स्थावर(जंगमही उदा. मुदत ठेवीच्या पावत्या.) असेल तर आधी त्यावरचे इतरांचे दावे तपासले जाणारच. त्यावरची देणी चुकवल्याशिवाय त्याचा मालकीहक्क वारसांना मिळणार नाही.

कर्ज+व्याज मिळून शिल्लक देय रक्कमेची बेरीज काही कारणाने तारणापेक्षा अधिक होत असेल पण ऋणको एकुण मालमत्तेपेक्षा कमी असेल तर काय होते ?

अनु राव Thu, 14/04/2016 - 12:27

In reply to by माहितगारमराठी

कर्ज+व्याज मिळून शिल्लक देय रक्कमेची बेरीज काही कारणाने तारणापेक्षा अधिक होत असेल पण ऋणको एकुण मालमत्तेपेक्षा कमी असेल तर काय होते ?

कायद्याच्या चौकटीत, ती रक्कम बुडीत खाती जमा करावी लागते.

अनु राव Fri, 15/04/2016 - 09:45

In reply to by माहितगारमराठी

माम - तुम्ही माहिती विचारलीत ती मी दिली आता "नक्की का?" हा प्रश्न का विचारला आहात? माझी परीक्षा घेउन तुम्हाला काहीही हासील होणार नाही. मुळात तुमचा उद्देशच ठीक दिसत नाही असले प्रश्न विचारताय म्हणजे.

उत्तर पटले नसेल तर अर्ग्युमेंट करा, हे काय आहे?

माहितगारमराठी Fri, 15/04/2016 - 16:02

In reply to by अनु राव

कायदे विषयक प्रश्नावर चर्चा चालू असताना साशंकता असल्यास "नक्की का ?" असे खात्री करुन घेणासाठी दुजोर्‍याची अथवा संदर्भाची अपेक्षा करण्यासाठी प्रश्न विचारण्यात गैर काय आहे ?

अवांतरः हा प्रश्न तसा दुजोरा हवा आहे /खात्री करुन तसा साशंकतेमुळे गंभीरपणेच विचारला होता, बाकी '..नक्की काय ?' असा प्रश्न आपणच या धागा चर्चेच्या सुरवातीस विचारला होता, अर्थात तो प्रश्न ज्या प्रतिसादाला तुम्ही दिला तो प्रतिसाद तुम्ही उडी मारुन उत्तर द्यावे म्हणूनच टाकला होता कारण माझ्या मागच्या प्रत्येक नव्या धागा लेखा खाली अगदी अवांतर फाटेफोड करु नये असे लिहिले असतानाही अनु रावांचे तिसरेच काही चालू असते. -त्यामुळे आपला प्रतिसाद विश्वासार्ह आहे का याची साशंकता असणे सहाजिक असावे - इतरांनी प्रतिसाद दिले आणि अवांतर केले तर सहन करणे जरासे अवघड असते नाही का ?

रेड बुल Thu, 14/04/2016 - 12:33

विषय भटकु न देण्याची सर्वप्रथम जबाबदारी धागा लेखकाची असते. पण धागा लिहुन बराच काळ होउनही एकही प्रतिसाद (विषयाला धरुन वा सोडुन)न आल्याने त्याला निराशेचा बळी व्हावे लागल्याचे निरक्षण होत आहे. त्यातुनच त्याने स्वतःच प्रतिसादकांची खोड काढीत धागा भरकटवला हे अतिशय निंदनीय कृत्य आहे. धाग्यावरील पहिला प्रतिसादही (जो माझा आहे) विषयाला धरुनच होता (त्यात लेखकाने लिहीलेलीच वाक्ये वापरुन काही प्रश्न उपस्थित केल्या होता).

इतर स्थळांवर अक्षरशः मर्यादीत यशाचा पराकोटीचा माज तेथील अतिसामान्य जाणकारांना चढला आहे यात दुमत नाही पण ऐसीचे संपादकही वगैरे वगैरेही फार धुतल्या तांदळासारखे अजिबात नाहीत. तरीही धागा लेखकाने जो खोडिलपणा या धाग्यावर दाखवला आहे तो माझ्या लेखी अक्षम्यच होय. अशा लेखकांना पल्याड संस्थळावर दोन टुकार लेख लिहण्याची शिक्षा द्यायला पाहिजे.

माहितगारमराठी Thu, 14/04/2016 - 17:32

In reply to by रेड बुल

स्वतःच्या नाकावरच्या माशा न उडवता (दुसर्‍यांच्या विनाकारण) नळ्या फुंकल्या की, त्यांचे पक्षी होऊन उडत जातात ( आणि रात्रीचे किडे खातात)

चल उड़ जा रे पंछी बेगाने धागेमे ना कर अपने बुल की रेड
चल उड़ जा रे पंछी ...

खतम हुए दिन उस बेगानी डाली के जिस पर तेरा टैमपास हो रहा था
आज यहाँ और कल हो वहाँ ये मख्खी मार फेरा था
सदा रहा है इस दुनिया में किसका आबू\-दाना
चल उड़ जा रे पंछी ... ;)
(विडंबनासाठीगीतकार राजींदर क्रिश्नन यांची माफी मागून)

.
.
bat

छायाचित्र सौजन्य विकॉ
रोपण : By Original photo: אורן פלס Oren Peles Derivative work: User:MathKnight [CC BY 2.5 (http://creativecommons.org/licenses/by/2.5)], via Wikimedia Commons

बॅटमॅन Thu, 14/04/2016 - 17:47

In reply to by माहितगारमराठी

यत्ता तिसरीत असताना लिहिलेला निबंध आठवला. (८ मार्कांकरिता)

माझा आवडता प्राणी- वटवाघूळ.

वटवाघूळ झाडावर लटकते. आणि रात्री उडते. त्याचे पंख पिसांनी बनलेले नसून कातड्याचे बनलेले असतात. तो प्राणी आहे पण त्याला चुकीने पक्षी समजले जाते. लोक त्याला अशुभ समजतात पण ते चूक आहे. त्याला नीट दिसत नाही. ते वस्तूंवर ध्वनिलहरी सोडून त्यांच्या आधारे उडते.

('विज्ञानातील गमतीजमती' की अशाच काहीशा नावाच्या पुस्तकावरून सगळा मजकूर ढापला होता. यात कुठेही वटवाघूळ मला का आवडते याचा उल्लेख नसतानाही बाईंनी एक शब्द न बोलता पैकीच्या पैकी मार्क दिलेले तेवढे आठवते.)

बॅटमॅन Thu, 14/04/2016 - 18:03

In reply to by -प्रणव-

ओह येस. पण बॅटमॅन हे क्यारेक्टर तुलनेने नंतर जास्त आवडू लागले, यत्ता सातवी-आठवीत. त्याअगोदर लोक अशुभ म्हणतात म्हणून त्या वटवाघळाबद्दल आकर्षण होते. शिवाय ती ब्याटम्यान-रॉबिनची एक धमाल सेरीज़ होती. एक पंच मारला की कॉमिकबुकमधल्यागत त्याची 'प्लॉफ्फ', 'थ्वॅक्क', इ. अक्षरे दिसत असत. तिथून बॅटमॅनची प्रथम ओळख झाली. त्याचे ते डार्कपण सातवी-आठवीत जे भावले ते भावलेच.

माहितगारमराठी Thu, 14/04/2016 - 20:28

In reply to by बॅटमॅन

आम्हाला तुम्ही किरकेट वाले ब्याटमन वाटल होत, तुम्ही इकड बी हात(कं) मारता म्हणायचे ! लै भारी आयडीया ! हवं त्यांना उलटं लटकवून, 'आमाले तुमी ब्याटमन्न सारख्खे लयं आवडंता' म्हणूनश्यान सांगता येते ! :)

अरविंद कोल्हटकर Fri, 15/04/2016 - 02:14

In reply to by बॅटमॅन

अच्छा, असं आहे तर! म्हणजे कुठलंतरी काहीतरी ढापून ते आपलंच म्हणून खपवायची तुमची सवय शाळेपासूनचीच आहे.

(परिहासविजल्पितं सखे परमार्थेन न गृह्यतां वचः!)

adam Fri, 15/04/2016 - 14:16

In reply to by बॅटमॅन

आल, संदीप आणि गोर्बी

कोल्हटकरांचा अजून एक मिश्किलपणा आठवला.

आणि हेही :-
http://www.aisiakshare.com/node/1820#comment-26824

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 14/04/2016 - 17:51

इतर संस्थळांना नावं ठेवण्यसासाठी 'ऐसी आक्षरे'चं व्यासपीठ वापरू नये ही विनंती.

रेड बुल Thu, 14/04/2016 - 18:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाकी एक प्रेक्षाग्रुह नावाचे संस्थळ निघाले पाहिजे ज्यात कोणत्याही संस्थळांना (त्यावरील आक्षेप असलेल्या कंटेटला )नावं ठेवण्याची सोय असली पाहिजे. अर्थात वॅलीड पॉइंटवर. एकमेव निपक्षपाती अन सर्वसामावेशक कसलाही पुश्थ्रु न राखणारे संस्थळ. सदस्य नाम मात्र खरी द्यायला लागतील त्यासाठी आधार, ग्रीन, वोटर, मास्टर, विसा कार्ड स्विकारली जातील.

होउदे चर्चा आडपडदा न राखता. अन्यथा संस्थळांची मनमानी व इंटॉलरन्स हा आगामी काळातील ज्वलंत विषय बनेल. लेट्स मुव टु लेवल NEXT. क्रंट सिस्टम इज बगी अँड अ॑नेक्सेप्टेबल टु दी फुटुरे..

रेड बुल Thu, 14/04/2016 - 19:36

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दॅट मीन्स यु वुड बी वेरी वेरी वेरी फेथफुल टु सच वेबसाइट ? बट यु जस डोंट वांट इट हिर ? दॅट्स वेरी काँफ्युसींग अ‍ॅक्ट आ मस से.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 14/04/2016 - 20:07

In reply to by रेड बुल

ठराविक गोष्टींवर कुठेच टीका करता येत नसेल तर निराळे मार्ग शोधले जातात, कारण त्याची गरज असते. मला अशा संस्थळाची गरज काही लोकांना असू शकेल ही गोष्ट समजते. (शिवाय, त्यामुळे मला इथे वरच्या प्रतिसादासारखे प्रतिसाद देत बसावे लागणार नाहीत. अनुताईंना माझ्या प्रमाणलेखनातल्या चुका काढता येणार नाहीत, इ. इ.)

गब्बर सिंग Thu, 14/04/2016 - 21:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ठराविक गोष्टींवर कुठेच टीका करता येत नसेल तर निराळे मार्ग शोधले जातात, कारण त्याची गरज असते. मला अशा संस्थळाची गरज काही लोकांना असू शकेल ही गोष्ट समजते

झकास.

.शुचि. Thu, 14/04/2016 - 22:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ठराविक गोष्टींवर कुठेच टीका करता येत नसेल तर निराळे मार्ग शोधले जातात, कारण त्याची गरज असते. मला अशा संस्थळाची गरज काही लोकांना असू शकेल ही गोष्ट समजते.

सॉलिड मारा!!!

रेड बुल Fri, 15/04/2016 - 11:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नैष्ठीक पाठिम्बा... म्हणजे अशा संस्थळाशी तुम्ही निष्ठावान रहाल. इतरांना त्याची गरज असते नसते हे विषयांतर झाले.

नितिन थत्ते Fri, 15/04/2016 - 07:04

बहुतांश करारांमध्ये दोन पार्ट्यांचे वर्णन असते "अमुक तमुक बिइंग द फर्स्ट पार्ट" आणि त्या पुढे "Including their heir and / or assignees" अशी प्रोव्हिजन असते. कर्जाच्या करारातसुद्धा ती असेल तर कर्ज वारसांना फेडावे लागेल.