Skip to main content

ही बातमी समजली का - भाग १७३

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
.
---
.

गब्बर सिंग Mon, 23/04/2018 - 21:58

मार्च मधे अग्रगामी आर्थिक निर्देशांक ०.७% नी वधारला
.

The Conference Board Leading Economic Index®(LEI) for India increased 0.7 percent in March 2018 to 110.7 (2016=100).
.
The Conference Board Coincident Economic Index®(CEI) for India increased 0.5 percent in March 2018 to 111.2 (2016=100).

.

गब्बर सिंग Tue, 24/04/2018 - 03:18

विकसनशील देशांमधे फेसबुक चा दबदबा
.

Indonesia, home to roughly 6 percent of Facebook Inc.'s users, isn't happy with the social-media giant. Officials there are even threatening to shut the service down after its latest egregious privacy scandal. That sounds like an ominous threat -- but it's empty. In Indonesia, as across the developing world, Facebook is no longer just a platform for sharing photos and news. It's becoming perhaps the world's most important channel for small businesses to reach customers. From Asia to Africa, countries are learning that they need Facebook as much as Facebook needs them -- and maybe more so.

.

Combined with Facebook's already formidable e-commerce footprint, Marketplace could make it increasingly difficult for developing countries to regulate or threaten the company. The economic disruption, especially for small businesses, would simply be too great -- not to mention the protests. Privacy worries, meanwhile, are less pressing in developing countries where informal, cash-based commerce remains king.

.
.
लई आवडलं आपल्याला. सरकारं खाजगी उद्योजकांसमोर/उद्योगांसमोर हतबल होत आहेत हे लई आवडलं.
.

गब्बर सिंग Tue, 24/04/2018 - 21:12

In reply to by चिंतातुर जंतू

वाचलं. आयम नॉट इम्प्रेस्ड/मूव्हड्. कसल्याही परिस्थितीत खाजगी कंपन्यांचे राक्षसीकरण करायचेच ह्या एकमेव उद्देशाने प्रेरीत झालेली डझनावारी आर्टिकल्स सापडतील.

चिंतातुर जंतू Tue, 24/04/2018 - 15:57

गोरखपूरमध्ये गेल्या वर्षी घडलेल्या हॉस्पिटलकांडात अनेकांचे प्राण वाचवल्याबद्दल डॉ. कफील माध्यमांच्या प्रकाशझोतात आले होते. आता मात्र त्यांनाच बळीचा बकरा बनवलं गेलं. सध्या ते तुरुंगात आहेत.
Gorakhpur doctor Kafeel Khan writes from jail: Made scapegoat for administrative failure

चिंतातुर जंतू Tue, 24/04/2018 - 16:06

भीमा-कोरेगाव हिंसाचारातल्या एका पीडितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. काही माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार हिंसाचाराच्या घटनेची ती एक साक्षीदारही होती.

चिंतातुर जंतू Wed, 25/04/2018 - 19:02

In reply to by चिंतातुर जंतू

ह्या बातमीतली आरोपींची नावं वाचून असा प्रश्न पडला की ह्यातले काही ब्राह्मण आहेत की काय?
Day after Dalit girl found dead in Koregaon Bhima, cops suspect suicide

अतिशहाणा Wed, 25/04/2018 - 19:38

In reply to by चिंतातुर जंतू

आरोपी कोणत्या जातीचे आहेत याने काय फरक पडतो? ब्राह्मण आरोपी असणे ही जगावेगळी गोष्ट आहे की काय?

चिंतातुर जंतू Wed, 25/04/2018 - 19:52

In reply to by अतिशहाणा

आरोपी कोणत्या जातीचे आहेत याने काय फरक पडतो

दिवस वाईट आले आहेत. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यासारख्या लोकांनी हिंसाचाराला चिथावणी दिली असं एक गट म्हणतो आहे, तर एल्गार परिषदेत माओवादी लोकांनी हिंसाचाराला चिथावणी दिली असं दुसरा गट म्हणतो आहे. ह्या आरोपांमागची जातीय समीकरणं लक्षात घेता हिंसाचाराला बळी पडलेले आणि आरोपी ह्यांच्या जातींकडे आता आपोआप लक्ष जातं. हे दुर्दैवी आहे हे मान्यच आहे, पण प्रचंड ध्रुवीकरण झालेलं हे आताचं इथलं वास्तव आहे, हेदेखील नाकारता येण्याजोगं नाही. त्यामुळे असा विचार केल्याशिवाय घटनेचे अन्वयार्थ लावणंच अशक्य होऊन बसलेलं आहे.

चिंतातुर जंतू Thu, 26/04/2018 - 13:09

In reply to by अतिशहाणा

आरोपी कोणत्या जातीचे आहेत याने काय फरक पडतो?

आता ही आजची बातमी पाहा :
अपयश झाकण्यासाठी पोलिसांची बदनामी

सरकारचे अपयश झाकण्यासाठी भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत हे जाणूनबुजून पोलिसांना बदनाम करीत आहेत आणि नक्षलवाद्यांकडे बोट दाखवून जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप शहर काँग्रेसने बुधवारी केला आहे.

या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पोलिस बंदोबस्त देण्यात आला नाही. त्यामुळे कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी आंबेडकर अनुयायींवर जातीयवादी शक्तींनी हल्ला केला. मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांच्या समर्थकांनी कट रचून कोरेगाव भीमा येथे हिंसाचार केला असल्याचा आरोप बागवे यांनी केला आहे.

यात नक्की कोण खरं बोलतंय, हे कसं कळणार? पीडित कोणत्या जातीचे आणि आरोपी कोणत्या जातीचे हे पाहायचं नाही असं म्हटलं तर ते सांगता येणार नाही.

चिमणराव Thu, 26/04/2018 - 11:42

In reply to by चिंतातुर जंतू

रंजलेल्या गांजलेल्यांना संतुष्ट करत होता,जिएसटी फ्री सेवा द्यायचा त्याचं काय?
" बिमारी व्याधियों के लिए बाबा के पास क्यों जाते हैं लोग?"
- श्रद्धा.
" फिर तकरार क्यों?"

चिंतातुर जंतू Thu, 26/04/2018 - 14:12

'रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स' ही संस्था दर वर्षी जगभरातली प्रसारमाध्यमं कितपत स्वतंत्र आहेत ह्याचा आढावा घेणारा अहवाल सादर करते. ह्या वर्षीच्या अहवालात भारताचा क्रमांक १३८, म्हणजे दोन स्थानं खाली गेला आहे.

In India (down two at 138th), hate speech targeting journalists is shared and amplified on social networks, often by troll armies in Prime Minister Narendra Modi’s pay.

भारताविषयी अधिक माहिती इथे.

गब्बर सिंग Thu, 26/04/2018 - 20:28

In reply to by चिंतातुर जंतू

In India (down two at 138th), hate speech targeting journalists is shared and amplified on social networks, often by troll armies in Prime Minister Narendra Modi’s pay

मी ही बातमी तपशीलात वाचलेली नाही.

पण सकृतदर्शनी हे -- Modi and his fans are guilty regardless of whether they are proven innocent or not; And if we cannot find something substantive against them then hammer them anyways - च्या धर्तीवर आहे.
.

चिंतातुर जंतू Fri, 27/04/2018 - 11:35

In reply to by गब्बर सिंग

Modi and his fans are guilty regardless of whether they are proven innocent or not; And if we cannot find something substantive against them then hammer them anyways

सहमत. आरएसएफला काहीच रेप्युटेशन नाही. उलट, तपशीलातल्या सैतानांना न घाबरता मताची पिंक टाकणाऱ्या कोणत्याही भारतीय ट्रोलाचं मत त्यापेक्षा अधिक मार्मिक असणारच.

गब्बर सिंग Fri, 27/04/2018 - 20:05

In reply to by चिंतातुर जंतू

ऑ ?

पत्रकारांवरील टीका (अगदी हेट स्पीच सुद्धा) सोशल मिडीयावर अँप्लिफाय करणे हे अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची गळचेपी नसून त्या स्वातंत्र्याच्या उपयोगाची परमावधी आहे.
.
.
अगदी ब्लासफेमीविरोधी कायदे सुद्धा अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी नसते का ?. आणि ब्लासफेमी हे "हेट स्पीच" असू शकते की नसते ?
.
-----

'रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स' ही संस्था दर वर्षी जगभरातली प्रसारमाध्यमं कितपत स्वतंत्र आहेत ह्याचा आढावा घेणारा अहवाल सादर करते.

.

चिंतातुर जंतू Thu, 26/04/2018 - 17:59

आज न्यू यॉर्क टाइम्सचं एक पान भारताविषयीच्या दोन वृत्तांकनांना वाहिलेलं आहे -
Where 8-Year-Old Was Raped and Killed, Hindus Rally Around Suspects
Indian Guru Sentenced to Life in Prison for Raping Teenage Girl

चिंतातुर जंतू Thu, 26/04/2018 - 19:56

उत्तर प्रदेशात २०१३मध्ये उफाळलेल्या हिंसाचाराविषयीची आणि त्या आधी चिथावणीखोर वक्तव्यं केल्याची प्रकरणं मागे घेतली जाणार असं दिसतंय -
Yogi govt moves to withdraw hate-speech cases against Sadhvi Prachi, Sanjeev Balyan

गब्बर सिंग Fri, 27/04/2018 - 07:28

काँग्रेस ला नैतिक अधिकार नाही _ रविशंकर प्रसाद.

भाजपाच्या लोकांनी हा नैतिक अधिकार असण्या / नसण्याचा बकवास बंद केला तर बरं होईल. नै ?
.

चिंतातुर जंतू Fri, 27/04/2018 - 11:42

राजकुमार राव अभिनित आणि हंसल मेहता दिग्दर्शित 'ओमर्ता'मध्ये दोन दृश्यं कापावी लागणार आहेत. त्यापैकी एकात पुरुष समोरून नग्न दाखवला होता म्हणून, तर दुसऱ्या दृश्यात राष्ट्रगीत वाजत असताना एक व्यक्ती मुतताना दाखवली आहे म्हणून कात्री लागली.

'Omerta': Censor board demands two scenes cut from the Rajkummar Rao starrer

चिंतातुर जंतू Fri, 27/04/2018 - 12:19

न्या. लोया प्रकरणाला एक वेगळं वळण -
‘न्या. लोयाप्रकरणी जनहित याचिकेमागे संघाचा हात’

म्हणजे संघाला शहा जड होतोय आणि त्यामुळे आता त्याला बाजूला करायचं आहे, असं?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 27/04/2018 - 21:00

In reply to by चिंतातुर जंतू

हे वाचून 'न'वाच विचार डोक्यात आला. भाजप आणि त्यांची बाकीची नऊ तोंडं आकारानं चिकार मोठी व्हायला पाहिजेत. म्हणजे आपसांतल्या मारामाऱ्यांमुळे त्यांचीही लफडी-कुलंगडी बाहेर यायला सुरुवात होईल. एर‌वी आदर्श वगैरे घोटाळेही समोर आले असते असं वाटत नाही.

चिंतातुर जंतू Fri, 27/04/2018 - 16:29

न्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्री

न्या. जोसेफ यांनी २०१६ मध्ये उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट रद्द करून तत्कालीन मुख्यमंत्री हरीश रावत यांचे काँग्रेसचे सरकार सत्तेवर आणले होते. न्या. जोसेफ यांचा हा निर्णय केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपला मोठा धक्का होता.

चिंतातुर जंतू Sat, 28/04/2018 - 16:43

‘ऑनलाइन’ ओझ्यापायी मुख्याध्यापकाची आत्महत्या

ऑनलाइन माहिती भरणे, निकालासंबंधीची कामे तसेच शालेय पोषण आहाराअंतर्गत शिल्लक धान्याचा साठा मोजणे, शासनाच्या योजनेंतर्गत शौचालय बांधकामाचा अहवाल देणे आदी कामेही शिक्षक, मुख्याध्यापकांना करावी लागत आहेत. ऑनलाइन सादरीकरणासाठी ग्रामीण भागात इंटरनेटला रेंज न मिळण्यापासून अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षक आणि मुख्याध्यापक वर्ग सध्या दहशतीखाली जगत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

१४टॅन Sat, 28/04/2018 - 19:38

In reply to by चिंतातुर जंतू

माझी आई शिक्षीका आहे. तिचं हे ऑनलाईन मार्क भरायचं काम मला करावं लागतं. ही साईट स्ट्याटीक का काहीतरी आहे, ज्याने ती अकस्मात रिफ्रेश होते. चढवलेला विदा चढलेला दिसत नाही. प्रत्येक मुलाचं वेगळं पान उघडून त्यात अचूक पत्ता, आधारकार्ड क्र. इ. कचरा टाकायचा असतो. साधारण ६० मुलांचं हे काम करायला आठवडा जातो.
--
बऱ्याच प्राध्यापकांनी केलेली तक्रार ही, की मुंबई विद्यापीठाचे निकाल प्रचंड प्रलंबित होण्यामागचं कारण हे, की अर्ध्या लोकांना ते नीट वापरता येत नाही. उत्तरपत्रिका स्कॅन केल्या गेल्यानंतर, (लिहील्या गेलेल्या पानांनंतर) उरलेल्या रिकाम्या पानांचे शून्य गुण टंकले नाहीत, तर एकूण गुण चढवले जात नाहीत. ते चढवले गेलेले नाहीत, हेही बऱ्याच तपासनीसांना कळत नाही.
--
त्यामुळे एकूणात मुख्याध्यापक सुटले बिचारे. :'(

गब्बर सिंग Sun, 29/04/2018 - 04:50

Dalmia group adopts Red Fort: PM Modi preparing to ‘mortgage’ India’s heritage to corporates, alleges Congress
.
मोदीं सरकारने झकास निर्णय घेतलाय. जोरदार अभिनंदन, मोदी सरकारचे.
.
खाजगी कंपन्या ह्या सैतान असतात अशा आकसातून काँग्रेसने व इतरांनी थयथयाट सुरु केलेला आहे.
,
In a bid to improve tourism potential of Sun Temple at Konark, Rajarani temple at Bhubaneswar and Ratnagiri Buddhist monument at Jajpur, the Centre has shortlisted a private company for proper upkeep of those destination. The company, T K International Limited, was selected under 'adopt a heritage' scheme, launched by the ministry of tourism last month.
.
मस्तच.
.

गब्बर सिंग Sun, 29/04/2018 - 06:04

Unlike Hitler, Nehru betrayed his nation, says Subhas Chandra Bose’s grandnephew
.
.

.
ऑ ??
.

'न'वी बाजू Sun, 29/04/2018 - 06:12

In reply to by गब्बर सिंग

मत आणि ढुंगण, प्रत्येकाला एकएक (तरी) असतेच. (आणि बहुतकरून ते वास मारते.)

सबब, जौद्याहो!

गब्बर सिंग Sun, 29/04/2018 - 10:33

Trump deserves credit for Korean thaw

Washington (CNN)Any way you cut it, President Donald Trump is entitled to significant credit for Friday's historic opening between the two Koreas. Whether he deserves as much as he's claiming or whether he's wise to bullishly declare a new era of denuclearized peace on the peninsula seems much more doubtful. Still, the summit between North Korean leader Kim Jong Un and South Korean President Moon Jae-in keeps alive the possibility of a legacy win for Trump that would rank as one of the top presidential achievements since World War II.

.
बातमी ही आहे की सीएनेन ने ट्रंप यांना थोडेफार श्रेय दिलेले आहे.
.
.

चिमणराव Mon, 30/04/2018 - 06:33

शिक्षकांची आताची ओनलाइन ओझ्याखाली परिस्थिती फक्त महाराष्ट्रातच आहे का? शिक्षणसेवक नावाचे कंत्राटी कामगार करणे. खासगी शाळा काढता येण्यासाठी नवनवी क्लुप्त्या काढणे. शिक्षकांनीच पार्टटाइम क्लासिज काढून शिक्षकपेशावरच धोंडा पाडून घेतला का?
- हा वेगळा धाग्याचा विषय आहे.

गब्बर सिंग Mon, 30/04/2018 - 10:50

गूगल ज्याप्रमाणे सगळ्या विश्वाची खबरबात ठेऊन असतं तसंच पूर्वी नारद मुनी समस्त ब्रह्मांडाची खबरबात ठेवून होते ____ इति गुजरात मुख्यमंत्री विजय रुपानी.
.
नारद मुनी "नारायण नारायण" म्हणत ट्वीट करायचे असं सुद्धा म्हणा. काय पिरॉब्लेम नाय.
.
पण फेसबुकाचे काय ?
.

नितिन थत्ते Mon, 30/04/2018 - 14:26

In reply to by चिंतातुर जंतू

बेसिकली त्यांचं १८००० गावांमध्ये चार (की तीन?) वर्षात वीजपोचवण्यावरून चाललेलं ड्रमबीटिंग पण अनाठायी आहे. काँग्रेस सरकारांच्या परफॉर्मन्सच्या तुलनेत हा परफॉर्मन्स केविलवाणा आहे.

चिंतातुर जंतू Mon, 30/04/2018 - 14:35

In reply to by नितिन थत्ते

काँग्रेस सरकारांच्या परफॉर्मन्सच्या तुलनेत हा परफॉर्मन्स केविलवाणा आहे.

महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. प्रत्येक गावात वीज आली आहे. काळा पैसा नाहीसा झाला आहे. केवळ तुमच्यासारखे चिंतातुर जंतूच अनाठायी शंका उपस्थित करून जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

गब्बर सिंग Mon, 30/04/2018 - 20:44

In reply to by नितिन थत्ते

काँग्रेस सरकारांच्या परफॉर्मन्सच्या तुलनेत हा परफॉर्मन्स केविलवाणा आहे.

गोयल सायबांना म्हणावं किमान तुमचा व काँग्रेस चा विद्युतीकरणाचा परफॉर्मन्स तुलना करता येईल अशी आकडेवारी जरी (लबाडी न करता) उपलब्ध करून दिलीत तरी तुम्हास कुर्निसात करायला तयार आहोत आम्ही.
.

नितिन थत्ते Tue, 01/05/2018 - 09:44

In reply to by गब्बर सिंग

डेटा सरकारी वेबसाईट्सवर (सध्यातरी*) उपलब्ध आहे.
मीच फेसबुकवर टाकलेला डेटा इथे पण टाकतो.

https://data.gov.in/.../progress-report-village...

On this site you see a CSV file (second one titled Progress Report ..... Feb 2017) which you can download.
1. The file shows that there are in all 5,97,464 villages. It shows 18452 villages unelectrified as on 1 Apr 15.

2. I see below document also on govt URL that says 1500 villages were electrified at independence.

http://indiaenergy.gov.in/.../Rural-Electrification-in...

3. So
Earlier useless governments - Villages electrified 5,97,464-1500-18452= 5,77,512 in the period of 68 years. That makes 8492 villages per year.
Efficient Modi Govt- Villages electrified 18452 in 3 years = 6,150 villages per year.

सरासरी परफॉर्मन्स नको असेल तर यूपीएच्या सर्वात वैट्ट काळातला परफॉर्मन्स पाहू.

In September 2010 the unelectrified villages number was 88748 in May 2014 it was 25982. So 63K in 44 months. More than 1.4 K per month ie more than 17K per year more than double of Modi Sarkar.

निष्कर्ष : यूपीएचं सरकार जाऊन मोदी सरकार आलं नसतं तर हे काम २०१५ मध्येच पूर्ण झालं असतं.

शेवटची खेडी अधिक दुर्गम असणार वगैरे सर्व मान्य आहे. पण यांनी अशी बोंबाबोंब केली होती की स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांनीही अजून १८ हजार खेडी विजेविना आहेत (आणि काँग्रेससरकारला त्याचं काहीच वाटत नाही वगैरे). प्रत्यक्षात ते ऑनगोईंग काम होतं.

दुसऱ्या प्रकारे सांगायचं तर स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारे होती म्हणून ७० वर्षात हे काम झालं. स्वातंत्र्यानंतर लगेच मोदी सरकार आलं असतं तर दीडशे वर्ष लागली असती. =))

*वर्तमानपत्रे वगैरेंनी हा डेटा प्रकाशित करायला सुरुवात केली तर कदाचित सरकारी वेबसाइटवरून हा डेटा गायब होऊ शकतो.

अनुप ढेरे Tue, 01/05/2018 - 11:34

In reply to by नितिन थत्ते

शेवटची खेडी अधिक दुर्गम असणार वगैरे सर्व मान्य आहे. पण यांनी अशी बोंबाबोंब केली होती की स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांनीही अजून १८ हजार खेडी विजेविना आहेत (आणि काँग्रेससरकारला त्याचं काहीच वाटत नाही वगैरे). प्रत्यक्षात ते ऑनगोईंग काम होतं.

इतक्या वर्षात वीज पोचली नाही हे खरच इन प्रोग्रेस काम आहे म्हणुन कंदोन करण्यासारखं आहे? सिरियसली?

नितिन थत्ते Tue, 01/05/2018 - 12:21

In reply to by अनुप ढेरे

इन प्रोग्रेस नव्हतं का? सिरिअसली?

म्हणजे कोणत्यातरी एका वर्षी "जितक्या खेड्यांमध्ये वीज पोचवायची ती पोचवून झाली आहे आणि ती उरलेली १८००० खेडी गेली तेल लावत" असं ॲटिट्यूड होतं का? की ८० हजार खेडी, ६० हजार खेडी ४० हजार २५ हजार अशी कंटिन्यूअस प्रगती चालू होती?

इतका वेळ का लागला असा प्रश्न असेल तर ढोल वाजवून केलेलं काम तर आधी झालेल्या कामाहून हळू केलं आहे. इतका कन्सर्न असेल तर सहा महिन्यात /एका वर्षात काम व्हायला हवं होतं. तीन वर्ष का लागली?

तुम्हाला खरंच हे समजत/ पटत नाहीये?

अनुप ढेरे Tue, 01/05/2018 - 13:47

In reply to by नितिन थत्ते

हाहहा. एकतर हे ढोल कांग्रेसने २००५मध्ये वाजवले होते. राजीव गांधी कसलीशी योजना म्हणुन. की २००९ सालापर्यंत आम्ही प्रत्येक गावात वीज पोचवु म्हणुन. त्या निकम्मेपणाबद्द्ल बोलणं सोडुन तीन वर्षात एवढीच गावं? हॅ... हे रिमार्क ऐकुन मजा वाटते.
इथे पहा.
http://archivepmo.nic.in/drmanmohansingh/speech-details.php?nodeid=87

The Prime Minister, Dr. Manmohan Singh, has said that the Government is committed to providing access to electricity to every village in the country by 2009. "The Rajiv Gandhi Gramin Vidyutikaran Yojana is one of the most important promises we are committed to fulfilling during the tenure of our Government", he added.

म्हणजे बघा, की कांग्रेसनी एक प्रामिस केलं. ते झेपलं नाही. चार पाच वर्षात करु म्हणाले ते दहा वर्षातदेखील जमलं नाही. मोदी सरकारने यांची हगोडी कामं संपवली तर "ह्या, याचं काय एवढंस. फाल्तु ढोल वाजवतायत" हे म्हणण आणि त्यावर दात काढणं म्हणजे भक्तीचा आणि निर्लज्जतेचा (बोले तो कांग्रेसी नेत्यांचा निर्लज्जपणा )कळस आहे.

नितिन थत्ते Tue, 01/05/2018 - 19:36

In reply to by अनुप ढेरे

समजा 2009 मध्ये किंवा कोणत्याही वर्षी हे काम पूर्ण झालं असतं तर "ते वर्ष वजा 1947 इतकी वर्षे" का लागावीत असा आक्षेप घेतलाच असता !!

अनुप ढेरे Tue, 01/05/2018 - 20:31

In reply to by नितिन थत्ते

गिरे तो भी टांग उपर असं म्हणतात वरील प्रतिसादाला. एकतर कांग्रेसने जितक्या दिवसात प्रामिस केलं त्याच्या दुप्पट वर्षातपण का जमल नाही याचं उत्तर नाही तुमच्याकडे. तरी काहितरी फुसकुली सोडायचा प्रयत्न चालुच आहे.

नितिन थत्ते Tue, 01/05/2018 - 19:34

In reply to by अनुप ढेरे

.

सरकार कामाला लागलं?

मी दिलेल्या लिंकवर आता डेटा दिसत नाही.

व्हॉट से ढेरेशास्त्री?

P.S.
सदर वेबसाईट्स पुन्हा दिसत आहेत . सबब माझा हा प्रतिसाद आता गैरलागू आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 30/04/2018 - 20:59

In reply to by चिंतातुर जंतू

बहुदा शैल चतुर्वेदीच्या दोन ओळी आहेत -

मैने टीसी से पूछा, क्या गाडी टाईम पे है।
उसने बोला, अबे गाडी पटरी पे है, क्या यही कम है।

गब्बर सिंग Mon, 30/04/2018 - 21:10

In reply to by चिंतातुर जंतू

मुमकिन हो कल जुबान-ओ-कलम पर बंदिशे
आंखों को गुफ्तगू का सलीका सिखाइये

--

शब्दार्थ खाली -

मुमकिन = शक्य
सलीका = पद्धत
गुफ्तगू = संभाषण

गब्बर सिंग Mon, 30/04/2018 - 20:48

In reply to by नितिन थत्ते

पहिले दोन परिच्छेद वाचले.
बऱ्याच भागाशी सहमत आहे.

पण त्यातले खालील वाक्य माझे असू शकत नाही -

नागरिकांचे उत्पन्नस्रोत वाढावेत, त्यांचे राहणीमान सुधारावे यासाठी त्यांना रोजगार वा व्यापारउदिमाच्या सुयोग्य संधी वा वातावरण निर्माण करून देणे हे सरकारचे प्राथमिक काम.

.

गब्बर सिंग Tue, 01/05/2018 - 08:05

In reply to by नितिन थत्ते

उसुवि मोड ऑन -

अहो तुमचा पहिला प्यारा .... म्हंजे काव्यमय ह्याचा हा आहे नुसता.... उत्कृष्ट नमूना.....

उसुवि मोड ऑफ्फ्

चिंतातुर जंतू Wed, 02/05/2018 - 14:16

मे १९६८च्या विद्यार्थी चळवळींच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पॅरिसमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये शंभरेक लोकांना अटक झाली आहे. राष्ट्राध्यक्ष माक्रों यांच्या आर्थिक धोरणांविरोधात रेल्वे कामगार आणि आणि इतर कामगार संघटनांनी गेल्या काही महिन्यांत संप पुकारले आहेत.

सुधीर Thu, 03/05/2018 - 09:06

१०% घरांमध्ये विज आली की आपण गावाचे विद्द्युतीकरण झाले असं आजही जाहीर करतो. आजही गावात विज आली तरी घरांमध्ये विज असण्याचं प्रमाण ४७%-१००% या पट्टीत आहे. हे वाचून मला अंतू बर्वा अजूनही आहेत याची खात्री पटली. रच्याकने, अंतू बर्वाचा हा हिंदी अनुवाद आवडला.

चिंतातुर जंतू Thu, 03/05/2018 - 13:16

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : राष्ट्रपतींऐवजी स्मृती इराणींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास कलाकारांचा नकार

चिंतातुर जंतू Thu, 03/05/2018 - 16:40

In reply to by चिंतातुर जंतू

पुरस्कार सोहळा इथे लाइव्ह पाहता येईल. खरोखर राष्ट्रपती उपस्थित नाहीत आणि इराणी पुरस्कार देत आहेत.

चिंतातुर जंतू Thu, 03/05/2018 - 19:42

In reply to by चिंतातुर जंतू

वाईट गोष्ट म्हणजे तांत्रिक पुरस्कार आणि भाषिक पुरस्कारांना राष्ट्रपती नव्हते, पण निवडक पुरस्कारांसाठीच होते. म्हणजे पंकज त्रिपाठीनं 'न्यूटन'साठीचा पुरस्कार इराणीबाईंकडून घेतला, पण विनोद खन्ना (दादासाहेब फाळके) आणि श्रीदेवीला 'मॉम'साठी मिळालेला पुरस्कार द्यायला होते. त्यामुळे एक प्रकारची जातिव्यवस्थाच निर्माण झाली.

अनुप ढेरे Thu, 03/05/2018 - 17:25

In reply to by चिंतातुर जंतू

या प्रकारची आर्टिकल ऑपईंडिया प्रकाशित करत असे, २०१५च्या आसपास. अल्टन्युजची प्रेरणा ऑपईंडिया आहे हे आयरॉनिक आहे :)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 03/05/2018 - 20:08

श्रद्धा कुंभोजकर* यांच्या फेसबुकवरून -

विद्यापीठ अनुदान आयोगानं मान्यता काढून घेतलेल्या नियतकालिकांच्या यादीत ईपीडब्ल्यू, भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचं 'इतिहास', इंडिअन हिस्टरी काँग्रेसचा वार्षिक संशोधननिबंधसंग्रह, दक्षिण भारत इतिहास परिषदेचा वार्षिक निबंधसंग्रह, अशी खूपच मान्यताप्राप्त नियतकालिकं आहेत. आयोग म्हणतोय की आम्ही खूप काळजीपूर्वक चिकित्सा करून आणि विश्लेषण करून हा निर्णय घेतलाय. आश्चर्यकारक आहे हे.

This is an amusing list of Journals Removed from the UGC-Approved List of Journals. It contains such 'Unapprovable' names as those of EPW, Itihasa of the Indian Council of Historical research, Proceedings of the Indian History Congress, Proceedings of the South Indian History Congress.

Mind you- This is not a mistake, but 'Careful Scrutiny and Analysis' - the website says -

"...the Standing Committee on Notification of Journals re-evaluated every journal title recommended by universities as well as those indexed by Indian Citation Index on filtering criteria defined by the Standing Committee. Based on careful scrutiny and analysis, 4305 journals are removed from the current UGC-Approved List of Journals because of poor quality / incorrect / insufficient information/ false claims. "

मान्यता काढून घेतलेल्या नियतकालिकांची यादी.

*श्रद्धा कुंभोजकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधन करतात.

नितिन थत्ते Fri, 04/05/2018 - 06:16

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अनुदान आयोगाने मान्यता काढून घेतली म्हणजे नक्की काय? ही नियतकालिके आयोगाच्या अनुदानावर चालत होती का?

की आयोगाच्या अनुदानाचे पैसे वापरून यापुढे विद्यापीठाना या नियतकालिकांची वर्गणी भरता येणार नाही?

चार्वी Fri, 04/05/2018 - 07:37

In reply to by नितिन थत्ते

मान्यता काढून घेतली म्हणजे या नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या शोधनिबंधांचे गुण कॉलेज/ विद्यापीठ शिक्षकांना मिळणार नाहीत. शैक्षणिक कामं, अशैक्षणिक कामं, संशोधन प्रकल्प, प्रकाशन अशा वेगवेगळ्या सदरांत शिक्षकांना प्रतिवर्षी विशिष्ट गुण मिळाले तरच कालांतराने पदोन्नती (व पर्यायाने पगारवाढ) मिळते.
EPW सारख्या प्रतिष्ठित व दर्जेदार नियतकालिकात प्रकाशित केलेल्या शोधनिबंधाला शून्य गुण, पण त्यामानाने कमी दर्जेदार नियतकालिकात प्रकाशित झालेल्या लेखाला मात्र अधिक गुण अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

गब्बर सिंग Fri, 04/05/2018 - 08:29

In reply to by चार्वी

EPW सारख्या प्रतिष्ठित व दर्जेदार नियतकालिकात प्रकाशित केलेल्या शोधनिबंधाला शून्य गुण, पण त्यामानाने कमी दर्जेदार नियतकालिकात प्रकाशित झालेल्या लेखाला मात्र अधिक गुण अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

.
ठ्ठो !!!
.
याचे मुख्य कारण - ज्यांचा शोधनिबंध प्रतिष्ठित व दर्जेदार नियतकालिकात प्रकाशित होत नाही ते उपेक्षित, शोषित, पीडीत, तळागाळातले, रंजले-गांजलेले, बिछडलेले, पुछडलेले, मुछडलेले. सबब त्यांना द्या सवलती.
.
.

नितिन थत्ते Fri, 04/05/2018 - 09:38

In reply to by चार्वी

म्हणजे आता ई पी डब्ल्यू मध्ये लेख न लिहिता दुसऱ्या नियतकालिकात लिहायचा इतकंच ना?

हे दुसरे नियतकालिक पाञ्चजन्य तर नव्हे?

ओंकार Fri, 04/05/2018 - 11:16

ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचं निधन

ऐसी वरील कोल्हटकरांचे काही नातेसंबंध असतील तर जुन्या गोष्टी वाचायला आवडतील.

- ओंकार.

'न'वी बाजू Sat, 05/05/2018 - 20:21

In reply to by गब्बर सिंग

नथुरामने जीनाला ठोकले नसते.

(असते, तर त्यालाही आत्याबाईप्रमाणेच काका म्हटले असते, ही बाब अलाहिदा. परंतु नसतेच ठोकले.)

गब्बर सिंग Sun, 06/05/2018 - 01:41

राहुल गांधी मधे अनेक सद्गुण आहेत __ इति शशी थरूर
.
त्या अनेक सद्गुणांपैकी एकदोन नमूद केले असतेत तर बरं नसतं का झालं ??
.