दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
८ मे
जन्मदिवस : इतिहासकार एडवर्ड गिबन (१७३७), 'रेडक्रॉस' सुरू करणाऱ्यांपैकी एक आँरी द्यूनाँ (१८२८), नोबेलविजेता अर्थतज्ज्ञ फ्रीडरिक हायेक (१८९९), सिनेदिग्दर्शक रोबेर्तो रोसेलिनी (१९०६), ग्राफिक डिझायनर सॉल बास (१९२०), पर्यावरणवादी डेव्हिड अटेनबरा (१९२६), गायिका गिरिजा देवी (१९२९), लेखक थॉमस पिंचन (१९३७), लेखिका व सामाजिक कार्यकर्ती नेओमी क्लाईन (१९७०), गायक, अभिनेता एन्रिके इग्लेस्यास (१९७५)
मृत्युदिवस : अर्थतज्ज्ञ जॉन स्टुअर्ट मिल (१८७३), लेखक ग्युस्ताव्ह फ्लोबेर (१८८०), थिऑसॉफिक सोसायटीची एक संस्थापक सदस्य हेलेना ब्लाव्हात्स्की (१८९१), स्वातंत्र्यवीर वासुदेव चाफेकर (१८९९), चित्रकार पॉल गोगँ (१९०३), छायाचित्रकार इ. मयब्रिज (१९०४), कवी अनिल उर्फ आत्माराम रावजी देशपांडे (१९८२), बौद्ध वाङ्मयाचे भाषांतरकार चिंतामण राजवाडे (१९२०), विज्ञानकथालेखक थिओडोर स्टर्जन (१९८५), अभिनेता डर्क बोगार्ड (१९९९), ‘भारतीय व्यवहार कोश’ आणि ‘भारतीय कहावत संग्रह’चे संपादक, कोशकार विश्वनाथ दिनकर नरवणे (२००३), संस्कृत व प्राकृत भाषासाहित्यांचे अभ्यासक अमृत घाटगे (२००३), लेखक मॉरिस सेंडक (२०१२), धृपदगायक झिया फरिदुद्दिन डागर (२०१३)
--
जागतिक रेडक्रॉस दिवस.
वर्धापनदिन : रवींद्र भारती विद्यापीठ, कोलकाता (१९६२)
१७९४ : फ्रेंच राज्यक्रांती - आधुनिक रसायनशास्त्राचा उद्गाता आँत्वान लाव्ह्वाझिएला गिलोटिनवर मृत्युदंड दिला गेला.
१८८६ : डॉ. जॉन पेंबरटन याने 'कोका-कोला'ची निर्मिती केली.
१९१२ : 'द गॉडफादर' व 'श्रेक'सारख्या चित्रपटांचे वितरण करणाऱ्या पॅरामाऊंट पिक्चर्सची स्थापना.
१९३३ : म. गांधींचे २१ दिवसांचे उपोषण सुरू.
१९७८ : रेनहोल्ड मेस्नर व त्याचा सहकारी ऑक्सिजनच्या नळकांड्याविना एव्हरेस्टवर पोहोचले.
१९८४ : शीतयुद्ध - लॉस अँजेलिस येथे होऊ घातलेल्या ऑलिंपिक खेळांवर सोव्हिएत युनियनने बहिष्कार घातला.
२००० : लंडनमध्ये टेट मॉडर्न गॅलरी प्रसारमाध्यमांसाठी खुली झाली. आधुनिक कलेच्या जगातील सर्वात महत्त्वाच्या संग्रहालयांपैकी टेट हे एक आहे.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
अपेक्षित
खरोखर दाद द्यावी अशी बातमी. हेच धोरण उन्हाळ्यापर्यंत राबवले की 'शिवनेरी' अधिक तोट्यात जायला हरकत नाही. सरकारी निर्बुद्ध बाबुगिरीचे एक खास उदाहरण.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
आधीच
आधीच स्वारगेट-बोरिवली बसला प्रायव्हेटचे भाडे ३५०/- असताना शिवनेरीचे ४३५ ठेवून पायावर धोंडा पाडून घेतलाच आहे. आता चटके देऊन गिर्हाईके पळवून लावा.
संपूर्ण भारताचेच एक 'मेंटल हॉस्पिटल' झाले आहे असे वाटते.
हा हा
पडदे काढून टाकले की प्रवासी कमी होतील. आणि मग एखादीच तरुणी आणि साताठ पोरांचं टोळकं एवढेच लोक प्रवास करत असण्याची शक्यता वाढेल.
मूळ प्रश्नावर तोडगा न काढता
मूळ प्रश्नावर तोडगा न काढता केवळ 'पॅचवर्क' करणे हे तर सरकारी कामांचे वैशिष्ट्य आहे.
जोवर अपराध करणार्यांच्या मनात आपण पकडले जाऊ शकतो ही आणि त्यानंतर होणार्या शिक्षेबद्दल भीती निर्माण होत नाही तोवर ते अपराध करतच राहणार. ह्याबाबत अमेरिकेतील वाहतूक व्यवस्थेचे उदाहरण अतिशय चांगले आहे. मुळात वाहतुकीचे नियम तोडल्यावर होणारी शिक्षा जबर आहे. त्यामुळे इथे कोणी सहसा वाहतुकीचे नियम तोडताना आढळत नाही. मी सध्या ज्या शहरात राहतो तिथे 'Yield to pedestrians' हा नियम सगळे वाहनचालक काटेकोरपणे पाळतात असा माझा अनुभव आहे. चालणार्या माणसाने पदपथावरून रस्त्यावर पाऊल टाकल्यावर वाहने त्याच्यापासून जवळपास चार फूट अंतरावर थांबतात. जर आईवडील हा नियम काटेकोरपणे पाळत असतील तर मुलांवर आपोआपच वाहतुकीचे नियम पाळण्याचे संस्कार होतात. सुरुवातीच्या पिढीला कदाचित जाचक वाटतील असे हे नियम पुढच्या पिढ्यांसाठी स्वाभाविक होऊन जातात. इथे येणारे भारतीय लोक भारतात कदाचित कधीही नियम पाळणार नाहीत पण इथे झक्कत पाळतात, त्याचे कारण नियम न पाळल्यास दणकून होणारा दंड. अशी न्यायव्यवस्था/दंडव्यवस्था भारतात अस्तित्वात येणे गरजेचे आहे. जेणेकरून माणसाने अपराध करण्याआधी दहादा विचार करावा.
सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे
अवांतरः जबर शिक्षेपेक्षा
अवांतरः जबर शिक्षेपेक्षा 'नक्की' आणि 'लगेच' होणारी शिक्षा अधिक दहशत बसवते असे वाटते. बाकी सहमत
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शिक्षेचे मुख्य उद्दिष्ट हे
शिक्षेचे मुख्य उद्दिष्ट हे बाकीच्यांना दहशत बसवणे हेच आहे असे वाटते. ज्ञानेश्वरांच्या शब्दांत सांगायचे झाले तर 'जे खळांची व्यंकटी सांडो'.
त्यामुळे नक्की आणि लगेच होणारी शिक्षा गरजेची आहेच, परंतु कुठेतरी असे देखील वाटते की जबरी शिक्षा असेल तर दहशत अधिक बसेल. कारण शिक्षा 'नाममात्र' देखील असू शकते आणि तिने काही विशेष फरक पडेल असे वाटत नाही.
सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे
सर्कार्चा इजय सो!!!!
सर्कार्चा इजय सो!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सो व्हॉट ?
काय फरक पडतो ?
एखाद्या स्लिपर कोच मधून जाताना आपण १०००/- रुपड्याचे तिकिट काढलेले असून देखील पांघरुण घरुनच घेऊन जातो की. तसेच हवा असेल तर पडदा देखील घरुनच घेऊन जायचा. हाय काय आन नाय काय !
बाकी बाहेरच्यांना दिसू नये असे पडदा लावून लोकांना शिवनेरीत करायचे तरी काय असते?
सरकारने तत्परतेने काही का होईना पण अॅक्शन घ्यायला सुरुवात केली ह्यासाठी आपण सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव इथे आणायला हवा.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
१००० रुपये वाले स्लिपर कोच
१००० रुपये वाले स्लिपर कोच वाले माजोरडे दिसतात. ७००-८०० वाले पांघरुण पण देतात.
असो
बातमी वाचुन मजा वाटली. एकुणच नको ते निर्णय घेण्यात सरकार पुढे असते
अंमळ गल्लत होते आहे का ?
मी ते पांघरुण देत नाहीत असे कधी म्हणालो ? मी फक्त आपण घरुनच घेऊन जातो असे म्हणतो आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
पुर्ववत
काही काळानंतर हे सर्व पुर्ववत होईल.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
फालतुगिरीला मर्यादा नाही
सरकार काय करेल ह्यचा काय नेम नाही. सकाळी सकाळी उठ्ल्यावर "आज कुछ तुफानी करते है" असे वाटत असावे.