दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१० मे
जन्मदिवस : संगीतकार, लेखक आणि चित्रकार उपेंद्रकिशोर राय (१८६३), जगातील सर्वात प्राचीन सिनेकंपनीचा जनक लेआँ गोमाँ (१८६४), सिनेसंगीतकार मॅक्स श्टाइनर (१८८८), नर्तक, अभिनेता व गायक फ्रेड अॅस्टेअर (१८९९), सिनेनिर्माता डेव्हिड सेल्त्झनिक (१९०२),संगीतकार, गायक व अभिनेता पंकज मलिक (१९०५), गीतकार जगदीश खेबूडकर (१९३२), कवी ग्रेस उर्फ माणिक गोडघाटे (१९३७), लेखिका नयनतारा सहगल (१९२७)
मृत्युदिवस : चित्रकार होकुसाई (१८४९), संगीतज्ञ जहांगीर खाँ (१९७७), नाटककार पीटर वाइस (१९८२), पत्रकार आणि ‘साधना’ साप्ताहिकाचे माजी संपादक यदुनाथ थत्ते (१९९८), कवी ना. घ. देशपांडे (२०००), कवी, गीतकार, पटकथाकार, संवादलेखक कैफी आजमी (२००२), संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा (२०२२)
--
महाराष्ट्र जलसंधारण दिन.
इ.पू. २८ : सौरडागांचे पहिले ज्ञात निरीक्षण चीनमध्ये नोंदले गेले
१८१८ : तहाद्वारे रायगड इंग्रजांच्या ताब्यात
१७७३ : ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीला अमेरिकन बाजारपेठेची मक्तेदारी देणारा टी अॅक्ट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये संमत झाला. १६ डिसेंबरची विख्यात 'बॉस्टन टी पार्टी' त्याविरोधात होती
१७७४ : फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान ज्यांची राजवट जनतेने उलथली ते सोळावा लुई व मारी ऑन्त्वानेत फ्रान्समध्ये सिंहासनाधिष्ठित
१८२४ : लंडनमधील जागतिक कीर्तीचे संग्रहालय 'नॅशनल गॅलरी' जनतेला खुले झाले
१८५७ : ब्रिटिशांविरोधात उठावाची पहिली ठिणगी मीरतला पडली
१९३३ : हिटलरच्या राजवटीत ज्यांच्या लिखाणावर बंदी घातली गेली अशा लेखकांची २५,००० पुस्तके नाझींनी बर्लिन येथे सार्वजनिकरीत्या जाळली
१९४० : दुसरे महायुद्ध : विन्स्टन चर्चिलची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती
१९४८ : चीनमध्ये राष्ट्राध्यक्षाला विशेषाधिकार बहाल. ते १९९१पर्यंत टिकले
१९६२ : 'इन्क्रेडिबल हल्क'चे पहिले कॉमिक पुस्तक उपलब्ध
१९६८ : 'नाइट ऑफ द बॅरिकेड्स' - पॅरिसच्या लॅटिन क्वार्टरमध्ये विद्यार्थी व पोलिसदलात रात्रभर चकमकी
१९७५ : सोनीने बेटामॅक्स व्हीसीआर जपानमध्ये बाजारात आणला. ऐंशीच्या दशकात व्हीएचएस फॉर्मॅटने त्यावर बाजी मारली
१९८१ : मुंबईत पहिला विद्युतप्रकाशातला क्रिकेट सामना खेळला गेला
१९९४ : दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या बहुवांशिक विधिमंडळाने प्रचंड बहुमताने नेल्सन मंडेलांना राष्ट्राध्यक्ष निवडले
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
अपेक्षित
खरोखर दाद द्यावी अशी बातमी. हेच धोरण उन्हाळ्यापर्यंत राबवले की 'शिवनेरी' अधिक तोट्यात जायला हरकत नाही. सरकारी निर्बुद्ध बाबुगिरीचे एक खास उदाहरण.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
आधीच
आधीच स्वारगेट-बोरिवली बसला प्रायव्हेटचे भाडे ३५०/- असताना शिवनेरीचे ४३५ ठेवून पायावर धोंडा पाडून घेतलाच आहे. आता चटके देऊन गिर्हाईके पळवून लावा.
संपूर्ण भारताचेच एक 'मेंटल हॉस्पिटल' झाले आहे असे वाटते.
हा हा
पडदे काढून टाकले की प्रवासी कमी होतील. आणि मग एखादीच तरुणी आणि साताठ पोरांचं टोळकं एवढेच लोक प्रवास करत असण्याची शक्यता वाढेल.
मूळ प्रश्नावर तोडगा न काढता
मूळ प्रश्नावर तोडगा न काढता केवळ 'पॅचवर्क' करणे हे तर सरकारी कामांचे वैशिष्ट्य आहे.
जोवर अपराध करणार्यांच्या मनात आपण पकडले जाऊ शकतो ही आणि त्यानंतर होणार्या शिक्षेबद्दल भीती निर्माण होत नाही तोवर ते अपराध करतच राहणार. ह्याबाबत अमेरिकेतील वाहतूक व्यवस्थेचे उदाहरण अतिशय चांगले आहे. मुळात वाहतुकीचे नियम तोडल्यावर होणारी शिक्षा जबर आहे. त्यामुळे इथे कोणी सहसा वाहतुकीचे नियम तोडताना आढळत नाही. मी सध्या ज्या शहरात राहतो तिथे 'Yield to pedestrians' हा नियम सगळे वाहनचालक काटेकोरपणे पाळतात असा माझा अनुभव आहे. चालणार्या माणसाने पदपथावरून रस्त्यावर पाऊल टाकल्यावर वाहने त्याच्यापासून जवळपास चार फूट अंतरावर थांबतात. जर आईवडील हा नियम काटेकोरपणे पाळत असतील तर मुलांवर आपोआपच वाहतुकीचे नियम पाळण्याचे संस्कार होतात. सुरुवातीच्या पिढीला कदाचित जाचक वाटतील असे हे नियम पुढच्या पिढ्यांसाठी स्वाभाविक होऊन जातात. इथे येणारे भारतीय लोक भारतात कदाचित कधीही नियम पाळणार नाहीत पण इथे झक्कत पाळतात, त्याचे कारण नियम न पाळल्यास दणकून होणारा दंड. अशी न्यायव्यवस्था/दंडव्यवस्था भारतात अस्तित्वात येणे गरजेचे आहे. जेणेकरून माणसाने अपराध करण्याआधी दहादा विचार करावा.
सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे
अवांतरः जबर शिक्षेपेक्षा
अवांतरः जबर शिक्षेपेक्षा 'नक्की' आणि 'लगेच' होणारी शिक्षा अधिक दहशत बसवते असे वाटते. बाकी सहमत
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शिक्षेचे मुख्य उद्दिष्ट हे
शिक्षेचे मुख्य उद्दिष्ट हे बाकीच्यांना दहशत बसवणे हेच आहे असे वाटते. ज्ञानेश्वरांच्या शब्दांत सांगायचे झाले तर 'जे खळांची व्यंकटी सांडो'.
त्यामुळे नक्की आणि लगेच होणारी शिक्षा गरजेची आहेच, परंतु कुठेतरी असे देखील वाटते की जबरी शिक्षा असेल तर दहशत अधिक बसेल. कारण शिक्षा 'नाममात्र' देखील असू शकते आणि तिने काही विशेष फरक पडेल असे वाटत नाही.
सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे
सर्कार्चा इजय सो!!!!
सर्कार्चा इजय सो!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सो व्हॉट ?
काय फरक पडतो ?
एखाद्या स्लिपर कोच मधून जाताना आपण १०००/- रुपड्याचे तिकिट काढलेले असून देखील पांघरुण घरुनच घेऊन जातो की. तसेच हवा असेल तर पडदा देखील घरुनच घेऊन जायचा. हाय काय आन नाय काय !
बाकी बाहेरच्यांना दिसू नये असे पडदा लावून लोकांना शिवनेरीत करायचे तरी काय असते?
सरकारने तत्परतेने काही का होईना पण अॅक्शन घ्यायला सुरुवात केली ह्यासाठी आपण सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव इथे आणायला हवा.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
१००० रुपये वाले स्लिपर कोच
१००० रुपये वाले स्लिपर कोच वाले माजोरडे दिसतात. ७००-८०० वाले पांघरुण पण देतात.
असो
बातमी वाचुन मजा वाटली. एकुणच नको ते निर्णय घेण्यात सरकार पुढे असते
अंमळ गल्लत होते आहे का ?
मी ते पांघरुण देत नाहीत असे कधी म्हणालो ? मी फक्त आपण घरुनच घेऊन जातो असे म्हणतो आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
पुर्ववत
काही काळानंतर हे सर्व पुर्ववत होईल.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
फालतुगिरीला मर्यादा नाही
सरकार काय करेल ह्यचा काय नेम नाही. सकाळी सकाळी उठ्ल्यावर "आज कुछ तुफानी करते है" असे वाटत असावे.