दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१४ मे
जन्मदिवस : छत्रपती संभाजी (१६५७), चित्रकार थॉमस गेन्सबरो (१७२७), लैंगिक तज्ज्ञ व समलैंगिकांच्या हक्कांसाठी लढणारा मॅग्नस हिर्शफेल्ड (१८६८), संगीतसंयोजक ऑटो क्लेम्परर (१८८५), वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधन करणारा पिएर ओजे (१८९९), सिनेदिग्दर्शक मृणाल सेन (१९२३), 'स्टार वॉर्स'चा निर्माता, दिग्दर्शक जॉर्ज लुकस (१९४४), 'बॅक टू द फ्यूचर'मुळे प्रसिद्ध दिग्दर्शक रॉबर्ट झेमेकिस (१९५१), अभिनेत्री केट ब्लँचेट (१९६९), सिनेदिग्दर्शिका सोफिया कोपोला (१९७१), संगणकतंत्रज्ञ प्रणव मिस्त्री (१९८१), फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग (१९८४), मॉडेल, अभिनेत्री झरीन खान (१९८४)
मृत्युदिवस : नाटककार ऑगस्ट स्टिंडबर्ग (१९१२), लैंगिक तज्ज्ञ व समलैंगिकांच्या हक्कांसाठी लढणारा मॅग्नस हिर्शफेल्ड (१९३५), कायदेपंडित व समाजसुधारक ना. ग. चंदावरकर (१९२३), भाषाकोविद आणि कोशकार डॉ. रघुवीर (१९६३), लेखिका जीन ऱ्हीस (१९७९), अभिनेत्री रीटा हेवर्थ (१९८७), गायक, अभिनेता फ्रँक सिनात्रा (१९९८), समाजसुधारक असगर अली इंजिनियर (२०१३), मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके (२०२०)
---
स्वातंत्र्यदिन : इस्राएल
१७७६ : एडवर्ड जेन्नरने पहिली देवीची लस टोचली.
१८४४ : मोर्स कोडचा जनक सॅम्युअल मोर्स याने अमेरिकेतील टेलिग्राफद्वारा पहिला संदेश पाठवला.
१८७९ : भारतातल्या वेठबिगारांचा पहिला समूह फिजी बेटावर आला.
१९२५ : व्हर्जिनिया वूल्फची कादंबरी 'मिसेस डॅलोवे' प्रकाशित झाली.
१९२९ : प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये विल्फ्रेड ऱ्होड्सने ४०००वा बळी घेतला.
१९४८ : डेव्हीड बेन गुरीयन यांनी इस्राएल या स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीची घोषणा केली. लगेचच शेजारच्या अरब राष्ट्रांनी त्याच्याशी युद्ध सुरू केले.
१९५५ : शीतयुद्ध : सोव्हिएत संघ आणि पूर्व युरोपातील साम्यवादी देशांनी वॉर्सा करार मंजूर केला. 'नाटो'च्या निर्मितीला हे प्रत्युत्तर होते.
१९७० : 'बादर-माईनहॉफ गट' या कट्टर डाव्या विचारांच्या विद्रोही गटाची प. जर्मनीत स्थापना.
१९७३ : पहिले अमेरिकन अवकाशस्थानक 'स्कायलॅब'चे यशस्वी प्रक्षेपण.
१९७६ : भारत-पाकिस्तानमध्ये मैत्रीला चालना देण्यासाठी आपसांत विमान आणि रेल्वेवाहतूक सुरू करण्याचा निर्णय.
१९९८ : 'साईनफेल्ड' या टीव्ही मालिकेच्या शेवटच्या भागाचे प्रसारण.
२००२ : भारत सरकारने मारुती उद्योग लिमिटेड या कंपनीमधील आपल्या हिश्शाची रक्कम कमी केली आणि तो भाग सुझुकी मोटर कॉर्पोरेशनला एक हजार कोटी रुपयांना विकला.
२०१३ : 'बोको हराम'च्या दहशतवादी कृत्यांमुळे नायजेरियात आणीबाणीची घोषणा.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
अपेक्षित
खरोखर दाद द्यावी अशी बातमी. हेच धोरण उन्हाळ्यापर्यंत राबवले की 'शिवनेरी' अधिक तोट्यात जायला हरकत नाही. सरकारी निर्बुद्ध बाबुगिरीचे एक खास उदाहरण.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
आधीच
आधीच स्वारगेट-बोरिवली बसला प्रायव्हेटचे भाडे ३५०/- असताना शिवनेरीचे ४३५ ठेवून पायावर धोंडा पाडून घेतलाच आहे. आता चटके देऊन गिर्हाईके पळवून लावा.
संपूर्ण भारताचेच एक 'मेंटल हॉस्पिटल' झाले आहे असे वाटते.
हा हा
पडदे काढून टाकले की प्रवासी कमी होतील. आणि मग एखादीच तरुणी आणि साताठ पोरांचं टोळकं एवढेच लोक प्रवास करत असण्याची शक्यता वाढेल.
मूळ प्रश्नावर तोडगा न काढता
मूळ प्रश्नावर तोडगा न काढता केवळ 'पॅचवर्क' करणे हे तर सरकारी कामांचे वैशिष्ट्य आहे.
जोवर अपराध करणार्यांच्या मनात आपण पकडले जाऊ शकतो ही आणि त्यानंतर होणार्या शिक्षेबद्दल भीती निर्माण होत नाही तोवर ते अपराध करतच राहणार. ह्याबाबत अमेरिकेतील वाहतूक व्यवस्थेचे उदाहरण अतिशय चांगले आहे. मुळात वाहतुकीचे नियम तोडल्यावर होणारी शिक्षा जबर आहे. त्यामुळे इथे कोणी सहसा वाहतुकीचे नियम तोडताना आढळत नाही. मी सध्या ज्या शहरात राहतो तिथे 'Yield to pedestrians' हा नियम सगळे वाहनचालक काटेकोरपणे पाळतात असा माझा अनुभव आहे. चालणार्या माणसाने पदपथावरून रस्त्यावर पाऊल टाकल्यावर वाहने त्याच्यापासून जवळपास चार फूट अंतरावर थांबतात. जर आईवडील हा नियम काटेकोरपणे पाळत असतील तर मुलांवर आपोआपच वाहतुकीचे नियम पाळण्याचे संस्कार होतात. सुरुवातीच्या पिढीला कदाचित जाचक वाटतील असे हे नियम पुढच्या पिढ्यांसाठी स्वाभाविक होऊन जातात. इथे येणारे भारतीय लोक भारतात कदाचित कधीही नियम पाळणार नाहीत पण इथे झक्कत पाळतात, त्याचे कारण नियम न पाळल्यास दणकून होणारा दंड. अशी न्यायव्यवस्था/दंडव्यवस्था भारतात अस्तित्वात येणे गरजेचे आहे. जेणेकरून माणसाने अपराध करण्याआधी दहादा विचार करावा.
सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे
अवांतरः जबर शिक्षेपेक्षा
अवांतरः जबर शिक्षेपेक्षा 'नक्की' आणि 'लगेच' होणारी शिक्षा अधिक दहशत बसवते असे वाटते. बाकी सहमत
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शिक्षेचे मुख्य उद्दिष्ट हे
शिक्षेचे मुख्य उद्दिष्ट हे बाकीच्यांना दहशत बसवणे हेच आहे असे वाटते. ज्ञानेश्वरांच्या शब्दांत सांगायचे झाले तर 'जे खळांची व्यंकटी सांडो'.
त्यामुळे नक्की आणि लगेच होणारी शिक्षा गरजेची आहेच, परंतु कुठेतरी असे देखील वाटते की जबरी शिक्षा असेल तर दहशत अधिक बसेल. कारण शिक्षा 'नाममात्र' देखील असू शकते आणि तिने काही विशेष फरक पडेल असे वाटत नाही.
सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे
सर्कार्चा इजय सो!!!!
सर्कार्चा इजय सो!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सो व्हॉट ?
काय फरक पडतो ?
एखाद्या स्लिपर कोच मधून जाताना आपण १०००/- रुपड्याचे तिकिट काढलेले असून देखील पांघरुण घरुनच घेऊन जातो की. तसेच हवा असेल तर पडदा देखील घरुनच घेऊन जायचा. हाय काय आन नाय काय !
बाकी बाहेरच्यांना दिसू नये असे पडदा लावून लोकांना शिवनेरीत करायचे तरी काय असते?
सरकारने तत्परतेने काही का होईना पण अॅक्शन घ्यायला सुरुवात केली ह्यासाठी आपण सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव इथे आणायला हवा.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
१००० रुपये वाले स्लिपर कोच
१००० रुपये वाले स्लिपर कोच वाले माजोरडे दिसतात. ७००-८०० वाले पांघरुण पण देतात.
असो
बातमी वाचुन मजा वाटली. एकुणच नको ते निर्णय घेण्यात सरकार पुढे असते
अंमळ गल्लत होते आहे का ?
मी ते पांघरुण देत नाहीत असे कधी म्हणालो ? मी फक्त आपण घरुनच घेऊन जातो असे म्हणतो आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
पुर्ववत
काही काळानंतर हे सर्व पुर्ववत होईल.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
फालतुगिरीला मर्यादा नाही
सरकार काय करेल ह्यचा काय नेम नाही. सकाळी सकाळी उठ्ल्यावर "आज कुछ तुफानी करते है" असे वाटत असावे.