मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५१
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================
जीर्ण झालेल्या नोटा बदलायच्या असतील तर काय प्रोसिजर आहे? पुण्यात कुठे बदलून मिळतात?
प्रश्न नव्हे,
प्रश्न नव्हे, विचार.
महाराष्ट्र टाईम्स वगैरे वर्तमानपत्रं दहावी बारावीच्या परीक्षेत प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम गुण मिळवणार्या पोरापोरींना वाचकांकडून मदत मिळावी म्हणून आवाहन करतात. चेक थेट विद्यार्थ्यांच्याच नावाने काढायचे असल्याने बर्यापैकी पारदर्शकता आहे.
या प्रत्येक होतकरु कँडिडेटच्या घरची आणि परिस्थितीची माहिती वेगवेगळी दिलेली दिसते. साधारणपणे हातगाडीवाले, भाजीपालाविक्रेते, मोलकरणी किंवा तत्सम व्यवसायातले पालक दिसतात. नाहीतर मग विकलांगता, आजार अशी काही खडतर परिस्थिती. त्यातून उभं राहात राहात यांनी अभ्यास केला आणि मार्क्स मिळवले याचं कौतुक आहे. पण अगदी झाडून सर्वांना फक्त इंजिनियर किंवा डॉक्टर यापैकी एकच व्हायचं आहे. हे दोन व्यवसाय म्हणजेच गरीबीतून बाहेर येण्याचे राजमार्ग, असं खरंच आहे का? की इतर कोर्सेसना पैसे फारसे लागणार नाहीत अश्या अंदाजाने डॉक्टर आणि इंजिनियरेच्छुकच निवडले जात असावेत या मदतीसाठी? हे व्यवसाय वाईट आहेत असं नव्हे पण एकाचवेळी पन्नासेक होतकरुंपैकी प्रत्येकाला याखेरीज एकही ऑप्शन ध्येय म्हणून दिसू नये याचं वाईट वाटतं.
का?
पण अगदी झाडून सर्वांना फक्त इंजिनियर किंवा डॉक्टर यापैकी एकच व्हायचं आहे. हे दोन व्यवसाय म्हणजेच गरीबीतून बाहेर येण्याचे राजमार्ग, असं खरंच आहे का?
आपल्या शिक्षणप्रवाहात चांगले मार्क पाडणारा प्रतिभावान असण्याची शक्यता कमी आहे, तो मेहनत करणारा आणि तांत्रिक विषयात गती असणाराच असणार, तो इतरत्र जायचा विचार का करेल?
व्यक्तिगत विचारानुसार त्यांना
व्यक्तिगत विचारानुसार त्यांना मदत देण्यातून आणखी एक डॉक्टर किंवा इंजिनियरच निर्माण होण्याचं ठरलेलं असेल तर ती मदत देण्यातली इच्छा क्षीण झाल्यासारखी वाटतेय. त्यांनी काय करावं हा अर्थातच त्यांचा निर्णय.. पण इतर पर्यायच त्यांच्या मनात येण्याइतपतही चमकदार नसावेत असं नको असं वाटतं. दहावीच्या लेव्हलला ते इंजिनियर व्हायचं किंवा डॉक्टर व्हायचं इतकंच नव्हे तर त्यातलं स्पेशलायझेशनही सांगताहेत (नेमका कशाचा सर्जन, नेमका कोणत्या प्रकारचा इंजिनियर इ इ) तर मग सीए, सीएस, यूपीएससी, प्रीमियम एमबीए, प्रोफेसर, शास्त्रज्ञ, नेव्ही, मर्चंट नेव्ही, संशोधक, फॉरेन लँग्वेजमधे उच्चशिक्षण अशापैकी काहीच ऑप्शन मनात असू नये एकाच्याही?
साधारण ट्रेन्ड बघुनच बरेचजण
साधारण ट्रेन्ड बघुनच बरेचजण ठरवत असावेत, इतर उच्चशिक्षणाबद्दलचे अज्ञान आणि त्याचे जवळचे आर्थिक फायदे ह्याबद्दलही फारशी माहिती ना मागत मिळत असेल ह्याबद्दल साशंक आहे, त्यातही हुशार असणारे पुढे डॉक्टरेट करण्याचा प्रतत्न करतातच पण मुळातच सर्वायव्हल हाच एक उद्देश बर्याच अंशी असतो असे माझ्या माहितीत पहाण्यात आले आहे.
व्यक्तिगत विचारानुसार त्यांना मदत देण्यातून आणखी एक डॉक्टर किंवा इंजिनियरच निर्माण होण्याचं ठरलेलं असेल तर ती मदत देण्यातली इच्छा क्षीण झाल्यासारखी वाटतेय.
मदत समतेसाठी आहे का इतर काही कारणांसाठी वैयक्तिक मुद्दा आहे.
खरे तर मर्चंट नेव्ही मधे
खरे तर मर्चंट नेव्ही मधे कॅडेट म्हणुन जाणे हे ही शक्य आहे ( १२ वी नंतर ). आणि सैन्यदलाचा पर्याय पण आहेच.
माझ्या ओळखीतला एक माणुस बराच पूर्वी १२ वी नंतर एस्सार शिपिंग मधे कॅडेट म्हणुन लागला. पगार जवळजवळ नव्हताच, पण खाउन पिउन शिप वर काम होते. तो वयाच्या ३० व्या वर्षी कॅप्टन ची परीक्षा पास झाला. गेले कीत्येक वर्ष ऑईल आणि केमिकल चे टँकर वर कॅप्टन म्हणुन काम करतोय.
दोन्ही ला पैसे लागत नाहीत.
बहुधा हा सिलेक्शन बायस असावा.
बहुधा हा सिलेक्शन बायस असावा. मर्चंट नेव्ही, सिक्युरिटी, आर्ट्स इत्यादिंकडे जायचे तर कदाचित प्रचंड आर्थिक खर्च नसेल. मग मदत कसली मागायची व्यासपीठाद्वारे? म्हणून अशा इच्छा असलेल्यांना या लिस्टमधे स्थानच नसेल. केवळ खर्चिक कोर्सेस करु इच्छिणारेच लोक त्यात येत असतील.
चुकीची गैरसमजूत आहे.
मर्चंट नेव्हीचा 'शैक्षणिक' खर्च प्रचण्ड आहे. अन 'नोकरी' मिळवायला लय हाय उपस करावी लागते. माझे दोन जवळचे लोक यात आहेत. पहिला चीफ इंजिनियर, कॅप्टन इतकाच पगार मिळवतो, जो महिना ६ लाख रफली पडतो, यांना संपूर्ण टॅक्स माफी असते. दुसरा मुलगा नुकताच जॉईन झाला, याला जॉईन करून घेण्यासाठी पहिल्या चीफ इंजिनियरनेही फार वशिले लावले तेव्हा जमले.
नेव्हीत क्लास४ म्हणून लागायचे तरीही भरपूर कष्ट आहेत.
*
शिकुरिटीवाले भिकार्यापेक्षा ही बरे कमवत नाहीत. सिक्युरिटी एजन्सीतून जी माणसे मिळतात त्यांना जास्तीत जास्त २-३०० रुपये रोज मिळतो. रोजंदारीवरच कंत्राटी असतात. रात्रभर हास्पिटलाबाहेर खुर्चीत पेंगणारा खाकीवर्दीवाला 'शिकुरिटी' मॅक्स ४-५ हजार रुपये महिन्यावर काम करतो. आय मीन तितके पैसे मी एजन्सीवाल्याला देतो. याला किती मिळतात कुणास ठाऊक.
*
आर्ट्स :
हे करून शक्यतो सिव्हिल सर्विसमधे घुसण्याच मुलांचा कल असतो. अगदी आयेयेस नव्हे, तर एम्पीएस्सी तरी. प्रोबेशनमधेच दोन्ही हातानी अन पायांनीही खायला सुरुवात करतात.
यातही जमत नाही ती मुलं, पहाट-सायंकाळच्यावेळी जर स्टेट हायवेवरून गाडी चालवत गेलात, तर कोणत्याही खेड्याजवळ रस्त्याच्या बाजूने पळत जाणारी तरूण मुले दिसतात. हे असतात 'भरती'वाले. पोलीस, एसार्पी, अन तत्सम अनेक प्रकारच्या भरत्या भारतात सुरू असतात. त्यातल्या कुठल्याही खाकी वर्दीत घुसून शक्य तितक्या लवकर खाणे, हाच प्रकार असतो.
***
"अभ्यास" करून पुढे जायचं, तर इंजिनियर होऊन आयटीत/कंपनीत, अन डॉक्टर होऊन सेल्फ एंप्लॉयमेंट, या दोनच ठिकाणी थोडं सीधं जगता येतं, असं तरुणाईचं एकंदर इंप्रेशन आहे.
-- असे माझे मत.
मर्चंट नेव्हीचा 'शैक्षणिक'
मर्चंट नेव्हीचा 'शैक्षणिक' खर्च प्रचण्ड आहे.
मर्चंट नेव्हीत जाण्याचे बरेच मार्ग आहेत. मी कॅडेट म्हणुन जाण्याच्या मार्गा बद्दल बोलत होते. ज्यात तुम्हाला फुकट राबवून घेतात, पण शिकवतात पण. नंतर थर्ड ऑफिसर म्हणुन काम मिळते आणि पगार चालू होते. त्याच्या पुढे परिक्षा देत ( स्वताच्या खर्चाने ) कॅप्टन पर्यंत पोचु शकता.
सूर्यनमस्कार हा व्यायामप्रकार
सूर्यनमस्कार हा व्यायामप्रकार म्हणून परिचित आहे. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात घातल्यास व्यायामाबरोबरच ड जीवनसत्वाचा लाभ होतो. पण त्यासाठी उघड्या अंगाने नमस्कार घातल्यास ड जीवनसत्वाचा लाभ जास्त असतो.
जर बंद खोलीत/ बंद कपड्यानिशी घातल्यास त्याला म्हणून सूर्यनमस्कार का म्हणावे?? फक्त "ओम मित्राय नमः" वगैरे नावे घेतली म्हणून.. ड जीवनसत्वाव्यतिरीक्त सूर्याचं आणखी काही काँट्रिब्युशन असावं का? अन्यथा या व्यायामप्रकाराला साष्टांग नमस्कार हे नाव जास्त योग्य वाटते.
सुर्यनमस्कार हा उत्तम मसल
सुर्यनमस्कार हा उत्तम मसल रिलॅक्सटंट व विविध नसा (नर्व्ह्ज), जॉइंट्स, मणका यांच्यावर योग्य तो संस्कार करणारा व्यायाम प्रकार आहे असे वाटते.
भारतीय समाजात हे नमस्कार उघड्यावर घातले तर पुरूषांना ड जीवनसत्त्व हा अतिरिक्त लाभ आहे असे म्हणता येईल. मात्र तो काही सूर्यनमस्काराचा उद्देश नव्हे!
सूर्यनमस्कारांनी फार उत्तम
सूर्यनमस्कारांनी फार उत्तम वाटते. नावे न घेताही
सहमत
अन सूर्याची फक्त नावे घेतली तरी अत्युत्तम निव्वळ अप्रतिम वाटते, नमस्कार न करताही
आळसाला उत्तेजन देणारा विचार ;-)
नवग्राधिपती अन तेजस्वी तर तो आहेच
सहमत
मानसिक सुरक्षितता असेल पण सूर्य हा दारिद्र्यविनाशक अन महारोगनिवारक मानला जातो
असहमत
तुम्ही काय उत्तर देता?
इन्टर्व्युत एक बकवास अन खोटं बोलण्यास उद्युक्त करणारा प्रश्न असतो - तुमचे विकनेसेस कोणते? तुम्ही काय उत्तर देता?
- मी तर स्वतःला पढवुनच ठेवले आहे - जरा विचार केल्याचं नाटक कर अन मग उत्तर दे - "मी एकदा एखादी गोष्ट हाती घेतली की तड लावतेच किंवा त्यात फार खोलात शिरते. हा गुण म्हणा की दुर्गुण. अप टू यु" ;)
>>मर्चंट नेव्हीचा 'शैक्षणिक'
>>मर्चंट नेव्हीचा 'शैक्षणिक' खर्च प्रचण्ड आहे. अन 'नोकरी' मिळवायला लय हाय उपस करावी लागते. >>>----मंदी आहे.
नटस् क्रॅक करून भुगा केला आहे!!!!
अॅक्संटवर उपाय:-आपणच दासबेध मोठ्याने वाचून रेकॅार्डींग करून ठेवा आणि प्रवासात टोपण लावून ( हेडफोनस )ऐकत राहायचे.शुद्ध मराठी!!
महोदय, एक सूचना करू शकतो
महोदय,
एक सूचना करू शकतो काय?
तुमचे पुण्य २ झाल्याचे दिसते आहे म्हणजे तुमचा येथील वावर बर्यापैकी आहे. तरीही आपण कोणत्याही प्रतिसादास उत्तर देताना धाग्याच्या शेवटी टंकता असे दिसते. कदाचित 'थ्रेडेड' व्ह्यु न वापरल्यानेही असे होत असावे.
ज्या प्रतिसादास उपप्रतिसाद द्यावयाचा आहे, तेथे खाली "प्रतिसाद" असे लिहिलेले दिसते. (श्रेणी देतो तिथे, खाली.) त्यावर टिचकी मारल्यास आपले प्रतिसादात्मक लिखाण योग्य जागी दिसेल व त्यावर टिप्पणी / चर्चा सोपी जाईल.
रच्याकने: दासबोधाबद्दलचे वाक्य आपली स्वाक्षरी आहे काय?
मला तर बरोबर दिसतंय.... दोन
मला तर बरोबर दिसतंय.... दोन पायरी नंतर म्हणजे काय?
आडकित्ता यांना तुम्ही प्रतिसाद दिला असेल पण त्यापूर्वी त्यांना अ यांनी प्रतिसाद दिला आणि अ यांना ब यांनी प्रतिसाद दिला तर तुमचा आडकित्ता यांना दिलेला प्रतिसाद ब यांच्या अ ला दिलेल्या प्रतिसादानंतर पण अ यांच्या प्रतिसादाच्या लायनीत अलाइन्ड दिसेल.
Display -threaded होता
Display -threaded होता अगोदर.परंतू मला प्रत्येक प्रतिसादाची एकच ओळ दिसायची आणि प्रत्येकावर वेगळी टिचकी मारल्यावरच तो उघडायचा. एकदा 'flat'हा पर्याय केला तेव्हा सर्वच दिसायला लागले आणि त्यामुळे 'flat',करून ठेवले आहे.ठीक आहे.काही तरी संगणकावर पाहणाय्रांस वेगळे दिसत असावे. संदर्भ टाकून प्रतिसाद लिहित जाईन म्हणजे पुढेमागे झाल्यास अडचण येणार नाही.
नेट न्युट्र--- मी याचेबद्दल
नेट न्युट्र---
मी याचेबद्दल वाचन केले आणि असे कळले की काही सर्विस प्रवाइडर अमुकएक वेबसाइट पुढे आणणार बाकी टोलवणार.त्यांचे साटेलोटे होण्यास तुम्ही हातभार लावता याकरता डेटा स्वस्त देणार.एकप्रकारचे जाहिरात तंत्र म्हणता येईल.उदाहरणार्थ:अमुक कंपनी चे सिम कार्ड असेल तर फ्लिपकार्टवरूनच खरेदी करावी लागेल वगैरे.म्हणजे ग्राहकाचे स्वातंत्र्य कमी करण्याच्यक बदल्यात स्वस्त इंटरनेट.इकडच्या लोकांनी नकार दिल्याने झुकरबाग -पाटील थोडे नाराज झालेत म्हणे.
रिलायंसच्या कार्डास फेसबुक शुक्रवारी फ्री असते,नेटपॅकवर पंधरादिवस वाटसाप,फेबु,ट्विटर फ्री.
पुण्यात काही बायका ( टेलर)
पुण्यात काही बायका ( टेलर) नऊवारी साडी शिवून देतात त्यांच्यापैकीच कोणी डोक्याचं माप घेवून पगडी पण बनवून देतात असं ऐकलं आहे . आईला विचारून अजून खात्रीने माहिती देवू शकेन .
तुम्ही मिरजमध्ये असता न ?
माझ्या मिरजेच्या आजोबांकडे(आईचे बाबा ) एक लाल पगडी होती / आहे . मला तिचा आकार वगैरे माहिती नाही नक्की. पण एखाद्या दिवसासाठी हवी असेल तर ते पण देवू शकतील .
I had two contacts. I am
I had two contacts. I am unable to find them. but i found this one on web:
http://khandaredresswala.in/contactus.php
hope it will do.
पुस्तकं आणि नावं
बरेचदा मला हा मोह होतो.
उदा. "खूप लोक आहेत" हे श्याम मनोहरांचं पुस्तक केवळ त्याच्या नावावरून विकत घेतलं. पुढे ते वाचल्यावर.. जाऊ देत.
किंवा मग पेंडशांचं "ऑक्टोपस". खानोलकरांचं "अजगर" ही पुस्तकं त्यांचं नाव /मुखपृष्ठ पाहून घेतली होती.
मिलिंद बोकीलांचं "गवत्या"सुद्धा मुखपृष्ठ/नाव काँबिनेशनमुळे वाचायला घेतलं.
तुम्ही कोणी केवळ पुस्तकांच्या नावाकडे किंवा रूपड्याकडे आकर्षित होऊन पुस्तकं विकत/वाचायला घेतली आहेत का?
इथे बीच-बुक्स (टाइमपास
इथे बीच-बुक्स (टाइमपास समुद्रकिनारी वाळूत सन बाथ घेत वाचायची) उन्हाळ्याची पुस्तके येतात. त्यांची कव्हर्स अप्रतिम असतात. जांभळट-गुलाबी-फुले असलेली-मोत्याची सर वगैरे चित्रे असलेली. घेत नाही :)
कारण मी कॉलेजमध्ये मिल्स अँड बुन्स वाचले नाही. अन इथे तीशीनंतर एखादं नोरा रॉबर्ट्सचं पुस्तक वाचलं. पण हे कळलं की प्रिल्युड्/चेसिंग गेम" संपला की आपल्याला रस रहात नाही. जोवर नायक-नायिका भांडत आणि "विरोधात" असतात तेव्हाच खणाखणी अन सेक्श्युअल टेन्शन वाचायला मजा येते. ज्याक्षणी one of them surrenders मजाच जाते ;)
.
अनिल अवचट हा एक अवलिया आहे
अनिल अवचट हा एक अवलिया आहे असे ऐकून आहे. बाकी त्यांचे लिखाण हे "त्यांना जसे दिसले तसे त्यांनी मांडले" अशा पद्धतीने घ्या असा सल्ला मला माझ्या मित्रांकडून (ज्यांनी अवचटांचे साहित्य वाचलेले आहे) मिळालेला आहे. मीमराठी वर एका ज्येष्ठ युजर ने त्यांच्या लिखाणाचा "समाचार" घेतला होता. धाग्यावर लई धुमश्चक्री झाली होती.
हो हो...मी हे कांड नेहमी
हो हो...मी हे कांड नेहमी करतो. असे कलपदचे अनेक किस्से आहेत.
ऑक्टोपस पेंडशांनी टाकलेली एक जिलबी आहे. त्यांच्या आत्मचरित्रात असा उल्लेख आहे की ते फोर्टातल्या एका हॉटेलात बसलेले असताना त्यांना पलिकडच्या टेबलावरून दोन तरुणींचा संवाद ऐकू आला. एक मुलगी आपल्या promiscuity बद्दल खुलेपणाने बोलत असते. त्यावरून पेंडशांना पहिला प्रसंग सुचला आणि मग पुढे कादंबरी. पण पहिला प्रसंग वगळता बाकी गॅस आहे...
ऑक्टोपस
माझ्या मते ऑक्टोपस मराठीमधली एक काळाच्या पुढची कादंबरी होती. शहरी मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलेले लोक जेव्हा बक्कळ पैसा कमवू लागतात आणि प्रत्येक गोष्टीकडे धंदेवाईक नजरेनं पाहू लागतात, तेव्हा त्यांच्या मूल्यव्यवस्थेचं काय होऊ शकतं ह्याचं मला ते एक प्रभावी चित्रण वाटतं. आर्थिक उदारीकरणानंतर घडलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर तर ते खूपच वेधक वाटतं. शिवाय, लैंगिकतेला भिडण्याचा मराठीतला तो एक सणसणीत प्रयोग आहे. स्त्री-पुरुषांमधल्या लैंगिक राजकारणाचं असं चित्रण तेव्हाच्या मराठी साहित्यात तर दुर्मीळ होतंच, पण अजूनही ते तसंच आहे. मला श्री.ना. पेंडसे ब्रिलियंट वाटण्यामागे 'तुंबाडचे खोत'पेक्षा 'लव्हाळी' आणि 'ऑक्टोपस'चा वाटा अधिक आहे.
काहीही हं चिंजं, असं
काहीही हं चिंजं, असं म्हणण्याचा मोह आवरलाय. :प
'ऑक्टोपस'मधे जे आहे त्याला लैंगिक राजकारण म्हणायचं म्हणजे 'दिल दोस्ती दुनियादारी'मधल्या आचरटपणाला मराठी 'तरुणाई'ची (चार्वी यांचे आभार मानूनः हे शब्दा, मी तुझ्या वाट्याला गेल्याबद्दल नियती मला माफ करो) अभिव्यक्ती म्हणण्यासारखं आहे. पुढे कथावस्तू उघड होऊ शकते, नको असेल त्यांनी वाचू नका.
समलिंगी संबंधांत रस असलेल्या एका पुरुषानं त्याच्या पत्नीला पद्धतशीरपणे उलट बदनाम करत राहणं, म्हणजे लैंगिक राजकारण? की मिनीला तिच्यापेक्षा बराच मोठा आणि धसमुसळा रांगडा शृंगार आवडत असतो, आणि तरीही ती तिच्या लाभासाठी शरीर रीतसर वापरते, हे लैंगिक राजकारण? मला ते काहीसे बळंच सनसनाटी केलेले तपशील वाटले. (त्या प्रकारच्या राजकारणाचे तपशील तर 'कलंदर'मध्येही आहेत. पण ते 'कलंदर'मध्ये कितीतरी अधिक नैसर्गिकपणे येतात. त्या मानाने 'ऑक्टोपस' रीतसर सनसनाटी आणि पाडलेली वाटते - मला.) त्या वेळी धक्कादायक वाटले असतील असे तपशील बरेच आहेत त्यात. पण तसले प्रयोग होते, म्हणून ती कादंबरी थोर होते का? मला नाही वाटत. उलट त्या कादंबरीतलं संवादांचं भरताड मला अतिशय पकाऊ वाटलं होतं. शेवटावर 'बरं मग? पुढे काय? इतकं काय?' अशी प्रतिक्रिया झाली.
असो. तुमच्या प्रतिक्रियेमुळे चकित होऊन मी ती पुन्हा वाचून पाहीन. पण तूर्तास तरी असहमतीच. 'लव्हाळी'बद्दल मात्र बिनशर्त सहमती आहे.
रहस्यभेदी प्रतिसाद
ज्यांना कथानकातला रहस्यभेद वाचायचा नाही आहे त्यांनी प्रतिसाद वाचू नये.
खरं तर एक साधी बाई स्वतःला हुशार समजणार्या पुरुषाला चांगली ओळखून असते आणि त्यावर कुरघोडी करते हे रोचक आहे. त्याउलट, एरवीच्या आयुष्यात कर्तृत्ववान भासणारा पुरुष (पौरुषाच्या अवास्तव कल्पनांमुळे किंवा अहंगंडामुळे) स्वतःच्या लैंगिक प्रवृत्ती नक्की काय आहेत ते ओळखून त्यांना भिडू शकत नाही. त्यामुळे स्वत:चं सुख कशात आहे हेसुद्धा तो जाणू शकत नाही. त्यामुळे तो कमकुवत ठरतो. सारखा फायद्यातोट्याचा विचार करणारा पुरुष तसं करत करतच कसा तोंडघशी पडतो हे रोचक आहे. आणि तरीही, त्यात कुठेही त्याच्या लैंगिक वर्तनावर नैतिक ताशेरे नाहीत. म्हणून ते काळाच्या पुढेही आहे.
पुन्हा वाचून बघीन. पण मला हे
पुन्हा वाचून बघीन. पण मला हे पटत नाही.
बरेचदा स्त्रिया लैंगिक राजकारणाचा वापर अगदी सहजगत्या, कोणत्याही गाजावानाशिवाय आणि सूक्ष्म पातळ्यांवर करत असतात असं निरीक्षण. त्याच्या तुलनेत तुम्ही पेंडशांचं ज्या रेखाटनासाठी कौतुक करताय, ते अगदीच सामान्य, बटबटीत आणि बळंच वाटतं. नैतिक ताशेरे नाहीत, याबद्दलही असहमती. निवेदकानं लालजीबद्दल (नावात चूभूदेघे) वाटलेली घृणा नोंदल्याची मला स्पष्ट आठवण आहे. (आता पुन्हा वाचून पाहायलाच पाहिजे.)
खलनायक / खलनायिका
>> बरेचदा स्त्रिया लैंगिक राजकारणाचा वापर अगदी सहजगत्या, कोणत्याही गाजावानाशिवाय आणि सूक्ष्म पातळ्यांवर करत असतात असं निरीक्षण. त्याच्या तुलनेत तुम्ही पेंडशांचं ज्या रेखाटनासाठी कौतुक करताय, ते अगदीच सामान्य, बटबटीत आणि बळंच वाटतं.
वास्तवात तसं होत असतं ह्याच्याशी सहमत. साहित्यात मात्र स्त्रीला कपटी खलनायिका वगैरे न करता, तिची ग्रेस सांभाळत, अत्यंत शांतपणे असं दाखवण्याची परंपरा मराठीत फारशी आढळत नाही. हे वास्तव साहित्यात आणण्यासाठी मला पेंडसे महत्त्वाचे वाटतात.
>> नैतिक ताशेरे नाहीत, याबद्दलही असहमती. निवेदकानं लालजीबद्दल (नावात चूभूदेघे) वाटलेली घृणा नोंदल्याची मला स्पष्ट आठवण आहे. (आता पुन्हा वाचून पाहायलाच पाहिजे.)
कादंबरी संपल्यानंतर दिसणारा प्रोटॅगॉनिस्ट केविलवाणा भासतो, पण घृणास्पद भासत नाही. त्याचे पाय मातीचे आहेत, पण तो कोणत्याही अर्थानं खलनायक नाही.
हे वास्तव साहित्यात
हे वास्तव साहित्यात आणण्यासाठी मला पेंडसे महत्त्वाचे वाटतात.
आहेतच पेंडसे त्यासाठी महत्त्वाचे. (मलाही पेंडसे या आणि इतर कारणांसाठी अतिशय आवडतात. इतके, की त्यांची न आवडलेली पुस्तकं सांगणं जास्त सोपं जाईल.) त्याबद्दल अजिबात दुमत नाही. पण त्यांना हे तितक्या परिणामकारकपणे 'ऑक्टोपस'मध्ये जमलंय असं वाटत नाही. त्याहून 'रथचक्र', 'कलंदर', 'हत्या', 'एक होती आजी', 'तुंबाडचे खोत'मधला काही भाग अधिक उजवा आहे, असं वाटतं. हेतू कितीही चांगला असला, तरी आधीच्या पुस्तकांच्या तुलनेत 'ऑक्टोपस' पसरट, बटबटीत, परिणामात उणावलेली वाटते.
ऑक्टोपस..
माझ्यामते ऑक्टोपस मधलं जग हे पेंडशांच्या अनुभवापासून बरंच दूरवरचं आहे, त्यामुळे त्यांच्या इतर पुस्तकांत जशी परिणामकारक वर्णनं करतात ते इथे आलेलं नाहीये.
शिवाय कादंबरी संवाद आणि पत्रांमधे लिहिली गेलीये, तेव्हा त्यामु़ळे कदाचित तीही मर्यादा आली असेल.
एकूण कादंबरी विशेष भावली नाही.
डॉक्टरचा पत्ता पायजेलाय....
समलैंगिकपणा "बरा" करणार्या डॉक्टराचा पत्ता पायजेलाय.
समलैंगिक असण्याची वृत्ती 'बरी' करता येते का ?
"समाजात कोणीही समलैंगिक असायला नको " असा ठराव पास केलाय असं घटकाभर समजू.
पण जे समलैंगिक आहेत; त्यांचं समलैंगिकत्व वैद्यकीय मदतीनं वगैरे बदलता येतं का ?
म्हणजे "ती विकृती आहे आणि बरी करता येते" असं म्हण्णारे जे आहेत;
त्यांनी आजवर नक्की कितीजण असे "बरे केलेत" किंवा "बरे झालेले" पाहिलेत ?
.
.
त्यांना कुणा डॉक्टरनं वगैरे सांगितलेलं आहे का "मी ह्यांना बरं करतो" वगैरे ?
.
.
अशा डॉक्टरचा पत्ता ठाउक असूनही न सांगितल्यास तुम्हाला "एका पेशण्टला बरे न केल्याचे" पाप लागेल. तुमच्या पुढच्या सात पिढ्या पैदाइशी टकल्या असतील.
.
.
अशा डॉक्टारचा पत्ता किम्वा नावही ठौक नसताना "बरी करता येते" असे लिहिले असल्यास तुम्हाला धडाधडित खोटं बोल्ल्याचे पाप लागेल. अहो पाप कसलं ?
खोटं बोलणं हा तर कायद्यानंच गुन्हाय. तुम्हाला कोर्टात खेचता येइल.
.
.
पुरवणी -- बाबा रामदेव ह्याम्चे नाव डॉक्टर म्हणून गणले जाणार नाही. (मी बाबा रामदेवांच्या योगासनं करण्याच्या कौशल्याचा फ्यान आहे; पण ते स्वतंत्र प्रकरण आहे.)
अॅपऐवजी काही कॉस्मेटिक बदल करता येतील
चांगलं अॅप तयार करणं अवघड गोष्ट आहे. केवळ एक रॅपर अॅप तयार करुन आत पुन्हा वेबसाईटचा एचटीएमएल कोड एम्बेड करणे म्हणजे अॅप नाही.
मात्र मोबाईलवरील वापरकर्त्यांना चांगला अनुभव येण्यासाठी काही कॉस्मेटिक बदल करता येतील असे वाटते. एखादा वापरकर्ता मोबाईलवरुन संस्थळ पाहतो आहे असे लक्षात आले तर उजवीकडचे रकाने दाखवणे टाळता येईल. त्यामुळं आडवी पेजसाईज बऱ्यापैकी कमी होईल.
मोबाईल फ्रेंडली साईटमध्ये साधारण फक्त मुख्य कंटेंट दाखवायचा
उदाः ट्रॅकर पान
अॅप बनवायचेच तर काहीसे असे
अॅप बनवायचेच तर काहीसे असे असावे असे मनात आले:
- ठराविक १० (किंवा मर्यादित संख्येने) धागे त्यात अॅडवता येतील. हे प्रत्येक वापरकर्त्याला सध्या "ज्वलंत" वाटणारे धागे असतील.
- तेवढ्याच धाग्यांवर नवीन प्रतिक्रिया आल्यास ऑटोमॅटिक अपडेट अलर्ट येईल (ठराविक मिनिटांनी रिफ्रेश). तेवढ्याच धाग्यांवर अॅपद्वारे प्रतिक्रिया झटकन देता येईल (चॅटसारखी)
- खेरीज १० (किंवा मर्यादित संख्येने) सदस्यमित्र अॅपमधे अॅडवता येतील. तितक्यांशी थेट व्यनिसंपर्क अॅपद्वारे ठेवता येईल (चॅटसारखा)
- खरडफळा अॅपमधेही असेल. त्याद्वारे सर्वांशीच संपर्क ठेवता येईल.
-इमेजेस / मीडिया ऑटो डाउनलोड अथवा टाळणे हा ऑप्शन अॅप वापरकर्त्याला असेल.
पहिली दीड रिक्वायरमेंट
ठराविक १० (किंवा मर्यादित संख्येने) धागे त्यात अॅडवता येतील. हे प्रत्येक वापरकर्त्याला सध्या "ज्वलंत" वाटणारे धागे असतील.
- तेवढ्याच धाग्यांवर नवीन प्रतिक्रिया आल्यास ऑटोमॅटिक अपडेट अलर्ट येईल (ठराविक मिनिटांनी रिफ्रेश).
पहिली दीड रिक्वायरमेंट आहे त्याच आर्किटेक्चरमध्येही खूपच सोपी आहे. एचटीएमएल पार्सिंगचे बरेच एपीआय आहेत ते वापरुन धागे आणि त्यावरील प्रतिसादाचे काऊंट दाखवता येईल. ठराविक धाग्यांचा रेफरन्स साठवून ठेवून तेच धागे मॉनिटर करणेही शक्य आहे. बरेच न्यूज रीडिंग करणारे अॅप्स हाच प्रकार करतात.
पुढची रिक्वायरमेंट आहे त्या परिस्थितीत अवघड आहे. ऐसीच्या डेटाबेसची माहिती एक्चेंज करणारा एपीआय लिहायला लागेल. अॅपमध्ये लॉगाऊट होऊ नये यासाठी मोबाईल डिवाईस आयडी आणि लॉगिन आयडी यांचं मॅपिंग करुन ठेवायला लागेल. इ.इ..
तेवढ्याच धाग्यांवर अॅपद्वारे प्रतिक्रिया झटकन देता येईल (चॅटसारखी)
- खरडफळा अॅपमधेही असेल. त्याद्वारे सर्वांशीच संपर्क ठेवता येईल.
व्हॉट्सअॅप/स्काईप सारखे अॅप असताना चॅटसारख्या गोष्टीमुळे नक्की काय व्हॅल्यू अॅडिशन होईल.
- खेरीज १० (किंवा मर्यादित संख्येने) सदस्यमित्र अॅपमधे अॅडवता येतील. तितक्यांशी थेट व्यनिसंपर्क अॅपद्वारे ठेवता येईल (चॅटसारखा)
व्हॉट्सअॅप/स्काईप अॅप असताना चॅटसारख्या गोष्टीमुळे नक्की ??
विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! संस्थळावरचे बरेचसे सभासद एकमेकांना व्यक्तीशः ओळखत असतील पण माझ्यासारख्या काहीजणांकडे इथल्या सभासदांचे मोबाईल क्रमांक / ईमेल आयडी नसतील व तरीही गप्पा मारायच्या असतील तर 'चॅट' चा वापर होऊ शकतो. मात्र एकमेकांकडे मोबाईल क्रमांक / ईमेल आयडी नाहीत म्हणजे त्या सभासदांची जवळीकही नाही त्यामुळे चॅट काय कप्पाळ करणार असाही उपविचार आहेच म्हणा.
ऋषिकेश : अॅप नाही पण मोबी वेबसाईट बनवता येईल का हा पण विचार करता येईल. अर्थात फुकट मिळतेय तर किती मागायचे याचाही विचार करावा हे मान्य आहेच म्हणा.
आभार. अजिबात न संकोचता कल्पना
आभार. अजिबात न संकोचता कल्पना मांडा. जमल्यास करू, नैतर नै.
अॅप नाही पण मोबी वेबसाईट बनवता येईल का हा पण विचार करता येईल.
यावर मागेच विचार झाला होता.
हे सद्य ड्रुपल व्हर्जनवर करणे त्रासाचे आहे असे कळते. अपग्रेड केल्यावर हे जमेल. फक्त अपग्रेड कधी ते विचारू नका ;)
>>मात्र एकमेकांकडे मोबाईल
>>मात्र एकमेकांकडे मोबाईल क्रमांक / ईमेल आयडी नाहीत म्हणजे त्या सभासदांची जवळीकही नाही त्यामुळे चॅट काय कप्पाळ करणार असाही उपविचार आहेच म्हणा.
एखाद्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर त्याला ती नको असलेली जवळीक वाटू शकते अशी शंका माझ्या मनात असते. अनेकांच्या मनात ती असू शकते.टंकबोलीतून समोरच्या व्यक्तीला संवादात रस नाही ( कारण काही का असेना) असे लक्षात आले तर सुज्ञ व्यक्ती संवाद थांबवतात. कधी कधी अतिपरिचायद्वज्ञा अशी स्थिती निर्माण होउ शकते याचे भान/ भय ठेवूनही काही लोक 'सुयोग्य' अंतर ठेवतात. जालीय वावरातून निर्माण झालेले संबंध व प्रत्यक्श भेटीतून निर्माण झालेले संबंध यात फरक असू शकतो. प्रत्येक माध्यमाच्या काही मर्यादा व बलस्थाने असतात. शिवाय मानवी मन ही एक गुंतागुंतीची गोष्ट आहेच. ऐसी अक्षरे हे एक कुटुंब आहे व आपण सर्व त्या विशाल कुटुंबाचे सदस्य आहोत ही भावना समजा कित्येकांच्या मनात असली तरी व्यावहारिक दृष्ट्या एकमेकांच्या अडचणीच्या वेळी परस्परांची उपयुक्तता किती? हा प्रश्न उदभवतोच.
व्हॉट्सअॅप/स्काईप सारखे अॅप
व्हॉट्सअॅप/स्काईप सारखे अॅप असताना चॅटसारख्या गोष्टीमुळे नक्की काय व्हॅल्यू अॅडिशन होईल.
त्या विशिष्ट धागाविषयावर चर्चा करण्यासाठी सर्व ऐसीकरांचा ग्रुप अशा अॅप्सवर प्रत्येक वेळी एकेका विषयाचा वेगवेगळा बनणे ग्रुपच्या संख्यामर्यादेमुळे आणि अॅडमिन इश्यूजमुळे अवघड असावे. शिवाय अशा अॅप्समधे उपप्रतिसाद देता येत नाहीत.
कोणाकोणाला नेमका रस असेल ते आधीच माहीत नसल्याने विनाकारण एकेका धाग्यासाठी सर्व ऐसीकरांचा प्रचंड मोठा ग्रुप बनवून चॅट चालू करावी लागेल. त्यापे़क्षा वरील रचना बरी.
हेलिकॉप्टर चालवणारे वापरतात
हेलिकॉप्टर चालवणारे वापरतात ते पुर्ण कानच झाकतात त्यामुळे कानशिलांच्या हाडांतून जो आवाज आत जातो तेही बंद होतो.बोटीचे एंजीनरूममध्ये जाणारेही वापरतात.काही हेडफोन्सही या प्रकारचे असतात.फॅक्ट्रीत सेफ्टी गॅागल आणि तुम्हारा हवे असणारे इअरप्लग देतात ते स्पंजचे बोटवे स्वस्त असतात ते मिळतील.
टिका
अमेरिकेत राहत, काम करत, टाईमपास करत असलेला आणि अमेरिकेचा नागरिक नसलेला, से भारतीय, (कोणतातरी निळा पिवळा व्हिसा इ असणारा) नागरीक अमेरिकन सरकारवर जाहीर नी प्रखर टिका करू शकतो का? जालावर? पेपरात? भाषणांत? प्रदर्शने? आंदोलने?
कोणत्या पॉइंटनंतर हे वर्तन थेट देशविरोधीच मानले जाईल?
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/Vikram_Buddhi
हे वाचा. अर्थात ही केस एक्स्ट्रीम आहे, बुशला ठार मारले पायजे इ.इ. म्हटल्यावर ते लोक गप्प बसतील असे अपेक्षिणे चूक आहे.
डायबेटिस -- मधुमेह -- शुगर :- गोळ्यांपासून सुटका
http://aisiakshare.com/node/4181 ह्या धाग्याच्या प्रस्तावातच मी एका डॉक्टारबद्दल विचारणा केली होती.
तिकडे जाणे झाले परिचयातील व्यक्तीसमवेत. जवळून एक उदाहरण पहायला मिळाले.
एरव्ही मधुमेह म्हणजे जन्मभर गोळ्या घ्याव्याच लागणार असा समज होतो.
.
.
रुग्णास मधुमेहाचे प्रथम निदान झाले ते दीडेक वर्षापूर्वी. तेव्हापासून गोळ्या सुरु आहेत मधुमेहाच्या.
मागील दोनेक आठवडे ह्या डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे योग्य ते पथ्यपाणी पाळले.
सध्याच गोळ्या दिवसातून दोनदा घेण्याऐवजी एकदाच घ्यायला साम्गण्यात आले आहे.
(गोळ्यांची फ्रिक्वेन्सी निम्म्यावर आलेली आहे.)
जर असेच प्रयत्न सुरु राहिले तर कदाचित गोळ्या घेणे पूर्णतः बंद होउही शकेलसे वाटते... एखाद-दोन महिन्यात.
.
.
हे डॉ त्रिपाठी फारच काही वेगळं सांगतात असं वाटलं नाही.(काही भाग जरुर नवीन आहे; पण उरलेला बराचसा पब्लिक डोमेनमध्ये असतो; सामान्य ज्ञान म्हणून माहिती असतो; तसाच आहे.) पण ते त्याचं महत्व परिणामकारकरित्या पटवून देतात; माणूस पथ्यपाणी वगैरेबाबत जागरुक होतो; हे त्याचं यश.
"हम इन्तजार करेंगे तेरा कयामत
"हम इन्तजार करेंगे तेरा कयामत तक" प्रकारचं इंग्रजी गाणं सापडलं - अनेक गायक-गायिकांचं ऐकली पण हे व्हर्शन सर्वात आवडलं.
https://www.youtube.com/watch?v=MSoIBdD3WrI
He stopped loving her today
He said I'll love you 'til I die
She told him you'll forget in time
As the years went slowly by
She still preyed upon his mind.
He kept her picture on his wall
Went half crazy now and then
He still loved her through it all
Hoping she'd come back again.
He kept some letters by his bed
Dated 1962
He had underlined in red
Every single I love you.
I went to see him just today
Oh, but I didn't see no tears
All dressed up to go away
First time I'd seen him smile in years.
He stopped loving her today
They placed a wreath upon his door
And soon they'll carry him away
He stopped loving her today.
Ya' know she came to see him one last time
Oh, we all wondered if she would
And it kept running through my mind
This time he's over her for good.
He stopped loving her today
They placed a wreath upon his door
And soon they'll carry him away
He stopped loving her today...
मला येते तितके उत्तरः
नोटांची प्रोसिजर अशी काही खास नसते, सुमारे दोन तृतियांश पेक्षा मोठ्या साईजचा तुकडा असावा अशी अपेक्षा असते बहुतेक. स्टेट ब्यांकेत वेगळा काउंटर असतो.
पण ओळखपाळख असल्याशिवाय नोटा बदलायला त्रास देतात. कुणी नातेवाईक्/ओळखीच्या ब्यांकेत नोकरीस असेल तर त्याला द्या.
फारा वर्षांपूर्वी अलका टॉकीजच्या चौकातल्या पेट्रोल पंपावरून वर गेलं की एक जुनाट दुकान होतं तिथे 'येथे फाटक्या नोटा बदलून मिळतील' अशी पाटी पाहिल्याचं आठवतं.
पेशंट लोक दवाखान्यात हमखास फाटक्या, जुनाट नोटा खपवायचा प्रयत्न करतात.
हे जालावरचे : https://www.rbi.org.in/currency/Exc%20of%20Soiled-Mutilated%20Notes.html
*
आता माझा प्रश्न.
अजो दिसले नाहीत सध्या इकडे? तसा मीही बर्याच दिवसांनी आलोय म्हणा.