दिल्लीतील औरंगजेब रोडचे नामांतर,औरंगाबाद शहराचे नाव बदलणे ,हा खोडसाळपणा कशासाठी??

सध्या केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपप्रणित सरकारने
इतिहासातील मुस्लिम शासनकर्त्यांची नावे असलेल्या वास्तू,
रस्ते, शहरं यांची नावे बदलण्याचा सपाटाच लावला
आहे.हिंदुत्ववादी भाजप सरकारने हा खटाटोप मुस्लिम
समाजाला डिवचण्यासाठी केला आहे हे अगदी उघड आहे.

यातील पहीला वाद दिल्लीतील औरंगजेब रोडचे नाव बदलणे
यातुन सुरु झाला,इतकी वर्ष दिल्लीत दिमाखाने उभा असलेला
औरगजेब रोडचे नाव बदलुण सरकारने काय साधले याचे कसलेही
स्पष्टीकरण सरकारने दिलेले नाही.फार वाद वाढू नये म्हणून
अब्दुल कलाम यांचे नाव त्या रस्त्याला दिले आहे.

दुसरा वाद हा महाराष्ट्रात औरंगाबाद शहराचे नाव
संभाजीनगर करावे असा आहे,हा वाद तसा जुनाच
आहे.शिवसेनेसारख्या खोडसाळ संघटनेची ही मागणी आहे.
औरंगजेब हा अत्याचारी होता,बलात्कारी होता असा
पद्धतशीर प्रचार संघप्रणीत इतिहासकार अनेक वर्ष करत
आहेत,वास्तविक औरंगजेब हा लोकोत्तर राजा होता,त्याने
अनेक समाज सुधारणा घडवुन आणल्या होत्या. त्याच्या
कारकीर्दीत हिंदुंचे धर्मांतरन त्याने होऊ दिले नाही ,हा
त्याचा मोठा उपकार भारतीयांवर आहे.मुस्लिम शासनकर्ते
कसे क्रूर होते असे खोटेनाटे पसरवण्याने सांप्रत काळच्या
मुस्लिमांना आरोपी ठरवता येते,हाच या पाठिमागचा खरा
उद्देश आहे .

नामांतराने देशाचा, राज्याचा काय फायदा होणार
आहे,अशी खोडसाळ नामांतरे करुन मुस्लिम समाजाला आपण
राष्ट्रीयत्वापासून दुर नेत आहोत,यात हिंदू मुस्लिम दोघांचेही
नुकसान आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (4 votes)

फक्त औरंगाबाद शहराच्या नाव बदलण्याबद्दल -

१) नाव बदलण्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे जीवन नेमके कसे सुधारणार आहे ? (कोणतीही व्यक्ती म्हंजे औरंगाबादेतली वा औरंगाबाद च्या बाहेरची - भारतातली).
२) नाव बदलण्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे जीवन नेमके कसे बिघडणार आहे ? (कोणतीही व्यक्ती म्हंजे औरंगाबादेतली वा औरंगाबाद च्या बाहेरची - भारतातली).

-

फक्त औरंगाबाद शहराबद्दलचा हा प्रतिसाद आहे

--

हिंदुत्ववादी भाजप सरकारने हा खटाटोप मुस्लिम समाजाला डिवचण्यासाठी केला आहे

नाव बदलण्याने मुस्लिम समाज का डिवचला जातो ?

नाव बदलण्याच्या क्रियेनंतर डिवचले जाण्यामागची चेन ऑफ रिझनिंग स्पष्ट करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नामांतर वगैरे पॉलिटिकल गेम आहेच की.
त्या रस्त्याला औरंगजेब रस्ता- म्हणायच्या आधीही काहीतरी नाव असेलच ना? अबक रस्ता म्हणू. मग त्या अबक रस्त्याने एवढे दिवस औरंगजेबाला मिरवलं आता आणखी कुणाचं नाव लागू दे की. असं काय करता?
आता रस्त्याच्या नावावरून औरंगजेब, मग मुस्लीम राजे, मग इतिहासातल्या अस्मिता आणि शेवटी भावनांना ठेच. मग खेळ खलास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत. बदला नाव. भावना दुखावल्या तर दुखावू देत लोकांच्या. त्यात काय मोठंसं!

ताजवरच्या हल्ल्यानंतर आमच्याइथल्या नगरसेवकाला काहीतरी करून दाखवण्याचा दुसरा सोपा मार्ग सापडेना, तेव्हा आमच्या घराजवळचं कॉम्रेड गोदूताई परुळेकर उद्यान एका रात्रीत बदलून 'शहीद उद्यान' झालं. माझ्याही भावना दुखावल्या होत्या तेव्हा! पण भावनांसारख्या अमूर्त गोष्टींचा हवाला देऊन काही मागण्याची टूम तेव्हा इतकी बोकाळली नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी सहमत आहे. औरंगजेब कसा का असेना हिंदूस्तानी राजा होता ना. हिंदुस्तान त्याची जन्मभूमीच नव्हे तर कर्मभूमी होती ना? त्याने काही अत्याचार जरी केले असले तरी त्याचे नाव पुसल्याने, इतिहास पुसला जाणार आहे का? काही मुसलमान धर्मियांची सेन्स ऑफ आयडेन्टिटी त्याच्याशी जोडलेली असू शकते. काहींना हिंदू/मुस्लिम त्याचा वेगळा इतिहास माहीत असू शकतो.
हे सगळे गडे मुर्दे का उखडतायत लोक? दुसरं काही विधायक करता येत नाही का? पुढे (भविष्याकडे) पहायचं की तोच भूतकाळाचा चिखलचिवडा चिवडत बसायचं?
.
परत ते प्रिसिडन्स पडणे का काय म्हणतात ते झालेले दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाव बदलण्याची मागणी करण्याचा अमेरिकनांचा उद्दामपणा -

https://www.change.org/p/minneapolis-park-board-commission-change-the-na...
http://www.startribune.com/hennepin-county-outlines-process-for-renaming...

हे अमेरिकन येडपट लोक आहेत का? तो क्याल्हून कसा का असेना… ठेवलंय ना त्याचं नाव? कुणा कु क्लक्स क्लान वाल्यांची आयडेंटीटी असेल जुळलेली त्याच्याशी… हे सगळे गडे मुर्दे का उखडतायत लोक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आंतरराष्ट्रिय स्तरावर जरी अमेरीका जिकडेतिकडे नाक खुपसत असली तरी लोकल मनुष्य मात्र त्याच्या त्याच्या काऊंटीत अन विश्वात, त्याच अस्मितांच्या साचलेल्या डबक्यात लोळताना दिसतो. लोकल न्युज च्या बाहेरच्या जागतिक घडामोडीशी फार संबंध नसतो त्याचा. असे एक नीरीक्षण आहे, १००% आहे. कदाचित सगळेच मायग्रंट असल्याने फक्त तडजोडी अन धडपडीत (भाकरीचा चंद्र वेचण्यात) जिंदगी बर्बाद होत असेल. कदाचित बाकी काही करायला वेळच मिळत नसेल.
.
त्यातून मग हे काऊंटी लेव्हलवरचे, हिमालयन प्रपोर्शनचे प्रश्न निर्माण होत असावेत - हे नाव देऊ तळ्याला की ते? आधीचं नाव काढू का नको?

https://www.youtube.com/watch?v=k0RH0cYs4lw

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी दिलेले उदाहरण हे सौथ करोलैना मध्ये घडलेल्या घटनांचे मिन्नेसोट्यामध्ले पडसाद आहेत. कौंटी लेवलवर नाही. पण तुम्ही माझा प्रतिसाद भलतीकडेच नेलात त्याबद्दल आभार!

मला एवढंच म्हणायचं आहे की, कुणाचीतरी ओळख कुणाशीतरी निगडीत असू शकते. कलामांसारखं कुणी मेलं, तर रस्त्यांना वगैरे नाव देऊन त्यांचा सन्मान करायची पद्धत आहे, त्यामुळे कुणाचं नाव बदलतोय यापेक्षा कुणाचं नाव देतोय याला महत्व का देत नाहीये कुणी? आणि होता ना राजा? गेली ३०-४० वर्षं केला की त्याचा सन्मान रस्त्याला नाव वगैरे देऊन? आता तो राजा पायउतार झाला तिथल्या फळ्यावरून, तर काय बिघडलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेली ३०-४० वर्षं केला की त्याचा सन्मान रस्त्याला नाव वगैरे देऊन?

यू मीन औरंगजेबाचे नांव गेल्या काँग्रेस सरकारने दिले होते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

त्याच्या कारकीर्दीत हिंदुंचे धर्मांतरन त्याने होऊ दिले नाही ,हा त्याचा मोठा उपकार भारतीयांवर आहे.

ऑ!! म्हणजे हो ग्रेटथिंकर!
यात काय उपकार आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दरोडेखोराने सगळ लुटून नेल पण मंगळसूत्राला हात लावला नाही म्हणून दरोडेखोर किती सहृदयी असतो हे लॉजिक माहीत नाही का ऋषिकेश? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मला व्हीटी स्टेशन चे नाव बदलल्यावर आणि "University of Poona" चे "Pune University" आणि नंतर अजुन काहीतरी झाल्यावर फार्फार दु:ख झाले होते. त्याच सुमारास ह्या देशात फार काही चांगले होणार नाही हे ही जाणवले आणि पटले.

तसेच बॉम्बे चे मुंबई, मद्रास चे चेन्नै, ह्याबद्दल ही दु:ख झाले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाँबेचे मुंबई झाले तेव्हा किंचित सुखावलो होतो परंतु आता त्यातील फोलपणा उमजतो आहे!

इंग्रजांनी पॅरीस करूनही 'पारी' म्हणणार्‍या फ्रेंचांची भाषिक अस्मिता दुखावत नाही तिथे 'बाँबे' म्हटल्याने मराठी समाजाची दुखावते, हे पटण्याजोगे नाही.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही केसेस कंपॅरेबल आहेत का? इंग्रज काहीही म्हणाले तरी फ्रान्स देशात पारी च म्हणायचे अन म्हणतात. बाँबे-मुंबैचे तसे होते का? ऑफिशियल नावे दोन्ही होती का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फ्रेंच जसे आपल्या देशाला 'पारी'च म्हणायचे तसेच मुंबईतील मराठी आणि गुजराती मंडळी 'मुंबई'च म्हणीत (आणि म्हणतात).

इंग्रजी ही फ्रान्सची अधिकृत भाषा नसल्यामुळे (किंबहुना फ्रेन्च हीच एकमेव अधिकृत भाषा असल्यामुळे) ऑफिशियल नाव फक्त पारी हेच राहिले आणि राहील.

भारताचे तसे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> फ्रेंच जसे आपल्या देशाला 'पारी'च म्हणायचे तसेच मुंबईतील मराठी आणि गुजराती मंडळी 'मुंबई'च म्हणीत (आणि म्हणतात).

इंग्रजी ही फ्रान्सची अधिकृत भाषा नसल्यामुळे (किंबहुना फ्रेन्च हीच एकमेव अधिकृत भाषा असल्यामुळे) ऑफिशियल नाव फक्त पारी हेच राहिले आणि राहील.

भारताचे तसे नाही. <<

फ्रेंच केवळ आपल्याच देशातल्या नावांबद्दल हे पाळतात असं नाही. ते आजही बीजिंगला पेकॅं (Pékin), मुंबईला बोंबे (Bombay), श्री लंकेला सेलाँ(Ceylan) आणि म्यानमारला बिर्मानी (Birmanie) वगैरे म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मला बॉम्बे आणि मद्रास म्हणायला आवडते आणि मनासही पटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

औरगजेब रोडचे नाव बदलुण सरकारने काय साधले याचे कसलेही स्पष्टीकरण सरकारने दिलेले नाही

काहीच साधले नसेल तर या विषयावर वाद का व्हावा ?

औरंगजेब हा अत्याचारी होता,बलात्कारी होता असा पद्धतशीर प्रचार संघप्रणीत इतिहासकार अनेक वर्ष करत आहेत

संघप्रणित इतिहासकार करीत असलेल्या अशा प्रकारच्या प्रचाराला पाकिस्तानात जन्मलेला एक मुस्लिमदेखील बळी पडला आहे असं दिसतय .. पहा - Why I danced when I found out Delhi's Aurangzeb Road was being renamed after APJ Abdul Kalam संघप्रणीत प्रचार असल्याचे पुरावे द्या ...

औरंगजेब हा लोकोत्तर राजा होता,त्याने अनेक समाज सुधारणा घडवुन आणल्या होत्या.

कुठल्या हो समाजसुधारणा ??

नामांतराने देशाचा, राज्याचा काय फायदा होणार आहे

हाच प्रश्न आपण मराठवाडा विद्यापिठाच्या नामांतराच्यावेळेस विचारला होतात का ?

हिंदुत्ववादी भाजप सरकारने हा खटाटोप मुस्लिम समाजाला डिवचण्यासाठी केला आहे हे अगदी उघड आहे.

नाव बदलल्याने मुस्लिम समाज कसा काय डिवचला जातो हे जरा स्पष्ट करा .. समजा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मुस्लिम समाज डिवचला जात असेल तर त्याचा अर्थ अजुनही मुस्लिम समाजाला हिंदुंवर अत्याचार करणार्‍या, स्वतःच्या भावाचा आणि बापाचा खून करणार्‍या, शिख धर्मगुरु तेगबहाद्दूरांची हत्या करणार्‍या औरंगजेबाबद्दल आपुलकी आहे म्हणून असं म्हणावं लागेल. असा मुस्लिम समाज राष्ट्रियत्वाच्या जवळपासतरी आहे असं म्हणता येईल का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

नाव बदलल्याने मुस्लिम समाज कसा काय डिवचला जातो हे जरा स्पष्ट करा .. समजा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मुस्लिम समाज डिवचला जात असेल तर त्याचा अर्थ अजुनही मुस्लिम समाजाला हिंदुंवर अत्याचार करणार्‍या, स्वतःच्या भावाचा आणि बापाचा खून करणार्‍या, शिख धर्मगुरु तेगबहाद्दूरांची हत्या करणार्‍या औरंगजेबाबद्दल आपुलकी आहे म्हणून असं म्हणावं लागेल. असा मुस्लिम समाज राष्ट्रियत्वाच्या जवळपासतरी आहे असं म्हणता येईल का ?

आता लगेच इस्लामोफोबिया आणि हिंदुत्ववादाचा शिक्का बसणार तुमच्यावर...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगदी अगदी ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

काहीच साधले नसेल तर या विषयावर वाद का व्हावा ?

बर्वे साब, यहीच मुद्दा मैने उप्पर मांडा था ना ? मेरे प्रतिसाद मे से हवा कायकु निकालता है तुम ?? Smile

हे - तेरा करडू मेरे परडे मे आके वरड्या - किंवा - गटरी मे बेडकी अडक्या और पानी तुंब्याच तुंब्या - या चालीवर वाचावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीच साधले नसेल तर या विषयावर वाद का व्हावा
>>>>>>>>> काही साधायचेच नव्हते तर नामांतरं करावीच कशाला? असाही प्रश्न यातून तयार होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

ते वर विद्यापिठांच्या नामांतराबद्दल विचारलय त्यावरदेखील प्रकाश टाका थोडा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कोर्या करकरित गोष्टींचे नामकरण जरुर करावे,परंतु आधिपासून प्रचलीत नावे बद्लून वएका विशिष्ट समाजाला डिवचण्याने काय मिळते?
मराठवाडा विद्यापीठात नामविस्तार झाला आहे, 'मराठवाडा 'हा शब्द कायम ठेवला गेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

दिल्लीतील नामांतरातून मुस्लिम कसेकाय डिवचले जातील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा डिवचण्याचा प्रकार आहे पण ( छुपा ). भारतीय मुसलमानांवर सध्या दाउद, याकूब मेमन, औरंगजेब, ISIS असल्या प्रतिमांचा मारा हे तुमचे खरे प्रतिनिधी अश्या स्वरूपाने लादण्यात येत आहे. आणि मुस्लीमसुद्धा अभावितपणे हे मान्य करून टाकतात कारण व्हिक्टीम मेंटॅलीटी आणि मुळात साधारण मुस्लीम लोकांत असणारा अभ्यासाचा अभाव. मुस्लीम म्हणजे कट्टर आणि कट्टरच असणार(च) असे वारंवार मुस्लिमांवर आणि मुस्लीमेतरांमध्ये रुजवणे चालू आहे त्यासाठी सेलेक्टीव्हली अश्याच प्रतिमा येन केन प्रकारेण चर्चेत आणून मुख्य प्रवाहापासून मुस्लीम समाज वेगळा दिसावा असा सध्या प्रयत्न दिसतो. सरकारचा असा अजेंडा दिसतो. मुस्लिमांविषयी पॉजीटीव मिडीयामधून क्वचितच दिसते. द्वेष पद्धतशीर पसरवला जातोय आणि पुढील काळात मोठाच सांस्कृतिक संघर्ष आपल्या सगळ्यांपुढे वाढून ठेवलाय असं दिसतं. मला माझ्या मुलांसाठी फार काळजी वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हारून शेख ह्यांचा प्रतिसाद पटण्याजोगा आहे आणि हिंदुत्व अजेंडावाले अधिक आक्रमक झाले आहेत हेहि सहज दिसते.

पण ह्याच्या उत्तरात मुस्लिम समाज आणि त्यातील विचारवंत काय करीत आहेत?

एकेकाळी सगळेच धर्म कडवे होते आणि अन्य धर्मीयांकडे संशयानेच पाहात. पण ख्रिश्चन धर्मात १५व्या-१६व्या शतकात आतूनच सुधारक चळवळ उभी राहिली आणि तो धर्म पाळणारे आता पूर्वीइतके कट्टर उरलेले नाहीत. हिंदूंनी ब्रिटिशांकडे पाहून आपल्यामध्ये समाजसुधारणा करायला सुरुवात केली आणि त्यांचा जुना कर्मठपणा आणि आंधळे विश्वास खूपसे गळून पडले. इस्लामने असे काहीहि केले नाही. अजूनहि ७व्या शतकातील कुराण, जे बहुतेकांना समजतच नाही, त्यातील प्रत्येक शब्द आणि महम्मदाचे प्रत्येक वर्तन हे बरोबरच आहे ह्या पलीकडे इस्लाम जात नाही. एकेकाळी कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट एकमेकांच्या कत्तली सरसहा करत. आज त्यांच्यामधील फरक चर्चपुरताच उरला आहे. इस्लाममध्ये मात्र हसन आणि हुसेन ह्यांच्या शहादतीपासून पडलेली दुफळी १३०० वर्षानंतर बंद करण्याचा प्रयत्न कोणताहि विद्वान मौलवी अथवा अयातुल्ला करतांना दिसत नाही. त्यावरून कत्तली आजहि चालू आहेत.

सध्या जगामध्ये सर्व विचारी समाज त्यांनी पूर्वी अन्य गटांवर केलेल्या अन्यायांची माफी मागतांना दिसतात. ऑस्ट्रेलियामध्ये तद्देशीय लोकांची मुले सक्तीने आईवडिलांपासून अलग करून त्यांना सरकारी कोंडवाडयासारख्या शाळांमध्ये कोंबले ह्याची माफी मागितली गेली. कॅनडाने एकेकाळी चीनमधून आलेल्यांना हेड टॅक्स लावला ह्या अन्यायासाठी सध्याच्या पिढीची माफी मागितली आणि त्यांना भक्कम नुकसानभरपाई दिली. दुसर्‍या महायुद्धामध्ये जर्मनीमध्ये ज्यू लोकांचे शिरकाण झाले ह्याबद्दल बहुसंख्य जर्मनांना दु:ख वाटते आणि ते उघडपणे पश्चात्ताप व्यक्त करतात. असे इस्लाममध्ये होते काय?

हिंदुस्तानात इस्लामने हिंदूवर असंख्य अत्याचार केले हे नागडे सत्य आहे. गझनीच्या महम्मदाने आठवेळा सोमनाथ लुटले आणि फोडले, इल्तमशने विदिशेपासून उज्जयिनीपर्यंत देवळी फोडली आणि तेथील मूर्ति नेऊन मशिदींच्या दारामध्ये टाकल्या हे तत्कालीन स्तुतिपाठक मुस्लिम इतिहासकारांनीच अभिमानाने नोंदवून ठेवले आहे. दिल्लीच्या कुव्वत-उल-इस्लाम मशिदीच्या खांबासाठी वापरलेले हिंदु मूर्तींचे दगड आणि गटाराच्या तोंडावर बसवलेला गणपति आजहि हेच सांगतात. औरंगजेबाने मथुरेचे आणि अन्य अनेक देवळे फोडली, हिंदूंवर अन्यायी जिझिया कर लावला हे मुस्लिमांना दिसत नाही का? बाबराने अयोध्येतच बाबरी मशीद का बांधली तर हिंदूंची - आंधळी असेल पण - श्रद्धा होती तेच देऊळ फोडून तेथे मशीद बांधून गाझीपणा करायची त्याला इच्छा होती.

हे सगळे चुकीचे होते हे मान्य करण्याचे धैर्य दाखवून कोणा मौलवीने माफी मागण्याचा फतवा काढला असता तर हिंदु तालिबान्यांचीहि धार कमी झाली असती असे मला वाटते.

अशा प्रकारची अन्तःपरीक्षा आणि सुधारणा चळवळ जोपर्यंत मुस्लिम समाजात निर्माण होत नाही तोपर्यंत तो समाज असाच अज्ञान आणि दारिद्र्याने गांजलेला आणि कुराण-मोहम्मद तसेच त्यावरचे भाष्यकार मुल्ला-मौलवी ह्याचा गुलाम राहणार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिनेमके.

(इतकेच म्हणतो, अजून काही अ‍ॅड करू गेल्यास...असोच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रिचर्ड इटन यांच्या मुलाखतीचा एक छोटा भाग तहलकामध्ये प्रकाशित झाला होता (http://www.tehelka.com/2013/11/its-a-myth-that-muslim-rulers-destroyed-t...)

त्यात खालील वाक्यं आहेत. या वाक्यांचा खरेपणा तपासण्याइतकी साधनं माझ्याकडं नाहीत. कोल्हटकर, बॅटमॅन किंवा इतर सदस्यांकडं याचा प्रतिवाद करणारी विश्वासार्ह माहिती आहे काय?

The total number of temples that were destroyed across those six centuries was 80, not many thousands as is sometimes conjectured by various people. No one has contested that and I wrote that article 10 years ago.

Even the history of Aurangzeb, you say, is badly in need of rewriting.
Absolutely. Let’s start with his reputation for temple destruction. The temples that he destroyed were not those associated with enemy kings, but with Rajput individuals who were formerly loyal and then become rebellious. Aurangzeb also built more temples in Bengal than any other Mughal ruler.

मिर्झाराजे जयसिंग सोडून गेल्यावर नाराज झालेल्या औरंगजेबाने जयसिंगाच्या प्रांतातील काही मंदिरं तोडली होती हे मी वाचलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The total number of temples that were destroyed across those six centuries was 80, not many thousands as is sometimes conjectured by various people. No one has contested that and I wrote that article 10 years ago.

मज्जाच आहे. तो पेपर मी वाचलेला आहे आणि अतिशय हेतुपुरस्सर अंडररिपोर्टिंग त्यात केलेले आहे.

१. कुतुबमिनारच्या जवळ जी कुव्वतुल इस्लाम नामक मशीद आहे ती हिंदू + जैन मंदिरे पाडून उभारलेली आहे हे तिथे गेल्यावर आजदेखील कळते. तिथल्या शिलालेखानुसार जवळपासची २७ मंदिरे पाडून ती मशीद उभी केली गेली. हे एकच उदाहरण देतोय. बाकी तर सोडाच.

२. बादशाहनामा, आलमगीरनामा, तारीख ए फेरिस्ता वगैरे ग्रंथ धुंडाळून सीताराम गोएल यांनी अदमासे दोनेक हजार मशिदींची यादी दिलेली आहे- देवळे पाडून उभारलेली. त्यांचा प्रतिवाद तपशिलात जाऊन केलेला मला दिसला नाही. अतिशयोक्तिपूर्ण उल्लेखही जमेत धरण्याचा आरोप आहे पण नेमका तपशील कुठेच दिसत नाही.

सबब ८०च देवळे पाडली हे विधान ऐसीवर म्हणतो तशा अर्थाने रोचक आहे.

सीताराम गोएल यांच्या पुस्तकाची लिंक.

https://en.wikipedia.org/wiki/Hindu_Temples:_What_Happened_to_Them

सिंथिया टालबॉट वगैरे वेस्टर्न लोकांनी टीका करूनही या विषयावर अधिक काम झाले पाहिजे असे म्हटले आहे आणि आंध्रात १५६५ नंतर देऊळ पाडापाडी, विटंबना, इ. च्या घटनांत वाढ झाल्याचे म्हटले आहे. तेव्हा गोएल यांना पूर्णच निकलात आजिबात काढता येणार नाही.

बाकी गोएल हे आर एस एस शी निगडित असल्याने त्यांचे काम आपसूकच रद्दबातल, कचर्‍याच्या पेटीत टाकण्याजोगे ठरते हे आहेच, पण हा एक विदाबिंदू असावा म्हणून दिला. त्यामुळे ८० हाच खरा आकडा असावा यात संशय नाही. किंबहुना उरलेले एक शून्यही बहुधा पुसता यावे अजून रिसर्च केल्यास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माहितीबद्दल धन्यवाद. वाचून पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असा एखादा सारांश पेपर आहे का की ज्यात राज्यनिहाय/किंवा जिल्हानिहाय (सनावळ्यासहित) मंदिरे पाडली जाण्याचा त्यावर मशिदी उभ्या केल्या गेल्याचा तक्ता आहे ???

वरचा ब्याट्याचा प्रतिसाद वाचल्यानंतर हा खोडला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे, प्रतिसाद न वाचताच प्रतिप्रतिसाद दिला होतात तर! पक्के पुरोगामी, विचारजंत, डावे वगैरे दिसता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिप्रतिसाद नै कै. पृच्छा होती.

मला "डावे" म्हणाल्याबद्दल तुमचे खाते निस्सारित का काय ते केले जावे अशी माझी मागणी आहे. संपादक्/संचालक मंडल - आमची कैफीयत ऐकेल का ?

नैतर मी सुद्धा संपात सहभागी व्हायचं म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रिचर्ड ईटन ह्यांचे पुस्तक ई-पुस्तक रूपामध्ये उपलब्ध नसल्याने मला ते मिळविणे अवघड वाटते पण त्यावरील काही परीक्षणे वाचून (उदा. येथे वाचून थोडा अंदाज आला.

मुस्लिम इतिहासकरांनी लिहिलेली हिंदुस्तानवर सत्ता चालविलेल्या अनेक मुस्लिम सुलतान-बादशाह इत्यादींची चरित्रे उपलब्ध आहेत. ही चरित्रे आहेत तशी वाचली तर हिंदुस्तानमध्ये मुस्लिम सत्ताधीशांनी तोडलेल्या मंदिरांची संख्या शेकडोच्या घरात जाईल असे वाटते. ह्या आरोपातून त्यांना सोडवायचे असेल तर काही assumptions करावी लागतात. ईटन ह्यांची अशी दोन assumptions दिसतातः १) हे सर्व इतिहास ब्रिटिश भाषान्तरकारांनी ब्रिटिश सत्ता किती कनवाळू आहे हे तुलनेने दर्शविण्यासाठी वेचून उचललेले आहेत. २) नष्ट केलेली देवळे ही जित हिंदु राजांचा राजसत्तेच्या खुणा होत्या आणि त्या खुणा मिटवून आपली सत्ता पक्की उभारण्याचे ते एक राजकीय पाऊल होते. अतएव त्या नासधुशीकडे राजकीय दृष्टिकोणातून पाहायला हवे, धार्मिक नाही. तत्पूर्वीच्या काही हिंदु राजांनीहि अन्य हिंदु सत्तांचा पराजय केल्यावर अशीच देवळांची नासधूस केली होती असे ते सांगतात.

ह्यापैकी पहिले assumption हे Ipse dixit प्रकारचे आहे. गैरसोयीच्या मुद्द्यांना बगल द्यायची असेल तर मुद्दा उपस्थित करणार्‍याच्या हेतूविषयीच शंका उत्पन्न करायची. ('आर्य पश्चिमेकडून आले' असा विचार कोणी मांडला की 'असे तुम्ही म्हणणारच, कारण तुम्हाला पाश्चिमात्य संस्कृति पौर्वात्य संस्कृतीहून श्रेष्ठ आहे असे दाखवायचे आहे' असा आरोप मुद्दा मांडणार्‍यावरच करायचा. बाबरी मशीद पाडणार्‍या हिंदुत्ववादी विचाराची हीच युक्ति असते हे जाणवते.) दुसरे assumption काही अंशी खरेहि असेल पण केवळ तेच नासधुशीचे कारण होते हा विचार इस्लामचा एकंदरीत प्रवास आणि कुराणाच्या आज्ञा लक्षात घेता पटण्याजोगा नाही. विशेषत: इस्लामी सत्ता हिंदुस्तानात बळकट रीत्या प्रस्थापित झाल्यानंतर तर त्या assumption ला अर्थच राहात नाही. तेथे केवळ एकच हेतु उरतो - तो म्हणजे कुराणाची आज्ञा पाळणे हा धार्मिक हेतूच. नाहीतर मथुरेचे केशवरायाचे मंदिर, काशीतील विश्वनाथाचे मंदिर, सोमनाथाचे पुनर्रचित मंदिर, अहमदाबादचे चिंतामणि मंदिर अशी मंदिरे १७व्या शतकात औरंगझेबाने का पाडावीत? तेथे तर त्याच्याविरुद्ध दंड थोपटून उभा असा कोणी काफिर राजा नव्हता!

ही दोन assumptions वापरून आणि त्यामुळे मिळणारी वजावट जाऊनहि ८० च्या जवळपास मंदिरे उरतातच की ज्यांचा मुस्लिम सत्ताधार्‍याकडून झालेला विध्वंस मान्य करायला ईटन तयार आहेत. मला वाटते ही संख्याहि अल्प नाही. ही सर्व मोठी गाजलेली आणि इतिहासामध्ये ज्यांचा विध्वंस नोंदवला जाऊ शकला अशी प्रसिद्ध मंदिरे आहेत हे विशेष ध्यानात घ्यायला हवे. ह्यांच्या पलीकडे गावोगावची आणि ज्यांचा विनाश आता पूर्ण विस्मृतीत गेलेला आहे अशी शेकडो अन्य मंदिरे असतीलच की!

ह्यापुढे काही सहज शोधलेले उतारे दाखवतो. ते पाहता असे वाटते की खरोखरच इस्लामची आज्ञा पाळायच्या हेतूने आणि गाझीपद मिळवण्यासाठी मुस्लिम सत्ताधार्‍यांनी आपले बळ वापरून मंदिरे पाडली आणि मूर्ति पळवल्या.

ह्यापैकी पहिला उतारा माझ्याच ऐसीच्या २०१४च्या दिवाळी अंकातील ’विष्णुध्वज नावाचा स्तम्भ’ ह्या लेखातील आहे.

<<
गुप्तकालीन विदिशा-भिलसा गाव सध्याच्या जागी नसून ते बेस-बेटवा संगमावर होते आणि तेथे परिसरामध्ये भैलस्वामी नावाच्या देवाचे दूरवर ख्याति असलेले मंदिर होते. ह्याची आणि मालव प्रान्ताची कीर्ति ऐकून १२३४ मध्ये सुलतान इल्तमशच्या सैन्याने माळव्यावर चाल केली आणि बरीच लूटमार करून देवळे पाडली, तसेच बरीच लूट दिल्लीस नेली. उज्जयिनीचे मेघदूतामध्ये कालिदासाने वर्णिलेले महाकालाचे मंदिर आणि वर्णनावरून बरेच मोठे असावे असे वाटणारे भिलशाचे भैलस्वामीचे मंदिर, ही अशा तोडलेल्या मंदिरांमध्ये होती असे पुढील वर्णन सांगते. वर्णनात नाव न दिलेले मंदिर भैलस्वामीचे असावे. ह्या सर्व प्रकरणाचे पुढील वर्णन मिन्हाज्-उस्-शिराज़ लिखित तबकात-अल-नासिरी ह्या इतिहासात दिले आहे. (भाषान्तर एच.एम. इलिअट, पृ. ३२८, History of India as Told by Its Own Historians V. II)

"After he (Altamash) had reached the Capital he sent, in A.H.632 (1234 A.D.) the army of Islam towards Malwa and took the fort and the city of Bhilsa. There was a temple there which was three hundred years in building. It was abour one hundred and five gaz high. He demolished it. From there he proceeded to Ujjain, where there was a temple of Maha-kal, which he destroyed, as well as an image of Bikramajit, who was king of Ujjain, and reigned 1316 years before this time. The Hindu era dates from his reign. Some other images cast in copper were carried with the stone image of Maha-kal to Dehli."

ह्याच पुस्तकाच्या रॅवर्टी ह्यांनी केलेल्या भाषान्तरामध्ये हा इल्तमशच्या कार्याचा आढावा घेतांना हाहि अन्य मजकूर आहे:

(Conquering) Ujjain-Nagari and bringing away of the idol of Maha-kal, which they have planted before the gateway of the Jami Masjid in the capital city of Delhi in order that all true believers might tread upon it.
(Tabakaat-i-Naasiri - A General History of the Muhammadan Dynasties of Asia including Hindustan पृ.६२८).
>>

दुसरा उतारा मोहम्मद घोरी ह्याने केलेला सोमनाथ विध्वंस ह्या विषयी आहे.

पुढच्या उतार्‍यात सुलतान फिरोझ शाह तुघलक ह्याने मलुह/सलिहपुर/कोहाना नावाच्या गावांतील देवळांचा नाश केला त्याचे वर्णन आहे. (फुतुहात-इ-फिरोजशाही पृ.३८१ - भाषान्तर एच.एम. इलिअट, History of India as Told by Its Own Historians V. III). पैकी मलुहच्या नाशाचे वर्णन पहा. इतर वर्णने अशाच स्वरूपाची आहेत.

औरंगझेबाने केलेली काही कृत्ये:

जदुनाथ सरकार लिखित History of Aurangzib V. III येथे ३४व्या प्रकरणामध्ये (Islamic State Church in India) औरंगझेबाच्या देवळे तोडण्याची अनेक उदाहरणे पृ.२६६ च्या पुढेमागे दिसतात. त्यामध्ये अहमदाबादचे चिंतामणि मंदिर १६४४ (तो गुजरातेचा सुभेदार असतांना, येथे त्याने एक गायहि मारली - सरकार पृ.२८०), सोमनाथाचे पुनर्रचित मंदिर १६६९, वाराणसीचे विश्वनाथ मंदिर, मथुरेचे केशवराय मंदिर, (मथुरेच्या ह्यापूर्वीचे विनाशाचे काम सिकंदर लोदीने केले होते असे एलियटच्या ४थ्या खंडामधे पृ.४७ वर आहे असे दिसते.) हे धर्माचे कार्य व्यवस्थितपणे पार पाडले जावे ह्यासाठी औरंगझेबाने ’मुहतसिब’ (Censor of Morals) नावाचे अधिकारी आपल्या राज्यात नेमले होते आणि त्यांच्या अखत्यारातील देवळे पाडणे हे त्यांचे एक कर्तव्य होते (पृ. २६७).

त्याच प्रकरणामध्ये पंढरपूरच्या देवळाच्या विनाशाचे वर्णन पहा (सरकार पृ. २८६). देवळे फोडण्याच्या कामासाठी सैन्याबरोबर खास मजुरांचे पथक दिले जात असे येथे दिसते.

ईटन ह्यांनी ज्यावरून औरंगझेबाच्या पक्षामध्ये आपले मत बनविले आहे ते 'बनारस फर्मान' जदुनाथ सरकारहि देतात. येथे खरोखरच औरंगझेब बनारसच्या ब्राह्मणांच्या पुरातन अधिकारांमध्ये ढवळाढवळ करू नये असे आपल्या अम्मलदारांना बजावताना दिसतो. पण त्यासोबत एक rider देखील आहे, तो म्हणजे नवीन मंदिरे उभारण्याबद्दल बंदी. हे 'दयाळू' फर्मान आणि rider पुढील दोन उतार्‍यांमध्ये पहा. औरंगझेब आपल्या आंधळ्या कुराणश्रद्धेपासून थोडा विचलित झाला ह्याचे हे एकुलते एक उदाहरण असावे. (पृ. २८१ आणि २८३-८४)


जाताजाता आठवले की जहांगीर बादशहाने पुष्कर तलावाच्या भागात तो शिकारीसाठी गेला असतांना तेथे बांधले जाणारे वराह अवताराचे मंदिर तोडले आणि मूर्ति फोडली. हे मी Memoirs of Jahangir - जहांगीर-नामा ह्या जहांगीरच्या आत्मवृत्ताचे भाषान्तर - येथे पृ.२५४ वर वाचले आहे.

हे सर्व पाहता ईटन ह्यांनी केलेला मुस्लिम सत्ताधार्‍यांचा बचाव लंगडा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही वर्षांपूर्वी पुण्यात शनिवारवाड्यासमोरील नव्या पुलापासून सुरू होणारा नदीपात्रातील रस्ता बांधताना नदीकाठापाशी थोरला शेख सल्ला मशिदीच्या आसपास मंदिरांचे अनेक तुटकेफुटके अवशेष मिळाले होते. १३ व्या शतकात तत्कालीन मुस्लिम सरदाराने (बहुतेक खिलजी असावा) नदीकाठावरील अमृतेश्वर व नारायणेश्वर ही दोन मंदीरे पाडून तेथे मशीद बांधली अशी माहिती असलेले लेख त्यावेळी वृत्तपत्रात आले होते. या दोन मंदीरांचा ईटनच्या लेखात उल्लेख आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्राह्मणांनी या देशात जातिव्यवस्था तयार करुन हजारो वर्षं समाजाला नाडले आहे,वेदमंत्र ऐकले की अब्राह्मणांच्या कानात तप्त शिसे ओतने,शिक्षणाचा हक्क नाकारणे,दलितांना जनावरापेक्षा वाईट वागणूक देणे,ई ई ई अनेक प्रकार केले आहेत, त्याबद्द्ल कुणा ब्राह्मणाने माफी मागितल्याचे आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

मुसलमानांची आजची अवस्था अशी का आहे याचे विवेचन मान्य आहे पण माफीचा मुद्दा पटला नाही.
कुठल्या (भारतातल्या? इराणमधल्या? सौदीतल्या? मुघल?) मौलवीने माफी मागायला हवी आहे हे वरील प्रतिसादातून नक्की कळले नाही. हिंदुस्तानात इस्लामने अत्याचार केले आहेत तसे हिंदुंनीही अत्याचार केले आहेत, ब्रिटिशांनीही अत्याचार केले आहेत, मराठ्यांनी - पेंढाऱ्यांनी उत्तर भारतात प्रचंड लुटालूट केली आहे, पेशव्यांनी पुण्यात अत्याचार केले आहेत त्या सर्वांनी माफी मागायची का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही जरा अतिव्याप्ति होत आहे असे मला वाटते.

चर्चेचा मुद्दा इस्लामने केले अत्याचार हा आहे आणि त्या विषयाच्या मर्यादेतच आपण येथे बोलावे असे मला वाटते. तसे पाहू गेल्यास जगभर लहानमोठे लाखो अन्याय गेल्या शेकडो हजारो वर्षात केले गेले. त्या सर्वांची चर्चा तर आपण एकाच धाग्यात आत्ताच करू शकणार नाही हे उघड आहे.

तसे झाल्यास शिताफीने मूळ मुद्द्याला बगल देऊन वादांच्या गचपणात वाचकांना घुसवायचे असा हा प्रयत्न आहे असे वाटेल.

कोणत्या मौलवीने माफी मागायची हे मी माफी मागणार्‍यावरच सोडायला तयार आहे. माफी मागायची तयारी आहे काय हा मुख्य मुद्दा आहे. त्याच्यापासून दूर पळू नका. सल्मान रश्दीवर मृत्युदंड सुनावणार्‍या अयातुल्लाला तेव्हा jurisdiction चा प्रश्न आडवा आला नव्हता. तो आता का यावा? इथल्याइथे बुखारी आणि देवबंदसारखे धर्मज्ञ बसलेले आहेत आणि तेहि शबाना आझमीपासून ज्याची त्याची छाननी करण्याचे स्वातन्त्र्य स्वतःकडे घेऊ शकतात. तसलेच थोडे धैर्य येथे दाखवा इतकीच मागणी आहे आणि ते त्यांच्याच अनुयायांच्या हिताचेहि ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चेचा मुद्दा इस्लामने केलेले अत्याचार असा नसून औरंगजेब असा आहे. अत्याचारांची व्याप्ती मर्यादित केल्याने केवळ मुसलमानच अत्याचारी होते असे एकांगी चित्र उभे राहते. जगभर केलेल्या अन्यायांचा (ऑस्ट्रेलिया, जर्मनी इ.) दाखला तुम्हीच दिला आहे आणि त्या अनुषंगाने सद्यकालीन भारतीय मुस्लिमांनी सोळाव्या शतकातील अन्यायासाठी माफी मागावी असं सुचवलंय हे पक्षपाती आहे. (ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायाची माफी मागावी की काय या चर्चेत तुमचे मत संपूर्ण वेगळे दिसले. तो मुद्दा इथे विस्ताराने पुन्हा मांडत नाही)

१. पहिली गोष्ट म्हणजे औरंगजेबापुरते पाहिले तर तो भारतात जन्माला आला आणि भारतातच मेला. त्यादृष्टीने तो संपूर्ण भारतीय आहे. तो भारतीय नसेल तर उदा. लालकृष्ण अडवाणी सुद्धा पाकिस्तानीच आहे.

२. अयातुल्ला स्वतःला काहीही म्हणवून घेऊ दे, त्याच्या ज्युरिस्डिक्शनखाली भारतातल्या मुसलमानांना आणणं चुकीचं आहे. भारतातील मुसलमानांचं प्रतिनिधित्व भारतीय संसद करते. त्यांच्या वैयक्तिक कायद्यांसाठी (लग्ने, संपत्ती हस्तांतरण, घटस्फोट) भारतातील मुस्लिम वैयक्तिक कायदेमंडळाचे मत विचारात घेतले जाते. अयातुल्लाचे फतवे आणि आयसिसच्या खलिफाची आज्ञा याला भारतीय मुस्लिमांच्या दृष्टीने मी शून्य महत्त्व देतो. देवबंद वगैरे तर पूर्णपणे नॉन कॉनस्टिट्यूशनल आहेत. देवबंद मुसलमानांचे प्रतिनिधित्व करतात असे म्हणणे हे विहिंप हिंदूंचे प्रतिनिधित्व करते असे म्हणण्यासारखे आहे. त्यांना अजिबात रिकग्निशन देऊ नये.

३. औरंगजेब किंवा इतर मुसलमान राज्यकर्ते यांच्या 'अन्यायां'चं उदाहरण देताना 'मंदिरावर हल्ले' यापुढं गाडी जात नाही. या पलीकडं जाऊनही मुसलमानी काळातली भारतातली समाजव्यवस्था, करआकारणी, पायाभूत सुविधा, न्याय यासंदर्भात काही माहिती असेल तर ती जाणून घेण्यात मला रस आहे. उदा. जीझिया कराचं एक उदाहरण लगेच समोर येतं. तो कर निःसंशय अन्यायकारक आहे. पण त्याचा थोडा अधिक विचार होणे आवश्यक आहे. औरंगजेबासारखे मुस्लिम राज्यकर्ते शरिया कायद्यानुसार राज्य चालवण्याचे प्रयत्न करत होते. त्या कायद्यातील जीझिया कर एक पळवाट होती. याला अन्यायकारक कायद्याची अंमलबजावणी असं आज म्हणता येईल. पण ते पूर्णपणे खरं नाही. (मुद्दा ४ पाहा) आता अशी अन्याय्य करआकारणी करणं हे केवळ मुसलमानांचं व्यवच्छेदक लक्षण नाही. उत्तरपेशवाईतल्या करआकारणीबद्दल म.वा.धोंड यांनी 'मराठी लावणीचा इतिहास' सांगणाऱ्या पुस्तकात थोडी टिप्पणी केली आहे. कर्जपट्टी, सरंजामपट्टी, वेतनपट्टी, सावकारपट्टी, उंबरेपट्टी, भाडेपट्टी अशी मनमानी करआकारणी पेशवे करत असत. त्यातही कहर म्हणजे दुसऱ्या बाजीरावाला पेशवाई मिळाल्याबद्दल जनतेस संतोष झाला आहे याखातर 'संतोषपट्टी'ही सुरु केली होती. औरंगजेबानं जीझियासारख्या कराचा वापर साम्राज्यविस्तारासाठी केला. पेशव्यांनी या पट्टयांचा वापर शिंद्यांची देणी चुकवण्यासाठी आणि बावनखणीतले तमाशे आणि घटकंचुकीसारख्या प्रकारांवर पैसे उधळण्यासाठी केला.

४. जीझिया कर एकांगी होता हे चुकीचं चित्रण आहे. तत्कालीन इस्लाम कायद्यानुसार मूर्तीपूजक आणि अग्नीपूजक यांना मुळात जगण्याचीच परवानगी नव्हती. जीझिया कर हा एकेश्वरवादी नॉन-मुस्लिम ख्रिश्चन-ज्यूंसाठी होता. इतरांनी एकतर मुसलमान व्हावे किंवा मृत्यू पत्करावा असा कायदा होता. भारतातील मुस्लिम राज्यकर्त्यांनी खलिफा वगैरेंशी वाद घालून हिंदूंना जिवंत ठेवण्यासाठी ह्या कराची सवलत मिळवली. शिवाय जीझिया कर दिल्यावर हिंदूंवर राज्यासाठी लढण्याची जबाबदारी येत नाही. त्यादृष्टीने ती सेक्युरिटी फीदेखील होती. कुरुंदकरांनी अकबरावरच्या लेखात असं लिहिलंय की अकबराला - हिंदूंनी राज्यासाठी न लढणे ही - जीझियाची ही बाब पसंद नसल्यानं त्यानं जीझिया संपूर्णपणे रद्द केला आणि हिंदूंना राज्याचा भाग मानून राज्यासाठी लढण्यास प्रवृत्त केले. (औरंगजेबानं पुन्हा तो निर्णय फिरवला यावरुन शिवाजीने अकबराची आठवण करुन देण्यासाठी औरंगजेबाला पत्र लिहिले होते)

५. मुसलमान सामान्य जनतेवर नक्की काय अन्याय करत होते याचं दर्शन थोडं फुल्यांच्या लेखनातून घडतं.
अ. फुल्यांनी भारतावरील महम्मदी धर्मचक्राचं स्वागत करुन मोहम्मदाचा पोवाडा लिहिला. दलित - बहुजन जनतेला या निमित्ताने आशेचा किरण दिसला होता असं त्यांना वाटलं.
ब. शिवाजीसारख्या शूर परंतु भोळ्या राजाला भोंदू साधूंनी पुस्तके गंडवून मुसलमानांविरुद्ध लढायला भाग पाडले.

थोडक्यात अगदी अठराव्या शतकात (बाराव्या शतकातील सुरु झालेले आक्रमण त्याचा संपूर्ण भर ओसरल्यानंतरही) फुल्यांना मुसलमानी सत्तेविषयी आकर्षण वाटले यात सामान्य जनतेवर फारसा अन्याय झालेला दिसत नाही असा थोडासा समज होतोय.

६. आता मूळ मुद्दा औरंगजेबाचा. औरंगजेबाने स्वतःच्या थोरल्या भावाला ठार मारले. वडिलांना तुरुंगात टाकले. तो अतिमहत्त्वाकांक्षी राजा होता. यात मुसलमानांचा कुठं संबंध आला? यात फक्त औरंगजेब सायको होता असं दिसतं. औरंगजेबाने हे केलं त्याची सत्ताकांक्षा पूर्ण करण्यासाठी. त्यात तो पुढं बऱ्यापैकी यशस्वी झालेला दिसतोय. (शेजवलकरांनी औरंगजेबाच्या अधिपत्याखाली हा प्रचंड देश एकत्र होण्याची एक शक्यता होती असं म्हटलंय. या वाक्याचा संपूर्ण संदर्भ मला माहिती नाही पण हे सुटे वाक्य नकारात्मक छटेचे वाटले नाही.) पण अशी सायको उदाहरणं आपल्या हिंदूंमध्येही ही दिसतात. वर सांगितलेल्या म.वा.धोंड यांच्या पुस्तकामध्ये असा एक प्रसंग आहे. पानिपत म्हटले की उठताबसता शिंदे-होळकर अशी नावे घेतली जातात. यापैकी दौलतराव शिंद्यांनी स्वतःचा सेनापती नारायणराव बक्षी याच्या अंगाला बाण बांधून बत्ती मारून आकाशात उडवले आणि ठार केले. का? तर 'बक्षीचा पक्षी केला' असा अनुप्रास साध्य करण्याकरिता. निदान औरंगजेबाच्या म्याडनेसमागे एक सयुक्तिक कारण तरी होते असे मला वाटते.

७. याउप्पर बहुतेक सर्व भारतीय मुसलमान राजांनी खलिफा वगैरे अभारतीय एन्टिटिंना जितकं लांब ठेवता येईल तितकं ठेवलंय. अकबरासारख्याने तर स्वतःचा धर्मही चालू केला होता. उदा. मुस्लिम धर्मातील सुधारणेचे हे एक उदाहरण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद आवडला.

यात आणखी एक मुद्दा महत्त्वाचा वाटतो. ज्या लोकांनी (जे काही) अत्याचार केले त्यांचे वंशज म्हणवू शकणारे लोक त्या-त्या देशांमध्ये सत्ताधारी गटाचे आहेत. भारत हे हिंदू राष्ट्र नाही, पण बहुसंख्य प्रशासक आणि राजकारणी (जन्माने आणि निदान सांस्कृतिक) हिंदू आहेत. मुस्लिम समाज भारतातला प्रगत समाज नसून कमी प्रगत समाजांपैकी एक आहे. आरक्षणाच्या बाबतीत अशी माफीवजा भूमिका घेतली गेली आणि ती ग्राह्य वाटते; कारण एकेकाळच्या अन्याय करणाऱ्या लोकांचे वंशज म्हणवणारे समाज आज पुढारलेले आहेत. मुस्लिम समाजाबद्दल हे म्हणता येत नाही. त्यामुळे हा प्रश्न आणखी गुंतागुंतीचा बनत असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसाद अतिशय आवडला. आशय तर विचार करण्याजोगा आहेच. पण भाषा आणि सूर कमालीचा संयत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

४. जीझिया कर एकांगी होता हे चुकीचं चित्रण आहे. तत्कालीन इस्लाम कायद्यानुसार मूर्तीपूजक आणि अग्नीपूजक यांना मुळात जगण्याचीच परवानगी नव्हती. जीझिया कर हा एकेश्वरवादी नॉन-मुस्लिम ख्रिश्चन-ज्यूंसाठी होता. इतरांनी एकतर मुसलमान व्हावे किंवा मृत्यू पत्करावा असा कायदा होता. भारतातील मुस्लिम राज्यकर्त्यांनी खलिफा वगैरेंशी वाद घालून हिंदूंना जिवंत ठेवण्यासाठी ह्या कराची सवलत मिळवली.

उपरोक्त दाव्याची संदर्भा शिवाय वस्तुनिष्ठते बद्दल साशंकता वाटते.

sandarbha hava

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

कुरुंदकरांनी अकबराविषयक लिहिलेल्या लेखात हा उल्लेख वाचला आहे. दुर्दैवाने माझ्याकडे सध्या पुस्तक हाताशी नाही. विश्वास नसेल तर सोडून द्या.

खालील दुव्यावर साधारण याच आशयाची माहिती आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Jizya#Islamic_scriptures

Jizya is a religiously required per capita tax on non-Muslims under Islamic law, levied by a Muslim state.[1][2] Jizya tax was not paid by Muslims, who however paid zakat (alms) tax instead.[3] Muslims are exempt from Jizya tax, but they pay Zakat instead. Jizya tax on non-Muslims is mentioned in and mandated by the Quran and the Hadiths.[4][5]

Jizya is an example of taxes that depended on the religion of the individual. Scholars[6][7] state Jizya to be a discriminatory tax. Historically, the Jizya tax has been rationalized in Islam as a fee for protection provided by the Muslim ruler to non-Muslims, for the permission to privately practice a non-Muslim faith with some communal autonomy in a Muslim state, and as material proof of the non-Muslims' submission to the Muslim state and its laws

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिझीयाला लेजिटीमसी देणार्‍या मूळ इस्लामीक ग्रंथातील संदर्भ मिळतील ? झकात ~ जिझीया या दोन्हीचे स्वरूप एकसारखे आहे याचे संदर्भ मिळतील? औरंगझेबाने लावलेल्या जिझीया आणि झकातीची संदर्भासहीत तुलना मिळू शकेल ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

विकीपानावर थोडी माहिती आहे. हदीथनुसार हा कर लावण्यात येत होता. आधी फक्त ख्रिश्चन-ज्यू वगैरेंचा समावेश होता. मुहम्मद बिन कासीमने तो भारतात हिंदूंसाठी सुरु केला. (सुरुवात औरंगजेबाने केलेली नाही). करआकारणी वेगवेगळ्या दराने होत होती असं दिसतंय. प्रत्येक राजाने दराची मनमानी केलेली दिसते आहे. मला आठवतं त्यानुसार कुरुंदकरांनी असं लिहिलंय की उत्तर भारतातले मुसलमान राजे (मुघल वगैरे) हा कर जास्त एन्फोर्स (जास्त दर आणि सक्तीची वसुली असं दोन्ही) करत होते. दक्षिण भारतात (आदिलशाही-निजामशाही-कुतुबशाही) नावापुरता कर होता. अनेकदा वसुलीची सक्तीही होत नसे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.....अन्याय्य करआकारणी करणं हे केवळ मुसलमानांचं व्यवच्छेदक लक्षण नाही. उत्तरपेशवाईतल्या करआकारणीबद्दल म.वा.धोंड यांनी 'मराठी लावणीचा इतिहास' सांगणाऱ्या पुस्तकात थोडी टिप्पणी केली आहे. कर्जपट्टी, सरंजामपट्टी, वेतनपट्टी, सावकारपट्टी, उंबरेपट्टी, भाडेपट्टी अशी मनमानी करआकारणी पेशवे करत असत.........

नॉनसेक्युलर टॅक्सेशन आणि सेक्युलर टॅक्सेशन यांची तुलना कशी होऊ शकते ? सेक्युलर टॅक्सेशनही अन्यायकारक असू शकतच, समजा सेक्युलर टॅक्सेशन करणार्‍यांनी अन्याय केलाही त्यामुळे टॅक्सेशन नॉनसेक्युलर पद्धतीने करण्यातून होणार्‍या अन्यायाच परिमार्जन कसे होते ? एका वेगळ्या चुकीमुळे तीसर्‍याची तीसरी चुक कशी बरोबर होते ?

औरंगजेबाने जे अपराध केलेच नाहीत त्याच पाप औरंगजेबाच्या डोक्यावर घालण्याची आमची इच्छा नाही. पण जे केल ते झाकण्याच्या प्रयत्नातून नेमके काय साध्य करावयाचे आहे ? लिबरलीझम ? मुस्लीमांची बाजू मांडने ? का औरंगजेबाला हिरो करणे ?

औरंगजेबाला हिरो केल्यामुळे कुणी मुस्लीमांची, लीबरलांची अथवा सेक्युलरांची बाजू कशी मांडली जाते ? मुस्लीम आणि इस्लामचे योग्य बाबतीत गोडवे गा, चार पोवाडे लिहिण्यात मीही आपल्यासोबत सहभागी होतो. पण चांगल्या उद्देशांसाठी अधीक चांगला हिरो शोधणे अधीक सयुक्तीक असावे.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

ग्रेटथिन्कर वगळता औरंगजेबाला इथं कुणीही हीरो म्हटलेलं नाही. मी जीझिया हा निःसंशय अन्यायकारक होता, अौरंगजेब क्रूर-सायको असं स्पष्ट म्हटलंय. पण एकंदर करआकारणीमागची कारणमीमांसा काय होती हे सांगायचा प्रयत्न केलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेशव्यांनीही बेलगाम करआकारणी केली याचा मला लागलेला अर्थ - आज बेलगाम, अन्यायकारक वाटेल अशी करआकारणी करणं हे त्या काळाचं व्यवच्छेदक लक्षण होतं. औरगंजेबाच्या काळात होतं आणि पुढे पेशव्यांच्याही. औरंगजेबाने त्याच्या धर्मात थोड्या सुधारणा घडवून आणून करआकारणी केली, पेशव्यांनी "सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी" करआकारणी केली.

आजसुद्धा लोकांनी भरलेल्या करांमधून खगोलशास्त्र संशोधन किंवा दर्जेदार चित्रपट संस्था चालवल्या जातात ते काही लोकांना अन्याय्य वाटतं. हा "अन्याय" करण्यामागची कारणपरंपरा धर्म नाही, घटना किंवा तत्सम मूल्यरूपी गोष्टी असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अतिनेमके अन मार्मिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उत्तरपेशवाईतल्या करआकारणीबद्दल म.वा.धोंड यांनी 'मराठी लावणीचा इतिहास' सांगणाऱ्या पुस्तकात थोडी टिप्पणी केली आहे. कर्जपट्टी, सरंजामपट्टी, वेतनपट्टी, सावकारपट्टी, उंबरेपट्टी, भाडेपट्टी अशी मनमानी करआकारणी पेशवे करत असत. त्यातही कहर म्हणजे दुसऱ्या बाजीरावाला पेशवाई मिळाल्याबद्दल जनतेस संतोष झाला आहे याखातर 'संतोषपट्टी'ही सुरु केली होती. औरंगजेबानं जीझियासारख्या कराचा वापर साम्राज्यविस्तारासाठी केला. पेशव्यांनी या पट्टयांचा वापर शिंद्यांची देणी चुकवण्यासाठी आणि बावनखणीतले तमाशे आणि घटकंचुकीसारख्या प्रकारांवर पैसे उधळण्यासाठी केला.

वेल, वरील काहींना एक पॅरलल शिवछत्रपतींकडूनच मिळते. राज्याभिषेकाचा खर्च भरून काढण्याकरिता त्यांनी सिंहासनपट्टी नामक कर लादला होता. अन बाकी पट्ट्या मनमानी कशा हे समजत नाही. आणि पेशव्यांनी पैसे उधळले वगैरे जेनेरिक वाक्ये अतिरोचक आहेत. बावनखणी आणि घटकंचुकी हे प्रकार फक्त दुसर्‍या बाजीरावाच्या नावावर आहेत. तो शेवटचा पेशवा, राज्यकारभारास नालायक म्हणून त्याचे सर्वच 'गुण' हे घातक म्हणून दाखवले जातात. ज्याच्या काळात मराठे अटकेपार पेशावरापर्यंत पोहोचले (पेशावरही आपल्याकडेच होते काही काळ) तो नानासाहेबही "जातीच्या शुद्ध, तरण्या" स्त्रियांचे "सरकारात प्रयोजन आहे" असे म्हणतच होता ना? त्याच्या वेळी बरे काही झाले नाही?

राज्यकारभारातली अक्कल आणि पर्सनल चारित्र्य यांची गल्लत करू नका. पेशवे इतके डोळ्यावर येत असतील तर शेकडो स्त्रियांचे जनानखाने बाळगणार्‍या मोंगलांबद्दल काय म्हणाल? हे तेव्हा सर्वचजण करीत, त्यापायी थोडी उधळपट्टीही चालतच असे. पण फक्त त्यापायी पैसे घालवले आणि पर्यायाने राज्य गमावले वगैरे मीमांसा अतिसुलभीकरणाची आणि निखालस चूक आहे. दुसरा बाजीराव मूर्ख होता वगैरे म्हणा, पण बावनखणीपायी राज्य घालवले हे आततायी अतिसुलभीकरण आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(सर्व) पेशवे कर्तृत्ववान नव्हते अशी मी सरसकट टिप्पणी केलेली नाही. मनमानी करआकारणी करणे हे फक्त मुसलमान राज्यकर्त्यांचे लक्षण नव्हते इतकाच मर्यादित मुद्दा मांडायचा होता. त्यासाठी दुसऱ्या बाजीरावाचे उदाहरण दिले.

मला त्यापुढं जाऊन असं म्हणायचंय की भारतात जन्मलेल्या अंतर्बाह्य भारतीय औरंगजेबाने आसामापर्यंत त्याचे राज्य वाढवले आणि त्याच भारतातल्या पेशव्यांनी कंदाहारपर्यंत राज्य वाढवले यात ४०० वर्षानंतर आता आपले आणि बाहेरचे ठरवण्याचे निकष नक्की कसे लावायचे? एका ठिकाणी मुसलमानांनी स्वतःला आधी भारतीय समजावे असा दावा आपण करतो, मात्र दुसऱ्या ठिकाणी आपण मुसलमानांना 'आपले' मानतो का हा एक प्रश्न आहे.

(शिवाजीचे उदाहरण येथे घेतले नाही कारण शिवाजीचे सर्वच कार्य अत्यंत उत्तम आहे. करआकारणी, न्यायव्यवस्था, स्वतःच्या व इतरांच्या धर्मासंबंधी वागणूक, रयतेशी वागण्याची पद्धत या सर्व बाबतीत तो लोकोत्तर आहे. त्या तुलनेत पेशवे आणि मुघल हे यशापयश व स्खलनाच्या पातळीवर समांतर वाटतात)

राज्यकारभारातली अक्कल आणि पर्सनल चारित्र्य यांची गल्लत करू नका.

बिंगो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला त्यापुढं जाऊन असं म्हणायचंय की भारतात जन्मलेल्या अंतर्बाह्य भारतीय औरंगजेबाने आसामापर्यंत त्याचे राज्य वाढवले आणि त्याच भारतातल्या पेशव्यांनी कंदाहारपर्यंत राज्य वाढवले यात ४०० वर्षानंतर आता आपले आणि बाहेरचे ठरवण्याचे निकष नक्की कसे लावायचे? एका ठिकाणी मुसलमानांनी स्वतःला आधी भारतीय समजावे असा दावा आपण करतो, मात्र दुसऱ्या ठिकाणी आपण मुसलमानांना 'आपले' मानतो का हा एक प्रश्न आहे.

मुसलमानांना आपले मानणे म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे हे कळाले तर चर्चा अजून नेमकी होईल. इस्लामच्या नावाखाली अत्याचार करणारे अनेक मुसलमान राजे होऊन गेले. त्यांचा इतिहास नाकारायचा किंवा टोन डाऊन करून सांगायचा आहे का?

आपला आणि परका ही विभागणी सापेक्ष असते हे उघड आहे. भारतातील बहुसंख्य नॉन-अब्राहमिक धर्मीय प्रजेला (हिंदू म्हणणार होतो, पण लगेच व्याख्येवर चर्चा भरकटत जाईल म्हणून असो.) तिचा धर्म, संस्कृती, उपासनापद्धती वगैरे पाळू देणारे राजे किंवा शासक परकीय असले तरी त्यांना भारतीयांनी नेहमीच आपले मानले आहे. याउलट भारतात जन्मूनही बहुसंख्य जनतेवर विशिष्ट धर्माचरणाची सक्ती करणे वगैरे चाळे करणार्‍याला निव्वळ भारतात जन्म झाला म्हणून आपले मानावे ही सक्ती चमत्कारिक आहे.

पुढारलेल्या युरोपातलेच उदाहरण द्यायचे तर हिटलरचे अनेक अधिकारी जर्मनीच्या सध्याच्या भूभागातच जन्मले होते, त्यांना आज जर्मन जनता आपले मानते का? हिटलरला जर्मन्स राहूदेत, ऑस्ट्रियन्स तरी आपले मानतात का? हे पाहिल्यास औरंगजेबालाही आपले म्हणा ही सक्ती निरर्थक वाटते.

बाकी मुसलमान राजांना-अधिकार्‍यांना डोक्यावर घेतल्याची उदाहरणेही आहेतच, अकबर हे त्यातले सर्वांत मोठे नाव. बाकी मलिक अंबरासारखे सेमी-राजे, 'गोरा खोजा-काळा खोजा' या बहामनीकालीन दुकलीतील गोरा खोजा नामक तुर्क पाटबंधारेवाला अधिकारी, अशीही काही उदाहरणे आहेतच. मला आत्ता इतकीच आठवताहेत, अजून सर्च केल्यावर अजून दिसतील. जे अत्याचारी होते त्यांना शिव्या घातल्या तर लगेच 'आपले म्हणतो का' असे प्रश्न उभे करणे तर्कदुष्ट नाही का, याचा विचार होणे आवश्यक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपले मानावे म्हणजे चांगले मानावे असे मला अभिप्रेत नाही. औरंगजेब 'बाहेरचा' किंवा त्याने 'बाहेरुन' येऊन आपल्यावर अत्याचार केले असं म्हणणारे दिसतात त्या अनुषंगाने मला म्हणायचं होतं. अडीचशे वर्षापेक्षा कमी वयाच्या अमेरिकेसारख्या देशात स्थलांतरितांच्या अगदी दुसऱ्या पिढीला अमेरिकन मानले जाते. वडील-आजोबा-पणजोबांसकट सगळे भारतीय असूनही औरंगजेब भारतीय मानला जात नाही हे कोडं आहे. अकबराचं उदाहरण योग्य आहे, पण तुलनेने चांगला असूनही, अकबराला आपलं कोण मानतं हाही एक प्रश्न आहे. जोधा-अकबर चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा संभाजी भिड्यांसकट अनेकांनी संपूर्ण महाराष्ट्रात बरंच वातावरण पेटवलं गेलं होतं हा अगदी अलीकडचा इतिहास आहे.

हिटलर आणि 'अगदी पराकोटीचा अत्याचारी' औरंगजेब यांची तुलना होऊ शकत नाही. हिटलरने ज्यूंचा सरळसरळ द्वेष करुन कत्तलखाने उघडले होते. त्याच्याशी समांतर म्हणजे तैमूरलंग किंवा चंगेझखानाबद्दल 'मुडद्यांची रास रचली' असं वाचलंय. पण औरंगजेबाबद्दल तितक्या पराकोटीचं वाचलेलं नाही.

मंदिरं पाडणं हे 'हिंदूं'वरील अत्याचाराचं उदाहरण होऊ शकत नाही. हिंदूंचा अगदी मानबिंदू मानलं जाणारं काशीविश्वनाथ मंदिर औरंगजेबानं पाडलं. पण हे मंदिर संपूर्ण हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व करतं का? अगदी अलीकडे एकोणीसाव्या शतकात (१९०४) ह्या मंदिरात संपूर्ण हिंदू असलेल्या पेरियार रामस्वामी यांना ब्राम्हण नसल्यामुळं अपमान करुन हाकलून देण्यात आलं. पुढं द्रमुक वगैरे द्रविडी चळवळीच्या स्थापनेत हा प्रसंग कलाटणी देणारा मानला जातो. थोडक्यात या मंदिराचा हाही एक इतिहास आहे. हे एक उदाहरण झालं. अशा अनेक प्रतिष्ठित मंदिरांमध्ये, हिंदू मानल्या गेलेल्या समाजातील कित्येकांना प्रवेशाचीही परवानगी नव्हती. मग औरंगजेबानं तेव्हा जे केलं त्याला समस्त हिंदू समाजावरील अत्याचार मानून आता ऊर बडवण्यात काय अर्थ आहे.

औरंगजेबाने हिंदूंना तसंही सामावून घेतलेलं दिसतं. उदा. त्याचा सैन्यप्रमुख मिर्झाराजे जयसिंग हे एक उदाहरण. औरंगजेबाचे अनेक सरदार रजपूत होते. औरंगजेबाच्या सैन्यातही बरेच हिंदू होते असं दिसतंय. शाहजहानच्या मानाने औरंगजेबाच्या सैन्यात हिंदूंचं प्रमाण वाढलंय असंही वाचलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वडील-आजोबा-पणजोबांसकट सगळे भारतीय असूनही औरंगजेब भारतीय मानला जात नाही हे कोडं आहे.

परकीय कल्चरचा उदोउदो करून स्थानिक कल्चरचे सप्रेशन करणारा माणूस परकीय ठरवला गेला तर त्यामागची भावना समजू शकतो.

पण तुलनेने चांगला असूनही, अकबराला आपलं कोण मानतं हाही एक प्रश्न आहे. जोधा-अकबर चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा संभाजी भिड्यांसकट अनेकांनी संपूर्ण महाराष्ट्रात बरंच वातावरण पेटवलं गेलं होतं हा अगदी अलीकडचा इतिहास आहे.

भिड्यांबद्दल काय अन किती बोलावे तेवढे थोडेच आहे त्यामुळे बोलत नाही. समजा अगदी अख्खा महाराष्ट्र अकबराचा द्वेष करतो असे मानू, उरलेल्या भारताचे काय? उरलेल्या भारतात अकबराबद्दल काय भावना आहे हे पाहिलेत का?

हिटलर आणि 'अगदी पराकोटीचा अत्याचारी' औरंगजेब यांची तुलना होऊ शकत नाही. हिटलरने ज्यूंचा सरळसरळ द्वेष करुन कत्तलखाने उघडले होते. त्याच्याशी समांतर म्हणजे तैमूरलंग किंवा चंगेझखानाबद्दल 'मुडद्यांची रास रचली' असं वाचलंय. पण औरंगजेबाबद्दल तितक्या पराकोटीचं वाचलेलं नाही.

मुद्दा निव्वळ क्रौर्याच्या तीव्रतेचा आजिबात नाही. "भारतात जन्मून भारतातच मेला तरी आपला का मानत नाहीत बॉ" या प्रश्नाचे ते उत्तर आहे. ते लोकही काही कारणांमुळे जर्मनीत जन्मून जर्मनीत मेलेल्यांना आपले मानत नाहीत हे सांगायचे होते. त्यावर "याच्या गुन्ह्यांची तीव्रता कमी" हे उत्तर चूक आहे कारण फोकसच तो नाहीये.

राहता राहिला मुडद्यांच्या राशीचा मुद्दा- मुंडक्यांचे मिनार बाबर वगैरेंनीही रचलेले असल्याच्या नोंदी आहेत. नेमके पुरावेच पाहिजे असतील तर हुडकून देऊ शकतो.

मंदिरं पाडणं हे 'हिंदूं'वरील अत्याचाराचं उदाहरण होऊ शकत नाही. हिंदूंचा अगदी मानबिंदू मानलं जाणारं काशीविश्वनाथ मंदिर औरंगजेबानं पाडलं. पण हे मंदिर संपूर्ण हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व करतं का? अगदी अलीकडे एकोणीसाव्या शतकात (१९०४) ह्या मंदिरात संपूर्ण हिंदू असलेल्या पेरियार रामस्वामी यांना ब्राम्हण नसल्यामुळं अपमान करुन हाकलून देण्यात आलं. पुढं द्रमुक वगैरे द्रविडी चळवळीच्या स्थापनेत हा प्रसंग कलाटणी देणारा मानला जातो. थोडक्यात या मंदिराचा हाही एक इतिहास आहे. हे एक उदाहरण झालं. अशा अनेक प्रतिष्ठित मंदिरांमध्ये, हिंदू मानल्या गेलेल्या समाजातील कित्येकांना प्रवेशाचीही परवानगी नव्हती. मग औरंगजेबानं तेव्हा जे केलं त्याला समस्त हिंदू समाजावरील अत्याचार मानून आता ऊर बडवण्यात काय अर्थ आहे.

ठीक आहे. ज्यांना मंदिरप्रवेशाची परवानगी नव्हती त्यांचा प्रश्न नाही, त्यांनी ऊर बडवू नये, उलट देवळे पडल्याबद्दल अवश्य आनंदोत्सव साजरा करावा. उरलेल्यांचे काय? साडेतीन टक्केवाले सोडून उरलेल्यांना देवळांत प्रवेश नव्हता असे तर नाही ना? एस्सी एस्टी यांचे एकूण हिंदू समाजात % किती? तेवढे सोडून उरलेल्या हिंदूंसाठी तो प्रश्न नक्कीच रिलेव्हंट आहे. आणि उरलेले हिंदू हा गट किमान ७०-७५% इतका तरी नक्कीच आहे. तेवढ्या संख्येने असलेल्या जनतेच्या भावनांना काही अर्थ नाही, कारण बोलूनचालून ते अत्याचारी- असे असेल तर मग असूदे.

औरंगजेबाने हिंदूंना तसंही सामावून घेतलेलं दिसतं. उदा. त्याचा सैन्यप्रमुख मिर्झाराजे जयसिंग हे एक उदाहरण. औरंगजेबाचे अनेक सरदार रजपूत होते. औरंगजेबाच्या सैन्यातही बरेच हिंदू होते असं दिसतंय. शाहजहानच्या मानाने औरंगजेबाच्या सैन्यात हिंदूंचं प्रमाण वाढलंय असंही वाचलंय.

मिर्झाराजे जयसिंगाचे घराणे म्हणजे अंबर (जयपूर) कडचे राजघराणे होय. त्यांची आणि मुघलांची सोयरीक खूप प्राचीन आहे- जोधाबाई याच घराण्यातली. त्यापुढेही दोनेक पिढ्या त्यांनी आपल्या मुली मुघलांना दिलेल्या आहेत. त्यामुळे इतके क्लोज़ नाते औरंगजेब सहजासहजी तोडेल असे वाटत नाही. शिवाय हे सर्वांत ताकदवान रजपूत घराणे असून त्याचा पोलिटीकली प्रचंड फायदा मुघलांना होत होता. त्यामुळे हिंदूंना सामावून घेणे हे त्याच्या राजकीय धूर्ततेचे उदाहरण आहे. त्याला अपॉर्च्युनिझम म्हणता येईल, औदार्य म्हणता येणार नाही.

बाकी औरंगजेबाच्या सैन्यात हिंदू वतनदारांचे प्रमाण वाढले ही गोष्ट खरी आहे, पण त्याच्या मंदिर पाडापाडी प्रोग्र्यामनंतर त्यांच्यात असंतोष वाढला, बंडाळ्या वगैरेंना सुरुवात झाली असे पुरावे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वरील प्रतिसाद चांगला आहे. औरंगजेबाची आजी जयसिंगाच्या घराण्यातली होती हा महत्त्वाचा पॉईंट आहे तो लक्षात आला नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा प्रकारची अन्तःपरीक्षा आणि सुधारणा चळवळ जोपर्यंत मुस्लिम समाजात निर्माण होत नाही तोपर्यंत तो समाज असाच अज्ञान आणि दारिद्र्याने गांजलेला आणि कुराण-मोहम्मद तसेच त्यावरचे भाष्यकार मुल्ला-मौलवी ह्याचा गुलाम राहणार

हे अगदी नेमके आहे. कुरूंदकर आणि हमीद दलवाईंच्या लेखातूनही मुस्लीम समाजाबद्दल हेच वाटलं होतं.
----------
अर्थात त्यामुळे हिंदूंनी अधिकाधिक कट्टर बनण्याचं समर्थन करता येणार नाही. पण मुस्लीम समाजाच्या कट्टर मतांना चिकटून रहाण्यामुळे हिंदूंना अशी प्रतिक्रिया द्यावीशी वाटू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


पण मुस्लीम समाजाच्या कट्टर मतांना चिकटून रहाण्यामुळे हिंदूंना अशी प्रतिक्रिया द्यावीशी वाटू शकते.

A) मुस्लिम समाज कट्टर मतांना चिकटून राहतो
Dirol हिंदुंना कट्टर प्रतिक्रिया द्यावीशी वाटते.

A चा परिणाम B मधे का होतो ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हायला नको! अजिबात नको!
उ.दा. हिंदूंचं एक मत असं की "ते लोक बघा- अजिबात त्यांच्याविरूद्ध एक शब्द ऐकून घेत नाहीत, सरळ कापून काढतात(जणू काही हे भूषणास्पद आहे!). त्याविरूद्ध आपले लोक. सग्ग्ग्ग्ळं ऐकून घेतात."
मग मूळ हिंदूंमधे नसलेला धार्मिक कट्टरपणा जोपासण्याचे प्रयत्न होतात की "हिंदूत्व खतरे मे है".

खरं तर संपूर्ण कट्टर असलेलं एखादं मुस्लीम राष्ट्र आणि त्याउलट सेक्युलर असलेला भारत ह्यांच्या प्रगतीची तुलना केली तर कुठली दिशा बरोबर आहे ते सहज कळून यावं! तरीही हिंदू आपल्यात नसलेला कट्टरपणा का अंगिकारत असतील? "भावना दुखावल्या गेल्या म्हणून?"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑफेन्स इज बेस्ट डिफेन्स वाटत असावे असा कयास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विद्वान धागाकर्ते असे म्हणतात की 'औरंगजेब हा लोकोत्तर राजा होता'. त्याच्या दयाळू कारभाराचा पुरावे मला 'म'आसिर-ए-आलमगिरी' (जदुनाथ सरकार भाषान्तर) ह्या पुस्तकामध्ये सर्वत्र विखुरलेले दिसतात. त्यापैकी वानगीदाखल हा एक पृ. ३१५ वर आहे. औरंगझेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या धार्मिकतेचे वर्णन लेखक साकी मुस्त'आद खान करीत आहे. तो म्हणतो:

Eulogy

'वास्तविक औरंगजेब हा लोकोत्तर राजा होता,त्याने अनेक समाज सुधारणा घडवुन आणल्या होत्या. त्याच्या कारकीर्दीत हिंदुंचे धर्मांतरन त्याने होऊ दिले नाही ,हा त्याचा मोठा उपकार भारतीयांवर आहे.' (अशुद्धलेखन मूळचेच. त्याचे श्रेय मला नको!)

माझ्या मनात तरी ह्या विधानाच्या सत्यतेबद्दल काडीमात्र शंका आता उरलेली नाही.

कोण आहे रे तिकडे? 'बुडाला औरंग्या पापी' असे लिहिणार्‍या त्या नारायण ठोसराला ताबडतोब मुसक्या बांधून हत्तीच्या पायी द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बुडाला औरंग्या पापी
उदंड झाले पाणी
स्नानसंध्या करावया
म्हणजे पाणि मोकळ झालं शेतीला ,गरीबांना प्यायला याचा आनंद नाही, आनंद कशाचा तर ......... "स्नानसंध्या करावया"
याने म्हणे शिवाजीला प्रेरणा दिली
आधी आपल्या धर्मातले बघा ,मग आलमगीर औरंगजेबकडे बोट दाखवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

बुडाला औरंग्या पापी | म्लेंछ संहार जाहाला |मोडली मांडली छेत्रे | आनंदवनभुवनी
उदंड जाहले पाणी | स्नान संध्या करावया |जप तप अनुष्ठाने |आनंदवनभुवनी

शिवराज्याभिषेकानंतर (औरंगजेबाचा प्रभाव संपुष्टात आल्यामुळे) भ्रष्ट झालेली देवस्थाने पुनःप्रस्थापित झाली आणि धर्माचे पालन करावयाला प्रत्यवाय उरला नाही या अर्थाने "उदंड जाहले पाणी | स्नान संध्या करावया " असं समर्थ म्हणतायत. शेतीला ,गरीबांना प्यायला पाणी मोकळं होतच की तुमच्या "लोकोत्तर" औरंग्याच्या राज्यात.. परवानगी नव्हती ती देवपुजेला, स्नान-संध्येला, धर्मपालनाला .. त्यामुळे आनंद स्नान संध्या करायला पाणी उपलब्ध झाल्याचा आहे. जे नसतं ते मिळालं की आनंद होतो.

ग्रेटथिंकरसाहेब तुम्हाला फार म्हणजे फारच अभ्यास वाढवावा लागेल असं दिसतयं ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

अश्या कट्टर मुसलमानांची मला कीव येते.
आणि काही हिंदू त्यांचे अनुकरण करू पाहताहेत त्यांच्याकडे बघुन तर हसू येते! बिचारे!

कुरूंदकरांचे "ज्याने त्याने आपल्या धर्मात सुधारणा करायचा प्रयत्न करावा. दुसर्‍याच्या धर्मात का सुधारणा झाल्या नाहीत? मग मी ही करणार नाही ही भुमिका हास्यास्पद आणि त्याज्य आहे" हे मत मला पटते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यासाठी सेलेक्टीव्हली अश्याच प्रतिमा येन केन प्रकारेण चर्चेत आणून मुख्य प्रवाहापासून मुस्लीम समाज वेगळा दिसावा असा सध्या प्रयत्न दिसतो. सरकारचा असा अजेंडा दिसतो. मुस्लिमांविषयी पॉजीटीव मिडीयामधून क्वचितच दिसते. द्वेष पद्धतशीर पसरवला जातोय आणि पुढील काळात मोठाच सांस्कृतिक संघर्ष आपल्या सगळ्यांपुढे वाढून ठेवलाय असं दिसतं. मला माझ्या मुलांसाठी फार काळजी वाटते.

१) मुस्लिमांच्या खराब प्रतिमेसाठी मिडिया जबाबदार
२) केंद्रसरकार मुस्लिमांना पद्धतशीरपणे मुख्य प्रवाहाबाहेर लोटतेय
३) हिंदुत्ववादी मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरवतात
४) मुस्लिमेतर लोक पण चटकन मुस्लिमांबद्दल गैरसमज करून घेतात
५) आणि मुस्लिम मात्र एकदम बिचारे असल्याने ते सुद्धा स्वतःविषयी असे समज करून घेतात व हा अपप्रचार मान्य करून टाकतात.

निष्कर्ष - मुस्लिम समाज हा सदाचारी, सुजाण असूनही (व हे तुम्ही स्पष्टपणे नमूद केलेले नसूनही) त्याची प्रतिमा खराब होते.

मुस्लिमांच्या खराब प्रतिमेवर एकच इलाज - मुस्लिम समाज सोडून इतर सगळ्यांवर काहीनाकाही उपचार केले पाहिजेत. व ते उपचार म्हंजे - हिंदुत्ववाद्यांची प्रतिवाद करणे, हिंदु समाजाचे प्रबोधन करणे, मिडिया मॅनेजमेंट, इतर धर्मीयांमधे जनजागृती करणे, केंद्रसरकारात मुस्लिमांचे प्रतिनिधीत्व अधिक सॉलिड करणे वगैरे. हे झाले की मुस्लिमांची प्रतिमा सुधारेल. प्रतिमा सुधारली की झालं. हाय काय अन नाय काय.

बरोबर ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठवाडा विद्यापिठाचे नामांतर करण्यासाठी बरेच मोठे आंदोलन झाले होते .. हिंसक आंदोलन, जाळपोळ, दंगली यानंतर मध्यममार्ग म्हणून 'मराठवाडा 'हा शब्द कायम ठेवून नाव बदलण्यात आले. तरीही तुम्ही जर याला 'मराठवाडा 'हा शब्द कायम ठेवला आहे म्हणून नामविस्तार म्हणणार असाल तर मराठवाडा विद्यापिठाऐवजी व्हिजेटीआयच्या किंवा व्हीटीच्या किंवा दादर चौपाटीच्या नामांतराबद्दल बोलुया का ?

व्हिजेटीआय चे "व्हिक्टोरिया ज्युबिली" बदलून "वीरमाता जिजाबाई", व्हीटीचे "व्हिक्टोरिया टर्मिनस" बदलून "छत्रपती शिवाजी टर्मिनस" आणि "दादर चौपाटी" चे "चैत्यभूमी" झाले तेव्हा अनुक्रमे भारतातील अँग्लो इंडियन समाज आणि मुंबईतील (विशेषतः दादरमधील) चौपाटीशी संबंधित जो कुठला समाज आहे तो समाज डिवचला गेला असेल त्याबद्दलही तुम्ही असेच म्हणाल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

चुकीची माफी असावी गब्बरभौ .. लिहिण्याच्या ओघात लक्षच गेलं नाही ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

लांगूलचालनाने सेक्युलॅरीझीमचे भले होते असे वाटणारे लोक दुर्दैवाने सेक्युलॅरीझमचे नुकसान करताना दिसतात. शोधल्यास उदात्तीकरणासाठी इतर बरेच मुस्लीम सापडू शकतील की, उदात्तीकरणासाठी हा औरंगजेबच का सापडावा ? भारतात रावणाचेही मंदीर आहे तसे औरंगजेबाचेही एखादे मंदीर पुढे मागे बांधले जाईल पण त्याने ना दुसर्‍याच्या स्त्रीला पळवून नेणारा रावण लोकोत्तर होत ना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून करणारा औरंगजेब लोकोत्तर होऊ शकतो.

औरंगजेबाच्या एवजी दाराशुकोह सत्तेवर आला असता तर बहुसंख्यांकांची दुखावलेली मनांना फुंकर घातली गेली असती एक खरा सेक्युलर भारत मध्ययुगापासून उभा राहू शकला असता, औरंगजेबाने त्याची तलवार त्याच्या दाराशुकोह नावाच्या मोठ्या भावावर चालवली असे नव्हे, औरंगजेबाची तलवार सेक्युलॅरीझमच्या संधीवर सेक्युलॅरीझमच्या मानेवर चालवली हे कोणत्याही सुज्ञ सेक्युलर माणसाने लक्षात घ्यावयास हवे.

औरंगजेबाचा हिंदूवर जिझीया लावणे त्याची अंधश्रद्धा म्हणून क्षम्य धरा, त्याने त्याच्या बापाला मोठ्या भावांना हत केले संभाजी महाराजांना हत केले ते त्याच्या सत्ताका़ंक्षेतून झाले समजा; शीख गुरू तेघ बहादूर अथवा सुफी संत सरमद कशानी हि औरंगजेबाच्या सत्तेच्या स्पर्धेतली माणसे नव्हती त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर औरंगजेबाने तलवार चालवली. औरंगजेबाच्या अभिव्यक्ती स्वांतत्र्यावरील बंधनातून बाप आणि भाऊ सोडाच त्याच्या सख्ख्या मोठ्या मुलीसही बंदीवासात टाकले, औरंगजेबाच्या मोठ्या मुलीचा अपराध नेमका काय या बद्दल अल्प मतभेद असला तरी एकतर ती सुफी काव्य रचना करत असे अथवा लाहोरच्या कुणा सरदारावर ती भाळली होती. कोणत्याही केस मध्ये त्याने स्वतःच्या मुलीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचीही कदर केली नाही. हिंदू मुस्लीम एकतेच्या संधी घालवल्या शतकोन शतके भरून न निघणार्‍या जखमा बहुजनांच्या मनावर केल्या त्या औरंगजेबाच्या नावाने एक नाही चार नवे रस्ते बांधले एका एवजी दहा शहरांना त्याची नावे दिली आणि त्याची हजार मंदिरे उभी केली तरी औरंगजेब लोकोत्तर या विशेषणास पात्र कसा काय ठरू शकतो हा प्रश्न शिल्लक राहतोच ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

रावणाचे मंदिर कुठेय भारतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी या विषयातील माहितगार नाही, परंतु गूगल केलेत तर सापडावे.
Ravana temples and temples related with Ravana

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हाण तेजायला, धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उपयुक्त माहिती आणि लिंक दिलीत .. धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

तेजायला ती व्हिक्टोरिया राणी औरंगजेबापेक्षा नक्कीच कमी क्रूर असणार. तिचं नाव काढून टाकलं तर औरंगजेबाचं का नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अगदी अगदी. तदुपरि व्हिक्टोरिया स्वतः ड्रॅक्युलाचा अवतार होती असे मानले तरी प्रत्यक्ष तिच्याकडे पावर लैच कमी होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

औरंगजेबाचे धार्मिक धोरण ह्यावर बरेच आणि साधार लिहिण्याजोगे आहे पण मलातरी तसे करावेसे वाटत नाही कारण हा धागाकर्ता केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी खाजवून खरूज काढतो असे मला वाटते. "Don't Feed the Trolls" हे मला भावते.

हाच धागा मिपावरहि आला आहे असे दिसते (http://www.misalpav.com/node/32604) पण तेथे जाण्याचा प्रयत्न केला तर Access denied असे पुढे येत आहे. ते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोल्हटकर, सरळ सांगा ना प्रतिवाद कएअता येत् नाही ते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

मिपावर धाग्याला पंख लावले आहेत. (द्याट इज, धागा उडवला आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

म्हणजे मिपावर लेखनस्वातन्त्र्य नाही असे समजायचे काय?

आता ते बरे की 'ऐसी' बरे असा प्रश्न पडतो! ''ऐसी'वर कोणत्याही येडचापाला बिनशेंडाबुडख्याचे काहीहि बरळायला फुल्ल परमिशन आहे असे म्हणावे काय?

राघा इत्यादि चालक मंडळींनी मार्गदर्शन करावे...
इति याचना
कोल्हटकरब्रह्मकुलोत्पन्नस्य अरविन्दशर्मणः

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येडचापालाही स्वातंत्र्य द्यायचे का व्यवस्थापनाला नको असलेले धागे, प्रतिसाद आणि सदस्य उडवायचे याचे नियम वेगवेगळ्या संकेतस्थळांवर वेगवेगळे आहेत. त्यामुळे कोणते बरे हे ज्याने त्याने ठरविलेलेच उत्तम नाही का?

-ब्यानकुलसंपन्न निळोभर्मन्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

१. सहिष्णुता, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, उदारमतवाद, इ. मूल्यं
२. व्यावहारिक पातळीवर ट्रोलिंगला श्रेणी देऊन वासलात लावण्याची सोय.
३. 'ऐसी'चा (सध्यातरी) मर्यादित आकार

मिसळपाववर, या धाग्यावर काय झालं हे माहित नाही, पण न्यायालयीन कारवाई होऊ शकेल असं लेखन आल्यास फार पर्याय राहत नाहीत. 'ऐसी'वरचे तीन प्रतिसाद त्याच कारणास्तव अप्रकाशित करावे लागले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हिंदुस्तानचा सत्ताधीश असूनही औरंगजेब स्वतःचे पोट भरण्यासाठी टोप्या शिवून विकत असे म्हणे. जनतेच्या पैशातून दहा लाखाचा सूट शिवणाऱ्या राज्यकर्त्यांना हे बघवत नसल्याने औरंगजेबाचे नाव काढून टाकण्यात येत आहे का? Wink

(ह.घ्या. बरं का!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठे तो अखिल भारताला कंट्रोलमध्ये ठेवणारा आलमगीर औरंगजेब आणि कुठे ,कांद्याचेही दर कंट्रोलमध्ये ठेऊ न शकाणारा बोलबच्चन...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

ग्रेटथुंकर महाशय,

औरंगजेब मराठ्यांना कधी जिंकू शकला नाही हे तुमच्या ब्रिगेडी इतिहासात शिकवत नाहीत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अर्रे यांची ब्रिगेड नसतेय, बटालियन असतेय.. उगी भावना दुखवायच्या. जपून. Wink

(खुशाल ह.घ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

अर्र असंय होय. मग तर पर्फेक्ट बसतंय की, वैचारिक बाटग्यांची ती बाटालियन. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मराठ्यांचे साम्राज्य होते कीती???????? साडेतीन जिल्ह्यात पसरलेले...... दिला नाद सोडून औरंगजेबाने,त्याचे वयही झाले होते त्या वेळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

दक्षिण दिग्विजय विसरलास की. आणि या साडेतीन जिल्हेवाल्यांनी मुघलांना हरवले ते झोंबलेले दिसते. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दक्षिण दिग्विजय???????? हे कुठं वाचलत ब्याटोबा?
अच्छा !अच्छा! पुरंदरेंच्या पुस्तकात वाचले काय,बॉर बॉर
सरळ पु ना ओक यांची पुस्तके वाचा ब्याटोबा, म्हणजे कंबोडीया पासून अमरीश खंडापर्यंत हिंदू साम्राज्य होते हा दावा ठोकता येइल!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

अरेरेरे, दक्षिण भारतात महाराजांनी कुठले प्रदेश जिंकले तेही माहिती नाही आणि चालले इतिहास शिकवायला.

बाकी अमरीश खंड कुठला? की अमरीश पुरी हे नाव लिहायचं होतं? तुम्ही डीडीएलजे बघा, तुमची झेप तिथपर्यंतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही रेशिमबागेत बसून जाणता राजा बघा,भाटगिरी करण्याची आणखी सवय होईल.
आणि जमलं तर दाढी वाढवा, म्हणजे तुम्हालाही महाराष्ट्रभुषन मिळेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

ग्रेटथिंकर तुम्ही शुध्दलेखनाचे धडे गिरवा आणि जनरल नाॅलेजचे क्लासेस लावा .. म्हणजे जाणता राजा आयुष्यभर अभ्यासल्याबद्दल महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळतो महाराष्ट्रभूषन नाही हे उमजेल तुम्हाला ..
शब्दार्थ -
महाराष्ट्रभूषण - मराठी मातीला अभिमान वाटेल असं ..
उमजेल - समजेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

साडेतीन जिल्ह्यात पसरलेले

हा धागा त्रिशतक गाठणार असे भाकित करतो. साडेतीन जिल्हे काय अन साडेतीन टक्के काय - हमखास यश ठरलेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टह्ठो ROFL ROFL ROFL

हेच म्हण्णार होतो. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

औरंगजेब महान मुत्सद्दी होता असे कुरुंदकरसुद्धा म्हणतात पण त्याच्यावर सहिष्णु असल्याचा आरोप कोणी आजवर केला नसेल.

आगरयाहून शिवाजीला निसटु देण्यात औरंगजेबाचा हात असेल हे मलाही वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

औरंगजेब सहिष्णू होता हा जावईशोध आहे. स्वतःच्या सत्ताकांक्षेपायी भावाचे आणि वडिलांचेही ज्याने हालहाल केले त्याचा अभिमान वाटण्यासारखे काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता बरी आहे, वृत्तात जरा मार खातीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

एका 'ग्रेट थिंकर'ला दुसरे 'ग्रेट थिंकर' मिळाले असे दिसते. भालचन्द्र नेमाडे ह्यांचे हे वक्तव्य आताच 'सकाळ'मध्ये वाचले. ते पुनं मिळेल न मिळेल अशा भीतीतून येथे चिकटवत आहे.

<<नागपूर - मुस्लिम समाजाचा द्वेष बाळगून औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याचा आग्रह म्हणजे इतिहास नाकारण्याचा प्रकार आहे. अशाच पद्धतीने मुस्लिमांचा द्वेष म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रकारही झाला. दोन समुदायांमध्ये फूट पाडून पुन्हा एकदा देशाच्या फाळणीचाच डाव आखणे सुरू आहे, अशी टीका ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. भालचंद्र नेमाडे यांनी केली.

औरंगाबादचे नामकरण आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मिळालेला "महाराष्ट्रभूषण‘ या दोन मुद्यांवर प्रा. नेमाडे यांनी सरकारवर तोफ डागली. औरंगाबादचे नाव बदलण्याचे कारण केवळ मुस्लिमांबद्दलचा द्वेष आहे. हा निव्वळ पोरकटपणा आहे. सतीची प्रथा औरंगजेबाने बंद केली. एकाही हिंदू राजाला जमले नाही ते औरंगजेबाने साध्य केले. उलट सर्व महिलांनी औरंगजेबाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्यामुळे औरंगाबादचे नाव बदलण्यापेक्षा तेथील नागरिकांसाठी प्यायच्या पाण्याची व्यवस्था करा, या शब्दांत नेमाडेंनी खडसावले.

पुरंदरे यांना देण्यात आलेल्या "महाराष्ट्रभूषण‘ पुरस्काराबद्दल ते म्हणाले, ""आपल्या देशात कुणी मुसलमानांचा द्वेष म्हणून शिवाजीचे नाव वापरले, तर कुणी पक्षाच्या उद्धारासाठी वापरले; पण शिवाजी महाराजांचे सर्वांत जवळचे मित्र मुस्लिमच होते, हे का सांगत नाहीत? शिवाजी महाराजांच्या काळात हिंदू-मुस्लिम वाद नव्हता. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पडल्याने या देशाची एकदा फाळणी झालेली आहे, आता पुन्हा एकदा तोच प्रयत्न सुरू झाला आहे.‘‘

कलबुर्गी यांच्या हत्येमुळे सरकार दिवाळखोरीत निघाल्याचे सिद्ध होते. एवढे पोलिस, पथकं तयार करूनही हत्यारे सापडत नाहीत. कुणी काहीही बोलले की त्याला मारून टाकायचे म्हणजे, हातर तालिबानी प्रकार आहे. माणसं मारून टाकणे म्हणजे आपला पाकिस्तान होणे आहे.
- भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ कादंबरीकार >>

भारतातील मुस्लिमांना असले मित्र असले तर शत्रूंची गरजच भासणार नाही! आत्ता माझ्या ध्यानात आले की आपल्या 'ग्रेट थिंकर'ना एकाच वेळी शिवाजी आणि औरंगझेब आपल्याच पार्टीमध्ये आहेत हे कसे जाणवले. नेमाडेच सांगतात की शिवाजी महाराजांचे सर्वात जवळचे मित्र मुस्लिमच होते. आम्हाला आपले वाटत होते की तानाजी, बाजी प्रभु असे शिवाजीचे जवळचे मित्र होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाय म्हणजे आम्हीही तोफा डागून सरकारला खडसावण्याची महत्वाकांक्षा धरू इच्छितो!!! Smile

सतीची प्रथा औरंगजेबाने बंद केली. एकाही हिंदू राजाला जमले नाही ते औरंगजेबाने साध्य केले.

रियली?
मग नंतर दोनशे वर्षांनंतर राजा राममोहन रॉय आणि लॉर्ड बेंटिंकने नक्की काय केलं?
हुरडापार्टी?

च्यायला, आणि म्हणे हे विद्वान!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कायद्याने हुंडाबंदी करुन बरीच दशके झाली, तरीही हुंडाबळी होतातच ना!
आलमगीर औरंगजेब यांनी सतीप्रथा बंद करुनही तुरंळक हिंदू ती प्रथा पाळत होते, त्याविरोधात रॉय व बेंटिंक यांनी प्रबोधन केले,बंदी घातली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

आलमगीर औरंगजेब यांनी सतीप्रथा बंद करुनही तुरंळक हिंदू ती प्रथा पाळत होते,

मग त्या अशा तुरळक कायदेमोडू हिंदूंना पकडून सुळावर देण्यात आलमगीर औरंगजेब आणि त्यांचे प्रशासन अपयशी ठरले असेच म्हणावे लागत नाही काय?
औरंगजेब चाणाक्ष राज्यकर्ता आणि उत्तम मुत्सद्दी होता यात वाद नाही.
पण त्याने आपल्या कारकिर्दीत हिंदू समाजासाठी काही सुधारणा केल्या असं म्हणणं म्हणजे काहीतरीच!
हिंदू समाज हा त्याच्यासाठी उपभोग्य काफीर सोडून अन्य काहीही नव्हता.
आणि एक स्वतःला अस्सल तुर्कवंशीय माननारा मुसलमान सम्राट या त्याच्या मानसिकतेचा विचार करता त्याबद्दल आश्चर्य वाटण्याचंही कारण नाही....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर असलं तरी तुलनात्मक पहा-जर्मनीने आता ज्यु लोकांच्या यातना केंद्रांना दडपून न टाकता सरळ पर्यटन ठिकाणच करून टाकले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ग्रेटथिंकर, तुम्ही अजूनही मूळ प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. तुमच्या वतीने देण्याचा यत्न झालेला असेलही पण तो सफल झालेला मला दिसत नाही. झालेला असेल तर तसा थेट अंगुलिनिर्देश करा.

मूलभूत प्रश्न - हा -

A) औरंगाबाद शहराचे पुनर्नामकरण हे संभाजीनगर करण्याची सरकारची संभाव्य कृती
Dirol मुस्लिम समाज डिवचला जाणे

Why/How is A causing B ?

----

तुम्ही उत्तर दिल्यास मी फॉलो अप प्रश्न विचारेनच पण फॉलो अप प्रश्न विचारण्यापूर्वी मी तुमचा तेवढा/तितपत मुद्दा थेट, सहर्ष, मनःपूर्वक मान्य करण्यास उत्सुक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हारून शेख यांच्या भावनेशी सहमत आहे.

जसे औरंगजेबाचे ग़ज़नीच्या महमुदाचे कार्य मुसलमानाना बदनाम करते त्याचप्रमाणे ग्रेटथिंकरसारख्यांचे लिखाण सेक्युलरांना बदनाम करते. उद्या याच्या लिखाणाचे दाखले इतरत्र दिले जातील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बदनाम करते त्याचप्रमाणे ग्रेटथिंकरसारख्यांचे लिखाण सेक्युलरांना बदनाम करते

अहो, लोक काय सेक्युलर म्हणून जन्माला येतात काय? सेक्युलर, पुरोगामी हे विचार आहेत. जर तुमचे विचार तसे असतील तर तुम्ही सेक्युलर, पुरोगामी. आता एखाद्या व्यक्तीने एखादा सेक्युलर किंवा पुरोगामी विचार अवलंबला की लगेच त्याच्या सगळ्या विचारांना त्याचं लायसन मिळतं का? आणि बदनाम करणारे इतके गाढव कसे असतात हे एक मला समजत नाही. समोरच्याचा विचार चूक असेल तर त्याला चूक म्हणा, त्याच्या विचाराला चूक म्हणा. आख्खं सेक्युलरिझम अन पुरोगामीविश्वच लगेच कसं काय बदनाम होतं हे काही मला कळत नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

असं कसं....

बॅट्यासारखे* अदरवाइज सेन्सिबल असलेले लोक असल्या धाग्यांमुळे 'तिकडे' ढकलले जातात आणि मग तिकडे जाऊन "सर्व सेक्युलर/सिक्युलर असे असतात" म्हणून सरसकटीकरण करतात.

*बॅट्याचे नाव घेतले आहे. इतरही लोक असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बॅट्यासारखे* अदरवाइज सेन्सिबल असलेले लोक असल्या
धाग्यांमुळे 'तिकडे' ढकलले जातात आणि मग तिकडे जाऊन "सर्व
सेक्युलर/सिक्युलर असे असतात" म्हणून सरसकटीकरण करतात.>>>>>>>>>
ब्याट्यासारखे लोक फक्त ठराविक विषयावरच सेन्सिबल चर्चा करु शकतात.इतिहास ,धर्म असे विषय चर्चेला आले की ब्याट्यासारख्या स्यूडोहिदुत्ववाद्यांची अस्मितेची गळवे ठसठसायला लागतात.तिथे मग लॉजिक वगैरे गुडांळून ठेवऊ अटितटीने हे लोक सेक्यूलर लोकांना यथेच्च शिव्या घालतात.प्रतिवाद जमला नाही कि मग समोरच्याला बिग्रेडि वगैरे विशेषण लावतात आणि पळ काढतात.मागच्या महिण्यात मिपावर आणि ऐसिवर टिळक आणि पुरंदरे यांचे आंधळे समर्थन हे ब्याटम्यान करत होते, तिथे अनेकांनी टिळक व पुरंदरे यांच्याविरोधात पुरावे दिल्यानंतर हे ब्याटोबा तिथून सपशेल माघार घेउन पळून गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

हा हा हा, स्वतःला ब्रिगेडी इतिहास सोडून काही माहिती नसणार्‍यांना पुरावे दाखवले तरी ते दुर्लक्षच करणार. सत्य आणि पुरावे म्हणजे विषाप्रमाणे वाटते ग्रेटथुंकरांना. पण हेडक्वार्टरकडून आलेल्या आदेशाप्रमाणे ते वागत राहतात ही चिकाटी खरेच कौतुकास्पद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुरंदरे आदि लोकांनी केलेल्या कल्पनाविलासाला जे अस्सल ऐतिहासिक दस्तावेज मानतात अश्या ब्याट्यासारख्या लोकांशी माथापच्ची करण्यात अर्थ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

उगी उगी उगी. ब्रिगेडच्या पुस्तकांपेक्षा वेगळे वाचणे झेपत नाय तुझ्या मेंदूला, माहिती आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटमॅन, रॅशनल असल्याचे तू नाटक करत असतोस हे आता सर्व ऐसिकरांना लक्षात आले आहे, वास्तवात तू एक छुपा संघिष्ट आहेस हे कबुल करुन टाक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

तू छुपाच नव्हे तर उघड ब्रिगेडी आहेस हे सर्वचजण जाणतात. तुझ्या सांगण्याने कबुली द्यावी इतके वाईट दिवस अजून आलेले नाहीत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वैयक्तिक टिप्पणी टाळावी अशी दोन्ही सदस्यांना विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिकडे मिसळपाववर बॅटमन यांनी पुरंदर्‍यांच्या इतिहासापेक्षा मेहेंदळ्यांच्या इतिहासाला अहिक अस्सल म्हटले होते असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आणि बदनाम करणारे इतके गाढव कसे असतात हे एक मला समजत नाही. समोरच्याचा विचार चूक असेल तर त्याला चूक म्हणा, त्याच्या विचाराला चूक म्हणा. आख्खं सेक्युलरिझम अन पुरोगामीविश्वच लगेच कसं काय बदनाम होतं हे काही मला कळत नाही!

हे पुरोगामी गाढवही अख्ख्या "नॉनसेकुलरांना" बदनाम करतात अ‍ॅज़ अपोज़्ड टु अ सिंगल पर्सन ऑर हिज़ थॉट्स. या बडबडीची किती तरी उदाहरणे ऐसीवरच आहेत. ते चालत असेल तर मग हेही चालूनच जावे!

शिवाय, विचारांचा अ‍ॅनॅलिसिस करण्याऐवजी ते कुठे पब्लिश झालेत यावर कंठाळी फोकस करणार्‍यांना याची चिंता कधीपासून पडू लागली? गंमतच आहे सगळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खर तर नामांतर प्रकार आपल्याला नवीन नाही. मुलगी लग्न होउन सासरी जाते त्यावेळी तिचे पूर्ण अथवा अंश नामांतर होते. नाव,मधले नांव व आडनांव तिन्ही बदलतात. कधी कधी प्रथम नाव तेच राहते पण मधले व आडनांव बदलते. अपवादांची संख्या जरी पुर्वीपक्षा वाढली असली तरीही एकूणात फार कमी आहे. काही स्त्रिया नामविस्तार ही करतात. जोड आडनावे लावून सासर व माहेरची दोन्ही ओळख जपतात. ( पहिल आडनाव सासरचे की माहेरचे हा गोंधळ अजून ही माझ्या मनात आहे. समजा घटस्फोट होउन दुसरे लग्न केले तर ही जोड आडनावे ट्रिपल होतात का? अशी शंका मनात येते. पण तसे उदाहरण डोळ्यासमोर नसल्याने तसे नसावे असे वाटते.)
नाव न बदलण्याचे कारण 'अस्मिता' 'स्वत्व' जस आहे तसच नामांतराचे ही कारण तेच आहे. ज्यांना आपले नाव आडनावाची लाज वाटत वा गैरसोयीचे वाटते त्यांना सरकारी गॅझेट करुन नाव अधिकृतपणे बदलता येते.अपभ्रंश होउन शब्द सुद्धा बदलतात तर नावांनी का बदलू नये? असा प्रश्न मला पडतो.बदललेली नांव अंगवळणी पडायला वेळ लागतो. त्यातून ती जर लांबलचक झाली तर तो अधिकच वेळ लागतो. मग त्याची ही लघुरुपे होतात. एमजी रोड, डीबी मार्ग एबी चौक.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे लांबलचक उच्चारायच्या ऐवजी जर रुळलेला पुणे विद्यापीठ हा शब्दप्रयोग वापरला किंवा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ऐवजी तर तुम्ही मराठवाडा विद्यापीठ असा शब्द वापरला तर तुम्ही फुले आंबेड्कर विरोधी आहात. तुम्ही दलित विरोधी आहात.,, तुम्ही उच्चवर्णीय समर्थक आहात. तुम्ही छुपे जातीयवादी आहात. अजून तुमच्यातील तो एलिमेंट गेलेला नाही. वगैरे वगैरे भन्नाट आरोप होतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मला व्यक्तिशः कोणतेच नामान्तर आवडत नाही. स्थाननामे, ग्रामनामे ही तत्कालीन इतिहास-भूगोलाच्या खुणा असतात. इतिहास कितीही अप्रिय वाटला तरी त्याचा राग खुणांवर कशाला? मला मुंबईतल्या शींव कोळीवाड्याचे गुरु तेगबहादुर नगर, कृष्णगिरी उपवनाचे संजय गांधी उद्यान (कृष्ण नको होता तर निदान कान्हेरी तरी ठेवायचे), विन्सेंट रोडचे बाबासाहेब आंबेडकर रोड, फ्रिअर रोडचे शहीद भगतसिंह मार्ग, कॅडेल रोडचे स्वा. सावरकर मार्ग, अनेक म. गांधी रोड, घोडबंदर रोडच्या मुंबईतल्या भागाचे स्वामी विवेकानंद रोड, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, डॉ.आंबेडकर विद्यापीठ ही आणि अशासारखी अनेक नामान्तरे आवडली नव्हती. ह्या सर्व व्यक्तींबद्दल अपरिमित आदर आहे, पण या युगपुरुषांसाठी त्यांना साजेशी नवीन स्मारके, स्थापत्ये निर्माण व्हावीत. नवीन संस्था, मार्ग, विद्यापीठे, तंत्रनिकेतने, संकुले, उपशहरे निर्माण व्हावीत. मुंबईत नेहरू विज्ञान केंद्र आणि तारांगण हे असेच एक सुंदर नवनिर्माण आहे. तसेच दीनदयाळ उपाध्याय प्रतिष्ठाण किंवा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ह्या नव्या संस्था. कितीतरी नवीन करण्याजोगे आहे. मग जुन्याच मालावर नवे लेबल चिकटवण्याची हेराफेरी किंवा आळशीपणा कशासाठी? जुन्या मालाचेही लेबल एके काळी बदलले होते असा युक्तिवाद होतो. पण असे मागे मागे जात राहाण्यापेक्षा वर्तमानात तरी असे घडू नये हे पाहाता येईल. नामान्तर करण्यासाठी अस्मितेच्या चळवळी उभारणे हा माझ्यामते आपल्यातला न्यूनगंड आहे. कर्तृत्वाने मोठे व्हावे, नावे बदलल्यामुळे केवळ जिंकल्याचा भास आणि मनाचे खोटे समाधान होते. फक्त.
"प्राप्तकाल हा विशाल भूधर | सुंदर लेणी तयात खोदा ||
निजनामे त्यावरती नोंदा | बसुनी का वाढवता मेदा?||
विक्रम काही करा चला तर!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर नामान्तर करणे हा न्यूनगंड असेल तर युरोपातल्या नामान्तरणालाही तोच न्याय लागू पडावा काय? उदा. सेंट पीटर्सबर्गचे पेट्रोग्राड वगैरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सेंट पीटर्सबर्गचे पेट्रोग्राद हे भाषांतर आहे. नामान्तर नव्हे. बॉम्बेचे मुंबई झाले तसे. बाँबेचे छ.शिवाजीनगर किंवा चिमाजीअप्पानगर किंवा बिंबराजाच्या स्मरणार्थ बिम्बापुरी झाले असते तर ते खरेखुरे नामान्तर ठरले असते. तसे पेट्रोग्रादचे 'लेनिनग्राद' हे नामान्तर झाले होते, पण ते अल्पकाळच म्हणजे ६६ वर्षेच टिकले.
सिंहपुरचे वेगळ्या स्पेलिंगमुळे सिंगापोर झाले आहे, पण संस्कृती बदलूनही तिथल्या लोकांना या नावाविषयी आक्षेप नाही. आज सिंगापोर भरभराटीला आले आहे ते सिंगापोर या नावामुळे नाही तर तिथल्या लोकांच्या कर्तृत्वामुळे. तिथले लोक हे जाणतात म्हणून नाव बदलण्याचा खटाटोप त्यांना करावासा वाटत नाही, त्यात त्यांना रस नाही. नाव बदलले म्हणून सिंगापोरच्या यशोगाथेला अधिकचे चार चाँद लागतील असे नाही हे त्यांना ठाऊक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठीके, मग लेनिनग्राडचे काय? ते तरी नामांतर होतेच ना? अल्पकाळ टिकले म्हणून काय झाले, तिथेही केलेच ना नामांतर? सारखी आपली न्यूनगंडग्रस्त असण्याची रेकॉर्ड पाहूनच युरोपातील उदाहरण दिले. भारतातले नामांतर चालत नसेल तर तिथले नामांतर समर्थनीय कसे काय?

नामांतर करण्यावर इतका खार खाण्याचे कारण समजत नाही. तसे तर कुठल्याही संस्कृतीलाही काही अर्थ नसतो, बळी तो कान पिळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

येस, अँड नोट दॅट, सध्याचे दिवस बॅट्याचे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्यापुरते बाँबेच आहे तर असूद्यात ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ते नामान्तर समर्थनीय होते असे मी अजिबात म्हटलेले नाही. किंबहुना ते कृत्रिम होते, म्हणूनच अल्पकाळ टिकले असावे. खोट्या/पोकळ अभिमान/स्वाभिमानापायी अशी कृत्ये होत असतात. पोकळ स्वाभिमान हा एक प्रकारचा न्यूनगंड किंवा न्यूनगंडावर मात केल्याचे समाधान मिळवण्याचा प्रकार असावा.
शिवाय मी प्रतिसादात म्हटलेच आहे की जुनी मढी उकरून काढण्यात अर्थ नाही, कारण भूतकाळावर आपला ताबा नाही. वर्तमानकाळात तरी असे होऊ नये.

खूप खूप अवान्तर : आज वॉट्स अ‍ॅप वर मला एक बर्फाच्छादित खिंडीच्या भिंती जमिनीस सुंदरपणे बेतलेल्या काटकोनात फोडून बनवलेल्या अल्ट्रासुंदर रस्त्याचा फोटो आला. त्याचा मजकूर होता,
'ओम नमः शिवाय. कैलाश मानसरोवर जाने का नया रास्ता जो चायना के सहयोग से श्री नरेंद्र मोदी ने बात कर हिंदुओं के आस्थास्थलपर पहुंचने के लिये खुलवाया. देखिये नाथु ला दर्रे का रास्ता कितना सुंदर बन गया है.' हे फोटो जपानमधल्या युकिनो ओटानि या कॉरिडॉरच्या एका भागाचे होते, जिथे बर्फ अगदी आइस्क्रीमच्या लादीला छेद देऊन स्लाइस बाहेर काढावा तितक्या सफाईने आणि गुळगुळीतपणे बर्फ कापला होता; हे नंतर कळलेच.
अवान्तरभूषण राही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका नामांतरामुळे विकासाकडे दुर्लक्ष होतेय असा अनावश्यक पॅरानोइया जाणवला सबब विरोध केला, बाकी काही नाही. प्रत्येकवेळेस हा पॅरानोइया जाणवत राहतो, तुम्हांला वैयक्तिक म्हणून नाही तर अनेकांच्या प्रतिसादांत हे पाहिले आहे. त्यामुळे नाकर्तेपणा इ. आणि नामांतर यांचा कै संबंध नाही हे अधोरेखित करायचे होते त्याकरिता बाय डिफॉल्ट पुढारलेल्या युरोपाचे उदाहरण दिले. अर्थात पश्चिम युरोप आणि अमेरिकेपेक्षा मागासलेले उदाहरण आहे याची जाणीव आहे, पण किमान बुरसटलेल्या भारतापेक्षा तरी नक्कीच बरे, नै का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विकासाकडे दुर्लक्ष्य नामान्तरामुळे होतेय, असे माझ्या प्रतिसादातून सूचित होत नाही. विकास करण्याच्या स्वसामर्थ्यावर कदाचित आमचा विश्वास नसावा म्हणून अशा नामान्तराच्या मार्गाची कास पकडावी लागत असावी असा सूर होता. उदा. मराठवाडा विद्यापीठाचे नामान्तर किंवा नामविस्तार करण्याऐवजी त्याच ताकदीचे नवे विद्यापीठ उभारता आले असते. तितकी क्षमता आमची खचितच होती, पण आमचा त्यावर विश्वास नव्हता. विकासाचा आणि नामान्तराचा काहीच संबंध नाही हे उघडच आहे.
प्रतिसाद वैयक्तिकरीत्या अगदी मलाच उद्देशून नसणार हे कळले होते. आणि त्यासाठी धन्यवादही. पण सातत्याने एकच भूमिका मांडणे हे चांगले की सातत्याने भूमिका बदलत राहाणे चांगले? अर्थात प्रदीर्घ कालावधी आणि विचारान्ती भूमिका बदलतातच पण क्षणोक्षणी भूमिका बदलू नये असे वाटते. शिवाय अशा एका सातत्यमय भूमिकेला विरोध करणारे लोकही सातत्यानेच तिला विरोध करीत असतात(च). दुसर्‍या बाजूच्या लोकांना त्यात पॅरानॉइया जाणवत असेलही क्दाचित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण सातत्याने एकच भूमिका मांडणे हे चांगले की सातत्याने भूमिका बदलत राहाणे चांगले?

परिस्थितीप्रमाणे याचं उत्तर बदलणार. एकच एक उत्तर कसे देता यावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उदा. मराठवाडा विद्यापीठाचे नामान्तर किंवा नामविस्तार करण्याऐवजी त्याच ताकदीचे नवे विद्यापीठ उभारता आले असते.

नको हो राहीतै. मराठवाडा विद्यापिठाचा काय असा नावलौकिक होता? अजुन एक तसलेच विद्यापिठ करण्यापेक्षा जे आहे त्याचीच नावे बदला. पाहिजे तर अजुन १० नाव जोडा पुढे मागे, पण अजुन एक मराठवाडा विद्यापिठ नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> मग लेनिनग्राडचे काय? ते तरी नामांतर होतेच ना? अल्पकाळ टिकले म्हणून काय झाले, तिथेही केलेच ना नामांतर? सारखी आपली न्यूनगंडग्रस्त असण्याची रेकॉर्ड पाहूनच युरोपातील उदाहरण दिले. भारतातले नामांतर चालत नसेल तर तिथले नामांतर समर्थनीय कसे काय? <<

नक्की मुद्दा काय आहे? सेंट पीटर्सबर्गचं नाव बदलून 'लेनिनग्राड' करणं हा उघड राजकीय निर्णय होता. शहराचा निर्माता पीटर झार होता आणि कम्युनिस्टांना झारचा वारसा नाकारायचा होता. मग लेनिनच्या मृत्यूनंतर - म्हणजे खरं तर लेनिनचा वारसा जेव्हा नाकारला जाणार होता तेव्हाच Wink - त्याचं नाव लेनिनग्राड ठेवलं गेलं ही आणखी एक गंमत. मग कम्युनिस्ट राजवटीचा पाडाव झाल्यानंतर कम्युनिस्टांचा वारसा नाकारायचा होता म्हणून ते पुन्हा उलटलं गेलं. सगळे राजकीय निर्णय होते. त्यांचं समर्थन नक्की कुणी केलं आहे, की ज्यामुळे आपण इतके रागावला आहात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अगदी बरोबर. नामांतरामागे अशाच थाटाचे काहीतरी कारण असते बहुतेकदा. पण यावरून न्यूनगंड, नाकर्तेपणा वगैरेचा बादरायण संबंध जोडण्यात काही हशील दिसत नाही, सबब पुढारलेल्या युरोपातले उदाहरण दिले इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> नामांतरामागे अशाच थाटाचे काहीतरी कारण असते बहुतेकदा. पण यावरून न्यूनगंड, नाकर्तेपणा वगैरेचा बादरायण संबंध जोडण्यात काही हशील दिसत नाही, सबब पुढारलेल्या युरोपातले उदाहरण दिले इतकेच. <<

म्हणजे औरंगझेबाचे नाव काढून रस्त्याला अब्दुल कलामांचे नाव देणे हा राजकीय हेतूने घेतलेला निर्णय आहे असे तुम्ही मानता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कैक डिव्हेलपमेंट स्कीम, रस्ते, संस्था, इ. ना नेहरू-गांधींची नावे देणे हा राजकीय हेतूने घेतलेला निर्णय आहे असे तुम्ही मानता का?

वैसेभी या नामांतराची मागणी प्रथम कोणी केली हे पाहणे अतिरोचक ठरेल. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> कैक डिव्हेलपमेंट स्कीम, रस्ते, संस्था, इ. ना नेहरू-गांधींची नावे देणे हा राजकीय हेतूने घेतलेला निर्णय आहे असे तुम्ही मानता का? <<

अशा निर्णयांमागचे राजकीय हेतू अगदीच उघड असतात असं माझं मत आहे. असो. आपला ह्या धाग्यावरचा वावर पाहून मला प्रश्न पडला म्हणून विचारला. उत्तर देण्याचं टाळू शकता. ते स्वातंत्र्य तुम्हाला आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नामांतराची मागणी प्रथम कोणी केली ह्याकडे दुर्लक्ष करण्याचेही स्वातंत्र्य अर्थात तुम्हांला आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोणतेही नाव ओळख घडवायला उपयुक्त नसते. उलट ओळख घडल्यावर नाव होते.
पण नाव हे एक ओळखण्यची खूण इतपतच महत्त्वाचे. बदलण्यातही फार अर्थ नाही नी न बदलण्यातही प्रॉब्लेम नाही!

तसंही नावात काय आहे हे औरगजेब म्हणून गेलेलाच आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाकी इतिहास वगैरे थोडा बाजूला ठेवला तर औरंगजेब हे नाव अतिशय रुबाबदार, डौलदार वाटते बॉ. या नावाचा एक हिंदी चित्रपट निव्वळ नावामुळेच मला बघावासा वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात त्या रस्त्याला औरंगजेब रोड हे नाव केव्हा पडले आणि ते कुणी दिले असेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

या लेखावरून वाटते, की ब्रिटिशांनी दिले असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/aurangzeb-r...

या बातमीत रस्त्याचा थोडा इतिहास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

औरंगजेब लोकोत्तर होता की नव्हता किंवा त्याचे नाव रस्त्यावर पर्मनंट मार्कर ने लिहावे, की काही वर्षांत शाई उडून जाता येईल अशी व्यवस्था करावी या कुठल्याही वादात न पडता हा विडीयो बघा आणि हसा -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देवळे पाडणे हा प्रकार कायम चालू असणारा कार्यक्रम होता की मधून मधून ही मोहीम हाती घेतली जाई? म्हणजे मुल्ला लोक फार ओरडू लागले आणि इतर मुसलमानांना चिथावू लागले की पाच पंचवीस देवळे पाडली जात? [उदा. एखादी अप्रिय घटना घडल्यावर लोक मुसलमान=टेररिस्ट म्हणून फार ओरडू लागले पाच पन्नास मुसलमानांना पकडायचे असे प्रकार आताची सरकारे करतात तसे काहीसे]

तशा स्पोरॅडिक मोहीमा नसतील तर १७०७ मध्ये उत्तर भारतातील मंदिरांची संख्या शून्य असायला हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काही मुल्ला-फकीर जास्त आवाज करायला लागल्यावर औरंगजेबाने त्यांनाही फटकवल्याचे कुठेकुठे वाचले आहे. औरंगजेबाला त्याकाळी सगळेच शिव्या घालत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे जरा पाहतो.

तदुपरि मुल्लामौलवींनी एकदा अकबराविरुद्ध उठाव केला की हा पुरेसा इस्लामिक नाही, ह्यांव त्यांव करत नै, इ.इ. बरेच लोकही चिथावून फितवले. तेव्हा अकबर पेटला, विरोधकांचा लढाईत पराभव तर केलाच आणि जे मुख्य चिथावणीखोर मौलवी होते त्यांना सरळ गुलाम म्हणून काबूलकंदाहारात विकून टाकले. इतकी डेरिंग याआधी अन्य कोणीही मुसलमान सत्ताधीशाने केलेली नव्हती आणि यानंतरही केलेली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

है शब्बास!

जे मुख्य चिथावणीखोर मौलवी होते त्यांना सरळ गुलाम म्हणून काबूलकंदाहारात विकून टाकले.

हे लय भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

इंडीड. डेरिंगबद्दल आणि एकूणच व्हिजनबद्दल अकबराचा नाद नाय करायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तदुपरि मुल्लामौलवींनी एकदा अकबराविरुद्ध उठाव केला की हा पुरेसा इस्लामिक नाही,

म्हंजे कलाम सायबांना विरोध करायचा म्हणून "कलाम हे पुरेसे पॉलिटिकल नाहीत" असा मुद्दा उपस्थित केला गेला होता (असे अंधुकसे आठवतेय) तसे ??

किंवा डोरिस लेसिंग वर "शी इज नॉट फेमिनिस्ट एनफ" अशी टीका केली गेली होती तशी ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहा, रोचक! काईंड ऑफ, तसेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नवीन प्रदेश जिंकून घेताना पाडापाड जोरात असे. पुढे पुढे त्याचा रेट कमी झाला, नंतर मग कैतरी खास चिथावणी झाल्याशिवाय पाडापाड शक्यतोवर होत नसे, कारण किती झाले तरी किमान पोलिटिकल ऑर्डर बेअर मिनिमम स्वरूपात टिकून राहण्यासाठी बहुसंख्याकांचे "लांगूलचालन" आवश्यक असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जेते काहीही करू शकतात?होय.
पुर्वी तरवारीच्या धारेवर झालेल्या गोष्टी लोकशाहीत करून दाखवणे कठीण आहे.मोगलांचे मांडलिक होऊन आपल्याच राजांना कैद करून त्यांची संपत्ती बादशहाच्या पायावर आणून ओतताना काय कमी दु:ख होत असेल?
औरंगझेबास इराणचा धाक वाटत नसता आणि सत्ता इंग्राजांकडे गेली नसती तर एक दोन शुन्ये वाढवायला जागा होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या धाग्याच्या निमित्ताने औरंगजेबाचे साले रेकॉर्ड नेमके कसे होते ते पहावे अशी उबळ आलेली आहे, त्याबद्दल ग्रेटथुंकर आणि इतर प्रतिसादकांचेही आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटमॅन यांना त्यांच्या रसविषयात रुची घेण्याचे निमित्त दिल्याबद्दल ऐसीकरांतर्फे ग्रेथिं यांचे आभार. ट्रॉयाधारित लेखमालाकाळ पुन्हा येवो हीच प्रार्थना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बॅटमॅन यांनी या निमित्ताने या विषयात अधिक अभ्यास करुन पुढील माहिती द्यावी ही विनंती.

ग्रेटथिंकर यांचेही आभार. चिखलात कमळ फुलते हे असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यशस्वीपणे शंका निरसन करू शकतील एवढे शिक्षक अभ्यासू असतील तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा स्तर निश्चित वाढतो. नॉनसेक्युलरांचा अभ्यास वाढवू इच्छित सेक्युलर लिबलर शिक्षकांचा अभ्यासही वाढण्याची गरज कदाचीत अधिक आहे किंवा कसे. असो. शिक्षक दिना निमीत्त ऐसी अक्षरेवरील सर्व (उपदे)शिक्षकांना शुभेच्छा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

पाने