ऐसीवर वेगळे काय? - लेख काढला आहे.
संकेतस्थळांवर जाहीर टिप्पणी करणे हे अयोग्य आणि घातक असू शकते याची पूर्ण कल्पना असताना असा प्रमाद माझ्या हातून कसा घडला असावा बरे असे वाटते. तरीही, हा चर्चाप्रस्ताव संपादित करून मी झाल्या प्रमादाचे प्रायश्चित्त घेत आहे.
ही चर्चा उगीच पुन्हा वर आल्याचा खेद वाटतो. चर्चा अप्रकाशित करण्यास माझी ना नाही तरीही काही सदस्यांचे प्रतिसाद महत्त्वाचे वाटत असल्यास ती ठेवली तरीही माझी ना नाही. शक्य असल्यास ती दुसर्या पानावर ढकलावी ही विनंती.
येथे आधी लिहिलेले प.पू. तात्याबा महाराजांचे प्रसिद्ध वाक्य मी स्वत: संपादित करत आहे. संकेतस्थळ चालक व संपादकांशी माझे काही मतभेद आहेत असा गैरसमज होण्याची शक्यता वाटल्याने. कोणाचा गैरसमज झाला असल्यास क्षमस्व! (अरेरे! अद्ययावत केलं तरी हे बेणं वरती येतं याला प्लीज खाली ढकला.)
धन्यवाद
हा महत्त्वाचा मुद्दा ऐरणीवर आणल्याबद्दल प्रियाली यांचे मी आभार मानतो. प्रस्तावात चार आवडलेल्या व चार खटकलेल्या गोष्टी लिहून सकारात्मक मांडणी केल्याबद्दलही धन्यवाद.
आपण नक्की कोण, आपली आयडेंटिटी काय, या प्रश्नांचा बराच विचार झालेला आहे. त्याची काही झलक उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्वे - धोरणे मध्येही दिसते. काही त्रोटक मुद्दे आत्ता मांडतो, नंतर हा प्रतिसाद संपादित करून विस्तार करेन. कृपया या प्रतिसादाला प्रति-प्रतिसाद देऊ नये.
१. अभिव्यक्तिस्वातंत्र्य - ध्येय धोरणांतच अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा उल्लेख करणारं हे संस्थळ आहे.
२. पारदर्शकता - संपादकांची व श्रेणीदात्यांची यादी जाहीर आहे.
३. समूहाची लोकशाही आणण्याचा प्रयत्न - मोजक्या संपादकांपेक्षा अनेक श्रेणीदात्यांतर्फे संस्थळावर काय अपेक्षित आहे याची सर्वांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न
४. संपादकांचा दृष्टिकोन - इथे येणारे केवळ त्रास द्यायला येतात, असं गृहित धरण्याऐवजी बहुतांश लोक चांगल्या हेतूने येतात हे गृहितक आहे. जो काही खोडसाळपणा होईल त्यावर एका मर्यादेपर्यंत श्रेणीसुविधेने नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आहे.
५. दर्जाबाबतची भूमिका - केवळ निवडक लोकांच्या कल्पनेनुसार ग्राह्य आहे तेच प्रसिद्ध होईल अशी भूमिका नाही. त्यामुळे सुक्याबरोबर ओलंही येतं हे खरं आहे. पण चांगल्या लेखनाची नोंद घेण्यासाठी दरमहा उत्तम लेखन आर्काइव्ह करण्याचा हेतू आहे. तारांकन ही काहीशी पहिली चाळणी आहे. पण लवकरच निवड प्रक्रिया प्रस्थापित करून आर्काइव्ह करण्याची व्यवस्था होईल. इतर संस्थळांवर सहा महिन्यांपूर्वी काय चांगलं आलं होतं हे शोधून काढणं महाकठीण काम आहे. ते सोपं झाल्यास ज्या वाचकांना चांगलं लेखन वाचायचं आहे त्यांची सोय होईल. हे लेखन सतत चाळलं गेल्यामुळे नवीन वाचकांनाही दिसेल. तसंच प्रतिसादांमुळे सतत वर येत राहील. जेणेकरून चांगल्या लेखकांना अधिक व्हिजिबिलिटी मिळेल.
६. लेखकांना फीडबॅक - ज्या लेखकांचं लेखन चांगलं आहे, किंवा विशिष्ट लेख पुरेसा चांगला जमला नसला तरी स्पार्क आहे अशा लेखकांना धाग्यावर व व्यनिने वेळोवेळी सकारात्मक फीडबॅक देण्याचा प्रयत्न चालू आहे. धाग्यांवर मी स्वतः अनेकांना व व्यनिने किमान चार लेखकांशी साधकबाधक चर्चा केलेली आहे.
७. प्रस्थापित माध्यमं आणि आंतरजाल - यांच्यातली दरी कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जाणार आहेत. नक्की रूपरेखा अजून ठरलेली नाहीत, तरी काही कल्पना घोळत आहेत. हे साधण्यासाठी काय काय करता येईल याबाबतीतल्या सूचनांचं स्वागत आहे.
८. व्यवस्थापन व सदस्य - यांच्यातले संबंध अधिक मोकळे करण्याचा प्रयत्न आहे. वरील लेख काही संस्थळांवर कदाचित व्यवस्थापनविरोधी, खोडसाळ म्हणून उडला असता. इथे त्यातून काय शिकता येईल असा विचार आहे.
९. नवीन लेखन - इतर संस्थळांवर न प्रसिद्ध झालेल्या, फक्त ऐसीवर प्रकाशित झालेल्या लेखनाविषयी माझ्याकडे पुरेसा विदा नाही. पण मुक्तसुनीत यांची दिवाळी अंकांविषयीची चर्चा, चिंतातुर जंतू यांचं लिखाण हे निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या कविताही काही प्रमाणात वेगळ्या जातकुळीच्या आहेत.
१०. बाल्यावस्था - संस्थळ अजूनही बाल्यावस्थेतच आहे. दरमहा सातत्याने करण्याच्या गोष्टींनी दिसणारा परिणाम वर्षभराने दिसावा अशी आशा आहे. त्या दरम्यान सुधारणांचा विचार चालूच आहे.
११. तांत्रिक प्रगती - बाल्यावस्थेत असूनही गेल्या महिन्याभरात ज्या वेगाने बदल, सुधारणा झाल्या त्यासाठी मी तांत्रिक विभागाचे मनोमन आभार मानतो.
संकेतस्थळ फ्लॉप गेले आहे का?
संकेतस्थळ फ्लॉप गेले आहे का? असे विचारण्यासाठी काढलेला धागा आवडला.
गुर्जीनी उल्लेखलेले काही मुद्दे योग्य असले तरी बाकीचे पोकळ आहेत.
उदा. इथे लोकशाही वगैरे काही नाही. आपापल्या मित्रमंडळींना श्रेण्यादेण्याचे अधिकार देउन लोकशाही कशी काय येते? संपादकांची यादी आहे तशी सहसंपादकांची अपटूडेट यादी का नाही? समूहाची लोकशाही = समूहाची कंपूबाजी असे आहे का?
बहुतांश लोक चांगल्या हेतूने येतात हे गृहितक आहे, तर सर्वांनाच श्रेणी देण्याचा व धाग्यांना तारे देण्याचा अधिकार नको काय?
तसेच विशिष्ठ लोकांनी 'अतिपरिचयात अवज्ञा' ह्या सुभाषिताला स्मरुन इथले लिखाण काही दिवस थांबवावे. उदा. गुर्जी. प्रत्येक धाग्यावर त्यांच्या त्याच त्याच प्रतिक्रिया बघुन जाम कंटाळा येतो. इथला ट्रॅफिक वाढवण्याची एकहाती जवाबदारी सध्या त्यांच्यावर आहे असे वाटते.(एकंदरीतच फाउंडींग फादर्सनीच जरा विश्रांती घेतल्यास उत्तम. अर्थात हा त्यांच्याच गप्पांचा अड्डा भरवण्यासाठी ही साइट असल्यास ती गोष्ट वेगळी.)
गवि वगैरे लेखकांनी तेच तेच सगळीकडे देण्यापेक्षा काही एक्स्क्लुजीव इथल्यासाठीही लिहायला हवे. अन्यथा प्रतिसादलोलुप असा शिक्का बसतो आणि संस्थळालाही ते हितकारक नाही.
नेहमी न लिहिणार्यांचे मत मागवले म्हणून न राहवल्याने लिहिले.
ह्या प्रतिसादाला कैच्याकौ
ह्या प्रतिसादाला कैच्याकै श्रेणी देणारा जो कोण भ्याड सहसंपादक आहे त्याने ही श्रेणी का दिली ते उघड बोलून दाखवावे. छुपेपणाने श्रेणी देण्याचा मजा फक्त कंपूला घेता यावा ह्याचा अजुन दुसरा वस्तुपाठ नाही. बहुतेक लोकांनी ऐसीकडे सुरुवातीनंतर पाठ फिरवण्याचे हे एक महत्वाचे कारण आहे. तसेच संकेतस्थळ फ्लॉप होण्यामागचे ते एक महत्वाचे कारण आहे.
या संस्थळावरील एकाही सदस्याला
या संस्थळावरील एकाही सदस्याला मी तरी प्रत्यक्ष भेटलो नाही अथवा कुणाबरोबरही फोनवरही संभाषण झालेले नाही.
अर्थात मी कुठल्याही कंपूमध्ये समाविष्ट नाही.
तरीही मला येथे श्रेणी अथवा तारे द्यायचा अधिकार आहे. यावरूनच व्यवस्थापन मंडळ पक्षपाती नाही हे सिद्ध होते.
अर्थात या संस्थळावर श्रेणी व्यतिरिक्त फार्से नाविन्य दिसत नाही. पण नुकत्याच जन्मलेल्या संस्थळाला जरा बाळसे धरण्यासाठी वेळ हवाच. नाही का?
शिवाय एकदीड महिन्यातच संकेतस्थळ फ्लॉप हा शिक्का तुम्ही कसा काय मारला ब्वा?
------------------------
घणघणतो घंटानाद
कारण तुम्ही सुरुवातीपासुन
कारण तुम्ही सुरुवातीपासुन तस्त धरुन आहात.
तस्त धरलेले तुम्हास कोठे
तस्त धरलेले तुम्हास कोठे दिसले ते सांगा पाहू.
------------------------
घणघणतो घंटानाद
गवि वगैरे लेखकांनी तेच तेच
गवि वगैरे लेखकांनी तेच तेच सगळीकडे देण्यापेक्षा काही एक्स्क्लुजीव इथल्यासाठीही लिहायला हवे. अन्यथा प्रतिसादलोलुप असा शिक्का बसतो आणि संस्थळालाही ते हितकारक नाही.
तुमच्या मुद्द्यात तथ्य नक्कीच आहे. नव्या संकेतस्थळाच्या वाढीच्या प्रमाणात सर्वच बाबतीत वाढ होईलच. माझ्या इथल्या नऊ पोस्टपैकी तीन (मौजमजा - मार खाल्ला आहे का?, मिस्टर काय करतात?, आणि मदत नक्की कशी?) म्हणजे एकूणपैकी एक तृतियांश पोस्टे फक्त ऐसीअक्षरेवरच प्रकाशित केली आहेत. अगदी माझ्या स्वतःच्या खाजगी ब्लॉगवरही नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
प्रतिसादलोलुपतेचा मुद्दाही मी नाकारत नाही. मला प्रतिसादांची ओढ आहेच. प्रत्येकाला असते. नाही असे म्हणणार्यांनी लिखाण घरच्या फडताळात ठेवले असते. "लोलुप" म्हणावं की "भिलाषी" हा भाषेचा मुद्दा झाला. लग्नात अधिकाधिक लोकांनी येऊन आशीर्वाद द्यावेत, तिथे ज्यांना जमणार नाही त्यांनी रिसेप्शनला येऊन तरी द्यावेत असं वाटणार्याला दोन वेगळे समारंभ मांडले म्हणून आशिर्वादलोलुप किंवा शुभेच्छापिसाट म्हणावे का?
तरीही हा प्रतिसाद दडपण्याचे कारण नाही. मी त्याची श्रेणी वाढवून तो अनफोल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे.
धन्यवाद गवि. तुमच्या
धन्यवाद गवि. तुमच्या प्रामाणिकपणाला दाद देतो. तुमचे खास इथे दिलेले लेख खरेच सुटले माझ्या नजरेतुन. मध्यंतरी तुम्ही चक्क मिपा कट्ट्याचेही वर्णन इथे टाकले होतेत ते पाहुन काहिसा गैर समज झाला होता.
तरीही हा प्रतिसाद दडपण्याचे कारण नाही. मी त्याची श्रेणी वाढवून तो अनफोल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे.
हिच तर गोम आहे ना. तुम्ही असे उघडपणे लिहिलेत पण अजूनही माझ्या प्रतिसादांच्या श्रेण्यापाहा. कारण संकेतस्थळचालकांचे बगलबच्चे मोठ्या संख्येने श्रेण्या देतात पण ते भ्याड असल्याने तुमच्यासारखे उघड लिहित नाहित.
बगलबच्चे वगैरे प्रकार नसावा.
बगलबच्चे वगैरे प्रकार नसावा. मी स्वत: कोणत्याही प्रवर्तकाचा मालकाचा वैयक्तिक ओळखीचा किंवा खास नसूनही श्रेणी सुविधा मला दिसते आहे. माझे पुण्य केलेल्या योगदानानुसार घटते वाढते आहे.
त्या अनुषंगाने माझे हक्कही जात येत आहेत.. तेव्हा साईटच्या प्रवर्तकांचे यात काही असेलसे वाटत नाही. कोणा एखाददुसर्या वैयक्तिक आयडीज कडूनही हे हो ऊ शकते ना?
ओळख!
स्वतःची वेगळी ओळख करण्यास तूर्तास अपयश.
वर उल्लेखलेल्यांत मायबोली जरा वेगळं आहे.(ते फार जूनं आणि भलं मोठंठं असल्याने साहजिकच आहे)
अड्डा बनवणं ही बहुतेकांची जालीय गरज आहे हे नाकारू शकत नाही. प्रत्येकाला काय उपक्रमासारखे अकलेचे दिवे लावायचे नसतात.
जुन्या इतरत्र प्रकाशित झालेल्या लेखांनी वीट येतो हे खरेय.
आमच्यासारखे नुसते वाचू किंवा प्रतिसाद देऊ शकणारे लोक मग जास्तीत जास्त नविन वाचायला मिळेल तिथे जातात.
इथल्या सदस्यांची संख्या मर्यादित असल्याने तसेच अड्ड्यातल्या प्रत्येकाची मते माहिती असल्याने कुणी प्रतिक्रीया दिलि तर काय देणार याचा अंदाज असतो.
काही सरप्राईज इलेमेंट नाही त्यात.
इतकी कमी आणि आपलीच लोकं आहेत की तावातावाने भांडावेसे वाटणारेही कुणी नाहीत.
संपादक किंवा मालक जे कुणी आहेत ते त्यांचे काही बाबे आणि कार्टे आहेत ही गोष्टही लपून राहात नाही.उदा. काहींच्या मतांना काहीच गुण मिळत नाही.
काही बिचारे अपमानास्पद वागणूक (हे खरे आहे, कुणाबद्दल विचाराल तर संपर्कातून कळवेन) मिळूनसुद्धा इथे येत राहतात. तरी त्यांच्याबद्दलचा दुजाभाव संपलेला दिसत नाही.
सध्या सदस्य संख्या वाढवण्यासाठी काहितरी अमिष द्यावे लागेल जसे की एखादी लेखनस्पर्धा,छायाचित्र स्पर्धा, मग भले बक्षिस रक्कम नसूदे केवळ मानसन्मान असू दे.
स्वतःच्या आयडीला जालीय ओळख देऊ पाहाणारे नक्की येतील.
सदस्य संख्या वाढणे हा एकच मोठ उपाय दिसतोय अन्यथा मनोगताच्या सावत्रभावाचा सावत्रभाऊ ही ओळख लवकर पुसता येणार नाही.
प्रकाटाआ.
प्रकाटाआ. ज्या प्रतिसादांना उपप्रतिसाद आले आहेत ते मी काढू शकत नाही. ज्या उत्साहाने माझ्या इतर प्रतिसादांना निगेटीव्ह श्रेणी दिली जाते त्या उत्साही विरांनी ते बंद करून टाकावे. आपली आभारी असेन.
प्रकाटाआ
प्रकाटाआ
यू एस पी
मी मराठी संवादस्थळांवर गेले काही महिनेच वावरते आहे, आणि प्रथम तीच तीच नावं सगळीकडे पाहून चकित झाले होते. बरेच महिने सदस्यत्व घेऊनही चर्चेत भाग घेतला नाही, कारण जुन्या ओळखी असलेल्यांच्या गप्पा चालू होत्या हे उघड होते. भांडणं, वाद, चर्चा - संस्थापकांशी वाद, एका स्थळातून बाहेर पडून दुसरे सुरू होणे, वगैरे बरेच पाणी वाहून गेले आहे हे कळत होते, पण "अमुक अमुक आहेच हे वेगळे सांगायला नको" या नेहमीच्या शैलीत अंधुक संदर्भ येत असल्याने नक्की काय चाललंय हे उमगले नाही. शेवटी उपक्रम वरच्या एका चर्चेत उडी टाकली - सगळेच एकमेकांना परिचित असले तरी चर्चेच्या विषयाहून अवांतर गप्पा-मस्करी कमी होत असल्याने नवीनच कोणी टपकून पडलंय असा भास झाला नसावा.
अदितीला काही दिवसांपूर्वी सांगितल्याप्रमाणे - ऐसीअक्षरेवर सुरुवातीपासूनच असल्याने येथे मजा वेगळीच वाटत आहे, बराच वेळ चालू असलेल्या, आणि काहीशा संथ झालेल्या पार्टीत एकदम उशीरा टपकल्याचा भास मला होत नाहीय!
ही सगळी स्थळं पाहून एकूण स्थळं वाढताहेत, पण चर्चाविश्व किंवा सदस्यांमध्ये तेवढेच वैविध्य येतंय की नाही ही शंका येते. उलट फ्रॅगमेंटेशन होतंय असे वाटते. म्हणूनच पुन्हा पुन्हा हा प्रश्न सर्व स्थळांवर येतो. या धाग्यासारखाच उपक्रमवर ही एक धागा पाहिला, आणि काही दिवसांपूर्वी ऐलपैलच्या स्वास्थ्याबद्दल तेथे ही एक पाहिला. उपक्रमचे जुने लेख चाळत असता स्थळ नवीन असताना आधी असाच प्रश्न तेथे पडला होता असे दिसले. (मिपा - मनोगत बद्दल माहित नाही)
प्रत्येक स्थळाची अशीच एक यूएसपी असली तर तेच तेच लेखन सर्वत्र येणे कदाचित कमी होईल का, असा विचार येतो. एका स्थळाने कथा-कविता-ललित, एकाने राजकारण-चर्चा, एकाने पाककृती-कलादालन, एकाने वैचारिक-इतिहास-साहित्य-भाषा-चर्चा इत्यादी? मग कवितेत रस असलेले सर्व सदस्य त्या खास स्थळावरच जातील का? याने मजकूर तसा कमी असला तरी एकूण उत्साही आणि हवेहवेसे सदस्य-वाचक-प्रतिसादक यांत वाढ होईल का? का कोणाला काय आवडेल हे सांगता येत नाही, आणि कुठला विषय कोणत्या स्थळाने धरून ठेवावा हे ठरवणे अशक्य असल्याने वन-स्टॉप-शॉप, आणि इतर प्रकाशित लेखनही स्वीकारणे हाच पर्याय आहे? पण मग सगळेच सुपरमार्केट असले, तर मग नवीन स्थळ काढायचे प्रयोजन नेमके काय? वेगळा मजकूर, की वेगळे व्यवस्थापन (म्हणजे काँटेंट ड्रिवेन, की यूसर ड्रिवेन?)
मला उपक्रम चे "हाय-ब्रो" ही यू.एस.पी आहे असे वाटते आणि ते आवडते. म्हणजे हे स्थळाने स्पष्ट केलेले मी वाचले नाही, पण कथा-कविता तेथे येत नाहीत, फक्त नॉन-फिक्शन स्वीकारायचे धोरण बहुदा आहे. पण कशा प्रकारचे धागे-प्रतिसाद तेथे येतील, याची आता कल्पना आहे, आणि तेथे किती वेळ घालवावा, हे ठरवता येते. पण माझ्या आवडीचा एखादा घागा येण्याच्या अपेक्षेत ऐसीअक्षरे सारख्या मोठ्या स्थळावर किती वेळ घालवावा, हे अजून नीट ठरवता आले नाही (समीक्षा-माहिती चे सदर जोपर्यंत ठणठणीत आहेत तोवर अॅक्टिव्ह असेनच)
सुचतील तसे विचार टंकले आहेत - उपक्रम वरचा धागा नुकताच वाचल्याने विषय डोक्यात होता, स्थळांची नावे घेतल्यामुळे गैरसमज नसावा. पण माझे स्वत:चे सांगायचे झाले तर कवितांवर प्रतिसाद देणे मला जमत नाही, आणि त्यात तेवढा रसही नाही. मौजमज्जांच्या धाग्यांचे भाग घेण्याइतपत रस नाही, पण अधुनमधुन वाचायला आवडतात. वैयक्तिक अनुभवाच्या ललित लेखांवरही "मस्त!" किंवा "अरेरे" पलिकडे नेमके काय म्हणावे सहसा सुचत नाही. लिखाणाच्या दर्ज्यावर भाष्य करण्या इतके माझे मराठी श्ट्राँग नाही! म्हणून एकूण मिपा आणि ऐलपैल वर सदस्यत्व असूनही मी फारसे आता तेथे भेट देत नाही. आणि ऐसीवरही श्रेणी सुविधा असली तरी फक्त काही धाग्यांवरच मी ती वापरते, आणि माझ्या कर्म-पुण्याचे नक्की काय स्टेटस आहे किंवा त्याने काय उपयोग होतोय, हे अद्याप कळायचे आहे.
असो. प्रतिसाद बराच लांबला आणि भरकटला. क्षमस्व.
प्रकाटाआ
प्रकाटाआ
एक महिन्याची वाटचाल
"ऐसीच्या चालकांना आपली वेगळी ओळख निर्माण करायची आहे का याबद्दल माझ्या मनात तूर्तास संदेह आहे."
~ प्रियालीताईंचा हा रोखठोकपणा नि:संशय स्पृहणीय आहे. मला स्वतःला अशी संदेहाची भावना जाणवली असती तरी मी जन्मजात स्वभावानुसार मुकाट बसलो असतो आणि 'तुका म्हणे जे जे होईल ते ते पाहात रहावे' असा विचार करून यथाशक्ती लेख आणि प्रतिसाद देत राहिलो असतो. पण हे गळू फोडायचे काम कुणीतरी करायला हवे होते ते सर्वप्रथम जालीय विश्वातील एका बुजुर्ग सदस्येने केले त्याबद्द्ल ऐसी चे सर्वच सदस्य त्यांचे आभार मानतील.
एकच महिना झाला असला तरी 'ऐसी' ने पटावरील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत असे म्हणत असतानाच हेही सांगणे आता गरजेचे आहे की, मराठी जालीय दुनियेतील 'आगळेवेगळे' रूप 'ऐसी अक्षरे' ला प्राप्त होण्यासाठी अजून काही महिने सर्वानीच प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. इथले विषय आणि अन्य संस्थळावरील विषय यात जाणवण्याइतका फरक दिसून येत नाही. म्हणजे अमुक एका विषयावरील लेखन करायचे, वाचन करायचे असेल तर मराठी वाचक सदस्यांनी 'ऐसी अक्षरे' कडेच धाव घेतली पाहिजे असे चित्र निर्माण होण्यासाठी मॉडरेटर्सनी सदस्यांना विश्वासास घेऊन त्यांच्याकडून वैविध्यपूर्ण लिखाण करवून घेणे गरजेचे आहे. केवळ "आणखीन् एक टाईमपास आणि मौजमजेचे ठिकाण" यासाठी ऐसी चा जन्म झाला असेल तर मग या धाग्याच्या हेतूला काहीच प्रयोजन राहाणार नाही. सुदैवाने ऐसीचे संपादक मंडळ संस्थळाच्या बॅटिंग पिचवरील नामवंत खेळाडू आहेत हे तर सत्य आहेच पण संस्थळ स्थापन करण्यामागील त्यांच्यातील सीरिअसनेस ऐसीच्या भावी वाटचालीविषयी आश्वासक चित्र निर्माण करते. तांत्रिक बाजूच्या यशस्वीपणाविषयी अदितीचे नाव इथे घेतले गेले ते योग्यच आहे.
फक्त ती 'श्रेणी" चे चक्र अजूनही कित्येकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. त्यात अडकलेले सदस्य प्रतिसादापासून स्वतःला आता दूर ठेवीत आहेत की काय असे चित्र निर्माण होत आहे.
असो. केवळ एका महिन्याच्या वाटचालीवर स्वतंत्र धागा निघून तिथे प्रतिसाद दिले जातात, हे देखील 'ऐसी अक्षरे' च्या यशस्वी वाटचालीचे एक सुचिन्हच मानावे लागेल.
अशोक पाटील
लाऊड थिंकींग
असा धागा पहिल्या महिन्यात यावा म्हणजे ऐसीअक्षरे इतर संस्थळांच्या पातळीपर्यंत एका महिन्यात पोचले आहे असे म्हणायला हरकत नाही![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
गमतीचा भाग सोडला, तर माझ्यामते हे संस्थळ आताच कुठे सुरू झाले आहे व इतर संस्थळांवर आहे ते व तितके पुरवण्यात महिन्याभरात यशस्वी झाले आहे. याचे अजुन एक जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे याच्या संस्थापकांपैकी तांत्रिक दृष्ट्या 'चँपियन' नसूनही (असा आपला माझा समज हो, चुभुदेघे) संस्थळ अतिशय सुबक तसेच सोयींनी युक्त झाले आहे. किंबहुना इतर संस्थळांनी न देऊ केलेली 'श्रेणी' सुविधा पहिल्या दिवसापासून दिली गेली आहे. तेव्हा अजून या स्थळात फार वेगळे काहि नसले तरी वेगळे होऊ शकेल असे वाटते.
माझ्यामते या संस्थळाला (किंबहुना मायबोली सोडल्यास इतर प्रत्येकाला) नव्या सदस्यांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. बाहेरून बघणार्याला येथे फक्त ओळखीच्या लोकांना घेतात बहुतेक असे वाटते. माझ्या कित्येक मित्रांना इथे, उपक्रमवर बोलावले आहे/होते. त्यापैकी उपक्रमावर काहिंनी सभासदत्त्व घेतले कारण विचारले असले अपेक्षेच्या विपरीत निघाले की तिथे असलेले औपचारीक वातावरण. इथे/मिपावर आलेले प्रतिसाद पाहिले की त्रयस्थाला वाटते की सगळे एकमेकांना ओळखतात व त्यांच्यातल्या त्यांच्यात मस्करी चालु आहे. आणि हा समज फारसा खोटाही नाही.
दुसरे असे की मराठी संस्थळावर येऊन आवडीने लिहितील अशी पिढी कमी होत जाणार आहे हे वास्तवही मान्य करायला हवे. नव्या पिढीला बोलण्यापुरते मराठीही येते, एक भाषा म्हणून शाळेत शिकतात, पण इंग्रजीमधे इतकी माध्यमे असताना ती पिढी खास मराठी संस्थळावर चर्चेला येईल हे कठीण दिसते. भारतीय निमशहरी/ग्रामिण भागात हे शक्य व्हावे मात्र तिथे अजून पायाभूत सुविधांचा भाव असल्याने वीज असणेच मुश्कील त्यात संगणक सुरू झाला तर त्यांचा वेळ विविध परिक्षांचे फॉर्म आनि शहरात जायच्या बसची/ट्रेनची रिझर्वेशने करण्यातच जातो :(. तेव्हा सद्यपरिस्थितीत मराठी संस्थळावर लिहिण्यासठी (ज्यांच्याकडे वेळ आहे, क्षमता आहे आणि सोय आहे) मोजका वर्ग उरतो तो असा: १. परदेशस्थ भारतीय २. रिटायर्ड व्यक्ती ३. नोकरी न करणारा (महिला) वर्ग ४.कंप्युटरशी संलग्न नोकरी करणारा वर्ग. यातील १ व ४ प्रकारची बरीच मंडळी मराठी संस्थळावर आहेत व ती असलेल्या संस्थळावर आवड, मैत्री वगैरे निकषांवर विभागली गेली आहेत. नव्या सुरू होणार्या संस्थळासाठी उरलेले १,४ बरोबरच २,३ ह अख्खा वर्ग आहे. त्यांच्याकडेही देण्यासारखं खूप काहि आहे. ऐसीअक्षरेने या वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी काहि करता आलं तर बघावं असं वाटतं
तिसरे असे की ऐसी अक्षरेवर अनेक वाचक दिसताहेत, मात्र सदस्य संख्या सिमीत आहे. काहि नवे चेहरे आहेत. मात्र त्यांना लिहिते करण्यात सदस्यांना यश आलेले नाही (ही एकट्या संपादकांची जबाबदारी+क्षमता नाहिच आहे). लोकांना लिहिते करण्यासाठी विविध उपायांची गरज असते. प्रियाली ने इथे चर्चा करण्यासाठी सौम्य ट्रोलिंग केले आहे (उचकवले आहे) [ हे स्वागतार्ह आहे]. मागे सर्कीटरावांनी उपक्रमावरही असे ट्रोलिंग करून बालसाहित्य लिहायला 'उचकवले'होते. त्यातून मी "आजी आजोबांच्या वस्तु" लिहिल्या होत्या. आता वाटते ते उचकवणे झाले नसते तर कदाचित मी ते लिहिले नसते. असे सदस्यांना लिहिण्यासाठी उचकवण्याचे काम सर्व सदस्यांनी करणे गरजेचे वाटते
बाकी, काहि डोक्यात उपाय आहेत:
१. दर महिन्याच्या शेवटी या महिन्याचे टॉप ३ (प्रत्येक क्याटेगरीत) प्रकाशित करावेत [वर राजेश म्हणताहेत त्याच धर्तीवर, फक्त आर्काईव्ह म्हणजे काय करणार कळले नाही, म्हणून हा मुद्दा लिहिला]
२. अभ्यासवर्ग [छंद, वृत्त यांचा अभ्यासवर्ग, गझलेचा अभ्यासवर्ग, संस्कृतचा अभ्यासवर्ग, देवळांत काय बघावे याचा अभ्यास असे प्रयोग मागे मराठी संस्थळावर यशस्वी झाले आहेत मात्र काहि अपवाद सोडल्यास ते अर्ध्यातच राहिले. त्याच बरोबर एचटीएमेल चा अभ्यासवर्ग, अॅनिमेशन अभ्यासवर्ग, छायाचित्रण अभ्यासवर्ग, पक्षीनिरिक्षण वर्ग, एमेस ऑफीस वर्ग असे नवे अभ्यासवर्ग मराठीत घ्यावे असे सुचवतो.]
३. ऐसीअक्षरे सोडून इतर संस्थळावरील ३ नव्या लेखकांच्या लेखनाचे दुवे इथे अभिप्रायासकट द्यावेत. हे संस्थळ हे इतर स्थळांबरोबर स्परर्धेसाठी नसून उत्तम लेखनासाठीचे व्यासपिठ आहे हा संदेश गेला पाहिजे.
४. दर महिन्यातून एका मराठी ब्लॉगची ओळख इथे करून देता येईल. जालावर इंग्रजी मधे काय वाचण्यासारखे आहे त्याची ओळ्ख
असो, बरेच काहि लिहिता येईल. नकळत लाऊड थिंकीग करत गेलो, प्रतिसाद बराच लांबयाल.. थांबतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
काही मुद्दे
उपक्रमावरील वातावरण औपचारिक असण्यापेक्षा थोडे रुक्ष आहे पण ती त्या स्थळाची प्रकृती आहे. इथले वातावरण खेळीमेळीचे असणे अपेक्षित आहे परंतु खेळीमेळीचे वातावरण थट्टा-मस्करीचा अड्डा होणे धोकादायक वाटते.
अगदी योग्य! आणि बहुधा म्हणूनच नवीन लोक दिसत नाहीत. तेच लेखक, तेच लेख आणि तेच संवाद.![Sad](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/sad.gif)
उचकवणे, ट्रोलिंग करणे, यूएसपी तयार करणे आणि टिआरपी वाढवणे या सर्वांमध्ये किंचित फरक आहे. शेवटचे दोन प्रकार हे सकारात्मक रित्या वापरता येतात. तेव्हा माझा धागा ट्रोलिंग आहे असे मी तरी म्हणणार नाही.
(इतरांनी काहीही म्हणावे.) परंतु यूएसपी क्रिएट करणे किंवा टिआरपी वाढवणे यांत नेमके गैर काय ते कळत नाही. एकंदरीत मराठी माणूस यासाठी उदासीन दिसतो असे वाटते.
----
ऋषीकेशने सांगितलेले उपाय उत्तम आहेत परंतु त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. सतत जनसंपर्क तयार करावा लागतो. पाठपुरावा करावा लागतो. नोकरदार चालकांना हे शक्य असतेच असे नाही. हीच बहुधा अनेक मराठी संकेतस्थळांची पडती बाजू आहे.
---------
बायदवे, मी मायबोलीवर जात नाही*. नवीन सदस्य मायबोलीकडे चटकन आकृष्ट होतात याची कारणे कोणती असावी?
---------
@ पाटील,
थोडे अधिक
यातील उचकवणे (ज्याला मी सौम्य ट्रोलिंग म्हटले आहे) देखील सकारात्मकरित्या वापरले जाउ शकते त्याचे उदा. धाग्यात दिले आहेच.
काहि उपायांसाठी वेळ लागेल याच्याशी सहमत. मात्र हे लक्षात घेऊनच मी सांगितलेल्या उपायांत फारसा जनसंपर्क लागेल असे वाटत नाही. त्यातील काहि उपायांसाठी फारसा वेळही लागु नये. असो.
मी मायबोलीवर गेलो तेव्हा जालावर नवा नव्हतो. खरंतर बराच जुना होतो. माझ्या हाफिसातून फक्त मायबोली अॅक्सेस होऊ लागल्याने तिथे सदस्यत्व घेतले होते. एकच धागा टाकला आहे, त्यावर मात्र अगदी खुलेपणाने प्रतिसाद आले. प्रोत्साहन, सुचना, पुरवण्या सारे काही!
आधीच तेव्हा मी मनोगतावर लिहित होतो, शिवाय मिपा व उपक्रम अॅक्सेस होऊ लागले आणि मग मायबोलीकडे दुर्लक्ष झाले.
मनोगतानंतर जन्मलेल्या प्रत्येक संस्थळावर एखाद्या अपरिचित आयडीने लिहिले की हा कुणाचा बरे डु आयडी अशी कुजबुज व्यनीतून मग खरडीतून, पुढे पुढे तर एखाद्या प्रतिसादातून होत असे. हा सदस्य खराच नवा आहे याची खात्री जन्तेला पटल्याखेरीज त्याला स्वीकारले गेले नाही. आपल्यावर असा अविश्वास दाखवल्यावर /प्रसंगी भडीमार झाल्यावर नव्या जागी झाल्यावर मन कसे रमावे? मायबोलीवर हे न होणे हा फरक मला जाणवला.
सुदैवाने, (निदान आतापर्यंतच्या वाटचालीत) ऐसीअक्षरे मात्र शक्य तितके हे पूर्वग्रहाचे गाठोडे बाजुला ठेऊ पाहत आहे असे दिसते. आणि हा दृष्टीकोन टिकावा, वाढावा असे वाटते. म्हणूनच वरच्या सुचनांमधे इतर संस्थ़ळावरील लेखनाची दखल घेणे ही देखील एक सुचना आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
प्रकाटाआ
प्रकाटाआ. ज्या प्रतिसादांना उपप्रतिसाद आले आहेत ते मी काढू शकत नाही. ज्या उत्साहाने माझ्या इतर प्रतिसादांना निगेटीव्ह श्रेणी दिली जाते त्या उत्साही विरांनी ते बंद करून टाकावे. आपली आभारी असेन.
निबंध!
नवीन सदस्य मायबोलीकडे चटकन आकृष्ट होतात याची कारणे कोणती असावी?
यावर मी निबंध लिहू शकते. सध्या ते माझ्यासाठी प्रथम क्रमांकाचे आवडते मसंस्थ आहे.
पण माझ्यामते सगळ्यात महत्त्वाचे की ते खूप जुने आणि प्रचंड सदस्य संख्येचे आहे. तो भास का कुणी म्हणाला तसं विशाल कालखंड आणि विपुल लोकसंख्या असल्यवर आपल्या मताशी,विचारांशी जुळणारं कुणी ना कुणी मिळतच. मग ग्रूप फॉर्म होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला समानशील वाटणारी चारपाच मंडळी निघतातच.
नविन सदस्याचे स्वागत समिती पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते, मदत समिती अडल्यानडलेल्याला मदत करते.
काही अगदी क्लोज्ड ग्रूप आहेत तिथे सदस्य झाल्याशिवाय तुम्हाला काही लिहिता येत नाही की वाचता येत नाही.
कित्येक वाहते धागे आहेत जिथे तीसाच्यावर प्रतिसाद दिसणार नाहीत अशी सोय असते तिथे तुम्ही वाट्टेल ते लिहा. मनोगत आणि मिपावरच्या एव्हरशिळ्या खरडफळ्यासारखं नाही.
सगळ्यात महत्वाचे तिथले अनेक सामाजिक आणि साहित्यिक उपक्रम.
त्यामुळे आज या संस्थळाला फर मोठी सदस्य संख्या मिळून नविन पुस्तकांचे प्रकाशक आणि चित्रपटांचे निर्माते इथे जाहिरात करण्यासाठी येतात.
अजून बरंच काही आहे. तुझ्या विपूत जमतील तसे एकेक प्लस पॉईंट लिहेन. मायनस पॉइंटही निश्चितच आहेत पण त्यांच्यावर विचार करून आपल्याला काय करायचेय?
आजपासून ४-५ वर्षात ऐसी अक्षरे ही पातळी नक्कीच गाठेल हा आशावाद आहे.
एका बाबतीत असहमत.
असहमत. हा वर्ग वाढेल, अन वाढवता येईल.
नेटवर येतात पण इंग्रजी यथातथाच येते असा एक भयंकर मोठ्ठा वर्ग इथे आहे. किंबहुना अगदी इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांचेही इंग्रजी धेडगुजरीच असते. त्यामुळे मराठी स्थळे आहेत हे माहिती होणे पुरेसे आहे.
जर अशा स्थळांवर इंग्रजीतली माहिती सोपी करून मिळते हे कळलं, तर ट्यार्पी फार झपाट्याने वाढेल. याबाबतीत तुमचा मुद्दा क्र. २ उत्तम आहे.
यासोबत काही मार्गदर्शनपर लेख. खास करून तरूणांकरता. जसे: रेझ्युमी कशी लिहावी. गाव सोडून बाहेर नोकरीकरता गेलात तर येणार्या अडचणी अन त्यावरील मार्ग इ. हे जाणकारांकडून आले तर मजा येईल.
(या धाग्यावर माझ्या सगळ्या प्रतिसादांत मी फक्त इथे नवे अजून काय करता येईल इतकेच बोलतो आहे.)
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
अनुवाद..
अनुवादाला प्रोत्साहन देऊन वेगळा विभाग केला तर इंग्रजी किंवा अन्य भाषेतलं तांत्रिक आणि साहित्यिक बरंच काही मराठीत येईल, आणि शिवाय दणदणीत यूएसपीही होईलच..
शिवाय मराठीतून मूळ लिहिण्याचं न जमणार्या किंवा आवड नसणार्यांनाही उत्तम अनुवादाचं अंग असू शकतं. मूळ विषय आवडीचा असला की मराठीत आणतानाही आनंदच व्हावा..
अनुवाद करायला आवडेल.
तसा एक लेखकही डोळ्यासमोर आहे.
पण त्यासाठी मूळ लेखकाची परवानगी वै बारा भानगडी कोण करील?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
तांत्रिक ज्ञान तर आणता ये
तांत्रिक ज्ञान तर आणता ये ईल..
शिवाय स्वैर अनुवाद किंवा आधारित कथा वगैरे..
आजीबाईचा बटवा नावाचा वेगळा
आजीबाईचा बटवा नावाचा वेगळा विभाग सुरु करावा जेथे सदस्य स्वत: वापरलेल्या घरगुती औषधांबद्द्ल माहीती देतील. सर्दी खोकल्याचा एक बारीक धागा मी टाकलाय माहीतीत. बघा पटतंय का.
http://shilpasview.blogspot.com
लोणचं मुरायला वेळ लागतो / चांगली वाईन बरेच दिवस तळघरात काढते.
हि चर्चा, उपक्रमवरिल बंडलबोर ह्यांचा धागा, एकूण अपेक्षा बघता माझे असे मत आहे की - थोडा धीर धरावा. चांगले ते काय आणि कसे हे उमजायला वेळ लागतो, इथले संस्थळ-चालक विचारवंत आणि लिबरल आहेत असे माझे मत आहे, कालानुरूप गोष्टी बदलतिल/समृद्ध होतिलच.
एका महिन्यातच अशा अपेक्षा ठेवणे मला थोडेसे भांडवलशाही-वृत्तिचे वाटते.
तसेच लोकशाही कारभार मला थोडासा अवास्तव वाटतो, त्यापेक्षा एक-तत्व असणे उत्तम, त्यामधे दर्जा सांभळला जातो, पार्शलिटिचा आरोप कमीत कमी होइल ह्याची काळजी घ्यावी, बाकी रडणारे कायमच रडत असतात."आवडले तर घ्या, नाही तर सोडून द्या" हे तत्व ठेवावे.
फार मैत्रीचे राजकारण झाले तर लोक सोडून जातिल किंवा दुसरा पक्ष काढ्तिल, त्या चिंतेने आपले धोरण बदलू नये.
पण कंटेंट-संपादन होणे गरजेचे आहे, त्यामुळे दर्जा राखण्यास मदत होइल.
बाकी इथे इतरांनी सुचविलेले प्रयत्न देखिल स्तुत्य. जमेल ते करत रहावे.
पण आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे धोरण असणे मला गैर वाटते, तो एक साईड-इफ्केट असू द्यावा, तुलना होइल असे वागणे चुकिचे आहे.
लोकशाही
धीर धरण्याचा प्रश्न नाही (न धरून सांगतय कोण कोणाला ;)) प्रश्न आहे तो वाटचाल कोणत्या दिशेने सुरू राहिल हे जाणून घेण्याचा. उद्या चालकांनी सांगितले की आम्हाला प्रति-मिसळपावच उभे करायचे आहे तरी आपण काही करू शकत नाही. परंतु आपल्यापुरते त्या बँडवॅगनमध्ये आपण सामील व्हायचे की नाही हे तरी ठरवता येईल किंवा आपण येथे किती वेळ घालवावा (वर रोचना यांनी म्हटल्याप्रमाणे) त्याचा अंदाज लोकांना येईल.
मी याच्याशी पूर्णतः सहमत आहे पण ते माझे वैयक्तिक मत झाले.![Smile](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/smile.gif)
तुलना ही होतच असते. त्यासाठी मुद्दाम वेगळेपणा दाखवायची गरज नसते पण वेगळे काहीतरी करून दाखवणे गैर नाहीच.
वेगळेपणा
सहमत.
कदाचित हे वेगळेपण जपण्यासाठीच किंवा आपल्यावर देखिल 'मनमर्जी' चा आरोप होइल ह्या भितिने/किंवा अधिक खुलेपणातून इथले चालक पुरेसे संपादन करत नसावेत असे वाटले, एवढे करुनदेखिल बोम्बा मारणारे मारतच आहेत, तेंव्हा वेगळेपणाची अपेक्षा न ठेवता जे 'योग्य' वाटते ते करणे इष्ट. आणि कदाचित तुम्ही ह्या लेखात तेच थोडे-बहूत सांगायचा प्रयत्न केला आहे.
संपादन-कार्य कितिही वेळखाउ असले तरी ते करणे अति-गरजेचे आहे असे मी इथे परत नमूद करू इच्छितो.
वेगळे.
अगदी नव्याने प्रदर्शित होऊ घातलेल्या संस्थळावरही तेच नेहेमीचे यशस्वी कलाकार पाहून बरे ही वाटले अन नाहीही.
बरे यासाठी, की इथे तरी जालीय वय सारखे होऊन त्याच त्या काथ्याकूटात बरोबरीने भाग घेता येईल.
नाही यासाठी की त्याच त्या पूर्वग्रहांचे गाठोडे 'तिकडून' इकडे येईल.
हा या ठिकाणी मी दिलेला पहिला प्रतिसाद.
मला काय वेगळे वाटले ते लिहीतो.
इथे आल्यानंतर ३-४ गोष्टी घडल्या.
एकतर 'बरोबरीने भाग' घेण्याची माझी अपेक्षा पूर्ण झाली. बरोबरीने म्हणजे, जुन्या जाणत्यांच्या ज्ञानाशी/अनुभवाशी बरोबरी नव्हे, तर बरोबरीचा मित्र म्हणून 'पार्टी'त सामावला गेलो. सिनियर लोकांनी स्वतः मैत्रीचा हात पुढे केला. मी केलेल्या सूचनांबद्दल मॉड्सनी दखलही घेतली. काही सूचना जसे कलादालन अंमलातही आल्या. एकंदरीतच मला छान वाटू लागले इथे.
मग हे स्थळ वाढावे म्हणून मी काय केले?
मी लिहीता झालो. अन जे लिहीले ते इथे सोडून कुठेही प्रसिद्ध केले नाही. ज्या धाग्यांत पब्लीक पोल अपेक्शित आहे असे धागे उदा. मोबाईल कोणता घेऊ? हे ४ ठिकाणी पेस्टवलेत तर हरकत नाही. असे मला वाटते.
चर्चेत सकारात्मक भाग घेणे अन प्रत्येक धागा किमान वाचणे हे करतो.
अजूनही काही सूचना करता येतील वेगळेपण वाढविण्याच्या. पण तूर्तास अचानक पळावे लागत असल्याने बाकी नंतर.
अवांतरः
धाग्याची किती वाचने झाली याचा इंडिकेटर देता येईल तर बरे.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
वेट अॅण्ड वॉच
अजून वाट पहायला हवी असे वाटते.
श्रेणीदान हा प्रकार नवीन आहे आणि चांगला वाटतो आहे. (मी मराठीवर प्रतिसादाला नकारात्मक श्रेणी देण्याची सोय होती पण सकारात्मक देण्याची नव्हती असे वाटते). त्याचा उपयोग कसा होईल हे पाहून त्याची परिणामकारकता ठरवता दिसून येईल.
एकच लेख सर्व संथळांवर एका वेळी येणे कधी कधी वाईट असले तरी सहसा चांगले वाटते. याचे कारण हा 'तोच' लेख आहे हे तो लेख त्याच वेळी आलेला असेल तर सहज कळून येते तो काही दिवसांनंतर आला तर तसे कळत नाही. तोच लेख आहे असे कळले तर दोन्हीकडे/तिन्हीकडे उघडण्याची तसदी घ्यावी लागत नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
Also Ran
Also Ran या प्रकारची लोकांची भावना होऊ नये असे वाटते. तेच लिखाण इतरत्र पोस्टणे : दुसर्या धाग्यावर हा काथ्याकूट भरपूर झालाय ऑलरेडी.
पण मला तरी वाटतं, की लिहीणारे तेच लोक सगळीकडे. अन बरीच टायटल्स तीच तीच. मग कशाला ढीगभर सायटी उघडा? (आपल्या ब्राऊझरमधे) असा विचार न लिहिते लोक करतात. म्हणजे फक्त वाचण्यासाठी आलेले लोक.
फार कमी धागे असे आहेत की २-३ ठिकाणी साईटच्या टोन नुसार वेगळी चर्चा घडून येते. उदा. तो दारिद्र्यरेषेला ३२ रु. रोज वाला धागा. वेगवेगळ्या साईट्सवर वेगळे विचार ऐकायला मिळाले. पण हे चर्चांबाबत होते.
ललित, कविता इ. सगळीकडे त्याच वाचायला मिळत असतील, तर त्यासाठी ५ वेगवेगळ्या साईट्सवर का जावे लोकांनी? (या प्रकारच्या लेखनावरील प्रतिक्रियांचा उपयोग लेखकास पाठबळ मिळणे अन हुरुप येणे इतकाच असतो. त्यासाठी, या धाग्यांना फक्त स्टार्स शिवाय, किती लोकांनी वाचला, हे जर कळले, तरी छान वाटेल. किंवा आवडले/नाही आवडले. असे सिम्पल लाईक्/डिसलाईक जरी ठेवता आले तरी चालेल. या गोष्टींचा माझ्यासारख्या नवीन लिहीणार्यांना भरपूर उपयोग होतो.)
सगळीकडे तेच पहायला/वाचायला मिळतेय, तर ही साईट Also Ran in competition असेच होईल.
***
इथला ट्यार्पी वाढविण्यासाठी मी करीत असलेली अजून एक गोष्ट.
मोकळा वेळ असताना जर मला 'उपस्थित सदस्य' यादीत अनोळखी अन न लिहीणारा आयडी (माझ्या दृष्टीने) दिसला, तर मी खरडीत जाऊन त्यांना 'हाय' करून येतो. मला वाटते याचा चांगला उपयोग होतो.
माझ्यापुरतं तरी, ही माझी फेव्हरिट साईट आहे असं मी ठरवून घेतलंय. अन माझ्यापरिने मी या सायटीला बळ मिळावं म्हणून प्रयत्न करणारच आहे. (मी इतर सर्व म.सं. चा सद्स्य ऑलरेडी आहे. मिपावर माझं सभासदत्व टेक्निकली अडकलं होतं ते इथे ओळख झाल्यावर पैसाताईंनी स्वतः लक्ष घालून मिळवून दिलंय.)
***
एक सूचना अजून.
नवीन रजिस्टर झालेला सदस्य / वाचक आल्याबरोबर त्याला एकाद्या डीफॉल्ट धाग्या/पानावर जायला लागेल असे करावे. जिथे त्याचे ऐसीअक्षरेवर मनापासून स्वागत आहे. इथे सहभागी होण्याची विनंती. लवकरच तुमची आमची मैत्री होईल, जनरल नॅविगेशनल हेल्प, इथे वेगळे काय पहायला/वाचायला मिळेल? इ. व सदस्य न होता नुसती गेस्टबुकात काही सूचना/नोंद करता येईल असे काही करता आले तर चांगला परिणाम होईल असे वाटते. (नवीन वाचकास सद्स्यत्व न घेता आलो, तर प्रत्येक वेळी इथे हाच 'वेल्कम' धागा पाहून मग अनुक्रमणिकेत जावे लागते. एकून ३ क्लिका. हे पाहून 'फुकट सदस्यत्व' २ उंदिरटिचक्यांत घ्यावे असे वाटू लागेल. याचा उपयोग नक्कीच होईल.)
याच धाग्यावर उपस्थित मॉड्स अन माझ्यासारख्या सद्स्यांनी लक्ष ठेऊन नव्या लोकांनी टंकिलेल्या शंका, सूचनांना त्वरित प्रतिसाद दिला तर फार सकारात्मक परिणाम होतो. (हे माबो वर आहे. मला गेल्यागेल्या मॉडरेटरनी वेलकम केलेले होते. तिथे मी सदस्यत्व न घेता बरेच वाचले, अन नंतर इथे लिहीलं, तुम्ही सगळे एकमेकांना ओळखता का? मला ताबडतोब उत्तरही आले, अन असे फक्त दिसते, तुम्ही सामील झालात की तुमचीही ओळख होईल लवकरच. असेही सांगितले गेले.)
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
सहमत
नवीन सदस्याला एका स्वागताच्या धाग्याला नेणे ही सूचना चांगली आहे. चार लोकांनी या, बसा, पाणी हवे का, विचारले की बरे वाटते. नक्की कुठे सुरुवात करायची हा प्रश्न ही सुटतो. उपक्रम वर तसे धोरण आहे की नाही माहित नाही, पण नवीन कोणी आले की कोणी ना कोणी 'उपक्रम वर स्वागत, अजून लिहा' वगैरे लिहितं. पाटील साहेब आणि मी तेथे आसपास एकाच वेळेला जॉइन झालो - त्यांच्या पहिल्याच दणदणीत प्रतिसादाला खूप प्रोत्साहन मिळालेले पाहून मला ही हुरूप आला.
चौकशीतील आपुलकी
"चार लोकांनी या, बसा, पाणी हवे का, विचारले की बरे वाटते."
~ हे अगदी खरे आहे. बुजरेपणाही नाहीसा होतो अशा अगत्यामुळे. संस्थळावरच नव्हे तर अगदी आडगावच्या एस.टी.स्थानकावरदेखील "कुठून आल पाव्हणं? कुणाकडं जायचंय ?" असं न विचारताही चौकशी झाली की भर उन्हाळ्यातही गारव्याची झुळूक येते. नाव घेणे योग्य नाही, पण काही संस्थळावर नवीन सदस्याचे असे काही स्वागत (?) होते की, त्याला वाटावे कुठून दुर्बुद्धी झाली आणि मराठी संस्थळावर आलो. काहीवेळी मजा म्हणून ठीक आहे, पण त्याचे रुपांतर क्रूर (वा डेलिबरेट) चेष्टेत होण्या अगोदर संपादक मंडळाने तिथे हस्तक्षेप करणे अगत्याचे बनते.
~ साहित्य (मग ते कोणत्याही भाषेतील असो वा प्रकारचे असेल) हा एकमेकाला जोडणारा चांगला दुवा आहे असे मला जाणवत आहे. यात आवडीनिवडीपेक्षा होणार्या चर्चेमुळे अमुक एक लेखक वा तत्संबंधी साहित्य मिळवून त्याचा आनंद घेण्याची उर्मी जागृत होते हे मी अनुभवले आहे. रोचना यानी लिहिलेल्या "फेलुदा" या धाग्यावर झालेल्या चर्चेची आजही मला आठवण आहे. तिच गोष्ट मुक्तसुनीत यांच्या ताज्या "दिवाळी २०११" धाग्याबाबत. निव्वळ त्यानी उल्लेख केला म्हणून मला "मुक्तशब्द" सारखा देखणा आणि तितकाच वाचनीय अंक घेण्यास उद्युक्त केले. हा निखळ आनंद सहजगत्या तेव्हा मिळतो, ज्यावेळी साहित्यप्रेमी सदस्य (आवडीत मतभेद असले तरी) या विषयावर भरभरून लिहितात.
ऐसी अक्षरे अॅडमिननी ही बाब लक्षात ठेऊन या विषयावर सातत्याने नसले तरी ठराविक काळानंतर लेखन येत राहील हे पाहिल्यास त्याचा संस्थळाच्या वाढीसाठी नक्कीच उपयोग होईल.
अशोक पाटील
तुम्ही
तुम्ही मला अजून 'हाय' केलेले नाही.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
इथेच
हाय
खातोआय मीन कर्तो-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
"सहसा मत न मांडणार्या
"सहसा मत न मांडणार्या सदस्यांचा सहभाग अपेक्षित."
असे लिहूनही आतापर्यंत अशा एकाही सदस्याचा प्रतिसाद नाही, एवढे अधोरेखित करीत आहे.
बाकी नंतर.
किंचित प्रतिकुल असणारे
किंचित प्रतिकुल असणारे प्रतिसाद लगेच झाकणार्यांना, कोंबडं झाकलं तरी सुर्य उगवायचा राहत नाही ही म्हण ठाऊक नसावी. संकेतस्थळ यशस्वी कसे व्हावे ह्याचे प्रामाणिक आत्मपरीक्षण न करता सामुहिक लोकशाही ह्या गोंडस नावाखाली विशिष्ठ लोकांची कंपूबाजी चालू ठेवल्याने इथे कुणीही जास्त वेळ टिकणार नाही.
ऐसीवर वेगळे काय? - हिरव्या
ऐसीवर वेगळे काय? - हिरव्या रंगाने नटलेले स्थळ![Smile](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/smile.gif)
अमोल केळकर
मला इथे भेटा
अमोल,
मला तर तिरंगा दिसला बुवा!
भगवा, पांढरा अन हिरवा?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
बरंच काही बोलून
बरंच काही बोलून, मांडून झालंय या धाग्यावर. मराठी संस्थळावरचे काही कॉमन सभासद सगळीकडे दिसून येतात आणि त्यात गैर वाटावं असं काही नाहीय. प्रश्न आहे माझ्या सारख्या सभासदांच, जे अमावस्या पौर्णिमेला उगवतात. ऐसी अक्षरेच्या स्थापनेनंतर दोन-तीन दिवसांनी सभासद झालो, महिना उलटून गेला तरी चार- पाच प्रतिसाद या पलीकडे फारशी प्रगती झालेली नाही. बहुतेक वेळी प्रवासात असताना एखादा विषय सुचतो पण त्याच वेळी लॅपटोप उघडून लिहिणं अशक्य असतं. वीकेंडला झोपा काढण्यात जाम इंटरेस्ट - त्यामुळे कोणी किती लेख टाकले, चर्चा कशा घडतायत, प्रतिसाद कसे मिळतात या गोष्टी फारशा महत्वाच्या वाटत नाहीत. ( काही लेख, चर्चा वाचून झोप येते तो भाग वेगळा :bigsmile: ).
मला स्वतः ला हलकं-फुलकं वाचयला आवडतं. तत्वज्ञान, कविता यांच्या फंदात पडत नाही. आवडतं लिखाण म्हणजे चित्रपट समीक्षा. मला वाटतं इथे पहिल चित्रपट परीक्षण बहुतेक मृत्युंजय यांनी लिहिलं असावं. काही दिवसा पूर्वी परीकथेतील राजकुमारांनी दोन-तीन चित्रपटांची परीक्षणं लिहिली- ती मला आवडली, पण धाग्यावर जाऊन प्रतिसाद मी दिला नव्हता. याच आळशीपणामुळे त्याच त्याच सभासदांचे धागे, प्रतिसाद आले तर काही नवल नाही.
अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो- संस्थळाचे चालक/मालक, व्यवस्थापन, मॉडरेटर्स ( आणि काही हेकट सभासद ) यांच्या विषयी असलेली पूर्वग्रहदुषित किंवा म्हणूया प्रतिकूल/अनुकूल मतं. ह्या मुळे देखील नवीन सभासदांनी जॉईन न करणं, किंवा त्या सभासदांच्या धाग्यांवर प्रतिसाद न देणं ह्या बाबी देखील असू शकतात. इथे मात्र व्यवस्थापन, मॉडरेटर्स यांचा रोल खूप मोठा आहे. इथल्या व्यवस्थापनाची इतर संस्थळावर काय पुण्याई आहे मला माहित नाही आणि जाणून घेण्यात स्वारस्य नाही, पण जेव्हा अपेक्षित रिझल्ट मिळत नसतील तर थोडेफार इमेज बदल नक्कीच करावेत कि ज्याच्यामुळे संस्थळ वाढीस लागेल. शेवटी व्यवस्थापन vs सभासद यांच्या समजुतीवर किंबहुना समजूतदार वागणुकीवर यश अवलंबून आहे. नाहीतर संस्थळाचा ब्लॉग होण्यास फारसा वेळ लागणार नाही.
महिन्याभरात Top list मध्ये नाव यावं इतकी फास्ट प्रगती ऐसी अक्षरे कडून करणं चुकीचं आहे किंवा बरीच वर्ष मुरलेल्या इतरांसोबत तुलना करू नये असं वैयक्तिक मत आहे.
श्रेणी पद्धत वगळता, व कौलाची
श्रेणी पद्धत वगळता, व कौलाची सुविधा सोडता मला मायबोली/मनोगत/मिसळपाव व या संस्थळात फारसा जाणवण्याइतका फरक वाटला नाही. किंबहुना सोईसुविधा इथे जास्त आहेत असे वाटले.
मात्र, संस्थळाचे भविष्य काय हा प्रश्न स्वतःला विचारल्यावर श्रेणीपद्धतीच्या व तदनुषन्गाने कर्ममुल्य/पुण्य या केवळ एकमेव गोष्टीकडे लक्षवेधावे म्हणून ही पोस्ट केली असे.
त्या संदर्भातील, वरील चर्चेतील मोजके उल्लेख घेतले आहेत. व त्यावरील माझे भाष्य लिहीले आहे.
१) राजेशः ४. संपादकांचा दृष्टिकोन - इथे येणारे केवळ त्रास द्यायला येतात, असं गृहित धरण्याऐवजी बहुतांश लोक चांगल्या हेतूने येतात हे गृहितक आहे. जो काही खोडसाळपणा होईल त्यावर एका मर्यादेपर्यंत श्रेणीसुविधेने नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आहे. >>>>>> गृहितक चांगले आहे, पण माझा अनुभव असा की श्रेणीपद्धतीने माझ्या मुल्यान्कनाच्या क्षमतेवरच नियंत्रण आणले गेले त्याशिवाय माझे प्रतिसाद सदैव झाकलेले रहातील याची खात्री विशिष्ट सम्पादकान्नी केली. सबब मी प्रतिसाद देणे थाम्बविले.
२) खाजगीवाले: ह्या प्रतिसादाला कैच्याकै श्रेणी देणारा जो कोण भ्याड सहसंपादक आहे त्याने ही श्रेणी का दिली ते उघड बोलून दाखवावे. छुपेपणाने श्रेणी देण्याचा मजा फक्त कंपूला घेता यावा ह्याचा अजुन दुसरा वस्तुपाठ नाही. बहुतेक लोकांनी ऐसीकडे सुरुवातीनंतर पाठ फिरवण्याचे हे एक महत्वाचे कारण आहे. तसेच संकेतस्थळ फ्लॉप होण्यामागचे ते एक महत्वाचे कारण आहे. <<<<<< पाठ फिरविण्याचे हे संभाव्य शक्यतेचे कारण गम्भिरपणे घेतले पाहिजे असे माझे मत.
३) १२३४: काही बिचारे अपमानास्पद वागणूक (हे खरे आहे, कुणाबद्दल विचाराल तर संपर्कातून कळवेन) मिळूनसुद्धा इथे येत राहतात. तरी त्यांच्याबद्दलचा दुजाभाव संपलेला दिसत नाही. >>>> यान्नी, काय प्रकारची अपमानास्पद वागणूक व कुणाला,हा तपशील इथे दिला नाहीये, मात्र हा संदर्भ धरुन, मी म्हणू शकतो की माझ्या पोस्ट्स ना जी वागणूक मिळाली ती निदान मला तरी अपमानास्पदच वाटलि.
४) अशोक पाटीलः फक्त ती 'श्रेणी" चे चक्र अजूनही कित्येकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. त्यात अडकलेले सदस्य प्रतिसादापासून स्वतःला आता दूर ठेवीत आहेत की काय असे चित्र निर्माण होत आहे. <<<< होय, मी स्वतःला प्रतिसाद देण्याच्या मोहापासून दूर ठेवतोय कारण कोणत्याही प्रतिसादाला विनाकारण किम्बहुना कट केल्याप्रमाणे कधीही विनाकारणच मायनस श्रेणी मिळेल, सान्गता येत नाही.
याचबरोबर, मी आधीची काही संस्थळे का सोडलि ते सान्गतो, कदाचित उपयोगी/मार्गदर्शनपर वाटावे.
१) मनोगतवर माझा सदस्य क्रमांक सतराशेसाठ. त्यासाली पानिपत झालेले, त्यावरुनच सतराशेसाठ उपद्व्याप हा वाक्प्रचार रुढ झाला असावा, तर एका प्रसंगात मनोगतवर माझेही पानिपत झाले. "इंद्रजिमी जुंभपर.... शेर शिवराज है" हे मराठी शिवाजीवरील हिंदी काव्य मी बर्याच प्रयत्नाने मिळवुन तिथे टाईपले, तर ते हिन्दी आहे म्हणून अप्रकाशित केले गेले. त्यानन्तर तिकडे फिरकण्याचे माझे धाड्स झाले नाही.
२) खर तर मी कौतुकाने गेलेलो मिसळपाववर, पण तेथे वापरल्या जाणार्या/वापरू देत असलेल्या भाषेमुळे मी तेथुन लौकरच लाम्ब झाले. हे म्हणजे "मायबोली पेठी" वातावरणातुन एकदम कुठेतरी भलतीकडेच (कुठे ते सान्गत नाहीये मुद्दामच
) पडल्यासारखे वाटू लागले होते.
३) काही कारणाने मायबोलीवर "अनुल्लेख" वा कम्पुबाजीचे प्रयोग सातत्यपूर्णरित्या झाले, पण भरीव सदस्य सन्ख्येमुळे तेथे ते तितकेसे अवघड गेले नाही. शिवाय, येथिल श्रेणी पद्धतीसारखी डायरेक्ट सुरी फिरविणारी अनुल्लेखाची धार तेथे नव्हती. पेशल नमस्कार्/रामरामचा जन्म या अनुल्लेखातुनच झालेला. पण आजही मी तिथेच रमतो हे ही खरे.
वरील बाबीन्चा विचार व्हावा.
वरील उदाहरणातुन त्या त्या संस्थळ चालकान्ना वा त्यान्च्या सभासदान्ना दुखवायचा हेतू नाही, तर केवळ मला जाणवलेले ते फक्त मांडले इतकेच.
फक्त ती 'श्रेणी" चे चक्र
फक्त ती 'श्रेणी" चे चक्र अजूनही कित्येकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. त्यात अडकलेले सदस्य प्रतिसादापासून स्वतःला आता दूर ठेवीत आहेत की काय असे चित्र निर्माण होत आहे.
हेच सर्वांनी ओरडुन सांगितले तरी ह्यांना कळणार नाही. बसलेत श्रेण्या देण्याचा पाचकळपणा करीत. श्रेण्यांचा मूर्खपणावर तोडगा आणि गुर्जींच्या अतिवावर आणि सुमार विडंबने ह्यावर अंकुश ह्या दोन गोष्टी घडल्याशिवाय काहीही सुधारणा होणे शक्य नाही.
प्रामाणिक मत :-
कंपूबाजी ? नाह ! इथे कंपूबाजी नाही. इथे आहेत 'सो कॉल्ड स्वतःला हुच्चभ्रु समजणारे काही लोक'
मग आम्ही ठरावीक धागेच कसे उघडतो, ठरावीक लेखकांची नावे वाचूनच धागे कसे उघडतो, आम्ही 'सामान्यांपासून' कसे वेगळे आहोत इ.इ. दाखवण्याची धडपड चालू असते.
असो...
तू धागा काढला आहेस म्हणून प्रामाणिक मत मांडले.
अर्थात हे सगळे सहन न होणार्यांना वाचनमात्र राहण्याचा पर्याय उपलब्ध आहेच.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
तुम्हालाही उच्चभ्रु बनायचे
तुम्हालाही उच्चभ्रु बनायचे असेल तर गुर्जींना व्यनि पाठवा. तुमच्यात खरेच स्पार्क असेल तर व्यनितुन विनामुल्य मार्गदर्शन करतात म्हणे. इथे कशाला रडताय?
(अवांतर आईशप्पथ मला असला व्यनि आला तर मी व्यनि सुविधा कायमची बंद करेन)
व्यनी ?
तुम्हाला बर्या सगळ्या गावभरच्या बातम्या असतात हो![Smile](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/smile.gif)
![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
बाकी व्यनीच कशाला ? आमची त्यांना फोन करायची देखील ऐपत आहे. आणि गुर्जी हे बिकांचे खास मित्र असल्याने कदाचीत पुढे मागे ते स्वतःचा परदेशातून मला फोन करून मार्गदर्शन करू शकतील
आपण अंमळ गंडलेले आहात काय ? आपल्या नावाप्रमाणेच आपण आपली बुद्धीमत्ता खाजगी ठेवाल तर आंतरजालावर अनेक उपकार होतील.
हे म्हणजे नागड्याने 'उद्या मला रेमंडस मिळाला तर मी केळीची पाने लावणे बंद करेन' असे म्हणण्यासारखे आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
ती श्रेणी देण्याची पावर कशी मिळेल कुणी सांगेल का?
ती श्रेणी देण्याची पावर कशी मिळेल कुणी सांगेल का?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
माझ्याकडे आहे.
पण मला ती वापरता येत नाहीये. तुम्हाला हवी असेल तर ट्रान्स्फर देऊ काय मनोबा?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
तुम्हाला ती का वापरता येत
तुम्हाला ती का वापरता येत नाहीये बुवा?
------------------------
घणघणतो घंटानाद
आमाला आहे ब्वॉ पावर! आणि
आमाला आहे ब्वॉ पावर! आणि अर्थातच आम्ही ती ट्रोलांना खाऊ घालण्याच्या विधायक कामासाठी वापरतो.
तारांकित!
गंमत म्हणून एक धागा काढला आणि स्वतःच त्याला ५ तारे दिले.![Smile](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/smile.gif)
जमलं.
सोपय की स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायला.
आता आणखी कुणा दोघांनी रेटिंग देऊन ५ चे ४ तारे केलेत.
चलता है.
पण स्वतःच्याच धाग्याला स्वतःलाच पंचतारांकित करत येणं ही गोष्ट काही बरी वाटत नाही.
हेच
म्हणूनच वापरता येत नाही म्हटलो.
स्वत: काढलेल्या धाग्यावरील प्रतिसादांना श्रेणी देता येत नाही.
तसेच स्वतःच्या धाग्याना तारे देता येऊ नयेत अशी सोय करता आली तर बरे.
अन अगदीच चांगला वा फार वाईट प्रतिसाद दिसला तरच वापरायची इच्छा होते. उगा फक्त 'सर्वसाधारण' अशी श्रेणी देऊन कसे चालेल?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
अजून काही.
पहिल्या प्रतिसादाला प्रतिप्रतिसाद मिळाल्याने इथे लिहितो आहे. तसंही पहिल्यात काय वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहोत ते सांगितलं इथे तुम्हाला नावडलेल्या गोष्टींविषयी टिप्पणी करायच्या आहेत.
१. संकेतस्थळावरील लेखनात नावीन्याची कमतरता.
आत्ताच मी घेतलेल्या कौलाच्या आकडेवारीकडे बघितलं. पंधरा मतांची सरासरी काढली तर त्यातून ५२% मूळ लेखन झालं असा निष्कर्ष निघतो. थोडक्यात अडिचशेपैकी सव्वाशे धागे फक्त याच संस्थळावर निघाले. आता याची इतर संस्थळांशी तुलना कशी होते पाहू. इतर संस्थळांसाठी अर्थातच असा सर्व्हे घेणं त्रासदायक ठरेल. पण मी जो वरवर अभ्यास केला त्याचा निष्कर्ष असा आहे की बहुतेक संस्थळांवर सुमारे ५० ते ६० टक्के मूळ लिखाण होतं, बाकीचं इतरत्रही प्रसिद्ध होतं. उपक्रमावर (६० टक्के मूळ लेखन)आत्ता पहिल्या पानावर २५ लेख दिसतात. ते गेल्या तीन आठवड्यांत आलेले आहेत. त्यापैकी १० इतरत्र प्रसिद्ध झालेले आहेत. मायबोलीवरच्या (सुमारे ५० ते ५५ टक्के) गद्य २५ पैकी १४ धागे इतरत्र प्रसिद्ध झालेले आहेत, कवितांपैकी २५ पैकी ८ इतरत्र झालेल्या आहेत. इतरही कदाचित झाल्या असतील, मला पुरेशी माहिती नाही. मिसळपाववर (अंदाजे ६० टक्के) हे प्रमाण काढणं थोडं कठीण आहे कारण गेल्या महिन्याभरात अनेक धागे आलेले आहेत, व तिथे प्रकाशनाच्या तारखेप्रमाणे लेखन मांडलेलं नसतं. पण माझ्या एकंदरीत अनुभवावरून तिथेही बरंच सामायिक लेखन येतं. हे सगळं बघितल्यावर पुरेसं युनिक लेखन न येणं हे ऐसी अक्षरेचं वेगळेपण नाही. मला वाटतं पुरेसं या शब्दाची व्याख्या स्वतःसाठी प्रत्येकाने तपासून बघितली पाहिजे.
आणखीन एक नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तारांकित लेखांमध्ये केवळ ऐसीअक्षरेवर येणाऱ्या लेखनाचं प्रमाण खूपच जास्त - ७३% आहे. याचा अर्थ दोन प्रकारे लावता येतो - एक म्हणजे केवळ इथे आलेलं लेखन सरस आहे. दुसरी शक्यता अशी की वाचक इथे नवीन दिसणारं लेखन अधिक रस घेऊन वाचतात व त्याला भरभरून प्रतिसाद देतात.
२. मौजमजेचे धागे नसणार्या लेखांवर मौजमजेचेच प्रतिसाद दिसणे किंवा मौजमजेचे धागे इतर विभागांत प्रसिद्ध होणे.
हेही ऐसीअक्षरेचं वैशिष्ट्य नाही. अवांतराला थोडा वाव द्यायचा पण वहावू द्यायचं नाही, याची मर्यादा घालणं सोपं नाही. प्रत्येक संस्थळ आपापला बॅलन्स साधतं इतकंच म्हणता येईल. तो कुठचाही बिंदू साधला तरी कोणालातरी तो डाव्या बाजूला आणि कोणालातरी तो उजव्या बाजूला वाटणार.
३. श्रेणीसुविधेचा न केला जाणारा वापर -
खरा प्रश्न असा आहे की धाग्यांना तारका देण्याचा जो अपुरा का होईना प्रयत्न होतो तो पुरेसा आहे की नाही. सर्वाधिक तारांकित ३० धाग्यांची यादी पहावी. तुम्ही जर त्यातल्या निम्म्यापेक्षा अधिक धाग्यांबद्दल सहमत असाल तर ही प्रक्रिया कार्य करते आहे असं म्हणायला हरकत नाही. यापेक्षा सुधारणा करता येईल का? अर्थातच हो, पण एका मर्यादेपर्यंतच. कारण बहुतेक कोणाचीच सर्वोत्तम ३० ची यादी एकमेकांशी जुळणार नाही. तसंच प्रतिसादांना श्रेणीविषयीही. जर कोणी २ किंवा ३ थ्रेशोल्ड वापरला तर त्याला वाचायला मिळणारे प्रतिसाद चांगले असतील का? उत्तर माझ्यामते खात्रीलायक हो आहे. तुम्ही करून पहा. सगळेच चांगले प्रतिसाद वाचायला मिळतील का? याची खात्री नाही. तिथे तुम्ही म्हणता तसा अधिक वापर व्हायला हवा. ८० पेक्षा अधिक लोकांना धाग्यांना तारे व प्रतिसादांना श्रेणी देण्याची सुविधा आहे. लोकांनी ती वारंवार वापरावी असं मनापासून वाटतं. प्रत्येक धाग्याला १० ते १५ मतं मिळाली तर नीरक्षीरविवेकाचं काम खूप परिणामकारक होईल.
हेही ऐसीअक्षरेचं वेगळेपण नाही, कारण बहुतेक संस्थळांवर ही सुविधाच नाही.
४. चांगल्या लेखांना हवा तसा प्रतिसाद न मिळणे -
हेही ऐसीअक्षरेचं वैशिष्ट्य नाही. इतर संस्थळांवर हे होताना अनेकदा पाहिलेलं आहे. पुन्हा प्रश्न असा आहे की हे ऐसी अक्षरे वरच अधिक प्रमाणात होतं का?
तुम्ही मांडलेल्या वरच्या सर्व मुद्यांकडे पाठ फिरवणं हा हेतू नाही. या सर्वच बाबतीत सुधारणा व्हाव्यात अशी इच्छा आहे, काही बाबतीत तरी करता येतील अशी आशा आहे. फक्त चर्चाप्रस्तावाच्या शीर्षकात ऐसी अक्षरेच्या 'वेगळे'पणाचा उल्लेख आहे त्यामुळे बेंचमार्क करून त्रुटी नक्की किती कमी, किती अधिक आहेत हे दाखवण्यापुरता हा प्रतिसाद.
वेगळा मुद्दा
ज्या संस्थळांची तुलना होत आहे (मायबोली वगळून) ती संस्थळे चालक स्वखर्चाने/कुठल्याही प्रकारे बाह्य आर्थिक उत्पन्न न मिळवता चालवत आहेत. त्यामुळे अशा संस्थळांवर खूप काही वेगळे पहावयास मिळेल असे संभवत नाही. याचे कारण चालक स्वतः तंत्रज्ञ असण्याची शक्यता कमी आहे आणि बाह्य तंत्रज्ञ आणण्यासाठी पैसा हवा. दुसरे म्हणजे अधिक सुविधा केवळ तंत्रज्ञाच्या जोरावर देता येतील असे नाही तर त्यासाठी इतर काही लायसन्स्ड सॉफ्टवेअर/सर्वर स्पेस घेणे इत्यादि करावे लागेल, जे स्वखर्चाने चालवल्या जाणार्या संथळावर होणे कठीण.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
या विषयावर एवढा विचार होतो
या विषयावर एवढा विचार होतो आहे आणि ते सुद्धा एवढ्या लवकर त्यावरून मला असे वाटते की या संस्थळाचे भवितव्य उज्वल आहे. जर मौजमजचे धागे इतर ठिकाणी टाकले नाहीत तर मला वाटते ही प्रकिया लवकर होण्यास मदत होईल. ज्या प्रकारची मौजमजा चालते त्याला खरोखरच एवढे खपून हे संस्थळ चालवायची गरज नाही असे माझे मत आहे.... कुठेही एखादा ग्रूप उघडून ही मौजमजा संबधितांना करता येईल. चांगले लिहावे आणि चांगले वाचावे असे एकच उद्दीष्ट ठेवले तर संस्थळाला मोठे व्हायला वेळ लागेल पण जेव्हा होईल तेव्हा ते चांगल्या प्रकारे तग धरू शकेल हे निश्चित.
माझ्यापूरते म्हणायचे झाल्यास, मी जेव्हा लिहीन तेव्हा इतरत्र प्रकाशीत न झालेले लेखन येथे टाकेन. तसेच ते १५ दिवसांनी माझ्या ब्लॉगवर टाकेन.
स्वगत :अधिक काय करू शकतो बरे..............
जयंत कुलकर्णी,
Contradictions do not exists ! If you find any, check your premises !
संपादक आणि सदस्य
"मौजमजे" चे संस्थळ अशी पहिल्याच भेटीत ओळख होणे हे त्या संस्थळाच्या सुदृढ वाढीच्या दृष्टीने घातक ठरेल. सदस्य संख्या जास्त झाली म्हणजेच आपण रात्रंदिवस कष्ट करून, प्रसंगी खिशाला खार लावून उभे केलेले संस्थळ यशस्वी ठरले अशी समजून करून घेणे संचालकांना/मॉडरेटर्सना कधीच आवडणार नाही, हे जितके खरे तितकेच हेही खरेच की अमुक एका कारणामुळे [वा पॉलिसी मॅटरमुळे] सदस्यांत नाराजी उमटत चालल्याचे दिसून येत असेल तर त्या पॉलिसी (पॉलिसीं) चा फेरविचार करणे विचारांती संस्थळाच्या वाढीच्या दृष्टीने उजवे ठरेल. इथल्या सदस्यांसाठी नावीन्यपूर्ण ठरत असलेल्या "पुण्य", "श्रेणी", "स्टार मानांकन" आदींचा एक सर्वसामान्य सदस्य या नात्याने जेव्हा मी आढावा घेतला त्यावेळी असे दिसले की काही सदस्यांच्या अत्यंत निष्पाप (वा निरुपद्रवी म्हटले तरी चालेल) वाटणार्या प्रतिसादांनादेखील "लो लेव्हल" [उदा. 'निरर्थक, कै च्या कै'] समजले जाते आणि त्यांचे प्रतिसाद नेहमी झाकोळून गेलेले आढळतात. हे योग्य की अयोग्य ठरविणे माझ्या हाती नक्कीच नाही, आहे ते मॉड.टीमकडे. म्हणजे 'अ' या व्यक्तीने दिलेले प्रतिसाद (आणि आता झाकोळून गेलेले) विषयानुरूप होते की नव्हते हे अधिकृत टीम-सदस्याने पाहणे गरजेचे आहे. कुणी मुद्दाम 'अ' ची खोडी काढत असेल तर तसे करणार्या सदस्याच्या त्या वृत्तीचे कॅन्सरमध्ये रुपांतर न होऊ देणे हे संस्थळाच्या वाढीच्यादृष्टीने हितावह ठरेल.
संपादक मंडळाकडून अजून एक न झालेली गोष्ट म्हणजे 'धागा वाचनमात्र' करणे. वादाने विषय फुलतो हे जरी मान्य असले तरी त्या वादाचे रुपांतर व्यक्तिगत चिखलफेकीकडे जाण्याचे प्रकार घडत जाणे अपरिहार्य आहे हे संस्थापकांचा या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव विचारात घेता त्याना मान्य असेलच काहीवेळी 'धागा वाचनमात्र' करावा जेणेकरून वाढती कटुता टाळू शकते. [कालच्या 'शरद पवार प्रकरणा' मुळे इथे आणि अन्य संस्थळावर घटनेवर भाष्य करताना काही सदस्यांच्या भाषेचे जे प्रकार वाचायला मिळाले, तिथे खरेतर त्या त्या संपादकांनी लागलीच कैची चालविणे क्रमप्राप्त होते. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्या'चा मुद्दा महत्वाचा आहे यात दुमत असू नये, पण ज्यावेळी सामाजिक सभ्यता नावाचा प्रकार विचारार्थ आपण घेतो त्यावेळी संपादकांनी त्या स्वातंत्र्याचा अतिरेक केला जात नाही हे पाहणही नितांत गरजेचे असते]. सुदैवाने 'ऐसी अक्षरे' च्या महिन्याहून अधिक झालेल्या वाटचालीत 'धागा वाचनमात्र' करण्याइतपत वेळ आलेली नाही हे कबूल, पण तसे होण्याची शक्यता गृहित धरलेली केव्हाही चांगलेच. असे एकदोनदा झाले की, मग सदस्याचीही रुळावरून घसरू पाहणारी गाडी सावरते.
वरील एका प्रतिसादात श्री.जयंत कुलकर्णी म्हणतात त्याला अनुमती देतानाच थोडा बदल करून असेही म्हणेन "सदस्यानेही चांगले लिहावे आणि चांगले वाचावे असे उद्दीष्ट ठेवले तर त्याच्या आणि संस्थळाच्याही दृष्टीने ते चांगले लक्षण ठरू शकेल." संस्थळाची वाढ म्हणजे स्वतःच्या सांस्कृतिक जीवनाचीही ती एक चांगली वाढ ठरू शकते हे लक्षात घेतल्यास दोन्ही पक्षी हे माध्यम प्रभावशाली होईल.
अशोक पाटील
+१
हेच म्हणतो.
अन तुम्ही लिहील्याने धीर आला म्हणून पुढचे टंकतो-
ही श्रेणी देण्याइतपत पुण्य माझ्याकडे जमा होण्यापूर्वी अन नंतरची माझी गम्मत सांगतो.
आधी मला श्रेणी देता येत नव्हती तेंव्हा मी हिरिरीने त्याविरोधात बोललो, अन त्यासोबतच बघू तरी खरंच अमुक प्रकारे वागल्याने श्रेणी देण्याची 'पावर' मिळते का? खरेच माझ्यासारख्या तिर्हाइतास हे संपादक लोक 'लोकशाही' म्हणून 'पॉवर' देतात, की फक्त सांगताहेत? असं म्हणत 'पुण्य' कमवायला लागलो. या कालावधीतले माझे काही प्रतिसाद विषयाच्या जागी मी स्वत:च 'अवांतरः -१' वै "स्कोर" देऊन लिहिलेले आहेत.
श्रेणी देण्याची पॉवर मिळाल्यानंतर मी पहिली रिक्वेस्ट केली, ती म्हणजे स्वतःच्या धाग्यावरील प्रतिसादांना श्रेणी देता येऊ नये. त्यानुसार किमान मला तरी माझ्या धाग्यांवर आलेल्या इतरांच्या प्रतिसादांना श्रेणी देत येत नाहीये. (त्यापूर्वी माझ्या धाग्यावरील इतरांच्या प्रतिसादास श्रेणी देता येत होती.)
त्याचबरोबर गोची ही झाली, की नक्की काय श्रेणी द्यावी? हे समजेनासे झाले. ती 'पॉवर' मिळूनही मी ऑलमोस्ट न वापरल्यासारखीच आहे. उगा, खोडसाळ, भडकाऊ आदी श्रेणी मी देत नाही. खरंच हसू आलं तिथे १-२ विनोदी, व १-२ ठिकाणी माहितीपूर्ण/रोचक अशी श्रेणी दिलेली आहे, जिथे मला तो प्रतिसाद तसा वाटला. बाकी उगाच कुणाची उणीदुणी काढ्ण्यात ते 'टूल' वापरावं असं वाटत नाही. Who am I to judge A's opinion about B's actions/writings? That too without knowing either A or B, Their personalities, or their intentions or the contexts??
या प्रतिसादानिमित्ताने पुन्हा एकदा, वरील विश्लेषणा आधारे म्हणू इच्छितो, श्रेणीदान क्षमता ही जरी इथली वेगळेपणाची खूण असली, तरी ती मतदानाच्या हक्काप्रमाणे एकतर सर्वव्यापी केल्यास छान होईल, किंवा फक्त लिमिटेड संपादकांकडे ठेवली तर. हे मधलं सहसंपादक पद जरा त्रासदायक होतंय. एकतर सर्वांना मतदानाचा अधिकार असावा, किंवा फक्त 'पॉलिसी एन्फोर्समेंट केडर' ला- संपादकांना. म्हणजे कमीत कमी पोटदुखीचे मोठे कारण तरी कमी होईल.. किंवा तिसरी आयडिया करता येईल, जी टेक्निकली कठीण असावी बहुतेक : जसे प्रत्येकास आपल्या कोणत्या प्रतिसादास काय श्रेणी आली हे बघता येते, तसे ती श्रेणी कुणी व केंव्हा दिली ते बघता यावे.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
एकदम मनातल बोललात. तुमचे
एकदम मनातल बोललात.![Smile](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/smile.gif)
तुमचे बघुनच मी देखिल माझ्या पोस्टच्या विषयात निरर्थक वगैरे श्रेण्या आधीच द्यायला सुरुवात केली होती. नन्तर कण्टाळून बन्द केले.
>>>>> Who am I to judge A's opinion about B's actions/writings? That too without knowing either A or B, Their personalities, or their intentions or the contexts?? <<<<
हे सगळ्यात महत्वाचे आहे. याच दृष्टीने विचार करता, मी माझ्या अनुभवसिद्धतेनुसार व भविष्य जोखण्याच्या मूळच्या प्रवृत्तीनुसार श्रेणी पद्धतीबद्दलचे माझे मत थोडक्यात मान्डले होते की हे म्हणजे मागुन लपुन येऊन टपली मारुन गेल्यागत वाटते, दुसरीकडे हे ही लिहीले होते थोडक्यातच की कोण श्रेणी देतय हे किमान मॉडरेटर्स ना देखिल कळतय की नाही, ते कळावे. हे अगदी पहिल्या चारआठ दिवसात लिहील्याने त्यावर विरोधी मतान्चा गदारोळ उठला होता असे स्मरते,
याचाच अर्थ वरील वाक्यात आपण जो उल्लेख केलात कॉन्टेक्स्ट चा, त्याच्या मी लावत असलेल्या अर्थाप्रमाणे (कदाचित ते चूकही असेल) की एखाद्याला जे सान्गायच आहे ते जर मला काहीही कारणाने पुरेसे आकलनच झाले नसेल तर मी त्याला निरर्थक वा भडकावू ठरवावे का? माझी वर उल्लेखिलेली "मते" 'प्रतिक्रिया" या निरर्थक्/भडकावू ठरविल्या गेल्या होत्या. आणि आता एक महिना उलटल्यानन्तर किमान आपले पुढील मत तशा शब्दात नसले तरी जवळपास तसेच आहे असे वाटते.
>>>>>किंवा तिसरी आयडिया करता येईल, जी टेक्निकली कठीण असावी बहुतेक : जसे प्रत्येकास आपल्या कोणत्या प्रतिसादास काय श्रेणी आली हे बघता येते, तसे ती श्रेणी कुणी व केंव्हा दिली ते बघता यावे. <<<<
असो.
नो हार्ड फिलिन्ग्ज आयदर साईड प्लिजच!
तुलना करू नये
एवढ्या लवकर कोणत्याही गोष्टीवरून निष्कर्ष काढणे किंवा "मागे वळून पहाताना" छाप प्रतिक्रिया देऊ नयेत असं वाटतं. संस्थळाची त्याची वाढ एखाद्या मुलासारखी नैसर्गिक रीत्या होऊ द्या. हळूहळू स्वतःची ओळख मिळत जाईलच. अगदी मायबोली सारखं संस्थळ झालं तरी ते कोणत्या तरी पहिल्या सदस्यापासून सुरू होऊन इतक्या वर्षात आताच्या स्वरूपात स्थिर झालं आहे. इतर उपक्रम किंवा मनोगतबद्दल मला काही माहिती नाही, पण मिसळपाव वाढीच्या तिसर्या टप्प्यात आहे तर मीमराठी दुसर्या टप्प्यात आहे. ऐसी अक्षरेचं आताच रोप लावलंय. त्याला फुलं फळं का आली नाहीत, केव्हा येतील म्हणून काळजी करायचं कारण नाही. सगळं ठीक आहे,फक्त धीर धरा.
है शाब्बास!
मुद्याचं बोल्लात पैसातै!
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
टिकलीएवढं जग
मुळात मराठी संवादस्थळांचं जग इतकं टिकलीएवढं आहे की त्यात लिखाणाची एक्स्क्लुझिव्हिटी किंवा 'उसकी कमीझ मेरी कमीझसे सफेद कैसी' छापाच्या तुलना फारशा रोचक किंवा कळीच्या वाटत नाहीत. या इवल्याशा जगात विविध संवादस्थळ संचालकांनी किंवा सदस्यांनी खर्या किंवा डुप्लिकेट आय.डींमागे लपून एकमेकांची उणीदुणी काढणं अनेक ठिकाणी चालताना दिसतं; बहुसंख्य ठिकाणी ते आवडीनुसार चालवून घेतलं जातं, प्रोत्साहित केलं जातं आणि गैरसोयीनुसार त्यावर कात्री चालवली जाते. ते सर्व एक प्रकारचं कूपमंडूकत्व वाटतं. जगात करण्यासारख्या इतक्या गोष्टी असताना यातल्या क्षुद्र राजकारणावर वेळ किंवा उर्जा घालवणं तर अजिबातच पसंत नाही. त्यापेक्षा Let a thousand flowers bloom या नात्यानं म्हणेन की अजून संवादस्थळं येऊ देत; सदस्यांना जिथे जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथे तिथे त्यांना खुशाल वावरू दे; वेगळेपणा, वेगळी ओळख वगैरे हळूहळू दृग्गोचर होणार्या गोष्टी आहेत. सदस्यांच्या परिपक्वतेशीच त्याचा मुख्यतः संबंध आहे - आंतरजालावर वावरणारा मराठी समाज जितका प्रगल्भ (किंवा अप्रगल्भ) तितकीच संवादस्थळंही. परस्परांविषयीचा तुच्छतावाद मात्र जितका टाळू तितकी संवादस्थळं निकोप होतील.
- चिंतातुर जंतू![Worried](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/worried.gif)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
+१
तंतोतंत सहमत. धन्यवाद.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
चिंजंशी सहमत.
आई वडील भाऊ भावंडं या त्याच त्याच माणसाचा किती दिवसांनी कंटाळा येऊन संवाद बंद होतो? आला एकच धागा किंवा एकच प्रतिसाद चार ठिकाणी तर काय सर्वर तूंबून काही प्रॉब्लेम होणार आहे का? वेगळेपण म्हणजे "१००% वेगळं" असायला हवं का? असे अनेक प्रश्न मनात आले.
-Nile
बरोबर, किम्बहुना मी तर त्याही
बरोबर, किम्बहुना मी तर त्याही पुढे जाऊन म्हणतो की जी व्यक्ति या अशा संस्थळान्वर निरपेक्ष, नि:पक्षपातीपणे, सुसंस्क्रुतपणे, संयमाने, परस्परांविषयीचा तुच्छतावाद टाळत भरीव कार्य करीत राहू शकते/रहायचा प्रयत्न करते, त्या व्यक्तिला तिच्या कौटुम्बिक खाजगी आयुष्यात यशस्वीपणे सर्व वयोगटातील सर्व नात्यातील सर्वान्ची आवडती म्हणून जगण्यात कसलीही अडचण उरत नाही, कारण तन्टाविरहित एकदुसर्याकरताचे आयुष्य जगण्याचे बाळकडू या च्याटरुम्स मधे मिळते असे माझे मत.
चपलांचा वापर??
( चपलांचा वापर!! ) ही तर टोकाची प्रतिक्रिया![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
इतक्या उशीरा (आठ दिवसांनी)
इतक्या उशीरा (आठ दिवसांनी) पन्नासहून जास्त प्रतिसाद आल्यावर लेख काढला?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मुख्य कारण
नितिन जी, किती दिवसांनी वा किती प्रतिसाद आल्यानंतर प्रतिसाद काढला गेला यापेक्षा प्रियालीताईंना तो का काढावा लागला यावर शक्य झाल्यास संशोधन झाल्यास त्यांच्या तशा निर्णयामागील कारणमीमांसा तुम्हाआम्हाला तसेच संपादक मंडळालादेखील विचार करायला लावील असे (मला तरी) वाटते.
पर्सनली आय डू अॅडमायर स्टडिअस नेचर ऑफ मेम्बर लाईक प्रियाली, ऑल्वेज, अॅण्ड दॅट्स द सोल रीझन फॉर मी टु फील सम काईंड ऑफ शॉक ऑन अकाऊंट ऑफ हर अॅक्शन रिगार्डिंग रीमूव्हिंग द आर्टिकल मॅटर+रीस्पॉन्सेस.
अशोक पाटील
लिबरल
'ऐसीअक्षरे'चे मॉडरेटर्स लिबरल आहेत, अधिकाधिक पारदर्शकता असावी असा आमचा सर्वांचा आग्रह आहे आणि कोणी चुका दाखवत असेल तर आमची सर्वांची त्यांना सामोरं जाण्याची तयारी आहे. याच धाग्यावर स्वतःचे मत आणि 'ऐसीअक्षरे'च्या मॉडरेटर्सतर्फेही राजेश घासकडवी यांनी (कदाचित लेखापेक्षा जास्त लांबीचे) प्रतिसाद दिलेले आहेत. 'ऐसीअक्षरे'च्या वाचक आणि लेखकांनी व्यक्तिगत संपर्क, खरडी, व्यनि, प्रतिसाद, लेखांमधून 'ऐसीअक्षरे'वर केलेली टीका सकारात्मक पद्धतीनेच घेण्यात येत आहे. किंबहुना अशी टीका करता येण्याएवढं खुलं वातावरण 'ऐसीअक्षरे'वर असावं यासाठी मॉडरेटर्स जागरूक आहेत. स्वतःवर झालेली टीका पचवून, स्वतःचीच खिल्ली उडवण्याइतपत सर्व मॉडरेटर्स आणि संकेतस्थळही प्रगल्भ आहे.
संकेतस्थळांची तुलना व्हावी का होऊ नये हा वेगळा मुद्दा असेल, पण लोकशाही, खुलं वातावरण या बाबतीत मला तुलना करायची नाही. तेव्हा इतर संकेतस्थळांवर काय चालतं हा मुद्दा इथे वैध नाही, कोणा एका मॉडरेटर अथवा संकेतस्थळ चालकांच्या छोट्या-मोठ्या चुका, उणीवा सदस्यांनी नजरेस आणून द्याव्यात अशी विनंती.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लेख काढायचे कारण कळले नाही.
व्यवस्थापकांकडून, प्रतिसादकांकडून चांगल्याप्रकारे प्रतिसाद येऊनही लेख काढायचे कारण कळले नाही.
-Nile
म्हंजे?
चपला घालून निघालात का काय?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हे असे बऱ्यापैकी चर्चा झालेले
हे असे बऱ्यापैकी चर्चा झालेले धागे उडवण्यामागे काय उद्देश असावा ? आता मुळातला धागाच गेल्याने प्रतिसादांना फार अर्थ राहत नाही. मग खाली पान पान भर प्रतिसाद देणार मूर्ख म्हणावेत काय ?
स्वगत :- बरे झाले इथे लिहिले नव्हते, नाही तर जास्त चिडचिड झाली असती
दुसरे स्वगत :- ही TRP वाढवायची ट्रिक आहे काय?
अवांतर :- स्वसंपादनावर व्यवस्थापनाचे काय विचार आहेत हे ऐकायला आवडेल.
इथे प्रश्न विचारला आहे म्हणून इथेच उत्तर देते
प्रतिसादांना अर्थ नाही असं मी तरी म्हणणार नाही, संस्थळचालकांची मतं मांडणारे राजेशचे प्रतिसाद आणि इथे काय चांगलं, काय वाईट आहे हे सांगणारे सर्व लिहीत्या सदस्यांचे प्रतिसाद उपयुक्त आहेत. आत्तापर्यंत एवढं केलं आहे आणि यापुढे असं करा किंवा करू असे लिखाण निश्चितच निष्फळ नाही. संस्थळाचे लेखक आणि वाचक संस्थळासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या सूचनाही.
उदारमतवादी दृष्टीकोनामुळे लेखकांना स्वयंसंपादन करता यावे यावर विश्वास आहे. एखाद्या काना, मात्रा, वेलांटी, विरामचिन्हासाठी संपादकांना हाळी देण्याची गरज पडू नये. साध्या किंवा थोड्या मोठ्या टंकनचुका, किंवा आंतरजाल या माध्यमाचा फायदा घेऊन, आलेल्या प्रतिसादांप्रमाणे धाग्याचे रूप बदलता येईल असे लिखाण करणे शक्य असणे या गोष्टी स्वयंसंपादनाचे फायदे आहेत. त्याबरोबर जे तोटे होणार त्याची तयारी असावी आणि आहे, उदा. हा धागा.
संस्थळचालक राजे नाहीत, सदस्य प्रजा नाहीत आणि त्यांचा प्रतिपाळ करण्याचीही आवश्यकता नाही* असा मॉडरेटर्स (संस्थळचालक) यांचा दृष्टीकोन आहे.
प्रतिसादाला प्रतिप्रतिसाद आल्यास पहिला प्रतिसाद संपादित करता येत नाही ही वापरल्या जाणार्या तंत्राची मर्यादा आहे, ती संस्थळचालकांची विचारसरणी नाही.
*व्यक्तिगत मानहानी, गलिच्छ, अर्वाच्य मजकूर काढणे वगळता
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
स्वयंसंपादनावर संपूर्ण बंदी न
स्वयंसंपादनावर संपूर्ण बंदी न घालता लेखन केल्यावर १ ते २ दिवसांनी ते लेखन लॉक करता यावे ज्यामुळे भरपूर प्रतिसाद आल्यावर धागा काढता येऊ नये(काना, मात्रा, किंवा काही छोट्या-मोठ्या चुका १-२ दिवसात सुधारता येतातच). आलेल्या प्रतिसादाप्रमाणे मूळ धाग्यात बदल करता येऊ नये, परंतू धाग्याखाली पुरवणी मजकूर जोडता आला पाहिजे अशी सोय करता येईल का ते बघीतले पाहीजे. काही वेळेला सदस्य तडकाफडकी निर्णय घेतात (उदा. यशवंत एकनाथ ह्यांचा धागा). पण धागे उडण्याची वारंवारता वाढली तर असे उपाय करणे गरजेचे आहे असे वाटते.
अवांतर - हे मत कोण्या एका सदस्याला गृहीत धरून दिलेले नाही.
-अनामिक
क्षमा असावी
सदस्यांनी कृपया लक्षात घ्यावे की या धाग्यात केवळ माझे मत मांडले असल्याने ते उडवले आहे. अशाच प्रकारे मी माझे इतर प्रतिसाद, जेथे माझे मत मांडले होते ते उडवले आहेत. तरीही येथे या धाग्याचे शीर्षक आणि प्रतिसाद वाचून धाग्याचे स्वरूप लक्षात येते. ज्यांनी येथे प्रतिसाद दिले त्यांची मी अतिशय आभारी आहे. किंबहुना, काही नवीन लोकांनी येथे येऊन मत मांडावे असे लिहिल्याने ज्या नवीन लोकांनी येथे येऊन लिहिले त्यांचीही मी आभारी आहे.
हा धागा मी काढून टाकला याचे कारण अतिशय वैयक्तिक असून सदस्य, प्रतिसादकर्ते, संकेतस्थळ किंवा संपादक यांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. "मी" असा धागा टाकणेच चुकीचे होते.![Sad](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/sad.gif)
माझ्या या निर्णयामुळे ज्यांना त्रास झाला त्यांची मी मनापासून क्षमा मागते. क्षमा असावी!
अरे व्वा बरीच चर्चा झाली होती
अरे व्वा बरीच चर्चा झाली होती की पाच वर्षांपूर्वी...
आता सध्या काय परिस्थिती आहे?
साडेचार वर्षांच्या सदस्य
साडेचार वर्षांच्या सदस्य काळात कळलंच असेल की !!!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ऐसीचे प्रतिसाद एक गंमत आहे.
ऐसीचे प्रतिसाद एक गंमत आहे. श्रेणी कश्या दिल्या जातात, मला अजून तरी कळले नाही आहे.
कधी कधी प्रतिसाद निरर्थक म्हणून झाकले जातात आणि गंमत म्हणजे अश्या प्रतिसादावर प्रतिसाद हि दिले जातात.
काही विद्वान लोक प्रतिसाद का दिला ह्याचा विचार न करता त्या वर 'डोके फिरले आहे का" सारखे प्रतीप्रतीसाद हि देतात. पण एक मात्र खरे या प्रतिसादांवरून मानवीय स्वभाव हि कळतो. स्वत:च्या वैचारिक दृष्टिकोनाबाबत लोक किती पक्के आहेत हे हि कळते. प्रत्येक लेखाला वाचक आपल्या दृष्टीकोनातून प्रतिसाद देतात. खरंच प्रतिसाद देण्यापेक्षा वाचताना अधिक मजा येते. .
दिल्या प्रतिसादाबाबत वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. आपण काही देवमाणूस नाही कि आपल्या हातून चुकीचे प्रतिसाद दिल्या जाणार नाही.
बाकी माझ्या लेखनाला प्रतिसाद मिळाले नाही किंवा मला न रुचणारे प्रतिसाद दिले, किंवा कुणी गाढव किंवा मूर्ख म्हंटले तरी मी काही ऐसी सोडून जाणार नाही. लाथ मारून कोणी हाकलले तर गोष्ट वेगळी. बहुधा अशी वेळ येणार नाही हि अपेक्षा.