Skip to main content

इजराईल -इराण युद्ध

इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा.

इराण हा कट्टर इस्लामी देश आहे. इस्लामी जगाचे नेतृत्व मिळवण्यासाठी इजराईलचा संपूर्ण नाश करण्याची त्याची मंशा आहे. काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी व्यापक आर्थिक हितासाठी भारताशी संबंध दृढ केले आहेत. भारताचा मध्य आशियाशी होणारा व्यापार प्रामुख्याने इराणमार्गे होतो.

इजराईलने नेहमीच भारताला मदत केली आहे. कारगिल युद्ध जिंकण्यात इजराईलची मदत झाली होती. विविध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, युद्धास्त्रे इत्यादी भारताला इजराईलकडून मिळतात. नुकतेच इजराईलने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मानही दिला आहे.

या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्याने जगभरात महागाई वाढेल. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. इराण अणुबॉम्ब निश्चितपणे तयार करेल आणि त्याचा उपयोगही करेल. पुढील २० वर्षांत इजराईलचे अस्तित्व नामशेष होऊ शकते. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे.

विवेक पटाईत Tue, 03/03/2026 - 15:50

ज्यांनी स्वत:च्या देशातील लाखो लोकांना फासावर चढविले आहे, अश्या कट्टर जिहादी राष्ट्राला कुणीही समजवू शकत नाही. दुसरी कडे इजराईलचे अस्तित्व भविष्यात राहणार की नाही, हे ह्या युद्धाच्या निकालावर अवलंबून आहे. या शिवाय "सुपर पावर" भविष्यात सुपर पावर राहणार की नाही हे ही या युद्धाच्या निकालावर अवलंबून आहे.

'न'वी बाजू Tue, 03/03/2026 - 20:21

In reply to by विवेक पटाईत

या शिवाय "सुपर पावर" भविष्यात सुपर पावर राहणार की नाही हे ही या युद्धाच्या निकालावर अवलंबून आहे.

असे नोस्त्रोदामसकाकांनी सांगून ठेवलेले आहे काय?

सई केसकर Tue, 03/03/2026 - 19:19

इस्रायलचा नाश व्हायच्या आधी धनंजय माने यांचं डायबेटिसचं औषध मिळावं ही ईश्वरचरणी प्रार्थना..

सई केसकर Tue, 03/03/2026 - 20:38

In reply to by 'न'वी बाजू

आता इतक्या वर्षांचं इन्फ्लेशन वगैरे...शिवाय आज ब्रेंट क्रूडच $७०/बॅरल झालं. इस्लामी वर्चस्व हटवायची किंमत तर द्यावीच लागेल ना पुणेकरांना!

'न'वी बाजू Tue, 03/03/2026 - 21:02

In reply to by सई केसकर

...पुण्यावरील इस्लामी वर्चस्व हटविण्याची चिंता दिल्लीकरांना कधीपासून (नि काय म्हणून) पडू लागली, इतकाच प्रश्न आहे.

(शिवाय, त्यांचे मूळसुद्धा पुणेरी नव्हे. (नागपूर की कायसेसे ऐकून आहे.) अर्थात, पुणेरी लोकांच्या डोक्यांत इस्लामी वर्चस्वाच्या भीतीचे खूळ घुसवून देण्याची नागपूरकरांची परंपरा अंमळ जुनीच आहे, म्हणा.)

(बाकी, 'सदाशिव पेठेवरील इस्लामी वर्चस्व' वगैरे कल्पनांनी अंमळ महिरून वगैरे गेलो, हे नमूद करणे येथे प्राप्त आहे. चालायचेच.)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 04/03/2026 - 07:24

In reply to by सई केसकर

तो मित्र वारला तसं औषध वारलं नाही म्हणजे मिळवलं!

अमित.कुलकर्णी Wed, 04/03/2026 - 10:54

लेख नेहमीप्रमाणेच उत्तम!

२ मुद्द्यांविषयी माझी मते -

१. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. - "भारता"ने आपली राजवट तिथे स्थापन करावी. "अपॉरचुनीटी है, बेनिफिट ले सकते हैं." - हे यापूर्वी कुणालाही न सुचू शकणारे चतुर धोरण या वेळी अनुसरता येईल.

२. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. - विश्वगुरू असलेल्या भारताकडे का नाही बरे? "आमचे नेतृत्व करा" अशी गळ ते घालताना आम्हाला आत्तापासून दिसत आहेत.