दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२८ मार्च
जन्मदिवस : पहिलं चित्रात्मक पाठ्यपुस्तक बनवणारा शिक्षणतज्ज्ञ योहान कोमोनियस (१५९२), साहित्यिक मॅक्सिम गॉर्की (१८६८), भारतात स्त्रीवादी अभ्यासाची सुरूवात करणाऱ्या वीणा मजुमदार (१९२७), प्रोटॉनची अंतर्रचना शोधणारा नोबेलविजेता जेरोम फ्रीडमन (१९३०), अभिनेता अक्षय खन्ना (१९७५), अभिनेत्री चित्रांगदा सिंग (१९७६)
मृत्युदिवस : लेखिका, समीक्षक व्हर्जिनिया वूल्फ (१९४१), स्वातंत्र्य चळवळीतील पुढारी भाऊसाहेब रानडे (१९८४), चित्रकार मार्क शगाल (१९८५), 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप'चे एक प्रणेते, चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा (२००२)
---
राष्ट्रीय नौका दिन.
१७३७ : बाजीराव पेशवे यांनी मोगलांचा पराभव केला
१९१० : हेन्री फाबरने प्रथमच समुद्रावरून विमान उडवलं.
१९३० : काँस्टँटिनोपल आणि अंगोरा या तुर्की शहरांची नावं इस्तांबूल आणि अंकारा अशी बदलण्यात आली.
१९३३ : घातपातामुळे विमान पडण्याची पहिली दुर्घटना, प्रवाशाने विमानात आग पेटवल्यामुळे इंपिरियल एयरवेजचं विमान पडलं.
१९४२ : भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जपानमध्ये 'इंडियन इंडिपेडन्स लीग'ची स्थापना; त्यात 'आझाद हिंद सेने'ची मुळं होती.
१९५९ : चीनने तिबेटी सरकार बरखास्त करून तिबेट बळकावलं.
१९७९ : अमेरिकेत 'थ्री-माईल आयलंड' अणूदुर्घटनेत अणूइंधन अंशतः वितळलं, किरणोत्सारी रेडॉन वायू पसरला, जीवितहानी नाही.
१९९८ : सी-डॅकने पूर्ण भारतीय बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- अस्वस्थामा
- Rajesh188
प्रतिक्रिया
दमलो!!
नुस्ता स्क्रोल करोन दमलो
प्रतिक्रिया वाचून झाल्यावर देतो....
कैगा
छान आणि तितकाच विस्तृत परिचय आवडला. "मौज प्रकाशन" ने जयंत नारळीकरांपासून विज्ञान विषयाशी निगडीत असणार्या कथानकाना आपल्या प्रकाशन प्रेफरन्सेसमध्ये स्थान दिल्याचा आनंद झाला होताच. श्री.अरुण हेबळेकर यांची अशा विषयावरील ही कादंबरी जरूर वाचेन इतपत आता म्हणतो.
बाकी श्री.चेतन सुभाष गुगळे यानी निरिक्षण केलेल्या...."तिथे कर्मचारी वर्ग फारसा टिकत नाही. लोक येतात, प्रशिक्षण घेतात आणि दुसरीकडे बदली मागून घेतात. कारण : भीती. ’आदित्य’ च्या एकंदर रचनेमुळे तिथे येणारा प्रत्येक माणूस बिचकतच येतो आणि जातो तो सुटकेचा नि:श्वास टाकून. ही भीती निर्माण व्हायला राजकारणी आणि वर्तमानपत्रवाले सारखेच जबाबदार आहेत. गल्ली पासून दिल्लीपर्यंत प्रत्येकच जण दरवेळी आदित्य च्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करीत असतो..." या वातावरणाशी मी सहमत आहे. हा अनुभव माझ्या काही परिचिताना उत्तर कन्नड जिल्ह्याच्या 'कैगा' गावी कार्यरत असलेल्या भारत सरकारच्या 'न्यूक्लीअर अॅटोमिक पॉवर स्टेशन' संदर्भात आला होता. तिथे प्रत्यक्ष काय काम सुरू आहे वा तिथे येणार्याजाणार्यावर इतकी सीक्रसी फिल्टर्स का लावली जातात याची नीट कल्पना नसलेली पण विविध कामाची टेन्डर्स मंजूर झालेली ठेकेदार मंडळी दबकून ये-जा करीत. 'न्यूक्लिअर', 'अॅटोमिक एनर्जी', 'हेवी वॉटर', 'स्ट्रीक्ट ड्रेस कोड' असे एरव्ही सर्वसामान्याना भयचकित करणारे (कारण भोपाळकांड) शब्द सतत कानावर पडत. कार्यालय तसेच कर्मचारी निवासस्थाने आणि तत्सम विविध बांधकामाच्या गरजेसाठी लागणारे सीमेन्ट, सळी, गर्डर्स आदी सप्लाय करण्याचे ठेके ज्या आठदहा कंपन्यांना मिळाले होते व त्यांच्याकडून ट्रक वाहतुक परवाने ज्याना मिळाले होते त्यापैकी तिघाचौघांशी माझे अगदी एकेरी पातळीवरील संबंध होते. त्यांच्याकडून पुसटसे समजत असे की, पुढे पुढे कित्येकांनी ते सप्लाय कॉन्ट्रॅक्ट पूर्णही केले नाही. कारण मिडियातील सुरक्षिततेविषयी येणार्या विकृत बातम्यांनी ही मंडळीही बिचकून गेली होती. बाहेरच्या कंत्राटदारांची ही कथा तर मग प्रत्यक्ष साईटवर काम करणार्या तंत्रज्ञच नव्हे तर बाबू लोकांचीही तीच मानसिकता झाली असल्यास त्याना तरी कसा दोष द्यायचा ?
कैग्याप्रमाणेच आदित्यचीदेखील हीच परिस्थिती असणार.
अशोक पाटील
काय हो
काय हो, नविन संस्थळावर नविन लेखापासून सुरुवात करायची तर तेच लेख, ब्लॉग, मिपा, जालरंग, आणि इथे टाकलेत.
तुमच्यासारख्या चतुरस्त्र माणसाकडून ही अशी शिळोप्याची अपे़क्षा नव्हती.
------------------------
घणघणतो घंटानाद
रोचक कादंबरी
कादंबरीचा विषय वेगळा आहे. अशा तांत्रिक प्रश्नांवर बेतलेल्या, आणि तरीही मानवी संघर्ष दाखवणाऱ्या कादंबऱ्या कमी दिसतात. अशा कादंबऱ्यांतली पात्रं हाडामांसाची, खरीखुरी, जीवंत करण्यात लेखक यशस्वी झाला असेल तर ती वाचताना एक वेगळीच पार्श्वभूमी मिळते. मला एक आठवते ती म्हणजे अकरा कोटी गॅलन पाणी. कोळशाच्या खाणीतल्या दुर्घटनेवर आधारित होती ती.
कादंबरीच्या रसग्रहणापेक्षा हा सारांश अधिक वाटला. सगळी कथा, अगदी शेवटापर्यंत सांगू नये असा प्रघात आहे. शेवट सांगितला असल्यास लेखाच्या वर 'स्पॉइलर ऍलर्ट' द्यावा ही विनंती.
हे काय आहे?
दम लागला स्क्रोल करूनच. पुस्तकच वाचेन.
वाचकाला पुस्तकवाचनाकडे नेण्याचा डाव या दीर्घ लेखनात आहे की काय अशी शंका चाटून गेलीच.
इतकं संगणकावर वाचायची सवय
इतकं संगणकावर वाचायची सवय नाही. पण वाचतो.
धन्यवाद
(पूर्ण) सारांश दिल्याबद्दल, आता पुस्तक वाचायची गरज फारशी उरली नाही.
अतिशय सुरेख असे परिक्षण
या कादंबरीत अशी काही अद्भुत ताकद आहे की तुम्ही ती एकदा संपूर्ण वाचलीत की तुम्हाला अजुन एकदा तरी संपुर्णत: वाचल्याशिवाय पुन्हा खाली ठेवावीशी वाटत नाही
चेतन मित्रा,
हे अगदी अगदी खरे आहे.
हेबळेकरांची आदित्य वाचताना हा थरार मीदेखील पूर्णपणे अनुभवला आहे.
'आदित्य' चे अतिशय सुरेख असे परिक्षण लिहिले आहेस तू.
तुझ्या परिक्षणामुळे 'आदित्य' पुन्हा वाचल्याचा अनुभव मिळाला
धन्यवाद मित्रा.
’आदित्य’चा गाभा. गाभ्यापासून बारा आरे निघतात
यात थोडी अवांतर भर - आदित्य हे नाव त्या अणुभट्टीला देण्यामागे कारण हे आहे की त्या अणुभट्टीचे भारा आरे. भारतीय परंपरेनुसार आदित्यांची संख्या ही १२ मानली गेली आहे, त्यामुळे आदित्य हे नाव
आदित्य तुला जशी अतिप्रिय तशीच मला नारळीकरांची प्रेषित प्रिय आहे. वर्षातून १-२ पारायणे होतातच होतात
आदित्य गेल्या वर्षीच वाचली असल्यामुळे आदित्यची आठवण अगदी ताजी आहे.
तू आदित्यचे परिक्षण खूप छान लिहिले आहेस.
अशाच अजून सुंदर पुस्तकांची ओळख तुझ्याकडून व्हावी ही मनापासूनची इच्छा