'ऐसी अक्षरे'च्या यंदाच्या दिवाळी अंकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
कळवण्यात अतिशय आनंद होतो की, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या यंदाच्या दिवाळी अंक स्पर्धेत 'ऐसी अक्षरे'च्या नव्वदोत्तरी विशेषांकाला उत्कृष्ट ऑनलाईन दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळाला आहे. ऑनलाईन दिवाळी अंक पुरस्कारासाठी विचारात घेऊन नवा विभाग सुरू करण्याचे हे पहिलेच वर्ष आहे.
सर्व संपादकांचं, लेखकांचं, चित्रकारांचं, तांत्रिक आणि मांत्रिक कष्टकर्यांचं - आणि ऐसीकर वाचकांचं - मनःपूर्वक अभिनंदन!
पुरस्कार वितरण समारंभ बुधवार ३० मार्च रोजी संध्याकाळी ६:३० वाजता साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता, पुणे ४११०३० येथे होणार आहे. लेखक-समीक्षक संजय भास्कर जोशी यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल.
समारंभाला सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण. समारंभानंतर थोड्या गप्पाटप्पांना अजूनच आग्रहाचं आमंत्रण. :)
---
म.सा.प.चे संकेतस्थळ : www.masapapune.org
आजच्या दैनिक प्रभात मध्ये आलेली बातमी
महाराष्ट्र टाइम्समधली बातमी
बातमीचा प्रकार निवडा
फारच छान बातमी.
'ऐसी'परिवाराचे अभिनंदन. यात मालक, व्यवस्थापक/संपादक, लेखक आणि प्रतिसादकांचे अभिनंदन. दिवाळी अंक वाचला तेव्हा त्याचा दर्जा आवडला होताच. 'ऐसी'मुळे दर्जेदार लेखनासाठी एक व्यासपीठ सुलभरीत्या उपलब्ध झाले आहे.
जालावरचे लेखन कुठेही स्वतःचे म्हणून चिकटवण्याचा मार्ग कधीकाळी बंद होऊ शकला तर जाललेखन अधिक समृद्ध होऊ शकेल.
जबरदस्त बातमी. दिवाळी
जबरदस्त बातमी. दिवाळी अंकासाठी संपादक-व्यवस्थापक, लेखक, चित्रकार, डिझाइनर या सर्वांनीच प्रचंड मेहेनत घेतली. मेघनाने म्हटल्याप्रमाणे हा अंक व्यावसायिक (पैसे मिळवणारा) नसला तरीही दर्जाच्या बाबतीत इतर व्यावसायिक अंकांपेक्षा कुठेही कमी पडणार नाही उलट कांकणभर सरसच असेल यासाठी स्वतःचं आयुष्य सांभाळून जिवाचा आटापिटा केला. उत्तम कंटेंट मिळवणं हा पहिला भाग, पण त्यावर संस्करण करून तो देखण्या स्वरूपात मांडणं यासाठी प्रचंड कष्ट आवश्यक असतात. या दोन्हींचा समन्वय साधण्यासाठी आख्ख्या टीमने जे सतत जागरुकपणे प्रयत्न केले त्याचं हे फळ आहे.
सगळ्यांचंच अभिनंदन.
अभिनंदन
विशेष नोंद घेतली गेल्याबद्दल अभिनंदन.
आता एक शंका. पहिला क्रमांक सगळ्या दिवाळी अंकाला आहे की 'नव्वदोत्तरी' भागाला? हा भाग वेगळा काढून त्याची पीडीएफ केली आहे असे दिसले म्हणून पृच्छा. धाग्याच्या मुख्य लेखनामधून दोन्ही शक्यता जाणवतात. तसे असल्यास माझ्यावर माझेच पूर्वीचे लेखन सार्वजनिकरीत्या 'खाऊन' दाखवायची वेळ आहे असे म्हणता येईल कारण 'नव्वदोत्तरी' हा काय विशेष प्रकार आहे अशी कुशंका मज नतद्रष्टाला पूर्वी आलेली होती आणि मी ती उघडहि केली होती.
'नव्वदोत्तरी' भागात 'ऐसी'चा एकहि नियमित सदस्य उपस्थित नाही हे दिसत आहे. सर्वजण बाहेरचे विशेष विनंतीवरून आणलेले मान्यवर आहेत आणि त्यापैकी एकानेहि त्या लेखनानंतर 'ऐसी'कडे पुनः कृपाकटाक्ष टाकलेला नाही.
होका? तुमचा मुलगा पहिला आला!? वावावा..
एकूण किती लोक बसले होते परिक्षेला?
-- असले प्रश्न विचारणार्यांच्या मनात नक्की काय असते, त्याबद्दल मलाही उत्सुकता आहे.
मसापच्या संकेतस्थळाची लिंक आहे की दिलेली. त्यावर जाऊन शोधता येईल. शोधून तुम्हीच सांगा! बाकी मसाप म्हणजे गल्लीतील बाळगोपाळ साहित्यप्रेमी लायब्ररीचे संचालक मंडळ असावे असे वाटते.
बाकीच्यांचं माहीती नाही
बाकीच्यांचं माहीती नाही - "असले प्रश्न विचारणार्या"! - पण माझ्या मनात तरी '४ होते की ४०' ही ("कीतने आदमी थे? छाप ;) ) उत्सुकता आहे. आणि दुसरा/तिसरा कोण विचारायचं कारण म्हणजे अगदी चारच जरी असले तरी 'कोणते चार?' counts too - मग ते पारितोषिक देणारं मसाप असो अथवा गल्लीतील बाळगोपाळ साहित्यप्रेमी लायब्ररीचे संचालक मंडळ ! आता तुमचा पुढचा प्रश्न "अच्छा अच्छा, म्हणजे यावर तुमचा आनंद कीती ते ठरणार का?" येणार बहुदा ....sigh.....
त्या लिंकवर नाहीये म्हणून तर विचारतोय. पण म्हणजे तुम्हालाही नाही माहित तर. असूंद्या मग....
आठवणींच्या कुपिमधून
पीडीएफ फाइल बनवली ती काही सदस्यांनी प्रतिसादांतून मागणी केली म्हणून. (नाहीतर आळस करायचा विचार होता.) मसापला सांगताना, 'संस्थळावर या आणि अंक वाचा; कारण तेच मुख्य रूप आहे', असं काहीसं म्हटलं होतं.
--
मिसळपाव यांच्यासारखाच प्रश्न मलाही पडलाय. ऑनलाईन गट आधीपासून होता का, त्या गटात आणखी काही अंक होते का, त्या लोकांनी खरंच संस्थळावर येऊन अंक वाचला का पीडीएफ पाहिली, इत्यादी.
कल्पना नाही पण माझ्या मते
कल्पना नाही पण माझ्या मते मटाचा ऑनलाईन अंकही वेगळा निघतो, शिवय लोकप्रभा वगैरेही ऑनलाईन उपलब्ध होतात.
माझ्यासाठी, किती अंक होते यापेक्षा एक माध्यम म्हणून डिजिटल दिवाळी अंकाची दखल घ्यायला भाग पडेल असा अंक आपल्या संस्थळाने दिला याचं मोल एकुणच डिजिटल अंकांच्या वाढीसाठी मोठं आहे. ऐसीअक्षरेवर दिवाळी अंकात लिहिणार्यांना (जाहिराती न घेता व अंक मोफत असूनही) मानधनही देण्याची सुरूवात याच कल्पनेतून झाली होती की केवळ माध्यम वेगळं आहे म्हणून चांगलं लिहिणार्यांना मोबदला मिळू नये असं थोडंच आहे. अंकात अंतर्भूत लेखनाचा दर्जा उत्तम असणे महत्त्वाचे! या सगळ्याचा परिपाक असा अंक निघण्यात झाला ही आनंदाची गोष्ट.
ऑनलाईनका व्यवच्छेदक लक्षण क्या हय?
मटा, लोकसत्ता, मिळून साऱ्याजणी, साधना, इ. अनेक छापील अंक काही काळाने ऑनलाईन उपलब्ध होतातच. पण ते मूळ माध्यम नव्हे.
ऑनलाईन अंकामध्ये एखाद्या शब्दाला आपण दुवा जोडून देऊ शकतो, भारांकातल्या आदूबाळच्या कथेत क्लिकसरशी मिळणाऱ्या सहा शेवटांसारख्या वा मागच्या एका अंकात धनंजयच्या क्लिकहायकूंप्रमाणे गंमती करू शकतो, ते मटासारख्या अंकांत दिसते का? तर नाही. म्हणून ते अंक माझ्यामते सरसकट ऑलनाईन म्हणता येत नाहीत. अंकाचे संगणकीकरण करून जालावर चढवणे वेगळे नि जालावरच्या अंकाचे छापील स्वरूप उपलब्ध करून देणे वेगळे.
मस्त बातमी. संपादक मंडळ आणि
मस्त बातमी. संपादक मंडळ आणि अंकासाठी कष्ट घेणार्या सर्वांना धन्यवाद आणि अभिनंदन.
हा कार्यक्रम ८ पर्यंत चालण्याची शक्यता आहे का? कारण हिंजवडी वरुन निघुन पोचायला तितका तरी वेळ लागेल.
तिथे आलो तर मनोबा, चिंज आणि ऋ ला ओळखता कसे येइल? ( लाल रंगाचे शर्ट घालुन याल का सर्व? :p )
आटोपशीरपणा आणि वक्तशीरपणा
>> पण साडेसहाला सुरू होणार म्हटलंय म्हणजे सात धरायचे (डोळा मारत) पुढे तासभर तरी चालेलच असे धरले तरी आठ झालेच की!
कार्यक्रम वेळात सुरू करणं आणि आटोपशीर करणं ही साहित्य परिषदेची रीत आहे. त्यामुळे ७:३० पर्यंत कार्यक्रम संपूही शकतो. अर्थात, तसं झालं तर ७:३० वाजता आपापल्या मार्गी जातील ते ऐसीकर नव्हेत ;-) त्यामुळे तुमच्या परिचयातल्या एखाद्या ऐसीकराला फोन केलात, तर सगळे कुठे आहेत ते कळेलच.
कार्यक्रमास जाणार --अतिसंक्षिप्त/सूक्ष्म वृत्तांत
नमस्कार.
कार्यक्रमास ऐसीच्या व्यवस्थापनवाले उपस्थित असतीलच असा अंदाज.
आम सदस्यांपैकी मी जाणारे बहुतेक. ( माझे उपस्थित असण्याचे ९९% चान्सेस आहेत)
अजून कोण कोण येणारे ?
.
.
गब्बरच्या प्रतिसादास उत्तर --
बक्षिस मिळालं. प्रत्यक्ष रक्कम विशेष नव्हती. बक्षीस मिळाल्याचं अप्रूप हे रकमेहून कैकपट मोठं.पुण्यभूषण, व्यासपीठ ,पुरुष उवाच ह्या छापील अंकांना पारितोषिक. १६०+ अंकातून निवड करायची होती.जंतूंनी ऐसीतर्फे पारितोषिक स्वीकारलं. महंमद अझरुद्दीन १९९८ च्या काळात सिरिज जिंकल्याचं बक्षीस स्वीकारतानाही जितका कॅज्युअली स्वीकारायचा; तसेच भाव ह्यांच्या चेहर्यावर वाटले. अगदि कॅज्युअल. धन्य धन्य झालो ,कृत कृत्य किंवा यस्स्स कसं करुन दाखवलं वगैरे गांगुलीसारखे किंवा कोहली सारखे भाव नव्हते. पारितोषिक घेतल्यावर बाकी विजेते दहा पंधरा मिनिटं बोलले असतील प्रत्येकी. हे फक्त दोन-चार मिनिटं बोलले असावेत. ह्यांनी सांगितलं --
१. ऑनलाइन अंक म्हणजे आमचं संपादनही ऑनलाइन आहे. कुणी कॅनडा अमेरिका, पुणे-मुंबै इथे आहे तर कुणीनी थेट कोलकाता
२. एकूणात ऑनलाइन अंक ह्या प्रकाराची दखल घेतल्याबद्दल त्या सर्वांच्या वतीनं आभार
३. ऑनलाइन ह्या प्रकाराचं एक महत्व म्हणजे त्यांची "शेल्फ लाइफ" अधिक असते. जालावर अगदि २०१०, २०११ मधले अंकही शोधून वाचता येतात; लोक वाचतातही. दाद कळवतात. ( शिवाय बर्यापैकी संशोधन, शोधाशोध केल्यामूले व मान्यवरांचा सहभाग असल्यानं ) हय अंकांना संदर्भमूल्य प्राप्त होतं/व्हावं.
.
.
दोन मुद्द्यांचा उल्लेख ते करतील असं मला वाटलं होतं --
१. अंकाचा विचार करतानाच आम्ही ऑनलाइन स्वरुपात करतो. (हे ह्याच धाग्यात इतर प्रतिसादकांनी लिहिलेलं आहे.)धनंजय वगैरेंनी केलेले प्रयोग. (वेगवेगळ्या शेवटाच्या कथा किम्वा आवडलेल्या शब्दावरुन पुढचे कडावे/कविता वगैरे) म्हणजे एक माध्यम म्हणून आमेहे मुळात स्वतंत्रपणे त्याचा विचार करतो. ज्याप्रमाणे चित्रपट ह्या नंतर आलेल्या माध्यमात नाटकाशी कॉमन अशा काही गोष्टी आहेत; तसेच काही फरकही आहेत; काही अधिकची वैशिष्ट्यं बलस्थानंही आहेत. सिनेमा म्हणजे शूटिंग केलेलं नाटक नव्हे. ते एक वेगळं स्वतंत्र सादरीकरण आहे. त्याचप्रमाणे छापील आणी ऑनलाइन अंकात हा फरक आहे.त्यांनी उल्लेख केलेल्ल्या मुद्दा क्र१ मधून हे सूचित होत असावं,करायचं असावं हा अंदाज. पण इतकं सगळं अध्याहृत सगळ्यांनाच समजलं/जाणवलं असेल का असा प्रश्न मला आहे.
२. वाचकांची प्रतिक्रिया मिळत राहण्याची सोय. वाचक- लेखक ह्यांचं कमी झालेलं अंतर आणि उत्स्फूर्तता.
.
.
.
काही शक्यता --
१. हे मुद्दे त्यांनी उल्लेख केले असावेत पण मी विसरलो असेन.
२. त्यांनी उल्लेख केला पण तो सटल् असल्यानं मला जाणवला नाही.
अभिनंदन!
अभिनंदन!