दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१३ मे
जन्मदिवस : मलेरियाच्या जंतूंचा शोध लावणारे नोबेलविजेते रोनॉल्ड रॉस (१८५७), चित्रकार व शिल्पकार जॉर्ज ब्राक (१८८२), राष्ट्रपती फक्रुद्दीन अहमद (१९०५), लेखिका दाफ्ने द्यु मोरिए (१९०७), राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी (१९१३), नर्तिका बालसरस्वती (१९१८), समीक्षक भालचंद्र फडके (१९२५), समीक्षक गो. मा. पवार (१९३२), लेखक आर्मिस्टेड मॉपिन (१९४४), गायक स्टीव्ही वंडर (१९५०), संगीतकार आनंद मोडक (१९५१)
मृत्युदिवस : 'बकिंगहॅम पॅलेस'चा वास्तुरचनाकार जॉन नॅश (१८३५), अभिनेता गॅरी कूपर (१९६१), जाझगायक व वादक चेट बेकर (१९८८), लेखक आर.के.नारायण (२००१), नाट्यकर्मी बादल सरकार (२०११), छायाचित्रकार जगदीश माळी (२०१३)
--
१६३८ : दिल्ली येथील लाल किल्ल्याचे बांधकाम सुरू.
१८८८ : ब्राझिलमध्ये गुलामगिरीविरोधात कायदा अमलात आला.
१९४० : दुसरे महायुद्ध : जर्मन सैन्य फ्रान्सच्या भूमीवर. ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी पार्लमेंटमध्ये 'Blood, toil, tears, and sweat' हे आपले सुप्रसिद्ध भाषण केले.
१९५० : ब्रिटनमधील सिल्व्हरस्टोन येथे पहिल्या फॉर्म्युला वन स्पर्धेची सुरुवात.
१९५२ : प्रजासत्ताक भारताच्या पहिल्या संसदेचे (राज्यसभेचे) पहिले सत्र सुरू झाले.
१९५८ : 'वेल्क्रो'ची ट्रेडमार्क म्हणून नोंदणी.
१९६८ : फ्रान्समधील विद्यार्थ्यांच्या विद्रोही चळवळीला साथ देत कामगारांनी देशव्यापी संप पुकारला. आठ लाख विद्यार्थी आणि एक कोटी कामगार यांची ही युती अभूतपूर्व होती.
२००८ : जयपूर येथे बॉम्बस्फोट; १२ मृत
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- दोन गुलाबजाम
फतवा???
'आज रात्रीपासून' वगैरे???
(अवांतर: अशीच 'आज रात्रीपासून पंतप्रधान क्यान्सल' म्हणण्याची सोय पब्लिकला असती, तर किती बहार आली असती!)
(अतिअवांतर: काय 'गांधी सीरीज़' रद्द करून पुढेमागे 'मोदी सीरीज़' वगैरे आणण्याचा इरादा आहे काय?)
नवी बाजूंसाठी
हो ना!
कळले नाही
'मध्यरात्री फेज़ मॉड्यूलेशन अँप्लिट्यूड मॉड्यूलेशनमध्ये बदलेल' असे कायसेसे लिहिलेले आहे तिथे.
पण म्हणजे काय? आणि नेमके कसे? आणि कशासाठी?
आवरा!!! असला निर्णय घ्यायला
आवरा!!! असला निर्णय घ्यायला लैच दम लागतो. खूप लोकांच्या शेपटावर पाय...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हा प्रतिसाद अनुप ढेरेंना नाही
हा प्रतिसाद अनुप ढेरेंना नाही !!!
>>असला निर्णय घ्यायला लैच दम लागतो.
आणि पुरेसा रेमेडोके*पणासुद्धा !!!
रेम्याडोक्या असा शब्द ऐकला आहे त्याचे क्रियाविशेषण कसे बनेल ते अंदाजाने बनवले.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
२०१४ चे फतवे
असे फतवे मागे आरबीआयने काढलेले बहूदा.
http://indianexpress.com/article/india/india-others/rbi-to-withdraw-all-...
सगळ्या?
सगळ्याच की काही विशिष्ट सिरिजच्या?
सगळ्याच असतील तर कठीण आहे! पब्लिकला आता शंभर रुपयांच्या टोपल्या घेऊन शॉपिंग करायला लागणार बहुतेक!!
होय. सगळ्या. पुढल्या काही
होय. सगळ्या. पुढल्या काही दिवसांत बँक/पोस्ट इथे बदलून मिळतील असलेल्या नोटा. बरोबर आयडी फ्रूप पाहिजे फक्त.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कळलं नाही.
म्हणजे जुन्या सध्या प्रचलित असलेल्या ५००/१००० च्या नोटा बाद करून नवीन ५००/१००० च्या नोटा वापरात आणायचा प्लान आहे की ५००/१०००च्या नोटाच बाद करून जास्तीत जास्त नोट १००ची ठेवायचा प्लान आहे?
सर्व ५००/१००० चलनातून बाद.
सर्व ५००/१००० चलनातून बाद. लिमिटेड २०००च्या नोटा काढणार. (ज्यांचा रंग भयाण गुलाबी आहे.)
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
बाप रे गुलाबी? याइक्स.आम्ही
बाप रे गुलाबी? याइक्स.
आम्ही तर १५ पैशाला बबलगम घ्यायचो ब्वॉ आणि २५ पैशाला लहानशी दुचाकी सायकल भाड्याने घेऊन अर्धा तास चाल्वायचो. कसलं ग्लॅमर होतं त्या सायकलला.नंतर नंतर मैत्रिणींच्या भावाची जेंटस सायकल मधुन पाय टाकुन चालवली. शेवटी स्वतःची सायकल घेऊन कँपमधील लायब्ररीच्या दिवाळी-मे महीन्याच्या सुट्टीत वार्या केल्या.
नवा चेहरा
२००० रुपयांची नोट म्हणजे काळ्या पैशाला गांधी सोडून नवा चेहरा मिळणार तर! नबांशी एकमत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अदिती तै, तुम्ही टेक्सास मधुन
अदिती तै, तुम्ही टेक्सास मधुन ट्रंप बाबाला निवडुन दिल्याबद्दल धन्यवाद.
परचलित ५००/१००० च्य सर्व नोटा
प्रचलित ५००/१००० च्य सर्व नोटा रद्द होतील. नवीन प्रकारच्या (ज्यावर महात्मा गांधी आहेत) ५०० आणि २००० रु. चलनाच्या नोटा व्यवहारात आणल्या जातील. पण त्यांची संख्या आणि सर्क्युलेशनवर रिझर्व्ह बँकेची नजर असेल. सध्याचं पाऊल काळा पैसा आणि मुख्य म्हणजे बनावट नोटा चलनातून हद्दपार करण्यासाठी आहे. वित्त सचिवांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं की भारतीय अर्थव्यवस्था २०११ ते २०१६ या काळात ३०% ने वाढली, परंतु व्यवहारातील ५०० व १००० च्या नोटांचं प्रमाण १००% पेक्षा जास्त प्रमाणात वाढलं आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बनावट चलन फिरत आहे (ज्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात टेररिझम फायनान्ससाठी होतो). त्यावर आळा घालण्यासाठी हा उपाय.
बादवे २०००च्या नोटेचा रंग खरोखर भयाण आहे.
प्रश्न
आणि ह्याचा तोटा सामान्य लोकांना कितपत होईल, याबद्दल काही अंदाज आहेत का?
सामान्य लोक - तुमच्या-आमच्यासारखे किंवा आपल्याला निरनिराळ्या सेवा पुरवणारे, खोटं चलन वापरू नये हे मनापासून मान्य असणारे सगळेच लोक.
---
स्वीडनमध्ये रोखीने व्यवहाराचं प्रमाण, गेल्या ७-८ वर्षांच्या तुलनेत, २०%वर आलं आहे. त्यासंदर्भात गेल्या महिन्यात न्यूयॉर्करमध्ये प्रकाशित झालेला लेख -
Imagining a Cashless World
लेखातला हा भाग भारतासाठी फारच महत्त्वाचा वाटतो -
An Austrian woman, Sigrid, who was perched on a street corner, knitting, said that her Austrian pension had been locked. She’d been bouncing around various cities in Europe. Fortunately, she did not find the Swedes less liberal with their cash on the street than any other nationality she’d encountered, and she had managed to save money that she would use to buy a bus ticket elsewhere. “You won’t need a bank card?” I asked. Sigrid laughed. “No, no!” she said brightly. She was old and poor, and just the sort of person no one thinks of when imagining a thriving future, so I hoped that she was right.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आणि ह्याचा तोटा सामान्य
अजिबात तोटा होणार नाही. थोडा ४-५ दिवस त्रास होइल, पण तेव्हडा सहन केला पाहिजे. खरातर तेव्हडा सुद्धा त्रास होणार नाहीये. टुरीस्ट लोकांना थोडा होइल, पण ते ठीक आहे.
काल मुंबई मधे सोने काळ्याबाजारात ६०००० रुपये तोळ्यानी विकले म्हणे. म्हणजे ह्या उपायाचा थेट परीणाम होतोय हे स्प्ष्ट आहे.
म्हणे १३ लाख कोटींच्या नोटा आहेत बाजारात, त्यातल्या जितक्या परत येणार नाहीत, तितके डेफिसीट थेट कमी होइल म्हणे.
तोटा नव्हे त्रास
आणि ह्याचा तोटा सामान्य लोकांना कितपत होईल, याबद्दल काही अंदाज आहेत का?
अजिबात तोटा होणार नाही. थोडा ४-५ दिवस त्रास होइल, पण तेव्हडा सहन केला पाहिजे. खरातर तेव्हडा सुद्धा त्रास होणार नाहीये. टुरीस्ट लोकांना थोडा होइल, पण ते ठीक आहे.
माझ्या सोसायटीतल्या पाच वॉचमन आणि दोन झाडूवाल्यांना आम्ही नेहमीप्रमाबे ७ तारखेला चेक दिले. त्यांनी ८ तारखेला बँकेत जाऊन ते एन्कॅश केले. त्यातले सुमारे एक दीड हजार रुपये त्यांनी त्याच दिवशी खर्च केले. उरलेले रुपये आठ तारखेला त्यांच्याजवळ पाचशेच्या नोटांच्या स्वरूपात होते. काल सकाळी ते माझ्याकडे (कारण मी सेक्रेटरी आहे) आले. त्यांची वाण्याकडची देणी, इतर खर्च वगैरे करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. सोसायटीच्या पेटीकॅशमध्ये सुद्धा शंभराच्या नोटा वगैरे नव्हत्या. माझ्याकडे आणि इतर कमिटी मेंबर्सकडून काही कॅश जमा करून आम्ही तात्पुरते प्रत्येकी दीड दोनशे रुपये त्यांना दिले. माझ्याकडे सुद्धा आता पर्सनली दोनशेच रुपये आहेत. आजही एटीएम बंद आहेत. मला किरकोळ खर्चाच्या पैशांसाठी आज सुटी घेऊन बँकेत जाणे भाग आहे.
त्रास बर्यापैकी मोठा आहे.
काल पैसे बदलून द्यायला बँकांना परवानगी नव्हती हे ठीक. पण पैसे काढायला का बंदी होती ते कळत नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
एटीएमचं म्हणाल तर सॉफ्ट्वेअर
एटीएमचं म्हणाल तर सॉफ्ट्वेअर रिकॅलिबरेशन हे रिझर्व्ह बँकेने दिलेलं अधिकृत कारण आहे.
दुसरा एक प्रश्न असा की ९ तारखेला सर्व सरकारी ट्रेझरीजसुद्धा बंद होत्या. यात ट्रेझरीचा रोल काय असतो?
एटीएम चं बरोबर आहे. बँकेतून
एटीएम चं बरोबर आहे. बँकेतून कॅश काढायला का बंदी होती ते कळत नाही. आम्ही कॅश काढून आमच्या स्टाफला अॅडव्हान्स/लोन म्हणून देऊ शकलो असतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
त्रास बर्यापैकी मोठा
थत्ते चाचा - हे पेटीइश्युज आहेत. काहीच त्रास नाहीये. बर्याच लोकांची वाण्याकडे तशीही महिन्याची उधारी असते. नसली तरी नेहमीचा वाणी उधार नक्की देइल. नाहीतर सोसायटीच्या लोकांनी घरातले गहु तांदुळ द्यायला काहीच हरकत नाही.
काँग्रेस उगाचच नॉन इस्शुचा इश्यु करतीय. गांधींपैकी कोणी मेले की ३-३ दिवस बाजार बंद रहातात, तेंव्हा कसा पुळका येत नाही कोणाला वॉचमन लोकांचा?
३-३ दिवस ?
कोणता गांधी मेला तेव्हा ३-३ दिवस बाजार बंद होता? मो गांधींच्या वेळचं मला ठाऊक नाही. सं गांधी मेला तेव्हा (१९८०) बाजार अर्धा दिवससुद्धा बंद नव्हता. इं गांधी मेली (१९८४) तेव्हा एक दिवस बंद होता. रा. गांधी मेला तेव्हाही (१९९१) बाजार एकच दिवस बंद होता. शिवाय तेव्हा आम्हाला पुळका आलाच नव्हता हे कशाच्या आधारे ठरवले?
अडचण नॉर्मली आली नसती. जर आठ तारखेऐवजी १० किंवा १५ तारखेस हे घडले असते. जस्ट दॅट पगाराच्या तारखेशी ही घटना क्लॅश झाली.
>>काँग्रेस उगाचच नॉन इस्शुचा इश्यु करतीय.
काँग्रेस कशाचा इश्यु करतंय याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मी मला दिसलेल्या अडचणीविषयी बोलतो आहे.
शिवाय "आजच्या आज रद्द" या निर्णयाने नक्की काय फायदा झाला हे अजून कळलेले नाही. नोटा रद्द करण्याला माझा विरोध नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
शिवाय "आजच्या आज रद्द" या
शिवाय "आजच्या आज रद्द" या निर्णयाने नक्की काय फायदा झाला हे अजून कळलेले नाही. नोटा रद्द करण्याला माझा विरोध नाही.
"आजच्या आज रद्द" करून कोणत्याही प्रकारे काळ्या पैश्यांची विल्हेवाट लावता येणार नाही असा काहितरी प्रकार असावा. पुण्यातले सोनार दूकान (पी एन जी, कल्याण, रांका) रात्री २ -३ पर्यंत ऊघडे होते आणि सोन्याचा भाव ४५००० रुपये प्रती १० ग्रॅम इथपर्यंत गेला अशी वार्ता आहे. म्हणजे लोकांनी मिळलेल्या अवधीमधे सुद्धा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय.
घरी असलेल्या मोलकरीणींची काही तक्रार जाणवली नाही. माझ्या खिशातही फक्त एक दहाची नोट आणि बाकी ५०० च्या नोटा होत्या. घरी सुदैवाने काही १०० - ५० च्या नोटा मिळाल्या त्यावर काम चालवतोय.
दोन दिवस जरा त्रास होईल मान्य आहे, पण मोठा परिणाम साध्य होत असेल तर माझी ह्यासाठी तयारी आहे.
-अनामिक
पुण्यातले सोनार दूकान (पी एन
ह्या जुन्या रद्द झालेल्या नोटा घेऊन सोनाराला काय फायदा होणार?
सोनार बदलुन घेऊ शकेल ना?
सरकारकडुन, सोनार बदलुन घेऊ शकेल ना?
सरकारकडुन, सोनार बदलुन घेऊ
ग्राहकाला बाजारभावाने सोने विक्रीची पावती देउन तोळ्यामागे १०-२० हजार जास्त घेतलेले पैसे हे काळेच असणार ना? मग ते कसे पांढरे करणार?
अच्छा सोन्याचा भाव ऑफिशिअली
अच्छा सोन्याचा भाव ऑफिशिअली वाढला नाही तर. काळ्या बाजारात वाढला. ओक्के. पॉइन्ट आहे.
गैरसोय
पैसे बँकेत भरायला लायनीत उभे राहावे लागेल, हा त्रास तरी एकवेळ चालेल. पण ATM मधून सुट्टे पैसे पुरेसे मिळत नाहीत किंवा खिशात पैसे असूनही (पण ५००,१००० च्या नोटा आहेत म्हणून) वस्तू-सुविधा विकत घेता येणार नाहीत, ही गैरसोय जास्त त्रासदायक होईल, असे मला वाटते.
कुबेरांचे दोन पैसे
'लोकसत्ता'च्या अग्रलेखात मांडलेले मुद्दे पटण्यासारखे वाटले. विशेषतः -
आणि नोटांमध्ये जीपीएस चिप असल्याचे दावे आतापर्यंत तरी अफवाच ठरल्या आहेत.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
भारतासारख्या भ्रष्ट देशात
भारतासारख्या भ्रष्ट देशात काळ्यापैश्याची निर्मिती कधीही थांबेल असे वाटत नाही, आणि ते मोदींना माहित नसेल असेही वाटत नाही. पण आत्ता रद्द केलेल्या ५०० आणि शंभराच्या नोटांमुळे अस्तित्वात असलेल्या काळ्या पैश्यावर लगाम बसला/बसेल की नाही (किमान काही अंशी तरी)?
कुबेरांनी किती दिवसाची मुदत द्यायला पाहिजे असे वाटते म्हणजे परिणाम साध्य झाला असता?
याआधी नेमकी कधी १००० ची नोट रद्द केली गेली होती? आणि त्यावेळी काळ्या पैशाची निर्मिती थांबली नाही म्हणूण आत्ताही थांबणार नाही किंवा लगाम बसणार नाही हे कुबेरांना का वाटते? कुबेरांचा अग्रलेख (?) फारच त्रोटक आणि विरोध करायचाच म्हणून लिहिलेला दिसतो.
-अनामिक
बेहिशेबी मालाचा पॅटर्न
India has demonetised high-value currency before, in 1978
केवळ एक उदाहरण म्हणून सध्या तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांच्या बेहिशेबी मालमत्तेचा हा तपशील पाहा :
भुजबळांची मालमत्ता २६५३ कोटींची?
हे वाचलंत तर बेहिशेबी पैसे साठवण्याचा साधारण पॅटर्न तुमच्या लक्षात येईल. त्यात कॅशचा वाटा फारसा नसतो. कॅश केवळ तात्पुरती वापरली जाते. त्यामुळे ते फार तर हिमनगाचं टोक असतं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
India has demonetised
India has demonetised high-value currency before, in 1978
त्याकाळात चलनात असणारी १००० च्या नोटांची संख्या आणि सामान्य जनता तिचा करत असलेला वापर बघता, आताच्या परिस्थितीशी तुलना करता येणार नाही.
शिवाय, बेहिशेबी पैसे रोख ठेवण्यात येत नसले, आणि गुंतवणूक इतर मालमत्तेत होत असली तरी, रोख काळा पैसा आहे हे अमान्य करता येणार नाही. अगदी जवळच्या दोन व्यापारी नातेवाईंकाकडे प्रत्येकी दिड ते दोन करोड रोकड आहे. उच्च मध्यम वर्गातल्या लोकांची ही गत तर बाकीच्यांचे काय? सामान्यपणे व्यापारी वर्गाचे दाखवाचे आणि खायचे दात वेगळे असतात.
घेतलेल्या निर्णयामूळे व्यापारी, बिल्डर्स, प्लॉटींग, ई. धंद्यात असलेल्यांची चांगलीच गोची झालेली दिसते. शिवाय, आहे ते वाचवायचे कसे ह्याची धडपडही दिसून येत आहे. सामान्य नोकरदार वर्ग मजा बघतोय.
-अनामिक
माझ्यामते या नोटा प्रकरणाचे
माझ्यामते या नोटा प्रकरणाचे खालील फायदे होतीलः
१. खोट्या नोटा चलनाबाहेर जातील.
२. कॅशच्या स्वरूपात काळे पैसे बाळगणार्यांना ते 'रिचवण्यासाठी' जास्त खटपट करायला लागेल.
३. आयकर खातं जास्त सक्रिय होईल.
______________
थोडं तपशिलातः
१. खोट्या नोटा
खोट्या नोटा 'आजच्या तारखेला' चलनाबाहेर जातील. (स्टॉक आणि फ्लो व्हेरिएबल्स या संकल्पनांशी परिचित असणार्यांसाठी - हा स्टॉक व्हेरिएबल असेल.) खोट्या नोटा बनवणारे थोड्या दिवसांनी चलनातल्या नव्या नोटाही खोट्या बनवतील, आणि याचा इफेक्टिव्हनेस संपेल.
२. कॅशवाले लोक (आणि काळे पैसे इन जनरल)
काळे पैसे कॅशमध्येच असतात हा एक अत्यंत लोकप्रिय गैरसमज आहे. खरे काळे पैसे हे अशा स्वरूपात असतात की ते काळे आहेत की पांढरे हे बिलकुल समजू नये. तरी एखादा काळेपैसेधारक माणूस ते कॅशमध्ये ठेवण्याइतका माठ असलाच तर त्याला जरा त्रास होईल. पण तोही कालांतराने - कालिया थियरीनुसार - शिकेल.
३. आयकर खात्याची सक्रियता
हा मात्र खराखुरा दूरगामी परिणाम करणारा घटक आहे. या नोटाप्रकरणातून जी माहिती मिळेल त्याचा उपयोग करून आयकर खातं जास्त सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे.
(आयकर खातं वेगवेगळ्या निकषांवर कोणाची असेसमेंट करायची हे ठरवतं. उदा० रोकड व्यवहार जास्त असणारे व्यवसाय, इतर सरकारी खात्यांकडून मिळालेली माहिती, वगैरे.)
उदाहरणः एका औरंगाबादकर सीए मित्राने सांगितल्याप्रमाणे औरंगाबादेतल्या ऑफिसर्सची संख्या गेल्या वर्षभरात दुप्पट झाली आहे. याचं कारण समजत नव्हतं. आता हळुहळू समजायला लागलंय
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
आजला प्रॉपर्टीच्या
आजला प्रॉपर्टीच्या व्यवहारांचं रजिस्ट्रेशन राज्यसरकारांच्या अखत्यारीत आहे. रजिस्ट्रेशनच्या वेळी पॅन कार्ड मागितले जात असले तरी त्या व्यवहाराची माहिती त्या पॅन नंबरच्या समोर आयकर खात्यात (आपोआप) नोंदली जात नाही. ते इंटिग्रेशन करणे आवश्यक आहे.
-----------------
माझे पॅनकार्ड काढले तेव्हा मी वेगळ्या पत्त्यावर रहात होतो. त्यानंतर मी घर बदलले. गेली कित्येक वर्षे रिटर्न भरताना मी नवा पत्ता फॉर्मवर भरतो. पण तो नवा पत्ता अजूनही माझ्या पॅननंबरवर (आपोआप) नोंदला गेलेला नाही. माझ्यावर खटला दाखल करायचा असेल तर आयकर खात्याकडे जुना पत्ता आहे. (तसा रिटर्नमध्ये लिहिलेला नवीन पत्ता पण आहे. पण मुख्य माहितीत तो अपडेट झालेला नाही).
-----------------
आदुबाळ यांच्यासाठी खास प्रश्न/मुद्दा. माझ्या एका परिचिताने काढलेला.
पूर्वी सुट्ट्या पैशांचा प्रश्न होता तेव्हा बेस्ट बसवाल्यांनी टोकन्स काढली होती आणि सुट्या पैशांऐवजी ती टोकन्स कंडक्टर देत असत. बेस्ट बसचे इतर कंडक्टर ते टोकन स्वीकारत असत. इव्हन काही हॉटेल्स ती स्वीकारत असत. ही टोकन काही खरे पैसे नव्हते पण त्या टोकनचे मूल्य २५/५० पैसे आहे हे "बेस्ट बसचा वापर करणार्या गटात सर्वांना" मान्य होते. तसेच "समांतर काळ्या अर्थव्यवस्थेतल्या सर्वांना" ही जुनी नोट म्हणजे १००० रुपये आहेत असे मान्य असेल तर ह्या नोटा बदलून घेण्याची तसदी ते घेणारच नाहीत. निदान 'काळा व्यवहार टु काळा व्यवहार' करणार्यांना ते चालू शकेल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
त्या व्यवहाराची माहिती त्या
असं मलाही वाटत असे. पण एकदा एका आयकर अधिकार्याने दोस्तीखात्यात त्यांच्या सिस्टिमबद्दल सांगितलं. तो म्हणाला की तू गेल्या रविवारी कोणत्या हॉटेलात जेवलास हेही मी शोधून काढू शकतो.
______________
हो, अगदी खरं आहे. जगातलं जवळजवळ सगळं चलन ही "फियाट करन्सी" आहे. म्हणजे इट्स व्हॅल्यू लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर. क्लोज्ड सिस्टिममध्ये व्यवहार करणारे कशालाही चलन म्हणू शकतात - प्लॅस्टिकचे तुकडे (नवा व्यापार), इलेक्ट्रिकल सिग्नल्स (बिटकॉईन), चामड्याचा तुकडा (ज्ञानेश्वरकालीन पैठण), सोनंचांदीब्राँझचे तुकडे (हॅरी पॉटर). फक्त दोन्ही पार्ट्यांनी ते मानलं म्हणजे झालं. अट ही एवढीच.
जेव्हा एका क्लोज्ड सिस्टिममधून दुसर्या क्लोज्ड सिस्टिममध्ये पैसे पाठवायची वेळ येते तेव्हा ही गुलाबी परिकथा संपते. म्हणूनच, काळा व्यवहार टु काळा व्यवहार करणारे नागडे नाचोत, त्याच्याबद्दल कोणाला प्रॉब्लेमच नाहीये. (किंबहुना, एकदा काळा झालेला पैसा कायमचा काळाच राहिला तर हरकत नाही.) पण त्याला पांढरा करायची वेळ झाली की हे सगळं भोगायला लागेल.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
आबा व थत्ते मस्त चर्चा!
आबा व थत्ते मस्त चर्चा!
पैज लावायला हवी होती तुम्ही
तो म्हणाला की तू गेल्या रविवारी कोणत्या हॉटेलात जेवलास हेही मी शोधून काढू शकतो. >> मी त्याला तिथल्या तिथे चॅलेंज केलं असतं की शोधून दाखव म्हणून.
अहो त्यांना शक्य आहे ते.
अहो त्यांना शक्य आहे ते. पॅनलिंक्ड व्यवहारांची सिस्टीम असावी.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
५०० रुपयांच्या नव्या नोटा
हे एकदम चुकीचे आहे. आधी जमलेल्या काळ्या पैश्यावरचा हा उपाय आहे. पुढे होणार्या काळ्या पैश्यावर वेगळा उपाय करायला लागेल.
नविन काळा पैसा निर्माण होऊ शकतो, पण आता लोक नक्कीच घाबरुन असणार भविष्यात.
+१
हे एरंडेलासारखं आहे. एका वेळची सफाई. पुन्हा अपचन होणार नाही याची ग्यारंटी नाही.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हा हा हा
भारतीय लोक सरकारला घाबरून पुन्हा काळा पैसा निर्माण करायला कचरतील हे कैच्याकै विनोदी आहे. माझ्या ओळखीतले रोख व्यवहारावर अवलंबून असलेले व्यावसायिक कुणाकडून आपल्याकडची रोख रक्कम बँकेत भरता येईल ह्याची व्यवस्था अगदी थंड डोक्यानं लावत आहेत. कुटुंब, मित्रमंडळी, सोसायटीतले शेजारीपाजारी अशा सगळ्यांचा वापर ते करून घेत आहेत. 'माझ्याकडचे साडेसात लाख तुला देतो; दोन महिन्यांत हळूहळू तुझ्या खात्यात भरू शकशील का, अशी नम्र विचारणा मला करण्यात आली होती. इतरांकडून आलेल्या विचारणा प्रामुख्यानं 'मदत करायला मी तयार आहे का, ह्याची चाचपणी' स्वरुपाच्या होत्या. मी हो म्हटलं असतं तर रक्कम कळली असती. तुम्ही भारतीयांना उल्लू समजता आहात असं ह्या निमित्तानं नम्रपणे नोंदवतो आणि खाली बसतो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
चिंज. तुम्हाला ( ऊच्च्भ्रु
चिंज. तुम्हाला ( ऊच्च्भ्रु नोकरदार ) विचारणा होत असेल तर ही स्कीम कीतीतरी यशस्वी होते आहे असे नाही का तुम्हाला वाटत. जो माणुस ते साडेसात लाख भरायला तयार होइल तो २०% तरी कट घेइलच. म्हणजे चोरांना २० टक्क्याचा तरी बांबू बसला ना. नॉट बॅड. काल तर सोने ६०००० रुपये तोळा होते. म्हणजे चोर ५०% नुकसान सोसायला पण तयार आहेत. हे ह्या योजनेच्या यश्स्वीतेची पावती आहे, असे मला तरी वाटते.
काहीच उपाययोजना न करता सिग्रेट चे चटके द्यायला व्हिक्टीम शोधण्यापेक्षा हे बरे आहे.
नॉट बॅड फॉर हूम?
आं? मला वीस टक्के कट ऑफर केला असं मी कुठे तरी म्हटलंय का? ज्यांनी अशी विचारणा केली ते माझे मित्र किंवा चांगल्या ओळखीतले आहेत. त्यांनी मला कसलाही कट वगैरे ऑफर केला नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तुम्हाला ऑफर केले असे म्हणत
तुम्हाला ऑफर केले असे म्हणत नाहीये मी. पण जो कोण अशी मदत करेल त्याला त्याचा कट मिळेलच ना. मुळ मुद्दा ज्यांनी टॅक्स चुकवला आहे त्यांना कोणत्या तरी रुपानी का होइना भुर्दंड बसला म्हणजे झाले.
आता थोडे वैयक्तीक - तुमचे मित्र टॅक्स न भरलेला पैसा तुमच्या मार्फत पांढरा करायचा प्रयत्न करत आहेत वर तुम्हाला त्यात काही कमिशन ऑफर पण करत नाहीत. हे त्यांचे वागणे चुक आहे. माझे हे मत त्यांना कळवा. मी ४५००० रूपये तोळ्यानी सोने विकले तर ते घ्यायला तयार आहेत का?
बंध रेशमाचे
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अर्थस्य पुरुषो त्रासः
>>> असं माझं अर्थनिर्णयन होतं.
- इथे एक कोट घालून कोटी साधता आली असती/ते, पण तुम्ही पडलात डाऊन टू अर्थ!
अनु व चिंता मस्त चर्चा.
अनु व चिंता मस्त चर्चा.
बंध रेशमाचे (पुढचा भाग)
माझ्या एका स्नेह्याकडून मला आज वेगळी ऑफर मिळाली -
त्याच्याकडची हजार किंवा पाचशेच्या नोटांमधली रोख रक्कम ३० डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्यानं मी माझ्या खात्यात भरायची. एकूण रक्कम इन्कम टॅक्सवाल्यांना संशय येणार नाही इतकीच असेल. मग पुढची काही वर्षं मी ती रक्कम मला हवी तशी वापरायला मुखत्यार आहे (कारण ऑफरदात्यापाशी पैशाची चणचण नाही आहे). जेव्हा त्याला परत हवे असतील तेव्हा तो ते परत मागेल. एका वेळी पन्नास हजारांहून कमी रक्कम मागितली जाईल. किमान आठवडाभर आधी तशी सूचना दिली जाईल. शिवाय, माझी गैरसोय होणार नाही ह्याची काळजी घेतली जाईल (मी परगावी नाही; अंथरुणाला खिळलेला नाही, वगैरे). थोडक्यात हे एक प्रकारचं व्याजमुक्त कर्ज असेल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
निराशा!
तुमची बाजारातली पत फारच कमी आहे; तुम्हाला प्रत्यक्षात ओळखणारे लोक तुम्हाला पुरेसे घाबरत नाहीत; थोडक्यात तुम्ही अगदीच फालतू आहात; हे म्हणण्याची संधी दिल्याबद्दल आभार.
ही अंमळ व्यक्तिगत स्वरूपाची प्रतिक्रिया झाली खरी. पण तुमचा रथ दोन अंगुळं खाली आणण्यासाठी एवढं करणं, माझं परमकर्तव्य आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
असे अनेक ऑफर सध्या चौफेर
असे अनेक ऑफर सध्या चौफेर दिसताहेत. माझ्या एका मित्राच्या वडिलांनी त्यांच्या दुकानातल्या सर्व कर्मचार्यांना ४९,००० च्या आसपास च्या रकमांचे "लोन" दिले. टप्प्या-टप्प्याने तो "लोन" त्यांच्या पगारातून परत घेतला जाईल, असा अलिखित करार केला. पॅन कार्डची गरज नाही, आणि एरवी खातं फारसं न वापरणार्या लोकांनी घरी साठवलेल्या नोटाच फक्त खात्यात घातल्या आहेत, हे सांगायला मार्ग नाही.
(नोकरांनी होकार न दिल्यास दुसरीकडे नोकरी शोधावी लागेल, हे ही त्या अलिखित करारात गृहित होतं का, हे माहित नाही. पण गरजू नोकराचे कागदपत्र ठेवून घेऊन असा करार करणे फारसे कठीण नाही.)
http://economictimes.indiatimes.com/industry/banking/finance/banking/dea...
कुठे नेऊन ठेवला बांबू आमचा?
ह्या हिशोबात एका चोराला २०% बांबू बसला आणि दुसऱ्या चोराला ते काळे २०% मिळाले. काळा पैसा काळाच राहिला आणि चोरांची संख्या वाढली. 'सिग्रेटचे चटके द्यायला व्हिक्टिम वाढले.' आमच्या जंतूला असं चोर नका हो बनवू! जंतू, तुम्ही चोर बनू नका, 'कुठे नेऊन ठेवला जंतू आमचा' असं म्हणावं लागेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
साडेसात लाख हळू हळू भरले काय
साडेसात लाख हळू हळू भरले काय किंवा एकदम भरले काय. यानी कसा फरक पडेल नाही समजलं. दिड महिन्यात एकूण दोन-अडीच लाखावर कॅश जमा केली तर तुमचा रिटर्न्/उत्पन्न चेक करणार आहेत.
+१. लोक कसा मार्ग काढतील सांगता येत नाही. काही लोकांनी दिल्ली त्रिवेंद्रम राजधानीची तिकिटं बुक केली कॅशनी. ६ तिकिटं ५००००ला पडतात. दोन दिवसांनी क्यांसल करून रिफंड घ्यायचा जो नव्या नोटांमध्ये मिळेल म्हणे.
एकाने परवा रात्री बांद्रा-वर्ली सी लिंकवर पन्नास चकरा मारल्या. प्रत्येक वेळेला ५००रु च्या नोटेने टोल भरला. टोल बहुधा ५० रु आहे.
ख.खो.दे.जा.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
एकाने परवा रात्री
कसली कल्पकता आहे!!! _/\_
चिंतातुर जंतु च्या टीकेला वैतागुन दिव्य मराठीने आज
स्पेशल अग्रलेखच लिहीलेला आहे.
तो ऐसी अक्षरे संस्थळावरील प्रतिसाद कागदी माध्यमे किती गंभीरतेने घेतात याचेच द्य्योतक का काय कस टायपताते आहे.
अग्रलेखाचे नावच " चिंतातुर जंतुंच्या व्यथा " असे आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-editorial-on-note-ban-in-india-...
अग्रलेखाचा शेवट या महावाक्याने केलेला आहे ज्यात सरळ सरळ व्यक्तीगत टीका केलेली आहे तो असा
"राम गणेश गडकरींनी जवळपास शंभर वर्षांपूर्वी ‘चिंतातुर जंतू’ या कवितेतून उठता-बसता शंका काढणाऱ्या चिंताग्रस्त प्रवृत्तींची बहारदार खिल्ली उडवली होती. मोदींच्या निर्णयामुळे अशा ‘चिंतातुर जंतूं’ची पैदास वाढल्याचे दिसते. त्याकडे दुर्लक्ष करून प्रामाणिक भारतीयांनी देशहितासाठी थोडा संयम दाखवावा."
अग्रलेख आवडला.
अग्रलेख आवडला.
धाडसी अग्रलेख
संगणक-तंत्रज्ञान आणि अस्तित्वात असलेल्या नोटा रद्द करून नवीन नोटा आणण्याचा संबंध नक्की कसा लागतो, हे मला समजलं नाही. कोणी थोडी मदत करणार का?
ग्राहकांवरच जळजळीत टीका करण्याचं धाडस आहे ब्वॉ दिव्य मराठीकडे!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ग्राहकांवरच जळजळीत टीका
ज्या कमाईवर प्राप्तीकर भरलेला नाही ते काळे धन. प्राप्तीकराच्या व्याप्तीमधे येत नसणार्यांनी केलेला नखशिखांत भ्रष्टाचार दिसत असूनही त्याकडे काणाडोळा करणार्या व हे काणाडोळा करणे कसे नैतिक आहे याचा ढोल वाजवणार्या व्यवस्थेमधे असे ग्राहक (खालील प्यार्यात वर्णिलेले) निर्माण होणारच. व ते अयोग्य नाहीच.
नव्हे.
तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचला नाहीत. मध्यमवर्गाला बँकेत वेळ दवडावा लागला, त्यांची गैरसोय झाली याचं दिव्य मराठीला अजिबात घेणं-देणं नाही; उलट त्या गैरसोयीबद्दल किंचित चिडवण्याचा सूर आहे. हेच मध्यमवर्गीय त्यांचा पेपर विकत घेतात. काळं धन वगैरेंचा संबंध नाही. दोन-चार हजारांची रोकड बाळगणाऱ्यांचीही गैरसोय व्हायची ती झालीच! (उदाहरणार्थ, नितिन थत्तेंनी गैरसोयीचा व्यक्तिगत अनुभव याच धाग्यावर लिहिलेला आहे.)
आणि, तंत्रज्ञान आणि नोटाबदल यांचा संबंधही मला खरंच समजला नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हेही वाचा
Demonetization: Witless and Anti-People - Professor Prabhat Patnaik, Jawaharlal Nehru University
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
नोटा कॅन्सल करणे उत्तम नि
नोटा कॅन्सल करणे उत्तम नि धाडसी निर्णय आहे. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन
५०० ची नवी नोट आणणे गरज आहे समजू शकतो. मात्र उगाच २००० रुची नोट का काढताहेत हे मात्र कळलं नाही!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
>>नोटा कॅन्सल करणे उत्तम नि
>>नोटा कॅन्सल करणे उत्तम नि धाडसी निर्णय आहे.
धाडसी आहे. उत्तम आहे का ते काळ ठरवील. हा निर्णय यशस्वी/अयशस्वी झाला आहे असं म्हणण्याचे निकष काय असतील? पुढील वर्षी (पासून?) करवसुलीत सिग्निफिकंट वाढ?
भरपूर काळा पैसा नोटांच्या स्वरूपात असेल तर त्या एकतर कर भरून पांढर्या करून घ्याव्या लागतील किंवा फुकट घालवाव्या लागतील. म्हणजे एकतर करवसुली वाढायला हवी किंवा बाजारात कॅशचा ग्लट आला पाहिजे. चौदा लाख कोटीच्या ५००- हजारच्या नोटा आहेत असे म्हटले तर तितक्या रकमेच्या १०० च्या, ५०० च्या नव्या नोटा, २०००च्या नव्या नोटा सरकार बाजारात सोडेल. पण तितक्या बदलून घ्यायला कोणी येणार नाही. म्हणून कॅशचा महापूर येईल. हे बरोबर का? गब्बर, अनु राव यांचे मत जाणून घ्यायचे आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तितक्या रकमेच्या १०० च्या,
सध्या चौदा लाख रुपयांच्या नोटा आहेत, त्यातल्या म्हणे ८६% ५००-१००० च्या आहेत. ह्या सर्व च्या सर्व नोटा सरकार रीप्लेस करणार नाही.
१.सरकार ह्या वेळेला, त्या सर्वच्या सर्व नोटा बाजारात सोडणार नाहीये. २००० च्या नोटा तर खुप कमी प्रमाणात सोडणार आहे. म्हणजे सरकार १४ लाख कोटींच्या ऐवजी १० लाख कोटीच नोटांच्या रुपानी बाजारात ठेविल.
२.सरकारला आशा आहे की काही प्रमाणात जुन्या नोटा जमा होणार नाहीत. तो सरकारचा/आरबीआय चा थेट फायदा आहे. बजेट डेफीसीट त्यामुळे कमी होइल.
पाचशे आणि हजाराच्या नोटांच्या
पाचशे आणि हजाराच्या नोटांच्या स्वरूपात असलेल्या काळ्या पैशांच्या क्वांटिटीबद्दल काही एस्टिमेट आहे का?
म्हणजे जरी चौदा लाख कोटींच्या नोटा असल्या तरी त्यातल्या फेक किती? जेन्युइन व्हाइट किती? आणि अनाकाउंटेड ब्लॅकमनी किती?
वन टाइम एरंडेलाच्या डोसने किती पो बाहेर पडण्याचा अंदाज आहे?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
चौदा लाख कोटींच्या नोटा ह्या
चौदा लाख कोटींच्या नोटा ह्या अधिकृत आहेत ना? मग त्यात फेक का असाव्यात? फक्तं जेन्युइन व्हाइट आणि अनाकाउंटेड ब्लॅकमनी एवढंच असेल ना?
-अनामिक
चौदा लाख कोटी आरबीआय नी
चौदा लाख कोटी आरबीआय नी काढलेल्या नोटांची रक्कम आहे.ह्या उपर, फेक कीती आहेत हे कसे एस्टीमेट करणार?
काळा पैसा कीती आहे हे कळणे अवघड आहे. जितका जमा होणार नाही तितका तर नक्कीच काळा आहे. २-३ महिन्यानी आरबीआय सांगेलच कीती जमा झाले ते.
तेव्हा आर बी आय सांगेलच. पण
तेव्हा आर बी आय सांगेलच. पण आत्ता काही एस्टिमेट आहे का? म्हणजे एवढा धाडसी आणि जन्तेला त्रास* होणारा निर्णय घेताना त्यातून किती बेनिफिट होणार याचा अंदाज तर केला असेल ना?
*फार कै त्रास नाही असं तुमचं मत आहे हे ठीक !!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
भरपूर काळा पैसा नोटांच्या
(१) सर्वंकष संपत्ती = अधिकृत + अनधिकृत संपत्ती. खाली क्र. ५ चा मुद्दा असत्य/नगण्य असेल तर सर्वंकष संपत्ती तेवढीच राहणार आहे.
(२) चलनाचे फक्त डिनॉमिनेशन बदलणार आहे. १००० च्या १ नोटेच्या ऐवजी १०० च्या दहा नोटा. म्हंजे नोटांची संख्या वाढेल हे बरोबर.
(३) ज्या १०००/५०० च्या नोटा बदलून घ्यायला कोणीही येणार नाही त्यांच्या इक्विव्हॅलंट शंभराच्या नोटा RBI बाजारात सोडू च शकणार नाही. म्हंजे त्या नोटा सर्क्युलेशन मधे येणारच नाहीत.
(४) ज्या १०००/५०० च्या नोटा बदलून घ्यायला कोणीही येणार नाही तेवढ्या किंमतीची संपत्ती ही जर unofficially इतर अॅसेट मधे (उदा. सोने) रूपांतरित केली गेली तर ती संपत्ती टिकून राहील. व ती ब्लॅक संपत्तीच असेल.
(५) ज्या १०००/५०० च्या नोटा बदलून घ्यायला कोणीही येणार नाही तेवढ्या किंमतीची संपत्ती ही जर unofficially इतर अॅसेट मधे (उदा. सोने) रूपांतरित केली गेली नाही तर ती संपत्ती लयास जाईल.
(६) क्र. (५) हे होण्याची शक्यता कमी आहे असे माझे गृहितक.
(५) ज्या १०००/५०० च्या नोटा
उ.प्र. मध्ये जाळलेल्या ५००/१०००च्या नोटा मिळाल्या म्हणे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
उ.प्र. मध्ये जाळलेल्या
फडतूसांच्या डोंबलावर नेऊन ओतण्यापेक्षा जाळणे बरे असं काही लोकांना वाटणे साहजिक आहे.
क्या गब्बर खफा खफा है ?
आज इतकी मोठी अर्थशास्त्रीय घटना झालेली आहे. इतका भुकंप झालाय. आणि गब्बर सिंग तसे उदासीनच दिसत आहेत.
त्यांच्या प्रतिसादातुन नविन दृष्टीकोण ज्ञान माहीती मिळेल यासाठी आज लॉग इन झालो व गब्बर यांचे प्रतिसाद शोधले तर फारसे हाती काही लागले नाहीत. गब्बर आज इतके उदासीन कसे इतका महत्वाचा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असुनही.
गब्बर यांच्या अभ्यास्पुर्ण मार्मिक प्रतिसादांच्या प्रतीक्षेत
गब्बर यांची या निर्णयावरची भुमिकाही पुरेशी स्पष्ट कळत नाहीये. की कुठे इतर धाग्यावर चर्चा झालेली आहे व मला माहीत नाही. ?
वेलकम टू गब्बर-फॅन-फॉलोईंग
वेलकम टू गब्बर-फॅन-फॉलोईंग क्लब.
आज इतकी मोठी अर्थशास्त्रीय
माझा मोदींच्या या धोरणाला विरोधच आहे कारण (माझा असा समज आहे की) १००० व ५०० च्या नोटा रद्द करण्याचे हे धोरण काळ्या पैश्याच्या विरोधी आहे म्हणून. जोपर्यंत फडतूसांचे लांगूलचालन अस्तित्वात आहे तोपर्यंत माझा काळ्या पैश्याला थेट पाठिंबा आहे व असेल.
निर्णय जाहीर झाल्यावर बिटकॉईन ची किंमत वधारली होती असं ऐकतो.
--
केनेथ रोगॉफ (अर्थशास्त्री) यांनी "रोकडी चा शाप" या पुस्तकात मोठ्या डिनॉमिनेशन च्या नोटा ह्या मुख्यत्वे करचुकवे लोक व गुन्हेगार बाळगून असतात असा मुद्दा मांडलेला आहे. तेव्हा ह्या धोरणाचा फटका करचुकवे लोक व गुन्हेगार यांना बसेलच. रोगॉफ्फ यांनी अर्थातच मोदींच्या धोरणाची प्रशंसा केलेली आहे.
--
ग्राफ आवडला. (अर्थात मला
ग्राफ आवडला. (अर्थात मला आवडणार नाहीत असे ग्राफ विरळाच...)
याचा अर्थ सध्या काळा काय, पांढरा काय, सगळ्याच रोकडीपैकी सुमारे ८० टक्के पैसा पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटात आहे. कमी किंमतीच्या नोटा सामान्य माणसांकडे बऱ्याच असल्यामुळे काळा पैसा परवडू शकेल अशांचा रोखीत असलेला काळा पैसा हा त्याच नोटांत आहे असं समजायला हरकत नाही. जर हा काळा पैसा काढून टाकण्यासाठी लोकांना दर दहा वर्षांनी पन्नासेक टक्के घालवावे लागत असतील तर त्यापेक्षा टॅक्स देणं बरं असं अनेक जण म्हणतील. चिंतातुर जंतू यांनी लिहिल्याप्रमाणे अनेक जण काही ना काही मार्ग काढतील हे खरं आहे. पण बराच काळा पैसा पांढरा होईल किंवा नाहीसा होईल.
मला एक प्रश्न पडतो. हा पैसा बाहेर आल्याने महागाई वाढेल की कमी होईल? एका बाजूने वाटतं की फिरत्या चलनातला पैसा वाढेल. पण दुसऱ्या बाजूने काळा पैसा बाळगणाऱ्याकडे रोकड जितकी मुबलक प्रमाणात अस्तित्वात होती ती नाहीशी होईल. नक्की चलनफुगवटा होईल की नाही याचा कोणी विचार केला आहे का?
थिंकिंग आउटसाईड द बॉक्स.
ग्राफ आवडला. (अर्थात मला आवडणार नाहीत असे ग्राफ विरळाच...) >> मी काय म्हणतो गुर्जी, आधी हवा तसा ग्राफ बनवून नंतर त्यात हवा तसा विदा कोंबला तर? स्टॅटिस्टीशियन असं काही करतात का?
मला एक प्रश्न पडतो. हा पैसा
भाजपाचे निवडणूक चिन्ह कमळ आहे. सध्या भाजपाकडे दोन कमळं आहेत. अरविंद सुब्रमण्यम आणि अरविंद पनगारिया. डॉ. पनगारिया यांनी याचा विचार केलेला आहे असे दिसते. Move to demonetize economy will help bring down inflation
बरोबर. टोटल महागाई कमी होईल
बरोबर. टोटल महागाई कमी होईल कारण लोकांकडचा पैसा कमी होईल आणि डिमांड कमी होईल. आणि रेट कट होऊ शकतो.
https://www.bloomberg.com/gadfly/articles/2016-11-09/india-chose-a-bad-d...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
भाकीत
>>>बरोबर. टोटल महागाई कमी होईल कारण लोकांकडचा पैसा कमी होईल आणि डिमांड कमी होईल. आणि रेट कट होऊ शकतो.
ढेरे शास्त्री थोर द्रष्टे अर्थतज्ञ असल्याचे याठिकाणी जाहीर करण्यात येत आहे.
मंदी येणार आणि ती ही नेमकी कशामुळे येणार याचं भाकीत त्यांनी दोन वर्षापूर्वी वर्तवले होते. मंदी हा शब्द त्यांनी वापरला नसला तरी महागाई कमी होणे याचा परिणाम मंदीत होईल हेच त्यांनी सूचित केले होते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
(No subject)
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
Option for NRIs
NRIS HERE’S HOW TO CONVERT YOUR 500, 1000 RUPEE NOTES
--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life
५०० व १००० च्या जुन्या नोटांवर बंदी
भारतात काही सणानिमित्त व शनिवार रविवार जोडून आल्यावर बँकांना चार चार दिवस सुट्टी असते, त्यावेळी लोक काय करतात ? सर्वच जण खुप अगोदर योजना करुन पैसे काढून ठेवतात कां ? अडचण सहन करतात ना ?उगीचच विरोधासाठी विरोध करावयाचा याला देशप्रेम म्हणत नाही.
काय पण तुलना ..... चार दिवस
काय पण तुलना ..... चार दिवस सुट्टी असते ते त्या चार दिवसांच्या आदल्या संध्याकाळी आठला जाहीर होत नाही. १ जानेवारीपासून ठाऊक असते. पैसे आधी काढता येतात आणि काढलेले पैसे निरुपयोगी आहेत असं अचानक कळत नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नव्या रुपात, नव्या रंगात पुन्हा येणार एक हजाराची नोट
नव्या रुपात, नव्या रंगात पुन्हा येणार एक हजाराची नोट
हा हा हा!
येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक
तुघलक
तुघलकाची गोष्ट आठवली ब्वॉ.
निराळा प्रश्न
मला प्रश्न विचारताना निराळंच मनात होतं, पण जे प्रतिसाद वर आलेले आहेत तेही माहितीपूर्ण आहेतच.
प्रश्न असा की, जुन्या नोटा रद्दबातल केल्यावर गैरसोय होत आहे ती निराळी. बनावट, नकली नोटांमुळे सामान्य लोकांचं किती आर्थिक नुकसान होईल आणि त्यावर इलाज करण्याची गरज आहे का, वगैरेंसाठी काही अंदाज आहेत का? सामान्य लोक म्हणजे, सर्वसाधारण कायदेभीरू, पापभीरू लोक जे आपल्या औकातीच्या बाहेर भ्रष्टाचार करत नाहीत. आणि गरीबांचं काय, हातावर पोट असणारे लोक; त्यांचं नुकसान कितपत होईल?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
इन्फ्लेषन
>>बनावट, नकली नोटांमुळे सामान्य लोकांचं किती आर्थिक नुकसान होईल आणि त्यावर इलाज करण्याची गरज आहे का, वगैरेंसाठी काही अंदाज आहेत का?
माझ्या तुटपुंज्या ज्ञानानुसार बनावट नोटांमुळे मूळ चलनाची किंमत कमी होते. त्यामुळे जर खूप बनावट चलन बाजारात आलं तर चलनवाढीचा धोका संभवतो. हे सामान्यांसाठी वाईट आहे. अर्थात जुन्या (त्यासोबत नकलीसुद्धा) नोटा चलनातून बाद केल्याने सध्या असलेला चलनवाढीचा दर कमी होण्याची कितपत शक्यता आहे हे ठाऊक नाही.
ममता बॅनर्जी, मुलायम सिंग,
ममता बॅनर्जी, मुलायम सिंग, अरविंद केजरीवाल, लालू प्रसाद आणि ममता बॅनर्जी हे सगळे लोक टीका करतायत म्हणजे नक्कीच चांगलं पाऊल आहे हा निर्णय. सगळ्यात मोठा फटका राजकारण्यांना बसणार आहे. महाराष्ट्रात आता निवड्णुका आहेत झेड्पी वगैरेंच्या. अमाप पैसा जमलवला होता उमेदवारांनी वाटायला. भाजपावाल्यांनी देखील. आता सगळ्यांचं धाबं दणाणलं असेल.
विरोधीपक्षांतले नितीश कुमार यांनी एकट्यांनी उघड समर्थन केलं आहे या निर्णयाचं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
समर्थन नाही पण काँग्रेसनेही
समर्थन नाही पण काँग्रेसनेही बहुदा स्वागत केलंय. मोठ्या पक्षांना अर्थातच तुलनेने कमी फटका बसणार. त्यांच्याकडे जिरवायला अनेक संस्था आहेत, माध्यमं आहेत (झालंच तर देवस्थानांच्या पेट्या आहेत)
लहान पक्षांना मोठा तोटा
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
रा.गा. आणि सूरजेवाला यांनी तर
रा.गा. आणि सूरजेवाला यांनी तर टीका केल्याचं वाचलं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आता नक्की किती काळा पैसा
आता नक्की किती काळा पैसा बाहेर आला त्याचा डेटा येण्याची वाट पहायची.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
थोडी व्हॉटबाउटरी
वन्स अऑन अ टाइम इन जॅन २०१४
http://zeenews.india.com/hindi/news/india/decided-to-change-the-currency...
भाजपा ने आरोप लगाया कि सरकार ने कालेधन पर काबू पाने के नाम पर वर्ष 2005 से पहले के सभी करेंसी नोट वापस लेने का जो निर्णय किया है वह आम आदमी को परेशान करने और उन ‘चहेतों’ को बचाने के लिए है जिनका भारत के कुल सकल घरेलू उत्पाद के बराबर का कालाधन विदेशी बैंकों में जमा है।
पार्टी ने कहा कि यह निर्णय बैंक सुविधाओं से वंचित दूर दूराज के इलाकों में रहने वाले उन गरीब लोगों की खून पसीने की गाढ़ी कमाई को मुश्किल में डाल देगा जिसे उन्होंने वक्त जरूरत के लिए जमा किया है।
भाजपा प्रवक्ता मीनाक्षी लेखी ने यहां कहा, अवसरों को गंवाने वाले संप्रग के 10 साल के शासन में पी चिदंबरम 7 साल वित्त मंत्री रहे हैं और अब सरकारी की चली चलाई की बेला में वह लोगों द्वारा पूछे जा रहे सवालों से भागने के लिए कालेधन के विषय से जनता के असली मु्द्दों को भ्रमित करना चाहते हैं।
ठळक ठसा माझा.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हा हा हा
__/\__
मस्त.
मोदीने गुजरातला आधीच खबर दिली होती.
मोदीने गुजरातला आधीच खबर दिली होती, चक्क सात महिन्यापूर्वी.
--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life
पान सापडले नाही. हासुद्धा
पान सापडले नाही. हासुद्धा विनोद आहे का? तसे असल्यास संपल्यावर हात वर करत जा हसायला बरे
फोटो
ह्या बातमीचा फोटो कालच्या मराठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला आहे. मूळ पान खोडले गेले तरी ती बातमी आता छापील स्वरूपात उपलब्ध आहे.
आर के लक्ष्मण
आजच्या मटा.च्या महामुंबई पानावर (पान ६) लक्ष्मण यांचे एक जुनं कार्टून प्रसिद्ध झालं आहे. मोरारजीभाईंनी १९७८ साली नोटा रद्द केल्या त्या वेळचं. सध्याच्या परिस्थितीलासुद्धा अगदी चपखलपणे लागू पडतंय ते. मला लिंक देता येत नाहीय. कुणाला शक्य असेल तर प्लीज़ द्या. त्यात काळापैसारूपी वाघाला पिंजर्यात बंद करण्यासाठी एक खेळण्यातला पिंजरा लावलाय, त्या वाघाच्या शेपटीचं टोकसुद्धा त्या पिंजर्यात जाऊ शकत नाहीय आणि मोरारजी वगैरे मंडळी एका झाडामागे लपून बघतायत की कसं पकडलंय बेट्याला किंवा आता कुठे पळशील बेट्या. वाघाच्या आणि नेतेमंडळींच्या चेहर्यावरचे भाव बरंच काही सांगून जातात.
सापडली लिंक
अन्य संस्थळावर सापडली.
(संपादक : दुवा दुरुस्त केला आहे.)
Modi Goes To Daulatabad हा
Modi Goes To Daulatabad
हा लेखक बास्तिया पारितोषिक विजेता आहे. लेखात हायेक चे क्वोट्स आहेत.
पण हे असं चक्रमासारखं का लिहिलंय ते मात्र समजत नाही.
ज्या व्यक्तीकडे सेव्हिंग्स असतात जी ५०० व १००० च्या नोटांच्या डिनॉमिनेशन मधे असतात त्या व्यक्तीला गरीब का म्हणायचे ?? हा प्रश्न गेला तेल लावत. नैका ??
जी व्यक्ती स्वतःचा ID सुद्धा काढत नाही तिचे निर्लज्ज समर्थन का केले जातेय ?? - हा प्रश्न गेला गाच्यागात. नैका ??
विमुद्रीकरणाच्या आवृत्या
http://blogs.economictimes.indiatimes.com/onmyplate/the-cycles-of-demone...
विमुद्रीकरणाच्या (demonetization) आवृत्यांवर भाष्य करणारा हा लेख आवडला.
विद्रुपीकरण
डिमॉनेटायझेशन या शब्दाचं विद्रुपीकरण झाल्यासारख याटलं काय तो शब्द शोथलाय विमुद्रीकरण
मला विमुद्रीकरणापेक्षा शोथलाय
मला विमुद्रीकरणापेक्षा शोथलाय हे जास्त विद्रुप वाटलं.
असो, काँक्रीटीकरण, डांबरीकरण आदी कर्णापेक्षा हे विमुद्रीकरण बरंच सुसह्य आहे.
सवलत पाहिजे
गुगल इडीक कि बोर्ड कालच शोधलाय।
स्मिताली
विमुद्राकरण म्हणू
माझं मराठी आणि संस्कृत दोन्ही तस कच्चच! लोकसत्ताने विमुद्राकरण हा शब्दप्रयोग आजच्या अंकात वापरला आहे.
आणखी अनुभव. एचडिएफसी बँकेत
आणखी अनुभव.
एचडिएफसी बँकेत गेलो होतो. माझ्याकडे ५०० च्या तीन नोटा होत्या त्या बदलायच्या होत्या आणि १०००० रुपये काढायचे होते.
मोठी लाईन होती. बँकेची वेळ ९.३० ते ३.३० होती . बँकेने रांगेची व्यवस्था बर्यापैकी ठेवली होती. मुख्य म्हणजे बँकेच्या आत जास्त माणसांना सोडत नव्हते. बँकेचा एक गार्ड सतत फक्त २००० च्याच नोटा मिळतील इतर कुठल्याही नोटा मिळणार नाहीत असे सांगत फिरत होता. त्याच्याजवळ पाण्याची बाटली होती. मागेल त्याला तो पाणी देत होता. सुमारे १२ वाजता नवीन माणसांना रांगेत घेणे बंद केले बँक साडेतीन वाजता बंद होईल अशी घोषणा तो करू लागला. टोटल दिडशे ते दोनशे लोकांची सोय आज झाली असावी. १२ नंतर आलेल्या लोकांची निराशा झाली.
बँकेसमोर बर्याच लोकांनी दुचाक्या आणि चारचाक्या उभ्या केल्या होत्या. त्यात कायद्याचे काही प्रमाणात उल्लंघन होते. काही वेळाने ट्रॅफिक पोलिसांची टोइंग व्हॅन आली तेव्हा लोकांनी त्यांच्याशी हुज्जत घालून वाहने उचलू दिली नाहीत. त्यांनीही लोकांची संख्या पाहून माघार घेतली.
दोन हजारच्याच नोटा मिळणार त्यामुळे माझ्या तीन नोटा कशा बदलून देणार असा प्रश्न मला पडला होता. शाखेत फिरणार्या एका कर्मचार्याने तर मला आज तीन नोटा बदलून मिळणार नाहीत असेच सांगितले. पण काउंटरवरील कर्मचार्यांनी त्यातून मार्ग काढला. आणि मला नोटा बदलून मिळाल्या. त्यांनी काढलेला मार्ग इथे लिहीत नाही.
मधल्या काळात शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पाण्याचे ग्लास आणि ग्लुकोज बिस्किटांचे छोटे पुडे वाटले. ते अर्थात फोटोग्राफरसहित आले होते. लोकांनी "वडापाव आणि चहा नाही का?" असे विचारले.
सुमारे साडेतीन तास लायनीत उभे रहावे लागले.
--------------------------------------------------
शेजारी स्टेटबँकेची शाखा आहे. तिथली लाईन आणि केऑस खूपच मोठा होता.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आयसीआयसीआय ब्यांकेत कॅश
आयसीआयसीआय ब्यांकेत कॅश डिपॉझिट करायला पाऊण तास लागला. अजून कमी लागला असता पण एकाने ऑल्मोस्ट २० मिनिटं घेतली. बाकी स्मूथ. एक अशिक्षित बाई आली होती. बँकेच्या लोकांनी तिला फॉर्म भरून दिला. आंगठा कुठे लावायचा ते सांगितलं. ती बाई बँकेची ग्राहक देखील नव्हती. बँकेचा स्टाफ खूप हेल्पफुल होता.
===
केरळमध्ये CPMने आपल्या बॅंक युनिअनला घाऊक सुट्टी घ्यायला लावली असं वाचलं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
सेव्हिंग्ज एस्बीआयला, करंट
सेव्हिंग्ज एस्बीआयला, करंट पर्सनल अॅक्सिसला आणि फर्म चे अकाउंट लोकल कोऑपरेटिव्हच्या दुर्लक्षित ब्रांचमध्ये ठेवण्याची रणनीती उपयोगी पडली.
कोऑपरेटिव्हने विदाउट लैन सगळी कॅश स्वीकारली. ह्या बँकेचे एटीएम दरिद्री आहे आणि चालतही नाही. खर्चाला द्या की थोडे अशी विनंती केल्यावर २० चे दोन आणी १० चे एक बंडल दिले. ते पुरेसे आहेत. आठवड्यात २० के चे विड्रावल अलौड आहे.
अॅक्सिसवाले फोनवर मेसेजावर मेसेज फेकायलेत. बँक चालू आहे. या ना म्हनून.
आता चेकाने तिकडे अमाउंट फेकावी. अॅक्सिसचे कार्ड वापरायला मोकळा.
आयसीआयसीआय ब्यांक. २ तास वेळ
आयसीआयसीआय ब्यांक. २ तास वेळ लागला, २००० च्याच नोटा फक्त. ब्यांक स्टाफ हेल्पफुल होता पण गर्दीच मोठी होती.
एटीएममधून १०० च्या नोटांसाठी अडीच तास फिरलो. बहुतेक सगळी एटीएम बंद होती विथौट क्याश. एका चालू असलेल्या लायनीत थांबलो तर थोड्या वेळाने क्याश संपली. दुसरीकडे गेलो तर नेमका माझा नंबर आल्यावर मशीन हँग झाले. गार्डने सरळ बंदवाली पाटीच लावली. पण तसाच थोडा वेळ थांबलो मग आपसूक मशीन परत सुरू झाले आणि अखेर एकदाचे पैसे मिळाले. हुश्श.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बँकेत
दोन लायनी होत्या- एक अकौंट होल्डर व नॉन अकौंट होल्डर. अकौंट होल्डर लाईनमधून जास्त लोकांना आत सोडत होते. त्यावरून बरीच बाचाबाची झाली, एक गुंठामंत्रीछाप आणि एक सडकछाप अशा दोघांनी बँक कर्मचार्यांची आईमाई काढून "फोडून टाकू" वगैरे बोलायला सुरुवात केली. बँकवाल्यांनी लगेच सायरन वाजवला आणि जास्त आरडाओरडा केल्यास बँक बंद करून टाकू असे सांगितले. थोड्या वेळाने पोलिस आल्यावर तणाव निवळला. तोवर महिला वर्गातही रांगेतल्या स्थानावरून एक भांडण झाले. तेही नंतर मिटले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
महाब्यांकेत कोणी नाही का
महाब्यांकेत कोणी नाही का गेलं?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
मुंबई मधे झवेरी बाजारात १०००
मुंबई मधे झवेरी बाजारात १००० च्या नोटा ६०% डिस्काऊंट ला खरेदी करणारे लोक होते.
कलकत्त्यात ४० % च्या वर दर
कलकत्त्यात ४० % च्या वर दर गेलेला दिसत नाही. मी ५०० = ४००, ३००, आणि १००० = ६००, ७०० असे दर पहिले दोन-तीन दिवस ऐकत होते. पण आज सकाळी आमच्या एका सोनार स्नेह्याने सांगितलं की हा बाजारही आता बंद होतोय. कारण एक तर १०० च्या नोटा सहज मिळत नाहीयेत, आणि नवीन नोटा यायचं लांबत चाललंय.
सगळीकडे नुसता गोंधळ चालू आहे. ठिकठिकाणी २००० रु. च्या नवीन नोटा देखील लोक स्वीकारत नाहीयेत. १० रु. चे नाणं देखील का कोण जाणे लोक घेत नाहीयेत. काल एका दुकानात त्यावरून धक्का बुक्की झाली.
सगळीकडे नुसता गोंधळ चालू आहे.
अनिल बोकील साधारण असं म्हणाले की भारतामधे भारतीय चलन स्वीकारण्यास नकार देणे हा फौजदारी गुन्हा आहे. खखोदेजा.
मुलाखतः अनिल बोकील यांची अर्थक्रांती आणि आजची परिस्थिती
श्री अनिल बोकील यांची अर्थक्रांती आणि आज असलेली परिस्थिती या विषयीची लेटेस्ट मुलाखत ए बी पी माझावर घेतली गेली ती पाहण्यात आली. पहा
http://abpmajha.abplive.in/videos/abp-majha-katta-anil-bokil-313842
नोटा रद्द करण्यामुळे महागाई
नोटा रद्द करण्यामुळे महागाई कमी होईल आणि वस्तूंचे भाव खाली येतील हे कोणत्या गृहितकावर आधारित होतं हे समजलं नाही.
मुलाखतीत अनेक "स्वीपिंग स्टेटमेंट्स" होती. (उदा० मोठ्या डिनॉमिनेशनच्या नोटा असणं हे शेतकर्यांच्या आत्महत्येचं कारण आहे, मुक्त अर्थव्यवस्थेत फक्त हॅव आणि हॅवनॉट्स हे दोनच वर्ग असतात, वगैरे.) ही नेहेमी अशीच असतात की या मुलाखतीसाठी सरसकटीकरण केलं होतं?
काहीही झालं तरी "ट्रान्झॅक्शन टॅक्स" (अर्थक्रांतीचं मूळ प्रपोजल) आणू नये हे आपलं माझं वैयक्तिक मत.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
नोटा रद्द करण्यामुळे महागाई
मी मुलाखत बघितली नाही. पण हे विधान काही पूर्णपणे बरोबर वाटत नाही. त्यात तथ्याचा भाग असा आहे की चलनफुगवटा झाला की बाजारात महागाई वाढते - म्हणजे सरकारने जर कर्ज फेडण्यासाठी नोटा छापल्या तर भाव वाढतात - तसंच चलन नष्ट झालं तर बाजारात भाव कमी होतील हे पटतं. याचं कारण तितक्याच वस्तू बाजारात कमी पैशांसाठी स्पर्धा करतील. (क्वांटिटी थियरी ऑफ मनी)
मात्र हे सर्क्युलेशनमध्ये असलेल्या पैशाबाबत आहे. जर तिजोऱ्यांमध्ये पडलेला पैसा अचानक बाहेर आला - बाहेर पडताना कदाचित त्यातला काही नष्टही होईल हे गृहित धरूनही - तरीही काही काळापुरता तरी सर्क्युलेशनमधला पैसा वाढेलच. हा पैसा बॅंकांमध्ये जाईल, बॅंकांकडून कर्जं स्वस्त प्रमाणात मिळतील. म्हणजे पुन्हा पैसा स्वस्त, सर्क्युलेशन जास्त - तेव्हा महागाई वाढेल. लोकं रोखीऐवजी सोनं घेतील - सोन्याचे भाव वाढायला लागतील. कदाचित स्टॉक मार्केटमधले पैसे काढून लोक सोन्यात घालतील. त्यातून सोन्याच्या किमतीत फुगा निर्माण होऊ शकेल. स्टॉक मार्केट किंचित काही आपटू शकेल. अर्थात हे माझे तर्क आहेत. काय होतंय ते आपण पाहूच.
शिवाय महागाई ही बहुधा टोटल
शिवाय महागाई ही बहुधा टोटल मनी सप्लायवर अवलंबून असते. नुसत्या नोटा किती आहेत यावर नाही.
अर्थक्रांतीचे बायर्स मुख्यत्वे मध्यम वर्ग असणारच कारण त्यात इन्कमटॅक्स सहित सर्व टॅक्स रद्द करण्याची शिफारस आहे.
बाकी कॅशलेस सोसायटीकडे वाटचाल हे चांगलेच ध्येय आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
काल बँकेच गेलेलो. सगळं इतक
काल बँकेच गेलेलो. सगळं इतक छान चालू होतं की मी मोदी विरोधक असल्याने मला गोंधळ तयार करायला एका रँडम माणसाच्या कानाखाली मारायला लागली. -- इथि वत्सप्प
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
माझे गोड अनुभव
काल रात्री मी बस स्टॉपवर उभा होतो. एक ओला कॅबवाला आला. मला कुठे जायचंय म्हणून त्यानं विचारलं. मी सांगितलं. त्यालाही त्याच बाजूला जायचं होतं. तो म्हणाला मी सोडतो. मी म्हटलं माझ्याकडे कॅशची तंगी आहे म्हणून तर बस स्टॉपवर उभा आहे ना भाऊ. तो म्हणाला हरकत नाही; १० रुपये द्या. (एरवी रिक्षानं सुमारे ७० रुपये भाडं झालं असतं.) मग मी गाडीत बसलो. आम्ही गप्पा मारल्या. तो म्हणाला परिस्थिती फार तंगीची आहे. लोक बाहेर पडतच नाहीत किंवा पेटीएम वगैरे मार्गानं डायरेक्ट खात्यात भाडं जमा करणारी गिर्हाइकंच भेटताहेत. बँकेत गेलो तरी किमान ३ तास जाणार म्हणजे तेवढा धंदा बुडणार. आता कॅश संपत आली आहे त्यामुळे उद्या ते करणं भागच आहे.
आज दुपारी पुन्हा बस स्टॉपवर उभा होतो. काही वेळानं एक ज्येष्ठ महिला तिथे आली. थोडा वेळ बसची वाट पाहून त्यांनी रिक्षा केली. मला त्यांनी लिफ्ट ऑफर केली. माझं गंतव्य स्थान नेमकं त्यांच्या वाटेवर होतं. मग आम्ही गप्पा मारत प्रवास केला. माझी कॅश वाचली. त्या म्हणाल्या पाहा देवालाच तुमची काळजी होती. मी खरं तर म्हणणार होतो की खरं तर मोदींच्या रूपानंच आपल्याला देव भेटला आहे, किंवा खरं तर मोदींची काळजी देव वाहतो आहे; मी तर केवळ एक सामान्य क्षूद्र पापी माणूस. पण असं काही न बोलता मी फक्त त्यांचे आभार मानले.
तात्पर्य : असे सुंदरसुंदर जीवनानुभव दिल्याबद्दल आणि माणुसकीचा परिमळ माझ्या परिसरात कसा दरवळतो आहे त्याचा दैनंदिन प्रत्यय देण्यासाठी मी पंतप्रधानांचे जाहीर आभार मानतो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
असच
आज एका आजींकडून मोदी हे कलियुगातले कल्की आहेत असं ऐकलं आणि धन्य झालो.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
Malda, India's fake currency
Malda, India's fake currency capital, is feeling the demonetisation pinch
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
जीडीपीच्या २% (टोटल जीडीपीच्या २०%) काळा पैसा नष्ट होईल
इटी एडीटरच्या मते जीडीपीच्या २% (टोटल जीडीपीच्या २०%) काळा पैसा नष्ट होईल.
http://blogs.economictimes.indiatimes.com/et-editorials/new-currency-won...
अजय शहा यांच्या ब्लॉगवरचा हा लेख भराभर वाचलाय. बराच मोठा आहे. पुन्हा एकदा शांत बसून वाचावा लागेल.
https://ajayshahblog.blogspot.in/2016/11/trumping-black-money.html?utm_s...(Ajay+Shah%27s+blog)
लेख पूर्ण वाचला. चांगला
लेख पूर्ण वाचला.
चांगला आहे. मुद्दे पटतात. त्यांनी जो कॉस्ट बेनिफिट चा मुद्दा मांडला आहे तो व्हॅलिडच आहे. पण तसे कॉस्ट बेनिफिट अॅनालिसिस आत्ता करणे शक्य नाही. सर्व धुरळा खाली बसल्यावर किती काळा पैसा उघडकीस आला आणि त्याने पुढील काळ्यापैशाच्या निर्मितीवर किती परिणाम झाला हे पहावे लागेल. तत्काळ बेसिसवर किती पैसा बाहेर आला हे (म्हणजे तो काळा होता हे कळून आले आणि त्यावर दंडात्मक कारवाई झाली) ; आणि दीर्घ काळाने काळ्यापैशाची निर्मिती थांबली का हे पहावे लागेल.
त्यांचे म्हणणे हा सर्वसामान्य* प्रामाणिक लोकांवर मोठ्या कॉस्ट लावणारा तात्पुरता उपाय आहे असे दिसते.
*सर्वसामान्य म्हणजे गरीब लोक असे नाही. ज्यांच्या व्यवसायात मोठा कॅश व्यवहार नेहमीच होत असतो ते व्यावसायिक सुद्धा.
--------------------------------------------------
काळा पैसा म्हणाजे भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा अशी सामान्यपणे मध्यमवर्गीयांची समजूत असते आणि त्यामुळे आपण काळ्यापैशाच्या निर्मितीतले भागीदार नाही अशीसुद्धा त्यांची समजूत असते. खरे तर १३-१४ टक्के व्हॅट/सर्विस टॅक्स लागू नये म्हणून दुकानदाराकडून विदाउट बिल वस्तू खरेदी करणारे किंवा रंगार्याकडून विदाउट बिल रंग लावून घेणारे सुद्धा यातले भागीदार असतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
http://atmsearch.in/ ही एक
http://atmsearch.in/ ही एक वेबसाइट सुरू झाली आहे. तुम्हाला हव्या त्या भागात कोणती ATM चालू आहेत हे त्यावर दिसेल. तुम्हाला कुठलं ATM चालू आहे असं दिसलं तर त्यावर प्लीज अपडेट करा.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
खोट्या नोटांचा प्रश्नही फार मोठा नाही?
खोट्या नोटांचा प्रश्नही फार मोठा नाही?
ऑगस्ट २०१६ मध्ये सरकारने दिलेल्या माहितीनुसार खोट्या नोटांच्या प्रमाणाचा अंदाज फक्त ४०० कोटी रुपयांचा.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
डेली अपडेट
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
त्या रिक्षावाल्याने
त्या रिक्षावाल्याने प्राप्तीकर भरला नसेल तर त्याला धडा शिकवण्यात आलेला आहे. व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न १ रुपया जरी असेल तरी त्याने त्यातला किमान १७% प्राप्तीकर भरायला हवा. प्राप्तीकर भरला नसेल तर ते उत्पन्न हे काळापैसाच. दणका बसला ते बरं झालं. फार लाड झालेत या लोकांचे.
का-ही-ही
लोकांकडे सुट्टे पैसे कमी आहेत, रिक्षावाल्याला कार्डाने पैसे देता येत नाहीत म्हणून लोक रिक्षाने प्रवास टाळत आहेत. तशा अर्थाचा एक प्रतिसाद चिंतातुर जंतूंनी दिलेला आहेच. फेसबुकवर अनेकांनी लिहिलेलं वाचलं की सध्या फुटकळ खरेदी बंद आहे, उगाच टपरीवर जाऊन चहा-सिग्रेट मारणं, उगाच वडापाव किंवा सँडविच खाणं, अशा छापाची.
यात रिक्षावाल्याचा पैसा काळा का गोरा याचा काय संबंध?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हॅहॅहॅ Welcome to पोथिनिष्ठ,
हॅहॅहॅ
Welcome to पोथिनिष्ठ, हस्तिदंति मनोर्यातले Economics.
हस्तिदंती मनोऱ्याची बदनामी थांबवा!
हस्तिदंती मनोऱ्यातल्या लोकांना फडतुसांची दुःखं, गाऱ्हाणी समजत नाहीत. मनोऱ्यातल्या लोकांना मनोऱ्याबाहेरच्यांची काळजी नसते असं नाही; त्यांना त्या लोकांशी संवाद साधता येत नाही. तुम्हाला फडतुसांचं अस्तित्वही सलतं. दोन्हींत किंचित फरक आहे. हस्तिदंती मनोऱ्याची बदनामी थांबवा!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तुम्हाला फडतुसांचं अस्तित्वही
खरंतर आम्हाला फडतूसांचं अस्तित्व सलतंच असं नाही. पण ... त्यांनी त्यांची समानतेची ईर्षा आमच्यावर लादू नये असं आमचं म्हणणं आहे. Liberty includes freedom to be unequal - असं आमचं म्हणणं आहे.
•आज एक इंटिरियर डेकोरेटर
ही कीती उत्तम बातमी आहे. आत्ता पर्यंत लोकांनी कीती व्हॅट चुकवला असेल? आता ह्यापुढे तरी नीट वागावे.
चांगली आणि वाईट
नाही, बातमी उत्तमच आहे. पण त्याहून वैट बातमी ही आहे की या इंटिरिअर डेकोरेटरचे कष्टंबर इतकं झाल्यावरही व्हॅट देणार नाही असं म्हणतायत.
शिवाय हेच कष्टंबर सोशल मीडियावर मोदींच्या धाडसी निर्णयाचं कौतुक करत असतील.
दहा लाख सामान्य लोक > एक हजार इंटिरिअर > दहा सप्लायर > एक मॅन्युफॅक्चरर. या साखळीतले दहा लाख लोक व्हॅट भरणार नाही म्हणतायत.
देश बदल रहा है.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पण त्याहून वैट बातमी ही आहे
थत्तेचाचा - ही काय तुमच्यासाठी नविन बातमी आहे का? मोदीनी स्वताच्या मतदारांना पण सोडले नाही हे तुम्हाला कबुल करावे लागेल
ह्याच उदाहरणात इंटीरीअर डेकोरेटर ला धंदा पाहिजे असेल तर स्वताच्या किमती कमी करुन ग्राहकाला पूर्वी इतक्याच किमतीत सेवा देऊ शकतो. नकोच असेल धंदा तर ठीक आहे.
कर चुकवण्याचे मार्ग कमी आणि जास्त कष्टप्रद झाले की लोक सुधारतील.
•आज एक रिक्षावाला भेटला.
•आज एक रिक्षावाला भेटला. पन्नास टक्के धंदा बसला आहे म्हणाला.
त्याला २५% म्हणायचं असावं, कारण एरवी सगळं आलबेल असताना हे माजुरडे रि़क्षावाले पब्लीकला जिथे जायचं असतं तिथे येत नाहीत; झोपा काढतात नाहीतर रस्त्यावर पिचकार्या मारत बसतात. त्यांचा ५०% धंदा तिथेच बसलेला असतो. आता काही दिवस बसा म्हणावं बोंबलत.
बाकी, कितीतरी रिक्षावाले पेटीय्मवर पैसे घेतात. ओला वरून रिक्षा मागवता येते जिथे कॅश द्यावी लागत नाही.
•आज एक इंटिरियर डेकोरेटर मैत्रीण भेटली. सगळा धंदा बसला आहे म्हणाली. तिचे पुरवठादार म्हणतात की कॅश द्या नाही तर व्हॅट भरा. तिचे क्लायंट म्हणतात की व्हॅट भरणार नाही आणि कॅश नाही.
तुमची मैत्रीण कॅश घेते म्हणजे तिचा काळा पैसा आहेच तेव्हा तिच्या धंद्यावर परिणाम झाला ते योग्यच (हेच इतर धंदेवाल्यांनीही लागू). तिच्या क्लायंटचं काम अर्धवट राहिलं आणि त्यांना अप्रत्यक्ष झळ पोचतेय ते पण योग्यच्.
-अनामिक
सुदैवाने
पाचशेच्या नोटा नव्हत्या. हजाराच्याही नाही. जवळ कधीच रोख पैशे ठेवत नसल्याने डोक्याला ताप नाही. जय हो!
इथं ओळखीच्या काही लोकांकडे पंधरा-वीसहजार वगैरे रुपै होते. धावतपळत एअरपोर्टवर जाऊन एक्चेंज करायचा प्रयत्न केला तर ती 'सुविधा' एक दोन दिवसात बंद झाली आहे असे कळले. आता सुटीच्या कालावधीत कोणी भारतात जाणार असेल तर चेंज करुन आणण्याची विनंत्या चालू आहेत.
----
घरी आईबाबांकडे ( त्यांचा एटीएमवगैरेंवर विश्वास नसल्याने ) दवाखाना-हॉस्पिटल वगैरे इमर्जन्सीला लागतील म्हणून काही कॅश होती. ती डिपॉझिट करण्यासाठी बँकेच्या वाऱ्या चालू आहेत.
एक शंका
ज्यांच्याकडे काळा पैसा आहे असा प्रामुख्याने दावा केला जातो - बिल्डर्स, शरद पवार, सोनिया गांधी, इतर राजकारणी वगैरे. यापैकी किती लोक बँकांच्या लायनीत दिसत आहेत? की यांनी त्यांच्या पैशावर पाणी सोडले?
स्वतः बारामतीला
परवा मोदी स्वतः बारामतीला जाऊन पवारांचा सगळा काळा पैसा बाहेर काढून पवारांना जबर दंड करून देशोधडीला लावून आले म्हणे !!
http://www.loksatta.com/agralekh-news/narendra-modi-and-their-ministers-...
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
बँकेच्या रांगेत उभे राहणारे
बँकेच्या रांगेत उभे राहणारे पब्लीक हे जनरली मध्यमवर्गीय पब्लीक आहे ज्यांना लगेचच पैश्यांची गरज आहे. तुम्ही म्हणताय त्यापैकी किती लोकांना तातडीने चार ते दहा हजाराची गरज असू शकते. शिवाय ते रांगेत उभे असले (नेता, सेलेबब्रिटी सोडून) तर कोणाच्या लक्षात येणार आहे की हा मोठ्ठा बिल्डर आहे म्हणून. शरद पवार, सोनिया गांधी एरवी किती जणांना बॅकेत जाताना दिसलेत म्हणून आता दिसतील. शिवाय ३० डिसेंबर पर्यंतची मुदत असताना हे लोक लगेच घाईने रांगेत का उभे राहतील. ह्या लोकांचा मुख्य प्रश्न असा आहे की असलेल्या अनधिकृत रकमेची विल्हेवाट कशी लावायची? विल्हेवाट नाही लावता आली तर त्यांना ह्या पैश्यांवर पाणी सोडायलाच लागेल, पण जाहीरपणे कोण कबूल करेल?
जनरल पब्लीकला थोडा त्रास होतोय हे मान्य आहे, पण त्याबद्दल फारशी कुणाची तक्रार दिसली नाही. तक्रार असेलच तर ५ ते १०% लोकांची जो काही फार मोठा आकडा वाटत नाही. टाईम्स न्यूजवर घेतलेल्या पोलमधे ८२%मत "गुड आयडीया, वेल एक्झीक्युटेड" १४% मत "गुड आयडीया बॅडली एक्झीक्युटेड" आणि ४% मत "बॅड आयडीया बॅडली एक्झीक्युटेड" असे दिसते ह्यावरून लोकांना डिमोनीटायझेशन बद्दल काय वाटते ते लक्षात यावे.
-अनामिक
या पोलचा दुवा द्या ना.... मी
या पोलचा दुवा द्या ना....
मी काल एक ८२% पाठिंबावाला पोल पाहिला होता. पण तो ८ आणि ९ तारखेचा होता. जेव्हा फक्त निर्णय कळला होता. अंमलबजावणीचा घोळ कळलेला नव्हता. तुमच्या पोलमध्ये बॅड इम्प्लिमेंटेशन वगैरे वाले लोक दिसतात तर त्याचा दुवा द्यावा.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
Poll: What do you think of
Poll: What do you think of the demonetisation of notes?
http://toi.in/3dvM2a/a19li
-अनामिक
अच्छा . सिंगल क्वेश्चन पोल.
अच्छा . सिंगल क्वेश्चन पोल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ह्यात काही प्रॉब्लेम आहे का?
ह्यात काही प्रॉब्लेम आहे का? अशा पोल मधून पब्लीकचा कल कळत नाही का? जेन्युइनली विचारतोय.
-अनामिक
ऑनलाईन पोलचा काय उपयोग?
ऑनलाईन पोलचा काय उपयोग? ग्रामीण भागाचा सहभाग नाही यात. DCCB मधे नोटा बदलून मिळत नाहीत, DCCB च्या कस्टमर्सना विचारलं तर, "गुड आय्डीआ, बॅडली एक्झिक्यूटेड" ला बहुमत मिळेल.
ऑनलाईन पोलचा काय उपयोग?
हाहाहा
हास्य उपरोधिक आहे असे वाटले.
हास्य उपरोधिक आहे असे वाटले. पण उपरोध का ते कळले नाही.
जिल्हा मध्यवर्ती बँकात अदलाबदल व पैसे जमा करायला घातलेल्या बंदीने बर्याच ओळखीच्या व्यक्तिंना व कुटुंबियांना त्रास होत आहे, रांगेत उभे रहायला लोकांची ना नाही पण आपले खाते असलेल्या सरकारी बँकेत पैसे बदलून मिळत नाहीत (किंवा जमा करुन घेतले जात नाहीत) त्यामुळे ताप होत आहे.
जिल्हा ब्यांकात बदली नकोच.
जिल्हा ब्यांकात बदली नकोच. भ्रष्टाचाराचं आगर असते ते.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
किमान दोन कोटी लोक असे आहेत
किमान दोन कोटी लोक असे आहेत ज्यांचं फक्त जिल्हा बँकेतच अकाउंट आहे. असं आजच्या मटाचा अग्रलेख म्हणतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
केवळ बदली अलाउड नाही. डिपॉझिट
केवळ बदली अलाउड नाही. डिपॉझिट अलाउड आहे माझ्या माहिती प्रमाणे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
डिपॉ़झिटही चालत नाही -
डिपॉ़झिटही चालत नाही - https://www.rbi.org.in/scripts/BS_PressReleaseDisplay.aspx?prid=38576
ओह.. ओके
ओह.. ओके
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
सामान्य लोकांची जिल्हा
सामान्य लोकांची जिल्हा ब्यांकात खाती नसतात असा समज असेल तर तो चुकीचा आहे. तसा तर आख्खा भारत देश भ्रष्टाचाराचं आगर आहे. शिवाय ही उपरती ४-५ दिवसांनी का झाली? आरबीआयने पुरेशी पर्यायी व्यवस्था करून मग जिल्हा बँकेतली बदली रद्द करायची.
जिल्हा सहकारी बॅ़ंकामधे
जिल्हा सहकारी बॅ़ंकामधे केवायसी नियमांचे नीट पालन केले गेले नसल्यामुळे, तिथे जमा होणार्या पैश्याबद्दल ( त्याच्या स्रोताबद्दल ) आरबीआय ला शंका आहेत. सुक्या बरोबर ओले जळते ह्या न्यायानी तुमच्या नातेवाइकांना त्रास होतोय. पण असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ हे सर्वांनीच लक्षात ठेवावे.
पाने