Skip to main content

चित्रपट

रा. पु. जोशी

रुढ अर्थाने ही समीक्षा नाही. कारण समीक्षाकाराला चित्रपटाच्या तांत्रिक बाबींचीही माहिती असायला हवी. पण एक सामान्य प्रेक्षक म्हणून काय वाटले ते मांडण्याचा प्रयत्न करतो..

शक्यतो गोष्ट विस्ताराने न उलगडता लिहिली आहे. त्यामुळे , हे वाचूनही ज्यांना हा चित्रपट बघायचा असेल, त्यांनीही हे वाचायला हरकत नाही.

रामचंद्र पुरुषोत्तम जोशी, नांवाचा चित्रपट आला आहे असे कळल्यावर, तो जरा वेगळा, आशयघन असेल असे वाटले होते. म्हणून बघायला गेलो. रिकामे प्रेक्षागृह पाहून तर, हा नक्कीच अ‍ॅवॉर्ड जिंकणारा असावा असे वाटू लागले होते.

समीक्षेचा विषय निवडा

'इन्व्हेस्टमेंट'

१९९०च्या दशकात किंवा नंतर जी मध्यमवर्गीय पिढी कमावती झाली, तिला आर्थिक उदारीकरणाचे अनेक फायदे मिळाले. त्यामुळे ह्या मध्यमवर्गाची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरीत्या सुधारली. पण त्यासोबत मध्यमवर्गीय विचारसरणीतदेखील हळूहळू काही बदल झाले. एखादं सरकारी खातं किंवा बॅंकेत कायमची नोकरी पटकावली, कर्ज काढून छोटा फ्लॅट घेतला म्हणजे आयुष्य सफल झालं, ह्या तेव्हाच्या मध्यमवर्गीय मानसिकतेतून हा वर्ग बाहेर आला. साध्या राहणीची जागा चैनीनं घेतली.

समीक्षेचा विषय निवडा

SHIP OF THESEUS

काल SHIP OF THESEUS हा सिनेमा बघण्याचा योग आला. अनेक जणांकडून हा सिनेमा चुकवू नकोस असं सांगण्यात आलं होतं. एकदा जाऊन तिकिटं न मिळणं हा सुखद धक्का देखील बसला होता. कालही सिनेमा हाऊस फुल्ल होता. एका ठिकाणी वाचलं होतं की पहिल्या विकांता चं कलेक्शन अंदाजे २५ - २७ लाख झालं . हा देखील एक सुखद धक्का . कारण याच आठवड्यात निखिल अडवानी चा D-DAY प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला आलेला प्रेक्षक वर्ग हा सिने आणि जाहिरात व्यवसायाशी निगडित असणारा होता आणि काही माझ्या सारखे चुकार लोक .

समीक्षेचा विषय निवडा

धुरंधर : रागाचे आणि बदल्याचे राजकारण

युद्धविषयक चित्रपट राष्ट्रवाद, सैनिकांचे शौर्य आणि राष्ट्रीय एकता ह्या विषयांवर केंद्रित असतात. पण ‘धुरंधर’ वेगळा आहे का?

All we imagine: स्वचा शोध

'लोक काय म्हणतील', 'हे असं वागायचं असतं म्हणून मी असं केलं', ह्या प्रेरणेतून दाखवलेल्या चांगुलपणामुळे आपण खरंच चांगली व्यक्ती ठरतो का? All We Imagine As Lightमध्ये घेतलेला स्वचा शोध.

समीक्षेचा विषय निवडा

सावरकर - एक अंतर्मनाला भिडणारा सिनेमा

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट हा पूर्णपणे सावरकारमय राष्ट्रभान समृद्ध करणारा अनुभव आहे. वि. दा. सावरकर यांचा बायोपिक खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यलढ्याचा संकीर्ण इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर काळातील व्यवस्थेने नाकारलेला महानायक याचा कालपट असणं सहाजिकच आहे. सावरकरांचे विचार हे सहजासहजी पचत नाहीत. कारण त्यांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिका ह्या अंगिकारून समाजात वावरणं राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांना शक्यच नाही. प्रत्येकाने आपापल्या विचारधारेला अनुसरून सावरकर आपले केले आहेत.

समीक्षेचा विषय निवडा