Skip to main content

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग ९

Part | | | | | | |

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.

यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===================================================
ब्रिटिशांनी एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बहुतांश भारत जिंकून घेतल्यानंतर भारतातला अंमल स्थिरावू लागला होता. त्या काळात ब्रिटिशांनी संस्थानांशी करारमदार केले होते. पण क्षुल्लक कारणावरून ते मोडीत काढायचे प्रकार लॉर्ड डलहौसीने केले. त्यातून असंतोष निर्माण होऊन १८५७ चे बंड उद्भवले.

ते बंड ब्रिटिशांनी मोडून काढले. १८५८ मध्ये ब्रिटनच्या सरकारने भारताचा ताबा ईस्ट इंडिया कंपनीकडून स्वतःकडे घेतला. त्या वेळी राणीने जाहीरनामा काढून प्रजाजनांना आणि संस्थानिकांना आश्वासने दिली.

त्यानंतर कोणत्या काळात ब्रिटिशांना असे वाटले असेल की आता आपले भारतावरचे राज्य चांगलेच सुरक्षित झालेले आहे?
इतिहासात डोकावले तर १८६२ मध्ये मुंबईच्या किल्ल्याच्या भिंती पाडण्यात आल्या असे दिसते.

१८८५ मधल्या काँग्रेस स्थापनेच्या काळात तरी ब्रिटिशांना उठाव वगैरे होण्याची भीती वाटत नसावी असे दिसते.

ऋषिकेश Fri, 04/04/2014 - 14:17

त्यानंतर कोणत्या काळात ब्रिटिशांना असे वाटले असेल की आता आपले भारतावरचे राज्य चांगलेच सुरक्षित झालेले आहे?

माझ्या मते खिलाफत चळवळीपर्यंत(१९१९?) ब्रिटिशांचा विरोध मराठा, पंजाब व बंगाल प्रांतातही पॉकेट्समध्ये होता. असहकार चळवळीने त्याला पहिल्यांदा देशव्यापी म्हणता येईल असे मोठे रूप दिले. तेव्हा तोवर आपले राज्य बर्‍यापैकी सुरक्षित आहे असे इंग्रजांना वाटत असावे असे म्हणता का?

टिळक (किंवा लाल-बाल-पाल) यांच्या कार्यकाळात असंतोष होताच पण तख्ताला मुळातून हादरे बसावे असे देशव्यापी काही घटले नव्हते, राईट?

मन Fri, 04/04/2014 - 14:26

कोब्रापोस्टच्या स्टिंग ऑपरेशनची कालपासून इतकी चर्चा का सुरु आहे ?
बाबरी पाडली गेली ती निव्वळ फावड्या-कुदली वापरुन नाही; तर आतून डायनामाइट स्टाइअल काहीतरी पेरुन्/स्फोट करुन
ही चर्चा पूर्वीही होतीच. त्याकाळात पाडापाडिसाठी गेल्याचा दावा करणारी मंडळी मागील किमान वीस वर्षे मला हेच सांगत आहेत
की योजनाबद्ध पद्धतीने आतूनच ते कसे उडवले गेले वगैरे.
तिकडे डॉ झाकिर नाइक हा मुस्लिम धर्मप्रचारक peace tv वगैरेवर प्रवचन करताना ह्या घटनेचा उल्लेख करताना
बाबरी स्फोट करुन उडवली गेली असाच करतो.
थोडक्यात, कोब्रापोस्टच्या आधीही ह्या प्रकाराची चर्चा होतीच.
लोकं आत्ताच एकदम धक्का बसल्यासारखी किंवा दचकल्यासरखी का करताहेत ?
देवबंद वगैरेच्या इलाख्यात काही पुस्तके असतात. मुस्लिमांवर वाईट वेळ आलेली असल्याने मुस्लिमांनी एकजूट व्हायला पाहिजे वगैरे स्टाइलची.त्यातही हाच उल्लेख असतो.
करकरे कामटे साळसकर ह्यांना ज्यू - हिंदुत्ववादी नेक्ससने मारल्याचा उल्लेख असलेलं एक पुस्तक आहे
"करकरे को किसने मारा" असल्या काहीतरी शीर्षकाचं. ते त्या लोकांत वर्ल्ड फेमस आहे.
आता उद्या त्यातली माह्तिई काढून कुनीतरी नव्यानच स्टिंग करतोय असाअ आव आणला तर कसं वाटेल ?

आदूबाळ Fri, 04/04/2014 - 14:38

ब्रिटिशांना भारतात कधीच सुरक्षित वाटलं नाही. म्हणजे "आचंद्रसूर्य नांदो, पारतंत्र्य भारताचे" या अर्थाने. "आपण या भूमीत पाहुणे आहोत, थोडक्या श्रमात आपला जास्तीत जास्त फायदा करायला आलो आहोत" असाच कायम त्यांचा दृष्टिकोन राहिला. ब्रिट मूळचा व्यापारी (ट्रेडर). त्यासाठी भारतावर राजकीय सत्ता मिळवणे हा साईड बिझिनेस नाईलाजाने करावा लागला.

मोर्ले-मिंटो यांच्या आपसांतल्या पत्रव्यवहारात "(भारतावर सत्तेचा हा खेळ) अजून किती दिवस रेटता येणार आहे काय माहीत" अशा आशयाचं वाक्य आहे.

नितिन थत्ते Fri, 04/04/2014 - 14:47

In reply to by आदूबाळ

तशा अर्थी त्यांना सुरक्षित कधीच वाटलं नसेल.
त्यांना अफगाणिस्तान बाजूने नेहमी धोका वाटत असे. तसेच रशियाचा झार स्वारी करेल अशीही भीती वाटत असे. म्हणून भारतात स्टॅण्डर्ड गेज ऐवजी ब्रीड गेज रेल्वे आली असे कुठेतरी वाचले होते.

पण भारतातून अंतर्गत धोका आता नाही असे कधीतरी वाटले असेलच. ते नेमके कधी? असा प्रश्न आहे. ज्या अर्थी फोर्टच्या भिंती पाडल्या त्या अर्थी मुंबईत किल्ल्याचा आसरा घ्यावा लागणार नाही असे त्यांना वाटू लागले असावे.

आदूबाळ Tue, 08/04/2014 - 17:04

आज एकीने येड्यात काढलं:

शाळेत असताना "स्वतःभोवती फिरणारं --> rotating" आणि "दुसर्‍या गोष्टीभोवती फिरणारं --> revolving" असं शिकलो होतो. Earth rotates, moon revolves around earth.

हा हिशोबाने स्वतःभोवती गोल गोल फिरणार्‍या दरवाज्याला rotating door म्हणालो तर सहकारीण हसायला लागली. म्हणाली अरे ते revolving door!

असं का बरं?

'न'वी बाजू Tue, 08/04/2014 - 17:26

In reply to by आदूबाळ

...सहा काडतुसांकरिता जागा (खाने) असलेले, आणि एक काडतूस उडवून झाल्यावर दुसरे काडतूस ऑपॉप लोड करणारे पिस्तूल (रिव्हॉल्व्हर) नेमके कशाभोवती गरागरा फिरते?

नगरीनिरंजन Tue, 08/04/2014 - 18:56

In reply to by 'न'वी बाजू

दाराचा आणि रिव्हॉल्व्हरच्या चेंबरचा अक्ष रोटेटिंग असतो आणि त्या अक्षाभोवती दार किंवा चेंबर रिव्हॉल्व्ह होते असे असेल.

आदूबाळ Tue, 08/04/2014 - 19:06

In reply to by नगरीनिरंजन

हां मलाही हेच सुचलं होतं, पण त्या अर्थाने प्रत्येक फिरणारी वस्तू कोणत्यातरी अक्षाभोवतीच फिरते. तो अक्षाचा बिंदू कितीही सूक्ष्म असू शकतो. म्हणजे सगळंच revolving. rotating काहीच नाही.

धनंजय Tue, 08/04/2014 - 19:58

In reply to by आदूबाळ

परिभ्रमण आणि पैर्वलन यांच्यामध्ये अर्थभेद/विवक्षा.

काही पिंडांकरिता विवक्षा उपयुक्त, काही पिंडांकरिता नाही.

काही पिंडे एकाच वेळी अनेक प्रकारे वळतात. (१) पहिल्या वलनात अक्ष पिंडामधून जातो (२) दुसर्‍या वलनात अक्ष पिंडाच्या सापेक्ष कुठेही असू शकतो - आत किंवा बाहेर. (प्रकार २ची अनेक वलने असू शकतात).

तर प्रकार १ चे वलन हे प्रकार २च्या वलनांचा विशेष प्रकार आहे (स्पेशल केस, सबसेट). काही पिंडांमध्ये प्रकार १ चे एक वलन आणि प्रकार २चे एक वलन चर्चेकरिता आणि हिशोबाकरिता अधिक उपयोगी असते. अशा पिंडांच्या बाबतीत प्रकार १ आणि प्रकार २ च्या वलनांमध्ये फरक करणे उपयुक्त असते. अशा पिंडांच्या बाबतीत सामान्य संज्ञा वापरली, तर "विशेष संज्ञा नाही" असा संकेत आहे. म्हणून (१) पृथ्वीचे परिवलन आणि (२) पृथ्वीचे परिभ्रमण = परिवलन सोडून बाकी सर्व वलने, असे मानण्याचा संकेत आहे.

काही पिंडे मात्र (उपयुक्त वर्णनाकरिता) केवळ एकाच प्रकारे वळतात. उदाहरणार्थ रिव्हॉल्व्हिंग डोअर किंवा रिव्हॉल्व्हर पिस्तूल. त्या पिंडांकरिता दोन संज्ञांची गरज नाही. त्यामुळे महासंज्ञा वापरली, तरी चालते.

----
भाषांमध्ये महासंज्ञा हीच संदर्भानुसार विशेषसंकुचित संज्ञा करण्याची लकब पुष्कळदा दिसते. येथे उदाहरण इंग्रजीतले आहे, सुचले तर पुढे मराठी उदाहरणही देतो.
जनावरांच्या एका प्रजातीला "horse" असे नाव आहे. ही महासंज्ञा आहे, हे कधीकधी लक्षात येत नाही.
Every mansion had at least one horse for riding or drawing a carriage.
येथे horse म्हणजे नर की मादी अशी विवक्षा न करणारी महासंज्ञा आहे.
मात्र
The mansion had one horse and one mare in its mews.
येथे संदर्भामुळे horse ही महासंज्ञा नसावी आणि लिंगविवक्षित नर असल्याचा संकेत मिळतो.

---
मराठी उदाहरण : गाव (महासंज्ञा म्हणून पुणे आणि गुंजवणे [राजगड पायथा]) ही दोन्ही गावे आहेत. परंतु संदर्भानुसार गरज असल्यास पुणे हे गाव-नव्हे-तर-शहर आहे; गुंजवणे हे शहर-नव्हे-तर-गाव आहे.

रिव्हॉल्व्हर आणि रिव्हॉल्व्हिंग डोअर उदाहरणांमध्ये रोटेशन/रेव्होल्यूशन विवक्षेची गरज नसल्यामुळे महासंज्ञा वापरता येते.

मन Wed, 09/04/2014 - 09:40

In reply to by मी

हल्ली ऐसीवरच्या दर दुसर्‍या प्रतिसादात पॉप्युलर कल्चर ही संज्ञा का असते ?
"रोचक" हा शब्द मागच्या दोन तीन वर्षात इतका वापरात कसाकाय आला ?
(अमुक रोचक आहे, तमुक रोचक ठरावं."रोचक माहिती")
अदितीच्या लेखनात अचानक अगदि वेगळी चर्चा सुरु असली तरी स्त्रीवाद कसा काय येतो ?
.
.
मला वाटतं आपलं स्वतःचं असं काही आपण क्वचित स्वतःच्याच नकळत मानलेलं असतं.
ते आपल्या मनात कुठेतरी समोर आलेल्या हरेक घटनेच्या तपशीलाशी आपलं मन जोडू पहातं.

मेघना भुस्कुटे Wed, 09/04/2014 - 09:51

In reply to by मन

'रोचक'बद्दल - मराठी आंतरजालाची देणगी असावी बहुधा:

रोचक
अंमळ
सरसकटीकरण
विदा
विरोप
खरड

ही तर निव्वळ नामं वा विशेषणं झाली. वाक्प्रचार आणि तत्सम शब्दसमूहांची नोंद घ्यायची झाली, तर वेगळा धागाच काढावा लागेल!

मी Wed, 09/04/2014 - 11:23

In reply to by मन

>>हल्ली ऐसीवरच्या दर दुसर्‍या प्रतिसादात पॉप्युलर कल्चर ही संज्ञा का असते ?

पॉप्युलर कल्चरला 'मानवी चेहरा' असल्याने मी ती संज्ञा वापरली ;) आणि तसेच सरसकटीकरण करुनही सरसकटीकरणाचा शिक्का टाळता येतो. पण 'पॉप्युलर कल्चर'ला मराठी नाव सुचवा बरे (जनप्रवाह?)

>>मला वाटतं आपलं स्वतःचं असं काही आपण क्वचित स्वतःच्याच नकळत मानलेलं असतं.
ते आपल्या मनात कुठेतरी समोर आलेल्या हरेक घटनेच्या तपशीलाशी आपलं मन जोडू पहातं.

छे, तुम्ही 'वैचारीक बैठक' हा शब्द वापरायला हवा होता.

मन Wed, 09/04/2014 - 11:30

In reply to by मी

http://www.aisiakshare.com/node/1303 ह्या धाग्यातून साभार :-
जनसंस्कृती = पॉप्युलर कल्चर.

किंवा मूळ प्रतिसाद पुन्हा लिहायचा झाला तर असा लिहिता येइल :-
"रिव्हॉल्व्हिंग डोअर हे पॉप्युलर कल्चरमधील नाव आहे पण तांत्रिक दृष्ट्या दोन्ही नावे योग्य आहेत. "
ऐवजी :-
रिव्हॉल्व्हिंग डोअर हे नाव प्रचलित आहे पण तांत्रिक दृष्ट्या दोन्ही नावे योग्य आहेत.
किंवा:-
रिव्हॉल्व्हिंग डोअर हे लोक्प्रैय/लोकांच्या सर्रास वापरातलं नाव आहे पण तांत्रिक दृष्ट्या दोन्ही नावे योग्य आहेत.

नितिन थत्ते Wed, 09/04/2014 - 11:51

In reply to by मन

>>तांत्रिक दृष्ट्या दोन्ही नावे योग्य आहेत

इंजिनिअर लोक्स मोटर्स, जनरेटर्स टर्बाइन्स यांना रोटेटिंग मशीन्स असे संबोधतात. (रिव्हॉल्व्हिंग मशीन्स म्हणत नाहीत).

मन Wed, 09/04/2014 - 12:01

In reply to by नितिन थत्ते

माहितीबद्दल आभार.
पण मी त्यांना "पॉप्युलर कलचर" ह्या संज्ञेला पर्यायी काय संज्ञा, शब्द वापरावे ते सांगत होतो.
बाकी, ऐसीवरच्या अशा गहनगंभीर आणि रोजच्या जीवनाशी अतिनिगडित चर्चा वाचून डोके रोटेट का रिव्हॉल्व्ह व्हायला लागते ब्वॉ .
;)

नितिन थत्ते Wed, 09/04/2014 - 12:09

In reply to by मन

अर्रर्रर्र...

तुम्हाला पर्टिक्युलरली उद्देशून नव्हतं ते. जनरल रिव्हॉल्व्हिंग रोटेटिंगवर प्रकाशझोत पाडायचा क्षीण प्रयत्न होता.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 10/04/2014 - 20:44

In reply to by मन

अदितीच्या लेखनात अचानक अगदि वेगळी चर्चा सुरु असली तरी स्त्रीवाद कसा काय येतो ?

असे गैरसमज का निर्माण होतात, हा मला पडलेला छोटा-मोठा प्रश्न आहे.

मी केलेलं गेल्या काही महिन्यातलं लिखाण हे -
अलीकडे काय पाहिलंत - १० - दोन लोकांच्या मैत्रीवर असलेल्या चित्रपटाबद्दल.
(त्यातल्या त्यात `खाणेबल' सिरीयल....) - निव्वळ दंगा
चिलॅक्स! - सांगायचा मुद्दा 'दिल पे मत ले यार', माफक मजा
ही बातमी समजली का? - १४ - सई परांजपे यांच्या सदराचा दुवा. हे सदर स्त्रीवादी नाही.
शुद्धलेखन चिकीत्सक - तंत्रज्ञान संबंधित
पैशाला पासरी मुलाची गोष्ट - दंगा करायचा म्हणून दंगा
"ब्रेकिंग न्यूज" - कृष्णविवरं नाहीतच - स्टीफन हॉकिंग - खगोलशास्त्र

यात एकही विषय स्त्रीवादाशी संबंधित नाही. म्हणून गेल्या काही दिवसात लिहीलेले प्रतिसादही पाहिले. वरवर नजर टाकली तर ५-१०% प्रतिसाद स्त्रीवाद किंवा त्याच्याशी संबंधित असतील असं वाटलं. मी नास्तिक आहे, धर्म-रूढी-परंपरा याचा मला बराच कंटाळा आणि काही प्रमाणात तिटकारा आहे, विज्ञान आणि विज्ञानवादी दृष्टीकोन याबद्दल प्रेम आहे, यामुळे मी स्वतःला उदारमतवादी समजते (आणि उदारमतवादी व्याख्येनुसार स्त्रीवादी ठरतात), मला ठराविक प्रकारचे चित्रपट आवडतात- त्याबद्दल मी लिहीते, अधूनमधून फोटो काढते आणि ते ही इथे डकवते, पण ते सगळं सोडून माझी ओळख स्त्रीवादी एवढीच मर्यादित) का बनते?

कोणत्याही माणसाची ठराविक एवढी मर्यादित ओळखच का बनते? (दुसरं उदाहरण, राहुल गांधींवर टीका केली, सोनिया गांधींना विठोबाची उपमा दिली तरी नितिन थत्तेंवर गांधी घराण्याचे भक्त असण्याचा शिक्का बसतो.) आपल्याला तशी ओळख बनवणं सोयीचं असतं म्हणून असं होतं का? का आपण एका व्यक्तीकडून एकाच प्रकारची अपेक्षा ठेवतो आणि बाकीचं विस्मरणात जातं? अशा प्रकारे एका व्यक्तीला एका खणात मर्यादित ठेवण्याच्या विचारांचा, सोयीस्कर विचारांचा माणसाला उत्क्रांतीमधे काही फायदा होत असेल, का हे फक्त electrons follow the path of least resistance मुळे होतं? इत्यादी. (आणि इथेही विषय काही एक सुरू आहे, पण मला त्यावरून उत्क्रांती आठवली. स्त्रीवाद नाही.)

यावरून कालच पाहिलेला 'हर' नावाचा झकास चित्रपट आठवला. प्रमुख पात्राचं त्याच्या ओ.एस.वर प्रेम जडतं. आणि त्याला ती आवडण्याचं मुख्य कारण असतं की ती एकच एक प्रकारची 'व्यक्ती' नसते. (चित्रपटातली ही एक छोटीशी बाब आहे, बाकी चित्रपटाचा पट बराच व्यापक आहे.)

बॅटमॅन Fri, 11/04/2014 - 13:44

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ही प्रतिमा फक्त गेल्या काही महिन्यांच्या लिखाणावरून बनलेली नाही इतकेच फुल विनम्रता के साथ इ.इ. निदर्शनास आणून देऊ इच्छितो. झालंच तर नुस्ते लेखन नै, प्रतिसादांवरूनही प्रतिमा ठरत असते. त्यामुळे असा आव आणण्याला अर्थ काहीच नाही.

(श्रेणीदात्यांनो, द प्रतिसाद इज़ ऑल युवर्स! होऊदे श्रेण्यांचा खर्च.)

गवि Wed, 09/04/2014 - 12:12

निवडणुकीत NOTA अर्थात नन ऑफ द अबोव्ह असे मत देण्याचा हक्क बरीच वर्षे केलेल्या संघर्ष / खटला / लढा आदिनंतर "मिळाला" आणि (त्यामुळे) आता मतदान टाळण्याची कोणतीही सबब लोकांनी सांगू नये अशा अर्थाचं भाष्य काल लोकसत्ता आणि अन्यत्र वाचलं. एकूणच अन्य काही देशांप्रमाणे हा हक्क आता भारतातही लागू झाल्याचा आनंद / विजय अनेकांच्या बोलण्यालिहीण्यात दिसला.

मला काही, कदाचित अडाणी, शंका आहेतः

१. नन ऑफ द अबोव्ह असे "सरसकट कोणीच नको" स्वरुपाचे मत अधिकृतपणे मतदानयंत्रावर नोंदवता येण्याच्या बटणाने काय साध्य झाले?
२. अधिकृतपणे असे तटस्थ मत नोंदवून त्याचा काउंट रीतसर नोंदवला जाईल हे मान्य.. पण.. त्याने निकालाच्या आउटकममधे काही फरक पडणार आहे का? काहीच नाही असं सध्या दिसतंय.
३. मला निगेटिव्ह व्होट देण्याचा(एखाद्या उमेदवाराला व्होट डाऊन करण्याचा)हक्क असता तर त्यात बर्‍यापैकी इन्टेलिजन्स आहे असं म्हणता आलं असतं, कारण एखादा उमेदवार जिंकण्यापेक्षाही दुसरा एखादा आवर्जून जिंकू नये यासाठी मी देऊ शकत असलेलं जास्तीतजास्त योगदान (त्याचे एक मत कमी करणे) हे करण्याचा हक्क निदान आउटकममधे थेट फरक घडवणारा आहे. (म्हणजे "अ","ब" किंवा "ड" यापैकी कोणीही चालेल पण तो गुन्हेगार "क" नको.. असा जास्त स्पेसिफिक चॉईस मला उपलब्धच नाही, आणि त्याआधी अ ब क ड हे चारही नकोत असा एकच घाऊक न-निवडीचा हक्क (टेक वन ऑर लीव्ह ऑल) मात्र आम्ही भांडून प्रायॉरिटीवर मिळवला?!)
४. पण केवळ मला कोणीच पसंत नाही हे तात्विक मत नोंदवून (तेही अ‍ॅनॉनिमस हे ओघाने आलेच) आणि अशा मतांचा एक आकडा आंत्रपुच्छाप्रमाणे निकालाच्या आकड्यांत जोडून काय सिग्निफिकंट फरक पडणार?

समजा एका वॉर्डात १०० मतदार आहेत

पूर्वी त्यातले ५० मतदानाला यायचे. त्यातले ४० "अ" उमेदवाराला मत द्यायचे, ५ "ब" उमेदवाराला आणि इतरजण एकटेदुकटे कोणी "क" उमेदवाराला.

म्हणजे ५० लोक उदासीन, ५० अ‍ॅक्टिव्ह, ४० मते मिळालेला "अ" विजेता.

असे चित्र पूर्वीही स्पष्ट होत होतेच. (किती टक्के मतदान झालं याची आकडेवारी जाहीर करता येतेच)

आता १०० पैकी ६० मतदानाला आले.

१० लोकांनी NOTA ऑप्शन वापरला.
५० जणांनी प्रत्यक्ष उमेदवारांना मत दिले.
४० जणांनी "अ"
५ जणांनी "ब"
इतरांनी "क"

यातही ४० उदासीन, १० अधिकृत उदासीन (फारतर बेफिकिर व्हर्सेस अ‍ॅक्टिव्ह उदासीन)

सर्वाधिक ४० मते मिळालेला "अ" विजेता.

फरक इतकाच झाला की १० नोंदणी झालेले पण तात्विक विधान करण्यापलीकडे कोणताही फरक करु न शकणारे NOTA दिसले. म्हणजे १० लोकांची नाराजी दिसली. ती नाराजी मतदान टाळणार्‍या गटापैकी बहुतांश लोकांत आहे हे सर्वत्र लख्ख माहीत असताना ते फक्त अ‍ॅनॉनिमसली नोंदवून काय साध्य झाले.

हे मला काही प्रमाणात दूरच्या पल्ल्याचे ट्रेन तिकिट काढून प्लॅटफॉर्मवर पोहोचून तिकीट चेकरसमोर ते तिकीट फाडून प्रवास न करणे आणि आपण रेल्वेला फसवले / धडा शिकवला / रेल्वे प्रवासाबद्दलची नाराजी उत्तम प्रकारे नोंदवली अशी समजूत करुन घेणार्‍या सरदारजीसारखे विनोदी वाटते.

गवि Wed, 09/04/2014 - 12:15

In reply to by गवि

अजून पुरवणी.. "खालीलपैकी कोणालाच मत नाही" हा पर्याय इन इटसेल्फ "खालीलपैकी सर्वांनाच माझे मत आहे" या बेंबट्या छाप मताइतकेच ट्रिव्हिअल, बाष्कळ आहे.

ऋषिकेश Wed, 09/04/2014 - 13:00

In reply to by गवि

जर सर्वाना मत आहे / कोणीही आल्याने काय फरक पडतो? वगैरे मत असेल तर निवडणूकीला न जाणे हा उपाय आहे. मात्र "यापैकी कोणीही नाही" - मात्र कोणीतरी अन्य पर्याय हवा असे असेल तर मतदानाला जाऊन NOTA ला मत द्यावे.

गवि Wed, 09/04/2014 - 13:47

In reply to by ऋषिकेश

मात्र "यापैकी कोणीही नाही" - मात्र कोणीतरी अन्य पर्याय हवा असे असेल तर मतदानाला जाऊन NOTA ला मत द्यावे.

अगदी महत्वाचा पॉईंट..

मी तेच म्हणतोय.. कोणीतरी अन्य पर्याय हवा या ऑप्शनचे बहुमत झाले तर अन्य पर्याय मिळण्याची सोय आहे का? तसे असेल तर आक्षेप मागे.

हीच माहिती मी विचारत होतो.

गवि Wed, 09/04/2014 - 13:16

In reply to by बॅटमॅन

ठीक आहे. इन इटसेल्फ या शब्दाने काहीतरी गोंधळ होत असावा...

म्हणजे जणूकाही "कोणीही नको.." आणि "सर्वच चालतील" हे दोन पर्याय एकसम, एकाच अर्थाचे आहेत असे मला म्हणायचे नव्हते. ते दोन्ही पर्याय विरुद्ध टोकांवरचे असून "आउटकम"च्या सद्य मेथडॉलोजीत ट्रिविअलपणात एकाच ताकदीचे (पण वेगळ्या दिशांचे) आहेत असे म्हणायचे आहे.

कोणीच नको यात तात्विक नोंद होते हे खरे आहे, पण निवडणूक ही तात्विक नोंदीसाठी होत नसून निवडीसाठी होते. त्या निवडीच्या आउटपुटला या तात्विकतेने "फरक" पडत असला तरच हे असे ऑप्शन्स ट्रिव्हिअल नाहीत असे म्हणता येईल.

या अर्थाने मला सर्वच उमेदवार लायक वाटतात हे अत्यंत वेगळ्या दिशेतले मतही ग्राह्य का मानण्यात येऊ नये? असाही त्याचा "उपयोग" नाहीच आहे की..

म्हणूनच "कोणीच नको" किंवा "कोणीच हवे" अशा पर्यायांपेक्षा जास्त स्पेसिफिक पर्याय म्हणजे:

१. हा नको.. तो नको असा एका उमेदवाराबाबतीत असावा.. याचाच अर्थ त्याचे एक मत कमी करता यावे.

किंवा

२. हा नको पण दुसरा कोण सांगता येत नाही असे असल्यास ओटोमेटिकली त्या "नको" मार्क केलेल्याच्या सद्यक्षणी सर्वात निकट असलेल्या स्पर्धकाला ऑपॉप माझे एक मत असाईन होईल (म्हणजे मला "अ" नको हे मत अन्य जनतेच्या सध्याच्या नेक्स्ट बेस्ट बहुमतवाल्या चॉईसकडे रीडायरेक्ट होईल. माझं पोझिटिव्ह मत बनत नसलं तरी जनमानसाला पाठिंबा मिळेल-व्हिच इज नॉट बेस्ट बट किमान नेक्स्ट बेस्ट थिंग टू नो व्होट.) सध्याच्या पूर्ण संगणकीकृत व्यवस्थेत हे सहज शक्य आहे.

किंवा

३. ठराविकपेक्षा जास्त नोटा मते आल्यास सर्व प्रक्रिया पुन्हा करावी.

यापैकी काहीही केल्यास या ना त्या प्रकारे किमान निवडप्रक्रियेला प्रत्यक्ष हातभार लागतो.

नुसते कोणी नको असे नोंदवून यातले काहीच होत नसल्याने ते बाष्कळ म्हटले.

बॅटमॅन Wed, 09/04/2014 - 13:25

In reply to by गवि

अर्थातच. सद्य परिस्थितीत नोटा मतांचे % किती आहे यावर निवडप्रक्रिया पुन्हा होणार की नाही हे अवलंबून नसल्याने विथ रिस्पेक्ट टु निकाल दोहोंत फरक नाहीच.

ऋषिकेश Wed, 09/04/2014 - 12:15

In reply to by गवि

जरा वेळ मिळताच तपशीलात उत्तर देतो. तुर्तास NOTA हा काही नव्याने मिळालेला ऑप्शन नाही. बटण आल्याने ते मत दिल्यास ते गुप्त रहाते इतकेच. बाकी सविस्तर तपशील देतो तासाभरात.

गवि Wed, 09/04/2014 - 12:25

In reply to by ऋषिकेश

हो. पूर्वी मतपत्रिकेच्या पद्धतीत हे नोटा मत देण्याची प्रोसेस मोठी सव्यापसव्याची होती आणि त्यात व्यक्ती गुप्त राहात नसे.

त्यामुळे मुळात उदासीन लोकांपैकी कोणी हे अधिकचे कष्ट घेऊन हा तात्विक वांझोटा हक्क बजावणे तर्कदुष्ट होते.

मान्य.

आता थेट अनोनिमस नोटा बटण दाबण्याची सोय यंत्रावर झाली यालाच मी "नवीन" घटना म्हणतो आहे. NOTA वेगळ्या स्वरुपात पूर्वीही होता हे मान्यच आहे.

आता याखेरीज अधिकचा तपशील तुला वेळ मिळाला की नक्की लिही.

५० % हून अधिक नोटा आले तर ते मतदान अग्राह्य ठरणे आणि वेगळ्या उमेदवारांना उभे करुन पुन्हा मतदान होणे अशी तरतूद आहे का?

तशी असेल तर काहीतरी अर्थ आहे, पण नोटाचे पेव फुटले तर हा उपाय अत्यंत खर्चिक आणि रोगापेक्षा भयंकर ठरुन निर्नायकी अवस्था आणू शकतो.

मुळात (काही अपवाद सोडता) मतदानाचे प्रमाणच खूप कमी असलेल्या मतदारसंघांत ५०% हून जास्त लोक मुळात मतदानात नोटा बजावतील ही शक्यता बिंदुवत आहे.

शेवटी पार्टीकडे पाहून लोकांचे मत बनते.. बहुतांश ठिकाणी एक मनुष्य काढून दुसरा उभा केला म्हणजे लगेच जनमत १८० अंश फिरेल असे नव्हेच.

शिवाय सर्वच पक्षांनी आपले उमेदवार बदलणे हे व्यावहारिक वाटत नाही.

ऋषिकेश Wed, 09/04/2014 - 13:24

In reply to by गवि

NOTA चा उपयोग काय हा प्रश्न महत्त्वाचा आहे. या पर्यायाचा अर्थ abstained इतकाच होतो. लोकसभेत वगैरे मतदान करताना पाहि खासदार असे अ‍ॅबस्टेन रहातात, त्याने काय होते, तर "फस्ट पास्ट द पोस्ट" पद्धतीत महत्त्वाचा 'पोस्ट' हलतो.

समजा एका मतदारसंघात १०० मतदार आहेत, पैकी ८० मतदार मतदान करतात. आता इथे दोन उमेदवार आहेत असे समजु. अशावेळी एकाला किमान ४१ मते मिळवणे गरजेचे आहे. समजा नोटापूर्वकाळात हे मतदान उमेदवार अ = ४१ व ब=३९ असे होत

मात्र समजा पाच मतदार असे आहे ज्यांना खरेतर दोघेही पसंत नाहित पण गोपनीयतेच्या काळजीने ते पूर्वी ४९(ओ) भरत नसत. या पाचापैकी ४ "त्यातल्या त्यात" बरा म्हणून 'अ' ला मत देत असत व १ जण ब ला. आता नोटाउत्तर काळात निकाल असा असेल अ=३७ ब=३८ व नोटा=४

अर्थात ही फारच सिंप्लीफाईड केस झाली पण अ‍ॅबस्टेन मतांनी फरक पडु शकतो इतके दर्शवायला पुरेसे आहे.

यावर विचार करताना दोन प्रश्न माझ्या समोर आहेत ज्यापैकी एकाचे उत्तर हल्लीच निवडणूक आयोगाने दिले आहे. दुसर्‍याचे मात्र अजूनही माहिती नाही

१. समजा एकच उमेदवार निवडणूकीला उभा असेल तर काय? - अपेक्षेप्रमाणे त्याला विजयी घोषित केले जाणार आहे कारण 'पोस्ट' कुठेही हलवला तर विजेता तोच असेल मग निवडणूकीचा खर्च का? - हे मला योग्य वाटते.

काहीसा अवांतरः २. समजा दोन उमेदवारांना समान पते पडली (हे नोटा पूर्व व नोटा उत्तर दोन्ही वेळा शक्य आहे) तर कोणाला विजयी घोषित केले जाते? याचे उत्तर कोणाला माहिती असेल तर द्या

मन Wed, 09/04/2014 - 13:38

In reply to by ऋषिकेश

"दोन उमेदवारांना समान मते " ही rarest of rare केस झाली.
भारतीय निवडणूक पद्धती किंवा एकूणच भारतीय व्यवस्थेतील नियमांच्या चष्म्यातून विचार करुन पाहिला.
पुनः निवडणूक हाच पर्याय दिसतो.
जिथे अगदि close फाइट होत असे , थोड्याच मतांचा फरक असे अशावेळी तिथे पूर्वी फार मोठ्या प्रमाणावर हाणामार्‍या आणि उपोशण - आंदोलन होइ हरणर्‍या बाजूकडून.पुनर्मोजणीची मागणी सर्रास होइ. क्वचित पुनर्निवडाणूकीचीही मागणी होइ.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे येण्यापूर्वी हे फार मोठ्या प्रमाणावर दिसे. बूथ कॅप्चरिंगचे आरोपही नेहमीचेच असत.
आता ते प्रमाण १९९०च्या दशकापेक्षा कमी झाले आहे.
हे असे का झाले आहे, ठाउक नाही.

गवि Wed, 09/04/2014 - 13:41

In reply to by ऋषिकेश

उत्तमरित्या समजावलेस. थँक्स.

फक्त इतकेच म्हणतो की:

या पाचापैकी ४ "त्यातल्या त्यात" बरा म्हणून 'अ' ला मत देत असत व १ जण ब ला.

हे सिम्प्लिफाईड आहे हे ठीकच कारण उदाहरण सिम्प्लिफाईडच घ्यावे.

पण मुळात कोणीच नको असतानाही बळंच मतदानाला जाऊन त्यातल्यात्यात बर्‍याला मत देण्याची सक्ती कोणी करुन घेत असतील असं पटत नाही.

वास्तवात ८० मतदारांपैकी ज्यांना कोणीच पसंत नाही असे १० आणि ज्यांना एकूण प्रक्रियेत काडीचाही रस नाही असे ३० = १०+३०=४० हे मतदानाला जातच नाहीत / नसत.

उरलेले ४० मतदानाला जाऊन आपल्याला त्यातल्यात्यात योग्य वाटेल अशा उमेदवाराला मत देत.

मतदानकेंद्रावर जाऊन "कोणीही नको" हे बटण रीतसर दाबण्याची सोयच तेवढी जणू कमी पडत होती म्हणून कोणीच नको असतानाही बळंच उगा कोणालातरी त्यातल्यात्यात बरा पाहून मत देण्यासाठी आवर्जून कष्ट घेणारे चारपाचजण असतील असा सिनारिओ होता पटत नाहीये.

आता असं प्रोजेक्ट केलं जातंय की "आता मतदान न करण्याची कारणं कोणी देऊ नयेत.." हे नाही पटलं.

उदा.

No excuse not to vote now: Chief Electoral Officer

अशी अनेक आहेत.

ऋषिकेश Wed, 09/04/2014 - 13:53

In reply to by गवि

१० आणि ज्यांना एकूण प्रक्रियेत काडीचाही रस नाही असे ३० = १०+३०=४० हे मतदानाला जातच नाहीत / नसत

हे गृहितक झालं, पण प्रत्यक्षात तसं नसावं. जर नोटा आल्यानंतर मतदान करायला बाहेर पडणार्‍यांत व नोटा पर्याय निवडणाअर्‍यात लक्षणीय व साधारण तेवढिच वाढ झाली तर हे गृहितक खरं आहे असे म्हणता यावे. नोटा आल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत बरेच मतदान झाले मात्र नोटा मते त्या संख्येत दिसत नाहीत. तेव्हा काही नव्या मतदारांनी तर काही नेहमीच्या मतदांनी अशा दोघांपैकी काहींनी नोटा वापरला असेच समजायला हवे.

बाकी वरील उदाहरणात, म्हणूनच खास नोटा साठी मतदानाला येणारे धरलेले नाहित. आधी जर ८० मतदान करत असतील त्यापैकीच काहिंनी यावेळी नोटाला मत दिलं तर निकालात फरक पडु शकेल. ही अर्थातच शक्यता झाली आणि प्रॅक्टिकली विचार केला तर फारच लो प्रोबॅबल शक्यता, पण ज्यांना ती आजमावायची आहे त्यांच्यासाठी ती खुली आहे इतकाच त्या 'नोटा'चा अर्थ.

मतदानकेंद्रावर जाऊन "कोणीही नको" हे बटण रीतसर दाबण्याची सोयच तेवढी जणू कमी पडत होती म्हणून कोणीच नको असतानाही बळंच उगा कोणालातरी त्यातल्यात्यात बरा पाहून मत देण्यासाठी आवर्जून कष्ट घेणारे चारपाचजण असतील असा सिनारिओ होता पटत नाहीये.

असा सिनारीयो होता की नाही माहिती नाही. कळायला काही काळ जावा लागेल, काही निवडणुका व्हाव्या लागतील. मात्र हा पर्याय आल्याने निदान तसा सिनारॉयो होता की नाही हे समजेल.

आता असं प्रोजेक्ट केलं जातंय की "आता मतदान न करण्याची कारणं कोणी देऊ नयेत.." हे नाही पटलं.

+१ अशी विधानं मलाही बालिश/दिशाभूल करणारी वाटतात.

नितिन थत्ते Wed, 09/04/2014 - 14:05

उपक्रमावर नोटा विषयाने चांगली चर्चा झाली होती.

नोटाचे बहुमत झाल्यास निवडणुक रद्द करावी असा निर्णय घेतल्यास काय होईल याचे उत्तम विवेचन धनंजय यांनी केले होते. सारांश असा:
१. खूप मतदारसंघात नोटा जिंकला तर नवी लोकसभा स्थापन होण्यात अडचणी येतील. पक्षी अपुरी लोकसभा निर्माण होईल आणि त्या अपुर्‍या लोकसभेतून सरकार स्थापन होईल. हे सरकार संपूर्ण देशाचे प्रातिनिधिक सरकार नसेल. [माझ्या मतदारसंघातले सर्वजण मला आवडत नाहीत म्हणून मी माझा प्रतिनिधीच निवडणार नाही. देशातले इतर (कोणीका असेना) प्रतिनिधी माझ्यावर राज्य करतील. ते मला चालेल].

२. नोटाचे बहुमत झाले असे फार थोड्या मतदारसंघात होईल. या परिस्थितीत नोटा असण्याने कुठलाच गुणात्मक फायदा होणार नाही. ५४३ पैकी ५३०+ प्रतिनिधी पूर्वीसारखेच असतील. असे होण्याची शक्यता असेल तर नोटा असण्याने काही फरकच पडणार नाही.

अवांतर: नोटाचे बहुमत ज़ाले नाही तरी बर्‍याच ठिकाणी नोटांचे ;) बहुमत होते असे ऐकून आहे.

राजेश घासकडवी Fri, 11/04/2014 - 08:04

In reply to by नितिन थत्ते

इथे उपप्रतिसाद देत असलो तरी तो थत्ते आणि गवि या दोघांसाठीही आहे.

माझ्या मते नोटा हा पर्याय संपूर्ण लोकसभेलाच बदलण्या अथवा नाकारण्यासाठी उपयुक्त ठरणार नाही हे उघड आहे. पण ज्या मतदारसंघात प्रच्छन्नपणे वाईट उमेदवार सर्वच पक्षांनी दिलेले आहेत अशा ठिकाणी पक्षांना लाज आणण्यासाठी हा पर्याय वापरता येईल. म्हणजे एका पक्षाने लाचखोर मंत्री आणि दुसऱ्या पक्षाने सर्वज्ञात गुंड उभा केला तर जनता या दोहोंना नाकारून नोटाला बहुमत देऊ शकेल. जिथे हे असं होईल तिथे या दोन्ही उमेदवारांची इतकी छीथू होईल की ते पक्ष पुन्हा त्यांना तिकीट देऊ धजणार नाहीत. याची कल्पना असल्याने कुठलाच पक्ष नोटाकडून आपण हरू नये अशी काळजी घेईल. म्हणजे या पर्यायाच्या उपलब्धतेमुळे पक्षांतर्फे येणाऱ्या उमेदवारांची एक विशिष्ट पातळी राखली जाईल अशी आशा आहे. जेव्हा हा पर्याय (प्रॅक्टिकली) नव्हता तेव्हा ही छीथू होण्याची शक्यता नव्हती.

हा आशावाद कितपत यशस्वी होतो हे निवडणुकांत किती ठिकाणी नोटाला किती मतं मिळतात यावरून तपासून बघता येईल. आपल्या पक्षाच्या उमेदवाराला नोटापेक्षा कमी मतं मिळाली तर त्याला पुढच्या निवडणुकीला तिकीट द्यायचं का असा गंभीर विचार पक्षश्रेष्ठी करतील याबाबत मलातरी शंका वाटत नाही.

धनंजय Fri, 11/04/2014 - 22:05

In reply to by राजेश घासकडवी

आशावाद थेट तपासण्याकरिता भारतातून आकडेवारी वगैरे लवकर मिळेलच. पण तोवर जिथून माहिती उपलब्ध आहे, त्या ठिकाणांकडे दुर्लक्ष करून भाकिते करणे ठीक नाही. "पक्षश्रेष्ठी गंभीर विचार करतील याबद्दल शंका वाटत नाही" याचे कारण आधीच उपलब्ध साधनसामग्रीकडे दुर्लक्ष होत आहे.

यू.एस मधील नेव्हाडा राज्यात, स्पेन, रशिया, युक्रेन, आणि कोलोंबिया देशांत "कोणीच नको"ची ओळ मतपत्रिकेवर असते. नाचक्की होऊन जनमानसातली प्रतिमा बदलून फरक होतो की नाही, याबाबत अभ्यास करणे उपयुक्त राहील. (दुवा)

या कारणामुळे नेव्हाडा राज्यातील निवडणुका/राजकीय पक्ष अन्य यू. एस राज्यांपेक्षा खूप सुधारलेले नाहीत : वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून तरी स्पष्ट फरक जाणवत नाहीत. यादीतील बाकी देशांबाबतही : या उपलब्धतेमुळे या देशांतील राजकीय पक्ष आजूबाजूच्या देशांतील राजकीय पक्षांपेक्षा लोकाभिमुख असल्याचे फारसे ऐकलेले नाही.

जर त्या ठिकाणची स्थिती लक्षात घेतली, तर शंका वाटायला पुष्कळच जागा आहे: "कोणीच-नकोच्या नाचक्कीने पक्षश्रेष्ठी सुधारतील" या गृहीतकात सकृद्दर्शनी मला बळ वाटत नाही, उलट त्याच्या विरोधात अनुभव आहेत असे ढोबळमानाने वाटते. या राज्या-देशांचा तपशीलवार तुलनात्मक अभ्यास करण्यापासून मी सूट घेतो आहे.

मन Thu, 10/04/2014 - 15:43

एक संकल्पना आहे.

अँड्रोमिडा गॅलॅक्सीमध्ये M319 या ताऱ्याच्या थोडासा पलिकडे एक बॉस्को नावाचा गुलाबी उंट राहतो.
तुमचे जे काही चांगले चालले आहे ते बॉस्कोच्याच कृपेने आहे. तुम्ही त्याला आजवर ओळखू शकला नाहित,
ही त्याचीच लीला आहे. तुम्ही त्याला ओळखू नये म्हणूनच तो असे मायजाल बनवून खेळत असतो.
पण तो खूप चांगला आहे. त्याच्यामुळेच सारे चांगले होते आहे.
शिवाय काही वाईट झाले तरी "बॉस्को रे बाबा कारे तू घेतोस परीक्षा " असे म्हणत विनवणी करावी;
एखादेवेळी तुम्ही वाईटातून बाहेरही याल. समजा आला नाहित, आणि तुमची राखरांगोळी झाली तरी तुमचे
नाव बॉस्कोभक्ती अमर होणार हे निश्चित!
सारेच तुमच्या निष्ठेची अगदि तारिफ करतील.
तुम्ही फक्त निष्ठा ठेवा. शरण जा. आयुष्याचे भले होइल!

वरील चार पाच ओळी जर मी सतत म्हणत असेन तर विवेकवादी लोक, विज्ञानप्रेमी मंडळी व नास्तिक ग्यांग असे विविध
प्रकारचे लोक माझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे असेच म्हणतील.
पण वरील ओळींमध्ये विठोबा,रामराणा,कृष्णलीला वगैरे शब्द पेरले की लागलिच ही संतवाणी आहे असे म्हणत
संत मंडळींचे कौतुक करतील.
असं का गड्या ?
संत मंडळी जे काही बोलली तो एक तर त्यांना झालेला भ्रम तरी आहे किंवा ती खोटे तरी बोलत असावीत.
इन आयदर केस, त्यांना फार थोर वगैरे म्हणण्याची गरज नाही.
(म्हणजे बुद्धीवाद्यांनी वगैरे थोर म्हणू नये. मी बुद्धीवादी वाइरे म्हणवून घेत नाही.
संतांना आणि त्यांच्या विठोबाला थोर म्हणायला मी मोकळा आहे.)

बुद्धीवादी, विवेकवादी लोक फक्त चार चौघांच्या धाकानं ह्यांच्याबद्दल चांगलं बोलतात का ?
(म्हणजे चुकून ह्यांच्याबद्दल काही शंका घेतली तर खळ्ळ खट्ट्याक व्हायचं वगैरे?)

सर्वात कहर म्हणजे अंनिसवाले ऊठसूट संतांचा दाखला देतात.
काहीही झालं की लागलिच "संतांनी सामाजिक समतेचा प्रसार केला . अंधश्रंद्धांवर कोरडे ओढले" वगैरे घिस्यापिट्या
लायनी बोलतात. संतांनी खरच असं केलं ? की हा अंनिसचा प्रपोगेंडा आहे ?
"संतांनी विठोबा नावाच्या काल्पनिक देवाच्या भरवशावर बसायला सांगितलं.
त्यांनी उल्ट देव धर्माचा व पर्यायाने अंधश्रद्धेचा सर्वदूर, सर्व थरात प्रचार केला "
हे असं म्हणणं अंनिसच्या इतर तर्कांशी अधिक सुसंगत होत नाही का ?
अंनिसवाले हे म्हणत नाहित म्हणजे त्यांना डोके कमी आहे की स्वतःचे डोके फुटायची भीती आहे की अजून काही कारण ?
(जसे मनोबाला डोके कमी आहे, अंनिसची किम्वा संतांचीही भूमिका सम्जून घेण्यास तो नेहमीप्रमाणेच कमी पडतो वगैरे.)

.
.
बॉस्को उदाहरण http://www.aisiakshare.com/node/1404?page=1 ह्या धाग्यातून उचलले आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/04/2014 - 01:35

In reply to by मन

संतांनी बॉस्को नावाच्या उंटाचा फक्त खांदा वापरला आणि सामाजिक मूल्य सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न केला. कडू औषधाचा डोस देताना त्याला फक्त होमिओपथीच्या गोळ्यांचं आवरण वापरलं. होमिओपदी जेवढी खरी तेवढीच खरी बॉस्को या उंटाची ताकद.

विवेकवादी, विज्ञानवादी मंडळी असाही विचार करू शकतात.

मन Wed, 16/04/2014 - 15:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ज्ञानेश्वर, तुकाराम, झालंच तर चोखामेळा,गोरा कुंभार्,एकनाथ ह्या संतांबद्दल वरील विवेचन मान्य करण्यास थोडाफार वाव दिसतो. पण ---
नऊ नाथांच्या - नवनाथांच्या कथा, शेगावचे गजानन महाराज व त्यांचे किस्से/लीला ह्याबद्दलही विवेकवादी,बुद्धीवादी वगैरे मंडळी
गौरवपर बोलून दाखवू शकतात काय ? आपलं च्यालेंज आहे.

केतन Thu, 10/04/2014 - 22:18

'पाट्या टाकणे' हा वाकप्रचार कुठून आला?
म्हणजे पाटीच का टाकायची? दुसरं काही का नाही ?

~ केतन

आडकित्ता Fri, 11/04/2014 - 08:54

In reply to by केतन

अन्स्किल्ड लेबरर्स मधे, मातीकाम करणारे सगळ्यात अधिक अनस्किल्ड समजतात, त्यातही खड्डे खणणार्‍यास थोडे तरी स्पेशल ट्रेनिंग / मेंटल स्किल आवश्यक असते. पाटीत आयती भरलेली माती इकडून तिकडे नेऊन टाकण्यात फक्त ढोरमहेनत असते. शून्य डोके वापरता, फक्त रिपिटीटिव्ह फिजिकल वर्क.

आता ही अ‍ॅनालॉजी बुद्धीजीवींना लावायची तर, उदा. मागच्या वर्षीच्या नोट्स दर वर्षी एकाच जागी बसून डिक्टेट करणारा शिक्षक = मास्तर पाट्या टाकतोय, असा अर्थ होतो.

निर्बुद्धरित्या पुनःपुन्हा केलेले काम = पाट्या टाकणे.

मी Fri, 11/04/2014 - 12:39

झाडावरुन (नारळाच्या) नारळ काढण्याची सोपी आणि कल्पक आयडिया कोणी सुचवू शकेल काय? किंवा पुण्यात असे नारळ काढणार्‍यांचा पत्ता कोणाकडे आहे काय? क्रेनचा पर्याय बाद आहे. पर्यायाची किंमत नारळांच्या किमतीपेक्षा जास्त नको.

ॲमी Fri, 11/04/2014 - 12:50

In reply to by मी

नारळं काढायला क्रेन? :O त्यापेक्षा झाडाचा बुंधा पकडुन हालवायचा गदागदा. पडतील नारळ खाली :-D
कोणी झाडावर चढणारा मिळतोय का पहा. किँवा उंच बांबु असेल तर त्याला आकडा बांधुन निघतील बहुदा.

नितिन थत्ते Fri, 11/04/2014 - 13:35

In reply to by मी

पंक्चर (पम्पचर किंवा पंचर जे काय असेल ते ;) ) काढणार्‍याकडे जाऊन विचारा. त्याला नारळ काढणारा मलबारी ठाऊक असेल.

'न'वी बाजू Fri, 11/04/2014 - 22:07

In reply to by नितिन थत्ते

पंक्चर (पम्पचर किंवा पंचर जे काय असेल ते ;) ) काढणार्‍याकडे जाऊन विचारा. त्याला नारळ काढणारा मलबारी ठाऊक असेल.

लॉजिक कळले नाही.

(तसे, फॉर द्याट म्याटर, जुन्या पुण्यात (बोले तो, आमच्या काळच्या ४११०३०मध्ये; अजूनही असे होते की नाही, आणि/किंवा व्यापक पुण्यात असे होते/होत असे की नाही, ठाऊक नाही.) सायकल भाड्याने देणारे/दुरुस्त करणारे हे सहसा ष्टोसुद्धा दुरुस्त करत असत, यामागचेही लॉजिक कळलेले नाही.)

ऋषिकेश Fri, 11/04/2014 - 13:55

In reply to by मी

पुण्यात काही मलबारी कामगार तुम्हाला रोजगार तत्त्वावर कामगार-नाक्यावर मिळतील.
पुण्यात असे कामगार कुठे कुठे उभे असतात हे माहिती नाही. वारजे नाक्यावर (हायवेवर) त्यांचे घोळके बघितल्याचे आठवते आहे.

बॅटमॅन Fri, 11/04/2014 - 13:56

In reply to by मी

झाड किती उंच आहे? २० फुटांपेक्षा जास्त उंच असेल तर नारळकाढ्या मस्ट आहे. नपेक्षा लांब काठीनेही काढता येतात-यद्यपि काठीला आकडी बांधावी लागेल अन ती एकदम मजबूत लागेल. झाड जर पुरेसे व्हर्टिकल नसेल तर त्यावर चढताही येऊ शकते-पण अर्थातच तितकी उसाभर करायची तयारी असेल तर. तसा डिव्हाईसही मिळतो असे ऐकून आहे, पण पाहिला नै कधी कुणाला वापरताना. जरा तिरक्या असलेल्या झाडावरचे नारळ कधीकाळी चढून काढले आहेत. ते तुलनेनं सोपं.

अजो१२३ Fri, 11/04/2014 - 14:07

In reply to by बॅटमॅन

झाडावरचे नारळ कधीकाळी चढून काढले आहेत

नारळाच्या झाडावर चढून नारळ काढायचे म्हटले कि मला का कोण जाणे automobile company मधल्या cutting tool division मधल्या ब्रोच या टूलची आठवण येते.

Broach

तिरशिंगराव Wed, 16/04/2014 - 09:18

In reply to by मी

एक माकड पाळा. ते तुम्हाला नारळही काढून देईल आणि फावल्या वेळांत तुमची करमणुकही करेल.

मी Fri, 11/04/2014 - 14:45

सगळ्यांच्या सुचनेचे स्वागत आहे, सध्या परिस्थिती खालिलप्रमाणे आहे -

१. नारळ काढणारे यंत्र केरळा कृषी खात्याने(का तत्सम कोणीतरी) विकसीत केले आहे, त्याची किंमत ८के+ आहे.
२. नारळ काढण्यासाठी ट्री-प्रुनिंग डिव्हाइस असते पण ते हि बरेच महाग आहे.
३. नारळाचे झाड साधारणपणे ३.५+ मजले उंच आहे, गच्चीवरुन ट्राय करणे अवघड आहे कारण १५ फुटापेक्षा लांब आहे, एक बांबु आणि एक काठी वापरुन काढायचा प्रयत्न केला पण एवढे लांब मॅनेज करणे अवघड आहे, हिरव्या शहाळ्याचे देठ कठिण असतात, वाळलेले २०-३० नारळ ह्यापद्धतिने काढले आहेत.
४. नारळ काढणारा मलबारी शोध चालु आहे.

आडकित्ता Fri, 11/04/2014 - 21:55

In reply to by मी

१. नारळ पिकून खाली पडेपर्यंत वाट पहावी.
२. नारळ काढण्यासाठी माकडे पाळून त्यांना ट्रेन करतात असे ऐकिवात आलेले आहे.
३. डायरेक्ट झाडावरून काढून नेण्याच्या अटीवर नारळ विक्रीची जाहिरात लोकल पेप्रात द्या.

रच्याकने. अलिबागला काकांच्या परसात सध्या टोटल फक्त ३ नारळी आहेत. घरातल्या इतक्या नारळाचे काय करावे हा प्रश्न भयंकर कठीण असतो. एका घरात रोज फारतर १ खाउन होईल. वेट वॉच करण्याच्या जमान्यात तितकाही होणार नाही..

'न'वी बाजू Fri, 11/04/2014 - 22:02

In reply to by आडकित्ता

त्यापेक्षा 'जेम्स बाँड के पोते'गिरी केली तर?

ढिश्क्याँव! ढिश्क्याँव!! ढिश्क्याँव!!!

मी Fri, 11/04/2014 - 22:09

In reply to by आडकित्ता

नारळाने ओटी भरण्यासाठी सुवासिनी रांग लावून उभ्या आहेत, आणि त्यांचे माकड नारळ काढत आहे असे चित्र मांडत आहात काय?

'न'वी बाजू Fri, 11/04/2014 - 22:09

In reply to by आडकित्ता

...करवतगुरुत्वाकर्षणयोगाचा प्रयोगही करून पाहणे उपयुक्त ठरू शकावे.

'न'वी बाजू Fri, 11/04/2014 - 22:19

In reply to by मी

तुम्हाला नारळ खाली पडायला हवे होते ना? सर्वात प्रभावी उपाय सांगितला. नारळ ग्यारण्टीड खाली पडतील.

(डोकेदुखीसाठी शिरच्छेद हा जालीम प्रभावी उपाय आहे, तद्वत.)

ॲमी Tue, 15/04/2014 - 11:26

अत्यंत तीव्र घृणा, तिरस्कार वाटेल अशी पुस्तक/चित्रपटातील पात्रांची नावे सांगा.
मला जास्त रुची स्त्री पात्रांमधे आहे, पण पुरुषही चालतील. कथेत चांगली व्यक्ती-वाईट व्यक्ती असा संघर्ष नको. वाईट पात्राभोवतीच कथा गुंफलेली हवी.
दोन उदा. लोलितामधला हम्बर्ट, शायनिँगमधला ज्याक टोरंस.

आदूबाळ Tue, 15/04/2014 - 14:44

In reply to by ॲमी

चटकन आठवणारं उदाहरण म्हणजे श्री ज जोशींची "साळसूद" नावाची कादंबरी.

अजून एक म्हणजे "फ्लॅशमॅन" पण मला तर तो आवडतो ब्वा!

ॲमी Tue, 15/04/2014 - 15:23

In reply to by आदूबाळ

साळसूद मालिका होती दुरदर्शनवर. दिलीप प्रभावळकर, नीना कुलकर्णी, स्मिता तळवळकरची. जेवढी आठवतेय त्यावरुन yes he is creepy.
"फ्लॅशमॅन" माहित नव्हता. वाचते त्याच्याबद्दल. धन्यवाद.

ॲमी Tue, 15/04/2014 - 15:48

In reply to by आदूबाळ

लेडी मॅक्बेथ > पुस्तक वाचलं नाही. पण माझा मते ही कथा तिच्याभोवती गुंफलेली नाही. आणि मकबुलमधली तब्बु मलातरी क्रिपी वाटली नाही फार. ठीक आहे ती :-D.
सरदार खान (गँग्ज ऑफ वासेपूर) > पाहते.

ॲमी Tue, 15/04/2014 - 16:49

In reply to by मी

नाय. नायक-नायिका-खलनायक आणि मग त्या खलनायकाची उच्च क्रिपी लेव्हल असं नकोय. फिमे फअॅटल, व्हँप पण नकोय. हम्बर्ट, ज्याक, साळसूद सारखे पायजेत.

मी Tue, 15/04/2014 - 16:54

In reply to by ॲमी

सैफचं पात्र(मुळ इयागो) हलकट वाटतो आणि सैफने बर्‍यापैकी भुमिका केली आहे असेही वाटते म्हणुन सुचवले होते. डिपार्टेडमधला मॅट डिमनही बर्‍यापैकी नालायक वाटतो.

'न'वी बाजू Wed, 16/04/2014 - 07:46

In reply to by ॲमी

फिमे फअॅटल

१. आगागागागागागा!

२. आपल्याला, बायेनीचान्स, 'फ़ाम फ़ाताल' म्हणावयाचे होते काय?

--------------------------------------------------------------------------------------------

(चूभूद्याघ्या; फ्रेंचतज्ज्ञांनी उच्चाराची दुरुस्ती - असल्यास - अवश्य सुचवावी.)

बॅटमॅन Wed, 16/04/2014 - 11:07

In reply to by 'न'वी बाजू

आम्ही तर त्या शब्दाचा उच्चार 'फेम्म फॅटाल' असा करत असू. अद्याप कुणा फ्रेञ्चविदासमोर हा उच्चार करायची पाळी न आल्यामुळे आम्ही व फ्रेञ्चविद दोघेही जगून आहोत.

'न'वी बाजू Wed, 16/04/2014 - 16:24

In reply to by बॅटमॅन

आमची (अर्थात अमेरिकन) डिक्षनरी असलाच काहीतरी (बोले तो, आपण दिल्यासारखा) उच्चार दर्शविते.

पण शेवटी आम्ही अमेरिकनच, त्याला काय करणार?

अहो, (धाकल्या बुशसाहेबाच्या इराकयुद्धात हातभार न लावल्याबद्दल) फ्रेंचांचा वचपा फ्रेंच फ्राइज़चे पुनर्नामकरण 'फ्रीडम फ्राइज़' असे करून काढू पाहणारे आम्ही. आमच्या नादी कसले लागता?

--------------------------------------------------------------------------------------------------------

ती टूम फार काळ टिकली नाही. बेटर सेन्सेस, प्रिव्हेल्ड.

इफ एनी.

अर्थात लिबरल.

'रिअ‍ॅलिटी हॅज़ अ वेल-नोन लिबरल बायस' याबद्दल ऐकले/वाचले आहेत की नाही?

अतिशहाणा Wed, 16/04/2014 - 18:31

In reply to by 'न'वी बाजू

अहो, (धाकल्या बुशसाहेबाच्या इराकयुद्धात हातभार न लावल्याबद्दल) फ्रेंचांचा वचपा फ्रेंच फ्राइज़चे पुनर्नामकरण 'फ्रीडम फ्राइज़' असे करून काढू पाहणारे आम्ही१. आमच्या नादी कसले लागता?

यावरुन तेलंगण प्रश्न फुल्ल पेटला होता तेव्हा तेलंगणाच्या उत्साही आंदोलनकर्त्यांनी तेलंगण प्रांतात येणाऱ्या 'आंध्रा मेस' नावाने चालणाऱ्या खाणावळींचे 'तेलंगाणा मेस' असे नामकरण करण्याचा आग्रह धरल्याचे एका तेलुगूभाषिक सहकाऱ्याने सांगितल्याचे आठवले.

साधारण तशीच माहिती देणारा हा एक दुवाः http://indianexpress.com/article/india/india-others/in-hyderabad-chicke…

अनुप ढेरे Tue, 15/04/2014 - 20:42

In reply to by मी

ते अजून समाजवाद आणि क्यापिटॅलिझम मध्ल्या फरकावर रमतारामांशी भांडतायत... त्यांच नसेल लक्ष इकडं

ॲमी Wed, 16/04/2014 - 05:50

In reply to by अनुप ढेरे

अरे माझ्या देवा! जॉर्डन क्रिपी आहे होय??
मी या चित्रपटाच्या एकदोन समिक्षा वाचलेल्या. त्यावरुन 'तो+चित्रपट silly stuff ने ओतप्रोत भरलेला आहे' असे समजत होते. आता मात्र पुस्तक वाचायलाच हवं. धन्यवाद :-)

अनुप ढेरे Wed, 16/04/2014 - 10:07

In reply to by ॲमी

पुस्तक नाही वाचलं पण पिच्चर बघितला आहे. क्रीपी आहे का तो नाही माहिती पण अनेकदा घृणास्पद वाटतो.

ॲमी Wed, 16/04/2014 - 06:01

In reply to by अस्वल

रोचक उदाहरणे.
मकडीमधली चेटकीण क्रिपी होती खरी.
ह्युमन सेँटीपेडबद्दल माहित नव्हतं. डॉक्टर क्रिपी वाटतोय.
नो कंट्रीमधला अँटन क्रिपी आहेच, पण तो कथेच्या केँद्रस्थानी नाही ना!

मी Wed, 16/04/2014 - 14:44

In reply to by केतकी आकडे

हा चित्रपट जेवढी हाइप होती त्याच्या निम्मा सुधा बरा वाटला नाही, किंवा त्याच्यानंतर आलेल्या पण त्याच थीमवर आधारीत इतर दृकश्राव्य अनुभव घेतल्याने त्यातले नवखेपण जाणवले नसावे.

ॲमी Wed, 16/04/2014 - 15:59

In reply to by ॲमी

प्रतिसाद देणार्या सर्वाचे आभार :-)
मला माझा मुद्दा नीट मांडता आला नाहीय बहुतेक. ग्रेटेस्ट व्हिलन ऑफ ऑल टाइम नको आहे (सांगितलेत तरी हरकत नाही, पण माझा मूळ उद्देश तो नाहीय). कथेच सेँट्रल केरेक्टर/ज्याच्याभोवती कथा गुंफलीय/नेरेशन ज्याचं आहे/ज्याच्या दृष्टीकोनातून आपण घटनाक्रम पाहतोय ती व्यक्ती क्रिपी, घृणास्पद हवीय. त्यामुळे साळसुद, जॉर्डन ही योग्य उदा होतील. बाकीँच्याबद्दल खात्री नाही.
हे करण्यामागे खास कारण असे काही नाही. फक्त कुतुहल आणि असं एकही स्त्री पात्र का आठवू नये हा प्रश्नदेखील...

अतिशहाणा Wed, 16/04/2014 - 16:51

In reply to by ॲमी

ब्रेडाऊन नामक चित्रपटातील जे.टी.वॉल्श या अभिनेत्याने साकारलेला खलनायक मला आतापर्यंत सर्वाधिक घृणास्पद वाटत आला आहे. चित्रपट फारच टीपिकल आहे मात्र या कलाकाराने जबरा काम केले आहे. ज्युडी फॉस्टरच्या अक्युज्ड या चित्रपटातील बलात्काराच्या प्रसंगाला चीअर अप करणारी तीन पात्रेही अत्यंत घृणास्पद वाटली होती. क्लॉकवर्क ऑरेंज या चित्रपटातील अॅलेक्स हे पात्रही घृणास्पद वाटते.

आदूबाळ Wed, 16/04/2014 - 15:34

In reply to by आडकित्ता

उत्पत्ती, उपपत्ती माहीत नाही बॉ.

नेवासे, पाथर्डी इ. भागातले माझे मित्र या अर्थाने हा शब्द वापरत असत. उदा. "लय चायट्या xxचा आहे" (च चहातला). म्हणजे हरामी, विश्वासपात्र नसलेला माणूस.

विचार करता असं जाणवलं की त्याहून सूक्ष्म अर्थच्छटा "भरवशाच्या म्हशीला टोणगा" किंवा "one who commits but does not deliver" या वळणावर जाणारी आहे.

आडकित्ता Wed, 16/04/2014 - 16:07

In reply to by आदूबाळ

त्या भागातील कुणाशी बोलण्याचा प्रसंग आल्याचे आठवत नाही. पण शब्दसंग्रहात भर घातल्याबद्दल धन्यवाद!

गावरान Thu, 17/04/2014 - 19:41

In reply to by आडकित्ता

१. शेतातील उगवणारे धान्य ही मातीची/शेताची उत्पत्ती.

२. माणूसघाणा हा शब्द माणूस या शब्दाची उपपत्ती.

अशी माझी समजूत आहे. चू. भू. द्या. घ्या.

मन Tue, 15/04/2014 - 13:02

हल्ली काही प्रक्षोभक म्हणा उद्बोधक म्हणा फॉरवर्ड्स येतात, कैकदा conspiracy theory असते, कैकदा
थोर्थोर प्राचेन देशात सारच कसं ऑलरेडी होतं, वगैरे हेसुद्धा असतच.
आणि त्यात "आग की तरह फैला दो ये जानकारी" असलं कायतरी शेवटी लिहिलेलं असतं.
नुकतेच आलेले काही फॉरवर्ड्स :-

१.congress has secret plan to kill all Hindus of this country, on the day of voting;
so that they should not vote.Else; congress can never remain in power.
The people with apparently Hindu names in congress have already converted to christianity for madam soniya.

We Hindu will live no longer than 48 hours.

iss message ko aag ki tarah failaa do

२.शुभ समाचार -----
गुजरात मे एल डी इंजिनियरिंग कॉलेज के छात्र धुव पटेल ने गौ माता की रक्षा के लिए एक ऐसा केमिकल इंजेक्शन तैयार किया है जिसे गौ माता को लगाने के बाद गौ माता के मांस को खने वाले की ४ घंटे के अन्दर अन्दर मौत हो जाएगी.
आपसे प्रार्थना है इस मेसेज को आग की तरह फैला दो जिससे गौमाता का मांस खाने वाले उसका वध करने से पहले सौ बार सोचे |

हे असले फॉरवर्ड्स पाठवणारी मंडळी राहुला हा पप्पू , बिन्डोक ,निर्बुद्ध व पर्यायाने *त्या आहे असे सातत्याने सांगत असतात.
स्वतःच्या बुद्धीबद्द्ल ह्यांना नितांत आत्मविश्वास असतो.

आदूबाळ Tue, 15/04/2014 - 14:40

In reply to by मन

या निमित्ताने ऐसी वर दुहेरी श्रेणीदान पद्धती चालू करावी अशी सुचवणी करतो.

उदा. या प्रतिसादाला "महाभयानक विनोदी" अशी श्रेणी देता आली पाहिजे.

मन Wed, 16/04/2014 - 10:42

In reply to by मन

खरे देशभक्त असाल तर राम मंदिर समर्थक होउन थांबू नका.
मोदी-मंदिर समर्थक व्हा!!

नितिन थत्ते Wed, 16/04/2014 - 10:46

In reply to by मन

>>congress has secret plan to kill all Hindus of this country, on the day of voting;

यंदाच्या निवडणुकीपैकी जेवढ्या ठिकाणी निवडणुका झाल्या तिथले हिंदू मेले का? काही अपडेट मिळाला आहे का?

अस्वल Tue, 15/04/2014 - 23:07

दैनिक सनातन प्रभातसारखे अजून काही विनोदी साहित्य आपल्याला ठाउक आहे का?
त्यांचे जवळपास सर्वच लेख अशक्य विनोदी असतात. उ.दा. हा सल्ला.

बॅटमॅन Tue, 15/04/2014 - 23:49

In reply to by अस्वल

दैनिक मूलनिवासी नायक. उदा. ब्राह्मण हे मूळचे ज्यू असून मूलनिवासी अरबांना हाकलून इस्राएल बनवणार्‍यांना सपोर्ट करतात. त्यांना भारताबाहेर हाकलले पाहिजे. किंवा सर्व ब्राह्मण पुरुषांची कत्तल केली पाहिजे इ.इ.

दै. संध्यानंदचे मागचे पान. उदा. अमेरिकेतील क्षयझ विद्यापीठातील संशोधक वाय.झेड. फूल्सन यांच्या संशोधनाप्रमाणे आजपासून १०१० वर्षांनी पृथ्वीचे दोन तुकडे होणार आहेत.

दै. पोलीस टाईम्समधील बातम्यांची यमकबद्ध शीर्षके- उदा. पाटलाची सून त्याच्या मनात भरली, त्याने तिला वाटेतच धरली.

पण सनातनची सर/मॅडम कुणालाच येत नाही. संध्याकाळपेक्षा सकाळी देवळात गेल्यावर ३.१४७% जास्त फायदा होतो इ.इ. टक्केवारी याचि देही याचि डोळा पाहून धन्य जाहलो.

अस्वल Wed, 16/04/2014 - 01:09

In reply to by बॅटमॅन

संध्यानंद! दुर्दैवाने online उपलब्ध नाहीये :(
बाकी पोलिस टाईम्स वाचनीय वाटतोय.
@सनातन -> आमच्या एका मित्राला हे वर्तमानपत्र विकण्यासाठी उद्युक्त केलं गेलं होतं.
विक्रेता - "साहेब, दुर्जनांच्या नाशासाठी हे वाचाच "
मित्र - " सॉरी , मी दुर्जन आहे रे ".

बॅटमॅन Fri, 18/04/2014 - 14:14

In reply to by आदूबाळ

नै :( शिवाजीनगर ष्ट्यांडातल्या पेपर डेपोत पाहिला पैल्यांदा- अन त्यानंतर स्वारगेटात. अन्यत्र कुठे फारसा दिसलाही नै कधी.

अजो१२३ Thu, 17/04/2014 - 18:42

प्रगत देशांत सिनेमाचे तिकिट सरासरी केवढ्याला असते? पॉपकॉर्न केवढ्याला असतो? सध्याला दिल्लीत विकांताला मॉल मधे तिकिट किमान २५०-३०० रु चे असते. (जे प्रतिष्ठित मॉल आहेत तिथे ५०० ते ७५० असते.) थेटरात पॉपकॉर्न १५०/-- रु चा असतो.

अशा ठिकाणी मिनरल वाटर ५०-६० रु ला का असते? त्यावर तशी एम आर पी लिहिलेली असते. त्याचा वेगळा सप्लाय असतो म्हणे. त्याची पावती देखिल मिळते. म्हणजे अनाधिकृत काही नाही. बाहेरचे अन्न (कोण्या का कारणाने) अलाऊ न करणे आणि आतले महाग विकणे ही मालप्रॅक्टीस नाही का?

नितिन थत्ते Thu, 17/04/2014 - 18:48

In reply to by अजो१२३

>>ही मालप्रॅक्टीस नाही का?

अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस आहे. पण हल्लीच्या कायद्यात काय आहे हे ठाऊक नाही.

एम आर टी पी कायदा हा लायसन्स परमिट राजचे भूत समजला जातो.

आदूबाळ Thu, 17/04/2014 - 19:06

In reply to by नितिन थत्ते

एम आर टी पी कायदा जाऊन त्याजागी "कॉम्पिटिशन कायदा" आला आहे.

त्याच्या सेक्शन ४ प्रमाणे "No enterprise ... shall abuse its dominant position" आणि "There shall be an abuse of dominant position ... if an enterprise ... directly or indirectly, imposes unfair or discriminatory ... price in purchase or sale ... of goods or service."

उपहारगृहांत छापील किंमतीपेक्षा जास्त किमतीत वस्तू विकणे हे "denial of market access" या सदराखाली कायद्याच्या कक्षेत येतं.

त्यामुळे कॉम्पिटिशन कमिशनला कळवल्यास ते कारवाई करू शकतात.

------------
पंचतारांकित हॉटेलातही हा प्रकार घडतो, आणि ते या (व इतर) कायद्यांबद्दल जागरूक असल्याने वेगळी क्लृप्ती वापरतात. विक्री किंमत आणि एमारपी यांच्यातला फरक "सर्व्हिस चार्ज" म्हणून लावला जातो. त्यावर रीतसर सर्विस टॅक्स आणि लक्झरी टॅक्स भरला जातो. हे टॅक्स अर्थातच ग्राहकाच्या माथी मारले जातात, पण पंचतारांकित हॉटेलांच्या ग्राहकांची price elasticity कमी असल्याने त्यांना फरक पडत नाही.

वाचक Thu, 17/04/2014 - 20:06

In reply to by अजो१२३

(अमेरिका हा प्रगत देश आहे असे गृहित धरुन, नसल्यास प्रतिसाद बाद समजावा :) )
इथे सर्वसाधारणपणे नविन रेलिज झालेल्या चित्रपटाचे तिकिट ९-१४ डॉ असते. (सिनेमा/सिझन प्रमाणे बदलते) ३-डी असेल तर १३/१८ - Imax असेल तर १९-२०

इथे सुद्द्धा बाहेर १ अथवा १:५० ला मिळणारा पॉपकॉर्न ४.२५ डॉ ला मिळतो. एवढेच नव्हे तर इतर कँडी वगैरे ३-४ डॉ ला - जी साधारण वॉल-मार्ट मधे .८० सेंट्स ला मिळते.

आता मला वाटते अरुणजोशींना तक्रारीला जागा नसावी :)

अजो१२३ Thu, 17/04/2014 - 20:09

In reply to by वाचक

सुकुन मिला यार पढके!

भारतात राहतात न जाणो का मला नेहमीच वाटत असते कि जगात पिळले जाणारे केवळ आम्हीच तेवढे आहोत.

अतिशहाणा Thu, 17/04/2014 - 20:48

In reply to by अजो१२३

साधारणपणे मॅटिनीचे दर (दुपारी १२ ते संध्याकाळी ५ पर्यंतचे शो) प्राईमटाईमपेक्षा कमी असतात. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच्या आठवड्यात मॅटिनीला पाहिला तर बराच स्वस्त पडतो. फर्स्ट डे फर्स्ट शो किंवा त्याच आठवड्यातील वीकेंडला प्राईमटाईम शो महाग पडतात असे दिसते.

थिएटरची जागाः आताच पाहिले त्यानुसार लोकप्रिय मॉल किंवा शॉपिंग सेंटरमध्ये अंतर्भूत थेटरांमध्येही तिकीटे महाग आहेत असे दिसते. स्ट्रीपमॉल किंवा स्टँडअलोन थेटरांमध्ये तिकीट स्वस्त दिसले. त्याचबरोबर प्राईम लोकेशन (श्रीमंत लोक किंवा प्रोफेसर/डॉक्टर वगैरे राहतात अशी ठिकाणे, डाऊनटाऊन वगैरे परिसर) येथे महाग तिकीट आहे असे दिसते. विद्यार्थी/निम्नमध्यमवर्गीय राहतात अशा ठिकाणी तिकीट स्वस्त दिसते.

मिहिर Thu, 17/04/2014 - 22:52

In reply to by अतिशहाणा

आम्ही गेलोच तर पुण्यात ईस्क्वेअरमध्ये मॉर्निंग शोला जातो. तो तसा तुलनेने स्वस्त असतो.
रॉकस्टार आला होता, तेव्हा आमच्या वर्गातील ९० पैकी ५० जण सकाळच्या ८.३० च्या खेळाला गेले होते. कधी लेक्चरसाठी न उठणारे लोक लवकर उठून आवरून गेले आणि नंतर शिव्या घालत बसले, उगाच उठलो म्हणून! :ड

मी Thu, 17/04/2014 - 22:39

In reply to by अजो१२३

अशा ठिकाणी मिनरल वाटर ५०-६० रु ला का असते? त्यावर तशी एम आर पी लिहिलेली असते. त्याचा वेगळा सप्लाय असतो म्हणे. त्याची पावती देखिल मिळते. म्हणजे अनाधिकृत काही नाही.

होय, ज्या ब्रँडची वस्तू असते तेच वाढीव छापील किंमतीचे लेबल लावतात, कारण विकणारे (रिटेलर, एजंट) जास्त रिटर्न/कमीशन घेतात.

बाहेरचे अन्न (कोण्या का कारणाने) अलाऊ न करणे आणि आतले महाग विकणे ही मालप्रॅक्टीस नाही का?

बाहेरचे अन्न अनुमत न करणे गैर नाही, खाजगी व्यवस्थापन असल्याने त्यांचे नियम पाळावे लागतील. आतले एमाआरपीपेक्षा जास्त विकणे गैर आहे.

मन Fri, 18/04/2014 - 09:42

In reply to by अजो१२३

प्रत्येक थेटरात ग्राहकासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे अनिवार्य असल्याचा कायदा आहे; असे वाचण्यात आले आहे.
काही हलकट थेटरवाले पाण्याचा कूलर अगदिच तोकाला, गच्चीवरील कोपर्‍अयत वगैरे ठेवतात; तिथवर ग्राहकाची नजर
जाउ नये म्हणून. मग तहानलेला ग्राहक चाळिस रुपयाचे लिटारभर पाणी खरेदी करतो.
कायदा आहे की नाही नक्की ठाउक नाही;(ग्राहक मंचाच्या लेखात वाचण्यात आले होते.)पण बहुतेक असावा.
दोन्-चार थेटरात मी तसा कायदा असल्याचे ठोकून दिले. त्यांनी मला पिण्याच्या पाण्याची जागा दाखवली.
मी तिकिटाव्यतिरिक्तची रक्कम खर्च न करता पाणी प्यायलो.
ज्या अर्थी हे लोक गपगुमान पाण्याचा टॅप दाखवताहेत; त्या अर्थी खरोखरिच कायदा असावा.
ई स्क्वेअरमध्ये फार पूर्वी टेरेसवर कोपर्‍यात पाणी ठेवत असत. आता तिथे स्मोकिंग झोन आहे.
पाण्याचा कूलर आतमध्येच कुठेतरी आहे.
पाणी विकत घेण्यास स्वतःस बाध्य करुन घेउ नका.
तुम्ही एक पर्याय म्हणून विकत घेण्यास हरकत नाही. पण बाध्य होउन, मजबूर होउन असे करु नका.

मन Fri, 18/04/2014 - 10:04

NOTA ह्या मतदानातील पर्यायाबद्दल बरीच उत्सुकता आहे. नक्की किती मतं ह्या ऑप्शनला जातील समजत नाही.
मी स्वतः त्याच्या वाटेला जाण्याची शक्यता नगण्य आहे.
पण ते किती महत्वाचे ऑप्शन आहे वगैरे वगैरे मी खुबीने इतरांना पटवून द्यायच्या विचारात आहे.
निदान ज्यांची मते माझ्या उमेदवाराच्या विरोधात जाणार अशी खात्री वाटू लागते; त्याचवेळी मी
"एकूणच सिस्टिम गंडली आहे. पण मत न देउनही काही साध्य नाही. निदान तिथे जाउन NOTA मार्फत आपले
मत नोंदवणे जरुरिचे आहे." वगैरे स्टाइल टकळी लावतो. थोडक्यात माझ्या विरोधक मतदारास nota वापरण्यास उद्युक्त
करुन मी माझ्या उमेदवाराच्या विरोधात जाणारी मते कमी करण्याचा प्रयत्न करतो.
त्यांना जाउ दे चुलीत सिस्टिमला शिव्या देत.
मी त्याच सिस्टिममध्ये राहून माझ्या निवडीच्याच उमेदवारास पुढे रेटित राहीन.
थोडक्यात, "लढाईत अर्थ नाही. एकूण जीवनात, संघर्षात अर्थ नाही. ही मोह माया आहे" असे युद्धातील किंवा
कोठल्याही संघर्षातील संभाव्य प्रतिस्पर्ध्यास वारंवार पटवून संन्यस्त होण्यास उद्युक्त करण्यासारखी ही कावेबाजी आहे.
"जीवनात अर्थ नाही, मी संन्यस्त होतो. किंवा हजची यात्रा करुन येतो" असे त्याला वाटू लागणे म्हणजे त्याने
संघर्षातून अंग काढणे; लढाईपूर्वीच माझा जय होणे.
nota देउन लै लै उपकार केल्याबद्दल निवडणूक आयोगाचे किंवा एकूणच व्यवस्थेचे लै लै आभार.
आम्ही ते वापरणार नाही; पण लोकांना वापरायला अवश्य उद्युक्त करुत.

चिंतातुर जंतू Mon, 21/04/2014 - 19:14

In reply to by मी

>> विटांचा तंदूर(brick oven)बनवण्याबाबत इथे कोणाला प्रथमहस्ते माहिती आहे काय?

काय भाजायचं आहे? मी घराच्या गच्चीत भाज्या आणि मांस वगैरे भाजण्यासाठी अगदी प्राथमिक तंदूर केली होती. रोट्या वगैरेंसाठी ह्याहून वेगळी रचना लागते.

  • सर्व बाजूंनी विटा रचून मधला भाग बंद करा. म्हणजे धग आत राहील.
  • वरचा भाग वायुवीजनासाठी आणि पदार्थ आतबाहेर करण्यासाठी मोकळा ठेवा. त्यावर हवी तेव्हा काढता घालता येईल अशी जाळी पसरा.
  • कोळसे पेटवून ते जाळीखाली सारा. (धग कमी होईल तसं हे पुन्हा पुन्हा करावं लागतं)
  • रताळी-कांदे-बटाटे इ. पदार्थ कोळशातच सारता येतात.
  • चिकन, मटण, मासे इ.चे तुकडे सळयांवर खोचून जाळीवर ठेवता येतात.

मी Mon, 21/04/2014 - 20:45

In reply to by चिंतातुर जंतू

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

काय भाजायचं आहे?

भाजता येण्याजोगं सगळं, रोटीसाठी माठासारखी किंवा मोठ्या रांजणासारखी रचना लागते त्यामुळे ते बाद आहे. मला प्रामुख्याने ओटीजीचे काम करणारी(री?) तंदूर बनवायची आहे.

सर्व बाजूंनी विटा रचून मधला भाग बंद करा. म्हणजे धग आत राहील.

गुगलल्यावर मिळालेल्या माहितीमधे घुमटाच्या आकाराच्या रचनेवर अधिक भर आहे, आणि एका बाजुला कोळसे/लाकूडफाटा आणि त्याच घुमटाखाली दुसर्‍या बाजुला पिझ्झा, बटाटे वगैरे शिजवताना दिसत आहे, चौकोनाकृती(म्हणजे ओटीजीच्या सारखी) रचना केल्यास भाजण्यात/शिजण्यात फरक पडतो का असा विचार करत होतो.

वरचा भाग वायुवीजनासाठी आणि पदार्थ आतबाहेर करण्यासाठी मोकळा ठेवा. त्यावर हवी तेव्हा काढता घालता येईल अशी जाळी पसरा.

महाबळेश्वरला मॅप्रो गार्डनमधे जी मोठी तंदूर आहे तीमधे तिन्ही बाजुंनी सरपण घालण्याची सोय दिसते, त्याचा पसारा मोठा होईल असे वाटते. त्याउलट बेकरीमधे(उदा. संतोष बेकरीमधे) मागे भट्टी व पुढून पदार्थ काढण्या-घालण्याची सोय आहे असे दिसते.

वरचा भाग वायुवीजनासाठी

धूर होणार, त्यासाठी चिमणी वगैरे करुन लावा असे सल्ले गुगलवर दिसले.

कोळसे पेटवून ते जाळीखाली सारा. (धग कमी होईल तसं हे पुन्हा पुन्हा करावं लागतं)

हो, हे जमेपर्यंत तापमान+वेळेच गणित जमवत रहावं लागेल हेहि कळतं आहे, पण कोळश्यांचा वास प्रत्येक पदार्थालाच आलेला प्रत्येकालाच आवडेल असं नाही, त्यामुळे त्याला काही पर्याय आहे काय?

चिंतातुर जंतू Mon, 21/04/2014 - 23:34

In reply to by मी

मी केलेल्या रचनेत कमी जागा लागते, कोळशाची बचत होते आणि उघड्यावर केल्यामुळे चिमणी वगैरे काही लागत नाही. इतर रचना (तीन बाजूंना सरपण, घुमटाकार, बेकरीतली भट्टी) मोठ्या आकारात अधिक सोयीच्या जातात. आकारामुळे अर्थात अधिक कप्पे, जास्त लोकांसाठी भाजणं वगैरे शक्य होतं, पण कोळसा / लाकूडफाटा अधिक लागतो.

>> कोळश्यांचा वास प्रत्येक पदार्थालाच आलेला प्रत्येकालाच आवडेल असं नाही, त्यामुळे त्याला काही पर्याय आहे काय?

ओटीजी वापरा ;-)

ऋषिकेश Tue, 22/04/2014 - 09:16

In reply to by मी

नाही पण मडकी रांजण वगैरेत शिजवणे ऐकून आमची लाडकी "पोपटी" आठवली.
भांभुर्ड्याचा पाला वापरून केलेली. उत्तर अरोमा लागतो पदार्थांना

बाकी कोळशाचा वास नको असेल तर अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये पदार्थ गुंडाळून भाजता येईल का?

बॅटमॅन Wed, 23/04/2014 - 14:23

In reply to by ऋषिकेश

भांभुर्ड्याचा पाला--> ही भांभुर्डा/र्डं/र्डे नामक नक्की कुठली वनस्पती आहे? भांबुर्डे नामक एक गाव तेवढे माहिती आहे जं.म.रोडवाले ;)

नितिन थत्ते Wed, 23/04/2014 - 14:24

In reply to by अजो१२३

शक्यता कमी वाटते.

तांदुळाला भरपूर पाऊस लागतो. ज्वारी कोरडवाहू जमिनीत येते बहुधा...
अर्थात कमी पावसाच्या प्रदेशातही तांदूळ येतातच (बासमती).

ऋषिकेश Wed, 23/04/2014 - 14:34

In reply to by अजो१२३

मल्टी-क्रॉप म्हणजे दुबार, तिबार पिके घेता येणारी जमीन.
त्या त्या मोसमात ते ते पिक. फक्त जमिनीचा कस चांगला असल्याने/राखल्याने एका वर्षात एकाहून अधिक वेळा -थोडाश्या मशागतीतून- पिक घेता येते.

अजो१२३ Wed, 23/04/2014 - 14:43

समजा क्ष ला य चे १. पूर्ण नाव माहित आहे. २. पूर्ण पत्ता आहे. ३. लिंग नि वय माहित आहे. ४. अलिकडे फोटो पाहिला आहे वा प्रत्यक्ष पाहिले आहे वा ओळखू शकतो ५. दोघे निवासी भारतीय आहेत. क्ष ला बाकी काहीच माहिती नाही.

क्ष ने य विरुद्ध खोडसाळपणे, टाईमपास म्हणून, कारण/ पार्श्वभूमी नसताना (अर्थातच हे फक्त त्यालाच माहित आहे.) य च्या गावापासून दूर, म्हणजे य कोचिनचा असेल तर खोख्राझारमधे, एक कोर्टात केस केली. अशी कि य ने क्ष विरुद्ध खोख्राझार मधे नागरी/गुन्हेगारी खटला भरला.

तर, (आणि कोर्टाचा निर्णय य च्या बाजूने लागल्यावर तो मानहानीचा, नुकसानभरपाईचा गुन्हा दाखल करू शकतो हे थोडा वेळ बाजूला ठेवले तर,)

१. बाकी काही का असेना, य ला इतक्या दूर किमान पहिल्यांदा जावे लागेलच का?
२. दुरुन का होईना, वकिल नेमावा लागेलच का?
३. य ने, आसामातून आलेली कोर्‍ताची पत्रे, वाचायला आल्याने, न आल्याने, कळून, न कळून उगाच तशीच ठेऊन दिली, काहीच केले नाही, कोणता बेल घेतला नाही, तर अचानक एक दिवस त्याला पोलिस अटक करू शकतात का?
४. समजा केस ट्रान्सफर नाही झाली, नि य ला दोष्मुक्त व्हायचे आहे, तर प्रवासाचा खर्च, वकिलाचा खर्च उचलावा लागेल का?
५. हा त्याला 'सुरुवातीलाच' परवडत नसला, तर य त्याच्या अप्रोक्ष गुन्हेगार ठरवला जाऊन सजा भोगू शकतो का?

मी असला प्रश्न का विचारत आहे? समजा क्ष एक सज्जन माणूस आहे. त्याला फक्त इतकेच चेक करायचे आहे ज्यांचे कडे खूप वेळ आहे, पैसा आहे, कायद्याची माहिती आहे ( पण जे कोणत्याही अर्थाने कायदा तोडत नाहीत, तोडूही इच्छित नाहीत, त्यांना कायद्याचा आदर* आहे पण 'शत्रूला' त्रास द्यायचा आहे) असे लोक विरोधकांना अकारण परेशान, बदनाम करू शकतात का?

* इथे केसचा बेसिस खोटा आहे, तेव्हा इन स्पिरीट आदर नाही. पण सगळ्या प्रोसिजर्सचा आदर आहे.

नितिन थत्ते Wed, 23/04/2014 - 15:19

In reply to by अजो१२३

गुन्ह्याच्या स्वरूपावर बरेच अवलंबून असते पण सामान्यतः
१. कोणत्या कारणाने तक्रार आहे याची नोटीस पाठवावी लागेल. नोटीशीला उत्तर देण्यासाठी/तक्रारीचे निवारण करण्यासाठी मुदत द्यावी लागेल. ती मुदत संपल्यावर कोर्टात दावा दाखल करावा लागेल.
२. कोर्ट लागलीच दावा दाखल करून घेत नाही. तक्रारीत तथ्य आहे हे कोर्टास पटवून द्यावे लागेल. त्यासाठी...
गुन्हा घडला आहे हे दाखवून द्यावे लागेल
तक्रारीचे निवारण करण्यासाठी आरोपीस संधी दिली होती (नोटीस पाठवली होती, योग्य पत्त्यावर पाठवली होती, ती आरोपीला मिळाली होती) हे दाखवावे लागेल.
कोर्टाचे प्रथमदर्शनी समाधान झाल्यास कोर्ट दावा दाखल करून घेईल आणि आरोपीस समन्स पाठवेल व सुनावणीची तारीख देईल.
सुनावणीच्यावेळी आरोपीला समन्स पाठवले आणि आरोपीने ते घेतले असा रिपोर्ट पोलीसांकडून यावा लागेल.

त्यानंतरच कोर्ट वॉरंट काढेल. त्यानंतरच अटक होऊ शकते.

चिरीमिरी देऊन या पायर्‍या गाळता येत असतीलही. कल्पना नाही.

वरील माहिती कलम १३८ खाली चेक बाउन्स होण्याची तक्रार केली होती त्या वेळच्या अनुभवातली आहे.

अजो१२३ Wed, 23/04/2014 - 16:37

In reply to by नितिन थत्ते

धन्यवाद. रोचक माहिती.

यात -
१. नोटिसा पाठवणे, मिळणे, परतपावती मिळणे, न मिळणे, उत्तर मिळणे, न मिळणे, नीट उत्तर न मिळणे, उत्तरच न मिळणे, इ इ नोटीस नोटीस खेळ किती चालावा याला मर्यादा असावी. १-२ नोटीसा वा काही वेळ पुरेसा असावा.
२. गुन्हेगारी खटल्यासांठी तर अशी नोटीसांची गरजच नसावी असे वाटते.
३. स्त्रीने वा दलिताने (लिंग, जाती निगडीत) अन्यायाची तक्रार केली तर?
४. इथे क्ष च्या स्थानच्या लोकांनी साक्षीदार इ बनून अशी तक्रार दाखल करून घेता येत असावी.

राज ठाकरे विरूद्ध बिहार मधे (दुरुनच) भावना दुखवल्याची केस होती. तिच्यात व्हिडिओ पुरावा असावा. म्हणजे ज्या गुन्ह्याला पुरावा नाही तो गुन्हाच नाही असे काहीसे असावे का?

नितिन थत्ते Wed, 23/04/2014 - 16:52

In reply to by अजो१२३

Notice is Deemed to be served असा प्रकार असतो.

१. मी रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठवली तसेच अंडर सर्टिफिकेट ऑफ पोस्टिंग सुद्धा पाठवली.
२. रजिस्टर परत आले "नॉट फाउंड" किंवा "नॉट क्लेमड" असा शेरा घेऊन.
३. नॉट फाउंड याचा अर्थ व्यक्ती त्या पत्त्यावर रहात नाही. मग तक्रार करणे कठीण होते.
४. नॉट क्लेम्ड याचा अर्थ व्यक्ती त्या पत्त्यावर रहाते पण तिने नोटीस स्वीकारली नाही.
५. व्यक्ती त्या पत्त्यावर रहाते याचा अर्थ तिला अंडर सर्टिफिकेट ऑफ पोस्टिंग वाली नोटीस मिळालीच असणार.
६. या स्थितीत नोटीस इज डीम्ड टु बी सर्व्हड... :)

आदूबाळ Wed, 23/04/2014 - 17:43

In reply to by अजो१२३

ठाकरे बोलले महाराष्ट्रात. म्हणजे "actionable cause" महाराष्ट्रात निर्माण झाला. हे प्रकरण महाराष्ट्रातल्या न्यायालयाच्या आधीन होऊ शकतं.

समजा दरभंगामधल्या माणसाच्या भावना दुखावल्या. तर भाऊ जिथे actionable cause आहे तिथे येऊन कृती कर ना.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 24/04/2014 - 21:28

In reply to by आदूबाळ

या संदर्भात भोचक कुतूहल म्हणूनच प्रश्न आहे -

राज ठाकरेंनी बोलण्याची कृती महाराष्ट्रात केली तरी त्याला प्रसिद्धी मिळाली कोणत्यातरी चॅनल किंवा पेपरात. त्या बिहारी व्यक्तीने तक्रार केली ते समजा चॅनलवरचं प्रसारण पाहून. तर गुन्हा प्रसारण करणाऱ्या चॅनलवरही दाखल होऊ शकतो का?

एखाद्या भावना दुखावल्या हे एकूणच क्षीण कारण वाटतं, न्यायालयीन कज्ज्यांसाठी. पण लोकांच्या फक्त भावना न भडकवता कृती करायला उद्युक्त केलं, तर गुन्हा कुठे नोंदवला जावा? समजा, वाशीत प्रक्षोभक भाषण केल्याचा परिणाम म्हणून पुण्यात जाळपोळ, माफक दंगलसदृश परिस्थिती आली, तर गुन्हा कुठे नोंदवला जाईल? आज इंटरनेट, टीव्हीच्या जमान्यात प्रक्षोभकतेचा प्रभाव बऱ्याच जास्त अंतरावरूनही पडू शकतो; अशा वेळेस कायदे कालबाह्य वाटतात अशा काही घटना आहेत का?

आदूबाळ Thu, 24/04/2014 - 22:44

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तर गुन्हा प्रसारण करणाऱ्या चॅनलवरही दाखल होऊ शकतो का?

नाही - कारण त्या चॅनलने त्यात काही value add केलेलं नाही. जे घडलं ते दाखवलं. आता त्या बिचार्‍या चॅनलला काय ठाऊक की राज ठाकरे सभेत "अडगुलं मडगुलं" म्हणणार का बिहार्‍यांना शिव्या घालणार.

समजा, वाशीत प्रक्षोभक भाषण केल्याचा परिणाम म्हणून पुण्यात जाळपोळ, माफक दंगलसदृश परिस्थिती आली, तर गुन्हा कुठे नोंदवला जाईल?

बहुदा दोन्हीकडे. पुण्यात दंगल केल्याचा गुन्हा, आणि वाशीत उद्युक्त केल्याचा गुन्हा.

अशा वेळेस कायदे कालबाह्य वाटतात अशा काही घटना आहेत का?

जशी संपर्काची साधनं प्रगत होत गेली तसे कायदेही उत्क्रांत होत गेले. Air and space law ही कायद्याची स्वतंत्र शाखा आहे. तीच गत Information technology कायद्यांची.

त्याअनुषंगाने:
- "कायदा किती ठिकाणी पुरे पडणार" या जुन्या प्रश्नाला उत्तर असलेला एक सुंदर पेपर - The law is a fractal. (जुरिसप्रूडंस सारख्या डोक्याला शॉट लावणार्‍या विषयावरही बर्‍यापैकी रोचक भाषेत लिहिलं आहे. गणिती प्रज्ञा असलेल्यांना नक्की आवडेल.)

- (अगदीच अवांतर, पण जिव्हाळ्याचा विषय) -
नवनव्या बिझिनेस मॉडेल्सपुढे आयकर कायदे थिटे पडतात. गूगल, अ‍ॅमेझॉन सारख्या कंपन्या आजिबात कर नसलेल्या ठिकाणी त्यांचं उत्पन्न दाखवतात आणि सगळीकडचा कर चुकवतात. [गूगल भारताच्या पेजवर जाहिरात दिसते. पण त्याबद्दलचे पैसे गूगल आयर्लंडला दिले जातात. उत्पन्न आयर्लंडमध्ये दिसतं आणि १२.५% आयकर भरून ते मोकळे होतात.]

दोन वर्षांपूर्वी याबद्दल इंग्लंडमध्ये बराच राडा झाला होता. सांसदीय कमिटीच्या सुनावणीत अ‍ॅमेझॉन आणि स्टारबक्सच्या CFOच्या अक्षरशः चिंध्या केल्या.

आता आंतरराष्ट्रीय कर कायदे बदलायचे वारे वाहताहेत.

ॲमी Mon, 28/04/2014 - 09:28

कादंबरीपेक्षा त्यावर बेतलेला चित्रपट &/ मालिका जास्त आवडली असं तुमच्या बाबतीत कधी झालं आहे का?

मला प्राइड अँड प्रिज्युडाइस पुस्तक फार रटाळ वाटलेल, आवडल नव्हतं. पण त्यावरचीच बीबीसी १९९५ मालिका www.youtube.com/watch?rl=yes&v=0Il3TrP2kRQ&feature=related&hl=en-GB&gui… फार्फार आवडली.
अटोनमेँट चित्रपट मी अजून पाहिला नाहीय. पण ट्रेलर बघुनतरी असं वाटतय की पुस्तक जसं रटाळ, शब्दबंबाळ वाटलेल (गुन्हा घडेपर्यँत) तसे चित्रपट पाहताना होणार नाही.

आदूबाळ Mon, 28/04/2014 - 14:07

In reply to by ॲमी

हो...

परवाच आठवण काढलेली "साळसूद". ब्योमकेश बक्षी.

--
अवांतर / value add प्रश्नः मूळ इंग्रजी कलाकृतीपेक्षा त्याचं भारतीय रूपांतर आवडलं आहे का?

मला "चाची ४२०" मूळच्या मिसेस डाऊटफायर पेक्षा जास्त आवडतो. त्यात "चाची का पती कौन?" हा जो राडा घातलाय तो केवळ उच्च आहे.

तसंच "अंगूर"चं.

मेघना भुस्कुटे Mon, 28/04/2014 - 14:27

In reply to by ॲमी

मीही माध्यमांतर - भाषांतर अशी सवलत घेणारेय.
***

मला डॉयलचा होम्स ठीकठाक वाटतो. पण बीबीसीचा शेरलॉक... असो.

'डेर फोरलेझर' ही श्लिंकची कादंबरी जर्मनमधून वाचताना धाप लागली. पण त्यावरचा सिनेमा फार आवडला होता. तसंच अंबिका सरकारांनी जर्मनमधून मराठीत केलेलं भाषांतरही सहजसुंदर होतं. त्याच लेखकाच्या 'दास वॉखनेंडं' या कादंबरीला तीनदा हात लावून माघार घेतली. पण सिनेमा मात्र आवडला होता.

तशीच 'दी इयर्लिंग' वाचायचा प्रयत्न केला. पण 'पाडस' इतकी अंतर्बाह्य मराठी आहे की 'कशाला उगा कष्ट?' म्हणून मूळ कादंबरी अर्ध्यात टाकून दिली खुशाल.

'लिटिल विमिन'चं शांताबाईंनी केलेलं भाषांतर मला अधिक लडिवाळ वाटतं. मूळ पुस्तक वाचलं मी, पण - तरीही 'चौघीजणी'च जास्त आवडली.

'माकडाच्या हाती शॅम्पेन' मी तीनदा पाहिलं. एकदाही बोअर झालं नाही. पण त्याच्यावरचा 'बदाम राणी गुलाम चोर' बघताना मात्र कंटाळाच आला. माकडटोपी घातली की तेच पात्र प्रत्यक्ष अस्तित्वात नसून व्हर्चुअली अस्तित्वात आहे, असं समजायचं - वगैरे 'मेक बिलिव्ह' गिमिक्स नाटकात मजा आणतात. त्याला समांतर काही सिनेमात करणं दिग्दर्शकाला झेपलं नाहीय, म्हणूनही असेल. शिवाय ओपन एण्डेड नाटकांची सवय मराठी प्रेक्षकांना आहे. पण ओपन एण्डेड सिनेमा त्या मानानं नवीन, म्हणूनही असेल. कुणास ठाऊक.

'लॉर्ड ऑफ दी रिंग्स'पण मला तू म्हणतेस तशी शब्दबंबाळ वाटली होती. पण हे माझं भाषादारिद्र्य असणार, कारण लोक ती त्यातल्या भाषेच्या ओघाकरता वाचतात. पण मला सिनेमेच जास्त आवडतात.

'लॉर्ड ऑफ दी फ्लाइज' मात्र पुस्तकच जास्त आवडलं होतं. त्यातला अंगावर येणारा क्रीपी भाग सिनेमात फार काही अंगावर आला नाही....

मस्त आहे प्रश्न तुझा.

ॲमी Wed, 30/04/2014 - 10:13

In reply to by ॲमी

धन्यवाद आदूबाळ :-)
साळसूद आणि व्योमकेश बक्षी दोन्ही मालिका मस्त होत्या. ही पुस्तक मात्र मी वाचली नाहीयत. प्रश्न रोचक आहे. Macbeth, Othello वाचलं नाहीय पण आपल्या विशाल भारद्वाजने बनवलेले मकबुल, ओँकारा अप्रतिम आहेत. अंगुरपण झकासच!

मेघना आभार :-) प्रतिसाद पचवायचा प्रयत्न करतेय कारण बरीच थोर्थोर नावं आहेत त्यात.
पण हे माझं भाषादारिद्र्य असणार, कारण लोक ती त्यातल्या भाषेच्या ओघाकरता वाचतात. >> मी भाषादरिद्रीतर आहेच + मला वाटत कल्पनादरिद्रीपण असणार :-D. कारण प्राइड अँड प्रिजुडीस व अटोनमेँट दोन्ही पुस्तकं मला नीट व्हीज्युअलाइज करता आली नव्हती. आपण ज्या देशात, ज्या पद्धतीने वाढलो त्यामुळे कदाचीत ही लिमीटेशन्स येत असावीत. म्हणजे मी भारतातल खेडं व्हीज्युअलाइज करु शकेन, पण युरोपमधली एकोणीसाव्या शतकातल खेडं वगैरे म्हणजे :-(

मन Wed, 30/04/2014 - 09:25

In reply to by अनुप ढेरे

छे हो!
ऋ मोदींवर नव्हे तर मोदींच्या धोरणावर टिका वगैरे करतात.
मग इथले उरलेले सदस्य जबाबदार आणि पोक्त नागरिकाप्रमाणे आपापल्या खुर्च्यात बसून मोदींना पाठिंबा किंवा
मोदींच्या धोरणाला वगैरे कडाडून केलेल्या विरोधाला जोरदार पाठिंबा देत देशाची दोन घटका चिंता वगैरे करुन झाली की
पुन्हा आपापल्या आयुष्यातले लोणी चापण्यात माझ्यासारखेच गर्क होतात.

मन Wed, 30/04/2014 - 09:51

कॉंग्रेसचे राज्य असेल तर भयत्कारी असेल.
टोकाच्या भ्रष्टाचाराने एका रात्रीत देश विकला जाइल.
वगैरे काहिच्या काही विधाने गर्दीतली माणसे करु लागली की विचारी, गंभीर (म्हणजेच काँग्रेसप्रेमी व कित्येक आघाडीचे ऐसीकर!)
गर्दीतील लोकांच्या अकलेची कीव वगैरे करतात.

आता हीच विचारी ,गंभीर वगैरे माणसे संभाव्य शक्यतेपैकी एक असलेल्या भाजपशासित सरकारचा अस्साच बागुलबुवा
उभा करीत आहेत.

काँग्रेसराज्याची कुणी भीती घेतली तर तो बिन्डोक व अकलेने कमी.
भाजपराज्याची कुणी भीती घेतली तर तो मात्र परम आदरणीय , अतिसंतुलित, थोर विचारवंत.
हे बरय.

कॉंग्रेस काय किंवा भाजप काय अल्पशा मर्यादेपलीकडे देशाचे वाटोळे किंवा भले करण्याची ताकत राखून नाहित
हे दिसत नाही काय. सरकार कुणाचेही आले तरी जो बट्ट्याबोळ आधीच सुरु आहे, तो आटोक्यात आणण्याची ह्यांची
ताकत नाही. अगदिच देश विकतो म्हणाले तर ईस्ट इंडिया कंपनीला घरची प्रॉपर्टी लिहून द्यावी तसे देश लिहून देण्याची
ह्यांच्याकडे पावर नाही. जगन्नाथ रथ असा एकट्याने हलणार आहे काय ?