Skip to main content

सामाजिक संकल्पनांची घटनात्मक वैधता

सामाजिक संकल्पनांची घटनात्मक वैधता
=====================

-राजीव उपाध्ये

निसर्ग बौद्धिक क्षमतेची देणगी सर्वांना समान देत नाही. त्यामुळे असे असमान बौद्धिक क्षमतेची वाटणी झालेल्या सदस्यांचे मानवसमूह भावनिक, आर्थिक, शारीरिक इ० गरजांच्या पूर्ततेसाठी कळप करून एकत्र राहतात. अशा कळपात राहताना कळप एकत्र ठेवण्यासाठी, तसेच कळपांतर्गत हितसंबंध अनेक ’सामाजिक संकल्पना’ (सोशल कंस्ट्रक्ट्स) सहसा कळपातले बलिष्ठ सदस्य निर्माण करतात. अशा सामाजिक संकल्पना रुजविण्यासाठी बळ, दंतकथा, भीति अशी वेगवेगळी साधने वापरली जातात.

मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कारविजेते: वि.स.खांडेकर

२६ फेब्रुवारी १९७६ हा दिवस मराठी साहित्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला. कारण याच दिवशी मराठी भाषेला पहिल्यांदाच ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि तो मिळाला महान साहित्यिक वि. स. खांडेकर यांना. हा पुरस्कार त्यांच्या ‘ययाती’ या कालजयी कादंबरीसाठी देण्यात आला. हा सन्मान फक्त एका लेखकाचा नव्हता; तो संपूर्ण मराठी भाषेच्या सर्जनशील शक्तीचा आणि तिच्या समृद्ध साहित्यपरंपरेचा गौरव होता. त्या क्षणी मराठी साहित्याने राष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख अधिक ठळकपणे निर्माण केली.

मेंदूची लवचिकता

मेंदूची लवचिकता
===========

- राजीव उपाध्ये

अनेक वर्षांपूर्वी प्रा० शिवाजीराव भोसले दै० सकाळ मध्ये एक लेखमाला लिहीत असत. एकदा त्यांनी योगावर लेख लिहीला होता. त्या लेखातले एक वाक्य डोक्यात एकदम चपखल बसले होते. त्यांनी लिहीले होते - योग आणि ध्यानाने मूळचा कवी मनुष्य अधिक चांगला कविता करेल, मूळ चित्रकार अधिक चांगला चित्रकार होईल, तसेच एखादा खेळाडू आपला खेळ सुधारेल. थोडक्यात मूळ गुणवत्तेला योगाने पुष्टी मिळू शकते.

निरीश्वर विचार

धार्मिक कट्टरतेचा समाचार कसा घ्यावा? विवेकी विचारांचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व कसे अधोरेखित करावे? वैज्ञानिक प्रवृत्ती आणि मानवतावाद कसा जपावा?

शून्याच्या शोधात...

शून्य ही संख्या नाही असे तुम्हाला वाटत असल्यास काही हरकत नसावी. कारण संख्यांचा वापर मोजण्यासाठी असतो. व जेथे काहीच नसते तेथे मोजणार कसे?

ऑपरेशन अबॉर्शन

दहा-अकरा वर्षांपूर्वी ऑफिसच्या कामानिमित्त माझी आमच्या मलेशियातील ऑफिसमध्ये इंटर्नल ट्रान्स्फर झाली. त्या वेळी मलेशियाला ट्रान्स्फर घेण्यामागची अनेक कारणं होती; त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मलेशियातलं अफाट फूड वैविध्य. लोकल मलेशियन, चायनीज, थाय, व्हिएटनामी, फिलिपिन्ससारख्या साऊथ-ईस्ट एशियन देशांच्या नानाविध रुचकर डिशेस, शिवाय इतरही अनेक युरोपियन, मिडल-इस्टर्न देशांच्या खाद्यसंस्कृती, कौलालंपुर ह्या मलेशियाच्या राजधानीतल्या प्रत्येक कोपऱ्यावरच्या रेस्टॉरंटमध्ये सहज उपलब्ध आहेत. 

"मॉलप्रॅक्टिसेस अँड द शो": थिएटर ऑफ द ग्रोटेस्क

"मॉलप्रॅक्टिसेस अँड द शो: थिएटर ऑफ द ग्रोटेस्क"

अलिकडे पुण्यामधे "द बॉक्स" ह्या "इंटिमेट" म्हणता येईल अशा थिएटरमधे "मॉलप्रॅक्टिसेस अँड द शो" ह्या नावाचं नाटक पहायला मिळालं. दिग्दर्शक : अतुल पेठे. 

धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य

मानव ऋषीने दगड घासून अग्नी प्रज्वलित केला. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली “हे अग्नी, सुख-समृद्धी दे, शत्रूंवर विजय मिळवून दे.” त्याने उच्चारले: “अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम.”

"...बट ही वॉज नेव्हर अग्ली!"

"कधी थांबणार आहात की नाही तुम्ही?" हा प्रश्न वयाची साठी ओलांडलेल्या अजितदादांनी त्यांच्या वयाची ऐंशी ओलांडलेल्या काकांना उद्वेगानं आणि जाहीरपणे विचारला होता. त्याच अजितदादांना नियतीनं अकाली थांबवलं. ट्रॅजिक एंड! दुर्दैवी अंत. महाराष्ट्र हळहळला. राजकीयदृष्ट्या अजितदादा जवळचे असोत, की नसोत हा मृत्यू चटका लावून गेला.