Skip to main content

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७०

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.

यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

माझा छोटा तान्त्रिक प्रश्न आहे. गूगलवर मराठी - देवनागरी शब्द टाकून शोध घेतला तर कधीकधी पुढे आलेले सर्व धागे हिंदी असतात. विशेषतः घातलेला शब्द मूळ संस्कृत असून हिंदी आणि मराठी ह्या दोन्ही भाषांमध्ये वापरला जाणारा असला तर असे फार होते.

उत्तरे मराठीवाली हवीत हे गूगलला कसे पटवायचे?

मिहिर Fri, 16/09/2016 - 20:31

दोन पर्याय:
१. 'गूगल.को.इन'वर मराठी भाषा निवडणे. हे केल्यावर मराठी निकाल जास्त येतात.
२. 'गूगल.कॉम'वर शोधताना मूळ शब्दाबरोबर 'आहे', 'आणि' अशा प्रकारचा मराठीत भरपूर वापरला जाणारा, पण हिंदीत वापरला न जाणारा शब्द शोधचौकटीत टाकणे.

राजेश घासकडवी Sun, 18/09/2016 - 21:48

In reply to by मिहिर

मीही एखादा मराठी शब्द जोडतो. त्याने प्रचंड फरक पडतो. उदाहरणार्थ
स्वच्छ - सगळी हिंदी पानं
स्वच्छ आहे - सगळी मराठी पानं

चिमणराव Sat, 17/09/2016 - 15:04

मराठीतू शोध गुगलवर - असंच भन्नाट हिंदी येतं.
______________
प्रश्न -
प्राइम मार्गेज का काय यावर युएसए सरकार ब्यान्कांवर(उदा डॅाइश ) फाइन लावताहेत ( ते समजणार नाहिये )हे वाचलं, तर त्यांना नियम अटी माहित नाहीत असे कसे होईल? काही कायदेशिर मुद्द्याची खोच आहे का?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 19/09/2016 - 20:07

In reply to by रेड बुल

मृत आणि जखमी लोकांना, त्यांच्या कुटुंबियांना जखमा भरून येण्यासाठी सहवेदना.

रेड बुल Tue, 20/09/2016 - 19:37

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वाटत नाही.

हां तर असंवेदनशीलता झाकायचा प्रयत्न... अर्थात संस्थळावर/समस्त अविवेकी मुक्तीवाद्यांवर टीपणी केली की ते ट्रोलिंग आणि सदस्य रेफ़रन्स देऊन विरोध नोंदवला की वैयक्तिक हल्ला अशी बोंब ठोकणारे आणखी काय बोलणार म्हणा ?

एव्हड़ा मोठा हल्ला झाला पण ऐसीवर त्याची विशेष दखलही नाही

दखल घेतली म्हणजे फार कळवळा असतो, संताप असतो असे नाही तसेच दखल घेतली नाही म्हणजे असंवेदनशीलता असते असेही नाही.
हे वाक्य पुढील वाक्याच्या तालावरती वाचावे -
Sagittarius woman will probably tell you that - waltzing in at mid­night doesn't indicate promiscuity any more than coming home at a more conventional hour indicates innocence.

रेड बुल Tue, 20/09/2016 - 21:51

In reply to by .शुचि

यासंदर्भात ते वाक्य आहे त्यापलिकडे जास्त खोल अर्थ नको बघायला... उद्या अनेक नव्या सदस्यांना पडणारा एका प्रश्नाचे हे उत्तरही आहे तो प्रश्न म्हणजे सगले शहाणे इथे असुनही तुलनेत संस्थळ सुनं का... कारण हेच की सामान्य वाचकाच्या डेटुडे प्रश्न संदर्भाचा फुटकळ बौध्दिक अहमन्यते मुळे टाळलेला मागोवा. आणि कोणी यावर निराशा दाखवली तर याच बौध्दिक अहमंन्यतेच्या आहारी जाउन स्वचुकांचा करायचा बिनडोक पुरस्कार.... वाह !

उठसुठ लोकांच्या श्रध्दास्थानांची मापे काढायची ते 5 मार्मिक म्हणून मिरवायचे तो च प्रकार यांच्या तत्वज्ञाना विरोधात केला की ते निर्थक ट्रोलिंग... वाह

.शुचि. Tue, 20/09/2016 - 21:53

In reply to by रेड बुल

ऐसी = ऐसीचे संपादक नसून ऐसीचे सदस्य आहे. प्रत्येकाचा काहीतरी अजेंडा बनुन गेलेला आहे जसे अदिती इज पॅशनेट अबाऊट स्त्रीमुक्ती, मला मेंटल हेल्थ या विषयाबद्दल आत्मियता आहे, राघांना विज्ञान तर नानावटींना अंधश्रद्धा निर्मूलन व बर्‍याच सामाजिक बाबींबद्दल. काहीजण खगोलशास्त्रात प्रवीण आहेत तर काही कॅपिटॅलिझम वगैरे कोणी राजकारणाबाबत हिरीरीने बोलतो तर कोणी सिनेमाबाबत किंवा कवितांबाबत.
तुम्हीही दोन सामाजिक काथ्याकूट टाकले आहेत. मिलिंदजी सुद्धा टेररिझमच्या बातम्या रेग्युलरली टाकत असतात व त्यांवरते चर्चा झडतात.
.
मग उगाच त्रागा करण्यात किंबहुना टीका करण्यात काय अर्थ आहे?

.शुचि Tue, 20/09/2016 - 22:01

In reply to by रेड बुल

ओके त्रागा नाही टीका. माझा शब्द चुकला.
निदान या मान्यतेमुळे म्हणजे चूकी कबूल केल्याममुळे सदस्य ओपन माईंडेड आहेत याचादेखील पुरावा मिळत नाही काय? मात्र ओपन माईंडेड आहेत हे आता कबूल करण्याची पाळी तुमची.

रेड बुल Wed, 21/09/2016 - 09:48

In reply to by .शुचि

माझी सर्व वास्तव निरिक्षणे धाग्यावर ट्रोलांनी निरर्थक अन भडकाउ ठरवली आणि तुम्ही म्हणता गोड शेवट ? तसेही तुमच्या माझ्यात कटूताच नाही तर गोड शेवट करून साध्य काय ?

माझा विरोधा या बौध्दिक अहमन्यतेच्या ट्रोलिंग विरोधात आहे आणि त्यांची पुन्हा पुन्हा वैचारिक घुसमट मी करत राहीन जोपर्यंत त्यांना विरोधी मताना निरर्थक श्रेन्या देण्याचा पळपुटेपणा सोडून वास्तववादी खुल्या चर्चेच्या मैदानात पाय ठेवायचे बळ उत्पन्न होत नाही

.शुचि Tue, 20/09/2016 - 22:14

In reply to by रेड बुल

सगले शहाणे इथे असुनही तुलनेत संस्थळ सुनं का

संस्थळ सुनं असणं वाईट व भरलेले असणे चांगले असा समज नक्की का आहे? क्वालिटी नको का पहायला? कुत्र्याला १० पिले होतात, सिंहाला एक किंवा दोन. कोण श्रेष्ठ?

* ही तुलना किंचीत चुकलीये. कुत्र्यासारखी राखण सिंह करणार नाही व सिंहासारखा रुबाब कुत्र्यास दाखविता येणार नाही. पण मर्म कळले असेल असे अ‍ॅझ्युम करते. बाय द वे इथे कुत्र्या ऐवजी डुक्कर हा शब्द योग्य बसला असता का? बहुतेक नाहीच कारण डुकराचाही काहीतरी उपयोग होतोच. जसे निसर्गातील घाण कमी करणे.
पण मग मला नक्की काय दाखवायचे होते, हलका दर्जा का? तसे असेल तर कोणताच प्राणी हलक्या दर्जाचा नाही. तेव्हा सिंहाशी तुलना कोणत्याच प्राण्याची होणार नाही :(
.
असो काल व्यायाम बरा झालाय. आज डोकं कमी फॉगी आहे. ;)

अबापट Thu, 22/09/2016 - 09:01

In reply to by .शुचि

हे जरी खरे असले , तरीही मलाही या हल्ल्याच्या बद्दल अनुल्लेखाचे आश्चर्य वाटले . शब्दबंबाळ श्रद्धांजल्या वगैरे नाही झाल्या हे ठीकच , पण अनुल्लेखाचे आश्चर्य. मान्य आहे कि जास्त लिहिते सभासद भारतात रहात नसावेत , त्यामुळे थोडे... पण तरीही. (तुम्ही का लिहिले नाहीत तिथे राहूनही असा योग्य प्रश्न येऊ शकतो. माझे वैयक्तिक उत्तर असे कि गेले चार पाच दिवस अतिव्यग्र होतो )8

.शुचि Wed, 21/09/2016 - 19:48

जर एखाद्या सुप्त जादूने आपल्याला कळले की अमुक एक व्यक्ती आपल्याला या दिवसानंतर कधीच भेटणार नाही आहे (कारण काही का असो) तर आपण शेवटच्या दिवशी त्या व्यक्तीशी काही खास वेगळे वागू का? उदा - अतिप्रिय व्यक्ती तर अर्थातच रडू येईल, दु:ख होइल वगैरे. पण हाऊ अबाऊट - एक तिर्‍हाईत व्यक्ती आहे म्हणजे त्रयस्थ. उदा मी व अनु किंवा मी व अप्पा जोगळेकर. मग त्या शेवटच्या दिवशी "How will I chose to TREAT them?" मोअरओव्हर "Will that reflect on me as well as that person equally?"
जसे मला माहीत आहे की परत अमका अमकी मला भेटणार नाहीच आहेत मग मी कशाला धड बोलू, कर्टसी दाखवु? किंवा असेही होइल, मला असे वाटू शकते की ही शेवटची संधी आहे, स्वतःला हायलाईट करण्याची, त्या व्यक्तीच्या स्मृतीत मला स्थान प्राप्त करण्याची.
.
मला हा प्र्शन विशेषतः व्हर्च्युअल जगात नेहमी पडतो. की आज आला किंवा आली आहे उद्या येइल का? मला परत भेटेल का/दिसेल का? पण खर्‍या जगातही ही जीवनाची क्षणभंगुरता सतावते. म्हणजे प्रिय व्यक्तींबाबतही हीच हळवी भावना मनात येते, मन "खुदा हाफीझ - खुदा हाफीझ" म्हणत रहातं.
.
कदाचित या वागणुकीला "स्वभाव" हाच निकष लावता येइल. उदा - जेव्हा माझा आजार ट्रिगर झालेला व माहीतही नव्हते की अमुक एक आजार आहे तेव्हा मला अत्यंत तीव्रतेने वाटायचे (गट फीलिंग/ इन्टेन्स फीलिंग) की मी नवर्‍यापासून व मुलीपासून फार दूर जाणार आहे कधीही परत न येण्यासाठी. हे इतकं vehemently, fiercely violently वाटायचे की त्रास व्हायचा. आणि काहीच दिवसात मृत्युच्या दारात जाऊन मी डोक्टरंच्या कौशल्यामुळे व नवर्‍याच्या अपरिमीत समजूतदार शुश्रुषेमुळे परत आलेही.
.
असो तर मी कधीकधी माझ्या मित्राला म्हणते "पुढील जन्मी कोण होऊन भेटशील? सांग आत्ताच्या आत्ता सांग."
.
तर असे कोणाला वाटते का. ही irrational uncertainty की परत भेट होइल का नाही?

अतिशहाणा Wed, 21/09/2016 - 19:49

In reply to by .शुचि

अनेकांना भेटल्यावर मला नेहमी वाटतं की ही शेवटचीच भेट असली तर उत्तम. ही व्यक्ती पुन्हा भेटली नाही तर खूपच बरं होईल.

.शुचि Wed, 21/09/2016 - 20:01

In reply to by अतिशहाणा

=)) =)) मला अशी एकही व्यक्ती पहाण्यात नाही :)
___
अति जल राशीतील ग्रह = अति अ‍ॅटॅचमेन्ट हाच आमचा प्रॉब्लेम आहे. किंवा स्वभाव म्हणा ना.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 21/09/2016 - 20:18

In reply to by अतिशहाणा

लादलेल्या लोकांपैकी अनेकांबद्दल हल्ली मी असा विचार करते की हे लोक मला नात्यांबाहेर भेटले असते तर मी ह्या लोकांची दखल घेतली असती का? ह्या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं आलं तर त्या लोकांशी माझे संबंध फार टिकणार नाहीत ह्याची मला कल्पना येते. मी मुद्दाम संबंध कमी करतेच असंही नाही; कधीतरी मोदी, ट्रंप, धर्म, माझा धर्मबुडवेपणा (किंवा मला माधुरी दिक्षित अभिनेत्री न वाटता नटी वाटते) ह्यावर चर्चा होतात, प्रत्यक्षात किंवा फेसबुकवर; ह्या लोकांना माझा कंटाळा येतो किंवा मला त्यांचा येतो. आणि संबंध कमी होतात. कधी परस्परांना friendly fade दिला जातो.

हल्लीच एका आतेबहिणीशी फेसबुकवर संपर्क झाला. आमच्या मैत्रयादीत खूप कॉमन लोक आहेत; तिची भिंत पाहिल्यावर मला तिची व्यक्ती म्हणून दखल घ्यावीशी वाटली. पण हे अपवादाचं उदाहरण.

.शुचि Wed, 21/09/2016 - 20:41

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

friendly fade - हे मला न पचणारं उदाहरण आहे :(
पण आपली मैत्री, व्यक्तीमत्त्व दुसर्‍यावर लादू नये हेही कळतं पण ..... आपल्याला एखाद्या व्यक्तीची मैत्री (सोशल इन्टरॅक्शन) हवीशी वाटते व त्या व्यक्तीला आपली नकोशी वाटते किंवा निदान विशेष काहीच वाटत नाही हे मला कधीच पचलेले नाही. विच इज अ डिफेक्ट इन माय नेचर.
.
मग असे वाटते अरे मी या व्यक्तीला इम्प्रेस करायला हवे होते मग ही व्यक्ती माझ्याशी बांधली गेली असती = अमुक वेळी असे वागायला नको होते, तसे वागायला नको होते.
पण या जर तर ला अर्थ नसतो. You simply aren't meant to be each other's friends in this life. आणि पुढील जन्माचे तर कोणी पाहीले आहे? मैत्री हा २-वे स्ट्रीट असतो. म्युच्युअल अ‍ॅडमायरेशन मधुनच मैत्री होऊ शकते. गब्बर यांनी पूर्वी सुचविलेले "friendship an expose joseph epstein" पुस्तक मस्त आहे. अगदी नॉन्ग्लोरीफाय करुन, काव्यात्मकता टाळून मैत्री या संकल्पनेची चिर्फाड केलेली आहे, चिरफाड नाही अ‍ॅनॅलिसीस (विश्लेषण).

.शुचि Wed, 21/09/2016 - 21:37

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तू म्हणजे साक्षात वायु+अग्नि तत्वाच्या कुंडलीचे उदाहरण असावीस मला खात्री आहे. डिटॅचमेन्ट/फटकून वागणे/अंतर ठेवणे + स्पष्टवक्तेपणा.
___
वायु तत्वाचे लोक डिटॅच्ड असतात. कोणी गुदमरवुन टाकण्याइतके कोणाला जवळच येऊ देत नाहीत. जल आणि वायु विपरीत नाही पण न्युट्रल आहेत. हां जल आणि अग्नि विपरीत तत्वे आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 22/09/2016 - 07:14

In reply to by .शुचि

हे तेल तत्त्व आहे. सदैव अंगाला, मनाला तेल चोपडून ठेवायचं. कोणी पकडलं तरी सहज निसटता येतं. तुमची कुंडली फार कामाची नाही वाटत!

'न'वी बाजू Tue, 27/09/2016 - 16:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(किंवा मला माधुरी दिक्षित अभिनेत्री न वाटता नटी वाटते)

कोण माधुरी दीक्षित?

धन्यवाद.

(अतिअवांतर: 'नटी' बोले तो nutty काय?)

आदूबाळ Wed, 21/09/2016 - 21:42

In reply to by .शुचि

जर एखाद्या सुप्त जादूने आपल्याला कळले की अमुक एक व्यक्ती आपल्याला या दिवसानंतर कधीच भेटणार नाही आहे (कारण काही का असो) तर आपण शेवटच्या दिवशी त्या व्यक्तीशी काही खास वेगळे वागू का?

असं अनेकदा झालं आहे. कित्येक क्लायंट, ट्याक्स ऑफिसर असे 'शेवटचे भेटले' आहेत.

इट्स नो बिग डील. पूर्वी जसे संबंध होते तसेच शेवटच्या भेटीतही राहिले. उदा० एका ऑफिसरशी नेहेमी भांडणं व्हायची. तसं शेवटच्या भेटीतही झालं. "तुमच्या पुढचा माणूस तरी रीझनेबल असेल अशी आशा करतो" अशा काहीतरी आशयाचं त्याचं शेवटचं वाक्य होतं असं आठवतंय. (इन हाईंडसाईट - मी जरा त्याला जास्तच त्रास देत असे. तब तरूण था मय.) मी-त्याच्याशी-तो-माझ्याशी शेवटच्या भेटीतही काहीही वेगळं वागलो नाही.

.शुचि Wed, 21/09/2016 - 21:44

In reply to by आदूबाळ

तुम्ही नक्की पृथ्वी प्रधान. चंगले तेवढे वेचून घ्यायचे, वाईटकडे दुर्लक्ष. फार भावुक होऊन डोक्याला शॉट नाय पायजेल. एकदम व्यवहारी, स्टेबल.

.शुचि Wed, 21/09/2016 - 21:51

(१) इन्सेन्टिव्हज देऊन त्यांची सवय लावुन, नंतर ते इन्सेन्टिव्हज होल्ड बॅक करुन - हवे ते मिळविता येते
(२) आधीच उपद्रवमूल्य अति ठेऊन, व नंतर ते कमी करण्याची (एक्झेम्प्ट?) लालूच दाखवुन, हवे ते मिळविता येते.
___
ही थिअरी कोणी मांडली आहे की नाही माहीत नाही. पण हे नीरीक्षण आहे. असे हवे ते करवुन घेण्याचे अन्य मार्ग सुचवा. प्लीज प्लीज सुचवाच!!

अनु राव Thu, 22/09/2016 - 09:15

In reply to by नितिन थत्ते

हो आणि घेतलाच तर कमीतकमी १५ दिवस तोच आयडी वापरायचा, बदलायचा नाही असे काही करता येणार नाही का?
:p

तिरशिंगराव Thu, 22/09/2016 - 17:38

आय डी बदलता येत नाही, म्हणून बोधवाक्यच बदललं.

चिमणराव Thu, 22/09/2016 - 18:03

प्रत्येक आइडी हे स्वतंत्र वेगळेच व्यक्तिमत्त्व म्हणून लोकांसमोर जाता येत असेल तर मी तसे चारपाच आइडी घेईन.तांत्रिक दृष्ट्या शक्य आहे.ऐसीच्या नियमांत बसायला आणि लिहायला काहीच अडचण नसावी.मला कुठे फटकळ/गुळमुळीत होता येत असेल तर करेन.पण ओळख वेगळीच ठेवेन आणि आपसात प्रतिसाद देणार नाही.

.शुचि Thu, 22/09/2016 - 18:28

In reply to by चिमणराव

होय मी आपसात कधीच प्रतिसाद दिले नाहीत. प्रत्येक वेळी मला वाआट्ले की आय डी ची डेथ = माझ्यातल्या एखाद्या गुणावगुणाची डेथ (मी जाणते की हे चाइल्डीश आहे) पण परत ये रे माझ्या मागल्या. स्वतःपासून सुटका नसते हेच खरे.

अनु राव Thu, 22/09/2016 - 18:32

In reply to by चिमणराव

पण ओळख वेगळीच ठेवेन आणि आपसात प्रतिसाद देणार नाही.

मी ओळख पण वेगळी ठेवते आणि आपासात प्रतिसाद पण देते. मनोबा च्या ललिताला लगेच रडगाणे म्हणुन हिणवते.

.शुचि Thu, 22/09/2016 - 19:34

In reply to by चिमणराव

हे खरे आहे. मला खूपदा वाटते माझ्या मैत्रिणींना हे संस्थळ सुचवावे. पण मी सुचवत नाही कारण हात दाखवुन अवलक्षण. माझा इथला बागड-वावर त्यांनी पाहू नये ;). हे माझे मनमुराद बागडण्याचे क्षेत्र आहे इथे मला कोणाची जजमेन्टल नजर नको.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 23/09/2016 - 02:20

In reply to by .शुचि

हे माझे मनमुराद बागडण्याचे क्षेत्र आहे इथे मला कोणाची जजमेन्टल नजर नको.

जजमेन्टल नजर नको म्हणून तू मराठी संस्थळावर, त्यातून ऐसीवर! अरेरे, कुठे नेऊन ठेवलं ऐसी आपलं!!

रेड बुल Sat, 24/09/2016 - 13:57

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जजमेन्टल नजर नको म्हणून तू मराठी संस्थळावर, त्यातून ऐसीवर! अरेरे, कुठे नेऊन ठेवलं ऐसी आपलं!

अनिवासी भारतीय असल्याची(किमान अधुन मधुन) खात्री पटवलीत की ऐसीचे अह्मन्य मीत्रकुट अशा सदस्यांचे कसलेही चाळे(उर्फ लिखान) फार सहज जजमेंटल बनण्यापासुन दुर्लक्षीत करतं न्हवे ते फारच खेळकरपणे घेतं हे निरीक्षण आहे. त्यामुळे ऐसी अजुन कुठेही कुणीही न्हेउन ठेवलेलं नाही जन्मापासुन जिथे आहे तसेच अन तिथेच आहे असे निरीक्षण आहे असे मला वाटते.

गब्बर सिंग Sun, 25/09/2016 - 05:26

In reply to by रेड बुल

अनिवासी भारतीय असल्याची(किमान अधुन मधुन) खात्री पटवलीत की ऐसीचे अह्मन्य मीत्रकुट अशा सदस्यांचे कसलेही चाळे(उर्फ लिखान) फार सहज जजमेंटल बनण्यापासुन दुर्लक्षीत करतं न्हवे ते फारच खेळकरपणे घेतं हे निरीक्षण आहे.

अगदी.

"मी सोमालियन कंपनी मधे कामाला आहे" असं त्यानं सांगितलं आणि सगळ्यांनी त्याच्यासमोर आदराने माना तुकवल्या. व त्यानंतर त्याचं म्हणणं सगळे जण खेळकरपणे घ्यायला लागले.

काळाचा महिमा. दुसरं काय !!!

रावसाहेब म्हणत्यात Sun, 25/09/2016 - 04:57

आता मनातील विचार थ्रेड वर आलोच आहे म्हणून सांगतो -

मला आमच्या एका मित्रांनी ही साईट सुचवली. पण बऱ्याच महिन्यांपूर्वी आयडी काढून ही साईट फारच user unfriendly वाटल्याने काही जास्त पोस्ट केले नाही. त्यात इथे बऱ्याच जणांचे शुद्ध मराठी पाहून डोके गरगरले.

पण मराठी आणि विनोदाची आवड असल्याने, आज शेवटी पुन्हा एक ट्राय मारायचं ठरवून कंबर कसून साईटवर आलोय.
प्रत्रीक्रिया समाप्त (वरील प्रत्रीक्रीयेवरून अजून एक पुणेकर उपटला असे वाटणाऱ्यांना सांगू इच्छितो मी पुण्याचा नाही).

राही Sun, 25/09/2016 - 21:27

In reply to by रावसाहेब म्हणत्यात

मला वाटतं इथली सदस्यसंख्या मुळात कमी आहे त्यामुळे त्यात महाराष्ट्रात स्थायिक असलेलेही ओघानेच अगदी कमी. त्यामुळे मराठी लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय ऐसीवर निघतच नाहीत. महाराष्ट्रातल्या चालू बातम्या, चालू घडामोडी यात इथल्या सभासदांना फारसा रस नसतो. पुन्हा कारण तेच की महाराष्ट्र सोडून ते बरेच दूर गेले आहेत. शरीराने आणि मनाने. मला नक्की माहीत नाही, पण मालक आणि संपादक सगळेच परदेशी नागरिक किंवा अनिवासी भारतीय असावेत. इथल्या बदलत्या वास्तवाविषयीची त्यांची जाण आणि ओळख धूसर होऊ लागली असावी, जरी संपर्कक्रांतीमुळे स्थळकाळ जवळ आला असला तरी. त्यामुळे स्थानिक लोकांना रस वाटेल असे विषय इथे निघू शकत नाहीत. स्थानिक (आणि तरुण) सदस्यांची संख्या वाढणे हाच उपाय यावर दिसतो.
भाषेविषयी म्हणायचे तर शुद्धतेविषयी फारसा आग्रह कधी दिसला नाहीय पण महाराष्ट्रातल्या बोलीभाषांतून व्यक्त होऊ शकणारे आणि त्यात आनंद असणारे लोकच इथे नाहीत. त्यामुळे प्रमाणित मराठीतूनच लिहिले जाते. बाकी माफक तिरकस शेरे वगैरे असतात. अगदी शिवीगाळ आणि वैयक्तिक अपमान नसतो हा प्लस पॉइन्ट्च आहे.
ता. क. आपण पुणेकर नसावेतच. कारण पुणेकर कधी आपले मत इतक्या स्वच्छ सरळपणे व्यक्त करीत नसतात असे म्हणतात.

नितिन थत्ते Mon, 26/09/2016 - 09:31

In reply to by राही

>>पुन्हा कारण तेच की महाराष्ट्र सोडून ते बरेच दूर गेले आहेत. शरीराने आणि मनाने. मला नक्की माहीत नाही, पण मालक आणि संपादक सगळेच परदेशी नागरिक किंवा अनिवासी भारतीय असावेत. इथल्या बदलत्या वास्तवाविषयीची त्यांची जाण आणि ओळख धूसर होऊ लागली असावी, जरी संपर्कक्रांतीमुळे स्थळकाळ जवळ आला असला तरी. त्यामुळे स्थानिक लोकांना रस वाटेल असे विषय इथे निघू शकत नाहीत. स्थानिक (आणि तरुण) सदस्यांची संख्या वाढणे हाच उपाय यावर दिसतो.

याविषयी साशंक आहे.

अबापट Tue, 27/09/2016 - 18:06

In reply to by राही

पुण्याची बदनामी थांबवा !!!( बोल्ड टायपात छापणे) पुणेकर स्वच्छ सरळ भाषेतच बोलतात ( इतरांना ते खवचट वाटते एवढेच )

.शुचि Tue, 27/09/2016 - 19:14

In reply to by चिंतातुर जंतू

असोच.

रावसाहेब म्हणत्यात Wed, 28/09/2016 - 05:29

In reply to by अबापट

दुसऱ्याने काय करावे हे सांगणे थांबवा. :)

ऑन ए सिरीयस नोट, माझ्या मते पुण्याची खवचट भाषा ही बदनामी नसून तो एक सांस्कृतिक विषय झाला आहे. जसं सरदार जोक्स किंवा ज्यू बद्दल जोक असतात. कुणीही कितीही ठणाणा केला तरी कुणी थांबवत नसतं. उलट मुंबईत तर जो "मला चिडवणं थांबवा" म्हणतो त्याची चड्डी आधी उतरवतात.

.शुचि Wed, 28/09/2016 - 07:54

In reply to by रावसाहेब म्हणत्यात

ऐसी ना मुंबई आहे ना पुणे, ग्लोबल व्हिलेज आहे.असं व्हिलेज (गाव) ज्याच्यात नाना स्वभावांचे नग आहेत :) आणि कोणीही आपला मूळ स्वभाव सोडायला तयार नाही हाहाहा
आणि म्हणुनच अ‍ॅट द एन्ड ऑफ द डे रिलॅक्स होण्याकरता, सकस मनोरंजन, माहीतीच्या देवाणघेवाणीकरता, पाय इकडे वळतातच :)

अंतराआनंद Tue, 27/09/2016 - 19:15

In reply to by राही

@राही:
थोडंफार का? अगदी खरं आहे असं मला तरी वाटतं. पण इकडे लिखाण आवडलं नाही तर लोकं दुर्लक्ष करतात म्ह्णून आणि सवय झालीय म्हणून येते. आता खरं तर "तिथे" जी कुस्ती खेळली जाते त्या मातीत अंग मळवावे वाटत नाही आणि इथे एवढं थंड वातावरण की उपरं वाटतं. माबो म्हणजे अगदी शाळाच म्हणून फक्त वाचनापुरतं ठिकाय.

अगदी शिवीगाळ आणि वैयक्तिक अपमान नसतो हा प्लस पॉइन्ट्च आहे.

हो. हो.
अजोंबरोबर वाद घालणे हा प्रकार केला. आता त्यातली मजा हरवली.

.शुचि Tue, 27/09/2016 - 19:25

In reply to by अंतराआनंद

इथे एवढं थंड वातावरण की उपरं वाटतं.

हं तू खफवरती येत नाहीस म्हणुन तिथे खूप मजा , लेग पुलिंग, चेष्टामस्करी चालते.

अभ्या.. Thu, 29/09/2016 - 19:13

In reply to by राही

आक्ख्या प्रतिसादाला सहमत.
कधी कधी तर फारच कानकोंडं होतं बाबा.
ते ट्रम्फ हिलरी, फ्रेंच जर्मन, बर्फ आणि बागकाम असलं काही दिसलं तर 'हे आपलं काही नाही' हे फिलिंग जास्त घट्ट होते.
अर्थात आम्ही काही लिहिलं तर असंच वाटत असेल म्हणा. जौदे. आपल्याला काय करायचं?

Nile Sun, 02/10/2016 - 02:15

In reply to by राही

थोडं फारच बरोबर असावं. अन्यथा,

१. इथले बरेचसे सदस्य इतर संस्थळांवरही सदस्य आहेत.
२. इतर संस्थळांवर महाराष्ट्राबाहेर अनेक वर्षे स्थायिक असलेले सदस्य आहेत, अनिवासीही अनेक आहेत. अगदी मालक, संपादक अनिवासी असणारं ऐसी एकमेव नाही हे तुम्हाला माहित असेलच.

मला वाटतं कोणते विषय कोणत्या गटात चर्चिले जातात अन कोणत्या गटाची प्रकृती कशी आहे यात कुठेतरी उत्तर असावं.

राही Sun, 02/10/2016 - 21:03

In reply to by Nile

इथले सदस्य इतरत्र वावरतात हे खरे. पण 'तिथल्याच फक्त' अशा सदस्यांची संख्या त्यांच्यापेक्षा खूपच जास्त आहे. सदस्यसंख्या कमी असणं आणि त्यामुळे त्यात स्थानिकांचं प्रमाण घटणं हे 'ऐसी'वरच दिसतं. इतर दोन संस्थळांचे मालक भारतीय नसतीलही पण सदस्यमंडळी खूप मोठ्या प्रमाणात भारतीय आहे. मायबोलीवर एकेकाळी अनिवासी आणि परदेशी-कायमनिवासी भारतीयांचे प्रमाण अधिक होते, पण आता तशी स्थिती नाही. त्यामुळे इथल्या लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, इथल्या टीवी मालिका, इथल्या पाककृती, इथली भटकंती, सायकलप्रवास, गिर्यारोहणासारखी साहसे, इथली वाहातूक व्यवस्था, यावरचे धागे तिथे येत राहातात. प्रकृतीचे म्हणाल तर हे विषय इथे कोणी मांडले तर ऐसीच्या थोड्याशा डाव्या विचारवंती प्रकृतीला चालणार नाही असे वाटत नाही. पण खूपश्या सदस्यांना ते आपले वाटणार नाहीत. गट छोटा आहे म्हणून. मोठ्या गटात समानशील लोक सापडण्याची शक्यता अधिक असते.

Nile Sun, 02/10/2016 - 21:16

In reply to by राही

पण आता तशी स्थिती नाही. त्यामुळे इथल्या लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, इथल्या टीवी मालिका, इथल्या पाककृती, इथली भटकंती, सायकलप्रवास, गिर्यारोहणासारखी साहसे, इथली वाहातूक व्यवस्था, यावरचे धागे तिथे येत राहातात.

अगोदर जरा सविस्तर लिहायला हवं होतं. एक उदाहरण देतो.

उपक्रम, ऐसी अन ऐलपैल ही स्थळं सदस्यसंख्येच्या दृष्टीने सारखी म्हणता येतील. पण तरीही त्यांची प्रकृती वेगवेगळी आहे/होती हे सहज दिसून येते.

किंवा, मी जर भारतात राहत असतो तरी मी तिथल्य टीव्ही मालिकांवरच्या चर्चेत जिव्हाळ्याने सामील झालो असतो असं वाटत नाही. माझा मुद्दा इतकाच की कोणते मुद्दे जिव्हाळ्याने चर्चीले जातात यात निवासी/अनिवासी पेक्षा सदस्य गटाची प्रकृती याचा हात जास्त आहे. असो.

तिरशिंगराव Tue, 27/09/2016 - 16:31

तुमच्या प्रत्रिक्रियेवरुन तुम्ही पुणेकर नाही, पत्री सरकारचे वाटता.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 28/09/2016 - 22:22

बदलत्या वास्तवाविषयीची त्यांची जाण आणि ओळख धूसर होऊ लागली असावी, जरी संपर्कक्रांतीमुळे स्थळकाळ जवळ आला असला तरी. त्यामुळे स्थानिक लोकांना रस वाटेल असे विषय इथे निघू शकत नाहीत. स्थानिक (आणि तरुण) सदस्यांची संख्या वाढणे हाच उपाय यावर दिसतो.

व्यक्तिशः, बदलत्या वास्तवाविषयी मला महाराष्ट्रात राहत असताना कितपत जाणीव होती आणि आता किती आहे, ह्याचा हिशोब लावला तर बहुदा आता अधिक जाण आहे; वाढतं वय हे एकमेव कारण. ते पुरेसं नाही हे मान्यच. मराठा मोर्चांबद्दल एक-दोन लेख वाचले; मिलींद मुरुगकरांचा त्रोटक वाटला, (वृत्तपत्रीय शब्दमर्यादा आड आली असावी) आणि प्रताप आसबेंचा ... असो. एनाराय नव्हते तेव्हा हे लेख कितपत समजले असते ह्याबद्दल शंका आहे. मधल्या काळात संस्थळावरच्या लोकांचं लेखन आणि त्यांनी शेअर केलेल्या लिंका वाचूनच शिक्षण झालं आहे.

स्थानिकांना रस वाटेल असे विषय इथे निघू शकत नाहीत कारण स्थानिक काढत नाहीत. किंवा महाराष्ट्रात राहणाऱ्या उत्साही लोकांची संख्या कमी आहे. ही त्रुटी अगदीच मान्य आहे. त्यासाठी सुचवलेला उपायही मान्य आहे - तरुण सदस्यांची संख्या वाढणे. फक्त ते कसं करायचं हे समजत नाही, एवढी एक बारीक अडचण आहे खरी.

टिकलू, तुम्हाला जमेल तशा मराठीत लिहीत राहा. विशेषांक वगळता एरवी प्रमाणलेखन सुधारायला कोणाला वेळ नसतो; अगदी 'मराठी वर्ड्स रिमेंबर करायला डिफिकल्ट पडतं' छाप भाषा नसेल तर त्यावरून फार कोणी टिंगलही करत नाहीत; तुम्हाला हौस असेल तर भाषा सुधारायची संधी आहे असं म्हणा किंवा हौस नसेल तर 'काय हायफंडा मराठी बोलतात' म्हणून टिंगल करा.

राही Thu, 29/09/2016 - 13:50

कॉन्स्पिरसी थिअरी :
हे मराठामोर्चे अत्यंत शिस्तबद्ध, शांततामय असतात. शिवाय त्यांच्या आयोजनकर्त्यांकडून/विषयी कडेकोट गुप्तता पाळली जातेय. बाजारात अफवांचे पीक, कुजबुजींना उधाण आलेय. यावरून एक 'शिस्तबद्धसंचलनफेम' संघटना आठवतेय. शिस्त, शांतता, लाखलाख सहभागी, कुजबूज कँपेन...
ही थिअरी खरी असण्याची कितपत शक्यता आहे?

बॅटमॅन Thu, 29/09/2016 - 13:51

In reply to by राही

माहिती नाही, परंतु परवाचा सांगलीतील मराठा मोर्चा उच्चांकी ठरला. १०-१२ लाख लोक सहज आले असतील. (अतिशयोक्ती नाही) आणि रोचक गोष्ट म्ह. या मोर्चात माळी, कुंभार, धनगर वगैरे अन्य समाजांचाही समावेश होता. सर्वांत रोचक म्ह. ब्राह्मणही होते. अर्थात हे लोकल झाले. बाकी ठिकाणच्या मोर्चांचे डेमोग्राफिक ब्रेकप माहिती नाही.

राही Thu, 29/09/2016 - 14:09

In reply to by बॅटमॅन

म्हणजे ही महाराष्ट्रीय अखिल हिंदू समाजाची दलितांविरुद्ध (जास्त करून धर्मांतरित) मोर्चेबांधणी आहे तर! हिंदू हिंदू तेतुका मेळवावा....

अनुप ढेरे Thu, 29/09/2016 - 14:09

In reply to by राही

अ‍ॅक्चुअली मिपावर किती लोक जमले होते याच्या आकड्यांवर चर्चा चालू आहे. त्यात नासाने घेतलेली दखल, त्यांनी उपग्रहांमार्फत घेतलेले फोटो, मोर्चाला जमलेले २ कोटी लोक वगैरे आकडे हे मुद्दे आहेत. ये पेहेले कहीं सुना है! मोर्चात भगवे झेंडेदेखील खूप प्रमाणात होते.

नितिन थत्ते Thu, 29/09/2016 - 15:51

In reply to by अनु राव

दारू बनण्यातली कम्पल्सरी स्टेज बहुधा ग्लुकोज बनणे ही असते. दुधातून ग्लुकोज बनत नसावे.

दुधात लॅक्टोज हा एकच कार्बोहायड्रेट असतो. लॅक्टोजचे फर्मेंटेशन झाल्यावर कोणतातरी अल्कोहोल बनत असेल पण इथिल अल्कोहोल बनतो का ते ठाऊक नाही.

अरविंद कोल्हटकर Sun, 02/10/2016 - 22:27

In reply to by अनु राव

मी वाचल्यानुसार किर्गिझ, उझबेकी इत्यादि 'स्तान'वाले मध्य-आशियाई (एकेकाळचे) भटके लोक कुमिस (रशियन Кымыз, kymyz) नावाचे एक मद्य दुधापासून बनवतात. त्याची माहिती येथे विकिपीडियामध्ये पहा. अजून एक कृति येथे पहा.

पूर्वी हे लोक कुमिस नैसर्गिक पद्धतीने करीत असत. मेंढीच्या एका कोकराला भरपूर दूध पाजायचे आणि काही तास झाल्यानंतर त्याला मारून त्याच्या पोटाच्या पिशवीमधील नैसर्गिक आंबलेले दूध काढायचे. तेच कुमिस.

.शुचि Sun, 02/10/2016 - 22:42

In reply to by अरविंद कोल्हटकर

माहीतीपूर्ण आहे हे. आत्ता मुलीला ही अघोरी पद्धत सांगत होते त्यावरुन विषय निघाला आणि तिने मला फॉइ ग्रा ची माहीती दिली. यात गूझ किंवा बदकास ओव्हरफेड करतात आणि १०० किंवा ११२ व्या दिवशी मारुन खातात. बाप रे! ओव्हरफेड ही नळीने (ट्युब) करतात, भयानकच.

.शुचि Sun, 02/10/2016 - 23:08

In reply to by बॅटमॅन

अहो, खत किती शोषून घ्यायचं ते वनस्पती ठरवितात. इथे गूझ काही ठरवण्याच्या काबिलच रहात नाहीत. अर्थात असे गृहीत धरते आहे की वनस्पतिंचे नियंत्रण असते. अन्यथा म्हणजे तसे नसेल तर काहीच फरक नाही.

'न'वी बाजू Mon, 03/10/2016 - 03:03

In reply to by .शुचि

त्या (तुम्हीच दिलेल्या) विकीदुव्यावर त्याचा उच्चार स्पष्टपणे 'फ्वा' असा दिलेला आहे.

शिवाय, माझ्या ऐकीव माहितीआधारित अंदाजाप्रमाणे (चूभूद्याघ्या), फ्रेंच उच्चारनियमांनुसार त्याचा उच्चार 'फ्वा' असा व्हायला हवा. (कॉलिंग नंदन/चिंजं/कोणीही फ्रेंच जाणकार.)

(तरी नशीब, 'फॉइ ग्रास' म्हणाला नाहीत.)

'न'वी बाजू Mon, 03/10/2016 - 03:43

In reply to by .शुचि

काव्हियारच्या उत्पादनपद्धतीबद्दल काय म्हणाल?

(बादवे मागे एकदा प्रेग्नंट खेकडिणीच्या गाबोळीचा ज़िक्र कोणी केला होता बरे?)

(अतिअवांतर: आम्हां अमेरिकनांत एक म्हण आहे: Those who love sausage and respect the law shouldn't see either one being made. यावरून काय तो बोध घ्यावा.)

चिंतातुर जंतू Tue, 04/10/2016 - 13:58

In reply to by .शुचि

>>तिने मला फॉइ ग्रा ची माहीती दिली. यात गूझ किंवा बदकास ओव्हरफेड करतात आणि १०० किंवा ११२ व्या दिवशी मारुन खातात. बाप रे! ओव्हरफेड ही नळीने (ट्युब) करतात, भयानकच.

सहमत. मात्र, माझा हा अतिशय आवडता पदार्थ आहे ह्याचीही कबुली देतो. त्यामुळ मी कधी कधी थोडी गब्बरगिरी करतो, पक्ष्यांना फडतूस मानतो आणि कोणाच्या कानी वार्ता जाणार नाही अशा बेतानं थोडं खातो ;-)

फ्वा ग्राची निर्मिती 'एथिकली' करता येते असा काही लोकांचा दावा आहे. त्यात फ्री रेंज पद्धतीनं पक्ष्याला हवं तितकं खाऊ दिलं जातं. हिवाळ्यात आपोआप जास्त चरबी वाढण्याकडे कल असतो त्याचा फायदा घेतात वगैरे. ह्या दाव्यांत कितपत तथ्य आहे त्याचा माझा अभ्यास नाही.
(उच्चार : फ्वा ग्रा)

अबापट Sun, 02/10/2016 - 22:45

In reply to by अरविंद कोल्हटकर

हे इंटरेस्टींग दिसतंय. अर्थांत 1 ते 2 टक्के म्हणजे फारच कमी अल्कोहोल आहे. ( व्हिस्की रम 42% , बिअर 4 ते 8 %त्यामानाने)पारंपरिक पध्धत दिसतेय. टेक्नॉंलॉजिकली प्रोटीन seperate होणे कसे थांबवतात हि बाब रोचक असेल. पारंपरिक स्टार्टर culture मध्ये कुठल्यातरी moderate pH ला अल्कोहोल तयार करणाऱ्या यीस्ट असाव्यात . अजून शोध घ्यायला पाहिजे.

अनु राव Thu, 29/09/2016 - 15:12

फाटलेली जीन्स , दोरे निघालेली, दोरे उसवायला लागलेली, झिजलेली जीन्स घातलेली चालते; पण बाकीची कोणतीही प्यांट फाटकी घातलेली चालत नाही. कोणताही शर्ट, टी शर्ट फाटका घालायला फाटकी जीन्स घालण्याइतकं ग्लॅमर नाही. हे असं का आहे ?

मन१ Thu, 29/09/2016 - 15:50

अनु राव माझा आय डी नाही. आमचं व्यनिमधून वगैरे बोलणं झालं तेव्हा मी त्यांना हे प्रश्न विचारले. मी व्यग्र असण्याची शक्यता व इतर काही कारणं लक्षात घेउन मला मदत म्हणून अनु राव ह्यांनी माझे प्रश्न विचारले. त्याबद्दल त्यांचे आभार.
माझे उरलेले प्रश्न
ज्या गाडीवर स्क्रॅचेस पडलेले आहेत अशी गाडी वापरायची फॅशन का येत नाही ?
दाढी करताना चेहर्‍यावर क्वचित कापलं जातं अल्लाद. आणि त्यानंतर आलेला बारिक ओरखडाही दिसतो.
असे ओरखडे पाडून घ्यायची नि मिरवायची फ्याशन का येत नाही ?
कित्येक पदार्थ नासवून्/आंबवून त्याची दारु बनवतात. दुधाची दारु (दूध आंबवून) बान्वण्याचे काही प्रयोग झालेत का ? कसली पौष्टिक नि चवदार असेल यार ती दारु ?

आदूबाळ Thu, 29/09/2016 - 16:17

In reply to by मन१

दाढी करताना चेहर्‍यावर क्वचित कापलं जातं अल्लाद. आणि त्यानंतर आलेला बारिक ओरखडाही दिसतो.
असे ओरखडे पाडून घ्यायची नि मिरवायची फ्याशन का येत नाही ?

https://en.wikipedia.org/wiki/Dueling_scar

चिंतातुर जंतू Thu, 29/09/2016 - 17:42

In reply to by मन१

>> दुधाची दारु (दूध आंबवून) बान्वण्याचे काही प्रयोग झालेत का ? कसली पौष्टिक नि चवदार असेल यार ती दारु ?

मनोबा इथंच तुमचं आयुष्यात हुकतं. उद्या म्हणाल - आशा काळे 'शीला की जवानी'वर नाचेल तर कित्ती कित्ती मज्जा येईल ना! असा विचार हिंदी सिनेमात आजवर कुणी का नाही केला?

बॅटमॅन Thu, 29/09/2016 - 17:50

In reply to by चिंतातुर जंतू

आशा काळे 'शीला की जवानी'वर नाचेल तर कित्ती कित्ती मज्जा येईल ना! असा विचार हिंदी सिनेमात आजवर कुणी का नाही केला?

किंवा

"मनोबा अमुकतमुक प्रश्न विचारेल अशी भीती आजवर कुणाला कशी नाही वाटली". ह.घ्या.

चिंतातुर जंतू Thu, 29/09/2016 - 17:59

In reply to by बॅटमॅन

>> "मनोबा अमुकतमुक प्रश्न विचारेल अशी भीती आजवर कुणाला कशी नाही वाटली".

मला असा प्रश्न पडतो - मनोबा शुद्धीत असतो तेव्हा एवढी मज्जा येते. त्याला झिंगवून कित्ती मज्जा येईल?

बॅटमॅन Thu, 29/09/2016 - 18:03

In reply to by चिंतातुर जंतू

हा प्रयोग आमच्या मित्रांवर झालेला आहे. जे एरवी खूप दंगा करीत ते चढल्यावर चुप्प बसून रहात. त्यामुळे कदाचित मज्जा येणार नाहीसं वाटतं.

चिंतातुर जंतू Thu, 29/09/2016 - 18:08

In reply to by बॅटमॅन

>> जे एरवी खूप दंगा करीत ते चढल्यावर चुप्प बसून रहात. त्यामुळे कदाचित मज्जा येणार नाहीसं वाटतं.

माझा अनुभव ह्याच्या उलट आहे. पुरेशी पाजायला हवी मात्र. :-)

चिंतातुर जंतू Fri, 30/09/2016 - 15:00

In reply to by अबापट

>> कधी जमवायचा हा कार्यक्रम ?

'न पिऊंगा न पीने दूंगा' अशा उद्घोषणा मी करत नाही हो. काय करता, उदारमतवादी पडलो ना. त्यामुळे 'जो जे वांछील तो ते लाहो' हेच आपलं ब्रीद. त्यामुळे मी कुणाला पाजणार नाही आणि मी पिणार नाही हवं तेच आणि हवं तितकंच पिईन. मग मनोबाला किंवा कुणालाही कोण तर्र करणार? ;-)

अनु राव Fri, 30/09/2016 - 15:13

In reply to by चिंतातुर जंतू

चिंज - "न पीने दूंगा" अशी घोषणा तुमच्याच कुंपुतल्या एका पुरोगामी, उदारमतवादी, शहाबुद्दीन प्रेमी चोरानी केली होती. पण आज न्यायालय चिडलय त्याच्यावर म्हणे.

अनु राव Thu, 29/09/2016 - 16:02

वरील आयडींच्या गमतीमुळे एक खराखुरा प्रश्न जो अनेक वर्ष मनात होता तो आता विचारते.

------
बर्‍यास सिनेमात किंवा सीरीअल्स वगैरे बुद्धीबळाचा पट मांडलेला असतो असे दाखवतात. आणि एकच रीकामटेकडा माणुस दोन्ही बाजुनी तो खेळत असावा असे रेफरंस असतात. असा बुद्धीबळ एकच माणुस दोन विरुद्ध बाजुनी खेळु शकतो का? ( हे जर शक्य असेल तर मनोबा माझ्याशी व्यनितुन बोलु शकेल )

चिंतातुर जंतू Thu, 29/09/2016 - 17:37

In reply to by अनु राव

>> असा बुद्धीबळ एकच माणुस दोन विरुद्ध बाजुनी खेळु शकतो का?

असे स्वतःशीच बुद्धिबळ खेळणारे लोक मला व्यक्तिशः माहीत आहेत.

>> हे जर शक्य असेल तर मनोबा माझ्याशी व्यनितुन बोलु शकेल

दोन गोष्टींचा अजिबात संबंध नाही. एका आयडीला दुसर्‍याशी बोलायचं असेल तर दोन ब्राउझरमधून दोन आयडी लॉगिन होऊ शकतात, किंवा एकाच ब्राउझरच्या इन्कॉग्निटो मोडमधून दुसरा आयडी लॉगिन होऊ शकतो. हाकानाका. :-)

अनु राव Thu, 29/09/2016 - 17:46

असे स्वतःशीच बुद्धिबळ खेळणारे लोक मला व्यक्तिशः माहीत आहेत.

हे कसे शक्य आहे हेच कळत नाही, सिन्सिअरली समजुन घ्यायचे आहे.

एका बाजुनी जी स्ट्रॅटेजी ठरवली असेल तर ती त्या माणसालाच माहीती असणार, मग तोच दुसर्‍या बाजुनी कसा काय खेळु शकतो?

दोन गोष्टींचा अजिबात संबंध नाही. एका आयडीला दुसर्‍याशी बोलायचं असेल तर दोन ब्राउझरमधून दोन आयडी लॉगिन होऊ शकतात, किंवा एकाच ब्राउझरच्या इन्कॉग्निटो मोडमधून दुसरा आयडी लॉगिन होऊ शकतो. हाकानाका. (स्माईल)

टेक्निकली नाही हो. पण एकच माणुस आणि २ व्यक्तीमत्व अश्या अर्थानी मी म्हणत होते.

चिंतातुर जंतू Thu, 29/09/2016 - 17:55

In reply to by अनु राव

>> हे कसे शक्य आहे हेच कळत नाही, सिन्सिअरली समजुन घ्यायचे आहे.
एका बाजुनी जी स्ट्रॅटेजी ठरवली असेल तर ती त्या माणसालाच माहीती असणार, मग तोच दुसर्‍या बाजुनी कसा काय खेळु शकतो?

असा विचार करून पाहा : समोरच्याची स्ट्रॅटेजी काय असेल त्याचा आधी अंदाज करून मग त्याला शह देण्यात ज्याला मजा येते, त्याला स्ट्रॅटेजी नक्की माहीत झाल्यावरही शह देण्याचा प्रयत्न करण्यात मजा येत असेलच ना?

चिंतातुर जंतू Thu, 29/09/2016 - 18:18

In reply to by अनु राव

>> हे सर्व काही एकाच मेंदुत होत असणार

मग काय झालं? पीएचडी झालेली मुलगी लग्न झाल्यानंतर लोकट जीन्स घालून मांग मे सिंदूर आणि हातभर बांगड्या घालून फिरताना पाहिली तेव्हा मला असंच वाटलं होतं की एकाच मेंदूत हे सगळं कसं होऊ शकतं? पण होऊ शकतं. ;-)

चिंतातुर जंतू Thu, 29/09/2016 - 18:35

In reply to by अनुप ढेरे

>> स्त्री मुक्तीवाल्या कपाळावर हे एवढं लाल कुंकू लावतात तसं.

नाही. त्यांचं लॉजिक मला माहीत आहे -
मी ब्रा जाळणारी पुरुषद्वेष्टी नाही आहे, तर स्वतःच्या स्त्री असण्यावर माझं प्रेम आहे. एथ्निक ज्वेलरी, मेक अप आणि कुंकू वगैरे लावून सजायला मला आवडतं. ते मी मला आवडतं म्हणून करते; कुणा पुरुषाची दासी म्हणून नाही. तुम्हाला ते आवडत नसलं तर फक ऑफ. अ‍ॅज सिंपल अ‍ॅज दॅट.

चिंतातुर जंतू Thu, 29/09/2016 - 18:45

In reply to by अनुप ढेरे

>> वर दिलेल्या पीएच्डीवाल्या मुलीच्या उदाहरणापेक्षा हे वेगळं कसं आहे ते समजलं नाही.

पीएचडी मुलीला लोकट जीन्स आवडत. पण माँगमे सिंदूर आणि हातभर बांगड्या आवडतात म्हणून ती घालत नव्हती. आणि 'मी घालते हातभर बांगड्या. फक ऑफ!' असंही ती म्हणत नव्हती. तिनं जातपात पाहून लग्न केलं होतं. आता ती आपली महान संस्कृती, सासूबाई, घर की लाज म्हणून घालत होती. त्याहून वेगळं जगता येईल असं तिचं तिलाच वाटत नव्हतं.

बॅटमॅन Thu, 29/09/2016 - 19:00

In reply to by अनुप ढेरे

किंवा एरवी निधर्मीपणाचे ढोलताशे पिटपिटून लोकांना पिडणारे विशिष्ट धर्मावर टीकाच करत नाहीत तसं. हे जर एकाच मेंदूत होत असेल तर बुद्धिबळ किस झाड की पत्ती.

किंवा प्रतिसाद आवडला नाही की प्यासिव अग्रेसिवपणे श्रेण्या देऊन प्रतिसाद दाबणे आणि एरवी श्रेण्यांच्या दुरुपयोगाला नावे ठेवण्याची क्रिया जशी एका मेंदूत होते त्यातलाच प्रकार.

अबापट Thu, 29/09/2016 - 18:53

In reply to by चिंतातुर जंतू

उच्चं शिक्षणामुळे माणूस तार्किक होतो किंवा शहाणा होतो ( किंवा कमी येडा बनतो ) असं खरच तुम्हाला वाटतं का ? आणि कपड्यांचा ( lack of) सेन्स याचा शिक्षणाशी संबंध आहे असे वाटते का ?

चिंतातुर जंतू Thu, 29/09/2016 - 19:24

In reply to by अबापट

>> उच्चं शिक्षणामुळे माणूस तार्किक होतो किंवा शहाणा होतो ( किंवा कमी येडा बनतो ) असं खरच तुम्हाला वाटतं का ? आणि कपड्यांचा ( lack of) सेन्स याचा शिक्षणाशी संबंध आहे असे वाटते का ?

तेच तर सांगतोय : की आता मला ह्या सगळ्या गोष्टी एकाच मेंदूत वसतात ह्याचं आश्चर्य वाटेनासं झालंय. पीएचडी (नीटपणे) करायला किमान तर्कशुद्ध विचारपद्धती लागते, ती ह्या मुलीपाशी होती. पण लग्न करताना तिनं ती बाजूला ठेवली होती आणि नंतर सगळी रीतभात पाळतानासुद्धा.

.शुचि Thu, 29/09/2016 - 20:18

In reply to by चिंतातुर जंतू

पी एच डी करायला पॅशन नक्कीच लागत असावी आणि ती लग्न करतानाही उपयोगी पडली असावी. रीतभाती पाळण्यात काही तथ्य नसेल तर मग पाळायला काय हरकत आहे निदान संघर्ष कमी आणि त्यातून वाचलेला वेळ अन्यत्र सदुपयोगी लावता आला असेल. बरेचसे लोक वहात्या पाण्यासारखे असतात, वाटेत आलेल्या शिळेशी लढत बसत नाहीत, वळसा घालून निघून जातात. त्याला कणाहीन म्हणायचे तर म्हणा. पण अव्हॉइड संघर्ष अ‍ॅट एनी कॉस्ट - अशीही वृत्ती असू शकते.

नितिन थत्ते Fri, 30/09/2016 - 11:41

In reply to by चिंतातुर जंतू

स्वप्न यांनी म्हटल्याप्रमाणे "पाळायला काय हरकत आहे निदान संघर्ष कमी आणि त्यातून वाचलेला वेळ अन्यत्र सदुपयोगी लावता आला असेल. बरेचसे लोक वहात्या पाण्यासारखे असतात, वाटेत आलेल्या शिळेशी लढत बसत नाहीत, वळसा घालून निघून जातात. " ही तर्कशुद्ध विचारपद्धती नाही का? "ऑब्जेक्टिव्ह" वेगळे असेल तर विचारपद्धती त्या दिशेने तर्कशुद्ध असू शकते.

चिंतातुर जंतू Fri, 30/09/2016 - 11:58

In reply to by नितिन थत्ते

>> "पाळायला काय हरकत आहे निदान संघर्ष कमी आणि त्यातून वाचलेला वेळ अन्यत्र सदुपयोगी लावता आला असेल. बरेचसे लोक वहात्या पाण्यासारखे असतात, वाटेत आलेल्या शिळेशी लढत बसत नाहीत, वळसा घालून निघून जातात. " ही तर्कशुद्ध विचारपद्धती नाही का? "ऑब्जेक्टिव्ह" वेगळे असेल तर विचारपद्धती त्या दिशेने तर्कशुद्ध असू शकते.

त्या मुलीचे ह्या बाबतीतले विचार इतके स्पष्ट असते तर माझा काही आक्षेपच नसता. तिनं मला 'फक ऑफ' म्हटलेलंही मग मला आवडलं असतं. पण तिला इथे काही तरी गोंधळ आहे हेच दिसत नव्हतं. थोडक्यात, ती आपला इतरत्र झपाझप चालणारा मेंदू इथे बंद ठेवत होती. अर्थात, मेंदू बंद ठेवणं कदाचित तिला सोयीस्कर होतं (एक प्रकारचा पाथ ऑफ लीस्ट रेजिस्टन्स), पण ती ते जाणूनबुजून, विचारपूर्वक करत नव्हती.

बॅटमॅन Fri, 30/09/2016 - 12:02

In reply to by चिंतातुर जंतू

थोडक्यात, ती आपला इतरत्र झपाझप चालणारा मेंदू इथे बंद ठेवत होती.

थोडक्यात, एका उदाहरणावरून मत बनवणारे स्वतःचा मेंदू नक्की कसा चालू ठेवतात ते पाहणे रोचक आहे.

चिंतातुर जंतू Fri, 30/09/2016 - 12:12

In reply to by बॅटमॅन

मी अशी इतरही कित्येक उदाहरणं पाहिलेली आहेत. माझी एक मुसलमान मैत्रीण होती. गणित विषयात गोल्ड मेडल. विशीत असताना तिचं लग्न चाळिशीतल्या एका लठ्ठ धनिकवणिकाशी झालं. माझी एक एकारांत चित्पावन गोरीघारी मैत्रीण होती (तीसुद्धा पीएचडी). तिनं उत्तर भारतीयाशी प्रेमविवाह केला आणि रोज सातच्या आत घरात जाऊ लागली. ह्या सगळ्यांच्या मेंदूला चालना देण्याचे माझे जोरदार प्रयत्न झाले. आणि कित्येक पुरुषांच्यासुद्धा. मग कधी तरी मी नाद सोडून दिला. थोडक्यात, उच्च शिक्षणामध्ये तल्लख चालणारा मेंदू लोक इतरत्र बंद करून जगतात ह्या, म्हणजे वर बापटांनी सांगितलेल्या मुद्द्य्यापाशीच येऊन मी थडकलो.
आता इथे माझ्या मित्रमैत्रिणींची यादी का देत बसू? ;-)

अनु राव Fri, 30/09/2016 - 12:27

In reply to by चिंतातुर जंतू

थोडक्यात, उच्च शिक्षणामध्ये तल्लख चालणारा मेंदू लोक इतरत्र बंद करून जगतात ह्या,

चिंज - तुम्ही बघितलेली उदाहरणे बरोबर आहेत, ह्याचा एक पॉइंटर भारतीय शिक्षणपद्धती कडे असायला पाहीजे खरातर. उच्च शिक्षण ( म्हणजे डीग्र्या ) म्हणजे तल्लख मेंदु हे समीकरण भारतात कीती टक्के लोकांना लागु होइल ह्याचा सर्वेच केला पाहिजे.

माझ्या शी नोकरी/कामानिमीत्त संबंध आलेले जवळजवळ सर्व आयआयटीअन पुरुष हे मद्दड किंवा डंब म्हणावेत इतके कमी समज असलेले होते. ते फास्ट पण नव्हते. २ शास्त्रीय विषयात पीएचडी मिळालेल्या बायका ह्या त्यांच्या पेक्षा ही मद्दड होत्या.

-------------
आता एक पॉझीटीव्ह भाग : माझ्या अनुभवात, काम करायला चांगले आणि ( आयआयटीअन्स पेक्षा ) वरच्या दर्जाची समज असलेले लोक हे समहाऊ "कराड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग" चे होते ( १९८५ तो १९९५ मधे पासाऔट झालेले )

नितिन थत्ते Fri, 30/09/2016 - 12:16

In reply to by चिंतातुर जंतू

रॅशनॅलिटी ही अ‍ॅबसोल्यूट असते का?

लग्नातले विधी भंकस/बकवास असतात असं माझं मत आहे. पण माझ्या वडिलांच्या आणि बायकोच्या वडिलांच्या इच्छेसाठी मी किमान विधी करून लग्न केलं. त्यावेळी मला ते बकवास वाटणं हे वडिलांना दुखावण्यापेक्षा महत्त्वाचं आहे का? असा विचार मी केला तर तो रॅशनल आहे की नाही? माझ्या वडिलांनी जर मोठा खर्च करण्याचा घाट घातला असता किंवा हुंडा वगैरे घ्यायचा प्रयत्न केला असता आणि मी त्यालाही संमती दिली असती तर ते माझ्या विचारांशी (प्रचंड) प्रतारणा करणारे आणि म्हणून इरॅशनल ठरले असते. आणि मेंदू बंद ठेवण्याचा आरोप योग्य ठरला असता.

चिंतातुर जंतू Fri, 30/09/2016 - 12:19

In reply to by नितिन थत्ते

>> त्यावेळी मला ते बकवास वाटणं हे वडिलांना दुखावण्यापेक्षा महत्त्वाचं आहे का? असा विचार मी केला तर तो रॅशनल आहे की नाही?

तुमच्या विचारातला तर्क मला कळतो. पण अनेक उदाहरणांत असा तर्क चालवतानासुद्धा लोक दिसले नाहीत. त्यांनी तुमच्यासारखी मांडणी केलेली मला चालली असती. ते एरवी (इतर विषयांत) अशी मांडणी करायला समर्थ होते. निष्कर्ष : अशा अनेक केस स्टडीजनंतर माझे निष्कर्ष असे होते की विशिष्ट विषयांत लोक डोकं बाजूला ठेवतात - उदा. विवाहसंस्था, प्रेमसंबंध, कुटुंबसंस्था, धर्म, देश, वगैरे. शिवाय, जिथे भय किंवा असुरक्षितता आड येते तिथेही लोक डोकं बाजूला ठेवतात.

बिटकॉइनजी बाळा Thu, 29/09/2016 - 19:55

कोपर्डी नंतर पाथर्डी येथेही एकाने १४-१५ वर्षांच्या मुलीवर तिच्या गतिमंदतेचा गैरफायदा घेत बलात्कार केला. शिवाय मुलीचे नातेवाईक फिर्याद दाखल करायला निघाल्यानंतर गुन्हेगाराने अ‍ॅट्रॉसिटीची धमकी दिली. मराठा मूक मोर्च्यात ही घटना हरवून गेली आहे.
मुलगी भटक्या जमातीची (एन टी पण सामाजिक उतरंडीत वरची) आहे असं कळतं. म्हणजे हा लढा बहुजन वि. दलित असा होईल. कोपर्डीची घटना नुकतीच घडून गेल्यावर पाथर्डीमध्ये दलितांनी अ‍ॅट्रॉसिटीची धमकी द्यावी याचे आश्चर्य वाटत आहे. या धमक्या देण्यात दलित महासंघ आणि तत्सम संघटनांचे स्थानिक पाठबळ असणारच, अन्यथा गुन्हेगार आणि त्याचे नातेवाईक यांना उलट्या बोंबा मारता आल्या नसत्या. माझ्या माहितीनुसार अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर करण्यात S. C., S.T. मध्ये मोडणार्‍या जाती बहुतांशाने आहेत. पारधी आणि तश्या जाती ज्या चोर-दरोडेखोर-गुन्हेगार म्हणून गणल्या जातात, त्यांच्यात खूपदा खरे गुन्हेगार आढळूनही त्यांनी पोलिस स्टेशनांत प्रचंड दंगा घातल्याचे ऐकले आहे. लहानपणी मी पारधी समाजाच्या बायकांनी स्वतःच कपडे फाडून-झिंज्या ओढून विनयभंगाच्या आणि संघटनांच्या मदतीने अ‍ॅट्रॉसिटीच्या खोट्या केसेस घातल्याचे प्रत्यक्ष पाहिले आहे. मी अजुनही त्या बायकांना सर्वस्वी दोषी मानत नाही, या जातींवर गुन्हेगारीचा ठपका हळू हळू पुसला जात आहे, तोवर अशा बाबी होणारच. पण काळाच्या या टप्प्यावर जिथे सामाजिक आग क्षणात लागू शकते, दलित संघांनी अ‍ॅट्रॉसिटीबाबत गंभीर परीक्षण करणे भाग आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 30/09/2016 - 02:04

In reply to by रावसाहेब म्हणत्यात

सदस्यांना आपापली निवड करता येईल, असं सेटिंग दुर्दैवाने गमभनमध्ये नाही. त्यामुळे त्याला पर्याय सापडेस्तोवर सध्या गैरसोय सहन करावी लागेल.