सध्या काय वाचताय? - भाग ३०
बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते; एखादा दीर्घ लेख आवडतो; वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते; पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्राचा इतिहास (१७०७ ते
महाराष्ट्राचा इतिहास (१७०७ ते १८१८) हे डॉ. वि. गो. खोबरेकर यांनी लिहिलेले आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबै यांनी प्रकाशीत केलेले पुस्तक वाचत आहे. पुस्तकाची पिडिएफ आणि इपब मोफत उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचताना पानोपानी धक्के बसत जातात. शिवाजीनंतरचे मराठी राज्यकर्ते काय लायकीचे होते हे वाचताना मन विषण्ण होते. आजकाल शाहु महान, ताराबाईही महान, आंग्रे महान, पेशवे लै लै महान, संताजी- धनाजी तर काय महानच, शिंदे, होळकर महान वगैरेचा काळ आलाय. यांचे पाय कसे मातीचे होते आणि शिवाजी सोडला तर ध्येय वगैरेशी बाकीच्या राज्यकर्त्यांची बांधीलकी काय दर्जाची होती याचे दर्शन घडते. ॲनार्की वाचताना हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
महाराष्ट्र राज्य सा सं मंडळ
त्या वेबसाईट वरील भारतीय मुसलमान हे वसंत नगरकर आणि माटे, जी टी कुलकर्णी यांनी लिहिलेले पुस्तक पण छान आहे.
डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता
दुवा?
कृपया पुस्तकाच्या e प्रतीचा दुवा पुरवावा.
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
इथे
https://sahitya.marathi.gov.in/%E0%A4%87-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0...
इथे सापडले, क्रमांक ३६८
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
धन्यवाद!
Thanks!
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
वाह वाह!!! _/\_
वाह वाह!!! _/\_
इ एच कारच "WHAT IS HISTROTY".
ई एच कार च इतिहास म्हणजे काय हे पुस्तक वाचले आहे का? इथे त्यावर चर्चा झाली आहे का? असेल तर वाचायला नसेल तर करायला आवडेल.
(पुस्तकांविषयीच्या चर्चा ह्या धाग्यात होतात म्हणून प्रश्न इथे हलवला आहे. - संपादक)
डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता
‘अव-काळाचे आर्त’ सदरात आज ‘V
‘अव-काळाचे आर्त’ सदरात आज ‘V for Vendetta’विषयी आदूबाळ.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
The Dispossessed: an ambiguous utopia
स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय, खऱ्या अर्थाने स्वतंत्र असणे म्हणजे काय हा माणसासमोरचा बराच जुनाच प्रश्न आहे. गेल्या अनेक शतकांमध्ये ह्या प्रश्नाच्या मुळाशी जाणाऱ्या विचारसरणी उदयास आल्या. ॲनार्किजम किंवा स्वातंत्र्यवादी समाजवाद हा अशा प्रकारच्या एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बऱ्यापैकी प्रसिद्ध असलेल्या विचारसरणींचा गट आहे. अराजक म्हटलं की बहुतेक लोकांच्या डोळ्यासमोर गुंडगिरी, तोडफोड, दहशत वगैरे प्रकार येतात, पण सर्व प्रकारच्या केंद्रीय सत्तास्थानांना विरोध करणाऱ्या ह्या विचारसरणीला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यवाद (लिबर्टेरियनजम) आणि समाजवाद (सोशलिजम) ह्या एकमेकांपासून अतिदूर असणाऱ्या विचारधारा आहेत आणि त्यामुळे स्वातंत्र्यवादी समाजवाद हीच मुळी विरोधाभासी संज्ञा आहे असं अनेकांना वाटू शकतं. थोडं खोलात जाऊन पाहिलं तर (किंवा लिबर्टेरियन शब्दाचा इतिहास पाहिला) तर त्यात फार तथ्य नाही असं दिसतं. हाव आणि परस्परस्पर्धा ह्याऐवजी परस्परमदत ह्या तत्त्वावर आधारित समाजाची मांडणी होऊ शकते का? लोकांनी काम करण्यामागे केवळ बाह्य कारणेच (वरिष्ठांचा दबाव, मालकाचे/बॉसचे आदेश, अर्थार्जनाची गरज) असतात की स्वयंप्रेरणा पुरेशी असू शकते? व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजाप्रती असलेलं उत्तरदायित्व ह्यांचा मेळ कशा प्रकारे घालता येतो? सामूहिकता (collectivism) आणि एकसारखेपणा (conformity) ह्यात फरक असू शकतो का?
ह्या आणि अशा अनेक प्रश्नांचा वेध घेणारी 'द डिस्पझेस्ड: ॲन अँबिग्युअस युटोपिया' ही उर्सुला के. ल ग्विन ह्या अमेरिकन लेखिकेची कादंबरी अलिकडेच ऑडिओबुक स्वरूपात ऐकली. आकाशगंगेतल्या एका ताऱ्याभोवतीच्या ग्रह-उपग्रहाच्या जोडगोळीवर ही गोष्ट घडते. ग्रह हा नैसर्गिकदृष्ट्या अगदी संपन्न, तर त्या तुलनेत उपग्रह हा नैसर्गिक साधनसंपत्ती बरीच कमी असलेला. कथा घडते त्याच्या सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी ग्रहावरचे काही गरीब कामगार उठाव करतात आणि ग्रहापासून दूर उपग्रहावर आपली ॲनार्किस्ट वसाहत स्थापतात. पुढच्या सात-आठ पिढ्या ग्रहावरील लोक (जी व्यवस्था बऱ्यापैकी आपल्यासारखी आहे) आणि उपग्रहावरील लोक एकमेकांशी अगदी कमी संपर्क साधत स्वतंत्रपणे विकसित होतात. ह्या उपग्रहावरच्या ॲनार्किस्ट समाजातला एक भौतिकशास्त्रज्ञ पुढच्या संशोधनासाठी ग्रहावर जातो हा कथेचा मुख्य भाग. हा ॲनार्किस्ट समाज रंगवताना लेखिकेने खूप मुळापासून विचार केला आहे. प्रेम, दु:ख, अहंभाव, परस्परमदत, स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष संबंध, अशा व्यवस्थेत येऊ शकणारं साचलेपण अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे. अशा तिऱ्हाइताच्या (ग्रहावर गेलेल्या भौतिकशास्त्रज्ञाच्या) दृष्टिकोनातून बघितल्यावर आपण ज्या अनेक गोष्टी खूप विचार न करता गृहित धरलेल्या असतात त्यांतले अंतर्विरोधही समोर येऊ शकतात. हा रंगवलेला युटोपिया गुडी-गुडी स्वप्नरंजनासारखा नसून शीर्षकात म्हटल्याप्रमाणे संदिग्ध आहे ही गोष्ट विशेष आवडली. पुस्तक अवश्य वाचावं अशी शिफारस करेन. पाच तारे.
धन्यवाद
वाचीन/ऐकीन म्हणतो. "द लेफ्ट हँड ऑफ डार्कनेस" ही उर्सुला के. ल ग्विन ह्यांचीच कादंबरी फार वर्षांपूर्वी वाचली होती.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
‘पॅराडाईझ’
‘पॅराडाईझ’ ही अब्दुल रझ्झाक गुर्ना यांची कादंबरी.
https://hindikahani.hindi
https://hindikahani.hindi-kavita.com/HK-Indira-Goswami.php
इन्दिरा गोस्वामी यांची ही 'नीलकंठी ब्रज' कादंबरी वाचली. वृंदावन धाम मध्ये रहाणार्या विधवांचे जीवन किती भयंकर आहे. बाप रे! अंगावरती काटा येतो वाचून. या विधवांची इच्छा आहे की त्यांच्या मरणोपरान्त त्यांचे शास्त्रयुक्त दहन व्हावे त्याकरता त्या पै पै जोडतात. त्यांचे शोषण होते, फसवल्या जातात.
नंतर यासंदर्भात सर्चेस देता, पुढील नियत/अनियतकालिक सापडले.
https://emanjari.com/wp-content/uploads/2019/04/Manjari-12tedi.pdf
नीलकंठी ब्रज वाचताना इतके विदारक वर्णन, अनुभव करु शकले की शेवटी असे वाटले काही जन्म जगून आले. आपण किती सुरक्षित, शेल्टरड जीवन जगत असतो.
शेवटी धर्म, देव याबद्दलही मनात प्रश्न उठू लागतात.
Whole Numbers and Half Truths
आकडे म्हणजे सर्वसत्य नाही. संबंधित विषयाची माहिती घेतल्याशिवाय आकड्यांचा अर्थ लावता येत माही. आकडे गोळा करण्याची चौकट तयार करणाऱ्या संख्याशास्त्री, गोळा करणारी असंख्य माणसं, आणि त्यांतून गोळाबेरीज चित्र मांडणाऱ्या पत्रकार रूक्मिणी एस. अशा सगळ्यांचं जेव्हा आपल्या कामावर प्रेम असतं आणि त्या कष्टांमुळे सामान्य लोकांना फायदा व्हावा असं वाटत असतं, त्यातून हे पुस्तक येतं.
काल लोकसत्तेत आलेला हा परिचयही चांगला आहे, आणि पुस्तकही. जरूर वाचा.
खुस्पट काढलंच पाहिजे. काही आलेखांची मांडणी सुधारायला जागा आहे. (कमीतकमी शाई आणि रंगांमध्ये काढलेले आलेख चांगले समजले जातात.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
Creative Pasts: Historical Memory And Identity In Western India
https://www.amazon.in/Creative-Pasts-Historical-Identity-1700-1960/dp/81... प्राची देशपांडे यांचं 'Creative Pasts: Historical Memory And Identity In Western India 1700-1960' वाचतोय.
डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता
सदर पुस्तक नुकतेच वाचून
सदर पुस्तक नुकतेच वाचून संपवले. बखरींपासून ते आजतागायतचा महाराष्ट्रातील ऐतिहासिक नोंदी ठेवण्याच्या इतिहासाचा उत्तम आढावा घेतलेला आहे. तब्बल २६ पानांच्या तळटीपा आणि २२ पानांची Bibliography वरून लेखिकेने घेतलेल्या परीश्रमाचीही कल्पना येते.
हे पुस्तक फक्त नोंदींपुरतं
हे पुस्तक फक्त नोंदींपुरतं मर्यादित नाही.
डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता
रान - शिवार - गाव
कॉनरॉड रिक्टर यांच्या त्रयीचे जी ए कुलकर्णी यांनी केलेले अनुवाद वाचत आहे. पहिली दोन पुस्तके 'द ट्रीज' आणि 'द फिल्ड्स' अशी आहेत. त्याचे जी एंनी 'रान' आणि 'शिवार' या नावाने अनुवाद केलेले आहेत. ते वाचून झाले. एकाच स्त्रीचे जीवन शिकारी - अन्न गोळा करणार्या जीवनशैलीमध्ये 'रान' या पुस्तकात आहेत. तिचेच जीवन पुढे शेती व्यवस्थेत कसे बदलत जाते हे 'शिवार'मध्ये येते. तिसरे पुस्तक 'गांव' हे आहे, ते आता वाचत आहे.
दोन्ही पुस्तके स्लो बर्निंग प्रकारची असून हळूहळू पकड घेत जातात. जी ए म्हटलं की भाषेचा जी एक खास शैली असते, तिचा प्रत्यय इथे येतोच. १७-१८व्या शतकातील अमेरिकेत गोर्या लोकांच्या वसाहती होत असतानाचे जीवन, त्यातील संघर्ष, रितीभाती यांचे अगदी चित्रदर्शी वर्णन वाचून सध्याच्या अमेरिकेत लोक असे का वागत असावेत, याचा काही प्रमाणात उलगडा होतो. एक चांगला वाचन अनुभव, जरूर वाचा.
नायजेरियातलं साठच्या दशकातलं यादवी युद्ध.
नायजेरियात साठच्या शतकाच्या उत्तरार्धात यादवी युद्ध झालं. स्वातंत्र्यानंतर पूर्वेकडे राहणारे इग्बो (इबो?) लोक विरुद्ध बाकीचे, असंही याचं स्वरूप होतं. तीन वर्षं बायफ्रा नावाचा देश पूर्व नायजेरियात होता. अमेरिका, ब्रिटन, रशिया इत्यादींनी यात नायजेरियाची बाजू घेतली आणि बायफ्रा टिकला नाही. चिमामांडा नगोझी अडेचीई यांनी त्या काळातले संदर्भ वाचून लिहिलेली कादंबरी, Half of a Yellow Sun वाचली.
मध्यमवर्गीय घरात घडणारी ही गोष्ट. ह्या घरात काम करणारा आणि गरीब घरचा, खेडूत, जेमतेम दुसरी पास झालेला उगवु नसुक्का विद्यापीठात शिकवणाऱ्या जोडप्याच्या घरी कामाला येतो. श्रीमंत व्यावसायिकांच्या पोटी जन्माला आलेली आणि आता डाव्या विचारसरणीची झालेली समाजशास्त्रज्ञ ओलान्ना, आणि अशिक्षित आईच्या पोटी जन्माला आलेला पण आता विद्यापीठात गणित शिकवणारा ओडेनिग्बो हे ते जोडपं. ओलान्नाची जुळी बहिण कैनिनी आणि तिचा बॉयफ्रेंड, ब्रिटिश, लेखक रिचर्ड अशा पात्रांची कथनं कादंबरीत आहेत.
एका बाजूला माणसांमधली नाती, संबंध, ताणेबाणे आणि दुसरीकडे दोन जमाती, टोळ्यांमधल्या भांडणांमुळे झालेलं युद्ध, युद्धकाळात बायफ्रन लोकांची उपासमार ही महत्त्वाची पात्रं आहेतच.
यांपलीकडे मला ममव दृष्टिकोनातून दिसलेल्या गोष्टी. नायजेरियन मध्यमवर्गातल्या आणि गरीब घरांतल्याही स्त्रियांना असणारं लैंगिक स्वातंत्र्य. ह्या स्त्रिया लग्न करतात किंवा करत नाहीत. लग्न न करताही ह्या स्त्रिया पुरुषांबरोबर झोपतात; त्यांना मुलं होतात; आणि त्याबद्दल बहुतेक कुणी तरुण, मध्यमवयीन लोकांना काही आक्षेप नसावा असं वाटतं. मध्यंतरी मी शांता गोखल्यांचं मेम्वार वाचलं. त्या शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेल्या, आणि ह्या कादंबरीतल्या जुळ्या बहिणी, ओलान्ना आणि कैनिनी, साधारण त्याच वयाच्या, त्याही इंग्लंडमध्ये शिकलेल्या आहेत.
कादंबरीची सुरुवात १९६०च्या दशकाच्या सुरुवातीला होते तेव्हा ओलान्नानं ओडेनिग्बोशी लग्न केलेलं नाही. यादवी युद्ध सुरू होतं आणि त्यांना आपलं नसुक्काचं राहतं घर सोडून पळावं लागतं. पुढचं घरही सोडून त्याच गावात एका खोलीत राहण्याची वेळ येते. तोवर ओलान्नानं खूप हिंसा बघून झाली असते; स्वतःच्या घरच्या लोकांची मृत शरीरं बघितलेली असतात; त्यानंतर डिप्रेशनमधून ती बाहेर येते. आणि त्यानंतर ती लग्नाला होकार देते.
कैनिनीनं कादंबरीच्या शेवटापर्यंत रिचर्डशी लग्न केलेलं नाही. बायफ्रा देश तयार झाला तोवर रिचर्ड इग्बो बोलायला शिकलेला असतो. त्याला त्याच्या गोरेपणातून मिळणाऱ्या मानसन्मानाची जाणीव असतेच. बायफ्रा तयार होतो तेव्हा तो स्वतःला बायफ्रन समजायला लागतो. यादवी युद्ध सुरू झाल्यावर काही काळानं बायफ्राच्या बाजूनं तो पाश्चात्त्य वर्तमानपत्रांसाठी लेखनही करतो; यात त्याच्या गोरा असण्याचा फायदा होईल हे गणित त्यात सगळ्यांनाच मान्य असतं. कधी वेळ पडेल तेव्हा बायफ्रा आणि इग्बो लोकांच्या बाजूनं बोलताना तो कैनिनीचा उल्लेख आपली बायको किंवा फियान्से आहे असाही करतो.
कैनिनी सुरुवातीला थंड आणि व्यवहारी, काहीशी दुष्ट वाटावी अशी दाखवली आहे. युद्ध सुरू होतं तेव्हा ती त्यातून चिकार पैसाही कमावते. नंतर तिला बायफ्रन लोकांची होणारी उपासमार समजते, दिसायला लागते. आणि ती आपली सगळी शक्ती, वेळ, ओळखीपाळखी, सगळंच वापरून निर्वासितांना जमेल तितकी मदत करते. कादंबरीच्या शेवटाकडे, युद्ध संपत यायला लागतं; कैनिनीकडेही फार काही राहिलेलं नाही. ती व्यापारासाठी नायजेरियात जाते आणि परत येत नाही. (ज्यांच्यात असा बदल होतो, कोरडेपणा सोडून माणूसकी दाखवायला लागतात, अशी पात्रं बऱ्याच ललित लेखनांमध्ये मरतात, गायब होतात, वगैरे. You cannot go back home.)
रिचर्ड लेखक असतो. युद्धाच्या आधी तो नायजेरियात येतो तेव्हा त्याला तिथल्या संस्कृतीबद्दल कादंबरी लिहिण्याची इच्छा असते. आधीच्या दोन कादंबऱ्या काही कारणानं बारगळतात. युद्धकाळात तो नवी कादंबरी लिहायला सुरुवात करतो - The world was silent when we were dying.
कादंबरीच्या शेवटी रिचर्डला आपलं उपरेपण लक्षात येतं. आणि उगवूनं लिहायला सुरुवात केलेली आहे - Life in a country - असं शीर्षक असेल असं तो रिचर्डला सांगतो.
(या कादंबरीवर नायजेरियन-ब्रिटिश सिनेमाही बनवलेला आहे. तो मी बघितलेला नाही.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
‘टोळ्यां’च्या सहअस्तित्वाची कथा!
‘टोळ्यां’च्या सहअस्तित्वाची कथा!
बॅटमन यांनी लिहिलेले डॉ. सुमित गुहा यांच्या पुस्तकाचे परीक्षण माहितीपूर्ण आहे.
या करारांची भाषा अर्थातच इंग्रजी/मराठी असावी. टोळी प्रमुखाला समजा आजूबाजूच्या भाषा समजत असल्या तरी लिहिता वाचता येण्याची शक्यता कमी वाटते. आणि टोळी समुहाची गणसंख्या साधारण किती असावी? (ब्रिटीशांपूर्वी आणि मराठ्यांच्या काळात). कारण ब्रिटिश समाजप्रमुखाला पेंशन देत असतील तर टोळीची 'बार्गेनिंग पावर' चांगलीच असायला हवी.
माझं शरीर, माझा हक्क?
अदिती यांचा लेख. या लेखातल्या विचारांशी/भावनेशी सहमत.
हा निर्णय आल्यावर दुसर्या दिवशी वॉलस्ट्रीटच्या संपादकीय मंडळाने थोडा वेगळा मुद्दा मांडला. तांत्रिक दृष्ट्या कदाचित तो चुकीचा नाही. त्यांनी १९७३ मध्ये वेगळं मत मांडणार्या न्यायाधिशांचा मुद्दा उचलून धरला आहे.
पण त्यांनी रिपब्लिकनांची तळी उचलेली नाही. नेशनवाईड बॅनची मागणी करणार्यांना रिपब्लिकनांना त्यांनी दांभिक म्हटले आहे. त्यांच्या मते आता वादविवाद कोर्टाकडून राजकीय विचारधारांच्या कक्षेत येईल.
थोडक्यात, त्यांच्या मते, असे वादविवाद न्यायालयाच्या माध्यमातून न सोडवता जुन्या पद्धतीने मतपरिवर्तनातून सुटले पाहिजेत. पण प्रॉब्लेम हाच आहे. हे 'टॉलरेबल कन्सेन्सस' शोधणार कसं? खास करून जेव्हा एखाद्या सामाजिक प्रश्नाचे इतके ध्रुवीकरण झाल्यावर. हे म्हणजे १८६० च्या यादवीसारखेच आहे. गुलामगिरी ठेवायची की नाही यावर कॉमन ग्राउंड कसे शोधणार? पण कदाचित असे म्हणणे असावे की, तेव्हाही लिबरलमधले काही, गुलामांना मुक्त करण्यासाठी भले सहमत असले तरी समानतेचे हक्क देण्यास तयार नव्हते. पुढची कैक दशकं गेली. पुढच्या पिढीतल्या लोकांना/नेत्यांना नवा संघर्ष करावा लागला. तेव्हा कुठे आजची अमेरिका आपणास दिसते. थोडक्यात, असे मतपरिवर्तन होण्यास कैक दशकांचा कालावधी जातो.
Exile at Home- Final Encounte
Ashish Nandy
the final encounter
The politics of the assassination of Gandhi
आशिष नंदिनी त्यांच्या Exiled at Home या पुस्तकात गांधीजींच्या खुनावर “the final encounter” नावाचा लेख लिहीलाय,त्यात त्यांनी हा खून कुठल्या व्यापक पार्श्वभूमीवर झाला हे एका वेगळ्या आणि मोठ्या कॅनव्हासवर उलगडून सांगितलं आहे. हा लेख निव्वळ इतिहास या विषयापेक्षा समाज ,परंपरेने घडवलेले तत्कालीन समाजमन. खुनाला कारणीभूत असणारे भौतिक आणि जाणीव नेणिवेच्या पातळीवरचे वेगवेगळे घटक यांची मांडणी करतो.
नंदी लेखाची सुरुवातच मुळी ‘हा खून हा खुन्याने आणि बळीने एकत्र सहलेखन केलेले स्टेटमेंट होते’ अशी करतात. कुठलाच खून हा मारणारा मारणारा यांच जॉईंट व्हेंचर असते .खुनी अगदी मतिमंद किंवा मनोरुग्ण असला तरी त्याच्या त्या अवस्थेत हि तो अधिक व्यापक अशा ऐतिहासिक आणि मानसिक शक्तींना रेप्रेझेन्ट करत असतो .त्या शक्तीच त्याला त्याच्या सावजाशी कनेक्ट करतात. गांधी आणि त्यांचे मारेकरी यांच्याशिवाय गांधींच्या संरक्षक अश्या पोलीस आणि गुप्तहेर संस्था ,नोकरशाही आणि राजकारणी यांच्या जाणीव किंवा नेणिवेच्या पातळीवरून चाललेल्या मनोव्यापारांचा हि वाट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण हे सगळे घटक जुळून कसे आले ,याच उत्तर गांधींनी राजकारणात काय घडवून आणले, गांधीजींनी समाज बदलला म्हणजे नक्की काय बदलले ते किती गाभ्यापासून बदलायची ताकद त्यांच्यात होती,याच्या पृथःकरणात आहे असं म्हणून नंदी तिकडे वळतात

भारतात चालत आलेल्या पारंपरिक सत्ताश्रेणी आणि वसाहतवादाटून जन्मल्आधुनिकतावादी ,पाश्चिमाळलेला मध्यमवर्गीय सुधारकवर्ग ती सटताश्रेणी कायम ठेवून स्वतःला शोषितांचे कैवारी म्हणवणातें राजकारण करत होता.त्यात हा वर्ग केंद्र आणि बाकी समाज हा परिघावर अशी हायरार्की जपली जात होतीच. ह्या पार्श्वभूमीवर गांधीजींनी भारतातील पारंपरिक सत्ता व्यवस्था आणि त्याच वसाहतवादातून इवोल्व होणारे आधुनिक रूप ह्यांना दोन मूलभूत हादरे दिले.
1) पारंपरिक वर्ण श्रेणी आणि वसाहतवादातून झालेल्या आधुनिक पाश्चात्य विचार यांच्या संकरातून तयार झालेला हा एलिट क्लास परंपरेने sanction केलेले (reason डॉमिनंट राजकारण समाजकारण करणार आणि त्याआडून सत्ता श्रेणी अधिक वसाहतवाद अधिक घट्ट होतील, हे जाणून पाहिलं काय केलं असेल तर राजकारणाचे De-Intellectualization. याचा अर्थ गांधीजी intellectuals च्या विरोधी होते असे नाही पण आपल्या वर्ण परंपरेत निखळ विचार चिंतन हे कृतीपेक्षा जास्त अग्रक्रम टिकवून आहे त्याला धर्माची अधिमान्यताहि आहे (असा नंदींचा दावा आहे)
हि व्यवस्था केंद्राकडून परिघाकडे सरकावण्यासाठी De - INTELLECTUALISATION चा भाग म्हणून गांधींनी ग्ग्रामीण अब्राह्मणी अक्षत्रिय व्यवस्थेतील अनेक RITUALS आर्थिक आणि सामाजिक जीवनपद्धती ह्या हिंदुधर्माचा अधिक ठळक गाभाच आहे असे सांगत हा वर्ग केंद्राकडे आणण्याची धडपड सुरु केली ब्रह्मन् क्षत्रिय व्यवस्थेत असलेल्या INTELECTUALISM च्या ऐवजी परिघावरील जनसमुदायांची व्यापक चळवळ, उत्स्फूर्तता, ङोई MASS MOBILISATION याना केंद्रस्थानी आणले
◦
2)पारंपरिक क्षत्रिय व्यवस्थेत असलेल्या भारतीय समाजातल्या रचनेत चालत आलेली मॅस्क्युलनीटी आणि फेमिनिटी यांच्या संकल्पनातच मूलभूत धक्के दिले (अजूनही मारेकऱ्यांचे वैचारिक वंशज मूठभर मिशा, खरा मर्द वगैरे गोष्टी कवटाळून आहेत ) त्यांनी स्त्रीत्व हे केंद्रस्थानी आणायचा प्रयत्न केला आणि पारंपरिक वर्णव्यवस्थेत क्षत्रियत्व आणि पौरुषत्वाशी जुळलेल्या गोष्टी परिघावर ढकलायचा प्रयत्न केला. त्यांच्यालेखी पुरुषाने आपल्या पुरुषपणाच्या चौकटीत स्त्रीत्वाचे काही घटक सामावून घेणे यात, पौरुषाच्या बाता मारण्यापेक्षा अधिक, तप अधिक साफल्य आहे असे असावे. इथे मूळ लेखात नसलेल्या एका गोष्टीची मला आठवण झाली ती म्हणजे त्यांची नात मनुबेन पोरकी झाल्यावर 'मी तुझा बाप नव्हे तर आई होण्याचा प्रयत्न करेन' असं त्यांनी तिला सांगितलं होत. त्यांच्यालेखी हि सर्वोच्च साधना होती (गांधीजींच्या सावरकरवादी विरोधकांनी 'गांधींनी हिंदूंना स्त्रैण केले' असा आरोप वारंवार केला आहे. हेही इथे लक्षात ठेवावे )
या सगळ्यातून त्यांनी जय पराजय जीत जेते यांचे पारंपरिक अर्थच बदलून टाकले. या सर्व पारंपरिक कल्पनांना आणि वसाहतवादी(विज्ञान, बुद्धिवाद, उपयुक्ततावादी ) कल्पनांना कवटाळून बसलेल्या त्यांच्या हत्याऱ्या गटाला या साऱ्याच आघाड्यांवर हे थोपवावे कसे हे समजेनासे झाले.
◦ आपण समजतो तस गांधीजींनी फक्त बहुजन समाजाला भौतिक दृष्ट्या फ्रंटवर आणलं म्हणूनच नव्हे तर परंपरावाद्यांच्या भावनिक विश्वाला पण त्यांनी सुरुंग लावले हे समजावून घेतल्याशिवाय त्यांचा खून समजणे अवघड आहे
◦ त्यांनी सातत्याने केंद्र आणि परीघ यांची व्याख्या बदलायची धडपड केली
बाकी तपशील पुस्तकातच वाचणे इष्ट आणि आनंदाचे आहे
डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता
हिजाब या विषयावर फार
हिजाब या विषयावर फार चर्वितचर्वण झाले आहे. सुप्रीम कोर्टात असलेली केस आता मोठ्या न्यायपिठाकडे वर्ग झालेली आहे. या विषयावर इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेला खालील लेख फार मननीय आहे.
https://indianexpress.com/article/opinion/columns/supreme-court-verdict-...
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
The Elephant Whisperer
आफ्रिकेतील जंगली हत्तींच्या कळपाबरोबर राहिलेल्याचे अनुभव-- The Elephant Whisperer सध्या वाचत आहे. खूप चांगले पुस्तक आहे.
चीपर बाय डझन या पुस्तकाचा
चीपर बाय डझन या पुस्तकाचा पुढचा भाग बेलीज ऑन देअर टोज.
चीपर बाय डझन हे पुस्तक परिचीत आहे पण त्याचा पुढचा भाग आहे हेच बरेचजणाना माहीत नाही.
पुस्तक फार जुने आहे. मात्र ते कुठेच उपलब्ध नव्हते.
गेल्याच आठवड्यात मिळाले
माझ्या आगामी पुस्तकाविषयी
१.माझे ‘पाळण्याच न दिसलेले पाय’ हे आत्मकथनपर पुस्तक पुण्याच्या ‘मनोविकास प्रकाशन’तर्फे प्रकाशित होत आहे.
२. पुस्तकाची पृष्ठसंख्या २५० असून किंमत ४३० रुपये आहे.
३. सध्या हे पुस्तक प्रकाशनपूर्व २५ टक्के सवलतीच्या दराने उपलब्ध आहे. सवलत मूल्य ३२२ रुपये आहे व टपालखर्च ७० रुपये आहे. ज्यांना हे पुस्तक सवलतीच्या दरात घ्यायचे असेल ते ‘मनोविकास’च्या 8888550837 या मोबाईल नंबरवर गूगल-पे च्या माध्यमातून पैसे पाठवू शकतात. (रु. ३२२ + रु. ७० असे एकूण ३९२ रुपये एका प्रतीसाठी पाठवावे लागतील.)
४. गूगल-पे ने पैसे पाठविल्यावर त्याच मोबाईल नंबरवर पैसे पाठविणार्या नाव, पुस्तकाचे नाव व पुस्तक ज्या पत्त्यावर पाठवायचे तो संपूर्ण पत्ता असा मजकूर व्हॉट्सअॅपवर पाठवावा.
५. या प्रमाणे पैसे पाठविले व व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठविला की पुस्तक टपालाने पाठविले जाईल.
६. धन्यवाद.
पाळण्याच?
.
आलोक - आसाराम लोमटे
नुकतेच आसाराम लोमटे यांचे आलोक हे कथासंग्रह असलेले पुस्तक वाचले. २०१० ला प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला २०१६ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. वृत्तपत्रात छापून येणार्या ग्रामिण वा निमशहरी भागातल्या बातम्यांच्या वास्तवाचा धागा पकडून (लेखक पत्रकार आहेत) त्याभोवती कलात्मकतेने रचलेल्या मोजून सहा कथा या पुस्तकात आहेत. या कथातर आवडल्याच पण पुस्तकाच्या शेवटी असलेल्या परिशिष्ट (लिहिण्यामागची 'भूमि'का) मध्ये लेखकाने एकंदर साहित्य, लेखक, स्वतःच्या लेखन कलेच्या सृजनशीलतेविषयी आणि काही कथांच्या मागच्या अनुभवावर जे मनोगत लिहिले आहे ते खूप आवडले.
या परिशिष्टचा सारांश मांडण्याचा प्रयत्न करतो. काळ आणि भवताल याचा प्रभाव लेखकावर आणि साहित्यावर पडत असतो. साहित्यामध्ये वास्तवाचे प्रतिबिंब किती हा नेहमीच चर्चिला जाणारा विषय. आजचे वास्तवही तितकेच संभ्रमित करणारे आहे. उदा. महानगरात धुमाकूळ घालणारी गाणी अगदी खेडेगावातली तरुणाई सुद्धा कानठळ्या बसेपर्यंत सार्वजनिक उत्सवात वाजवून उन्माद संचारल्यासारखी नाचणार. तरुणांचे टोळके कायम हाताशी हवे म्हणून या सगळ्या उत्सवाचा खर्च एखादा नेता करणार. झालेला खर्च तो काळाबाजार करणार्यांकंडून वसूल करणार जेणे करून त्यांच्या चोरवाटा मोकळ्या. नाचणार्या तरुणांना त्याचे भान नाही असेही म्हणता येत नाही. तेच "अखंड हरिनाम सप्ताह" चा प्रायोजक वाळूमाफिया असणार. इकडे गावात अखंड हरिनामात आणि तिकडे अखंड वाळूउपसा. त्यामुळे गावचे रस्ते खराब झालेले. बाळंतीणीला तालुक्याच्या गावी न्यावे तर वाटेतच प्रसुती व्हायची भीती. अशा अनेक बाबी एकात एक घुसलेल्या. काळाच्या पटलावर अनेक घटना घडत असतात, पण लेखक काही खेळाच्या समालोचकासारखा ती घटना त्याच्या-त्या-वेळेला टिपत नसतो. एखादी घटना घडून जाते आणि त्यानंतर लेखक त्याची आकलनक्षमता, संवेदनशीलता आणि तल्लख नजरेने त्या घटनेच्या नोंदी मनःपटलावर घेत असतो. घडून गेलेल्या घटनेविषयी नेमके कुठले तपशील वा कुठला मुद्दा वाचकांपर्यंत प्रकर्षाने पोहोचवायचा आहे हे सुद्धा लेखकच ठरवत असतो. वास्तवाचा हा धागा पकडून मग लेखक त्या भोवती काल्पनिक कथा रचत असतो. त्यात रुपकांची पेरणी करत असतो. कथेच्या गतीनुसार वातावरण निर्मिती करत असतो. आणि इथे त्याचा नेमका कस लागतो. एकतर घडून गेलेल्या घटनेच्या सगळ्याच बाबी लेखकाला कळतीलच असे नाही. केवळ कर्जामुळे शेतकर्याने आत्महत्त्या केली का? व्यक्तीच्या मनोव्यापारा पर्यंत लेखकाला पोहोचावे लागते. त्यामुळे त्या घटनेसंदर्भात लेखकाचे आकलन काय झाले आहे हे महत्त्वाचे. शहरी वाचकांच्या मनोरंजनासाठी आतापर्यंत ग्रामीण कथा म्हणजे किस्से आणि इरसाल गोष्टी (असलेल्या नसलेल्या भानगडी) हे समीकरण ठरून गेले होते. पण आसाराम यांची पिढी ही "भेगाळलेला, चिरफाळलेला, चिंध्या झालेला गाव" पाहणारी आहे. त्यामुळे प्रचलित "ग्रामिण कथा" या संज्ञेशी त्यांचे कूळ जुळत नाही. ते म्हणतात, "मी ग्रामीण कथा लिहीत नाही. आजचे जे अस्वस्थ करणारे, बोचणारे, अंगावर येणारे वर्तमान आहे तेच गोष्टींच्या रुपाने मांडतो. त्या लिहिण्याचा परिसर ग्रामीण असेल पण या कथा माणसांच्या, त्यांच्या जगण्याच्या आहेत.... व्यवस्थेत कायम पराभूताचे जगणे वाट्याला आलेल्या माणसाचे बोट सूटू नये यासाठीची धडपड लिहिण्याच्या माध्यमातून चाललेली असते."
फारच आवडते पुस्तक आहे हे.
फारच आवडते पुस्तक आहे हे. सहाही कथा आणि चिंतनशील लोमटेंचे मनोगत हृद्य आहे.
मला यतली ओझं ही कथा सर्वात जास्त आवडते. अगदी गलबलून येतं ती वाचताना. मी लोमटेंचा प्रचंड मोठा फॅन आहे. त्यांचे लोकसत्तेतील लेखमालिका 'धुळपेर' अशीच भावलेली.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
खुंदळण
@पुंबा
खुंदळण ही कथा सुद्धा वेगळी वाटली आणि चालू घडामोडीत चपखल बसेल अशीच आहे. साम-दाम-दंड भेद या नात्याने दुसर्या पार्टीचे कार्यकर्ते, नेते आपल्या पार्टीत घेतले की, विरोधकांची कशी "खुंदळण" करता येते याची ही गाव पातळीवरची कथा आहे.
https://indianexpress.com
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
https://www.newyorker.com
त्यावरून मग इ एम फॉर्स्टरची याच नावाची कथा शोधताना हा लेख मिळाला. यात रेफरन्स मिळाल्याने फिलिप रॉथ्ची एक्झिट घोस्ट ही कादंबरी शोधून वाचणे आले.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
२०२२ मध्ये अमेझॉन वरून ऑर्डर
२०२२ मध्ये अमेझॉन वरून ऑर्डर केलेली पुस्तके
सर्वात आवडलेले क्रमांक ६
सध्या उशिराने वाचतोय क्रमांक ५
1. Goa a daughter’s story
2. Bad Blood : Secrets and lies in a silicon valley start up
3. गावकुसाबाहेरचा ख्रिस्ती समाज
4. Pity the nation : Lebanon
5. The great war for civilization : The conquest of middle east
6. The warmth of other suns
7. Roots: The saga of an American family
8. Henry Morton Stanley: Emergence of the pearl of Africa
9. क्रुसाभोवतीचा ख्रिस्ती समाज
10. Too late to turn back : Barbara and Graham Green in Liberia
11. Dark Safari: The life behind the legend of Henry Morton Stanley
12. Maximum city : Bombay lost and found
13. Caste
14. Decoding the Pandemic
झाडे आणि जंगले
The Hidden Life of Trees - या नावाची बरीच पुस्तके असतील पण Peter Wohlleben यांचं पुस्तक (इंग्रजी भाषांतर) वाचण्यात आलं. युरोपिअन थंड प्रदेशांतील झाडे आणि जंगलांची माहिती. कशी,किती वाढतात. मित्र कोण शत्रू कोण. शहरातील झाडे आणि जंगलातील यातील सुखी कोण वगैरे.
लोकसंख्या वृद्धीदर
बर्याचदा असे होते की, एका पुस्तकातल्या एखाद्या मुद्द्याचे गांभिर्य आपल्याला दुसरे पुस्तक वाचताना उमजते. अलिकडे हरारीची २१ लेसन्स... आणि होमो डेअस ही दोनही पुस्तके (खास करून चॅट जीपीटी नंतर) वाचली. त्यातला दुष्काळ, साथीचे रोग, युद्ध या अलिकडच्या दशकात बिलकूल आव्हानात्मक वाटत नसलेल्या बाबी काही शतकांपूर्वी किती आव्हानात्मक होत्या हा हरारीचा मुद्दा मला खूप चांगल्या पद्धतीने थॉमस पिकेटीचे कॅपिटलिझम इन २१स्ट सेन्च्युरी वाचताना उमजला.
१७०० च्या सुरुवातीला असलेली ६०० मिलिअन लोकसंख्या (उपलब्ध सर्वोत्तम अंदाजानुसार) २०१० च्या आसपास म्हणजे ३०० वर्षांनी ७ बिलिअन म्हणजेच जवळजवळ १० पट झाली. हा वृद्धीदर तसा बघायला गेला तर ०.८% दसादशे आहे. पिकेटीच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे वैश्विक अर्थगती आणि लोकसंख्यावाढ ही नेहमीच १% पेक्षा खाली राहिली आहे. कारण आकडेवारीनुसार १% पेक्षा अधिक लोकसंख्या वाढ शक्य नाही. कारण जरी ०.८% वृद्धीदर पकडला तर इसवी सनाच्या सुरुवातीला लोकसंख्या काही हजारांमध्ये असायला हवी. पण ते शक्य नाही. एकट्या रोमन मध्येच काही मिलिअन लोकसंख्या असावी. मग हा वृद्धीदर एवढा छोटा का असावा? उलट पूर्वीच्या काळात भरपूर अपत्य जन्माला घातली जायची. म्हणजेच दुष्काळ, वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयीचा अभाव (साबण इ.चा वापर नसणे), साथीचे रोग, युद्धे यामुळे बर्याच लोकांचा बळी जात असला पाहिजे.
"कंपाउंडींग मॅजिक" (चक्रवाढीची जादू) हा गुंतवणुकदरांना नवीन नाही. पण त्यातही दृष्टी फारफार तर दषकापुरती मर्यादीत असते. शतकांपलिकडे मी तरी कधीच विचार केला नाही. त्यामुळे ०.८% वृद्धीदरामुळे ३०० वर्षात १० पट लोकसंख्या होते सुरुवातीला अविश्वसनीय वाटले. याच गतीने पुढल्या ३०० वर्षांनी जगाची लोकसंख्या आणि एकंदर जग कसे असेल याची कल्पना पण करता येत नाही.
मुद्द्याचे गांभिर्य आपल्याला दुसरे पुस्तक वाचताना उमजते.
हो ना.
ती दोन्हीं पुस्तके वाचली आहेत. पण सामान्य वाचक हा इकनॉमिक्सच्या अभ्यासुं इतका विचार करत नाही.
देशकालपरत्वे
याचे अनेक शास्त्रीय अहवाल मान्यवर संस्थांनी केलेले आहेत. देश जसजसे प्रगत, भांडवलवादी होतात आणि बायकांना काम (म्हणजे इंडस्ट्रियल) करावे लागते, तसतशी लोकसंख्यावाढ मंदावते. जपानवर तर विचित्र पाळी आली आहे.
आता तर माझ्या मते आपल्याला पुढच्या ३० वर्षातदेखील जग कसे असेल हे सुद्धा नीट कल्पता येत नाही.
आज फ्लॅट स्क्रीन टीव्ही, स्मार्टफोन सगळीकडे आहेत. खूप नावाजललेल्या भविष्यवेधी चित्रपटांनादेखील तीस चाळीस वर्षांपूर्वी हे भविष्य नीट दाखवता आले नाही. सीआरटी मॉनिटर जवळ जवळ नामशेष झालेले आहेत.
तरीही मला हे १९७० चे पुस्तक सुचवावेसे वाटते. फ्युचर शॉक.
https://en.wikipedia.org/wiki/Future_Shock
आता जे काही घडतंय याची एक संगती लागू शकेल.
अर्थात हे व्हॅल्यू इन्वेस्टरांत लोकप्रिय पुस्तक आहे. वाचले नसेल तर एक ट्राय मारा मग
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
.
सुचविलेल्या पुस्तकासाठी धन्यवाद.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/sampadkiya/features/earth-human-relations-peter...
हा परिचय वाचून पुस्तक वाचावेसे वाटत आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
द क्लिफ्टन क्रॉनिकल्स/ खंड तिसरा- 'बेस्ट केप्ट सिक्रेट'
द क्लिफ्टन क्रॉनिकल्स..., ह्या दोन ब्रिटिश परिवारांना केंद्रस्थानी ठेवून, लिहिलेल्या विस्तृत कादंबरी मालिकेतील, तिसरा खंड 'बेस्ट केप्ट सिक्रेट' (Best Kept ecret). पूर्ण झाला.
लेखक-जेफ्री आर्चर, मराठी अनुवाद : लीना सोहोनी यांनी केला आहे.
रवींद्र दत्तात्रय तेलंग