‘एक झाड आणि दोन पक्षी’ --- लेखक: विश्राम बेडेकर.
काही पुस्तके पुन्हा-पुन्हा वाचावीशी वाटत रहातात, त्याविषयी नव्याने काही लिहावे असेही वाटत रहाते.
असेच एक पुस्तक.....
‘एक झाड आणि दोन पक्षी’ --- लेखक: विश्राम बेडेकर.
सहा वर्षांपूर्वी लिहिलेला लेख, pdf लेख, खालील लिंकवर चढवला आहे, कारण तो युनिकोडमध्ये बदलता येत नाहीये आणि पुन्हा नव्याने type करत बसण्याचा कंटाळा व आळस!
http://www.scribd.com/doc/98079874/Vishram-Bedekar
हा लेख वाचल्यावर तो पुन्हा नव्याने लिहावासा वाटू लागला. असे का बरं होत असावे? म्हणजे पुनर्वाचन? पुनर्लिखाण?
मुख्य कारण मला वाटते, की आपल्यातील बदलत असलेल्या ‘मी’ला असा मोह होत असावा!
तुम्हांला काय वाटते?
प्रतिक्रिया
किती वर्षांपूर्वी लिहिला
किती वर्षांपूर्वी लिहिला होतात हा लेख?
तो नव्याने लिहावासा वाटणं स्वाभाविक आहे कारण आपली समज आणि आपला दृष्टिकोन काळानुसार बदलण्याची शक्यता असते.
कदाचित आताचा लेख आणि जुना लेख असे दोन्ही मांडून बघता येईल -नेमके काय बदलले ते.
मी खूप वर्षांपूर्वी वाचलं होत 'एक झाड...' आणि तेव्हा तरी आवडलं होत. आता वाचून पहायला हवं पुन्हा!
***
अब्द शब्द
बदलू लागले....
आतिवास,
11.09.2006.... म्हणजे ६ वर्षांपूर्वी! तेव्हा मी पुस्तके वाचायला सुरुवात केली होती, नुकतीच. अक्षरसः गृहपाठ केल्याप्रमाणे वाचन सुरू झाले ते तेव्हापासून. घरपोच वाचनालयाची सभासद असल्याने खूपच फायदा झाला आणि खूप वाचन करू शकले. तिथल्या वाचकघर उपक्रमामुळे लिहू लागले, लिहिता-लिहिता विचार करू लागले, विचार करता-करता बदलू लागले....
आणि आता...
आता तर असे जगणे अनिवार्य बनले आहे.
छान प्रतिसाद. असे शिस्तशीर
छान प्रतिसाद. असे शिस्तशीर सकस वाचले पाहीजे. आणि मुख्य म्हणजे वाचून चिंतन केले पाहीजे.
इथे माझ्या मैत्रिणींचे काही बुक रीडींग ग्रुप्स होते. पण त्यांचे त्यांच्या ख्रिश्चन धर्माशी निगडीत वाचनाचे ते ग्रुप होते.
यावरुन कोणाच्या तरी सहीतील वाक्य आठविले - एक से काम चलता है - दो की जरुरत है - तीन मिले तो अच्छा है ..... वगैरे
असे ग्रुप मिळाले, वाद-संवाद (ब्रेन-स्टॉर्मींग सेशन)झाले की किती मजा येत असेल.
पुस्तक वाचलेलं नाही, पण
पुस्तक वाचलेलं नाही, पण वाचण्याची इच्छा झाली. तुम्ही पुन्हा या पुस्तकावर लिहीणार असाल तर स्वागतच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.