Submitted by ऐसीअक्षरे on बुधवार, 05/08/2020 - 15:35
पुणे येथील एक कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. चाबुकस्वार (वय वर्षे ६२) यांचा करोनाकाळातला अनुभव.
Submitted by म्रिन on शुक्रवार, 24/07/2020 - 22:57
करोना काळातली निरीक्षणं, अनुभव सांगताहेत म्रिन
Submitted by सामो on बुधवार, 22/07/2020 - 23:40
मध्यंतरी सॅम जेप्पी (https://www.youtube.com/c/sadasiva108/featured) या माझ्या आवडत्या ज्योतिषाचा एक व्हिडीओ यु ट्युबवरती पहात होते. चंद्राचे कुंडलीतील कारकत्व या विषयावरचा तो व्हिडीओ होता. आत्ता सापडत नाहीये. सापडला की देते. हा व्हिडीओ ऐकताना, मला एक विलक्षण माहीती सहज सापडुन गेली. इट वॉज अ युरेका मोमेंट फॉर मी. ज्योतिषात चंद्राला मायेचे कारकत्व दिलेले आहे. म्हणजे हा ग्रह मायेचा कारक आहे. जसे सूर्य आत्म्याचा कारक तसा चंद्र मायेचा कारक. दर वेळेला मी हे वाचत आलेले आहे. त्यावरती क्वचित चिंतन केलेले आहे.
Submitted by मनीषा on बुधवार, 15/07/2020 - 11:34
(असच काही आठवलं म्हणून ....)
आज बस जवळ जवळ रिकामीच होती. आणि मला चक्क बसायला जागा मिळाली होती. उभ्याने प्रवास करणारे नव्हतेच. त्यामुळे आजचा प्रवास सुखद असेल असे वाटत तरी होते.
तेव्हढ्यात "आई ग्गं !!! कित्ती आंबट आहे. " असे जरा मोट्ठ्या आवाजातले उद्गार ऐकू आले.
Submitted by आदूबाळ on शुक्रवार, 10/07/2020 - 16:59
भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी, अर्थात बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांची थोडीफार ओळख मराठी वाचकांना असेलच. आचार्य अत्र्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ नाटकाची प्रेरणा ज्यांच्यावरून घेतली ते, किंवा व्ही.शांताराम यांचा ‘दो ऑंखे बारा हाथ’ ज्या खुल्या तुरुंगाच्या संकल्पनेवर बेतला होता ती संकल्पना राबवणारे, औंधात हायस्कूल आणि बोर्डिंग काढून त्यात माडगूळकर बंधू, साने गुरुजी, शंकरराव खरात यांच्यासारख्या गुणी विद्यार्थ्यांना आश्रय देणारे, किर्लोस्कर, ओगले प्रभृती मराठी उद्योजकांना मदत करणारे, वगैरे त्यांच्या ओळखी अनेक आहेत.
Submitted by हेमंत कर्णिक on सोमवार, 29/06/2020 - 15:06
आर डी बर्मन आणि लता की आशा? एक वाद-संवाद आणि एक श्रध्दांजली अशीही!
‘‘म्हणजे कसं बघ. हिंदी सिनेमाच्या इतिहासात असे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके सिनेमे आहेत, ज्यांची गाणी त्या त्या सिनेमाच्या आशयाशी एकरूप आहेत. इतकी, की ते गाणं त्या संगीतकाराच्या दुसऱ्या कुठल्याच सिनेमात असू शकणार नाही. उदाहरणार्थ, आपला तीसरी मंजिल. पण मला सांगायचंय की आरडी-आशा हे असं कॉम्बिनेशन आहे. अद्वैत. आरडीने लताला कितीही चांगली गाणी दिली असोत; ती बाय डिफॉल्ट चांगली ठरतात.’’
Submitted by कुमार जावडेकर on बुधवार, 24/06/2020 - 23:40
[हल्लीच मी लिहिलेल्या 'बटाट्याच्या चाळीतला लॉकडाउन' या कथेला 'काहीतरी बऱ्यापैकी वरिजिनल लिहा' असा एक प्रेमळ सल्ला मिळाला होता. त्यामुळे ('वरिजिनल' हा शब्द लेखकाचा ओरिजिनल असल्यामुळे नीट कळला नाही, पण-) माझं हे ओरिजिनल आणि रिजनल असं दोन्ही प्रकारचं लिखाण लिहायचा मोह अनावर झाला. अर्थात हे सगळं गंमत-जंमत या हेतूनंच लिहितो आहे याची कृपया नोंद घ्यावी. 'बऱ्यापैकी' हा शब्द कळला. हे त्यात सामील होतं की नाही हे वाचकांवर सोपवतो....]
आम्ही नदीम-श्रवणच्या संगीताचा बारकाईनं अभ्यास केला आहे.
Submitted by हेमंत कर्णिक on सोमवार, 22/06/2020 - 11:24
अडीच महिन्यांपूर्वी लॉकडाउन झाला आणि आमच्याकडे पेपर यायचा बंद झाला. पहिले काही दिवस ज्याप्रमाणे सकाळी चहा पिताना टीव्ही लावून भारत, अमेरिका, ब्रिटन, वगैरे देशांमधली कोरोनाखबर उत्साहाने बघत होतो, त्याचप्रमाणे लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस यांचे पीडीएफही वाचत होतो. पण दोन्हींचा उत्साह लवकरच संपला. सोडून दिलं. बातम्या नकोत आणि लेख, संपादकीय, वगैरे ग्यानही नको.
Submitted by ऐसीअक्षरे on सोमवार, 08/06/2020 - 17:10
या कोरोनाकाळात गेल्या दोन महिन्यांत संध्याकाळी एका विशिष्ट वेळी मी माझ्या खिडकीत उभा राहून बाहेर रस्त्याकडे बघत असे. त्याच वेळी आमच्या शेजारच्या बिल्डिंगमधल्या दोन तिशीतल्या स्त्रिया नित्यनेमाने आमच्या बिल्डिंगसमोरच्या रस्त्यावर दोन मोठ्या पिशव्या घेऊन यायच्या आणि त्यात खुप सारे 'डॉग फूड' आणि 'कॅट फूड' घेऊन यायच्या व ते रस्त्यावरच्या बेवारशी कुत्र्या-मांजरांना खाऊ घालायच्या.
Submitted by ऐसीअक्षरे on बुधवार, 20/05/2020 - 16:34
ते ४० तास...
बऱ्याच ठिकाणी चेकिंग खूप स्ट्रिक्ट होते, टेम्परेचर बघणे, ट्रान्झिट पास चेक करणे, फोटो काढणे हे सगळं स्वीकारूनच पुढे जावे लागत होते. खिडकीतून उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या, त्यामुळे चेकिंगच्या वेळी शरीराचे तापमानही वाढलेले येत होते. पण घरी जायचा आनंद त्याहून जास्त जाणवत होता. जास्त वेळ कुठे थांबू ही शकत नव्हतो. आता पाणीही संपत आलेले. तिथल्याच एका देवळाजवळच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील पाणी भरून घेतले. बिसलेरीची किंमतही त्यामुळे कळली...
पाने