Submitted by निमिष सोनार on गुरुवार, 03/09/2015 - 11:13
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वयाने मोठा असतो त्याचेकडून सतत कर्तृत्वाची आणि कर्तव्याची अपेक्षा केली जाते. केवळ वयाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व हौसे मौजेला मुरड घालावी लागते. पण हाच मोठा असलेला व्यक्ती जेव्हा लहानाला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र त्याचे लहान जर त्याचे ऎकत नसतील आणि मोठ्यांना योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल. आणि तेव्हा मग जर का मोठ्यांनी लहानांसारखे वागले तर त्यांना पुन्हा ऎकून घ्यावे लागते की "लहानांना मोठे होऊन मोठ्यांना समजवावे लागते आणि कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागते"
Submitted by .शुचि. on शनिवार, 29/08/2015 - 00:16
लोग दर्या पे क्युं जान दिये जाते है,
तिश्नगी का तो तआल्लुक नही पानी से
वा! काय चपखल , सुरेख वर्णन आहे तहानेचे. तृष्णा पाणी पिऊन थोड्या काळाकरता मिटते पण परत जागृत होते, त्रास देते. मग काय संबंध काय तहानेचा आणि जलाचा? काय संबंध आहे तृष्णेचा आणि अमर्याद पसरलेल्या अथांग सागराचा? जितका समुद्र अथांग तितकीच तहानही असीम नाही का?
.
"तृष्णा" हा शब्द कोणाला काय आठवण करुन देइल तर कोणाला काय. या शब्दाने मला मात्र आठवतो तो दुसरा शब्द - "द्वैत." वेगळेपण, भिन्नत्व. जर द्वैतच नसते तर कुठुन आली असती अमर्याद तडफड, व्याकुळ तहान?
Submitted by निमिष सोनार on बुधवार, 26/08/2015 - 11:54
सततची आणि अंधपणे केलेली स्वतःची इतरांशी आणि इतरांच्या जीवनाशी केलेली तुलना द्वेषाचे आणि नाशाचे कारण बनते. आपण इतर दोन व्यक्तींमध्ये केलेली तुलना सुद्धा हेवा आणि लोभाला जन्म देते आणि त्या दोघांचीही अधोगती करवते.
तुलनेमुळे स्वतःचे दोष आणि इतरांचे गुण आपल्याला दिसत नाहीत.
तुलना केल्याने आपण स्वतःचा वेगळेपणा आणि स्वतंत्र अस्तित्व नकळत नाकारत असतो.
तुलना ही नेहेमी हक्काची केली जाते पण कर्तव्याची आणि कर्तृत्वाची केली जात नाही.
इतरांपेक्षा मी कसा चांगला होईन, इतरांपेक्षा मी स्वतःच्या स्वभावात जास्त बदल कसा घडवेल अशी तुलना दुर्दैवाने होत नाही. अशी तुलना लाभदायक ठरते.
Submitted by निमिष सोनार on बुधवार, 26/08/2015 - 11:46
अर्धसत्य आणि सत्याचे प्रकटीकरण:
आपणांस माहिती असेल की महाभारतातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढत असलेल्या द्रोणाचार्यांचे धैर्य खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांनी शस्त्र त्यागण्यासाठी त्यांचा मुलगा अश्वत्थामा युद्धात मारला गेला असे त्यांना खोटे सांगण्यासाठी कृष्णाने सत्यवादी युधिष्ठिराला त्यांचेकडे पाठवले. पण युधिष्ठिर मोठा सत्यवादी. त्याचेकडून खोटे बोलणे शक्य नव्हते. मग अश्वत्थामा नावाचा एक हत्ती भीमाने मारला आणि मग युधिष्ठिरानं द्रोणाला सांगितलं, "हो अश्वत्थामा मेला" आणि मग हळूच त्यांना ऎकू येणार नाही असे बोलला," पण तो हत्ती होता" द्रोणांनी शस्त्रं त्यागली.
Submitted by विवेक पटाईत on सोमवार, 17/08/2015 - 21:25
नाम संकीर्तन साधन पैं सोपे
जळतील पापें जन्मांतरीची.
(संत. तुकोबाराय)
शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? अरे पण नाव नसते तर शेक्सपिअरला कोणी ओळखले असते. नावाच मुळे शेक्सपिअरला लोक आज ही ओळखतात. नावाची महीमाच न्यारी आहे. व्यक्तीपेक्षा त्याचे नाव मोठे असते. समुद्रावर सेतू बांधताना, राम नाव लिहिलेले पाषाण समुद्रावर तरंगत होते. पण भगवंतानी आपल्या हाताने समुद्रात टाकलेला दगड समुद्रात बुडाला कारण त्या दगडावर राम नाम लिहिलेले नव्हते. भगवंतापेक्षा, त्यांचे नाव जास्त परिणामकारक होते.
Submitted by .शुचि. on शुक्रवार, 14/08/2015 - 21:05
शतशब्दकथा हा कथेचा प्रकार मी एका संस्थळावरती वाचला. मला आवडला व त्यानुसार प्रयोग करुन पहाते आहे.
अन्य कोणाला अशी कथा (१०० शब्दात) मांडायची असेल तर या धाग्याचा उपयोग करावा.
________________________________________________
ईश्वराच्या अस्तित्वाविषयी तिला प्रश्न पडत नसतील?
इतकी देवभोळी नाही ती.
तिलाही गूढ जाणून घ्यावेसे वाटते. पूजा केल्यानंतरही ती विचार करते - तू आहेस का?
अन नसशील तर? माझ्याच हाती सर्व निर्णय? मी स्वतंत्र ? ना कोणाचा अंकुश ना कोणाचे सार्वभौमत्व. मी म्हणेन ते होणार. मी म्हणेन ती दिशा आयुष्याला देऊ शकेन.
.
खुडबुडीच्या आवाजाने ती दचकते. हा आवाज तिच्या परिचयाचा आहे.
Submitted by निमिष सोनार on शुक्रवार, 31/07/2015 - 15:49
(कथा वाचण्यापूर्वी एक निवेदन - ही कथा मी पूर्वी लिहिलेल्या शिकारी रात्र या कथेची सुधारीत आवृत्ती आहे. कथा कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा फक्त प्रतिक्रिया पूर्वग्रहदूषित नसाव्या ही माफक अपेक्षा!)
***
मध्यरात्र उलटून गेलेली असते.
वातावरणात खूप थंडी असते.
एक बैलगाडी गावाबाहेरच्या निर्मनुष्य मैदानातून चंद्राच्या उजेडात गावाकडे जात असते.
अचानक दोन्ही बैलाच्या मधोमध एक भयप्रद कुत्रा येतो आणि गाडीच्या खाली सरकतो आणि दोन्ही चाकांच्या मधोमध चालायला लागतो.
बरोबर बैलांच्या वेगात वेग मिसळून तो चालतो.
बैलगाडी हाकणारा (नंदू) बैलगाडीवर बसलेल्या दुसर्या माणसाला (हरी) म्हणतो,
Submitted by मेघना भुस्कुटे on रविवार, 19/07/2015 - 22:39
ललित है तो पूर्वप्रकाशित हैच! 
***
कोरा कागद निळी शाई!
हुंकारभुता बोल काही
अळीमिळी सोडून देई
इतके सारे बोललो तरी
घरभर उरून राही –
कोरा कागद निळी शाई!
कागदाच्या चल होड्या करू
तो बघ झाला पाऊस सुरू
दिवस गेला लिखा-पढी
सोड की रे अढी-बिढी –
चल आता मडके भरू!
कसली अढी कसले काय,
फक्त थोडा रुसलो हाय!
सगळा धडा पाठ आहे
मान माझी ताठ आहे –
पण गाण्याचा शेवट नाय?
ताठ मान हवी खरी
पण आता पुरे तिरीमिरी
म्हणतो राती परतीन घरी
Submitted by गवि on मंगळवार, 07/07/2015 - 17:27
नासिर काजमीने खूप गजला लिहील्या. भारतातल्या अंबाल्यात रचला गेलेला हा कवी पुढे पाकिस्तानात गेला. फाळणीवर त्याने पुष्कळ काही लिहीलं आहेच. पण अगदी "हंगामा", "चुपके चुपके" वगैरे ग्लॅमर लाभलेल्या चार गजलांवरच मैफिलीतून उठलेल्यांनीसुद्धा नासिरची "दिलमें एक लहेरसी उठी है अभी" ऐकलेली असते.
"कुछतो नाजुकमिजाज है हमभी
और ये चोटभी नयी है अभी"
ही अवस्था नासिरच्या काही गजल्स पहिल्यांदाच ऐकल्यावर अन वाचल्यावर झालेली असते. पण ते सर्वांना नाही जाणवणार कदाचित. अशातली एक गजल इथे आज घेतो.
गए दिनोंका सुराग लेकर किधरसे आया किधर गया वो
अजीब मानूस अजनबी था मुझे तो हैरान कर गया वो
Submitted by .शुचि. on सोमवार, 06/07/2015 - 15:47
.
अबौद्धिक व चाकोरीबद्ध, वारंवारता अति असलेलं काम करणार्या व्यक्तीची इच्छा असू शकते की आपल्याला बौद्धिक किंवा निर्णयक्षमतेची कसोटी पहाणारे काम मिळावे. आपण महत्त्वाचे निर्णय घावेत. आपल्यात तो करीष्मा असावा लोकांची मते बदलण्यात आपण महत्त्वाचे प्यादे ठरु. "ऑल्सो रॅन" च्याहूनही काहीतरी आहे अन ते यश आपले व्हावे. अनेकांनी आपली वाहवा करावी.
.
पाने