मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग २०
व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा
======
मी आकाशवाणीवर लहानपणी ही दोन गाणी ऐकलेली. त्यांची एकच ओळ आणि चाल मला स्मरते. ओळ मी खाली लिहित आहे नि चाल लिहू शकत नाही. भाषेचे दौर्बल्य. कोणाला ते पूर्ण गाणं माहित आहे काय?
गाणे १. उडता आवळी मज, ढगाची सावली मज, उडता आवळी मज
गाणे २. हीच माझी हीच माझी, माझी भावना.
पहिल्या दोन माझी मधला झी लहान आहे. तिसरा झी लांबलचक आहे.
सुमन कल्याणपुर यांनी गायलेला
सुमन कल्याणपुर यांनी गायलेला संत तुकाराम यांचा अभंग....
बूडता आवरी मज
भवाचे सागरी
नको मानू भार
पाहु दोषांचे डोंगर
आहे ते सांभाळी
तुझी तैसी ब्रिदावळी
तुका म्हणे दोषी मी तो
पातकांची राशी
दुसरं गाणं माहिती आहे पण शब्द
दुसरं गाणं माहिती आहे पण शब्द नाही आठवत.
पाय लागो!!!
आहे ते सांभाळी मधल्या ळी चा नि आवरी मधल्या री चा इतका घोळ केल्यांनतरही आपणांस स्वर पोहोचले ! आयडी अगदी सार्थ आहे आपला !! अनेक चरणस्पर्श!!!
--------------------
नितांत सुंदर रचना, स्वर, संगीत. नेटवर योग्य त्या ओळी इंग्रजीत नि मराठीत गुगलल्या तरी व्हिडिओ सोडाच, ऑडिओ किंवा साध्या ओळी देखिल मिळाल्या नाहीत. आपणांस हे सारं असंच ठावं आहे. त्याकरिता अजून एक नमस्कार.
-----------------------
आकाशवाणीवर अशी गाणी अलिकडे लागतात का? कॉपी करून पाठ करायचा विचार आहे. पण दुसर्या, शेवटच्या कडव्याला चाल लावता येत नाहीय.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अरुण जोशी : 'बुडता आवरी मज' आणि इतर
बुडता आवरी मज इथे वाचता, ऐकता येईल. (ऐकण्यासाठी त्या पानाच्या उजव्या बाजूस प्लेयर आहे, तो वापरावा)
तुमच्या आठवणीतला एकूण ळी-री चा घोळ पाहता दुसर्या गाण्यातल्या 'भावना'मुळे ते गाणे 'देह मंदिर, चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना' हे असावे, असे वाटते आहे.
लिंकसाठी
लिंकसाठी धन्यवाद.
---------------------
देह मंदिर, चित्त मंदिर ही आमच्या शाळेची नित्य प्रार्थना होती. त्याचा या गाण्याशी संबंध नाही. शिवाय ते खड्या आवाजातलं गाणं आहे, म्हणून इतका घोळ असायची शक्यता कमी.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
टांगे आणि घोडे
पूर्वी टांगे बरेच वापरात होते. त्यासाथी घोडे आवश्यक असत.
घोड्यांचा मोठय प्रमाणावर वापर लष्करातही होत असे.
एकूणातच "वाहतूक" ही घोड्यांवर अवलंबून असे.
आता यांत्रिकीकरणाच्या युगात,वाहतुकीची वगैरे घोड्यांची बरीच कामे गाड्या करतात.
लष्कराचेही घोड्यांवरचे अवलंबित्व कमी झालेले आहे.
तर हे असे अनेकानेक घोडे वापरातून कमी कमी होत गेले असणार.
म्हणजे तुलनेने घोड्यांची उपलब्धता अधिक झाली आहे का ?
मग "घोडे अत्यंत स्वस्त उपलब्ध झाले " असा काही ठळक काळ नोंदवला गेला का ?
उदा :- आधी एक घोडा दहा हजाराला असे. पण आता दोन हजारात मिळू लागला.
अशी एखादी नोंद १९५०,१९६० वगैरेच्या दशकातील कुठे आहे का ?
की घोडयंची पैदास कमी ठेवून हा प्रश्न सोडवला जात आहे ?
(सप्लायरने माल कमी ठेवणे, व किमती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
नाही,घोड्याला चैनीची गोष्ट
नाही,
घोड्याला चैनीची गोष्ट म्हणून प्रोजेक्ट केलं गेलं. ईले. घड्याळ ज्यादा अॅक्युरेट जादा स्वस्त म्हणल्यावर लोक्सनी काट्याच्या घड्याळाला जवळपास ज्वेलरी आयटम करून ठेवलं तसंच. घोडा दोन हजाराला नक्की मिळत नाही. घोड्याला इन्जेक्शन मारायचे हजार दिड हजार रुपये मिळतात असे जनावरांचा डॉक्टर असलेला मित्र म्हणतो.
भारताच्या नोंदी निश्चितच
भारताच्या नोंदी निश्चितच असतील, पण मला त्या सापडणं कठीण आहे. अमेरिकेच्या नोंदी मला अनेक सापडतात. कोणीतरी आपल्या खापर खापर... पणजोबांच्या डायरीतल्या नोंदी इथे दिलेल्या आहेत. १८७२ साली घोडा साधारण ६० डॉलरला मिळायचा. आता या साठ डॉलरची आजच्या किमतींशी तुलना कशी करायची? तर इथे साधारण तुलनात्मक प्राइस इंडेक्स दिलेला आहे. त्यावरून असा अंदाज करता येतो की २०१४ साली किमती सुमारे २५ पट असाव्यात. पहिल्या यादीत दिलेल्या वस्तूंच्या किमती पाहून २५ ते ३० पट हा ठीकठाक प्राथमिक अंदाज वाटतो. तेव्हा घोड्याची सध्याची किंमत १५०० ते १८०० डॉलर असावी. या किमतीत घोडा सध्या निश्चितच मिळतो. हा त्याच दर्जाचा आहे की नाही याची शहानिशा करणं कठीण आहे. (शौक करणारांचे घोडे याच्या दहापट, शंभरपट वगैरेही असू शकतात. रेसचे घोडे तर विचारूच नका.) किमती वाढल्या आहेत का? तर किमती 'स्थिर' आहेत, आणि उत्पादन व खरेदी दोन्ही कमी झाली आहेत असं म्हणता येईल.
बाकी पहिल्या यादीतल्या काही गोष्टींच्या किमती बघून डोळे फाटण्याची पाळी येते!
अंडी ३० सेंट डझन - सध्या अंडी सुमारे २.०० डॉलर डझनावारी मिळतात. १९८० साली सुमारे १ डॉलर... म्हणजे १०८ वर्षांत किमती फक्त सव्वातीनपट, आणि १४२ वर्षांत किंमत फक्त सहापट.
लोणी ३९ सेंट पाउंड - सध्याच्या बाजारात ते ३.५ डॉलर पाउंडाला मिळतं. १९८० साली ते १.७५ ला मिळायचं. पुन्हा १०८ वर्षांत किंमत फक्त साडेचार पट, आणि १४२ वर्षांत फक्त नऊपट.
दूध ३२ सेंट गॅलन - सध्याची किंमत ३.७५ डॉलर. १९९५ साली २.५० ला मिळायचं....
शेवटची
शेवटची अयदी खरच भन्नाट वाटली. विमानप्रवासाचे तीन दशकापुर्वीचे दर आणि आताचे दर बघूनही असच आश्चर्य वाटलं होतं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
शेतजमीन , अन्न आणि नागरीकरण
मागील काही वर्षे भारताचे शहरीकरण वाढते आहे.
कृषी उत्पन्नही वआधते आहे.शहरीकरनादरम्यान परिघावरील गावांची सुपीक जमीनही वस्तीसाठी वापरली जाते.
मग टोटलात लागवडीखालचे क्षेत्र कमी होत असणार ना.
असे होत असल्यास त्याचा अन्नोत्पादनावरही परिणाम व्हायला हवा ना ?
की फक्त एकरे उत्पन्न वाधले, म्हणून लागवडीखालची जमीन कमी होउनही एकूण क्रुषी उत्पन्न वाढले;
असे काही होत आहे ?
अजून एक शक्यता म्हणजे, शहरीकरण होत असले, तरी दूरच्या गावांची शेतज्मीनही वाधते आहे; असा सिनारिओ शक्य असावा. माळरान म्हणवली गेलेली पूर्वीची पडिक जमीन काही करुन लागवडीखाली आणली जाते आहे का ?
की जंगलाचा भूभाग शेतीसाठी वळवला जातो आहे ?
नक्की काय सीन आहे?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
माझा लेख ऐसीवरच असूनही
माझा लेख ऐसीवरच असूनही तुम्हाला हे प्रश्न पुन्हा पडावे, अं??
सर्वाधिक लोकसंख्येच्या ५० मोठ्या शहरांत मिळून भारताची १०% लोकसंख्या राहते. यांंचं एकंदरीत क्षेत्रफळ अंदाजे २५००० स्क्वेअर किलोमीटर असावं. भारताचं क्षेत्रफळ आहे ३३ लाख स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे भारताच्या क्षेत्रफळाच्या ०.७%. माझा अंदाज तिपटीने चुकला असेल तर २%. आता हा टक्का झाला थोडा मोठा तरी शेतीखालच्या जमिनीसाठी उरलेल्या ९९.३% मधून अॅडजस्ट करणं सोपं आहे. भारतात गेली काही दशकं ६०.५% जमीन शेतीखाली आहे, या आकड्यात ढिम्मही फरक पडलेला नाही.
शेतीखालची जमीन तितकीच राहिली, आणि एकरी उत्पन्न वधारल्यामुळे एकूण कृषी उत्पन्न वाढलं - हे त्यातल्या त्यात जवळचं उत्तर वाटतं. साठ सालापासून जगभर दर हेक्टरी यील्ड वाढलेले आहेत. विकसनशील देशांत अधिकच. भारतात दर हेक्टरी यील्डइतकंच जवळपास अन्नोत्पादन वाढलेलं आहे.
एक सूचना करू का? असे प्रश्न पडले की ते सरळ गूगलला विचारावेत. बहुतेक वेळा खूप चांगली उत्तरं मिळतात. तसंच त्या प्रश्नांशी निगडित अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टीही वाचायला मिळतात. उदाहरणार्थ, भारताचं शेतीखालचं क्षेत्रफळ किती? हे शोधण्यासाठी मी india total area under cultivation असा गूगल सर्च केला. दुसराच दुवा वर्ल्डबॅंकेचा मिळाला. त्यात १९८० सालपासून हे क्षेत्रफळ दिलेलं आहे. तसंच area under cities in india असा गूगल सर्च केल्यावर पहिल्या पन्नास शहरांची लोकसंख्या देणारे अनेक दुवे सापडले. यात मी काही रॉकेट सायंटिस्टगिरी करत नाही. तुम्हीही करून बघा. खूप माहिती असते. ऐसीवरच्या कोणाला तरी विचारण्यापेक्षा मूळ विद्याकडे स्वतःच जाण्याने फायदा होतो.
.
>>यात मी काही रॉकेट सायंटिस्टगिरी करत नाही. तुम्हीही करून बघा. खूप माहिती असते. ऐसीवरच्या कोणाला तरी विचारण्यापेक्षा मूळ विद्याकडे स्वतःच जाण्याने फायदा होतो.
तसं नाहीये. ऐसीवर विचारण्याचे कारण असते ते म्हणजे कुणी ऐसीकर त्या क्षेत्रातला जाणकार असेल तर तो प्रश्नाचे उत्तर रॉ माहिती/डेटापेक्षा अधिक चांगल्या पर्स्पेक्टिव्हने देऊ शकतो. किंवा कदाचित अचूक माहिती असलेल्या दुव्यांकडे निर्देश करू शकतो. It is just to avoid reinventing something if someone has already taken pains.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
प्लस आमच्यासारख्या फारसा
प्लस आमच्यासारख्या फारसा विचार न करणार्या आळशांना रोचक प्रश्न आणि उत्तरे इथेच वाचता येतात
ही अशी विदागिरी/विद्रटगिरी
ही अशी विदागिरी/विद्रटगिरी केल्यानंतर प्रश्नोत्तराच्या व्याप्तीनुसार स्वतंत्र लेख किंवा प्रतिसाद लिहीता येतातच. 'नव्वदोत्तरी संशयरत्नमाला' असा नवा प्रकारही सुरू करता येईल की. इथे लोकांना प्रश्न विचारला, उत्तर मिळालं नाही, थोडं खणल्यावर गूगलकडून उत्तर मिळालं ते ही इथेच लिहीलं. याची ही उदाहरणं - एक , दोन
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
विदारत प्रतिसाद
विदारत प्रतिसाद, लेख, साखळी, वगैरे.
अथवा तसे लेखन करतात ते विदावान.
त्याबाबत चर्चा "विदाविमर्श"
...
यप्स
तसच काहिसं.
पण राजेशरावांचे विशेष आभार.
स्वतःच शोधायचा प्रयत्नही करीनच.
पण तरीही शोधल्यावरही उलट जरा जास्तच प्रश्न पडतील, तेही इथे मांडत जाइन; असं वाटतं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मनोबा, १. भारताचे क्षेत्रफळ
मनोबा, १. भारताचे क्षेत्रफळ स्थिर आहे, २. भारतातले निरुपयुक्त भूभाग (डोंगर, वाळवंटे) तितकेच राहिले आहेत ३. भारतातले जंगलाखालचे क्षेत्र वाढलेले आहे. ४. भारतातील नगरांची संख्या वाढली आहे. ५. नगरांचे क्षेत्रफळ वाढले आहे. ६. ग्रामिण व शहरी क्षेत्रांतील उद्योग व युटिलिटी यांसाठी लागणारी जमीन प्रचंडच वाढली आहे. ७. रिक्लेमेशन शून्य आहे तर मग शेतीच्या लागवडीखालची जमीन वाढली कशी हा प्रश्न इथे पूर्वी चर्चिला गेला आहे. राजेशजींनी दिलेल्या उत्तरात कुठेतरी मी दिलेल्या एका लिंकवर सगळी आकडेवारी आहे. या प्रगती सिरिजमधेच असणार.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
निरुपयुक्त भूभाग (डोंगर,
हे अजोंनी म्हटलेले चालते, नेहरूंनी नाही

- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अजो हलवायाच्या घरावर
अजो हलवायाच्या घरावर तुळशीपत्र या सुरात ते शब्द वापरत नाहीयेत हा फरक आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
एक सूचना करू का? असे प्रश्न
प्रश्नाचं उत्तर जाणण्याचा प्रयत्न करण्याचा उत्साह नि प्रश्न पाडून घेण्याचा उत्साह यात तफावत असू शकते. शिवाय गुगल वर माहिती मिळते, उत्तरासाठी बरेच इंटर्प्रिटेशन हवे असते ते 'सामूहिकरित्या' केलेले बरे. शिवाय, ज्ञान पाजळण्यात जे सुख असते ते ज्ञानप्राप्तीत थोडेच असते?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तसं नाहीये
तसं नाहीये. एकाच विदाच्या सेटमधून वेगवेगळ्या लोकांनी स्वतःला सोयीस्कर किंवा स्वतःच्या मताशी सुसंगत असे निष्कर्श काढलेले बघायला मजा येते.
मागील काही वर्षे भारताचे
सरकारी माहिती प्रमाणे भारतात लागवडीखालची जमीन आणि जंगले दोन्ही वाढत आहेत.
अशी माहिती "ऑफिशियल" स्रोतांकडून सहज उपलब्ध असते आणि सहसा आशावादी असते. चिमूटभर मीठ लावून घ्यायची.
http://www.data.gov.in/catalog/pattern-land-utilisation#web_catalog_tabs_block_10
Note:
Below 500 hectares; * The figures are taken from the latest forestry statistics publication, agriculture census, are estimated based on latest available year data received from the States/UTs respectively; NA - Not Available; Note: The figures classified under different columns for different categories of land use do not always add up in sub-totals and as a whole to the area totals at state and all India levels due to rounding off of the figures.
('000 hectares); Data taken from Statistical Year Book of India - 2013, CSO Source: Directorate of Economics and Statistics, Ministry of Agriculture;
अशी माहिती "ऑफिशियल"
भारत सरकार सोबत काम करण्याचा अनुभव असेल तर सहजी कळून येते कि साम दाम दंड भेदे करोन सरकारचे कर्तृत्व दाखवायचा प्रयत्न, प्रेशर किती जोरदार असते. भविष्यात कधी या सगळ्या जमीनींची बेरीज १००% पेक्षा जास्त झाली तर नवल न वाटायची मानसिकता बाळगून असायला हवे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पण मग अशा माहितीचा आधार घेत
पण मग अशा माहितीचा आधार घेत सरकारच नाही तर कित्येक नागरीक सुद्धा भारताची बरीच जास्त प्रगती होते आहे, असा समज बाळगतात असतात त्याचे काय? (नुसते समजत नाहीत तर लेखमालिकाही लिहितात ती असाच विदा वापरुन
संबंधित हलके घेतीलच)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
घासकडवींनी जो विदा वापरला
घासकडवींनी जो विदा वापरला आहेत त्यात एकूण व्हॉल्यूममधे जी वृद्धी दाखवली आहे तिच्यातला तथ्यांश नाकारणे करंटेपणाचे आहे. पण दरडोई प्रगतीतील बदलाची मात्रा मात्र वादातीत नाही. हा बदल विद्याच्या तृटींमुळे नि विद्यातील त्रुटींमुळे नक्की किती आहे हे सांगता न यावे. वर त्याची सामाजिक किंमत हा अजून एक विषय आहे. त्याची आर्थिक नि पर्यावरणीय किंमत (कोण देणार देव जाणो) हा अजून एक विषय आहे. सामाजिक नि आंतरराष्ट्रीय विषमता हा अजून विषय आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अन्न निर्यात
भारत अन्न निर्यातदार वगैरे आहे म्हणतात. मग देशातल्या प्रचंड संख्येने असलेल्या उपाशी लोकांचा प्रश्न सोडवता येत नाही का ?
लाल बहादूर शास्त्रींच्या काळची समस्या तरी निदान आज नाही. तेव्हा पुरेसे अन्नच उपलब्ध नसे. आता उलट वरकड अन्न आहे म्हणतात. तरी लोक उपाशी ???
असो.
पण मग असे असताना "अन्नोत्पादन अजून वाढवलं पाहिजे" असं कृषीमंत्री वगैरे का म्हणतात ?
अन्नोत्पादन वाढवून साध्य काय करायचं आहे? फक्त निर्यात ???
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
किनारपट्टी आणि महानगरे
मुंबै काय किंवा हाँगकाँग , न्यूयॉर्क काय, समुद्राच्या इतक्या जवळ इतकी प्रचंड दाटीवाटीची वस्ती असणे विचित्र्/अनैसर्गिक नाहिये का ?
पूर्वापार त्या भागात दाटी किती होती ? तितकी दाटी होती, म्हणजे त्या भूभागाची लोकसंख्या पेलण्याची क्षमता तितकीच असली पाहिजे. मग आता इतकी लोकसंख्या वाढते आहे, हे विचित्र नाहिये का ?
समुद्राचे डोके फिरले तर समुद्राच्या इतक्या जवळ राहणार्या मानवजातीला ते कोणत्या भावात पडेल ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मुंबै, न्यूयॉर्क, हाँगकाँग ही
मुंबै, न्यूयॉर्क, हाँगकाँग ही (व इतरही) समुद्रानजीकची शहरं ही व्यापारी बंदरं होती/आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना, त्यामुळे स्थलांतरितांमुळे फुगलेली लोकसंख्या.
मुंबै, न्यूयॉर्क, हाँगकाँग या तीनही व्यापारी बंदरांना "सेफ हार्बर्स" असण्याचा राजकीय इतिहासही आहे.
मुंबै - इंग्रजांनी पोर्तुगिजांकडून हुंड्यात घेतलं (कोकणपट्टीवर हक्काचं स्थान असावं म्हणून)
न्यूयॉर्क - इंग्रजांनी डचांकडून विकत घेतलं, बदल्यात सुरीनाम दिलं. (न्यूयॉर्कचं जुनं नाव न्यू अॅम्स्टरडॅम होतं. तिथला हार्लेम या भागाचं नाव ज्या खेड्याच्या नावावरून ठेवलं आहे ते खेडं हेग जवळ आहे.)
हाँगकाँग - चिन्यांनी अफूच्या आयातीवर बंदी घातल्यावर ग्वांगझाऊ/कँटनमार्फत अफूचा चोरटा व्यापार सुरू रहावा म्हणून इंग्रजांनी अक्षरशः तीन भिकारड्या खडकांवर हाँगकाँग वसवलं.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
क्रेटानिन आणि चमत्कार
परवाच चमत्कार म्हणता यावा असा प्रकार झाला.
माझ्या मित्राच्या वडिलांना दीर्घकाळपासून मधुमेह आहे.
दोनेक महिन्यांपूर्वी तब्येतीस फारच भयंकर अडचणी आल्या. ते चक्कर येउन पडले. अंगावर सूजही आली.
क्रेटानिन का कोणतातरी घटक भलताच असंतुलित झाला होता म्हणे शरीरात.
शिवाय किडन्यांना धोका. काहीही करुन डायलिसिस करावेच लागेल असे विविध तज्ञांचे मत पडले.
माझ्या मित्राला कुणीतरी नांदेडजवळील किनवट येथे वास्तव्य करणार्या जडीबुटीवाल्या माणसाचा पत्ता सांगितला.
आलटरनेटिव्ह मेडिसिनबद्द्ल सहज बोलणे निघाले तेव्हा मीसुद्धा आल्टरनेटिव्ह मेडिसिन मनाच्या समाधानासाठी घेण्याइतपत चांगले असतात; असे मत दिले.
त्यांना काय सुचले कुणास ठाउक . प्रयोग करुच म्हणून जडीबुटीवाल्याची औषधी दोन चार आठवडे घेतली.
अन सारे काही नियंत्रणात आले !
सध्या डायलिसिसची गरज नाही असा निर्वाळा ताजे रिपोर्ट पाहून डॉक्टर लोकांनी दिलाय.
माझे डोके चक्रावले आहे.
अधिक तपशील मिळवायचा प्रयत्न करतो आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
या धाग्यापुरते या मालिकेचे
या धाग्यापुरते या मालिकेचे शीर्षक "मनातली मोठमोठाली वादळे" असे करावयास हवे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
+१
'मनातली वादळे आणि निघालेले प्रष्णबोळे' वुड बी सोऽ अॅप्ट.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ते
ते काही का असेना. पण आमच्या शंकावर कुणाच्याच प्रतिक्रिया का नाहित बरे?
ऐसीकर इतका भाव का खातात ?
आल्टारनेटिव्ह मेडिसिनची खिल्ली उडवायची असते हा धडा ऐसीवर आल्यापासून अधिकच व्यवस्थित गिरवतोय.
म्हणून विचारलं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
स्केल
दगड मारला तर काही दिवस तुरुंगात जावं लागतं, भोसकलं तर काही वर्षे जावं लागत असेल, एखाद खुन केलेल्याला फाशी वगैरे देतात, हत्याकांड किंवा जिनोसाईड झालं की लोकांना काय करावं कळतच नाही त्यातलाच हा प्रकार.
खडुस
दुष्ट
(किंवा आशा काळे फेम :- "चांडाळा...")
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
'रोचक' आरोप.
हपिसातून ऐसी सोडून अन्य सायटी उघडत नसल्यामुळे ऐसी सोडून अन्यत्र लिहिणे म्हणजे (वैट्ट वैट्ट दुष्ष्टपणे इ.इ.) 'माहिती दडवून ठेवणे' या आमच्या एका मित्राने केलेल्या आरोपाची आठवण होऊन ड्वॉळे पाणावले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
त्रिफळा
डाबर त्रिफला, इनो, नि नवरत्न तेल या तीन अल्टरनेटिव गोष्टींवर माझा विश्वास आहे. बाकी कशात नाही.
)व्हिनेगार खाणे, लोक जेवणात आबंट घालतात त्याने जसे सांबार/वरण, थोडे जास्त तेलकट खाणे, खोबरे खाणे, रात्री १२ नंतर जागणे, इ इ. याच्याने माझे डोके दुखायचे नि कधीही मन एकाग्र व्हायचे नाही. २०-२१ व्या वर्षी देखिल दुपारी ४ वाजल्यानंतर मी कशावरच फोकस करू शकत नसे. २००६ नंतर लग्नानंतर घरचे जेवण घेऊ लागल्यावरही (किवा सुट्टीत घरी गेल्यावरही) मला पित्त झाले नाही असे होईना. पण मला 'आंबट' शब्दाचीच अॅलर्जी आहे असे पण नीट म्हणता येत नाही. कैरी कितीही खाल्ली तर मला पित्त होत नाही. व्हायचे नाही.
१. अगदी अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षापासून मला जबरदस्त पित्ताचा त्रास चालू झाला. कारण माहित नाही पण घराबाहेरचे खाण्याची ती पहिलीच वेळ. मग १९९४ ते २००६ पर्यंत मी डायजीन वैगेरे घेऊन जगलो. मला सामान्यतः पित्त होत नसे. पण पुढीलपैकी काहीही एक केले कि व्हायचे - दही, लोणचे, चिंच, इ थेट आबंट पदार्थ खाणे, चायनिज, इ पदार्थांत घातलेले मायक्रोग्राममधे (
२. डायजीन, इ घेतल्याने पित्त जाते असे होत नाही. जठरातल जे काही पित्त आहे ते न्यूट्रलाइज होते. पण बेस खाल्ल्यामुळे अॅसिड अधिकच स्रवायचे कि काय ही शंका आहे. एकदा डायजीन वा कोणता सिरप चालू केला कि तो चालूच ठेवावा लागे. शेवटी कधी उलटी होऊन तो त्रास बंद होत असे.
३. २०१० मधे माझ्या एका पाहुण्याने मला रोज सकाळी नि रात्री दोन दोन चमचे डाबर त्रिफळा पावडर खा म्हणून सांगीतले. मी त्याचे ऐकले नाही. 'अल्टरनेटीव मेडिसिन' घेणे हे चक्क माझ्या इगोच्या आड यायचे! पण शेवटी त्याच्या घरी कोणालाच पित्त नाही हे सत्य पाहून नि मी करत असलेल्या मूर्खपणांत अजून एकाची भर पडल्याने फार काही फरक पडणार नाही असे त्याने जाणवून दिल्याने मी त्रिफळा खायचे मान्य केले.
४. सुरुवातीला आठवडाभर त्रिफळ्यामुळेच पित्त होत आहे कि काय असे मला वाटू लागले. कारण तो ही आंबट!! पण एक महिन्याने मला अॅसिडीटी होणे बंद झाले. मग मी हळूहळू दही चाखून पाहू लागलो. मग लोणचे चालू केले. दही, लोणचे, सांबार मनसोक्त खाऊनही पित्त होइना तेव्हा मी बावचळलोच. मी एकदा ३-४ महिन्यांनी त्रिफळ्याला ७-७ दिवसांचा गॅप दिला, मला पित्ताचा त्रास देणारे सगळे पदार्थ एकाच दिवशी/रात्री मनसोक्त खाल्ले नि सकाळी ५ वाजेपर्यंत टीवी पाहत बसलो. दुसर्या दिवशी एक्सेलवर रात्री उशिरापर्यंत काम करताना माझी एकाग्रता किंचितही भंग झाली नाही.
५. तेव्हापासून आय व्हाउच फॉर त्रिफळा फॉर अॅसिडिटी.
६. त्यानंतर मी प्रयोग म्हणून आयुर्वेदाची इतर औषधे, ते जे काही क्लेम करतात त्यासाठी, खाल्ली. पण त्यांत काही परिणाम जाणवला नाही.
७. तेव्हापासून आय व्हाउच ओन्ली फॉर त्रिफळा फॉर अॅसिडिटी.
--------------------------
एकदा इनोच्या बाटलीवरचा स्टफ वाचताना ते आयुर्वेदिक आहे हे आढळले. त्यापूर्वी ते अॅलोपॅथिक म्हणूनच मी वापरायचो.
----------------
नवरत्न तेल लावल्यावर डोके थंडगार पडते. झोप पटकन येते. (पण जास्त लावले तर दुसर्या दिवशी डोके दुखते सुद्धा.)
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
त्रिफळा पोट साफ करण्यासाठी
त्रिफळा पोट साफ करण्यासाठी प्रसिद्ध आहे, आणि त्याचे प्रोलॉन्ग्ड सेवन आरोग्याच्या दृष्टिने चांगले नाही असे ऐकून आहे.
पोट साफ करणे हा प्रोब्लेम मला
पोट साफ करणे हा प्रोब्लेम मला कधी नव्हता. (त्या टोकाचा प्रोब्लेम नव्हता, या टोकाचाच होता.)
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
शक्य, पण पित्त हे पोट साफ न
शक्य, पण पित्त हे पोट साफ न झाल्याने उद्भवलेली समस्या असु शकते असे वाटले म्हणून प्रतिसाद.
मनोबाच्या प्रश्न विचारण्याचा
मनोबाच्या प्रश्न विचारण्याचा रेट एक्स्पोनन्शिअली वाढतो त्यामागची कारणं काय असावीत?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अमुच्या भाळी सदैव लिहिली...
ठ्ठो
ठ्ठो
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
प्रकाटाआ
सॉरी चूकीची गल्ली!!
१५ ऑगस्ट १९४७
१५ ऑगस्ट १९४७ नंतर इथला ब्रिटिश अंमल संपला.
तोवर इथून त्यांना घसघशीत कर जात असणार. भरपूर उत्पन्न मिळत असनार्.
त्याला ब्रिटिश समाजजीवन सरावलेले असणार.
इथला ताबा निघून गेल्यावर त्यांच्यावर मोठाच परिणाम झाला असेल, नाही?
त्याचे कुठे उल्लेख आहेत का ? पडसाद कुठे कुठे उमटले ?
१९४६ सालचा ब्रिटिश पार्लमेंटचा अर्थसंकल्प १००० कोटिंचा होता, आणि लागलिच पुढल्या वर्षी तो
एकदम आकुंचित/shrink होउन ६०० कोटी वगैरेंवर आला, असे काही झाले असणार.
हे सगळे त्यांनी कसे पचवले? त्यावेळी ह्यातून घडलेल्या प्रमुख घटना कोणत्या ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
संत
मागे ऐसीवरच "पुरोगामी,सुधारणावादी मंडळी प्रथा परंपरांना आणि देव धर्माला जमेल तेव्हा नावे ठेवतात. खिल्ली उडवतात. पण देवावर दृढ विश्वास असणार्या संतांना मात्र लै लै भारी म्हणतात. म्हणजे संत ह्या मंडळींना खरच थोर वाटतात की संतांच्या चुका ह्यांना दिसताहेत पण दाखवायची हिंमत नाही (लोकभयाने वगैरे) असे आहे? " मी पृच्छा केली होती . उत्तर मिळाले ते हे "संत भारीच होते. समता वगैरेचा त्यांनी पुरस्कार केला. लोकांच्या भल्याचा उपदेश करायला त्यांनी देवाचा खांदा वापरला."
अरे??? काय हे ?
ह्यांनी लोकांच्या भल्याचं सांगितलं म्हणजे काय नेमकं?
"खोटं कधी बोलू नये; चोरी कधी करु नये." हे तर आमचे अरुण जोशीही सांगतात, मनोबाही सांगतो आणि प्रवीण दवणेसुद्धा संस्कारांच्या नावाखाली हेच्च सांगतो की.
मग दवणेकाकाला का संत म्हणत नाहित ?
नामदेव आणि एकनाथ ह्यांनाच का संत म्हणता ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
पण देवावर दृढ विश्वास
म्हणजे? त्यांच्या कोणत्या गुणांना हे पुरोगामी लै भारी म्हणतात? त्यांची भक्ती थोर आहे सर्वानी तशीच भक्ती ठेवली पाहिजे असे हे पुरोगामी म्हंटात की काय?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बस एक ही काफी...
एकट्या तुकारामांनी लोकांच्या भल्यासाठी सांगितलेल्या काही गोष्टी -
तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ।।
बोलाचीच कढी बोलाचाच भात | जेऊनिया तृप्त कोण झाला ।।
नाही निर्मळ जीवन | काय करील साबण ।।
काय दिनकरा | केला कोंबड्याने खरा ।।
नवसे कन्यापुत्र होती | तरी का करणे लागे पती ।।
उंचनिंच कांही नेणे भगवंत। तिष्ठे भावभक्ति देखोनियां ।।
सजनकसाया विकूं लागे मांस। माळ्या सांवत्यास खुरपूं लागे ।।
नरहरिसोनारा घडों फुंकूं लागे। चोखामेळ्यासंगे ढोरें ओढी ।।
'हे आज सांगण्यात काही विशेष नाही, पण तेव्हा सांगण्यात नक्कीच काही विशेष होतं' असं मला पूर्वी वाटत असे, पण आता आजूबाजूला जे काही चाललेलं दिसत असतं ते पाहता जे आज सांगणंसुद्धा विशेष गरजेचं आहे ते ३००-३५० वर्षांपूर्वी सांगणं किती महत्त्वाचं होतं हे विशेषत्वानं जाणवतं ते वेगळंच.
जाता जाता : लोकशिक्षण वगैरे सोडून देऊ. जर हिटलरनं इतक्या दर्जेदार कविता रचल्या असत्या तर मला (कवी म्हणून) तोसुद्धा आवडला असता.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
थँक्स
शंकांबद्दल, मुद्द्यांबद्दल गंभीरपणं माहिती दिलीत. थँक्स.
विचार करतो आहे. पटण्यासारखं वाटतं आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
साबण ही संकल्पना भारतात कधी
साबण ही संकल्पना भारतात कधी आली असा विचार करतोय. ४००-५०० वर्षांपूर्वी देखील होती का?
===
साबणाला ४००० वर्षांचा ईतिहास आहे.
http://www.soaphistory.net/
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
+१
जयाप्रमाणे उपनिषदातील एका उल्लेखावरून तत्कालीन लोक केस काढायला वस्तरा वापरत असत हे सिद्ध होते तसेच काहीसे.
तो उल्लेखः
उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरान्निबोधत |
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया | दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति |
-कठोपनिषद.
अर्थः वस्तर्याच्या धारेवर चालण्याप्रमाणे अध्यात्ममार्ग/मोक्ष मिळवण्याचा मार्ग औघड आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बाबौ , मला पौराणिक शिरिअल
बाबौ ,
मला पौराणिक शिरिअल मधले पात्र इतके गुळगुळीत दाढी केलेले कसे हा प्रश्न पडायचा. वस्तरा होता म्हणल्यावर ठीके.
हं
हां.
प्रतिसादावर विचार केला खरा.
पण परस्परविरोधी माहिती आल्यावर त्याच्याशी नेमकं डील कसं करायचं?
उदाहरण म्हणून स्वामी विवेकानंद घेउ. फारशी धार्मिक नसलेली पण विवेकानंदांचा आदर करणारी बरीच मंडळी असू शकतात असे मानून त्यांचे उदाहरण घेत आहे.
स्वामी विवेकानंद वगैरेंनीही "पवहारी बाबा" म्हणजे "पवन/हवा खाउन जिवंत राहणारा माणूस/बाबा" , हठयोगाच्या मदतीनं चमत्कार वाटावेत असे प्रकार करणारी माणसे , विविध सिद्धी वगैरेंचा अनुभव घेतल्याचा उल्लेख केलाय.
इतकं करुन पुरोगामी मंडळी विवेकानंद नामक प्रभृती आमचेच विचार सांगत होती असं कसं म्हणतात?
अल्याडच्या पुस्तकात विवेकानंदांनी "छी थू त्या जातिसंस्थेच्या." , "जय हो समानता की." , " भौतिक स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेले आधुनिक विज्ञानवादीच शिवाशिव पाळणार्यांपेक्षा वेदांताच्या जवळ आहेत." असा उपदेश केलेला असतो;
पण....
पण ह्या अल्याडच्या पुस्तकांशिवाय पल्याडच्या पुस्तकात विवेकानंदांनीच सिद्धी, चमत्कार, त्याबद्दलचे अनुभव, पवहारी बाबा वगैरेबद्दल जे लिहिलय ना! "विज्ञानालाही न समजलेल्या गोष्टी आहेत.(आणि त्या आमच्या जादुटोणा किंवा अध्यात्मवाल्यांना समजल्यात)" असं म्हणणारी निओ धार्मिक मंडळीही विवेकानंदांचाच वारसा सांगतात.
म्हणजे विवेकानंदांनी "जातीवाद वाईट आहे. प्रगतीची कास धरा" वगैरे सांगितलं हे सत्यच आहे.
पण त्याच्याच सोबत अशा चमत्कारांचा, सिद्धींना आपण साक्ष असल्याचेही बोलले आहे.
मग त्यांची क्रेडिबिलिटी किती धरायची ?
फक्त विवेकानंदच नव्हे मागील दीड दोन शतकात होउन गेलेल्या कैक संतांचे चमत्कार फेमस आहेत.
खरं तर त्यांनी चमत्कार केला आहे म्हणूनच ते थोर आहेत असं त्यांच्या मागे जाणारा मोठ्ठा समाज मानतो.
गाडगेबाबा, तुकडोजी हे सामाजिक कार्यासाठी थोर मानले जातात; मान्य.
पण महाराष्ट्रिय मध्यमवर्गात स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज हे व असे कैक लोक अतिप्रिय आहेत.
ह्यांची तत्वज्ञाने कमी किंवा नगण्य प्रमाणात म्हणता यावीत इतकी चर्चेत असतात, पण विषय निघाला की पोथी व त्यातले चमत्कार हे येतातच. ह्यांच्याबद्दल वस्तुनिष्ठ ष्ट्यांड घ्यायचा म्हटला तर काय म्हणता यावे नेमके ?
खुद्द विवेकान्म्दांचे गुरु रामकृष्ण परमहंस ह्यांच्याबद्दल काय म्हणता यावं?
केशवचंद्र सेन वगैरे तत्कालीन अग्रणी बुद्धीवाद्यांनाही रामकृष्ण परमहंस ह्यांची भुरळ पडली होती.
रामकृष्ण परमहंस स्वतः कॅन्सरनं गेले असले तरी त्यांच्याही चमत्कांरांच्या नोंदींची वानवा नाहिच.
ह्या सगळ्याकडे नेमकं कसं पहायचं?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
माझं मत
कोणत्याही माणसाचे विचार शंभर टक्के पटावेत अशी माझी अपेक्षा नाही. विवेकानंद जात्यंताच्या किंवा विवेकवादाच्या बाजूनं बोलले असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. बाकी चमत्कार, सिद्धी वगैरे आख्यायिका म्हणून मी सोडून देतो. (विवेकानंदांचे विचार वाचावेत इतके मला ते कधी महत्त्वाचे वाटले नाहीत. त्यामुळे मी पुरोगामी ठरत असलो/नसलो तरी हरकत नाही.)
वर उल्लेख केलेल्या कुणाविषयी तर मला आदरही नाही. त्यांचे कल्ट झाले आहेत किंवा केले गेले आहेत. त्यांच्याकडे फार तर समाजशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीनं पाहायला मला आवडेल. त्यामुळे माझा पास.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
थँक्स
सुस्पष्टता आवडली. बरीचशी पटली.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
+१
+१
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सुटीची भरपाई
मनोबा सुटीवर गेले होते आणि इंटरनेट हाताशी नसल्यामुळे त्यांनी रोज पडणारे प्रश्न कंप्युटरवर टाईपून ठेवले अन आल्याआल्या लगेच सगळे इथे उतरवले की काय?
('मना'तील छोटामोठा प्रश्न आहे.)
-Nile
पण
पण ते काहीही असले तरी ह्या शंकांबद्दल अधिक कुणी काही बोललं तर बर्म होइल, नै का ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
बर्म? नै म्हणजे सुसूत्रतेची
बर्म?
नै म्हणजे सुसूत्रतेची अपेक्षा दरवेळेस धरण्यात कै अर्थ नै, पण अचानक बर्म? रंगून-टेलिफून आठवला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हाहाहा "मेरे पिया गये रंगून"
हाहाहा "मेरे पिया गये रंगून"
"हम लुंगी बांधकर करे गुज़ारा,
"हम लुंगी बांधकर करे गुज़ारा, भूल गये पतलून"
हे त्या गाण्यातलं दिव्य वाक्य आठवलं. अगदी तद्दन टिप्पिकल असं ते सानुनासिक 'हॅलो' देखील मस्ताड आहे.
अवांतरः आमचे एक नातेवाईक खरेच रंगूनला गेले असताना या गाण्याची घरी झालेली उजळणी आठवली.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
त्या दिव्य वाक्यानंतर
त्या दिव्य वाक्यानंतर लगेचच
"तुम्हारी याद सताती है, जिया में आग लगाती है"
असे ध्रुवपदातले शब्द आल्यामुळे काही वेगळंच चित्र डोळ्यांपुढे उभं रहातं.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
ठ्ठो _/\_ बाकी, त्या
ठ्ठो
_/\_
बाकी, त्या ध्रुवपदातल्या शब्दसमुच्चयामुळे एकूण कार्यकारणभावही मनात चांगलाच ठसतो आणि माणूस जातो 'रंगून'.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
-१
नाही. हे प्रश्न कधीकाळी अजालीय अवस्थेत तरंगत होते, आत्ता कुठे इकडे आलेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आवड
ऐसीअक्षरे हे मला आजघडीला जालावर आवडणार्या संस्थळांपैकी सर्वात जास्त आवडणारे संस्थळ आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
प्रश्न
(मनातील छोट्या मोठ्या प्रश्नातील) प्रश्नचिन्ह राहिले काय?
शीर्षकात 'विचार' शब्द देखिल अंतर्भूत हवा.
संपादकांनी माझ्या मूळ संकल्पनेचे स्वरुप बदलले आहे. मी "मनातले छोटे मोठे प्रश्न आणि विचार" असा धागा सर्वात प्रथम काढलेला. काही विचार प्रश्नरुपाने असतात नि म्हणून जास्त महत्त्वाचे असतात. म्हणून प्रश्न हा शब्द वेगळा वापरलेला.
----------------------
माणसाच्या डोक्यात किती* प्रश्न आहेत हे तो माणूस विचार बदलण्यास किती मोकळा आहे याचे सूचक असावे.
*(फिक्स्ड आयडियांच्या तुलनेने)
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
माणसाच्या डोक्यात किती*
किंवा नवी माहिती मिळवण्यास किती उत्सुक आहे हेदेखील.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
लिंट चॉकलेट्स गतवर्षीपर्यंत
लिंट चॉकलेट्स गतवर्षीपर्यंत भारतात गोद्रेज नेचर्स बास्केट, हायपरसिटी आणि काही अन्य निवडक ठिकाणी रेग्युलर मिळायची.
गेल्या दिवाळीत भारतीय अन्न विभागाचे नियम पाळले न गेल्याने अनेक टन लिंट चॉकोलेट अन्य परदेशी चॉकलेट्सच्या सोबत भारतीय बंदरात नाकारले जाऊन सील करण्यात आले आणि गोदामात सडून गेले अशी बातमी आली. तदनंतर आजतागायत लिंट चॉकलेट (त्यातही लिंडॉर) ही अत्यंत आवडती गोष्ट पूर्णपणे अदृश्य झालेली दिसते. याबाबत लेटेस्ट बातमीही कुठे सापडत नाही. ऑनलाईन ऑर्डर करण्याच्या ऑप्शन्सवर क्लिकवले असता आउट ऑफ स्टॉक असा संदेश दिसतो.
याबाबत कोणाला काही लेटेस्ट माहिती आहे का? या कंपनीने भारतात चॉकलेट्स पाठवणे कायमचे बंद केले आहे किंवा कसे ?
पुढच्यावेळी तिकडे येताना घेऊन
पुढच्यावेळी तिकडे येताना घेऊन येईन नक्की!!
२०१२ नंतर मराठीत प्रकाशित
२०१२ नंतर मराठीत प्रकाशित झालेली चांगली/वाचनीय पुस्तके कोणती?
यात इंग्रजी कादंबर्यांचे अनुवाद वगळावेत.
मला ललित व अललित दोन्ही प्रकारच्या लेखनात रस आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वाचनालयांमधला राबता कमी
वाचनालयांमधला राबता कमी झाल्यापासून मला हल्ली ही माहिती संस्थळांवर मिळते.
असो. माझ्या माहितीमधला '२०१२ नंतर' हा आकडा थोडा मागेपुढे होईल.
अललितः
- 'समकालीन'चं 'लोकशाही झिंदाबाद' नामक पुस्तक इंट्रेष्टिंग होतं. त्यात निरनिराळी आकडेवारी, तक्ते, बदलती प्रमाणं यांची रेलचेल होती. सुहास पळशीकर + योगेंद्र यादव हे संपादकद्वय इंट्रेष्टिंग वाटत असल्यास हे पुस्तक पाहाच.
- 'ग्यानबाची एचार्डी' हे श्यामला वनारसेंचं पुस्तकही मला इंट्रेष्टिंग वाटलं होतं. कंपन्यांना मानसशास्त्रीय सल्ले देणार्या दांपत्याचे अनुभव असं वर्णन करता येईल.
- 'डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य' हे उत्क्रांतिविषयक लेख, प्रकाशक - मनोविकास. संपादकः रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ, नंदा खरे
- गणेश मतकरीचं 'फिल्ममेकर्स' हे काही महत्त्वाच्या दिग्दर्शकांच्या सिनेमांचा आढावा घेणारं पुस्तक होतं. तसंच त्याचं एक आल्बमसदृश पुस्तकही (चौकटीबाहेरचा सिनेमा) देखणं होतं. त्यात मला वाटतं, त्यानं 'महानगर'साठी लिहिलेल्या परीक्षणांचं आणि सिनेमाच्या पोस्टर्सचं संकलन होतं. पुस्तकात जाम प्रमाणलेखनाच्या चुका होत्या, पण मांडणी मराठी पुस्तकांत वेगळीच होती.
ललितः
- 'राखीव सावल्यांचा खेळ' आणि 'श्रीलिपी' हे किरण गुरवांचे कथासंग्रह.
- 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' ही आनंद विंगकरांची कादंबरी. या लेखकाची साधना साप्ताहिकातली लेखमालाही अंगावर काटा आणणारी होती. दुष्काळी प्रदेशातल्या माणसांना भेटून लिहिलेले अनुभव अशा स्वरूपाची होती. त्यातली शेतीबद्दलची, माणसांबद्दलची तुटक, भेदक निरीक्षणं केवळ थोर होती.
- 'खेळघर' ही रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथांची कादंबरी. त्यात एका सामाजिक प्रयोगाला केंद्रस्थानी ठेवून आधुनिक समाजाबद्दल काही भाष्य वगैरे आहे. (मला बोअर झालं हे पुस्तक जाम.)
- 'रावा' हे शुभांगी गोखलेचे ललित लेख. फारच फ्रेश शैली आहे बाईची.
- अच्युत गोडबोलेचं 'मुसाफिर' मी वाचलं नाही. पण लई लोकांनी लई वाचलं.
- काळसेकरांचं 'वाचणार्याची रोजनिशी' आणि शांताबाई गोखल्यांचं 'त्या वर्षी' तर फेमसच आहे.
- 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हे लक्ष्मीकांत देशमुखांचं 'मनोविकास'चं पुस्तक. शीर्षकच स्वयंस्पष्ट आहे. ('प्रशासननामा' हे यांचंच पुस्तक ललित-अललित असं म्हणावं लागेल.)
अजून आठवेल तसं लिहीन.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
आभार.यातील काही गेल्या
This comment has been moved here.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
संदर्भ
संदर्भ http://www.aisiakshare.com/node/3114
आणि इथला गब्बरचा प्रतिसाद,
गब्बर साहेबांच्या किंवा समान विचारसरणीच्या लोकांच्या डोक्यातली आयडीयल सोसायटी नेमकी कशी असावी??
सपोज हातात पैशे आणि ताकद नसलेले सर्वजण गचकणे सुरू झाले, तर कोणीही कोणासाठी पण का काम करेल? या सोसायटीचे नियम काय असतील?? न्युसन्स
व्हॅल्यूच फक्त महत्वाची असेल का?? गरज आहे तो पर्यंत काम कर आणि मग जा मर हा नियम असेल का? या असल्या मारामारी मुळे पैल्वान किंवा बौन्सर कॅटॅगरीला लै महत्व येइल काय?
आणि प्रश्न वैयक्तिक वाटल्यास उडवून लावावा.
प्रश्न मार्मिक आहे. लाडावलेली
प्रश्न मार्मिक आहे. लाडावलेली अनेक मुले एखाद्या खोलीत जमा झाली असताना त्या खोलीत मोठं आणि समजदार कोणीच नसेल तर जे होईल तेच जगात होईल.
एकतर मोठी माणसे निघून गेल्यावर तसं होईल किंवा खाऊ कमी पडल्यावर.
>>प्रश्न मार्मिक आहे +१ मात्र
>>प्रश्न मार्मिक आहे
+१
मात्र माझ्यामते एकाच आर्थिक स्थितीच्या (व सध्याच्या परिभाषेत फक्त श्रीमंत) व्यक्ती उरल्यास काही काळ स्टेटस कुओ असेल. सगळेच जण वरवर गुण्यागोविंदाने राहत असतील. प्रत्येक श्रीमंताचा व्यवसाय वेगळा असल्याने त्यातील काही श्रीमंत त्याचे गिर्हाईक असतील तर तो काहिंचा गिर्हाईक असेल.
)
मात्र अंतर्गत छुपी स्पर्धा असेल (जसे चाळींमध्ये किंवा सोसायट्यांत होते
काही काळात पुन्हा नवी उतरंड निर्माण होईल आणि नव-गरीब वर्ग जन्माला येईल
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
प्रत्येक श्रीमंताचा व्यवसाय
प्रत्येक श्रीमंताचा व्यवसाय वेगळा हे गृहीतक कितपत बरोबर आहे?
सेलिब्रिटी
सगळ्या क्षेत्रातले सेलिब्रिटी एका वेगळ्याच टापूवर रहायला गेले असं होउ शकतं ना.
उदा :- शाहरुख, टाटा -अंबानी, तेंडल्या, पवारसाहेब, मायकल जॅक्सन्, सतारवादक रविशंकर, एडिसन्-ग्रॅहम बेल, बाबा रामदेव, बालाजी तांबे , आमटे कुटुंबीय असे सगळेच एका बेटावर रहायला गेले तर ?
आमटे कुतुंबाकडे वैयक्तिक संपत्ती नाही. पण आनंदवनाच्या भूमीची किंमत बरीच व्हावी.
त्यांच्याकडे थेट संपत्ती नसली तरी बर्याच संपत्तीवाल्यांत (दात्यांमध्ये) त्यांची ऊठबस असते.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हा सिनारिओ अॅन रँडच्या
हा सिनारिओ अॅन रँडच्या अॅटलास श्रग्ड नामक कादंबरीत वर्णिलेला आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बाकी सगळं एका बाजूला आणि
बाकी सगळं एका बाजूला आणि रँडच्या हीरोंची वर्णनं एका बाजूला. तेवढ्यासाठीही रॅंडबाईंच्या कादंबर्या वाचणे वर्थ आहे!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
हीरोंची वर्णनं चांगली आहेतच,
हीरोंची वर्णनं चांगली आहेतच, सवालच नाय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ह्हॅ
हुड.
बाकी सगळं एका बाजूला आणि रँडच्या हीरोंची वर्णनं एका बाजूला. तेवढ्यासाठीही रॅंडबाईंच्या कादंबर्या वाचणे व्यर्थ आहे!
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
बाकी कैपण असाईड,ठ्ठो
बाकी कैपण असाईड,
ठ्ठो
अवांतरः मनोबा 'हुड'हूड तर घेत नैये ना
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
यातून फारफारतर इतकंच सूचित
यातून फारफारतर इतकंच सूचित होतं की, तू गे किंवा बाय नाहीयेस. बाकी काहीही सिद्ध होत नाही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
अगदी प्रत्येकाचा वेगळा असेल
अगदी प्रत्येकाचा वेगळा असेल असे नाही, मात्र त्या गटाला आवश्यक त्या सर्व सेवा + गुड्स पुरवणे या श्रीमंतांमध्ये विभागले गेले असेल. त्यामुळे एकमेकांवर इंटर डिपेंडन्सी असेल.
अर्थात एक नवी व्यक्ती जरी धंद्यात - स्वतंत्र धंदा करण्याच्या वयात - आली, जसे की पुढिल पिढी, आधीच्या मालकाच्या संपत्तीचे विभाजन सुरू होईल आणि मग ती नवी व्यक्ती कशी वागते, कोणता व्यवसाय कसा करते यानुसार आधीची थबकलेली चान चान व्यवस्था डिस्टर्ब होईल नी त्यातून उठलेल्या तरंगानी ती पुन्हा पूर्णपणे बदलु लागेल आणि पुन्हा उतरंड निर्माण होईल
(अर्थात एका फटक्यात बाकी सगळे गरीब मारले गेले आणि फक्त मोजके श्रीमंत उरले तर हे गृहितक आहेच)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पहिल्याच दिवशी कोकाकोला आणि
पहिल्याच दिवशी कोकाकोला आणि पेप्सीच्या मालकांमध्ये युद्ध होणार नाही कशावरुन?
युटिलिटी कंपन्यांचे मालक सगळ्या विजेचा, पाण्याचा किंवा आणखी कशाचा ताबा घेण्यासाठी युद्ध करणार नाहीत हे कशावरुन?
गब्बरसारख्या विचारांचे लोक उरले म्हणजे सरकार/कायदे वगैरे काहीही नसणार; म्हणजे सुरुवातीला चान-चान व्यवस्था नसून शेवटी इंटरडीपेंडंसी असलेले युनिक सेवादाते उरेपर्यंत हाणामार्या होणार.
???
मुळात कोकाकोला नि पेप्सी विकत घ्यायला गिर्हाइके शिल्लक कितीशी असतील? बोले तो, कोक आणि पेप्सी कंपन्या (पुरेशा ग्राहकांअभावी) डुबणारच ना? नि त्यांच्या शेअर्सचा भाव घसरून नगण्यच होणार ना?
(अतिअवांतर: कोक नि पेप्सी हे 'पेनी ष्टाक' होणे ही कल्पना मोहक आहे.)
म्हणजे, कोक नि पेप्सी मालक (अधिक उर्वरित मेजॉरिटी ष्टेकहोल्डर) यांसारख्यांचा 'नवा गरीब' (पक्षी: 'नवे फडतूस') वर्ग निर्माण होईल फार तर.
लॉर्ड ऑफ दि फ्लाइज
विलियम गोल्डिंगच्या लॉर्ड ऑफ दि फ्लाइज मधे ह्याचे उत्तर सापडु शकेलसे वाटते.
इथे वर्णन केलेली परिस्थिती
इथे वर्णन केलेली परिस्थिती सध्या भारतात आहे असा काही ऐसीकरांचा दावा आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
काही शक्यता
- फॉक्स न्यूज - आणि अमेरिकेतील एएम ब्याण्डवरील तमाम टॉक रेडियो सर्किट - बंद पडेल.
- गब्बर बहुधा आत्महत्या करेल. (अन्यथा, आता कोणता फडतूस त्यास विचारेल?)
(अतिअवांतर: फॉक्स न्यूज / अमेरिकन रैटविंग टॉक रेडियो सर्किट आदींवरील 'विचारवंतां'सारखी फडतूसांची मांदियाळी त्रिभुवनात शोधूनही बहुधा सापडणार नाही, असे आमचे खाजगी मत आह्रे.)
पुस्तकाच्या प्रेमात पडण्याचे निकष
Sarah ban breathnach नावाच्या लेखिकेचे एक वाक्य अफलातून प्रसिद्ध आहे -
अर्थात लेखिका असल्याने ती इतक्या देखण्या वाक्यात तिच्या पुस्तकाकडूनच्या अपेक्षा मांडू शकते. आपण इतक्या आकर्षक शब्दात मांडू शकलो नाही तरी प्रयत्नकरायला काय हरकत आहे?
तर माझा प्रश्न हा आहे की एखादं पुस्तक तुम्ही वाचायचं ठरवता ते कोणत्या कसोटीवर म्हणजे कोणी सुर्हुदाने (शब्द नीट टाइप करता येत नाहीये) ते तुम्हाला रिफर केलेले असते म्हणून की उत्तम पुस्तकांच्या एखाद्या यादीत ते तुमच्या नजरेला पडलेले असते म्हणून की अन्य काही?
माझं सांगायचं झालं तर, मी सहसा यादी चाळत नाही. थेट ग्रंथालय किंवा पुस्तकाच्या दुकानात जाऊन चाळते. पहीला निकष हा असतो की पुस्तकाच्या डोळ्यात पहाता क्षणी ते आवडले पाहीजे अर्थात पहीलं वाक्य जबरी हवं, मला जबरी वाटायला हवं "च"!!!
काही भन्नाट पहीली वाक्य शोधली असता पुढील वाक्ये सापडली-
(१) It is a truth universally acknowledged, that a single man in possession of a good fortune, must be in want of a wife. —Jane Austen, Pride and Prejudice
(२) Lolita, light of my life, fire of my loins. —Vladimir Nabokov, Lolita
(३) Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way. —Leo Tolstoy, Anna Karenina
(४) It was a bright cold day in April, and the clocks were striking thirteen. —George Orwell,
(५) The sun shone, having no alternative, on the nothing new. —Samuel Beckett, Murphy
या चाळणीतून जर पुस्तक पास झालं तर जर माझे नेहमीचे ठराविक "कविता/अध्यात्म्/तत्त्वज्ञान अन नॉन-फिक्शन" प्रकारातलं असेल तर ते पटक्कन उचलले जाते पण जर ते पुस्तक फिक्शन अन बीच बुक सदरात मोडत असेल तर, मग मी मलपृष्ठाकडे वळते अन त्या पुस्तकाचा सारांश (सिनॉप्सिस) वाचते. अन हिरॉइन पुरेशी स्नॉटी, स्ट्क अप असेल अन भरपूर "लव्हर्स चेझिंग गेम" असेल तर मी ते घेते.
तसे तुमचे पुस्तकाच्या प्रेमात पडायचे निदान पक्षी त्या पुस्तकावर वेळ खर्च करण्यास रुकार द्यायचे निकष काय?
ठोस निकष असे नाही नाहित.
ठोस निकष असे नाही नाहित. वाचुन/रेफरंसने/रिव्हुवरून किंवा विनाकारणही एखादे पुस्तक वाचायला घेतले जाते. पुस्तक वाचायला घेतले आणि रटाळ वाटले/नावडले तर काही काळ बाजुला ठेवतो व दुसरे पुस्तक घेतो. पुन्हा एकदा पुस्तकाला चान्स देतो, तरीही नै आवडले तर बाजुलाच काढतो (अर्थात असे प्रसंग अगदीच कमी आहेत), मग त्याची पुन्हा कोणी स्तुती केली किंवा त्यातील काही सौंदर्यस्थळे दाखवून/जाणवून दिली तरच ते उघडतो. (हे तर अगदी १-२ पुस्तकांच्या बाबतीत झालंय)
=====
बाकी
It is a truth universally acknowledged, that a single man in possession of a good fortune, must be in want of a wife.
या एका वाक्याचाच नव्हे तर प्राईड अँड प्रेज्युडीसमधील असंख्य वाक्यांचा मी जबरदस्त पंखा आहे. इतका सटल खवचटपणा मला लै म्हंजे लै आवडतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
* एखाद पुस्तक खूप आवडला की
* एखाद पुस्तक खूप आवडला की त्याच लेखकाची इतर पुस्तक.
* ऑलटैम बेस्ट सेलर.
* हॉलीवुड चित्रपट बनवणार असेल तर ती.
* गुडरीड्सच्या फेसबुक पेजवर दर शुक्रवारी 'या विकांताला काय वाचताय?' अशी पोस्ट येते. तिथे बर्याचजणांनी जर एकाच पुस्तकाच नाव दिलं असेल तर ते. उदा काही दिवसांपुर्वी द बुक थीफ वाचण्याची लाट आलेली.
पुस्तकाच्या प्रेमात पडायचे
पुस्तकाच्या प्रेमात पडायचे निकष आणि पुस्तक एकदा तरी वाचून बघण्याचे निकष वेगवेगळे आहेत.
एकदा तरी वाचून बघण्याचे निकष:
- कोणी तरी केलेली शिफारस
- दुसर्या पुस्तकातला संदर्भ किंवा दुसर्या पुस्तकाने चाळवलेली उत्सुकता
- सहप्रवासी वाचत असलेली पुस्तकं
- सेकंडहँड पुस्तकांच्या दुकानांत मिळणारी पुस्तकं
- आवडलेल्या लेखकाची पुढची/इतर पुस्तकं
- ज्या बाबतींत उगाचच गुप्तता बाळगली जाते / वाचायला प्रतिबंध केला जातो ती पुस्तकं (हे हल्ली कमी झालं आहे)
- वरील निकषांची काँबिनेशन्स
प्रेमात पडायचे निकष
हे नाही सांगता येणार. पण दोन-तीनदा वाचल्याशिवाय पुस्तकाच्या प्रेमात पडलो आहे हे स्वतःशीही कबूल करत नाही. (प्रथमदर्शनी प्रेमावर द्वितीयदर्शन हा उतारा असतो वगैरे...)
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
पुस्तक वाचण्याचे निकषः -
पुस्तक वाचण्याचे निकषः
- त्याच लेखकाचं एक पुस्तक इंट्रेष्टिंग वाटलेलं / आवडलेलं असणे
- आपल्याला विश्वासार्ह वाटणार्या लोकांनी केलेली शिफारस
- पुस्तक वाचायला घेतल्यावर पहिल्या सात-आठ पानांत भयानक झोप न येणे
- आवडत्या विषयांवरचे पुस्तक असणे
- प्रचंड कंटाळा आलेला असताना / काही कारणाने कुणाची/कशाची वाट पाहण्यात वेळ काढायचा असताना हाताशी तेवढे एकच पुस्तक असणे व आजूबाजूला बोअर लोक / गोष्टी असणे
- पुस्तकात वापरलेली पात्रं आवडती असणे
- इत्यादी.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
विकास
मनोरंजनाव्यतिरीक्त इतरांना समजतं पण आपल्याला समजत नाही अशी पुस्तकं मी वाचण्याचा प्रयत्न करतो, आपली कुठलीतरी एक बाजु विकसीत झाली नसावी काय ह्या शंकेने मी हे वाचन करतो.
छान उत्तर!!!
छान उत्तर!!!
बोरिंग वाचन
लोक पुस्तकं का वाचतात? पुस्तक वाचणं जाम बोरींग नसतं का? त्यातल्या त्यात ललित साहित्यामधे कोणत्या पात्राचं काय करायचं हे लेखकच ठरवत असतो. तो काहीही करू शकतो. मग उत्सुकता का?
--------------
त्यापेक्षा लोक विज्ञान का वाचत नाहीत? रियल सायन्सेस का वाचत नाहीत? सोशल सायन्सेस का वाचत नाहीत? जी के का वाचत नाहीत? मंजे त्यामानाने कमी का वाचतात?
--------
अलिकडे स्टोरी, ज्ञान इ इ चा इतका मस्त आनंद टीवी पाहून मिळत असताना रटाळ पुस्तके वाचणे लोकांना का आवडत असावे? वाचनात असं काय एक्स्टृऑ आहे जे दुसर्या माध्यमांत नाही?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हे पहा.
हे पहा.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
एक लंबर प्रश्न आहेत.
एक लंबर प्रश्न आहेत. उत्तरांची वाट बघतो आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.