हिंदूस्थान
येऊदे खिलजी किंवा तैमूरलंग कुणी
विठोबाचा वारकरी तो धीट आहे
पाडले बामीयान तोफांनी जरी
हासतो तरीही आज तो बुद्ध आहे
पाडा मंदिर कुठेही, आम्ही बांधू ते पुन्हा
आज आम्हा प्रत्येकात राम आहे
घरातले भेदी दिसणार आता कसे
आजही रंग कातडीचा तोच आहे
असली सुंदर सापाची नक्षी जरी
घातकी विषारी मात्र त्याचा दात आहे
ठेचून काढू सगळेच शत्रू आज ना उद्या
कुणी टपून बसला बाहेर तर कुणी आत आहे
रक्तात स्वतःच्याच भिजला वारंवार जरी
दिसेल सर्वांना ताठ उभा हिंदूस्थान आहे
प्रतिक्रिया
कवितेच्या आशयाशी पूर्णतः सहमत
कवितेच्या आशयाशी पूर्णतः सहमत नसले तरी कळकळ आवडली.
?
येऊदे खिलजी किंवा तैमूरलंग कुणी
विठोबाचा वारकरी तो धीट आहे
पण खुद्द विठोबानं सुल्तानी अत्याचारास घाबरुन पाण्यात उडी मारली ना?
शिवाय मंदिरात दलितांचा प्रवेश होणार म्हणून घाबरलेल्या विठोबाचा आत्मा
का प्राण स्वात्म्त्र्योत्तर काळात एका घागरित काढून ठेवलाय ना म्हणे?
त्याचे वारकरी धीट कसे मग?
.
तुम्ही कधी ट्रोलिंग केलीच तर तुमच्या ट्रोलिंग पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जाइल.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सबटेक्स्ट?
खिलजी, तैमूरलंग, विठोबा, राम, बुद्ध हे सगळे पुरुष आहेत. साप, तोफ ही फॅलिक प्रतीकं वाटतात - कारण त्यांना लांब आकार आहे, टोक आहे, त्यातून काही तरी बाहेर पडतं आणि त्यात काही तरी शक्ती असते. तरीही ह्या सगळ्यांसमोर हिंदूस्थान ताठ उभा आहे आणि तोदेखील पुल्लिंगी आहे. ह्यावरून असं प्रतीत होतं की कवीला समलिंगी संबंधांमध्ये रस असणार. पण आपल्या समाजात त्यांना अद्याप मान्यता नसल्यामुळे सूचकतेद्वारे कवी आपल्या उमाळ्यांना वाट देतो आहे.
असो. हे संकेतस्थळ उदारमतवादी आहे त्यामुळे ह्या विचारांना किंवा प्रवृत्तींना विरोध नाही; अर्थनिर्णयन तेवढं केलं आहे. उरलेल्या गोष्टींसाठी (म्हणजे समलिंगी जोडीदार शोधण्यासाठी वगैरे) कवीला शुभेच्छा.
श्री. मन, तुमच्या 'गे विषय चित्रपटात वगैरे कुठे होता?' ह्या प्रश्नाला इथे किंचित का होईना, उत्तर मिळालं का?
श्री. अरुणजोशी, हा पुरुषानं पुरुषावर केलेला अन्याय आहे की अनुल्लेखानं इथे स्त्रीशक्तीवर अन्याय झाला आहे ह्यावर कृपया प्रकाश पाडावा ही विनंती. (म्हणजे, ताठ उभ्या पुल्लिंगी हिंदूस्थानाऐवजी इथे दुर्गे दुर्घट भारी भारतमाता असती तर...? वगैरे)
(ज्यांना विनोदबुद्धी आहे ते हलके घेतील अशी आशा आहे.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आपल्या पोस्ट मुळे जरा हलके
आपल्या पोस्ट मुळे जरा हलके हलके वाटत आहे. विनोद उत्तम
इतर विचारसरणींवर उपहासात्मक
इतर विचारसरणींवर उपहासात्मक विनोद करण्यात वेळ न घालवता, आपल्याला जो विवेकवादी समाज अभिप्रेत आहे त्याच्या वर्तनाच्या फ्रेमवर्क्स बनवण्यात जास्त वेळ द्यावा ही विनंती. एक मॉडर्न विवेकवादी बनायची माझी फार इच्छा आहे. मी पॅरलल लॉजिक आणि एक्सटेंडेड लॉजिक वापरतो तेव्हा विवेकवाद मला अस्वीकार्य वाटतो. शिवाय प्रत्येक विवेकवाद्याचा विवेकवाद वेगळाच निघतो. आणि सगळं माझ्यावर सोडलं तर मी ज्या निष्कर्षांप्रत येतो त्यांना इतर विवेकवादी म्हणत नाहीत. मी स्वतःचा विवेक वापरायला तयार आहेच, पण सीमा घालून द्यायचं काम कराल तर ते उत्तम होईल.
सबब विनोद स्पोर्ट म्हणून घेतला तरी कविच्या कवितेतलं सत्य (तेव्हढं) कूठे ठेवायचं हा प्रश्न उरतोच.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कविची इतर मते व्यक्तिगत
कविची इतर मते व्यक्तिगत म्हणून मान्य करायला हरकत नाही. उर्दू लिपीवर मात्र ओळ पूर्णतःच अस्थानी आहे.
(कृपया मला काव्य कळले आहे असे समजू नये).
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.