Skip to main content

प्रेमाचे हाय कू (?)


गुलाबी कळ्यांची
कत्तल झाली
प्रेमाच्या दिनी.


कमलिनीच्या प्रेमात
बंदिवान भृंग*
नाहक प्राण गेला.

(

*भृंग = भ्रमर. ......मिटता कमलदल होई बंदी हा भृंग. श्वास कोंडून प्राण गेला)


तिची शॉपिंग
त्याचा बटवा
आता उधार मागणार.

वृन्दा Mon, 02/03/2015 - 01:44

कमलिनीच्या प्रेमात
बंदिवान भृंग*
नाहक प्राण गेला.

वा! सुंदर!!
नैनोंसे जो नैना टकराये तो कौन जीता और कौन हारा?
नैनोंसे जो नैना टकराये तो दिल हारा वोह सब जीता|
.
भुंगा जि़ंकला हो :)
____
तो श्लोक आहे ना की भुंगा बंदीवान झाला तरी कमळ पोखरत नाही. मस्त आहे .

बॅटमॅन Mon, 02/03/2015 - 13:19

In reply to by वृन्दा

रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्
भास्वानुदेष्यति हसिष्यति पङ्कजश्री:|
इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार ||

वेलांटी र्‍हस्व की दीर्घ याबद्दल जऽरा घोळ आहे डोक्यात.

बाकी याचा अर्थ असा की एक भुंगा कमळात गेला अन राच्च्याला न्हेमीपरमाने कमळ बंद झाले. मग उद्या दिवस होईल अन कमळ हसेल अन आपण मुक्त होऊ अशा विचारात असतानाच एका हत्तीने ते कमळ उपटून काढले.

'न'वी बाजू Mon, 02/03/2015 - 05:31

या कविता म्हणून एरवी चांगल्या असू शकतीलही, परंतु या हायकू नाहीत.

धनंजय Mon, 02/03/2015 - 07:54

In reply to by 'न'वी बाजू

कत्तल झाली
गुलाबाच्या कळ्यांची
प्रेमाच्या दिनी.

कमलिनीत
प्रेमी भुंगा अडके
नाहक मरे.

राजेश घासकडवी Mon, 02/03/2015 - 09:18

जास्वंद कळ्या
किती चुरगळल्या
गणेशापायी

दुधाची धार
शंकराच्या पिंडीला
पोरं उपाशी

अजो१२३ Mon, 02/03/2015 - 17:39

In reply to by राजेश घासकडवी

दुधाची धार
शंकराच्या पिंडीला
पोरं उपाशी

ग्रीन कवर ची इतकी मारामार असताना ऑफिसमधे, घरात भारीभारी वुडन फर्निचर, फ्लुअर असणे गरजेचे आहे काय? ते शंकरभक्त किमान अंधश्रद्ध आणि मूर्ख आहेत, कंपन्यांचे, शिक्षितांचे तसे आहे का?

अंतराआनंद Tue, 03/03/2015 - 23:10

In reply to by अजो१२३

मुळीच गरजेचं नाही.
शिक्षितांच्याही वेगळ्या अंधश्रद्धा असतात.आता लिंका शोधत नाही पण मेटल फर्निचर वापरल्याने त्यामधून सौम्य प्रमाणात विद्युत प्रवाह वैगेरे जात असतो आणि शरिरावर त्याचा परिणाम होतो वैगेरे असा काही तरी लेख वाचनात आला होता. अलीकडे वास्तुशास्त्र सांगतं म्हणून सेफ्टी डोअरही धातूचं न करता लाकडी करतात.

अजो१२३ Wed, 04/03/2015 - 11:35

In reply to by अंतराआनंद

असा काही तरी लेख वाचनात आला होता

१. शरीरात अनेक सौम्य विद्युतप्रवाह वाहत असतात. शरीराला त्याचे वावडे नसते.
२. धातूंतून निष्कारण विद्यूत प्रवाह वाहत नाहीत.
आपण ज्या संशोधनाबद्दल बोलत आहात त्याचा सारांश, लिंक अवश्य द्या. कारण या हिशेबाने सगळा धातू संपूर्ण लाकडांनी रिप्लेस करणे म्हणजे प्रूथ्वीचा सर्वनाश आहे.

विवेक पटाईत Tue, 03/03/2015 - 19:53

In reply to by राजेश घासकडवी

बारा एक वर्षाचा होतो, १९७२-७३ मधली घटना, कुणीतरी श्रावणाचा महिन्यात शंकराच्या पिंडीवर दूध घालायला वडिलांना सांगितले होते. अचानक त्यांना ऑफिसच्या कामानिमित एका आठवड्यासाठी बाहेर जावे लागले. खंड पडू नये म्हणून आईने ते काम मला सांगितले. रोज सकाळी हलवायाच्या दुकानातून १० पैश्याचे दूध (जवळ जवळ १०० ग्रम) एका गिलासात घेऊन जवळच्या एका मंदिरात शंकराच्या पिंडीवर दुधाची धार सोडायची, हेच काम. पहिल्याच दिवशी मंदिराच्या बाहेर एक भिकारी दिसला, का कुणास ठाऊक मी ते दूध त्या भिकार्यास दिले. आणि नुसते पाणी शंकराच्या पिंडीवर सोडले. आठवडाभर असेच केले. काही दिवसांनी वडिलांना खरे काय ते कळले (बहुतेक मंदिराच्या पुजारी कडून), पण त्यांनी या बाबतीत मला कधीच जाब विचारला नाही.

वृन्दा Tue, 03/03/2015 - 19:54

In reply to by विवेक पटाईत

पण त्यांनी या बाबतीत मला कधीच जाब विचारला नाही.

__/\__
म्हणून मला आपले सर्व धागे आवडतात.
त्यात भावनांचा ओलावा असतो :)

रेड बुल Tue, 03/03/2015 - 22:19

In reply to by वृन्दा

देवानेच भिकार्‍याला दुध पोचवले अन आपण मात्र फुका दुध दिले, पण वडील रागावले नाहीत वगैरे वगैरे आपल्या मनीच्या कल्पना अन अंधश्रध्दा लेखात प्रकट करतो.

पण मग अंधश्रध्दा बळगल्याबद्दल आपण निषेध करायचे सोडुन त्यांना "__/\__" का केला आहे ?

रेड बुल Tue, 03/03/2015 - 22:36

In reply to by वृन्दा

ही श्रेणी समजावी. निरर्थक प्रतिसाद न्हवे. चर्चा हवी असे तर मुद्दे धरुन करावी ही विनंती. काका तेंव्हा लहान होते व काही चुकीची कृती त्यांच्या कडून घडने हा एक समजुन घेण्याजोगा मुद्दा होता (त्यांच्या पिताश्रींनी तेच केले असावे असे मानायला जागा आहे) पण त्याला आपण हात जोडले बघुन प्रचंड गोंधळ झालाय.