मनातील छोटे मोठे प्रश्न -भाग ४३
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा
====
काल आंबेडकर जयंतीला काही बोर्ड दिसले ज्यावर आंबेडकरांच एक वाक्य लिहिलं होतं "भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा". कोणाकोणाला हे पटतं? की आपल्या मुलभूत गरजांपेक्षा स्वाभिमान महत्वाचा. यात ऑफ्कोर्स सब्जेक्टिविटी आहेच की स्वाभिमान म्हणजे नक्की काय वगैरे. पण हे वाक्य वाचल्यावर ते पटल का? का नाही?
डिपेण्ड्स
१. हे वाक्य दलितांना जागृत करण्यासाठी उच्चारले असावे. त्यात थोडी अतिशयोक्ती आणि र्हेटरिक असेल.
२. भाकरी पेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा हे वाक्य स्टॅण्डअलोन सत्य किंवा असत्य नाही. ते प्रत्येकाच्या परसेप्शन आणि प्रायोरिटीवर अवलंबून असते. काही सिच्युएशनमध्ये स्वाभिमान महत्त्वाचा वाटेल काही सिच्युएशनमध्ये भाकरी.
चूक वाटत असेल तर !!! पण चुक
चूक वाटत असेल तर !!!
पण चुक वाटण्यासाठी आवश्यक तो विदा (ते असं का बोलले, त्याचा संदर्भ काय) माझ्यापाशी नाही हे सुद्धा एक स्पष्ट मत आहे. चुक किंवा बरोबर वाटलेच पाहिजे हा काय हट्टंय?
====
सखाराम गटणे एक वाक्य पुलंना ऐकवतो, नी ते त्यांच्याच नाटकातील आहे असे सांगतो. मात्र मुळ नाटकात ते वाक्य विनोदी पात्र एक विनोद म्हणून म्हणत असते.
वरील वाक्याचा संदर्भ माहित असल्याशिवाय त्यावर सहमती/असहमती देणे अगदीच आततायी व्हावे!
===
कशावरून वरील वाक्य आंबेडकरांसाठी उपहासात्मक नसेल? कशावरून तो कोणालातरी हाणलेला टोला नसेल?
समोरच्याचे म्हणणे समजून घ्यायच्या आधी आंबेडकर असले तरी चुकू शकतात असे फुशारायची एवढी घाई का?
आंबेडकर चुकु शकतो ते मान्य
आंबेडकर चुकु शकतो ते मान्य असणे (जे एक जेनेरिक तत्त्व म्हणून मला कोणाही बाबत मान्य आहे) आणि त्यावरून फुशारणे यात फरक आहे. बघा पटतंय का?
वरील प्रतिसादशृंखला सलग सिक्वेन्समध्ये वाचा. तरीही शब्दयोजना पटली नाही तर माझ्या वाक्याचा हवा तो अर्थ काढायला तुम्ही मुखत्यार आहाताच!
फुशारणे ही शब्दयोजना वैयक्तिक
फुशारणे ही शब्दयोजना वैयक्तिक टीकात्मक वाटली. एरवी वैयक्तिक वैयक्तिक म्हणून शंख करणार्यांनी इकडे असे शब्द वापरावेत यातला अंतर्विरोध दिसत नाही की बघायचा नाही असेच ठरवले आहे (सोयीप्रमाणे आचारविचारांत ऐक्य आणि फारकत)? :)
त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे इथे तसे वाटतही नाहीये. तेव्हा "हवा तो अर्थ काढायला तुम्ही मुखत्यार आहातच" अशी पाचर मारून ठेवल्याचा काही फायदा नाही दिसत. :)
ढिगारा
एखाद्याकडे दहा वीस हजार भाकर्यांचा ढिगारा असेल; आणि आख्ख्या जन्मभरात मिळून त्याला फार्फार तर पाच्-सातशे भाकरी लागणार असतील; तर वरच्या एखाद दोन भाकर्यांसाठी स्वाभिमान कै तो गहाण टाकणार नै.
.
.
एखाद्याकडे भाकरीच नै; किंवा अगदि शेवटची भाकरी शिल्लक आहे; अशावेळी स्वाभिमान आणि भाकरी ह्यातली निवड त्याला कठीण होणे शक्य आहे.
.
.
दारिद्र्यात स्वाभिमान टिकवणे हा अत्यंत वेदनादायक अनुभव असू शकतो.
तुम्ही काहीही निवडालत तरी काहीतरी महत्वाचं गमावून बसल्याचं जाणवत राहतं.
मनुष्य स्वभावानुसार ते जन्मभरही छळू शकतं.
(रामदास ह्या आय डी ने मिपावर आंब्याबद्दल, लहानपणीच्या आठवणीबद्दल किस्सा लिहिलेला आहे;
तो एकदा वाचावा. गोपाळ गणेश आगरकरांनाही ह्या निवडीत लैच हाल झाले; शेवटी मनस्ताप सोसावा लागला तो वेगळाच.
होळकर संस्थान, त्यांनी दिलेला पुरस्कार, नंतर नोंदवलेली पुस्तकांची मागणी, आगरकरांना सुरुवातीस झालेला आनंद आणि शेवटी मनस्ताप...
वाचतानाही त्रास होतो.
)
भाकरीचा चंद्र
नारायण सुर्वेंच्या दो-आरजू-में-कट-गये-दो-इंतजार-में ओळी आठवल्या:
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली
हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
स्वाभिमान
>> "भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा". कोणाकोणाला हे पटतं? की आपल्या मुलभूत गरजांपेक्षा स्वाभिमान महत्वाचा. यात ऑफ्कोर्स सब्जेक्टिविटी आहेच की स्वाभिमान म्हणजे नक्की काय वगैरे. पण हे वाक्य वाचल्यावर ते पटल का? का नाही?
'भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा' हे काही लोकांना पटलं म्हणूनच देशात स्वातंत्र्यसैनिक वगैरे निर्माण झाले. वेळ पडली तर इंग्रजांच्या लाठ्या, तुरुंगवास, फाशी अशा अनेक गोष्टी त्यांनी पचवल्या. भाकरीचाच विचार प्रथम करता तर भगतसिंग शहीद झालाच नसता, नाही का? आणि काळ्या पाण्यावर जायला लागेल असं काही सावरकरांनी केलंच नसतं. वगैरे वगैरे.
+१
भाकरी की स्वाभिमान हे व्यक्तिसापेक्ष असते.
भाकरी महत्त्वाची वाटली म्हणून शिवाजीपूर्वीच्या मराठे लोकांनी मोगलांची आदिलशहाची चाकरी केली. शिवाजीला भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा वाटला म्हणून त्याने स्वराज्याचा संकल्प केला.
शिवाय माझा स्वाभिमान वि इतरांची भाकरी असाही प्रश्न येऊ शकतो.
छान प्रतिसाद!
इंग्रजांच राज्य हा स्वाभिमानावर घाला होता का भाकरीवर? लोक उपाशी मरत होते म्हणून लोकांना स्वातंत्र्याची गरज भासली अस म्हणता येइल का? किंवा स्वातंत्र्य (किंवा राज्यकर्ते निवड्ण्याचं स्वातंत्र्य) ही मूलभूत गरज आहे असही असू शकतं. मला नक्की मांडता येत नाहिये काय म्हणायचय ते.
>>लोक उपाशी मरत होते म्हणून
>>लोक उपाशी मरत होते म्हणून लोकांना स्वातंत्र्याची गरज भासली अस म्हणता येइल का?
नसावे. दादाभाई नौरोजी हे इंग्रज आर्थिक शोषण करतात असे म्हणणारे पहिले.
त्या आधी बहुधा इंग्रजांचे राज्य हे आधीच्यां राज्यांपेक्षा बरे आहे असे लोकांना वाटत असावे. १८५७ मध्ये लोकांचा सहभाग झाला नाही कारण इंग्रजांच्या राज्यात (आधीच्या तुलनेत) उपासमार होत नसावी.
पुरोगामी झाल्यापासून (असं
पुरोगामी झाल्यापासून (असं देखिल होतं मंडळी) माझा ऐसीकरांचं बौद्धिक ओरियंटेशन काय आहे याबद्दलचा संभ्रम शतगुणित होऊ लागला आहे. अरे, भाकरीपुढे स्वाभिमान काहीच नाही हे इतके पक्के ठावे तर सरकारने इतके पैसे प्रोटोकॉल्सवर का खर्चावे? चंद्रयान, मंगळयान सोडून 'हो, आम्हाला देखिल मेंदू आहे, गरीब असलो म्हणून काय झालं?' असं का सांगावं? त्या विषयात हीच्च पलटन प्रो-मंगलयान, अँटी-शेतकरी भूमिका घेते. आता अचानक भाकरी? का ते असं आहे -
आपला स्वाभिमान इतरांच्या भाकरीपेक्षा मोठा आहे.
Can ‘They’ Be Accepted as a
Can ‘They’ Be Accepted as a Singular Pronoun?
मला यातलं काही समजंत नाही. पण तुम्हा लोकांना इंट्रेष्टिंग वाटेल असे मला वाटले म्हणून डकवतोय.
Copy editors might seem like stick-in-the-mud traditionalists when it comes to language change, but when I attended the American Copy Editors Society’s annual conference in Pittsburgh a couple of weeks ago, I found growing acceptance of a usage that has long been disparaged as downright ungrammatical: treating “they” as a singular pronoun.
According to standard grammar, “they” and its related forms can only agree with plural antecedents. But English sorely lacks a gender-neutral singular third-person pronoun, and “they” has for centuries been pressed into service for that purpose, much to the grammarians’ chagrin. Now, it seems, those who have held the line against singular “they” may be easing their stance.
“They” most often turns singular in common usage when its antecedent is considered generic, not referring to a single known person. Nearly everyone would find that they can stomach the “they” in this very sentence, agreeing with “nearly everyone.”
---------------
The original market for water was the market for land—land with water was worth more. - हे वाक्य रोचक वाटले.
viral
viral गोष्टी आपल्याला वाटतं तशा खरोखरच १००% उत्स्फूर्त/spotaneous प्रतिक्रिया म्हणून पसरत जातात की सुरुवातीस कुणी योजनाबद्ध पद्धतीनं अल्लाद रचलेली ती कहाणी असते ? हे असं सतत काहीतरी नवनवं, हवंहवंसं वाटल्याशिवाय पुन्हापुन्हा इंटरनेट्,सोशल मिडियाकडे कोण कशाला वळेल ?
फार्म व्हिले काय, ऑर्कुट काय,फेसबुक टाइमलाइन , फेसबुक मूव्ही, फेसबुकचं ताजं धिस डे -दॅट इयर इन युवर लाइफ काय, नि अगदि क्यांडी क्रश सागा काय, सुरुवातीस पब्लिकला कित्तीही खिळवून ठेवणार्या ह्या बाबी वाटल्या तरी पाच पन्नास तास अथवा एखादा विशिष्ट थ्रिशोल्ड (तेजायला...थ्रिशोल्ड ला मराठीत काय म्हणतात ? ) ओलांडल्यावर त्याचा असर/प्रभाव/चुंबकीयशक्ती तितकी रहात नसावी. म्हणून मग एक गेलं की दुसरं, दुसरं गेलं की तिसरं असं काहीतरी नवं नवं ,चित्तवेध, क्रेझ असणारं लाँच करत राहणं भाग आहे.
म्हणजे प्रॉडक्ट/खेळणं/सर्विस नवीन वाटली पाहिजे, पण त्याच्या उपभोगासाठी आधीचच साधन (फेसबुक/गुगल/वॉट्स अॅप/ इंटरनेट जोडणी) वापरली जात राहिली पाहिजे.
.
.
ऐसीकर सिद्धार्थ राजहंस ह्याच्याशी परवा गप्पा झाल्या. त्यातही "कोलावरी डी " ही जाणीवपूर्वक पसरवलेली क्रेझ तर नव्हे; असं वाटलं.
.
.
उद्योगधंदा नि इतर छंद सांभाळून ही इतकी व्यवधानं हाताणार्या कीम्वा त्यांना वेळ देउ शकणार्या सर्वांचच मला कौतुक आहे.
तुम्ही लोक महान आहात.
ते मत मागे घ्यावे असे
ते मत मागे घ्यावे असे म्हणणारांना देखिल याची कल्पना आहे. पण अशा विशिष्ट प्रकारे या सत्याचा निर्देश केल्यामुळे नबा बॅक्टेरिया आहेत असे वाटून दु:ख होऊ लागते. म्हणून लोकांची काकलूत* चालू आहे.
------------------------------------------
(म्हणजे कावळा रेस्टरूममधे नव्हे.)
आय आर सी टी सी = एक वैताग
१. दिल्ली ते पुणे वा दिल्ली ते मुंबई तिकिट उपलब्ध असे कधीच आढळत नाही.
२. आढळले तर ते नको त्या दिवशी असते.
३. महिनाभर वेटींग लिस्ट किमान ४० च्या वर असते.
४. साईटवर इतके शॉर्टफॉर्म आहेत कि खास एजंटांसाठी आहे.
५. या सरकारी सायटीवर चिक्कार जाहीराती आहे.
६. १५ मिनिटे वापरली तर साईट किमान एकदा गंडते.
७. मागे व पुढे जायची ब्रावझरची बटने डिसेब्ल्ड आहेत.
८. डबल क्लिक डिसेबल्ड आहे.
९. रेफ्रेश डिसेबल्ड आहे.
१०.कॅपचा चक्क दोनदा मागतात.
११. आत्ताच तुम्हाला जेव्हा आमच्या सायटीतून हद्दपार केले होते तेव्हा तुम्ही डबलक्लिक केले होते म्हणून आता तुम्ही लॉगिन करू शकत नाहीयेत असा महान मेसेज देखिल कधीकधी पाहायला मिळतो.
१२. साईट पेंगू लागली कि मग झोपीच जाते.
१३. यांचा कॅपचा मनुष्याला समजेलच असे नाही.
१४. सदस्य म्हणून पंजीकरण करताना कोणत्या कारणाने हे मूर्ख तुम्हाला एजंट ठरवतील आणी तुमचा मोबाईल नंबर वापारताच येणार नाअही असे करतील याचा भरोसा नाही.
१५. निश्चित आठवत नाही, पण इ-टिकिट रद्द झाले आणि पैसे आयार्टीसीटी वरच्या माझ्या खात्यात आले. तितक्यात ते खाते रद्द झाले. म्हणून पैसे बुडाले.
-------------------------------------------------------
आहे कि नै भारत आय टी सुपरपॉवर?
दिल्ली-मुंबईचे काही वेगळे
दिल्ली-मुंबईचे काही वेगळे असेल तर माहिती नाही पण मला आजवर रेल्वे बुकिंग करताना कधीच ताप झालेला नाही. अतिशय उत्तम सेवा आहे. (मी महिन्याला किमान ३-४ वेगवेगळी तिकीटे काढतो. घरातल्यांची, जवळच्या नातेवाईकांची, शेजार्यांची वगैरे)
त्यांचे मोबाईल अॅप आल्यापासून हल्ली साईटवर जाणे बहुतेक बंदच झाले आहे. अॅपवरून अतिशय चांगल्या वेगात व सुरक्षितपणे ट्राझॅक्शन होऊन तिकीट मिळाले आहे.
त्यामुळे हल्ली मला लिफ्टमध्येच गाठून देतोस का पटकन मोबाईलवरून तिकीट काढून असे सोसायटीतल्या आज्या/काकवा/काके/आजोबा विचारू लागले आहेत. ;) (अर्थात त्यांच्या तिकीटांचे पैसे (१० रु सरचार्जसकट) मला ते लगेच कॅशमधे देतात)
सगळी डिटेल्स तयार असतील मोजून १० मिनिटांच्यावर कधीही वेळ लागत नाही.
==
माझे ३जी कनेक्शन आहे व घरी वायफाय ४जी. त्यामुळे फरक पडत असल्यास माहिती नाही.
ही सेवा २ वर्षांपलिकडे जरा दुबळी/"नाजूक" ;) होती ते मान्य.
कुठल्याही राजकीय नेत्याचे
कुठल्याही राजकीय नेत्याचे भाषण जर पाच दहा मिनिटांपेक्षा जास्त काल ऐकलेत तर तुम्हास असे वाटते का की टीका जरा जास्त प्रमाणावर होते आहे ? टीका ही मागणीपेक्षा जास्त पुरवली जाते का ?? आफ्टर ऑल ज्याच्यावर टीका होत असते तो काही टीकेची मागणी करीत नसतो. तो असे म्हणत नसतो की "माझ्यावर खूप टीका करा". मग टीका इतक्या प्रमाणावर का होते ? अर्थात खूप टीका व्हावी अशी मागणी जनता करते असे जर म्हणायचे असेल तर तसे कशावरून म्हणता येईल ?
>>अर्थात खूप टीका व्हावी अशी
>>अर्थात खूप टीका व्हावी अशी मागणी जनता करते असे जर म्हणायचे असेल तर तसे कशावरून म्हणता येईल ?
१. आपली जी वाईट परिस्थिती आहे त्यासाठी आपण सोडून इतर कोणीतरी जबाबदार आहेत असे ऐकायला जनतेला आवडते. म्हणून कोणावर टीका झाली तर जनतेला (श्रोत्यांना) बरे वाटते.
२. सत्तेवर असणार्याचे आपण काही वाकडे करू शकत नाही. त्यामुळे कोणी त्याचे वाभाडे काढले तर ते जनतेला आवडते. जनतेची तशी मागणी असते म्हणायला वाव आहे कारण टीकात्म लिखाण करणार्या वर्तमानपत्रांचा खप सरकारची भलामण करणार्या वर्तमानपत्रापेक्षा जास्त असतो. आज वर्तमानपत्रांच्या खपाचे गणित मला ठाऊक नाही. पण पूर्वीच्या काळी मुंबईत नवशक्ती हे वर्तमानपत्र आणि पुण्यात केसरी हे वर्तमानपत्र सहसा सरकारच्या बाजूचे आणि लोकसत्ता व सकाळ हे सरकारच्या विरोधी लिखाण करीत. नवशक्ती आणि केसरीचा खप लोकसत्ता आणि सकाळच्या खपाच्या मानाने कितीतरी कमी होता. शिवाय नवशक्ती आणि केसरीला जनताभिमुख* जाहिराती कमी मिळत असत आणि सकाळ लोकसत्ताला जास्त मिळत असत.
३. रेल्वेरूळ ओलांडताना मरणारे सर्वस्वी स्वत: जबाबदार आहेत रेल्वे मुळीच जबाबदार नाही असे वर्तमानपत्रात कधीही लिहिले जाऊ शकत नाही. रेल्वेने तसे म्हटल्यास "रेल्वेचे डोके ठिकाणावर आहे का?" असेच वर्तमानपत्राला लिहावे लागते.
*जनताभिमुख म्हणजे उत्पादनांच्या जाहिराती तसेच नाटक सिनेमाच्या जाहिराती. बाकी टेंडर नोटीसा वगैरे केसरी आणि नवशक्तीत सुद्धा येत असत.
मागनी तसा पुरवठा प्रत्येक
मागनी तसा पुरवठा प्रत्येक वेळी होतो का अशी शंका साक्षात गब्बरला यावी!!! (आज सूर्य... वगैरे वगैरे ;) )
--
जोक्स अपार्ट, मागणी कोणाची हा प्रश्न गरजेचा आहे. नेत्यांचे ग्राहक फक्त जनता/मतदार नाहीत. कार्यकर्ते, मिडीया हेसुद्धा ग्राहक आहेत. शिवाय "जहरी टिका", "शेलकी भाषा" यांचे (अवास्तव?) कौतूक, चांगला वक्ता म्हणजे चांगला प्रशासक अशी (गैर?)समजूत वगैरेमुळे भाषणबाजी केवळ मागणीवर न रहाता तो एक अॅसेट होतो. मग आपल्याकडे किती अॅसेट आहे हे चांगल्या अप्रेझलसाठी दाखवणे आलेच! :P
>>There is a demand for
>>There is a demand for something but no supply - is one of the cases of market failure.
(जीवनावश्यक गोष्टी- अन्न, पाणी धरून) मागणी ही पोकळीत अस्तित्वात नसते. ती वस्तूच्या प्राइसशी निगडित असते. कोलम तांदूळ ५० रु किलो असतील तर त्या तांदुळाला विशिष्ट मागणी असेल. तेच ७० रु किलो झाले तर मागणी कमी होईल (त्या ऐवजी ५० रु किलो उपलब्ध असलेले दुसरे तांदूळ जास्त खपतील).
(जीवनावश्यक गोष्टी- अन्न,
(जीवनावश्यक गोष्टी- अन्न, पाणी धरून) मागणी ही पोकळीत अस्तित्वात नसते. ती वस्तूच्या प्राइसशी निगडित असते. कोलम तांदूळ ५० रु किलो असतील तर त्या तांदुळाला विशिष्ट मागणी असेल. तेच ७० रु किलो झाले तर मागणी कमी होईल (त्या ऐवजी ५० रु किलो उपलब्ध असलेले दुसरे तांदूळ जास्त खपतील).
सिक्वेन्स समस्याजनक असू शकतो. प्राईस प्रथम की मागणी प्रथम की पुरवठा प्रथम ??
प्राईस ही मागणी व पुरवठा यांच्या "सो कॉल्ड" एक्विलिब्रियम चे टेंपररी द्योतक आहे असे चाचरत चाचरत म्हणता येईल. The most definitive statement that can be made about price is that - it is an information signal that wraps incentives (or disincentives).
कोंबडी आधी की अंडे.......
मागणी आधी
अॅबसोल्यूट मागणी तांदूळ या पदार्थाला आहे. (मोअर बेसिकली ज्यातून कॅलरीज मिळतील अशा अन्नाला आहे).
पटणी-कोलम-आंबेमोहोर-बासमती तांदुळाला असलेली मागणी प्राइस डिपेंडंट आहे.
उदाहरण द्यायचं तर मागणी तुपाला नाही. तळणासाठीच्या माध्यमाला आहे. (तुपाची किंमत परवडत नाही म्हणून लोकांनी डालडा स्वीकारले).
ओके. मान्य. Say's law वर मागे
ओके. मान्य.
Say's law वर मागे माझी मित्रांशी प्रचंड चर्चा झालेली आहे. पण मला ती खूप "करो फरियाद सर टकराओ अपनी जान दे डालो" टाईप ची वाटली. म्हंजे माझी काही ठोस पोझिशन नव्हती पण माझ्या मित्रांची द्वंद्वात्मक होती. ते दोघे मारे तावातावाने चर्चा कराय्चे. मला प्रत्येक वेळी फक्त जोरदार दारू चढायची. मर्ज की क्या दवा है ये कोई बीमार क्या जाने....
>>हे सगळ्या वस्तूंबाबत म्हणत
>>हे सगळ्या वस्तूंबाबत म्हणत येइल का? फेसबूकची(*) मागणी आधी होती का सप्लाय.
काही मागण्या नव्याने निर्माण होऊ शकतात. काही मागण्या तंत्रज्ञानामुळे वेगळ्या प्रकारे पुरवल्या जाऊ शकतात. व्हॉट्सअॅप*च्या बाबतीत आपल्या मित्रांशी सहज गप्पा मारता येणे ही मागणी पूर्वीपासून असेलच. तंत्रज्ञानाने हे शक्य झालेच पण जगातल्या कुठल्याही मित्राशी सहज गप्पा मारणे हे अधिकचे साध्य झाले.
*व्हॉट्सअॅप हे एक माध्यम आहे.
Demand in some form or the
Demand in some form or the other does exist.
Demand for a particular item may be derived from some other demand.
उदा. राजाचा आदेश नोंदवणे ही एक गरज. त्यासाठी एक मार्ग शिलालेख कोरणे. पण शिलालेख स्थिर असतो म्हणून पोर्टेबल आदेशासाठी भूर्जपत्र/कागद/शाई/दौत/बोरू/कॉपी/कार्बनपेपर/झेरॉक्स वगैरे.
बॉलपॉइंट पेनाची डिमांड ही वरच्या डिमांडमधून डिराइव्ह/एव्हॉल्व्ह झाली आहे.
बॉलपेनाची डिमांड ही तंत्रज्ञानाचा परिणाम आहे. लिहिण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले नसते तर बॉलपेन/शाई/बोरू ऐवजी हातोडी छिन्नीची मागणी राहिली असती.
हे विश्व बनवलेले असणे किंवा
हे विश्व बनवलेले असणे किंवा आपसूकच बनलेले असणे याची जाणीव गब्बरला होण्याने काय फरक पडेल नक्की?
आपसूकच बनलेले असणे हे "spontaneous order" या संकल्पनेस धरून आहे. म्हंजे Central planning does not work and hence should not be tried - हा धडा आचरणात आणल्याप्रमाणेच आहे.
टिका
कुठल्याही राजकीय नेत्याचे भाषण जर पाच दहा मिनिटांपेक्षा जास्त काल ऐकलेत तर तुम्हास असे वाटते का की टीका जरा जास्त प्रमाणावर होते आहे ?
एका राजकीय विचारांचा नेता दुसर्या राजकीय विचाराच्या नेत्यावर त्यामानाने कमी टिका करतो. उदा. मोदी सरकारने लँडबिलात दुरुस्ती आणल्या आहेत त्या काय काय आहेत, त्याचे शेतकर्यांवर, भूधारकांवर काय काय दूरगामी परिणाम आहेत, ते टाळून आणि विकासाभिमुख धोरणे ठेऊन चालण्यासाठी नक्की सरकारने काय करावे, मूळ स्वरुपातील कायदा कुठेही आडंगा घालताना कसा दिसला नाही याची उदाहरणे, इ इ कोणीही बोलताना दिसत नाही.
जास्त टिका म्हणजे काय? - सत्य, सुयोग्य आणि तार्किक बोलून सरकारला निरुत्तर करणे. लोकांना सरकारची चूक दाखवून देणे. "हे सरकार शेतकरी विरोधी आहे, उद्योजक धजिर्णे आहे" हे एकच वाक्य शंभर लोकांनी प्रत्येकी शंभरदा म्हणणे नव्हे.
जास्त टिका म्हणजे काय? -
जास्त टिका म्हणजे काय? - सत्य, सुयोग्य आणि तार्किक बोलून सरकारला निरुत्तर करणे. लोकांना सरकारची चूक दाखवून देणे. "हे सरकार शेतकरी विरोधी आहे, उद्योजक धजिर्णे आहे" हे एकच वाक्य शंभर लोकांनी प्रत्येकी शंभरदा म्हणणे नव्हे.
अतिमार्मिक. असले काही सुचायला खास उदगिरी जेवण जेवावे लागेल बहुधा.
चालू असलेल्या कार्यक्रमात
चालू असलेल्या कार्यक्रमात सर्वात कमी व्यत्यय आणून, जाहिराती न देता, इ इ प्रोग्राम दाखवणारे चॅनेल्स कोणते?
न्यूज चॅनेल्समधे अल जजिरा सर्वात कमी जाहिराती दाखवतो. चित्रपटांत एच बी ओ हिट्स बिना जाहिरातीचा चित्रपट पूर्ण करतो. दूरदर्शन, लोकसभा, राज्यसभा हे चॅनेल देखिल खूप छोट्या आणि कमी अॅड्स दाखवतात. एन डी टी वी आणि न्यूजएक्स हे सुद्धा कमी जाहीराती दाखवतात.
कोणत्या विशिष्ट दिवशी, किंवा कार्यक्रमात, किंवा अजून कसे कमी बोर करून कार्यक्रम दाखवण्याबाबत आपली काही निरीक्षणे आहेत काय?
कालच
कालच अभिराम भडकमकर यांची 'अॅट एनी कॉस्ट' ही छोट्या पडद्याशी संबंधित कादंबरी वाचून संपविली. त्यात एका ठि़काणी टीव्हीवरील मालिकांचा निर्माता म्हणतो की खरे म्हणजे जाहिराती ह्याच मुख्य कार्यक्रम आहे पण त्या सलग दाखविल्या तर कुणी बघणार नाही म्हणून आम्ही मधेमधे मालिका दाखवितो.
फेसबुक, लिंक्डइन, ट्विट्टर,
फेसबुक, लिंक्डइन, ट्विट्टर, युट्युब मधे तर याहीपुढची स्टेज आहे. युजर्स हे सप्लायर्स आहेत. दे सप्लाय आयबॉल्स, अटेन्शन, व मोफत डेटा. तुम्ही कधी लॉगिन करता, काय बोलता, कशावर कॉमेंट्स मारता काय कॉमेंट असतो, त्याचा अर्थ काय, ट्रेंड्स काय आहेत वगैरे. या डेटावर बिगडेटा ची अल्गो रन करून त्यातील इन्साईट्स विकल्या जातात. म्हंजे व्यक्तीगत डेटा विकला जात नाही. पण अॅग्रीगेट डेटा विकला जातो. High intensity Capitalism.
बेडरुममधील सोफा
अनेक अमेरिकन मालिकांमध्ये बेडरुम दाखवतात तेव्हा बेडच्या टोकाशी एक छोटा सोफा दाखवतात. बेडरुममध्ये सोफा कशासाठी असावा हा प्रश्न अनेकदा मनात येतो. हाऊस ऑफ कार्ड्समध्ये असा सोफा दिसला आहे. जुन्या मालिकांमध्ये (उदा. एवरीबडी लव्ज रेमंड) असा सोफा कधी दिसला नाही.
हा सोफा कशासाठी एनी आयडिया?
![]() |
|
![]() |
त्याच खोलीचा टिव्ही वगैरे
त्याच खोलीचा टिव्ही वगैरे बघताना, गप्पा हाकताना लिविंग रूमसारखा वापर करयचा असल्यास सोफा. "हल्ली टिव्ही बेडरूममध्ये गेल्यापासूनचा हा तरास हाये"
----
किंवा
दोघांना एकच गादी इतकी जागा पुरण्यासारखं काही करायचं असेल तर सोफा, नुसतं शेजारी झोपायचं असेल तर बेड :P ;)
ऋने उल्लेखिलेल्या क्रिया करुन
ऋने उल्लेखिलेल्या क्रिया करुन झाल्यानंतर काही महिन्यांनी यथावकाश इ इ त्या सोफ्याचे अन्य उपयोग कंटिन्युइटीमधे होऊ शकतील.
लहान अन वेळेवर झोपणारी पोरे असल्यास त्यांची प्रसंगोपात्त तात्पुरती सोफ्यावर रवानगी, असंही असेल.
मधोमध झोपणारं लहान मूल असल्यास दोन्ही बाजूंना खाली पडण्यापासून आई आणि बाप यांची तटबंदी असते, पण लहान पोरं ओम्नीडायरेक्शनल चळवळी असल्याने झोपेत खालच्या दिशेतही सरकत सरकत जाऊन जमिनीवर आपटतात, तेव्हा अडसर म्हणून हा सोफा कामाला येऊ शकेल.
अर्र.. होय की. पण मुळात
अर्र.. होय की. पण मुळात भारतात बालसंगोपनाची बरीच शास्त्रशुद्ध पुस्तके अमेरिकनच मिळतात.
आमेरिकन पुस्तकांत को-स्लीपिंग चाईल्ड या शब्दाने वर्णन केलेली बालके उल्लेखिलेली दिसतात. ती इन्फन्टावस्थेत असताना आईबापांसोबत झोपत असावीत. अर्थात आईबाप दोघेही एकत्र असतील का यावर शंका घेतलीत तर तो वेगळा मुद्दा झाला.
अहो
ते वेगळं, ते तर रेमंडमधे पण आहे त्याला सेटी किंवा अपहोल्स्टर्ड बेन्च म्हणतात.
हा सोफा आहे, जरा उच्चभ्रु स्टुडिओ अपार्टमेंटमधे वापरला जातो असे थोडे फार गुगलपांडित्य म्हणते.
किंचित दुरुस्ती -मी तिसरा भाग बघितला नसल्याने प्रेसिडेन्ट्चे बेडरुम बघण्याचे भाग्य नशीबी आले नाही, आपले म्हणणे रास्त आहे, व्हाइट हौसात तसा सोफा दाखविला आहे.
ह
हीटवर आलेली कुत्री
समजा हीटवर आलेल्या कुत्रीला हीटवर आलेल्या माणसाकडून पुत्रप्राप्ती झाली.
किंवा एखाद्या स्त्रीला हीटवर आलेल्या कुत्र्याकडून पुत्रप्राप्ती झाली तर त्या संबंधातून आलेले कार्टे इतरांना आपल्यासारखेच
समजून 'हीटवर आलेली कुत्री' वगैरे विशेषणे वापरणे शक्य आहे.
शिवाय तेच कार्टे स्वतःच्या पालकांना उपयुक्त पशू म्हणणेही शक्य आहे.( त्याचेच पालक पशू! सत्य आहे.)
.
.
अशा कुत्र्याच्या पुत्राने (किम्वा कुत्र्याच्या अर्धपुत्राने) indianपणाला घाउक , सरसकट काही म्हटले; तरी वाईट वाटून घेउ नये;
असा प्रयत्न करतो आहे.
शाम्पलस्पेस
मला आजवर जितकं कोण भेटलं आहे त्यातल्या कुणाचे पालक पशु/जनावर नाहित.
माझ्या परिचितांच्या माहितीतही इतर कोणाचे पालक पशु नाहित; मानवच आहेत.
मानवाचा पालक पशु असणे ही केस सामान्य जगात अतिदुर्मिळ आहे.
निदान ऐसीवर तरी तो उल्लेख/दावा न वी बाजूच करत आहेत.
आता परिस्थिती काय आहे :-
उर्वरितांना आपापले पालक पशु नाहित हे ठाउक आहे.
इतरांच्या परिचयातीलही कुणाचे पालक पशु नाहित.
तरी न वी बाजू पालकांच्या पशु असण्याचे दावे करीत आहेत.
म्हणजे किमान त्यांचे पालक तरी नक्कीच पशु असले पाहिजेत.
(मला वाटतं मी ते ऐसीवरच कुठेतरी एका प्रतिसादात लिहिलेलंही आहे.)
.
.
शिवाय त्यांच्या लिखाणातून असे पशुत्वाचे उल्लेख दिसतात (कुत्री हीटवर येणे वगैरे)
स्वतः पशुपेशीजन्मित असल्यावर असे होणेही शक्य असावे.
.
.
बाकी उपयुक्त पशुंचे मांससेवन करावे काय, ह्याबद्दल हे दावे करणार्याचे मत जाणून घ्यायला आवडेल.
बादवे, हा इसम गळ्यात पट्टा घालून स्वतःच्या घरातल्या पशुंना साखळदंडाने बांधून ठेवत असावा काय ?
बाकी काही असो, हिंदू
बाकी काही असो, हिंदू थेरडेशाहीबद्दल आम्ही त्यांचेशी सहमत आहो- किमान थेरडे होईस्तवर तरी नक्कीच राहू. स्वतः थेरडे झाल्यावर पाहू काय करायचे ते.
तदुपरि इंडियन या प्रकाराला झोडपले तर काही जीव जात नाही. स्त्री नसणारे आणि पुरुषजातीला झोडपणारे सगळे नपुंसक असतात का?
पालक हे उपयुक्त पशू आहेत या विधानाबद्दल बोलायचे तर- त्यांचे लेखी असतील. सो व्हॉट? आम्ही सूडोलिबरल नसल्याने त्या वाक्याशी आम्हांला प्रॉब्लेम नाही. तुम्ही मात्र खरे लिबरल आहात का? ;)
स्वतः थेरडे झाल्यावर पाहू काय
स्वतः थेरडे झाल्यावर पाहू काय करायचे ते.
तेवढ्या लांब जायचीही गरज नाही त्याआधीच्या पायरीवर ( नुकत्याच शिंग फुटलेल्या आपल्या पोरांनी आपली अक्कल काढली की) सहमती डळमळायला लागेल ( हे अणुभवाचे बोल आहेत.)
हो, पण थोडीफार सहमत आहे मी ही.
हो बाकी
त्यांचे लेखी असतील
हे खरं. शेवटी ज्याचा-त्याचा प्रश्न. नाही का?
तेवढ्या लांब जायचीही गरज नाही
तेवढ्या लांब जायचीही गरज नाही त्याआधीच्या पायरीवर ( नुकत्याच शिंग फुटलेल्या आपल्या पोरांनी आपली अक्कल काढली की) सहमती डळमळायला लागेल ( हे अणुभवाचे बोल आहेत.)
हां म्हणजे, बोळकेवाले थेरडे अशा स्ट्रिक्ट अर्थी म्हणत नैये. आपल्या विरोधी पार्टीला बळ येतेय असे जेव्हा जाणवेल त्याक्षणी इफेक्टिव्हली थेरडीकरण सुरू झाले असे समजावयास अडचण नाही. ;)
नोप्स
आता तसं करणं म्हणजे त्यांना फुल्टॉस दिल्यासारखं होइल.
पाल्य हे निरुपयोगी पशु आहेत' असं कुणी म्हटलं की लागलिच ते
"आमचे पाल्य पशु नाही. नियुपयोगी असणे वगैरे तर लांबची गोष्ट आहे.
सहीमध्ये ज्यानं ते वाक्य घातलय त्याचे पाल्य मात्र नक्कीच निरुपयोगी पशु असले पाहिजे."
असं म्हणत आमचाच तर्क आमच्यावरच उलटवू शकतात.
ती सही आता घेता येणे नाही.
एकदा काय ते ठरवा. बांडगूळ का
एकदा काय ते ठरवा. बांडगूळ का पशू? :)
बाकी जर मुलं बांडगुळं आहेत तर ती इतकी का आवडतात हा लेख वाचलाय का?
(टिंकूलाही बांड्गूळ हा शब्द
(टिंकूलाही बांड्गूळ हा शब्द परावलंबी या अर्थानं वापरायचा होता असं मला तरी वाटलं.) >> http://www.aisiakshare.com/node/2800#comment-56165 आडकित्तांचे म्हणणे अगदी परफेक्ट वाटल्याने वापरला. परोपजीवी आणि परावलंबी.
----------
बाकी "आज म्हातार्या गाईंना कत्तलखान्यात नेण्याचे समर्थन करताय उद्या आईवडील म्हातारे झाले म्हणून त्यांचही तेच कराल" अशा अर्थाच्या प्रतिसादाला प्रत्युत्तरम्हणून खवचटपणे स्वाक्षरीत लिहीलेल्या वाक्यामुळे ज्यांच्या भावना एवढ्या दुखावल्या जातात ते मोठे कधी होणार...
लोल
बाकी "आज म्हातार्या गाईंना कत्तलखान्यात नेण्याचे समर्थन करताय उद्या आईवडील म्हातारे झाले म्हणून त्यांचही तेच कराल" अशा अर्थाच्या प्रतिसादाला प्रत्युत्तरम्हणून खवचटपणे स्वाक्षरीत लिहीलेल्या वाक्यामुळे ज्यांच्या भावना एवढ्या दुखावल्या.....
हे माझ्याबद्दल म्हणत असाल तर ...
अहो एक्काच स्वाक्षरीनं असं दुखावून घेउन वगैरे कसं चालेल ? स्वाक्षरीच्या एका वाक्यात इतका दुखावलो वगैरे गेलो असतो तर त्या मूळ बांडगुळाच्या चर्चेत हिरिरीने वगैरे भाग घेतला नसता का ? त्या दोन-तीन शे प्रातिसादांपैकी फार तर एखाद दुसराच माझा प्रतिसाद आहे. "पशु/जनावर" म्हटलं जाणं इतकच दुखावण्याचं कारण असतं; तर तस्साच जोर्रात वाद घातला असता की "बांडगूळ" ह्याही शब्दावरून.
तसं काही झालं नाहिये. म्हणजेच कारण वेगळं आहे.
.
.
इथल्या काही टारगटांचा एकूण वावर हा मला अत्यंत त्रासदायक वाटतो.
त्यांच्या कैक प्रतिक्रिया हिणकस, मानवताहीन, भावनाशून्य,
आनंदावर विरजण घालणार्या अथवा एखादा दु:खी/चिंतित असेल तर
त्याची जबरदस्त टवाळी करत जखमेवर मीठ चोळणार्या अशा वाटतात.
हे सातत्याने अनेकवार पाहतो आहे ऐसीच्या स्थापनेपासून.
काही जणांना चांगल्या धाग्यांवर टारगटपणा करताना 'असं करु नका प्लीझ'
वगैरे विनंत्या केल्यावर त्या विनंतीचीही त्यांनी खिल्ली उडवली.
.
.
हे का होत असावं ? असा मी विचार केला.
त्यांना तितक्याच जोरकस तिरपागडा ठोसा बसला नाही म्हणून हे होत असावं असं वाटलं.
ते इतरांचं जे भजं करतात; ते तसच तितक्याच किंवा अधिकच ताकदीनं सव्याज त्यांचंही भजं केलं जावं;
असा माझा प्रयत्न आहे. ह्याचा उपयोग होइल का, ती मंडळी अस्थानी टारगटपणा कमी करतील का,
ठाउक नाही. प्रयत्न करुन पहावा इतकाच उद्देश आहे.
त्यांनाही बोचकारल्यामुळे होणारा त्रागा,चिडचिड ह्याचा अनुभव यावा, हा उद्देश.
.
.
शपथपूर्वक सांगतो -- माझा मू़ळ स्वभाव कुणाला बोचकारणं/ओरखाडणं असा नाही.
आताही असलं काही लिहून मला विशेष आनंद होतो आहे; असं नाही.
प्रतिबंधात्मक पाऊल म्हणून मी तसं करत आहे.
.
.
'हीटवर असलेली कुत्री' हा एक प्रतिसाद नमुन्यादाखल स्वाक्षरीमध्ये दिला आहे.
इतरत्रही काही टारगट लोकांचे चिक्कार प्रतिसाद सापडतील.
सर्वच आता शोधत बसणं शक्य नाही इतकच.
.
.
माझ्या टारगट-हिणकस लोकांच्या यादीत टिंकू हे नाव नाही.
पूरक
ह्यास पूरक असे माझे प्रतिसाद "गर्भपात, भृणहत्या(?), बालक दयामरण" ह्या धाग्यावर आहेत. हे त्याचे दुवे.
http://www.aisiakshare.com/node/3930#comment-98196
.
.
http://www.aisiakshare.com/node/3930#comment-98206
.
.
माझ्या आनंद/दु:खने या चर्चेत
माझ्या आनंद/दु:खने या चर्चेत काय फरक पडणारे? असे प्रश्न खरडीत विचारावेत अशी विनंती
चर्चेत फरक पडतो ना. तुमचा बातमी देण्यामागे हेतू काय आहे तो कळतो. मग तुमचा (म्हणजे लिहीणार्याचा ) बायस कुठे आहे त्याप्रमाणे चर्चेला वळण लागते ना. आणि तुमचा बायस कुठल्या बाजुला आहे हे कळले की बाकीच्यांना पण कुठल्या बाजुला झुकायचे ते कळते ( मूड प्रमाणे )
तशीही तुम्ही पीटीआय छाप बातमी दिली नव्हती. त्यावर तुमची कॉमेंट पण होती , म्हणुन विचारले.
ऑ!
अज्ञानच
ओह म्हणजे असे आहे की काय?
अगदी मूडप्रमाणे का असेना, इथले सदस्यांना आपले मत ठरवण्यासाठी, मी काय प्रतिसाद देतोय हे माहित असणे इतके महत्त्वाचे असते, याची मला कल्पना नव्हती!
कस्लं भारी!
मग मी काही विषयांवर प्रतिक्रीया दिली नाही, तर "आता काय बॉ प्रतिक्रीया द्यावी?" असा असमंजस ऐसीकरांत पसरेल की काय? =)) ;)
@ऋ - बॅट्या म्हणाला तसे तू
@ऋ - बॅट्या म्हणाला तसे तू "मूड प्रमाणे" हे नीट बघितले नाहीस. तुला उचकावयाचा मूड असला तर उलटा बायस. तुझ्या संतुलित पणा बद्दल बोलायचे असेल तर वेगळे. तुझ्या समाजवादी मता बद्दल असेल तर वेगळे, तुझ्या मोदी विरोधा बद्दल असेल तर वेगळे.
( बादवे - सर्वच संपादक मंडळींना उचकावयाला मजा येते. त्यांचा संतुलित पणा ढळलेला बघुन आत्म्यास थंडावा मिळतो....)
पण इथे ऋषिकेश साहेबांचा जो
पण इथे ऋषिकेश साहेबांचा जो मूळ प्रतिसाद आहे तो
एकतर
१. चांगल्या ऋषिकेशचा कॉंग्रेसवर नीचतेचा आरोप आहे.
किंवा
२. हलक्या वृत्तीच्या ऋषिकेशने काँग्रेसच्या चांगल्या कृतीचे मिसरिडिंग आहे.
-------------------------------
सबब इतक्याच प्रतिसादा पुरते पाहिल्यास लिनिंग कळत नाही.
"भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा"
बरोबर आहे. बोर्ड लावणारे राजकीय कार्यकर्ते असतात. त्यांच्या भाकरीची अगोदरच सोय झालेली असल्यामुळे त्यांना स्वाभिमान महत्वाचा असे (फक्त) म्हणायचे असते. स्वाभिमानाशी संबंधीत कोणत्याही राजकीय बॅनर ला गांभिर्याने घेऊ नका.
मी देखील काल मुलुंड चेकनाक्यावर एक बोर्ड वाचला. त्यावर लिहिले होते की 'बाबांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही दारु पिऊन नाचणार नाही व त्यांनी दाखविलेल्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करु'.
हा बोर्ड मला खरोखरीच कौतुकास्पद वाटला भले तो जाहिरातबाजीसाठी असो किंवा कसा. पण काही माणसे जरी अशा प्रकारचा विचार करु शकत असतील व निदान दोन-चार जरी त्या मार्गाने गेले तरी प्रयत्नांचे चीज झाले असे म्हणू शकतो.