मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६०
कर्मगुणांकन प्रणालीत काही उणीवा आहेत का?राजेश कुलकर्णी:पुण्य=० ?
राजेश कुलकर्णींच्या १२
राजेश कुलकर्णींच्या १२ फेब्रुवारीच्या फुसक्या बारांमध्ये सियाचेनमध्ये मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या निमित्ताने एक विचार मांडला आहे.
"आता युद्ध चालू नसतानाही आम्ही तेथे का जावे असे प्रश्न तुम्ही कोणी विचारत नाही आणि हेच तुमच्या धैर्याचे लक्षण आहे."
कालच्या लोकसत्ताच्या अग्रलेखातही अशा चौक्याची आवश्यकता काय आणि त्याचे फलित काय असा प्रश्न उपस्थित केला आहे.
.
.
.
.
.
.
पन्नास साठ वर्षांपूर्वी सैनिकांना तिथे पाठवणार्यांपैकी एका इसमाने हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. त्या इसमाला मूर्ख ठरवून तो प्रश्न त्याच्या मूर्खपणाचा पुरावा म्हणून आजही व्हॉट्सअॅपवर फिरत असतो.
+१
सियाचेन आणि अक्साई चिन ह्या वेगळ्या जागा आहेत. सियाचेन भारताच्या ताब्यात आहे तर अक्साई चिन ही चिनच्या. अक्साई चिन कधीच भारताच्या ताब्यात नव्हती.
तरीही, प्रश्नाच्या आशयाशी सहमत. आजही भारत दिवसाकाठी ६ कोटी रुपये सियाचेनवर पहारा देण्यासाठी खर्च करीत आहे. यात अशा मृत्युमुखी पडलेल्या जवानांच्या जीवाची किंमत समाविष्ट नाही!
आजही भारत दिवसाकाठी ६ कोटी
आजही भारत दिवसाकाठी ६ कोटी रुपये सियाचेनवर पहारा देण्यासाठी
सियाचीन मधले सैनिक फक्त पहारा देत असले तरी देश्/समाजाचे काही नुकसान करत नाहीत.
पण दिल्लीत अशी एक गोल इमारत आहे, तिथे शेकडो लोक जमतात आणि त्यासाठी वर्षाला हजारो कोटी खर्च होतो. वर ती लोक जमुन लाखो कोटी रुपये कमवतात. पण ती इमारत ख्ररच गरजेची आहे का असा प्रश्न कुबेरांना पडत नाही.
पुरुष हे स्त्रीयांपेक्षा हुशार आहेत का ???????
पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात का? हा प्रश्न अनेकांना
पडतो,तसा मलाही तो समजायला लागल्यापासून पडत
आलेला आहे.पुरुषाला जन्म देणारी स्त्री असूनही ति
पुरुषप्रधान व्यवस्थेत कशी अडकली? जगभरात पुरुषप्रधान
संस्कृतीच का आहे?.जग बदलणार्या विलक्षण घटना
(breakthroughs) फक्त आणि फक्त पुरुषांकडून का घडल्या
आहेत?.धर्म राजकारण ,विज्ञान तंत्रज्ञान, कला ,साहीत्य,
साम्राज्ये यावर एक नजर टाकली तर हा विलक्षण योगायोग
लक्षात येतो.जरा नजर टाकूयात
विज्ञान तंत्रज्ञान---- आर्कीमिडीज
,पायथागोरस,सुश्रुत,गॅलिलिओ,न्युटन , डार्विन , जेम्स वॅट,
एडीसन,बेंजामिन फ्रेंकलीन,मार्कोनी,मेंडेल,पास्कल, एडवर्ड
जेन्नर, अलबर्ट आइनस्टाइन , राईट बंधू,वॅटसन् क्रीक(DNA)
,स्टीफन हॉकींग्ज, बिलगेट्स , हेन्री फोर्ड , स्टीव जोब्ज.
......... ईत्यादी अनेक
तत्वज्ञान-----ॲरीस्टोटल, सॉक्रॅटीस , प्लेटो,रेने
देकार्त,डार्विन ,चाणक्य ईत्यादी अनेक
धर्म------ येशु ख्रिस्त,मोहंमद पैगंबर, आद्य शंकराचार्य,भगवान
गौतम बुद्ध,भगवान महाविर, गुरु गोविंदसिंग ईत्यादी अनेक
कला--- लिओनार्दो दा व्हीन्ची , पाब्लो पिकासो,
शेक्सपिअर,रविंद्रनाथ टागोर, राजा रविवर्मा ,बिटल्स,एम एफ
हुसेन...ईत्यादी अनेक
साम्राज्ये------ अलेक्झांडर द ग्रेट,नेपोलियन
बोनापार्ट,चंगेजखान,सम्राट अशोक,मुघल साम्रट बाबर,
शिवाजी महाराज, पेशवे इत्यादी अनेक
प्रश्न असा आहे की हे सगळे पुरुष जगाचा तोंडवळा बदलत
असताना स्त्रीया काय करत होत्या? त्यांनी का शोध लावले
नाहित? याचा सरळ अर्थ असा निघतो का की पुरुष
स्त्रीयांपेक्षा हुशार असतात?
मागच्या पन्नास वर्षात युरोप अमेरीकेत व भारतात
स्त्रीयांना समान संधी आहे तरीही विज्ञान ,तंत्रज्ञान, कला
, साहित्य ,क्रिडा यात स्त्रीया पुरुषांपेक्षा बर्याच
पिछाडीवर आहेत.या सामाजिक चमत्काराचे कारण काय असू
शकेल?
आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या युगात ऐसीसारख्या
खुल्या व अभिव्यक्तीची मोकळीक असणार्या
संकेतस्थळावर यावर काथ्याकूट व्हायला काहीच अडचण
नाही
लोल
मुक्तसुनीत हे माझे मित्र आहेत आणि त्यांच्याशी मी फोनवर चर्चा करते (असं अन्य एका धाग्यात लिहिलेलं आहे); या सोयी नष्ट होऊ नयेत म्हणून त्यांच्याशी सहमत होण्याशिवाय निराळा पर्याय नाहीच.
(सॉरी, आत्ता आणखी आचरटपणा जमत नाहीये; जमला की करेनच. तोवर इतरांनी आपापली आचरट मतं या धाग्यावर लिहावीत.)
अशा स्वरूपाची पोस्ट मी टाकली
अशा स्वरूपाची पोस्ट मी टाकली असती तर मात्र लिंगप्रदर्शन करणे वा याच्याशी जोडलेल्या मानसशास्त्रीय गोष्टी ऐसीवरच्या सगळ्यांनाच माहित आहेत. असल्या पोस्ट टाकून का पकवता? वेचारिक ताकद, ऐसीचा असा चेहरा अपेक्षित नाही वगैरे नेहमीची वायफळ बडबड झालीच असती.
तुमचे चालू द्या.
काय अर्धवटराव, बरेच खिदळत
काय अर्धवटराव, बरेच खिदळत आहात. ठीक आहे ना सगळे?
बाकी कोणाला भाषेबद्दल आक्षेप असेल तर आगाऊ सांगतो, श्रेणी देणे हा प्रकार कोणा विशेषाधिकार दिलेल्या लोकांकडून भेदभाव करण्याचा प्रकार आहे. माझ्या पोस्टला, कमेंटची प्रतवारी करण्याचा अधिकार मी कोणाला देत नाही, हा विशेषाधिकार मिळालेल्यांनीही कोनी तरी त्यांना तो दिले आहे म्हणून माझ्या डोक्यावर बसू नये. आवडले असेल-नसेल तर त्याबाबतची कमेंट मुद्द्याला धरून जरूर लिहावी, पण हा प्रकार प्रवारीचा प्रकार मला चालणार नाही. माझ्या गांभिर्याने लिहिलेल्या पोस्ट्स/कमेंट्स तुमच्या संपादकांपैकी व हे विशेषाधिकार असलेल्या एकाला विनोदी वाटत आहे. त्यांचे डोके तपासून घ्यावे.
तुमच्या संहितेत 'वाचकांचे हक्क' म्हणून काही आहे का पहा. नसल्यास व त्यात अशा मूलभूत गोष्टींचा अंतर्भाव नसेल तर ती अतिशय लाजीरवाणी गोष्ट ठरेल.
राकु सदस्यांची इथे
अशा स्वरूपाची पोस्ट मी टाकली असती तर मात्र लिंगप्रदर्शन करणे वा याच्याशी जोडलेल्या मानसशास्त्रीय गोष्टी ऐसीवरच्या सगळ्यांनाच माहित आहेत. असल्या पोस्ट टाकून का पकवता? वेचारिक ताकद, ऐसीचा असा चेहरा अपेक्षित नाही वगैरे नेहमीची वायफळ बडबड झालीच असती.
राकु सदस्यांची इथे फूट्प्रिंटस ची ट्रेल असते हो. त्यांनी (बरेच जण) एक तर प्रतिमा बनविण्याची मेहनत घेतलेली असते किंवा त्यांच्या मूळ अंगभूत स्वभाववैशिष्ट्यांमुळे तशी प्रतिमा बनलेली असते. प्रतिमा म्हणजे सुपरफिशिअल नाही म्हणायची मला. तर जेन्युइन पॅटर्न. आता तुम्ही जर नवे आहात तर पॅटर्न बनायला वेळ लागणार ना राकु. अचानक नग्नता विषयावर तुम्ही बोलू लागलात तर लोक गांभीर्याने घेणारही नाहीत.
अदिती काय किंवा अन्य जुने सदस्य काय तावुन सुलाखुन, उत्तीर्ण झालेले असतात. त्यांच्यावर वेळ घालविण्यात कमी रिस्क असते. म्हणून त्यांना रिस्पॉन्स मिळतात.
सतत चे वाद-विवाद
मी ऐसी ची एक नियमीत वाचक आहे. फुस़के बार ही वाचते. राकु तुमचे लेखन बर्यापैकी वाचनीय असते. कधी कधी काही मुद्दे सुमार ही वाटतात. पण रोज फुबा वाचते, ही वस्तुस्थीती आहे.
पण तुमचे अस्तीत्व तुम्ही वाद - विवादांनीच दाखवून देता ते खटकतं. जर संपादक मंडळ बायस असतं , तर इथे कधीही चर्चा झाल्याच नसत्या.
तुमच्या सगळ्या वादांचे मुळ आहे, फुबा चे एकत्रीकरण. एक वाचक म्हणून तुम्हाला ग्वाही देते की एकत्रीकरणाने काहीही फरक पडत नाही, ज्यांना वाचायचे आहे, ते वाचतात, त्रास पड्त नाही.
सभ्य भाषा वापरा ही विनंती.
धन्यवाद. मला माझ्या
धन्यवाद.
मला माझ्या पोस्टपुरतेच येथे असलेले आवडते. परंतु कोणी खोडसाळपणाने, मुद्द्याशी संबंध नसलेल्या कमेंट्स करत असेल तर त्याच भाषेत उत्तर देण्याशिवाय पर्याय नसतो. माझेच म्हणणे बरोबर असे माझे कधीच मचहणणे नसते. पण टीका ही मुद्द्याला धरून, वैयक्तिक व हेत्वारोप करणारी नसावी हा आग्रह असतो.
संपादकांपैकी काही जण बायस्ड आहेतच. मला त्यात शंका नाही. शंका असण्याचा प्रश्न नाही. अनेकदा सप्रमाण दाखवलेले आहे. श्रेणी देण्याचा प्रकार तर भेदभाव करण्याचे अगदी धन्य आहे.
पोस्ट्सच्या एकत्रीकरणाबद्दल म्हणाल, तर मी कालच याबाबतीत पांढरे निशाण उभे केलेले आहे. त्यांना माझ्या पोस्ट्सचे काहीही करू दे. अगदी काहीही. मी त्याबाबत बोलणार नाही. काल चार-पाच सदस्यांनी येथे सदर नावाचा प्रकार सुरू करण्याबद्दल सूचना केल्या आहेत. ते कोठवर जाते पहायचे. मी तशी सूचना केव्हाच केली होती. पण नवे स्विकारण्याला जो विरोध सगळीकडेच दिसतो, तसेच येथेही झाले असावे. त्यानिमित्ताने काही चांगले होणार असेल, तर त्याबद्दलचा वाईटपणा गग्यायला माझी ना नाही.
नाही ना! तोच तर प्रॉब्लेम
नाही ना! तोच तर प्रॉब्लेम आहे.
शिवाय किंडलवर मी २-३ देवनागरी पुस्तके पाहिली त्याचा फॉन्ट आणि काही अक्षरांचे आकार बघून मला अपार दु:ख झाले.
केवळ या कारणासाठी किंडल नकोसा वाटतो.
त्यापेक्षा अनेक अॅन्ड्रॉईड इ-बुक्स रीडर तितकेच चांगले नी देवनागरीला सपोर्ट करणारे आहेत
फक्त टॅब किंडल इतका हलका नसतो :(
सेंट्रल प्लॅनिंग
म्हटलं तर जनरल प्रश्न म्हटलं तर गब्बर-अनु राव यांच्यासाठी.....
समजा जॉन जानी जनार्दन यांनी आपल्या गावात शेतात काही प्रयोग केले आणि त्यामुळे त्यांना दर हेक्टरी दुप्पट तिप्पट पीक मिळू लागले. त्यासाठी त्यांना काही खास अवजारे/उपकरणे लागली ज्यांची किंमत खूपच जास्त होती.
या प्रयोगाची व्याप्ती सार्वत्रिक केल्याने सर्वांनाच हा फायदा मिळेल असे दिसते आहे. म्हणून सरकारने शेतकर्यांना सांगितले की तुम्ही या पद्धतीने शेती करा. त्यासाठी आम्ही तुम्हाला आर्थिक मदत देऊ.
तर सरकारची ही कृती "सेंट्रल प्लॅनिंग" च्या व्याख्येत बसते का? तशी ती बसत असेल तर केवळ "सेंट्रल प्लॅनिंग नको" म्हणून सरकारने ती करू नये का?
तर सरकारची ही कृती "सेंट्रल
तर सरकारची ही कृती "सेंट्रल प्लॅनिंग" च्या व्याख्येत बसते का? तशी ती बसत असेल तर केवळ "सेंट्रल प्लॅनिंग नको" म्हणून सरकारने ती करू नये का?
टेक्निकली हे सेंट्रल प्लॅनिंग नाही. सेंट्रल प्लॅनिंग हे यापेक्षा खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह असते. सेंट्रल प्लॅनिंग मधे खतं, औजारं, नांगर, जीवनाशके, बियाणे, व शेतकर्यांची सर्व उत्पादनं या सगळ्यांची किंमत ठरवायचा यत्न केला जातो.
ही अशी सबसिडी सरकारने देऊ नये कारण यात सरकार शेतकर्याचा नफा एन्श्युअर करते व त्याचा खर्च करदात्यांवर लादला जातो. Govt. ends up picking winners and losers. याचा परिणाम असही होतो की जे लोक शेतीतून बाहेर फेकले जायला हवेत ते जात नाहीत व इनिफिशियन्सी चालूच राहते.
या प्रयोगाची व्याप्ती
या प्रयोगाची व्याप्ती सार्वत्रिक केल्याने सर्वांनाच हा फायदा मिळेल असे दिसते आहे. म्हणून सरकारने शेतकर्यांना सांगितले की तुम्ही या पद्धतीने शेती करा. त्यासाठी आम्ही तुम्हाला आर्थिक मदत देऊ.
तर सरकारची ही कृती "सेंट्रल प्लॅनिंग" च्या व्याख्येत बसते का? तशी ती बसत असेल तर केवळ "सेंट्रल प्लॅनिंग नको" म्हणून सरकारने ती करू नये का?
ती मदत कोणत्या स्वरुपात आहे, ह्यावर बरेसचे ठरेल.
जर कमी व्याजानी किंवा शुन्य व्याजानी कर्जे उपलब्ध करुन दिली तर "सेंट्रल प्लॅनिंग" मधे बसणार नाही. खरातर हा योग्य मार्ग असेल.
पण फक्त पुढची १०-२० वर्ष शेतकर्यांना अवजारे स्वस्तात देऊ असे सांगितले आणि त्यासाठी सबसीडी दिली. त्या सबसीडीची प्रोव्हिजन बजेट मधे केली. तसेच ती अवजारे तयार करण्यासाठी सरकारने स्वताच कारखाने काढले तर ते "सेंट्रल प्लॅनिंग" होईल.
अधिकृत / प्रोफेशनल डीजे
अधिकृत / प्रोफेशनल डीजे (डिस्क जॉकी) हे विविध गाण्यांचा वापर करुन मिक्सिंगद्वारे पार्ट्यांमधे, मुख्यतः नाचासाठी गाणी परफॉर्म करतात.
त्या गाण्यात विविधता असणं अपेक्षित असतं, आणि शिवाय एका कार्यक्रमातही अनेक गाणी वापरली जातात. तर हे लोक सर्व गाण्यांच्या पब्लिक परफॉर्मन्सचे कॉपीराईट / रॉयल्टीज वगैरे कशा मॅनेज करतात?
साधारणपणे शब्द तेच असतील तर
साधारणपणे शब्द तेच असतील तर सरळ त्याची रॅायल्टी भरतात.ती लॅब प्रभादेवीला आहे कुठेतरी.मराठी नाटकात एखादा नट हिंदी गाण्याची ओळ गुणगुणत असेल तर त्याचेही पैसे भरतात.डीजे वाले एकतर शब्द कॅापी करत नाहीत.चाल चोरलीय असं म्हणायला नको म्हणून "म्युझिक पिसेस" तसेस ठेवत नाहीत.अगदी कोणी ढापेल त्याच्या वस्तू जप्त होण्याचा धोका असतो.
Every time the party in the
Every time the party in the White House changes, there is a potential impact on the court as the new president tries to mold it when openings develop.
अमेरीकेमध्ये सत्तरुढ पक्ष बदलल्याने सुप्रिम कोर्टावरती नक्की कोणता व कसा परीणाम होतो ते कळले नाही.
.
बहुतेक पुढील वाक्य कळीचं वाक्य आहे.-
Divisive Supreme Court decisions are more likely to be re-examined — and possibly overturned — when a court changes.
http://www.nytimes.com/2016/02/19/us/politics/scalias-death-offers-best…
http://www.nytimes.com/interactive/2016/02/18/us/politics/19-precedents…
जेव्हा पोलीस एखाद्या
जेव्हा पोलीस एखाद्या व्यक्तीला अटक करतात तेव्हा तो व्यक्तीच्या मूलभूत हक्कावर घाला समजला जातो. म्हणून पोलीसांना त्या व्यक्तीला अटक करणे कसे योग्य होते असे दुसर्याच दिवशी न्यायालयाला पटवावे लागते. ते पटले तर न्यायालय त्याला विशिष्ट कालासाठी पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची परवानगी देतात. हा कालावधी संपल्यावर तो वाढवून हवा असेल तर पोलिसांना पुन्हा न्यायालयास पटवून द्यावे लागते.
याचा अर्थ असा की व्यक्ती मुक्त असणे ही 'नॅचरल/डिफॉल्ट' स्थिती आहे. अटकेत असणे ही विशेष बाब आहे.
अटकेत ठेवलेली व्यक्ती न्यायालयाकडे जामीनावर मुक्ततेची मागणी करू शकते आणि जामीन का देऊ नये हे पोलिसांना न्यायालयास पटवावे लागते. ते पटवता आले नाही तर बाय डिफॉल्ट न्यायालय जामीन मंजूर करते.
अशा स्थितीत कन्हैया याच्या जामीन अर्जाला पोलीस विरोध करणार नाहीत असे असेल तर पोलीसांनीच त्याला बाय डिफॉल्ट मुक्त करायला हवे. न्यायालयात सुनावणी व्हायची काय गरज आहे?
अशा स्थितीत कन्हैया याच्या
अशा स्थितीत कन्हैया याच्या जामीन अर्जाला पोलीस विरोध करणार नाहीत असे असेल तर पोलीसांनीच त्याला बाय डिफॉल्ट मुक्त करायला हवे. न्यायालयात सुनावणी व्हायची काय गरज आहे?
मला वाटते की एकदा न्यायालया कडे गेल्यावर, पोलिस कुठलाही निर्णय घेत नाहीत. घेऊ शकत नाहीत. अटक करणे, गुन्हा दाखल करणे आणि जामिनाला विरोध करणे किंवा न करणे ह्या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
जेव्हा पोलीस एखाद्या व्यक्तीला अटक करतात तेव्हा तो व्यक्तीच्या मूलभूत हक्कावर घाला समजला जातो
ही माहीती तुम्हाला कोणी दिली माहीती नाही पण ती पूर्ण चुकीची आहे. अटक केल्यावर ठराविक कालावधीत ( २४ तास असावेत ) चार्जेस डिकेयर करावे लागतात. त्या ठराविक कालावध च्या पेक्षा जास्त बिना चार्जेस अटकेत ठेवू शकत नाही ( हा हा थोड्याफार प्रमाणात मुलभुत हक्क आहे ) ).
>>ही माहीती तुम्हाला कोणी
>>ही माहीती तुम्हाला कोणी दिली माहीती नाही पण ती पूर्ण चुकीची आहे. अटक केल्यावर ठराविक कालावधीत ( २४ तास असावेत ) चार्जेस डिकेयर करावे लागतात. त्या ठराविक कालावध च्या पेक्षा जास्त बिना चार्जेस अटकेत ठेवू शकत नाही
ज्या अर्थी २४ तासात न्यायालयाला पटवावे लागते त्या अर्थी अटक करणे हे बेसिकली चूक समजले जाते.
२४ तासात आरोप निश्चित करावे
२४ तासात आरोप निश्चित करावे लागतात फक्त, न्यायालयाला काही पटवावे वगैरे लागत नाही. थोडक्यात आरोपीला हे सांगावे लागते की आयपीसी च्या क्ष कलमाखाली तुला अटक करत आहोत, इतकेच. आणि हे डॉक्युमेंट होते.
बिना आरोप २४ तासा पेक्षा जास्त वेळ अटकेत ठेवता येत नाही.
आरोप जर काही च्या काही असतील तर न्यायालय पहील्याच सुनावणीत ते उडवुन लावते आणि आरोपी ला बाईज्जत वगैरे सोडते.
पण इथे तसेही झाले नाहीये. न्यायालय जामिना बद्दल विचार करतय म्हणजे लावलेले आरोप काही च्या काही आहेत असे न्यायालयाला वाटले नाहीये.
म्हणून पोलीसांना त्या
म्हणून पोलीसांना त्या व्यक्तीला अटक करणे कसे योग्य होते असे दुसर्याच दिवशी न्यायालयाला पटवावे लागते. ते पटले तर न्यायालय त्याला विशिष्ट कालासाठी पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची परवानगी देतात. हा कालावधी संपल्यावर तो वाढवून हवा असेल तर पोलिसांना पुन्हा न्यायालयास पटवून द्यावे लागते.
आरोपी कडुन अजुन माहीती मिळवायची असली तर पोलिस कोठडी मागतात, अटक जस्टीफाय करण्यासाठी नाही. अजुन माहीती मिळवायची आहे हे पोलिसांना न्यायालयाला पटवुन द्यावे लागते.
आरोपी जर पुराव्यांना धक्का लाऊ शकत असेल, फिर्यादीला धमकावू शकत असेल किंवा देश सोडुन वगैरे जाण्याची भिती असेल तर जामिन मिळत नाही.
कन्हया बद्दल हे काही होणार आहे असे असे पोलिसांना वाटले नाही तर ते जामिनाला विरोध करणार नाहीत. ह्या सर्वाशी अर्रोपी गुन्हेगार आहे की नाही ह्याचा काही संबंध नाही.
ट्रंप टेक्सास पायमरी हरल्याचे
ट्रंप टेक्सास पायमरी हरल्याचे ऐकुन प्रथम धक्का बसला पण नंतर कारण लक्षात आले.
आदितीच्या नैतिक, वैचारिक आणि इतर सर्व प्रकारच्या दहशतीमुळे हे घडले असावे.
ट्रंप बाबाला तातडीने मेल लिहुन हे रूट कॉज कळवण्यात आले आहे. वर हा सल्ला पण देण्यात आला आहे की मुख्य निवडणुकीच्या आधी किमान १ महिना आदितीतैं ना स्वखर्चाने ( ट्रंप च्या ) भारतात धाडुन द्यावे. आणि नंतर थेट शपथविधीचेच निमंत्रण पाठवावे.
विणकाम इथे अनेक लोक
विणकाम
इथे अनेक लोक विणकामतज्ज्ञ आहेत असा अंदाज आहे.
1) ज्या व्यक्तीला रिपिटीटीव्ह काम करायचा मनस्वी वैताग येतो तिला विणकाम शिकणं किती अवघड आहे? (मी पाहिलेले विणक लोक एकाग्रतेने सुयांची तीचतीच हालचाल करत राहतात. विणायचं मशीनदेखील असतं म्हणे.)
2) लोक स्वेटर, टोप्याच का विणतात? उदाहरणार्थ टाय का विणत नाहीत?
3) पसारा ना घालता विणता येतं का?
4) सुया विमानातल्या केबिन ब्यागेजमधून नेता येतात का?
5) सुईऐवजी चॉपस्टिक का वापरत नाहीत?
उत्तरे
१. अवघड असते.
२. टायसाठी वीव्हिंग केलेलं कापण लागतं निटिंग केलेलं चालत नाही. निटिंग केलेल्या कापडाची वीण सैल असते. त्याला इस्त्री केली तर नीट रहात नाही. तसेच तशा कापडाचा/कपड्याचा आकार बदलतो. उदा. मोजे, बनियन/टीशर्ट. निटिंगचे तंत्र पाश्चात्यांकडून अलिकडेच (म्हणजे युरोपियनांकडून चारपाचशे वर्षांत) आले असावे.
३. हो.
४. नाही.
५. चॉपस्टिक निमुळती असते. विणकामाची सुई समान व्यासाची असते. त्यामुळे विणत गेलेले कापड चॉपस्टिकवर मागे मागे सरकवता येणार नाही.
शंका
नाही म्हणजे, प्रतिसाद बव्हंशी माहितीपूर्ण आहे, परंतु,
निटिंगचे तंत्र पाश्चात्यांकडून अलिकडेच (म्हणजे युरोपियनांकडून चारपाचशे वर्षांत) आले असावे.
औरंगजेब उदरनिर्वाहार्थ टोप्या विणीत असे, असे ऐकून आहे. (खखोऔजा.) अर्थात, औरंगजेबाच्या काळापर्यंत (किंवा त्याही बऱ्याच अगोदर) युरोपियन हिंदुस्थानात आले होते, हे मान्यच आहे, तेव्हा मुद्दा तो नाही. प्रश्न असा आहे, की वास्को द गामाचा चरणस्पर्श या पवित्र भूमीस होण्यापूर्वीच्या काळात तत्कालीन एतद्देशीय मुसलमान टोप्यर्थ नेमके काय करत असावेत? की सिकंदर नामक युरोपियनाच्या आगमनाचे वेळीच त्यांच्या तत्कालीन प्रोटोमुसलमान१ पूर्वजांनी भविष्याचा वेध घेऊन त्यांच्याकरिता निटिंग मशिने घाऊक भावात (कदाचित कन्सेशनल रेटने) प्रीऑर्डर करून ठेवलेली असावीत?
फॉर द्याट म्याटर, खुद्द प्रेषिता२च्या काळात मक्कानगरीत (व/वा मदिनानगरीत) युरोपियन असावेत काय? गेला बाजार (दारोदार३) निटिंगमशीनविक्रेते म्हणून तरी?
..........
१ बोले तो, केवळ त्या काळी इस्लामची सुविधा प्रस्थापित झालेली नसल्याकारणाने जे मुसलमान होऊ शकत नव्हते, परंतु भविष्यात अनेक शतकांनतर ज्यांच्या पुढील पिढ्या मुसलमान होऊ घातल्या होत्या, अशी मंडळी.
२ पत्याशांदे.
३ याचा अर्थ नगरी-टू-नगरी असाही घेता यावा. पहा: दार-अस्-सलाम.
औरंगजेब टोप्या विणीत हे
औरंगजेब टोप्या विणीत हे विसरलो होतो खरे. कदाचित वास्को-द-गामा येण्यापूर्वी आलेल्या असतील.
ग्रीक लोक कोणत्याप्रकारचे शिरस्त्राण घालत होते ठाऊक नाही. परंतु ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी यांच्या काळापर्यंत बहुधा लोक टोप्या न घालता पागोटे/फेटा/पगडी किंवा तत्सम "वोव्हन" कापडाचे न शिवलेले शिरस्त्राण वापरत असे वाटते.
निटिंग
1) ज्या व्यक्तीला रिपिटीटीव्ह काम करायचा मनस्वी वैताग येतो तिला विणकाम शिकणं किती अवघड आहे? (मी पाहिलेले विणक लोक एकाग्रतेने सुयांची तीचतीच हालचाल करत राहतात. विणायचं मशीनदेखील असतं म्हणे.)
माझ्या स्वानुभवानुसार असा वैताग घालवायला याचा उपयोग होतो. हे रिपिटिव्ह म्हटलं तर आहे म्हटलं तर नाही. म्हणजे त्यातील कृती रिपिटिटिव्ह आहे पण दरवेळी वेगळी वीण/टाके असतात. हे म्हणजे चित्रकारांना सारखा ब्रश घेऊन रंगवण्याची रिपिटेटिव्ह कृती करताना बघून चित्रकला ही ब्रशने वेगवेगळे रंग चोपडण्याची हालचाल करत रहाची कला आहे. प्रिंटिंगचं मशीनदेखील असतं असं म्हटल्यासारखं झालं ;) (आयटीवालेही दिवसभर टंकनाची एकच कृती बराच काळ असतात :प )
2) लोक स्वेटर, टोप्याच का विणतात? उदाहरणार्थ टाय का विणत नाहीत?
असं काही नाही अनेक गोष्टी विणता येतात. मी आजवर कॅरमच्या जाळ्या, देवांची वस्त्र, बसकणं, तोरण, पायांत घालायला मोदड्या, टोपी, अंगड, पर्स या गोष्टी विणून पाहिल्या आहेत. टायही विणता येतो.
3) पसारा ना घालता विणता येतं का?
होय.
4) सुया विमानातल्या केबिन ब्यागेजमधून नेता येतात का?
नाही.
5) सुईऐवजी चॉपस्टिक का वापरत नाहीत?
हे केवळ दोन सुयांच्या निटिंगला लागू आहे. याला चाचांनी दिलेले उत्तर सुयोग्य असावे (मला हे निटिंग येत नाही, आम्ही क्रोशापंथीय! :प)
धार्मिकता
गेल्या काही काळातला विशिष्ट ठिकाणचा एखादा ट्रेंड घेऊन इतर घटक दुर्लक्षित करुन निव्वळ भूतकाळावर आधारित भाकित करणे हे चुकीचे आहे हे खूप वेळा दिसत असले तरीही त्यावर बिनधास्तपणे प्रेडिक्शन्स केली जातात.
जगातली धार्मिकता कमी होत चालली आहे आणि भविष्यात अज्ञेयवादी किंवा नास्तिक लोक बहुसंख्य होतील हाही असाच फसवा ठोकताळा आहे हे सांगणारा एक अभ्यास डेमोग्राफिक रिसर्च आणि प्यू रिसर्च सेन्टरने केला. अज्ञेयवादी किंवा नास्तिक लोकांचा एकूण लोकसंख्येतला वाटा १९७० मध्ये सर्वात जास्त होता आणि तो घटत चालला आहे.
http://www.pewforum.org/2015/04/02/religious-projections-2010-2050/
The religious profile of the world is rapidly changing, driven primarily by differences in fertility rates and the size of youth populations among the world’s major religions, as well as by people switching faiths. Over the next four decades, Christians will remain the largest religious group, but Islam will grow faster than any other major religion. If current trends continue, by 2050 …
The number of Muslims will nearly equal the number of Christians around the world.
Atheists, agnostics and other people who do not affiliate with any religion – though increasing in countries such as the United States and France – will make up a declining share of the world’s total population.
The global Buddhist population will be about the same size it was in 2010, while the Hindu and Jewish populations will be larger than they are today.
In Europe, Muslims will make up 10% of the overall population.
India will retain a Hindu majority but also will have the largest Muslim population of any country in the world, surpassing Indonesia.
In the United States, Christians will decline from more than three-quarters of the population in 2010 to two-thirds in 2050, and Judaism will no longer be the largest non-Christian religion. Muslims will be more numerous in the U.S. than people who identify as Jewish on the basis of religion.
Four out of every 10 Christians in the world will live in sub-Saharan Africa.
http://www.demographic-research.org/volumes/vol32/27/default.htm
एक उत्सुकता: ओनलाइन
एक उत्सुकता: ओनलाइन कंपन्यांचा रेव्हेन्यु कसा काढतात?कुठल्या भागातून वगैरे आणि मग त्यावरचा टॅक्स? :उदा० :http://www.neowin.net/news/facebook-overhaul-means-it-will-pay-millions…
मोठा रोचक विषय आहे. सवडीने
मोठा रोचक विषय आहे. सवडीने लिहीन.
तूर्तास असं, की चेपु वगैरे कंपन्या "advertising agency" सारखं काम करतात. म्हणजे यूकेतली कंपनी जाहिराती मिळवायची, पण इनव्हॉइस मात्र आयरिश कंपनी फाडायची. (आयर्लंडमध्ये 12.5% कर आहे.)
यावर 2012/13 साली बहुत राडा झाला. ब्रिटिश संसदेत चेपु, गूगलच्या अधिकाऱ्याना बोलावून पब्लिकमध्ये लाज काढली. मग हे प्रकरण OECD आणि G20 च्या पातळीवर लावून धरलं. आता यूकेने डायव्हर्टेड प्रॉफिट्स टॅक्स नावाची भानगड आणून याला चाप लावला आहे. त्यामुळे आता सगळे गुमान लायनीत येऊन योग्य तो कर भरत आहेत.
अगदी थेट नव्हे. ट्रॅडिशनल ऍड
अगदी थेट नव्हे.
ट्रॅडिशनल ऍड एजंस्या "गंप्याला जाहिरात बनवून, ती करवून देणार" असतात. म्हणजे ग्राहक गंप्या --> ऍड एजन्सी ओगिलवी --> जाहिरात ज्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रकाशित होते ती जागा (होर्डिंग/मासिक/वर्तमानपत्र वगैरे.) अशी मूल्यसाखळी असते.
याउलट ऑनलाइन जाहिरातबाजीत बऱ्याचदा** ग्राहक गंप्या --> जाहिरात ज्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रकाशित होते ती जागा (चेपु) एवढीच मूल्यसाखळी असते. चेपुने मधल्याला खाऊन टाकलं आहे. पण त्यांचं बिझिनेस मॉडेल होर्डिंग/मासिक/वर्तमानपत्र पेक्षा ऍड एजन्सीला जास्त जवळचं आहे, म्हणून "सारखं" असं लिहिलं.
**हे अर्थात सार्वत्रिक अर्थाने खरं नाही. रिक्षाने टांग्याना खाऊन टाकलं त्या अर्थी चेपुने ओगिलवीला खाल्लेलं नाही.
सोसल तेवढ सोशल
माझ्या मते हे असेय (अर्थात मी काही तज्ज्ञ नाही, पण ऐकीव माहितीवरचे अनभ्यस्त मत):
ट्रॅडिशनली गंप्या जाहिरात वाल्याकडे जाणार --> तो त्याला एक अॅद बनवून देणार --> ती तो मासिके/वृत्तपत्रे, रेडीयो गेलाबाजार टिव्हीवर झळकवणार.
फेसबुक काय कर्णार आधी एक चावडी फुकट देणार, तिथे जमलेल्या लोकांची आवड, निवड जाणून घेणार मग गंप्या जाहिरातीसाठी की त्याला सांगणार आदुबाळ निटिंग शिकतोय ;) फक्त त्याच्याच भिंतीवर निटिंगच्या सुया नि लोकरीची अॅड लावणार तर अचरटराव ऑर्गॅनिक खतं घेणार एत तर त्यांच्या भिंतीवर ऑर्गॅनिक खतांची अॅड लावणार. आदुबाळ आणि अचरटराव हवी ती वस्तु कुठे मिळेल ते समजल्याने खूश, गंप्या थेट आपल्या गिर्हाईकाला गाथल्याने खुश! (आता इथे फेसबुक ऐवजी नाव बदला कोणी चावडी देतंय, कोणी भिंग देतंय, कोणी चिवचिवाटासाठी कोनाडा देतंय, तर कोणी फोटो चिकटवायला होर्डिंग देतंय. आता तर पीपल बघितलं का ते तर तुमच्या मित्रांकरवी तुमही माहिती मिळवणार ए! तुमची संमती गेली चुलीत!)
बरोबर. पण म्हणजे मूल्यसाखळी
बरोबर. पण म्हणजे मूल्यसाखळी गंप्या --> चेपु एवढीच जाहली ना.
चेपु आपल्या चावडीच्या उपयोगाचे वेगवेगळे प्याकेज बनवतं. ते सामान्यतः जाहिरातदार एका वर्षात चेपुवर किती पैसे खर्चायचं अभिवचन देतोय त्यावर असतं. उदा - सॅमसंगसारखा मोठा जाहिरातदार data analytics वगैरे असलेलं मोठं प्याकेज घेतो. यांच्यासाठी चेपुही पेशल माणूस ठेवतो. उलट एखादा छोटा व्यवसाय फक्त टार्गेटेड युजर्सपर्यंत जाहिरात पोचावी एवढचं प्याकेज घेतो.
या विषयावर (ऑनलाईन कंपन्या,
या विषयावर (ऑनलाईन कंपन्या, त्यांचे आर्थिक व्यवहार, त्यांचा उद्योग नक्की कुठून येतो नि का चालतो, जुन्या प्रकारच्या उद्योगांशी त्यांची तुलना, त्यांना असलेले नवे फायदे आणि नवे धोके, त्यांचा जुन्या प्रकारच्या मार्केटांवर होणारा नि झालेला परिणाम, ग्राहकाचं नफानुकसान...) आबांनी एक लेखमालिका लिहावी, अशी (लाडीक / कळकळीची / हक्काची / प्रेमाची / नम्र / जोरदार) विनंती. त्यांच्या भाषेत हे असले, एरवी रटाळ वाटणारे विषयही प्रचंड रसाळ होतात आणि नीट समजतात.
विणकाम : मुसलमानी टोपी एका
विणकाम :
मुसलमानी टोपी एका सुयीवरची क्रोशे प्रकारची असते.मशिदीत जाण्यासाठी फक्त.उन्हापासून सावलीसाठी नाही.ते लोक व्यापारीच होते त्यांनि विणलेली वस्त्रे ( woven) आयतीच मिळायची.
कोळी लोक जाळ विणताना एका दोनतीन इंची काडीवर दोरा गुंडाळून घेतात आणी गाठी मारत जाळं विणतात.शटल या काडीची जागा घेते.
ताणाबाणा करून विणणे खूप जुनी कला आहे.माया संस्कृतीतही गुहेत हजार वर्षापुर्वींची कापडं सापडलीत.इजिप्तच्या पिरामिडातली रेशमी कापडं अर्थातच चीनची.
स्वेटर गरजेची वस्तू आहे टाय नाही.
दोन सुयांचा स्वेटर ,मोजे एक दोन दिवसात होऊ शकतात.डोंगरात राहणाय्रांना हे उद्योग करावेच लागतात.हौस नसते ती.
चॅापस्टिकवर विणणे हे केवळ प्रश्नाला ट्विस्ट म्हणून आहे .निरर्थक.
बय्राच जणांची मागणी आहे तर
बय्राच जणांची मागणी आहे तर येऊ द्या लेख.तुम्हालाही रोचक वाटतोय."त्यांच्या भाषेत हे असले, एरवी रटाळ वाटणारे विषयही प्रचंड रसाळ होतात आणि नीट समजतात." नक्कीच.
कोणताही अभिनिवेश नसतो आणि वाचकांस प्रश्न विचारायला वाव असतो.
बाकी त्यांच्या कंपन्यांचं वर्षअखेर केव्हा असतं?
शंका आणि मागणी
अनु राव ह्यांनी मागे एक दोन प्रतिसादाम्त लिहिलं होतं की त्यांना श्रेणी देण्याची सुविधा नाहिये.
त्यांना ही सुविधा मिळावी असं मला वाटतं.
अॅडमिनचं जर म्हण्णं असेल की असं एखाद्याला सुविधा देता येणं ; ते सुरु किंवा बंद करत नाहित;
किंवा करु शकत नाहित; तर मला आश्चर्य वाटेल.
अॅडमिनगिरी हा प्रकार आम सदस्यासाठी ब्लॅक बॉक्स असल्यामुळं अॅडमिन म्हणतात ते सत्य अथवा योग्य मानणं ;
इतकच हातात आहे. च्यालेंज करायचं असेल तर ड्रुपलचा अभ्यास करावा लागेल.
ते मात्र शक्य नाही. त्यापेक्षा त्यांचं जे काही म्हण्णं असेल ते मान्य करणं परवडेल.
तरीही अनु रावांना श्रेणी दाता/दात्री बनवावं अशी माझी इच्छा असेलच.
.
.
.
आताच वाचला धागा. घासकडवी ह्यांनी ह्या धाग्यात केलेला उल्लेख :-
तूर्तास तरी ही श्रेणी देण्याची क्षमता मोजक्या लोकांनाच देण्याचा विचार आहे. समूहाचा शहाणपणापेक्षाही निवडक (पण पुरेशा संख्येच्या) शहाण्यांनी घेतलेला हा निर्णय असेल.
म्हणजे हे अॅडमिन लोक इतर सदस्यांना श्रेणीदाता बनवू शकतात/ बनवतात.
.
.
अनु राव पुरेशा तार्किक आणि कन्सिस्टंट भूमिका घेतात असं मला वाटतं.
इतरांनाही तसच वाटत असावं हा माझा अंदाज. (अदरवाइज त्यावरुन अजो-राकुंएवढा धुराळा उडाला अस्ता.)
बहुतांश वेळा गब्बर-अनुराव हे एकाला झाकावं दुसर्याला काढावं इतकं सारखं लिहितात.
कधी कधी मेघना-अनु राव ह्यांचंही अद्वैत दिसून येतं.
अनु रावांना श्रेणी सुविधा नसेल तर गब्बरलाही असायला नको.
घ्या काढून ह्यांचीही श्रेणी सुविधा.
(तुम्ही काही गब्बरची सुविधा काढून घेणार नाहित हय अंदाजावर च्यालेंज देतो आहे.
पण गब्बरची सुविधा कायम ठेवायची असेल तर अनु राव ह्यांनाही सुविधा सुरु केली पाहिजे.
)
किंवा त्याहून महत्वाचं म्हणजे काही मूलभूत शंका आहेत; त्या विचारतो खात्री करुन घ्यायला .
- श्रेणीसुविधा आपोआप सुरु होते की अॅडमिन सुरु करतात ?
- ते सुरु होण्यासाठी नेसेसरी आणी सफिशियण्ट कन्डिशनस कोणत्या ?
- अनु राव त्यातल्या कोणत्या निकषांमध्ये बसत नसाव्यात ?
.
.
ता. क. :-
माझी दोन उद्दीष्टं आहेत :-
१. अनु राव ह्यांना श्रेणी सुविधा मिळावी.
२. श्रेणी सुविधेबद्दल अधिक माहिती व्हावी.
ह्यातील पहिली बाब जरी पूर्ण झाली तरी आभारी असेन. म्हणजे जर व्यवस्थापनाकडून "आता श्रेणी सुविधा सुरु केली आहे"
इतकच उत्तर आलं तरी पुरेसं आहे. "जावर कशी काय सुविधा दिली नैत ?" ,"तुमचा अजेंडा काय आहे" असली काहीही शेरेबाजी मी करणार नाही; किंवा "जैतं मया " छाप उन्मादही नसेल. लागलिच "मनःपूर्वक आभार" मानून विषय संपवण्याची तयारी आहे.
कारण निरर्थक मारामारीत मला शून्य रस आहे. (आणी तो माझा प्रांत नाही; ह्याचीही जाणीव आहे)
मागे कुठल्यातरी धाग्यात वाचलं
मागे कुठल्यातरी धाग्यात वाचलं होतं की निगेटिव आणी पॉझेटीव श्रेणी मिळाल्या तर पॉझेटीव श्रेणी वर दिसते. मी गवीला आत्ता "विनोदी" श्रेणी दिली, त्या आधी त्यांना "खवचट" मिळालेली. विनोदी ही श्रेणी पॉझेटीव असावी असे वाटते, मग खवचट श्रेणी दिसते ती कशी? की माझंच काही चुकतंय?
निराश आणि नाराज
प्रतिसादाला खोडसाळ श्रेणी दिल्यामुळं मी थोडासा निराश आणि नाराज आहे.
(व्हर्चुअल जगताला फारसं शिरेसली घेउ नये असं म्हणतात. ते पटतं आणि समजतंही तरीसुद्धा......)
ह्यात खोडसाळपणा काय वाटला असावा ते समजलं नाही.
प्रतिसाद मूळ धाग्यातून का हलवला ते समज्लं नाही.
मूळ धागा श्रेणीपद्धतीबद्दल माहिती देणारा होता.
त्यावरच हे विचारलेलं होतं. मग प्रतिसाद का हलवला असावा ?
आणि हलवता येतो आहे मह्णजे मुळात तो वाचलेला आहे.
वाचल्यानंतर त्याला खोडसाळ श्रेणी दिली गेली.
(मला वाटतं प्रश्न थेट व सरळ आहेत; व कुठलंही टॉण्टिंग, टोमणे, शेरेबाजी, टाळायचा प्रयत्न केला आहे.)
मूळ शंकेस उत्तर दिलेलेच नाही.
शिवाय प्रतिसादास ह्यापूर्वी एकूण रेटिंग ४, मार्मिक असे दिसत होते.
ते पूर्णपणे ओव्हरराइड करुन मग खोडसाळ केले गेले.
हे असे का झाले असावे ?
.
.
अदिती , राघा ऑनलाइन दिसले नाहित अजून. चिंजही सध्या दिसत नाहियेत.
म्हणजे ऋ धाग्यांची हलवाहलवी करत असावा का ?
का करत असावा बुवा ?
आणि खोडसाळ श्रेणी वगैरे तोच देत असावा एके अजून कुणी ?
( अर्थात अमुक एखादी श्रेणी मिळण्यापेक्षा किम्वा न मिळण्यापेक्षा सध्या माझ्या शंकेबद्द्दल अधिक तपशील मिळणं महत्वाचं आहे माझ्यासाठी)
.
.
व्यवस्थापक आहेत; साइट सांभाळायची; सदैव सगळ्यांशीच गोडगोड वागून चालणार नाही; ह्याची जाणीव आहे.
"मी म्हणतो म्हणून अमुक एक गोष्ट झाली पाहिजे " असं माझं म्हण्णं नाहिये.
तर तुमचे काय नियम ,निकाश आहेत; ह्याबद्दल विचारणा केलेली आहे.
पुन्हा सांगओत, व्यवस्थापनानं सदैव सगळ्यांशीच गोडगोड वागून चालणार नाही; शक्य नाही; हे मला समजतं.
कम ऑन. don't be nice, but please be fair!
मनोबा, सध्या २०२० सदस्यांपैकी
मनोबा,
सध्या २०२० सदस्यांपैकी सुमारे ४०० लोकांना श्रेणीदानाची सुविधा आहे. त्यापैकी किती लोकांना तू शत्रू बनवलं आहेस? ;)
विनोदाचा भाग सोडला, तर हो, श्रेणीसुविधेचा किंचित गैरवापर होताना दिसतो. पण चांगला वापर अधिक प्रमाणात होतानाही दिसतो.
- ९० टक्क्यांच्या आसपास धन श्रेणी असतात.
- चांगले प्रतिसाद लिहिणारांना चांगला फीडबॅक मिळतो.
- उगाच वा वा, चान चान, प्लस वन टाइपच्या प्रतिसादांची गर्दी होत नाही. विशेष चांगल्या प्रतिसादाला 'श्रेणी देऊनही समाधान झालं नाही म्हणून...' अशी दादही मिळू शकते.
- कुठल्या प्रतिसादाला वाईट म्हणायचं असलं तर ते अनॉनिमसली म्हणता येतं.
- आवडलं नाही, हे भडकाऊ आहे वगैरे प्रतिसादांची गर्दी होत नाही
- त्यामुळे वैयक्तिक भांडणं फार कमी होतात.
- ट्रोलांच्या प्रतिसादांना श्रेणी मिळाल्यामुळे चर्चेचं ट्रॅक्शन मिळत नाही.
माझा मुद्दा असा आहे की जेव्हा एरवी गुळगुळीत असणाऱ्या रस्त्यात एखादा खड्डा लागतो, तेव्हा त्या खड्ड्याबद्दल तक्रार करायची की त्याकडे दुर्लक्ष करून इतर प्रवासावर लक्ष केंद्रित करायचं हे आपल्याच हाती असतं.
काही उत्तरे
१. अनु रावला काय सोनं लागून गेलंय? बाकीचे सदस्य काय *** का? (पाहिजे त्याप्रमाणे रिकाम्या जागा भराव्यात.)
२. एक निगेटिव्ह बघावे की शंभर पॉझिटिव्ह (म्हणजे काय कुणास ठाऊक, पण ठोकून द्यायचं आपलं) ?
३. तुझ्यात लिखाणाची क्षमता आहे ती वाया का घालवतोस (विषय काय बोलतोय काय) ?
सध्या २०२० सदस्यांपैकी सुमारे
सध्या २०२० सदस्यांपैकी सुमारे ४०० लोकांना श्रेणीदानाची सुविधा आहे
हे आपला घासुगुर्जींचा नेहमीचाच डाटा आहे. एक तर तो निरर्थक आहे आणि तरी तो सारखा सारखा दिला जातो ह्या मागचे कारण काय ते माहीती नाही.
एकतर एकुणात नेहमीचेच जास्तीतजास्त १०-१५ लोक प्रतिसाद वगैरे देत असतात फक्त.
कुठल्याही प्रतिसादाला जास्तीत जास्त ५-७ श्रेण्या मिळालेल्या असतात. म्हणजे जे १५ लोक असतात त्यातले सुद्धा सर्व श्रेण्या देत नाहीत.
मग हे ४०० लोक कोण आहेत, ते कधीतरी ऐसीवर येतात का? येत नसतील तर ४०० लोक आहेत वगैरे आकडे फेकुन काय साध्य होते?
नमस्कार
काल टाकला होता प्रतिसाद. अजून काही उत्तर नाही. व्यवस्थापनवाले बिझी/व्यग्र असावेत काय ?
कालपासून आज्पर्यंत एक दिवस गेलाय. समजा अजून काही दिवस गेल्यावरही प्रतिसाद आला नाही, तर मी काय करावं ?
काय करता येणयसारखं आहे ? मुलात व्यवस्थापनवाले उपलब्ध आहेत; इतर धाग्यांवर प्रतिसाद देताहेत; पण इथे देत नाहित;
असं होणं येत्या काही दिवसांत शक्य आहे का ? तस झालच तर त्याला दुर्लक्ष करणं म्हणतात.
इन द्याट केस; मला काय काय करता येण्यासारखं आहे ?
मुद्दा सोडून देउन लगेच पुढच्या कामाला लागणं हे करता येइल असं समजू.
पण समजा मुद्दा सोडून द्यायचा नाहिये; तर मी काय करु शकतो ?
फार तर ह्या धाग्यात किंवा ऐसीवर अत्रतत्र रोज विचारणा करत जाइन "काय झालं मुद्द्याचं" म्हणून.
समजा तसं झालच तर ऐसीवाले पार्शलिटी अक्रतात; दाखवतात तितके fair नाहित; असं म्हणता अयवं का ?
नाही म्हणता येणार. कारण मग तसं असतं तर मुलात खुद्द मला, गब्बरला वगैरे श्रेणीसुविधा कशाला दिली असती.
आम्ही अकही ह्यांना दरवेळी +१ करत बसत नाहित.
मुळात त्यांनी श्रेणी सुविधाच सुरु केली नसती. इतर संस्थळांसारखं थेट सगळं स्वतःच्या हातात ठेवलं असतं.
पण ह्यांनी तर त्या प्रकाराचं डिसेंट्रलायझेशन केलेलं आहे.
म्हणजे हे इतर काहिंना श्रेणीसुविधा द्यायला तयार आहेत.
पण मग हे ज्या इतर काहिंना श्रेणी सुविधा देताहेत; त्यातल्या प्रत्येकाचं योगदान अनु रावांहून अधिक आहे का ऐसीअक्षरे ह्या सायटीच्या नजरेत. सर्व साडे चारशे लोकांचं योगदान अनु रावाहूंन जास्त आहे, असं म्हणायचय का ?
की तसं काही नाहिये. फक्त सुविधा सुरु करायची राहून गेलेली आहे.
कूनी तीव्रतेनं मागणी केली नाही; मह्णून सुविधा सुरु केलेली नाही; आनी आता सुरु होनार आहे; असं काही आहे ?
वो ऐसा है ना की खुदा देता भी
वो ऐसा है ना की खुदा देता भी बिनमांगे है और वापस लेता भी बिनमांगे है. नागडे आनेका नागडे जानेका.
जिनको भी श्रेणीसुविधा मिली, मांगके नही मिली ऐसा मेरा अंदाजा है. मतलब की मैंने तो मांगी नही थी, इसलिये मैं शीतसे भातकी परीक्षा करके यह अनुमान लगा रहा हूं.
वो पापपुण्य भी यहां बिनामांगे मिलता है.. घासकडवी और अदिती कुछ सच्चा नही बाबा.. उनके यहां न्याय मांगने की सोयच नही है.
तो ऐसेमें वेगवेगळे तर्कवितर्क आणि प्रश्नपर्याय खडे करके बारबार नमूद करते रहेने से क्लेश के अलावा हाथ में क्या आनेवाला है? उलटा जो मनकी है वो श्रेणीसुविधा भी चली गयी तो तेल गया और तूपभी गया और हाथमे धुपाटणा रेह गया ऐसेजैसी गत हो जायेगी ना मनकी?
तो ऐसी मानसिक उलघाल से बचने के लिये विविध प्रकारके उपचारोंके लिये प्रोत्साहित करनेको तुम हतोत्साहित करना ऐसे बुलाओगे तो
नाही म्हणता येणार. कारण मग
नाही म्हणता येणार. कारण मग तसं असतं तर मुलात खुद्द मला, गब्बरला वगैरे श्रेणीसुविधा कशाला दिली असती.
मुळात गब्बर श्रेणीसुविधेचा वापर अत्यंत कमी वेळा करीत असतो. (say 3% of the time.). So it is being wasted. तेव्हा त्याची श्रेणीसुविधा काढून घेऊन ती अनु राव यांना का दिली जाऊ नये ?
सुधारित प्रतिसाद -- नमस्कार
" नमस्कार " शीर्षक असणारा प्रतिसाद सुधारित करण्यापूर्वी उपप्रतिसाद आले. संपादित करता येत नाहिये.
इथे सुधारित व्हर्जन लिहितो आहे.
**************सुधारित व्हर्जन**************
काल टाकला होता प्रतिसाद. अजून काही उत्तर नाही. व्यवस्थापनवाले बिझी/व्यग्र असावेत काय ?
कालपासून आज्पर्यंत एक दिवस गेलाय. समजा अजून काही दिवस गेल्यावरही प्रतिसाद आला नाही, तर मी काय करावं ?
काय करता येणयसारखं आहे ? मुलात व्यवस्थापनवाले उपलब्ध आहेत; इतर धाग्यांवर प्रतिसाद देताहेत; पण इथे देत नाहित;
असं होणं येत्या काही दिवसांत शक्य आहे का ? तस झालच तर त्याला दुर्लक्ष करणं म्हणतात.
इन द्याट केस; मला काय काय करता येण्यासारखं आहे ?
मुद्दा सोडून देउन लगेच पुढच्या कामाला लागणं हे करता येइल असं समजू.
पण समजा मुद्दा सोडून द्यायचा नाहिये; तर मी काय करु शकतो ?
फार तर ह्या धाग्यात किंवा ऐसीवर अत्रतत्र रोज विचारणा करत जाइन "काय झालं मुद्द्याचं" म्हणून.
समजा तसं झालच तर ऐसीवाले पार्शलिटी अक्रतात; दाखवतात तितके fair नाहित; असं म्हणता अयवं का ?
नाही म्हणता येणार. कारण मग तसं असतं तर मुलात खुद्द मला, गब्बरला वगैरे श्रेणीसुविधा कशाला दिली असती.
आम्ही अकही ह्यांना दरवेळी +१ करत बसत नाहित.
मुळात त्यांनी श्रेणी सुविधाच सुरु केली नसती. इतर संस्थळांसारखं थेट सगळं स्वतःच्या हातात ठेवलं असतं.
पण ह्यांनी तर त्या प्रकाराचं डिसेंट्रलायझेशन केलेलं आहे.
म्हणजे हे इतर काहिंना श्रेणीसुविधा द्यायला तयार आहेत.
पण मग हे ज्या इतर काहिंना श्रेणी सुविधा देताहेत; त्यातल्या प्रत्येकाचं योगदान अनु रावांहून अधिक आहे का
ऐसीअक्षरे ह्या सायटीच्या नजरेत. सर्व साडे चारशे लोकांचं योगदान अनु रावाहूंन जास्त आहे, असं म्हणायचय का ?
की तसं काही नाहिये. फक्त सुविधा सुरु करायची राहून गेलेली आहे.
कूणी तीव्रतेनं मागणी केली नाही; म्हणून सुविधा सुरु केलेली नाही; आणि आता सुरु होणार आहे; असं काही आहे ?
होतं काय की समोरुन उत्तर आलं नाही तर विचित्र अवस्था असते. मौनाचा नेमका अर्थ समजत नाही.
आआणि आपण काहीही काढला तरी समोरचा तुम्ही काढलेला अर्थ चुकिचा आहे असं मह्णायला मोकळा असतो.
त्यापेक्षा नेमकं थेट आणि सरळ का बोलू नये.
व्यवस्थापनवाल्यांना अनु राव ह्यांचं योगदान पुरेसं वआटत नसेल तर सांगण्यात संकोच का वआटतो आहे ?
म्हणजेच तसं म्हटलं जाणं चुकीचं/अन्याय्य आहे; हयची त्यांना जाणीव आहे;
म्हणून जाहिर बोलता येत नाहिये; असं काही आहे का ?
मग "आम्हाला योगदान पुरेसं वआटत नाही" इतकच तुमेहे थेट मह्णालत तरी चालेल.
विषय संपेल की. करण तुमेहे व्यवस्थापन्वाले आहात.
तुम्हाला काही पटणं न पटणं हे समजू शकतो. पण तसं तरी सांगा ना.
.
.
मंडळी, चेष्टॅचे वगैरे प्रतिसाद देउन विषयांतर नकोय सध्या.
एकदा म्याटर क्लिअर होउ देत.
मग करा हवां तितकं विषयांतर.
काळा मठ्ठ बैल हा कुणाचा आय डी आहे; ह्याचा अंदाज आहे.
त्यामुळे विषयाचं महत्व डाउअन प्ले करणयचा त्यानं प्रयत्न करणं स्वाभाविक आहे.
पण तो मुद्दा इथे अप्रस्तुत आहे.
त्यामुळे वैयक्तिक भांडणं फार
त्यामुळे वैयक्तिक भांडणं फार कमी होतात.**
इकडे वैयक्तिक भांडणं होतात?
कोटा लिमिटेड असला ( २०२० पैकी ४०० )तर आमची सोय काढली तरी चालेल.प्रतिसाद लिहायलाच आवडतं.एखादी खरड खवचट आहे का हे लिहिणाय्रालाही माहित असतेच आणखी तीनचार जणांनी खवचट खssवचट खssssवचट असा कल्ला केल्याने काय फरक पडणारे?
त्यामुळे वैयक्तिक भांडणं फार
त्यामुळे वैयक्तिक भांडणं फार कमी होतात.**
इकडे वैयक्तिक भांडणं होतात?
यावरुन एक विनोद आठवला:
धावत्या कल्याण - सीेएसटी लोकल ट्रेनमधे खिडकीशी बसून एक प्रवासी एका वर्तमानपत्राचे बारीक बारीक कपटे फाडून दर एकेका मिनिटाने खिडकीबाहेर टाकत होता. (समर्पयामि)..
समोरचा सहप्रवासी (न राहवून): अहो हे असे दर मिनिटाला कागदाचे कपटे खिडकीबाहेर का सोडताय?
खिडकीजवळचा प्रवासी: असं केल्याने लांडगे येत नाहीत.
समोरचा सहप्रवासी: आँ? पण इथे लांडगे आहेत? इथै लांडगे कुठायत?
खिडकीजवळचा प्रवासी:बघा.. आहे की नाही माझा उपाय प्रभावी?
...
.
श्रेणीदानाची जबाबदारी कोणाबरोबर वाटून घेतली जाते?
कोणाला श्रेणीदाते बनवलं जातं याबद्दल संस्थळाचं धोरण -
- मर्यादित लोकांना ही सुविधा उपलब्ध आहे.
- त्या मर्यादित लोकांत कुणाचा समावेश असावा हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे.
- एखाद्या सदस्याला श्रेणी देण्याची सुविधा हवी असली तर त्यांनी स्वत:हून आणि खाजगीत व्यवस्थापनाला तशी विनंती करावी.
- व्यवस्थापनाच्या निर्णयाचं कोणतंही समर्थन दिलं जाणार नाही.
- श्रेणीदानाची सुविधा ही कुणाच्याही हक्काची बाब नसून जबाबदारीची आहे. त्यामुळे सदस्यांनी ती सुविधा वापरताना काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक वापरावी. जर कुणी तिचा गैरवापर करताना आढळलं तर ती कधीही आणि पूर्वसूचना न देता काढून घेतली जाऊ शकते. त्यामुळे ही जबाबदारी पेलण्याची क्षमता संस्थळावरच्या आपल्या वर्तनातून सातत्यानं दर्शवीत राहणं ही अपेक्षा व्यवस्थापन श्रेणीदात्याकडून ठेवतं.
- विशिष्ट सदस्याला श्रेणीसुविधा का नाही किंवा ती सुविधा त्यांच्याकडून का काढून घेतली ह्याविषयी कोणतंही स्पष्टीकरण व्यवस्थापन देणार नाही.
- एकापेक्षा अधिक सदस्यनामं वापरणाऱ्यांना श्रेणीसुविधा मिळणार नाही.
ह्या संदर्भात श्रेणीसंकल्पनेची माहिती हा धागा अद्ययावत केला आहे.
कर्म आणि पुण्य मध्ये काय फरक
कर्म आणि पुण्य मध्ये काय फरक आहे?