पाहुण तुमी कोण गावचं?
या गावचं, त्या गावचं
पाहुणं तुमी कोण गावचं?
लाल गावचं कि हिरव्या गावचं
पिवळ्या गावचं कि तिरंग्या गावचं.
निळ्या गावचं कि टोपी गावचं.
पाहुणं म्हणे, ऐका राव
मान मोठा मिळे ज्या गावात
चरायला मिळते सारे रान
तोची आहे आमुचा गाव.
सरडा आमचा गुरु भाई
त्याच्या सवे रंग बदलतो.
शिकारीच्या गावी
मुक्काम ठोकतो.
या गावचं, त्या गावचं
पाहुणं तुमी कोण गावचं?
प्रतिक्रिया
बडबडगीत असूनही समजले नाही.
बडबडगीत असूनही समजले नाही.
गर्दीतला दर्दी
केजिरवालांना उद्देशून आहे
केजिरवालांना उद्देशून आहे काय?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आवडली.
आवडली.
सैराट आणि ढेरे साहेब, ऐसी
सैराट आणि ढेरे साहेब, ऐसी वर देश्याचा राजनीतीवर नेहमीच गंभीर चर्चा होतात. कधी कधी वाचणारे खरोखरच देश्यातील राजनीती क्षेत्रात होणार्या घटनांबाबत किती जागरूक आहे पाह्ण्याआठी गंमत अश्या कविता रखडतो. निवडणूक जवळ येताच किंवा सत्तेसाठी सरडे एका झाडावरून दुसर्या झाडावर जातात मग उत्तर प्रदेश असो किंवा पंजाब सर्वत्र रंग बदलणार्या सरड्यांची चलती आहे.
आणि
आणि बाकी सर्व रंगांना फक्त निवडणुकीच्या वेळेसच निळ्या रंगाचा पुळका येतो आणि मग निळा रंगही अंगात वारं भरल्यासारखा मयूरनृत्य करु लागतो.
असंच काहीसं म्हणायचं आहे नं ?
जो रंग धारण केल्यावर
जो रंग धारण केल्यावर खुर्ची मिळेल तो रंग असतो सरड्यांचा. आता पहाच सिद्धू पा जी भगवा रंग सोडून कुठला रंग धारण करतात ते.
आवडली...
कविता आवडली...
रवींद्र दत्तात्रय तेलंग