ही बातमी समजली का? - ७६
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
=====
भेदभावाचा खेळ बंद
पर्रिकरांसारख्या व्यक्तीने
पर्रिकरांसारख्या व्यक्तीने इतके ढिसाळ आणि सैल वक्तव्य करावे यचा खेद झाला. भारत असे करत असेल किंवा नाही ही बाब इथे गौण आहे, एका कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याने त्याबद्दल बोलण्याने भारताकडे आता पाकिस्तान बोट दाखवायला मोकळा झालाय
लगेच पाकिस्तानच्या मंत्र्यांनी अपेक्षित वक्तव्य दिलेय
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आज आमच्या घरात सुद्धा हेच मत
आज आमच्या घरात सुद्धा हेच मत व्यक्त केले गेले. अमितभाऊ ऋ शी सहमत. इतकेच काय .... तर माझी बायको सुद्धा ऋ शी सहमत. लोहा लोहे को काटता है ... असे ठाकुर बलदेव सिंगी डायलॉग मारणारा मी एकटा पडलेलो.
इतरांनी तो डायलॉग मारू नये
इतरांनी तो डायलॉग मारू नये किंवा कसे याबद्दल काही मत नाही पण संरक्षण मंत्र्याने (वा कोणत्याही मंत्र्याने, अधिकार्याने) मारू नये कारण तशी भारताची अधिकृत भुमिका नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
लोह्याने लोहाला काटायचे असते
लोह्याने लोहाला काटायचे असते पण आम्ही काटतो असं सांगायचं नसतं. "छे !! आम्ही नाय बॉ" असं म्हणायचं असतं.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+
चाणक्याच्या देशात असले तोंडाळ मूर्ख पैदा होतात आणि (मुख्य म्हणजे) अशा जबाबदार पदांवर नियुक्त होतात याचा अतीव खेद वाटतो.
(ऑन सेकंड थॉट्स: एका थियरीनुसार, चाणक्याची जन्मभूमी तक्षशिला. बोले तो, रावळपिंडी/इस्लामाबादेजवळ. इन विच केस, माय ब्याड.)
चाणक्य मूळचा मागध, अर्थात
चाणक्य मूळचा मागध, अर्थात बिहारी. परंतु तक्षशिला युनिव्हर्सिटीत पोलिटिकल सायन्सचा प्रोफेसर होता असे वाचल्याचे आठवते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
...
शक्य आहे. परंतु, येथे त्याबद्दल असंख्य थियर्या मांडलेल्या आढळल्या, त्यात हीदेखील (बोले तो, तक्षशिला) होती, म्हणून लिहिले.
हम्म बरोबर. तसाही तत्कालीन
हम्म बरोबर. तसाही तत्कालीन घटनांसंबंधीचा विदा खूपच कमी उपलब्ध आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
...
यास Plausible deniability की कायसेसे म्हणतातसे वाटते. (चूभूद्याघ्या.)
POIDH???
लोहा लोह्यास काटण्यापूर्वी प्रत्येक भारतीय नागरिकास प्रत्येकी चार ओळींचे एक पोष्टकार्ड/प्रत्येक एनआरआय/पीआयओ/ओशीआयास प्रत्येकी दहा ओळींचा एक एअरोग्राम पाठवून व्यक्तिशः कळवीत नाही आणि लोह्यास काटल्यानंतर (त्या काटलेल्या लोह्यावर पाय टाकून) फोटू काढून ते 'ऐसीअक्षरे'वर छापत नाही, म्हणजे लोहा लोह्यास काटतच नसेल?
जे काही करायचे, ते चुपचाप करावे की! बोंबलावे कशापायी?
(अवांतर: माझ्या कल्पनेप्रमाणे असली तोंडाळ विधाने ही जेव्हा केली जातातच तेव्हा ती मुख्यत्वेकरून डोमेष्टिक कन्झम्प्शनसाठी केली जातात. भारतात कोठे एखादी दुय्यम निवडणूक/उपनिवडणूक वगैरे येऊ घातली आहे काय?)
तसेही
तसेही महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तीने जाहीररीत्या फारसे बोलू नये असे वाटते. मनमोहनसिंगांची मौनीबाबा म्हणून टवाळकी केली गेली पण सध्याचे पंप्र जी अतोनात बडबड करीत आहेत ते पाहून विकास नको पण भाषण आवरा असे वाटू लागले आहे. आणखी म्हणजे पंप्र.सहित अजित डोवल असतात हेही प्रामुख्याने प्रसिद्ध होत असते. 'रॉ'चे संचालक पडद्याआड राहाणेच इष्ट आहे. या बाबतीत रामेश्वरनाथ काव यांचा आदर्श घेण्याजोगा आहे. एखाद्या ००७पटातील हीरोलाही अशक्य वाटेल असे कर्तृत्व गाजवूनही रामेश्वरनाथ काव यांचे नाव आजही कित्येकांना माहीत नसेल.
आ. अत्रे यांचे वक्तृत्व अमोघ होते. पण सततच्या त्यांच्या 'आम्ही'पणाला हळूहळू लोक विटले. शेवटी त्यांना सभेत अंड्यांचा मारा सहन करावा लागला.
राही ताई जमाना बदलून गेलेला
राही ताई जमाना बदलून गेलेला आहे. अजित डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत केलेले कार्य प्रचंड आहे. बाकी आपले पंतप्रधान जे बोलतात ते करतात. खालच्या स्तराच्या कर्मचार्या बरोबर ही ते बरोबरीच्या नात्याने बोलतात. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात काही ही फरक नाही.
.
खेद झाला. आश्चर्य मात्र वाटले नाही.
सहमत
पर्रिकर खूपच ओवररेटेड आहेत. त्यामुळे आश्चर्य अजिबातच वाटले नाही.
काटयाने काटा?
काटयाने काटा काढायलाहि हरकत नसावी पण तसे बोलायची आणि स्वतःसाठीच अडचण निर्माण करण्याची काय आवश्यकता होती?
रघुवंशामध्ये पहिल्या सर्गात चाणाक्ष राजाचे लक्षण असे सांगितले आहे:
तस्य संवृतमन्त्रस्य गूढाकारेङ्गितस्य च|
फलानुमेया: प्रारम्भा: संस्कारा: प्राक्तना इव||
ज्याला मिळालेला मन्त्र गुप्त असतो, ज्याच्या मनात काय आहे हे लपवून ठेवलेले असते अशा त्या राजाच्या कृत्यांचा प्रारम्भ त्यांची फळे दृष्टीस आल्यावरच लक्षात येतो - जसे की पूर्वजन्मीच्या संस्कारांचे फलित पुढच्या जन्मामध्ये कळते.
हा धडा सर्व उच्चपदस्थांनी अवश्य लक्षात धरावा.
'
श्लोक आवडला.
श्लोक आवडला.
पर्रीकर
पर्रीकर हे एक ओवर-रेटेड व्यक्तिमत्त्व आहे असे खूप आधीपासून वाटत होते. आयाय्टीयन असल्याचा फायदा गोव्यासारख्या छोट्या राज्यात जरूर झाला असेल पण प्रचंड अशा देशाचे नेतृत्व करताना केवळ उच्च बुध्यंक हा एकच गुण असून चालत नाही असे वाटते.
पर्रीकर हे एक ओवर-रेटेड
हे आधीच कुठे लिहुन ठेवले असते तर बरे झाले असते, नाहीतर टिका करण्याच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्या सारखे वाटते.
आम्ही
आम्ही काही नोंदी करून ठेवाव्या किंवा इतिहासाने आमच्या म्हणण्याची नोंद घ्यावी, इतके मोठे आम्ही नाही.
जालमाध्यम हे वाहाते माध्यम आहे. तेव्हा असे (जाता जाता लिहिणे) चालायचेच.
पर्रीकर हे एक ओवर-रेटेड
ओव्हररेटेड हा शब्द अगदी चपखल आहे. मला आजपर्यंत त्यांच्याबद्दल जे वाटत आले आहे ते नेमके हेच.
गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची सिम्प्लिसिटी, विनय, सौम्य बोलणे वगैरे एक वेळ ठीकाय. पण हे संरक्षण मंत्र्यास आवश्यक असलेले सर्वात महत्वाचे गुण आहेत का ??
पर्रिकरांना केजरीवालला काउटर
पर्रिकरांना केजरीवालला काउटर करण्यासाठी प्रोजेक्ट केले गेले.
तो पण आय आय टीयन हे पण आय आय टीयन
तो पण साधा हे पण साधे वगैरे. मग पर्रीकरांचे पाणीपुरी खातानाचे फोटो वगैरे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
एका कॅबिनेट दर्जाच्या
ंमुळात काट्याने काटा काढावा अशा अर्थाच्या पर्रिकरांच्या वक्तव्याचा पहिला अर्धा भाग हा पाकिस्तान पुरस्कृत कारवायांशी निगडीत आहे. तेव्हा पर्रिकर म्हणतायत म्हणून आमच्याकडे होणार्या दहशतवादी कारवाया भारत करतोय असे म्हणणार्या पाकिस्तानला पर्रिकरांनी म्हटल्याप्रमाणे भारताने फक्त पाक दहशतवादाचा जवाब दिलेला आहे हेर मान्य आहे असे म्हणावे लागेल. ज्याअर्थी पाकिस्तान पर्रिकरांकडे बोट दाखवून भारत पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी कारवाया करतोय असा गळा काढतोय त्याअर्थी या कारवाया हे भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना दिलेले प्रत्युत्तर आहे हे पाकिस्तानला मान्य आहे असे म्हणता येईल.शब्दांचे खेळ कसेही खेळता येतात. पर्रिकरांनी केलेले वक्तव्यातून भारत यापुढे पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर देईल हा बोध पाकिस्तानी शासकांनी घेतला असेल पण भारतीय पत्रकारिता आणि बाळबोध विरोधी पक्ष मात्र अजूनही पर्रिकरांना झोडपण्यातच मग्न आहे.
अनेक गोष्टी फक्त बोलायच्या असतात आणि जिथे फक्त बोलून काम होत असेल तर जसे बोललो आहे तशी कृती केलीच पाहिजे असे नसते हा राजकारणातला प्राथमिक धडादेखील अनेकांना कळत नाही याला काय म्हणावे??
पर्रिकरांचे वक्तव्य ढिसाळ असेलही पण त्यातून पाक राज्यकर्त्यांना भारताकडून जशास तसे उत्तर मिळेल हा धडा आणि देशाच्या संरक्षणमंत्र्याकडून सेनेला दहशतवादी हल्ल्यांमधे जवानांची आहुती दिली जाणार नाही हा विश्वास मिळाला आहे त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून मिडीया जो गदारोळ करत आहे तो नकीच खेदजनक आहे. मुळात पर्रिकरांच्या वक्तव्यातील "Why my soldier has to do it ?" हे महत्वाचं वाक्य गाळून पर्रिकरांना झोडपण्यात काय अर्थ आहे ?
बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "
मुळात पर्रिकरांच्या
खरंय!
शत्रुशी व आतम्कवाद्यांशी लढायचे काम सैनिकांनी का करावे? असा प्रश्न विचारणार्या संरक्षणमंत्र्याला या वाक्यासकट नी विशेषतः याच वाक्यासाठी मिडीयाने सर्वाधिक झोडपलं पाहिजे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शत्रु आणि आतंकवादी यात फरक करायला शिकलं पाहिजे आता
शत्रु आणि आतंकवादी यात फरक करायला शिकलं पाहिजे आता .. सैनिकांचे काम शत्रुशी लढायचे आहे नि:संशय पण शत्रुराष्ट्राचे सैनिक आणि अफझल गुरु, कसाब यासारखे घोषित आणि गिलानी, एमआयएम, हुर्रियतच्या नेत्यांसारखे अघोषित आतंकवादी यात काहिच फरक नाही का? सैनिकाचे काम शत्रुच्या सैनिकाशी लढून त्याला संपवायचे आहे. राज्य सरकार, पोलीसदल, गुप्तचरखाते आणि इतर संबंधिताच्या नाकर्तेपणामुळे / अपयशामुळे देशात खोलवर जाऊन दहशतवादी कारवाया करणार्या अफझल गुरु, कसाब यासरख्या आतंकवाद्यांशी लढताना सेनादलाच्या जवानांनी आत्माहुती द्यावी आणि अफझल गुरुला फाशी देण्याचा निर्णय राजकीय होता का यावर चर्चा झडाव्यात यात काहीच चूक नाही का ??? संऱक्षणमंत्र्याचा - "Why my soldier has to do it ?" हा प्रश्न या पार्श्वभूमीवर बघितला तर अस्थानी म्हणता येईल का ?
बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "
राज्य सरकार, पोलीसदल,
याच्या इतके विनोदी वाक्य नसावे
जर आतंकवादी सैन्याच्या अखत्यारीत असणार्या सीमेला ओलांडून आत येत आहेत तर त्यांच्यापासून आपले संरक्षण करणे हे सैनिकांचे काम नाही? मग कोणाचे आहे? काय बोलता राव?
आणि संरक्षणमंत्र्यांनी हे अधिकृतपणे सांगावे?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जर आतंकवादी सैन्याच्या
आतंकवादी भारताची सीमा ओलांडून आत आलेला आहे. शहरात्/गावात घुसलेला आहे. व जनतेच्या प्राणाशी गाठ आहे. अशा प्रसंगी आतंकवाद्याचा बिमोड करणे हा सर्वात महत्वाचा भाग आहे. हे सगळ्यांनाच माहीती आहे.
पण - जर आतंकवादी सैन्याच्या अखत्यारीत असणार्या सीमेला ओलांडून आत
येत आहेतशहरात/गावात घुसलेले आहेत व त्यांच्यापासून जनतेच्या प्राणास धोका आहे. तर त्यांच्यापासून आपले संरक्षण करणे हे (भारतीय थलसेनेच्या) सैनिकांचे काम आहे - असे म्हणणे किमान काही प्रमाणावर तरी समस्याजनक नक्कीच आहे.>>ज्याअर्थी पाकिस्तान
>>ज्याअर्थी पाकिस्तान पर्रिकरांकडे बोट दाखवून भारत पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी कारवाया करतोय असा गळा काढतोय त्याअर्थी या कारवाया हे भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना दिलेले प्रत्युत्तर आहे हे पाकिस्तानला मान्य आहे असे म्हणता येईल.
काय सांगता? पाकिस्तान म्हणतोय आम्ही नाही करत. पण बघा भारताचा संरक्षण मंत्रीच सांगतोय की भारत दहशतवादी कारवाया करत आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
'इंडियन टॉइज् फोरम'ने मुलगा
हेच इंडियन क्लॉथ फोरम ने देखिल करावे काय?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
http://indiatoday.intoday.in/
http://indiatoday.intoday.in/video/parrikar-terrorism-india-aaj-tak-mant...
पारीकरांनी खूपच ब्लंटली "टेररिस्टांनी टेररीस्ट न्यूट्रलाइज करावेत" असं म्हटलं आहे. याची अजिबात आवश्यकता नव्हती.
वास्तविक २६/११ झाल्यास तुम्ही मुअँहतोड जवाब देणार का हा प्रश्न होता. तर अशी वेळ येणार नाही, अतिरेक्यांचा आम्ही काट्याने काटा काढू, ...इथपर्यंत ओके.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
http://www.dnaindia.com/india/report-controversy-erupts-over-ak-antonys-...
पण तरीही 'भारतीय सेनेच्या लोकांचे प्राण घेणारे सैनिक पाकचे सैनिक नव्हते तर त्यांचा वेष घालून आलेले अतिरेकी होते" अशा दिव्यज्ञानापेक्षा कितीतरी छान.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
http://www.firstpost.com/politics/antony-pm-upa-are-now-in-deep-schizoph...
नि या मनमोहनी गधडेपणापेक्षा बरंच चांगलं.
=================================================================================================
यातून भारताची भाषाच बदलली आहे हा संदेश गेला ते चांगलं झालं.
भारताचे नविन सरकार, चक्क चक्क संरक्षण मंत्री, खुलेआम, पाकच्या असंतुष्ट इलिमेंटस हाताशी धरून, त्यांना मदत करेल नि बदल्यास भारतविरोधी कारवाया हाणून पाडेल, इ इ अर्थ निघतात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
संदेश
>>यातून भारताची भाषाच बदलली आहे हा संदेश गेला ते चांगलं झालं.
भारताचे नविन सरकार, चक्क चक्क संरक्षण मंत्री, खुलेआम, पाकच्या असंतुष्ट इलिमेंटस हाताशी धरून, त्यांना मदत करेल नि बदल्यास भारतविरोधी कारवाया हाणून पाडेल, इ इ अर्थ निघतात.
असा संदेश द्यायचा असतो. पण शत्रू त्या संदेशाचाच आपल्या विरोधात उपयोग करणार नाही अशा रीतीने द्यायचा असतो.
असो. भक्त नुसत्या डरकाळ्यांनी खूश होतात असं दिसतंय.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पराकोटीचा द्वेष असेल तर
पराकोटीचा द्वेष असेल तर निरीक्षक भक्त दिसू लागतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
विनोदी श्रेणी देणारांस -
विनोदी श्रेणी देणारांस - कारगिलचा विजय विनोद आहे का? कि डरकाळी?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
'इंडियन टॉइज् फोरम'ने मुलगा
भारतात ज्या काही गोष्टी उत्तम आहेत त्यात हा निर्णय येतो. अनेक युनिसेक्स खेळणी असतात अन तीच मुलामुलींना द्यावी.
लहानपणी मुलीस बाहुली कधीच दिली नाही. तोंडातून साबणाचे फुगे काढणारे माकड, झोपाळा, लाकडी पशुपक्षांची चित्रे असलेले ठोकळे, ३ चाकी सायकल अशा प्रकारचीच खेळणी दिली आहेत. अन त्यामागे हाच हेतू होता.
[url=http://postimage.org/][i
Indians are easily America's most successful foreign-born population
------
upload gif
------
१) सेल्फ काँग्रॅच्युलेटरी मोड मधून बाहेर या ओ....
२) हा डेटा स्क्युड असू शकतो...
३) डिटेल्स महत्वाचे आहेत ओ .... तपशील विचारात घेतला तर हा आलेख फसवा आहे असे दिसेल.....
४) एनाराय नी भारतासाठी काय केलं ????
यातले बहुतांश एलिटच होते
यातले बहुतांश एलिटच होते सदासर्वकाळ. फक्त आता ते गरीब देशातून श्रीमंत देशात गेले इतकेच. ज्यांच्या घरी शिक्षणाचे (आणि एकूणच) वांधे होते आणि तरीही ते इतक्या वरती गेले त्यांचे मात्र मनापासून अभिनंदन!
अॅबरेशन
फॅमिली स्पॉन्सरशिप, राजकीय-धार्मिक असायलम, युद्धविषयक निर्वासित वगैरे कारणांसाठी आलेले निर्वासित सहसा उच्चशिक्षित नसल्याने तददेशियांचं अॅव्हर्रेज फॅमिली इन्कम खाली आणतात.
भारतीयांच्या बाबतीत काही गुजराती आणि तुरळक पंजाबी सोडले तर बहुतेक 'आर्थिक निर्वासित' आहेत. म्हणजे विद्यार्थी म्हणून आले आणि इथेच राहिले, किंवा पूर्वी डॉक्टरी (आणि आता आयटी)च्या नोकर्या करायला आले आणि इथेच राहिले असे. सहाजिकच त्यांचं उत्पन्न जास्त आहे.
आता आता भारतीयांचं देखील फॅमिली स्पॉन्सरशिपचं प्रमाण वाढतं आहे. अजून २० वर्षांनी भारतीयांचं देखील अॅव्हरेज उत्पन्न काहीसं बाकीच्या देशांबरोबर येईल असं वाटतं.
बेडेकर, चितळे, विको-वज्रदंती, रत्नागिरी हापुस आंब्याचा रस इत्यादिंना अमेरिकेत मार्केट मिळवून दिलं!!!
आंबे कोणीही नेलेले चालतात का?
आंबे कोणीही नेलेले चालतात का? का हजार परवानग्या घ्यायला लागतात?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आंबे कोणीही नेलेले चालतात का?
जर एक्स्पोर्ट करायचे असतील तर एक्सपोर्ट लायसन्स काढून एक्सपोर्ट करता येतात. मागे इंडियन स्टोअरमध्ये असे भारतातून आलेले हापुस आंबे बघितले होते.
कोणालाही असेच आंबे न्यायचे असतील तर ओलं (फ्रेश) फळ म्हणून डिक्लेअर करायला लागतात, मग बाकी कस्ट्म्सच्या हाती.
परदेशातून भारतात जर ओलं फळ न्यायचं असेल तर भारत सरकार/कस्ट्म्सही ते डिक्लेअर करायला लावतंच.
तेंव्हा 'हजार परवानग्या' ह्या दोन्ही बाजूंकडून आहेत!!
आणि माझ्या मते त्या योग्य आहेत.
कॅलिफोर्निया राज्यात मात्र बाहेरचं फळ असं प्रायव्हेटली आणायला बंदी आहे, एक्सपोर्ट करून इन्स्पेक्शन होऊनच आणावं लागतं.
आणि माझ्या मते तेही नियम योग्य आहेत.
धन्यवाद!
धन्यवाद!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
गरीब जनतेला समर्पित सरकार...
मोदींच्या म्हणण्यानुसार भारत सरकार हे गरीबांना समर्पित आहे.
बातमीतली काही वाक्ये पाहून पूर्ण भाषण पहायची जाम इच्छा झालेली आहे...
- गेल्या कित्येक वर्षांपासून 27 हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीत पडूनच होते
- अजून एक वर्ष काँग्रेस सरकार असतं, तर देश बुडाला असता
- गेल्या 30 वर्षांमध्ये जेवढी वीजनिर्मिती झाली नाही, तेवढी वीजनिर्मिती एक वर्षात केली
- शेतकऱ्याला वीज, पाणी पोहोचवण्याचं आमचं ध्येय, 5 वर्षात शेतकऱ्याला 24 तास पाणी देण्याचं उद्दीष्ट 24 तास वीज देण्याचा मानस.
ऐसीअक्षरेवर स्वागत.
ऐसीअक्षरेवर स्वागत.
http://timesofindia.indiatime
http://timesofindia.indiatimes.com/india/Bofors-scandal-was-a-media-tria...
राष्ट्रपतींनी मीडिया स्कॅण्डल हा योग्य शब्द नाही असे म्हणूनही बातमीच्या हेडलाइनमध्ये तसेच म्हटले आहे.
Asked if the Bofors scam was just a media scandal, he said, "I do not know. I'm not describing it, you're putting that word. Don't put that word. What I am saying is that in media it was publicised. "
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
'They Said We Don't Give
'They Said We Don't Give Flats to Muslims,' Alleges 25-Year-Old Woman in Mumbai
१) एकदा फ्लॅट भाड्याने दिल्यानंतर घरमालकांनी हे असले उद्योग करणे मनमानी वाटते.
२) पण घरमालकांना पूर्ण स्वातंत्र्य असावे - अशा प्रकारची धर्माधारित भेदभावाची पॉलीसी बनवायचे (provided they disclose it before the negotiation can begin.)
एकदा फ्लॅट भाड्याने
एकदा फ्लॅट भाड्याने दिल्यानंतर घरमालकांनी हे असले उद्योग करणे मनमानी वाटते.>>>>>>>
पश्चात बुद्धी असुच नये असे तुमचे म्हणणे आहे का गब्बर? फ्लॅट भाड्यानी घेणार्याचे मन पण २ दिवसात बदलू शकते.
कॉन्ट्रक्ट च्या टीसी प्रमाणे जी काय असेल ती भरपाई द्यायला तयार असेल तर मनमानी करण्यात काय चुक आहे?
मुद्दा मान्य.
मुद्दा मान्य.
Sunvault Energy and Edison
Sunvault Energy and Edison Power Company Create Massive 10,000 Farad Graphene Supercapacitor
जाणकारांनी (उदा. घासकडवी) याच्या पोटॅन्शियल बाबत प्रकाश टाकावा.
मलाही बॅटरीच्या युनिट्सबद्दल
मलाही बॅटरीच्या युनिट्सबद्दल नीट माहिती नाही. पण त्यांचं म्हणणं असं दिसतं आहे, की त्यांनी मोठ्ठ्या कपॅसिटीचं चार्ज स्टोअरेज डिव्हाइस तयार केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी ग्राफीन वापरून सुपरकपॅसिटर्स वापरले आहेत.
सर्वसाधारण बॅटरीत भरपूर चार्ज मावतो, पण ती चार्ज व्हायला प्रचंड वेळ लागतो. म्हणजे सध्याच्या इलेक्टिकल गाड्या एका चार्जवर २००+ मैल जाऊ शकतात. पण ती पुन्हा चार्ज करायची झाली तर दीड-दोन दिवस (साध्या १२० आउटलेटवर) लागू शकतात. त्याऐवजी कपॅसिटरमध्येही चार्ज साठवून ठेवता येतो. त्यांचा फायदा असा की कपॅसिटर पटकन चार्ज होतात, तोटा असा आहे की त्यांच्यात फार चार्ज स्टोअर करता येत नाही. त्यामुळे त्यांनी सुपरकपॅसिटर्स शोधले आहेत.
सुपरकपॅसिटर म्हणजे काय हे थोडं समजून घ्यायला हवं. साध्या कपॅसिटरमध्ये दोन पृष्ठभाग आणि त्यामध्ये एक विद्युत दुर्वाहकाचा थर असतो. जितकं क्षेत्रफळ जास्त, जितकं त्यातलं अंतर कमी, आणि जितका त्या दुर्वाहकाचा डायइलेक्ट्रिक कॉंस्टंट जास्त तितकी त्या कपॅसिटरची चार्ज साठवण्याची क्षमता जास्त. याला अर्थातच मर्यादा येतात. त्या ओलांडण्यासाठी सुपरकपॅसिटर्समध्ये पोरस माध्यम वापरलं जातं. म्हणजे त्यात असलेली बारीक छिद्रं ही हवा भरलेल्या कपॅसिटरसारखं काम करतात. यातून एकाच तुकड्यात अनेक लहान कपॅसिटर एकत्र करून एकंदरीत क्षमता वाढते.
आता यातही थोडी अडचण आहे. नेहमीचे साधे कपॅसिटर अधिक व्होल्टेजला चार्ज साठवू शकतात. मात्र हे सुपरकपॅसिटर सुमारे ५ व्होल्टपर्यंतच साठवू शकतात. त्यामुळे ते सिरीजमध्ये एकत्र करून मोठा कपॅसिटर तयार करावा लागतो. या बातमीनुसार हे टप्पे पार झालेले आहेत.
याचा अर्थ असा की लवकरच आपल्याला अधिक शक्तिशाली व पटकन चार्ज होणाऱ्या गाड्या दिसायला लागतील. कारण त्यातली 'बॅटरी' अधिक चार्ज साठवेल, चार्जिंगला वेळ कमी लावेल, आणि सध्याच्या बॅटऱ्यांपेक्षा सुमारे तिप्पट स्वस्त असेल. तसंच ती हलकीही असेल. वजन महत्त्वाचं असतं कारण गाडी वाहून नेताना ती बॅटरीही वाहून न्यावी लागते.
कपॅसिटरमध्ये आणि बॅटरीमध्ये
कपॅसिटरमध्ये आणि बॅटरीमध्ये चार्ज साठवला जातो पण बॅटरीचा फायदा असा असतो की चार्ज बराच कमी होईपर्यंत तिचे वोल्टेज स्थिर राहते. याउलट कपॅसिटरचे व्होल्टेज लगेच कमी होऊ लागते (सतत कमी होत राहते).
त्यामुळे बॅटरीजना पर्याय म्हणून हे कपॅसिटर वापरता येतील असं वाटत नाही. मोबाइलमध्ये वापरण्याविषयी म्हटले आहे.
हाय व्होल्टेजचे कपॅसिटर बनवून त्यापुढे रेग्युलेटर लावला तर स्थिर व्होल्टेज मिळवता येऊ शकेल. पण त्यात मोबाइलसारख्या उपकरणात एक हाय व्होल्टेज डिव्हाइस वापरण्याची आणि त्यामुळे निर्माण होणार्या धोक्यांची काळजी घ्यावी लागेल.
(New type)Mobile charger supplying 100VDC -> Capacitor in mobile charged to 100 V -> Regulator 4V -> Supply to mobile circuit 4V (Till the time capacitor voltage drops to below 4 V, there is no need to charge.
कपॅसिटिव्ह स्टोअरेजचे मला ठाउक असलेला उपयोग म्हणजे जिथे थोड्या काळासाठी खूप ऊर्जा साठवायची आहे अशा ठिकाणी होतो. उदा. कॅमेर्याचा फ्लॅश किंवा पर्मनंट मॅग्नेटला मॅग्नेटाइज करणारी डिव्हायसेस.
या कपॅसिटरचा नक्की उपयोग कुठे होणार आहे ते कळत नाही.
>>याचा अर्थ असा की लवकरच आपल्याला अधिक शक्तिशाली व पटकन चार्ज होणाऱ्या गाड्या दिसायला लागतील.
कपॅसिटरना चार्ज व्हायला वेळ कमी लागतो ही गोष्ट खरी असली तरी तुम्हाला एकूण जेवढी ऊर्जा साठवायची आहे तेवढी ऊर्जा त्यात घालण्यास जो वेळ लागेल तो लागेलच (तो चार्जिंग आउटलेटच्या कपॅसिटीवर अवलंबून असेल).
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
वीज आणि भारत
भारताची एमिशन्स, वीजेची गरज, कोळसा खाणी आणि त्यांचे परिणाम, आणि सौर उर्जेचं स्थान याचा घेतलेला छान आढावा.
http://www.theguardian.com/news/2015/may/27/why-india-is-captured-by-carbon?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
पुस्तक
16 Minute Video - Alice Goffman’s widely acclaimed On the Run: Fugitive Life in an American City
अलिस गॉफमन यांनी समाजशास्त्रात डॉक्टरेट केलेली आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णीय मुलांना त्यांच्या जीवनात कोणत्या दिव्यातून जावे लागते त्याचा हा आढावा. एका अर्थाने गुन्हेगारांचे "उत्पादन" कसे केले जाते त्याची कहाणी. फॉर्मेटिव्ह वयात ती मुलं लाईफ स्किल्स च्या जोडीला नेमकं काय शिकतात (उदा. पोलिसांपासून कसे स्वतःस वाचवायचे, पोलिसांशी नेगोशियेट कसे करायचे, शहरात लपायच्या जागा कोणत्या) व ही कौशल्ये नॉर्मल व्यक्तीस जीवन जगण्यास लागत नसल्यामुळे ही कौशल्ये कशा प्रकारचे जटिल व्यक्तीत्व घडवतात त्याची कहाणी.
ह्या पुस्तकाच्या सत्यासत्यतेवर प्रश्नचिन्हे उभी केली गेलेली आहेतच. एलिस गॉफमन यांनी दोन इन्स्टिट्युशन चा जिक्र केलेला आहे - कॉलेज व तुरुंग - की जिथे मुलं "घडवली" जातात. परंतु कुटुंब ही त्याहीपेक्षा जास्त महत्वाची भूमिका निभाणारी इन्स्टिट्युशन आहे व खोलीतला हा हत्ती त्यांच्या नजरेतून सुटला किंवा कसे ते समजून घेण्यासाठी पुस्तक वाचावेच लागेल असे दिसते. पुस्तकात साधा शोध घेतला तेव्हा फॅमिली या शब्दाचे ११३ परिणाम दाखवले. म्हंजे कुटुंब ही बाब त्यांच्या नजरेतून सुटलेली आहे असे वाटत नाही. पण कुटुंब ही संस्था तिची जबाबदारी पार पाडते का हा प्रश्न आहेच. याच पुस्तकाबद्दल आणखी - कायद्याच्या प्राध्यापकाने केलेले पुस्तकाचे परिक्षण
पुस्तक अतिशय रोचक वाटते आहे.
पुस्तक अतिशय रोचक वाटते आहे. आज ग्रंथालयातून घेइन.
अरे बापरे! हे खरच असणार. आपल्या कधी लक्षातही येत नाही अशा बाबी.
एकदा "वॉन्टेड" कॅटॅगरीत आलात की एक vicious downward spiral सुरु होत असणार
________
एकंदर पुस्तकाला डिमांड दिसते. ग्रंथालयात "ऑन होल्ड" आहे.
14 Funniest Public
14 Funniest Public Announcements
शेवटचा फोटो (क्र. १४) सर्वोत्कृष्ठ.
खिक माल.
http://aisiakshare.com/node/7
http://aisiakshare.com/node/7
पेड्डामानषी समारंभ आहे तो.
क्र० १ पण भारी आहे! बहात्तर
क्र० १ पण भारी आहे! बहात्तर वर्षांचे आजोबा नामे "शून्य सायफर झीरो"??
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
इंग्रजी ही जगाची भाषा हा आपला
इंग्रजी ही जगाची भाषा हा आपला समज असून तो सोडला पाहिजे.
----------------------------------
'परवडणारी घरे' योजना बिल्डरधार्जिणी?
भारतात हाऊसिंग / फायनान्शियल क्रायसिस होणार वगैरे वगैरे.
>>जगात सर्व देशांमध्ये
>>जगात सर्व देशांमध्ये प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून दिले जात असताना भारतात मात्र इंग्रजीचा उदोउदो केला जातो. इंग्रजी आल्याने माणसं ज्ञानी होतात ही अंधश्रद्धा आहे,
हे काही प्रमाणातच ठीक आहे. पण आज त्या नॉन इंग्लेश विकसित देशातले लोकसुद्धा इंग्रजी भाषेला जगाची भाषा म्हणून स्वीकारत आहेत.
>>इंग्रजी ही जगाची भाषा हा आपला समज असून तो सोडला पाहिजे.
जगातील विकसित राष्ट्रांची भाषा इंग्रजी नसूनही त्यांचा विकास झाला.
ही दोन विधाने एकमेकांशी संबंधित नाहीत. तो विकास झाला ही जुनी गोष्ट झाली. आज जपानी लोक इंजिनिअरिंगचे शिक्षण जपानी भाषेतून घेतात की कसे हे जाणून घ्यायला आवडेल.
पण आज त्या नॉन इंग्लेश विकसित देशातले लोकसुद्धा इंग्रजी भाषेला जगाची भाषा म्हणून स्वीकारत आहेत.
आपल्याकडे स्वातंत्र्य लढ्याचा हँगओव्हर अजून शिल्लक आहे. इंग्रजी भाषा बोलणे वापरणे याला "गुलामगिरीची मनोवृत्ती टिकून राहिली" असं म्हटलं जातं. खरं तर आज इंग्रजीचं महत्त्व आहे ते ती एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेची भाषा आहे म्हणून. अमेरिकेची भाषा जर स्पॅनिश असती तर आज सर्वत्र स्पॅनिश भाषिक शाळा उघडल्या गेल्या असत्या.
आपल्याकडची आयटी क्रांती आपल्यातल्या बर्याच लोकांना इंग्रजी येते म्हणून झाली आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
जर ... तर
जर असे असते तर बहुधा अमेरिका ही महसत्ता बनती ना!
१९ व्या शतकातील, जगावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी गोष्ट म्हणजे, उत्तर अमेरिकी लोक इंग्रजी बोलतात, ही होय - बिस्मार्क.
+१
खरं तर आज इंग्रजीचं महत्त्व
थत्ते, नेटवर्क इफेक्ट्स कडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो. भाषेच्या प्रसारातील महत्वाचा भाग आहे तो.
आपल्याकडची आयटी क्रांती हे
हे काय आहे???
चार पोरट्यांना आय टी त नोकर्या मिळाल्या म्हणजे "आपल्याकडची" क्रांती? चक्क क्रांती?
बाय द वे, खासगी असो नैतर सरकारी, आपल्याकडच्या जास्तीत जास्त व्यवस्था अजूनही आय टी चा स्पर्शही न झालेल्या आहेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
>>हे काय आहे??? जे काय आहे ते
>>हे काय आहे???
जे काय आहे ते !!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
चार पोरट्यांना आय टी त
अजो, आयटी क्षेत्रात भारतात क्रांति झाली नाही तर नेमके काय झाले ???
भारताचे एक वेळ बाजूला ठेवा. अमेरिकेत तरी आयटी/सॉफ्टवेअर मधे क्रांति झाली हे तरी मान्य कराल ???
थत्ते म्हणतात त्याप्रमाणे आपल्याकडचे इंग्लिश हे कारक आहे - याच्याशी मी ५०% सहमत आहे. इंग्रजीचा च जर एकमेव मुद्दा असता तर क्रांति ब्रिटन मधे सुद्धा व्हायला हवी होती. ऑस्ट्रेलिया ?? कॅनडा एक वेळ बाजूला ठेवलात तरी चालेल कारण तिथे इंग्रजी बरोबर फ्रेंच सुद्धा बोलणारे लोक आहेत. त्या दोन्ही ऑफिशियल भाषा आहेत. पण त्याहीपेक्षा मोठे भाषिक डायव्हर्सिटी भारतात आहे. भारतात इंग्रजी ही थर्ड लॅग्वेज आहे बहुतांश लोकांची. आता कॅनडाची लोकसंख्या (म्हंजे स्पेसिफिकली लेबर सप्लाय) पण विचारात घ्या. भारतातच आयटी क्षेत्रात एवढी जोरदार गुंतवणूक का होत्ये. लेबर आर्बिट्राज हे आणखी एक व महत्वाचे कारण आहे. "लेबर आर्बिट्राज" हा फॅन्सी शब्द आहे. पण विचार करा - भारतात लेबर चा पुरवठा अक्षरशः प्रचंड आहे. म्हंजे लेबर कॉस्ट खूप कमी असू शकते. हे गुंतवणूकदारांना/उद्योजकांना माहीती असेलच. म्हंजे प्रॉडक्शन्/मॅन्युफॅक्चरिंग मधे क्रांति होण्यास पूरक वातावरण होतेच की. आजही आहे. मग मॅन्युफॅकचरिंग मधे क्रांती झाली का ? का नाही झाली. होऊ शकते का ? मॅन्युफॅक्चरिंग मधे चीन मधे क्रांति का झाली ?? चीन मधे जे काही झाले ती क्रांति होती की नव्हती ?? तिकडे आयटी क्षेत्रात क्रांति का झाली नाही ?? चीन मधे लेबर सप्लाय जबरदस्तच होता की व आजही आहे. मग तिथे का नाही ? त्याचे कारण तिथे इंग्रजीचा प्रसार भारताइतका नाही.
जोडीला इथे पहा - List of countries by English-speaking population
-----
आता व्यक्तिगत अनुभवावरून बोलणे हे अॅनेक्डोटल एव्हिडन्स सारखे असते त्यामुळे तितकेसे ग्राह्य मानले जात नाही. पण तरीही - मी गेली अडीच वर्षे सिलिकॉन व्हॅलीत फायनान्स क्षेत्रात मधे आहे. प्रत्येक आठवड्याला २ कंपन्यांची प्रेझेंटेशन्स बनवतो. एकतर कॅपिटल रेझ किंवा सेल साईड. त्यातल्या ५०% कंपन्यांचा एकतर भारतात गुंतवणूकीचा प्लॅन असतो किंवा आधीच ऑफिस उघडलेले असते. भारतातच का ?? चीन मधे का नाही ?? ब्रिटन मधे का नाही ?? कॅनडात का नाही ?? ऑस्ट्रेलिया त का नाही ?? जर्मनी ?? फिलिपाईन्स ???
-----
मी अजून नेटवर्क इफेक्ट्स, व्हेंचर कॅपिटल बद्दल बोलायला सुरुवात सुद्धा केलेली नाहिये हे महत्वाचे.
-----
मला जे म्हणायचेय ते थोडक्यात, थेट व स्पष्ट - इंग्रजीबरोबरच लो कॉस्ट लेबर सप्लाय हे सुद्धा आयटी क्षेत्रात भारतात जे काही घडले त्यामागचे कारण होते/आहे.
-----
आता मूळ कळीचा प्रश्न हा आहे (की ज्याचे निसंदिग्ध नसले तरी रिझनेबल उत्तर देणे गरजेचे आहे) - की भारतात आयटी मधे जे काही झाले ती क्रांति होती की नव्हती ??
अजो, नेमका कोणता डेटा दिला की ह्याचे रिझनेबल उत्तर दिले असे मान्य कराल ??? (गुंतवणूक, निर्यात, एम्प्लॉयमेंट, .......) ?
-----
(महत्वाचे - क्रांतिची व्याख्या सुस्पष्ट नाही, आयटी क्षेत्राची व्याख्याच सुस्पष्ट नाही, बीपीओ म्हंजे आयटी नाही, आयटी सर्व्हीस सेक्टर वि. आयटी प्रॉडक्ट सेक्टर मधे तुलनात्मक विचार करायला हवा, सेलफोन हे आयटी मधे येते की नाही ??, निर्यात केली म्हंजे क्रांति झाली असे नाही, प्रचंड लेबर सप्लाय म्हंजे क्राति नाही, इस्रायलचे काय ?? १२ तासांच्या टाईमझोन डिफ्रन्स चे काय ?? - हे एकतर मुद्दे किंवा काऊंटर प्वाईंट्स नक्कीच आहेत - हे नोंदवून ठेवतो. )
>>मला जे म्हणायचेय ते
>>मला जे म्हणायचेय ते थोडक्यात, थेट व स्पष्ट - इंग्रजीबरोबरच लो कॉस्ट लेबर सप्लाय हे सुद्धा आयटी क्षेत्रात भारतात जे काही घडले त्यामागचे कारण होते/आहे.
लो कॉस्ट लेबर हे मुख्य कारण आहे. पण लो कॉस्ट लेबर उपलब्ध असलेल्या बर्याच देशांपैकी भारतातल्या१ लेबरला२ इंग्रजी येत असल्याने भारतातल्या लोकांना फायदा मिळाला.
१- काही प्रमाणात पाकिस्तानी लोकांना सुद्धा.
२- लेबर म्हणजे कामगार असे नव्हे. मनुष्यबळ. ज्या मनुष्यबळाच्या कामात भाषा फार महत्त्वाची नव्हती तिथे भारताला स्पेशल फायदा मिळाला नाही. त्यात चीन-बांगलादेश-फिलिपाइन्स वगैरे देशांनी बाजी मारली.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नेमका कोणता डेटा दिला की
आय टी इंडस्ट्रीचे दोन विभाग करता येतील. एक मीन्स आणि एक एण्ड्स.
WEF चा रिपोर्ट काय म्हणतो ते पहा.
http://www3.weforum.org/docs/WEF_GITR_Report_2013.pdf
पान ४० पर्यंतचे सारे रँकिंग्ज पहा.
"डिस्मल" मंजे काय?
--------------------------------------------------------------------------------------------------
दुसर्या देशातल्या १५० रुच्या कामाला १० रु त स्लेव उपलब्ध करून देणं म्हणजे क्रांती नव्हे.
आय टी क्रांती चायनात झाली आहे, भारतात नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तो डेटा पाहतोच
तो डेटा पाहतोच मी.
------
स्लेव ?? स्लेव्ह ची व्याख्या मी तुम्हास सांगू की तुम्ही मला सांगता ??
स्लेव्ह ची व्याख्या बाजूला ठेवलीत तरी - हा प्रश्न कमालीचा समस्याजनक आहे !!! जगात सगळीकडे प्रत्येक कामाची तनख्वा समानच असायला हवी ह्या गृहितकातून निर्माण झालेला आहे.
जर अमेरिकेतल्या १५० रु च्या कामाला जर भारतात १५० रु च मिळण्याची रिक्वायरमेंट असेल तर तो जॉब अमेरिकेतच का राहणार नाही ??
आज १० रु त काम करून हळूहळू स्किल डेव्हलप करण्याच्या व्यक्तीच्या प्लॅन चा तो भाग आहे. पुढे त्याला १० च्या ऐवजी ५० रु. मिळण्याची शक्यता अनुभवान्ति निर्माण होऊ शकते.
जगात सगळीकडे प्रत्येक कामाची
१००% गुलामाला पगार मिळत नाही. अंशतः गुलामाला त्याच कामाचे कमी पैसे मिळतात. तेच काम त्याच दर्जाचे झाले तर रेम्यूनरेशनमधे फरक का असावा? एकाच कंपोझिशनच्या क्रूड ऑइलची प्राईस जगात वेगवेगळी असते का? In what way IT labor is different from crude oil?
लेबर डिमांड सप्लाय चा इश्श्यू म्हणाल तर - "तुमच्या" अमेरिकेने "सगळ्या" भारतीय आय टी लेबरची तिकडे फ्री मूवमेंट स्वीकारली पाहिजे. भारतीय लेबर ऑनसाइट गेला रे गेला कि त्याची कॉस्ट जबरदस्त वाढते. ज्या देशाची करन्सी फॉरेन ट्रेडची करन्सी आहे त्याने एव्हढे व्हिसा रिस्ट्रीक्शन्स का ठेवावेत? हा शुद्ध दुटप्पीपणा आहे. Yes, I am mixing issues, but finally it is all about slavery.
----------------------------------------------------------------------
We are not speaking about differential skills and differential pays. भारतात आय टी क्षेत्रात कौशल्य कमी आहे असा प्रकार नाही. समान कौशल्याला निष्कारण भिन्न पगार आहे. मंजे बी पी ओ च्या एक मॅन मंथची १.५० ते ३.०० लाख कॉस्ट कंपनीला मिळते. त्यातले ते १० ते ४० हजार एंप्लॉइला देतात. हेच काम अमेरिकेत "तशास तसे" करायला ३.०० लाख ते ५.०० लाख पडतात.
कॉस्ट अॅडवांटेज आणि स्लेवरी मधे फरक असतो. कॉस्ट अॅडवांटेज १०% -२०% फार तर ५०% इ इ असते. १५००% नसते. ते ही नॅचरल रिसोर्सचे असते तर ठिक. लेबरचे? त्याला गुलामी म्हणतात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कैच्याकै. गुलामी
कैच्याकै.
गुलामी ??????????????
त्यांना कुणी जबरदस्ती केलिये तिथे काम करण्याची ??? ते जॉब सोडू शकतात की नाही ???
भारतात नोकरीचा बाँड सुद्धा चालत नाही. कोर्ट लगेच खारिज करते तो बाँड. इतका कायदा कडक आहे.
अजो, तुम्ही अजिबातच विचार न करता शब्द वापरता.
चला, गुलामी शब्द मागे घेतो.
चला, गुलामी शब्द मागे घेतो. गुलामीत माणसाला काहीच अधिकार नसतात, म्हणून तो शब्द चूक आहे हे मान्य. पण जबरदस्ती नि बंधन हीच गुलामीची निदर्शक नाहीत. भेदभाव देखिल आहे. Discrimination equivalent to the one in slavery असे म्हणतो.
-----------------------------------------------------------------------------------
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
भेदभाव देखिल आहे.
पुन्हा कैच्याकै.
भेदभाव ही गुलामगिरी ???
एखादी विवाहोत्सुक मुलगी म्हणते की मी फक्त माझ्या धर्माच्या मुलग्याशी विवाह करेन. दुसर्या धर्माचा मुलगा कितीही सुस्वभावी, क्वालिफाईड असला तरी नाही.
१) हा भेदभाव आहे का ?
२) असल्यास ती गुलामी आहे का ? असल्यास कोण गुलाम आहे व कोण गुलामाचा मालक ??
प्रत्येक भेदभावात गुलामगिरी
प्रत्येक भेदभावात गुलामगिरी असावीच असे नाही. प्रत्येक गुलामगिरीत भेदभाव असावाच असे नाही. पण अशी एक्सक्लूसिव उदाहरणे देऊन कोणत्याही गुलामगिरीत भेदभाव नसतोच आणि कोणत्याही भेदभावाने गुलामगिरी होतच नाही असं सिद्ध होत नाही. या संकल्पनांत ओवरलॅप आहे.
----------------------------------------------------------------------------------------
ज्या श्रमाला जे मोल मिळायला हवं त्याचा काहीही संबंध नसलेलं अव्वाच्या सव्वा कमी (से १५ पट) मोल मिळत असेल तर हे १-१/१५ श्रम गुलामगिरी आहेत. They are just not paid for.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तुमचा संपूर्ण विजय झाला व
तुमचा संपूर्ण विजय झाला व माझा संपूर्ण पराभव झाला हे मी सहर्ष मान्य करतो. तुम्ही चक्रवर्ती सम्राट आहात. आमचा कुर्निसात घ्यावा.
गब्बरशेट.. तुम्ही मानसिक
गब्बरशेट.. तुम्ही मानसिक कंडिशनिंगद्वारे घडलेली, घडवून आणली गेलेली गुलामगिरी, भेदभाव एकदमच डिस्काउंट करताना दिसता.
"न करण्याचा चॉईस असणे" या एका पॉईंटवर बर्याच गोष्टी जस्टिफाय केल्या जाताना दिसतात. पण
-इतर अनेक चॉईसेसमुळे प्रचंड लाभ असताना ते चॉईसेस आहेत याची जाणीवच होऊ न देणं
-मानसिकता अशीच डेव्हलप होणं, किंवा केली जाणं की ज्यामुळे चॉईसेसकडे बघण्याचा दृष्टिकोनच मारुन टाकणं, की ज्यायोगे मर्यादित ऑप्शन्समधेच अडकण्याची गुलामगिरी येईल.
-अमुक एक नोकरी करत राहण्यात अन्याय / भेदभाव / (पार्शल) गुलामी नाही, कारण ती सोडण्याचा चॉईस आहे असं म्हणताना अनेकदा ती सोडण्याचा चॉईस घेताच न येणं, इतके अन्य चॉईस वाईट असणं असंही असू शकतं. आगीत राहतोस की फुफाट्यात? उकिरड्यावर राहतोस की गटारात? अशा चॉईसेसमधे "लेसर इव्हिल" म्हणून घेतलेला पर्याय हा गुलामीविरहीत, अन्यायविरहीत, भेदभावविरहीत आपोआप ठरतो का? केवळ सोडून देण्याचा "चॉईस" आहे, इतक्या क्वालिफिकेशनवर?
अर्थातच अजो म्हणतात त्या उदाहरणांशी याचा संबंध नसेल, पण तश्या अनेक शक्यता असू शकतात हे नोंदवण्याचा प्रयत्न करतो आहे.
मार्मिक दिली आहे.
मार्मिक दिली आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
एखादी विवाहोत्सुक मुलगी
हेच इटसेल्फ वैचारिक गुलामगिरीचं उत्तम उदाहरण आहे.
सर्वांना उत्तम स्वतंत्र वातावरणात वाढवलं जाऊन त्यांची बुद्धी अत्यंत तल्लख आणि ३६० अंशांत कुठलाही चॉईस मुक्तपणे करु शकणारी लिबरल मानसिकता डेव्हलप केली गेलेली आहे असं गृहीतक बर्याच ठिकाणी दिसतं.
शिवाय दुसर्या धर्माचा असा
शिवाय दुसर्या धर्माचा असा क्वालिफाइड मुलगा उपलब्ध आहे ही "माहिती" सुद्धा सहज मिळत नाही.
(काही वेळा दुसर्या धर्मात कोणी क्वालिफाइड असूच शकत नाही अशीही कन्सेप्ट असते ती वेगळीच).
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आर्ग्युमेंट जरा आणखी ताणलं तर
आर्ग्युमेंट जरा आणखी ताणलं तर एकदाचा तात्काळ मरण्याचा कायदेशीर हक्क प्रत्येक व्यक्तीला दिला की एका फटक्यात जगातली सर्व गुलामगिरी, अन्याय, भेदभाव नष्ट होतील. सर्वात सरळ सोल्यूशन..!!
"न करण्याचा" किंवा "सोडण्याचा" सर्वात मोठा चॉईस.
हळूहळू मरण्याचा हक्क आहेच की
हळूहळू मरण्याचा हक्क आहेच की !!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हेच इटसेल्फ वैचारिक
कडेलोट.
धर्माधारित क्रायटेरिया ठेवणे हे वैचारिक गुलामगिरि आहे ??????????????? खरंच ???
ज्याक्षणी तुम्ही धर्माधारित क्रायटेरिया ठेवता तेव्हा इतर धर्मांशी जे काही करता ते भेदभाव नाही तर काय असते ????
माझ्या मुंबईतील कंपनीत काम करणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असायला हवी अशी अट घालतो. हा भेदभाव आहे की नाही ?? जर एखाद्या रशियन नागरिकास तिथे नोकरी हवी असेल तर ती त्यास मिळणार नाही. आता हा भेदभाव आहे की नाही??? कल्पना करा - तो रशियन नागरिक हा इतर सर्व बाबतीत पात्र आहे व पात्रतेपेक्षा इतर जे निकष असतात त्यांवर सुद्धा तो योग्य वाटतो पण भारताचा नागरिक नाही. आता हा भेदभाव आहे का ? नसल्यास कसा नाही ?? व मी ही अट ठेवणे ही गुलामगिरी आहे का ??? असल्यास कशी ???
माझ्या मुंबईतील कंपनीत काम
अत्यंत योग्य विरोधाभास दाखवून दिलेला आहे. तो पुरेसा स्पष्ट आहेच. यावर हेच म्हणावं लागतं की कुठल्यातरी एका बंद वर्तुळात, गटात, मानीव कुंपणातच न्यायअन्याय, भेदभाव या संकल्पना किंवा त्यांचा अभाव अस्तित्वात येऊ शकतात. गाव, देश, जग, धर्म, स्पेसीज (मनुष्य वि. इतर प्राणी) इत्यादि.
त्यामुळे अॅबसोल्यूट न्याय, अॅबसोल्यूट शोषणरहितता ही मिथ आहे हे मान्यच आहे.
सध्या प्रश्न फक्त "सोडण्याचा चॉईस आहे" या क्वालिफिकेशनवर एखाद्या गोष्टीला गुलामगिरी न समजण्याइतका मर्यादित आहे. वर्तुळच बदलणं किंवा हलवणं हे त्याचं उत्तर नव्हे. तस्मात भारतीय रशियन मुद्दा बिनतोड असला तरी "चॉईस असणे किंवा नसणे" यावर थेट गुलामगिरीचं अस्तित्व नाकारता येणं योग्य आहे का, याविषयी काय म्हणणं आहे?
"माझ्याच धर्माचा मुलगा हवा" यामागे त्या व्यक्तीच्या आसपासच्या घरच्या आणि इतर लोकांनी हळूहळू घडवत आणलेली मानसिक गुलामगिरी ऊर्फ "किलिंग द चॉईसेस" ऊर्फ "टु फोर्स समवन टु लिमिटेड चॉईसेस" हेच आहे.
ते कोणी केलेलं आहे याचं उत्तर या केसमधे कुटुंबाने, शेजार्यापाजार्यांनी, "तिच्या" धर्माच्या लोकांनी असं आहे. पण हे उत्तर प्रत्येक केसमधे वेगळं असणार. त्यामुळे ते कोणी केलं यावरुन अंतिम फळ = वैचारिक गुलामगिरी यात काय फरक पडतो?
- मूळ चर्चेसंदर्भात माझं मत अस्थानी असेल किंवा अग्राह्यही असेल पण इथे माझा मुद्दा केवळ "सोडण्याचा चॉईस आहे" या मुद्द्याचा वापर अन्याय, भेदभाव, गुलामीची शक्यताच नाकारण्यासाठी करण्याबाबत मर्यादित आहे.
"माझ्याच धर्माचा मुलगा हवा"
ह्याला काय अर्थ आहे गवि. ह्याच न्यायानी एस्क्लुसिव्ह रीलेशनशिप मधे असताना जोडीदाराशी प्रतारणा न करणे, मैत्रीत काही गोष्टी सोडुन देणे, सहन करणे - हे सर्व सुद्धा मानसिक गुलामगिरीच झाली की हो. ह्यालाच वाढवायचे झाले तर सिग्नल लाल असताना थांबणे, नो पार्कींगच्या इथे गाडी न लावणे हे सुद्धा "किलिंग द चॉईसेस" ऊर्फ "टु फोर्स समवन टु लिमिटेड चॉईसेस" हेच आहे.
तसे तर आपण जगतो त्यातली प्रत्येक गोष्ट मानसिक गुलामगिरी आहे असे म्हणता येइल.
मी ह्या गोष्टींना ट्रेड ऑफ म्हणीन. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडण्याचा विकल्प मला आहे, म्हणजे गुलामगिरी नाही.
+१
हेच मनात आले होते. अन्य अधिकच्या तडजोडी नकोत म्हणून घेतलेला निर्णय.
ह्याच न्यायानी एस्क्लुसिव्ह
हो.. तसं म्हणू की. पण "एक्स्क्लुसिव्ह रिलेशनमधे जोडीदाराने प्रतारणा केली" या क्रियेचा अर्थ दुसर्या जोडीदारावर इन गिव्हन सिस्टीम "अन्याय" झाला. समजा "जोडीदाराने मारहाण केली" तरीही अन्याय झाला. समजा "जोडीदाराने मानसिक दबाव आणून पैसे मागून मागून संपवले" तरीही अन्याय झाला. अशा प्रसंगी केवळ "या रिलेशनशिपला सोडून निघून जाणे हा मार्ग / चॉईस दोन्ही जोडीदारांना आहे की.." या आर्ग्युमेंटने तो अन्याय न्याय्य ठरत नाही. त्याला अन्यायच म्हणावं लागेल. ज्या ठिकाणी जोडीदाराला सोडून जाण्यामधे आणखी वाईट आयुष्य अपेक्षित असेल तिथे तर आणखीच वेगळी केस होईल.
अगदी अगदी.. सर्व लोकांना तो अन्याय वाटायला लागला तर हे म्हणणं आणखीनच तीव्र सत्य बनेल. शिक्षेच्या धाकाने सिग्नलला थांबायला लावणं हीदेखील गुलामगिरीच आहे असं म्हणता येईल. जर काहीजण ब्राह्मण म्हणून, किंवा भूमिपुत्र म्हणून किंवा भारतीय म्हणून, किंवा बिनबोभाट लाल सिग्नलला न थांबता जाऊ शकत असतील तर.
आहेच तसं. इनफॅक्ट "अमुक धर्माचा मुलगाच हवा" असं म्हणणं ही मानसिक गुलामगिरी आहे हे विधान मी बिनशर्त मागे घेतो..तिला मानसिक गुलामगिरी वगैरेमुळे तसं वाटत असलं तरी ती त्या निर्णयाबद्दल समाधानी आहे.
पण जिथे असं "कितना सुख है बंधन में" असं वाटत नसतं आणि तरीही लोक दुसरा चॉईस आणखी वाईट असल्याने सहन करत राहतात तिथे सोडण्याचा चॉईस "मालकाकडून" खुला आहे, इतक्या सबबीवर गुलामगिरी, अन्याय, भेदभाव या आरोपांतून पूर्ण सुटका मिळावी हे योग्य आहे?
भेदभाव
अमुक देशाचा नागरिक असायला हवा/हवी अशी अट घातली, तर अमेरिकेत तरी हा भेदभाव होईल कारण नागरिकत्वावर आधारित भेदभाव करता येत नाही. तुम्ही कायद्यानुसार या देशात नोकरीसाठी पात्र आहात का? हे मात्र विचारता येते. पण मी माझ्या कंपनीत फक्त डावखुर्या लोकांनाच किंवा स्मोकिंग न करणार्या लोकांनाच नोकरीला ठेवीन, असे म्हटले तर तो भेदभाव नाही. (अर्थात कंपनीला फेडरल-लॉ बरोबर राज्यातील कायदे पण आधी तपासावे लागतील.)
गब्बरशेट.. तुम्ही मानसिक
कैच्या कै आहे.
पण प्रश्न विचारतो - मानसिक कंडिशनिंगद्वारे घडलेली, घडवून आणली गेलेली गुलामगिरी ही कोणी घडवून आणली ??
------------------
खरंच ????
एखाद्या व्यक्तीला ती जाणीव करून देणे हे एम्प्लॉयर चे काम आहे ?? नसल्यास कोणाचे आहे ??? चॉइसेस काय आहेत ते त्या व्यक्तीस कोणी सांगावे ?? कसे ??
पर्फेक्ट
एकदम पर्फेक्ट. एम्प्लॉयर झाला म्हणजे तो चोरच असणार आणि तो नोकरांची मुस्कटदाबीच करतो, असा विचार असेल तर काय बोलणार? जाता-जाता, जर नोकरी आवडत नसेल तर नोकरी सोडून जावे, हा चॉइस उपलब्ध असतो. (परदेशात जर पासपोर्ट काढून घेतला असेल, तर ती गुलामगिरी झाली. पण त्याआधी पासपोर्ट न देण्याचा चॉइस होता, हे मात्र सोयीस्करपणे विसरले जाते.)
पैचान कौन, सॉल्लेट. The
पैचान कौन, सॉल्लेट.
The greatest success of socialism is mass production of socialists and so called well-wishers of the so called oppressed, repressed and suppressed. त्यामुळे आपल्या देशात ---- श्रीमंत हा फक्त लुटायलाच बसलेला असतो, कामगारांची फक्त पिळवणूकच होते, गरीब हे फक्त लुटलेच जातात, म्यानेजर हा नेहमी लुच्चाभेदभाव करणारा असतो, घरमालक आमची कष्टाची कमाई खाणारा आयतोबा असतो - असले कन्व्हिनियंट समज बाळगले जातात.
त्यामुळे आपल्या देशात ----
ओके.. आता हे नेहमीचं जनरलायझेशन करायचं असेल तर स्पेसिफिक पॉईंट्सना अर्थच उरत नाही. श्रीमंत हा लुटायलाच बसलेला असतो हे एक टोक, आणि सोडण्याचा ऑप्शन असलेल्या ठिकाणी जे होईल त्याला लूट अथवा भेदभाव म्हणताच येणार नाही हे दुसरे. प्रचंड डेफिशियन्सीमुळे "लुटून घ्यायला"ही जिथे रांग असते, आणि "पिळवणूक करुन घेण्या"इतपतही संधी अनेकांना मिळत नाही तिथे या आर्ग्युमेंटला मरण नाही.
असूदे.
नेमका कोणता डेटा दिला की
हा कळीचा प्रश्न आहे. केवळ याच बाबतीत नाही तर कुठच्याही बाबतीत. वैज्ञानिक विचारसरणीतला 'फॉल्सिफायेबिलिटीचा' भाग. 'माझं म्हणणं अमुकअमुक आहे, आणि जर काही विशिष्ट गोष्टी दिसून आल्या तर ते चुकीचं ठरेल' असं आधीच सांगितलेलं असलं की वाद भरकटण्याची शक्यता कमी होते.
सायंटिस्ट व कॅपिटलिस्ट मधे हा
सायंटिस्ट व कॅपिटलिस्ट मधे हा फरक असतो की सायंटिस्ट हा प्रश्नावर लक्ष केंद्रित करतो. व - आपण फार चांगला प्रश्न विचारला आहे - ह्याच्याच खुशीची गाजरं खात बसतो. कॅपिटलिस्ट - प्रश्न नव्हे, उत्तर पण नव्हे ... तर तोडग्यावर लक्ष केंद्रित करतो. याचा अर्थ सायंटिस्ट कमी महत्वाचा होत नाही. त्याचेच काम कमर्शियलाईझ करणार्या नवउद्योजकाच्या कंपनीला कॅपिटल पुरवणार्याला व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणतात.
भारतात आयटी क्षेत्रात जे झाले ते "बॉटम अप" क्रांति होती. विकेंद्रित, डिस्पर्स्ड, स्पाँटेनियस. सरकारला प्लॅन, इन्व्हेस्ट, रेग्युलेट करायला फारसा अवसरच मिळाला नाही. म्हंजे सरकारचा सहभाग शून्य आहे असे नाही. पण ...
अगदी साधी गोष्ट बघा - BCS, MCS, MCM, MCA ह्या डिग्र्या का निर्माण झाल्या ?
सायंटिस्ट व कॅपिटलिस्ट मधे हा
हे सर्वसाधारणीकण पटलं नाही. मी पुन्हा लेबलांपेक्षा वैज्ञानिक विचारसरणी अवलंबण्यात फॉल्सिफायेबिलिटी हे महत्त्वाचं अंग कसं असतं याबाबत बोलत होतो. लेबलांचा प्रॉब्लेम असा होतो की त्याखाली चांगले आणि वाईटही येतात. चांगला वैज्ञानिक नुसतेच प्रश्न विचारत नाही, तर उत्तर म्हणजे काय, काय डेटा मिळाला तर उत्तर पूर्ण होईल, याबाबत जाण ठेवून असतो. त्यासाठी डेटा गोळा करणारे हेही वैज्ञानिकच असतात. त्या डेटावरून आधीचा हायपोथिसिस टाकून द्यायचा की थोडासा बदलून अधिक समृद्ध करायचा हे ठरवणारेही वैज्ञानिकच असतात. कुठल्याही व्यवसायाप्रमाणे हाही व्यवसाय पद्धतशीरपणे करणारे आणि इतरांपेक्षा अधिक इनसाइट असलेले वैज्ञानिक असतात. आणि ते यशस्वी होतात. कॅपिटालिस्ट या व्यवसायाचंही तसंच आहे. पॉंझी स्कीमला बळी पडून पैसे गुंतवणारे आणि गमावणारेही कॅपिटालिस्टच असतात. पण ते अयशस्वी होतात. काही कॅपिटालिस्ट आपल्या रिसोर्सेसचा वापर चांगल्या पद्धतीने करतात (किंवा नशीबाने त्यांचे पैसे चांगल्या जागी पडतात आणि फळतात-फुलतात) ते यशस्वी होतात.
मानलं तुम्हास.
मानलं तुम्हास.
हे बरय
हे बरय. असलं काहीतरी कौतुकात्मक लिहून विषय तिथल्यापुरता मिटवायचा; पण स्वतःच्या मतात काडीचाही बदल/सुधारणा करायचीच नाही. सगळे तर्क आणि विदा खुबीनं अर्धवट वापरायचे;(त्यातील तार्किक दोषासकट) ही तुमची कार्यपद्धती. आताच स्वतःच्या मतातली जी तफावत मान्य केलेली असते; ती पूर्णतः तशीच सोडून देउन पुन्हा बाजूच्या धाग्यांवर तेच आणि तसलच लिहित सुटायचं. लोकं पुन्हा पुन्हा तुम्ही आधीच मान्य केलेले मुद्दे तुम्हाला पुन्हा पुन्हा पटवून देत बसतात. शेवटी लोकं थकले की तुम्ही "जितं मया. हुर्रे. जिंकलो. कुणी प्रतिवाद करायलाच आलं नाही." असला कैतरी ष्ट्यांड घ्यायला मोकळे.
राघांच्या बाजूत तथ्य वाटत असेल; तर आता इतरत्र रद्दड प्रो-धनदांडगे विचार पाजळत बसणं थांबव.
.
.
तुझ्याच ष्टायलित :-
संभाव्य आक्षेप :-
अॅड होमोनिम ; अॅड होमोनिम ; असा गलका होणार सुरु लवकरच आता.
मआंजावर चर्चा केल्यानंतर
मआंजावर चर्चा केल्यानंतर स्वतःच्या मतात बदल/सुधारणा करणारे कोणकोण आहेत हात वर करा बघू.
माझा हात वर करण्याची स्मायली
माझा हात वर करण्याची स्मायली कल्पावी.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मला हे सहर्ष मान्य करायला
मला हे सहर्ष मान्य करायला आवडेल की मी माझ्या मतात बदल केलेला आहे. मनःपूर्वक मान्य करतो. व हे मान्य करायला खूप आवडेल.
सलमान च्या केस मधे - सलमान ची चूक असली तरी त्या पदपथावर झोपलेल्या व्यक्तीची ही चूक आहे असा माझा मुद्दा होता. तो चूक होता. नंतर माझ्या लक्षात आले. नितीन थत्तेंनी सॉल्लिड पॉइंट मांडल्यामुळे. माझी बाजू चूकच होती. सहर्ष मान्य करतो.
खटल्यात पराजित व्यक्तीने नुकसानभरपाई द्यायची असते. मी त्या धाग्यातील चर्चेत भाग घेतलेल्या सगळ्यांना पार्टी देतो. चांगल्या हॉटेलात. मस्त बिर्याणी + टेकिला. अर्थातच थत्ते सायबांना स्पेशल काहीतरी देईन.
एका बॅटल मधे प्रतिद्वंद्वींचा
एका बॅटल मधे प्रतिद्वंद्वींचा पार्शल तह किंवा पार्शल पराजय किंवा पार्शल विजय झाला म्हणून त्यांनी अख्खी वॉर स्ट्रॅटेजी सोडावी ?????
( हा मनोबा ला दिलेला प्रतिसाद आहे.)
भारतात आयटी क्षेत्रात जे झाले
I have provided the data by WEF on the status of IT and IT-eS in India above. कृपया तो वाचून मग क्रांति हा शब्द वापरा. क्रांति हा शब्द फार पुढचा आहे. केवळ सामान्य विकास झाला असे देखिल म्हणावयास प्रगतीची जी मानके आहेत त्यात भारताचे काय स्थान आहे?
------------------------------------------------------------------------------------------------
कै च्या कै असं वारंवार म्हणण्यापूर्वी 'नक्की काय' हे देखिल पहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------
भिकार्याच्या तोंडात शेंगदाणा पडला म्हणजे क्रांति होत नाही. आपण खुद्द तो शेंगदाणा असिमिलेट करणारी पेशी आहोत याचा अर्थ सारे शरीर पाचक अन्नाने संपृक्त झाले आहे असा होत नाही. आय टी वाल्यांनी हा गैरसमज सोडून द्यावा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
विज्ञान आणि विज्ञानप्रसार
विज्ञान आणि विज्ञानप्रसार यांच्यातला फरक, थिल्लर पत्रकारिता यांच्याबद्दल एक चांगला लेख -
I Fooled Millions Into Thinking Chocolate Helps Weight Loss. Here's How.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मस्तं लेख! आवडला प्रयोग!
मस्तं लेख! आवडला प्रयोग!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
'International Yoga Day'
'International Yoga Day' matter of pride for India: Narendra Modi
आता लगेच "हे भारतातल्या सर्वधर्मसमभावाचे यश आहे" असे या ना त्या मार्गाने वा या ना त्या शब्दात व्यक्त करायचा यत्न होईल. योगसाधना ही धर्मातीत असते किंवा योगसाधनेस धर्म नसतो - असले डायलॉग मारले जातील (उदा कुमार केतकर). ह्याबद्दल देशाला अभिमान का वाटावा - असा प्रश्न उपस्थित केला जाईल.
-------------
Narendra Modi will be first Indian PM to visit Israel and Palestine
काय तेजायला.
इस्रायल ला भेट देणे ही प्रशंसनीय बाब आहे. इस्रायल आपला मस्त मित्र आहे व ही मैत्री फुलु शकते वाढू शकते.
पण त्या पॅलेस्टाईन ला कशाला ? Palestinians have never missed the opportunity to miss the opportunity to form their own state. दरिद्री लेकाचे. सगळा अरबस्तान त्यांच्या पाठीशी असूनही (पैसे, राजकीय पाठिंबा, मिलिटरी सपोर्ट, डिप्लोमॅटिक सपोर्ट सगळं असूनही. अगदी दहशतवादी सपोर्ट असूनही.) सारखं रडगाणं गात असतात.
मोदी सरकारच्या फायनान्शिअल
मोदी सरकारच्या फायनान्शिअल इन्क्लुजनच्या योजना आणि त्यातल्या तृटी यांचा आढावा घेणारा लेख.
http://www.moneylife.in/article/making-social-schemes-work/41899.html
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कोट्याधीश झाला संन्यासी
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.