याकूबला फाशी
याकूबला शेवटी फाशी दिलीच. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचेही शेवटपर्यंत एकमत होत नव्हते. हाच न्याय पंजाब, तमिळनाडूतील आरोपींना लावला गेला नाही. राजकीय पाठिंबा नसल्याने शेवटी याकूब गेलाच.
असो लोकसत्ताचा अग्रलेख आवडला. एकंदरीत टायगर आणि दाऊद ह्या मुख्य जबाबदार व्यक्तींच्या कृत्याची शिक्षा याकूबला झाली अशी भावना हा लेख वाचूून झाली आहे. असंगाशी संग प्राणाशी गाठ या म्हणीचा चोख प्रत्यय या घटनेतून येतो. बाकी देशभक्तांचा उन्माद बघवत नाही. अनेकांना शिक्षेच्या अंमलबजावणीनंतर समाधानही वाटले आहे. असो.
!
उद्वेग
.
.
.
आणि उन्माद, उच्छाद वगैरे.
ही अजून उद्वेगजनक माहिती.
ही अजून उद्वेगजनक माहिती. विशेषकरून बातमीतला तो तक्ता बघा.
@अतिशहाणा, हा प्रतिसाद
@अतिशहाणा, हा प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नाही. पण मला एकुणातच काही प्रश्न पडलेले आहेत. त्याबद्दल ऐसीवरच्या लोकांकडे उत्तरं आहेत का किंवा त्यांना काय वाटतं हे जाणून घ्यायला आवडेल.
१. याकूब मेमन कुठल्याच प्रकारे बाँबस्फोटाच्या कटात सामील नव्हता काय? किंबहुना स्फोटाची बरीचशी लॉजिस्टिक्स त्यानेच हाताळली होती असे सिद्ध झाले आहे. असे असताना मेमन कुटंबीयांना टायगरच्या उद्योगांची कल्पना नव्हती आणि याकूब बिचारा अनावधानाने यात ओढला गेला या लोकसत्ताच्या अग्रलेखात रंगवलेल्या चित्राला किती अर्थ आहे?
२. आपली न्यायव्यवस्था अत्यंत प्रोसेस ड्रिव्हन आहे. माझ्या अल्प ज्ञानानुसार उच्च आणि त्यावरील न्यायालये बर्याचदा पुराव्यांपेक्षा केसचे प्रोसीजर आणि कायदेविषयक आस्पेक्ट्स जास्त विचारात घेतात (जर पुराव्यांच्या गुणात्मक वैधतेबद्दल शंका नसेल तर), कारण पुराव्यांची मांडामांड आधीच खालच्या न्यायालयात नीट होणे अपेक्षित असते. याकूबच्या खटल्यात त्याबद्दलही काही प्रश्न नव्हता असे दिसते. सर्वोच्च न्यायालयाने २ वेळा वेगवेगळ्या विनंती अर्जांच्या सुनावणीच्या वेळेला सांगितले आहे की शिक्षा सुनावताना कुठलाही प्रोसीजरल लॅप्स झालेला नाही. कायद्याची प्रक्रिया योग्य रीतीने पाळली गेली आहे. मग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरही लोक शंका का घेत आहेत? आणि न्यायमूर्तींचे एकमत झाले नाही याबद्दल बोलायचे तर त्यासाठीच आपल्याकडे बेंचची व्यवस्था आहे. आता यापेक्षा अधिक चेक्स आणि बॅलन्सेस कुठे आणि कसे असणे आवश्यक आहेत आणि अशा प्रकारच्या प्रोसीजर्सना निर्णायक अंत कुठे असायला हवा? अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर किंवा त्याच्या गुणवत्तेवर शंका घेतली जात असेल (तसे असण्यातही काही गैर नाही पण त्याचा निदान आदर तरी करायला हवा, इथे थेट सर्वोच्च न्यायालयाच्या हेतूवरच लोकं प्रश्न विचारतायत), तर काही दिवसांनी सर्वोच्च न्यायालयाची सामान्य जनतेमधली प्रतिमाही मलिन होऊन लोकांचा न्यायसंस्थेवरचा विश्वास कायमचा उडून जाईल. याबद्दल कोणीच काही बोलायला तयार नाही.
नशीब न्यायाधीस मोदींनी
नशीब न्यायाधीस मोदींनी नेमलेले नाहीत. अगोदरपासूनचे आहेत. नाहीतर हा निकाल चिंताजनकच नव्हे तर विनोदी देखिल मानला गेला असता.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
नशीब न्यायाधीस मोदींनी
शॉल्लेट.
न्यायालयाबाबत शंका नाही
न्यायालयाबाबत मला अजिबात शंका नाही. मात्र न्यायालये प्रोसेसला बांधील आहेत. नवीन पुरावे प्रकाशात आल्यानंतर (उदा. बी रमण यांचा लेख) त्याची हाताळणी कशी केली जाते याबाबत मला माहिती नाही. विशेषतः उज्ज्वल निकमांसारखे पब्लिक प्रोसिक्युटर असल्यावर अशा पुराव्यांची मांडणी योग्य प्रकारे होणार नाही याची खात्रीच वाटते. (याच महाशयांनी जनतेत खळबळ माजवून देण्याकरिता कसाब-बिर्याणी प्रकरणाचे पिलू सोडले होते).
शिवाय न्यायालयाच्या सर्वच निर्णयांचा आदर करावा अशी मागणी होत नाही. श्रीकृष्ण आयोगाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे काय झाले? न्यायदान हे केवळ राजकीयदृष्ट्या सोयीस्कर पद्धतीने होते आहे अशी प्रतिमा होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
नवीन पुरावे प्रकाशात
नवीन पुरावे प्रकाशात आल्यानंतर (उदा. बी रमण यांचा लेख) त्याची हाताळणी कशी केली जाते याबाबत मला माहिती नाही.
बी रमण ह्यांचा लेख / नवीन पुरावा(?) प्रकाशात कधी आला? खरंतर हा पुरावा नाहीच आहे, पण तो प्रकाशात आला तो फाशीच्या ७ दिवस आधी. ह्याच लेखात याकुब दोषी आहेच असेही म्हणण्यात येते. पण फक्तं त्याने केलेल्या सहकार्यावरून त्याला फाशी होऊ नये असे म्हंटले आहे. त्याने केलेल्या सहकार्याचा विचार सर्वोच्च न्यायालयाने केला नसेल? तिथले न्यायाधिश एवढा विचार न करण्याइतके दुधखुळे नसावेत असे वाटते. खरेतर बी रमण ह्यांच्या लेखाला तो प्रकाशीत करून खळबळ मजवली ह्याखेरीज महत्व देऊ नये. सर्वोच्चं न्यायालयाने २०१३ मधेच फाशी कायम ठेवल्यावर शीला भट किंवा बी रमण ह्यांनी काही पाऊले का उचलली नाहीत. स्वतःकडे असलेली माहिती किंवा सबळ पुरावा लपवून याकुबला झालेल्या फाशीसाठी शीला भटला जबाबदार का धरू नये?
न्यायलयाने स्पष्टं सांगितलय की याकुबला स्वतःच्या बचावासाठी सगळ्या संधी आणी वेळ देण्यात आला होता. त्याला होणार्या शिक्षेच्या प्रोसीजर मधे कुठेही चूक झाली नाही. गुन्हेगार आहे हे माहित असूनही फाशीच्या आदल्या रात्री/सकाळी ३ वाजता न्यायालय उघडून आरोपीच्या वकीलाचा आरोपीला वाचवायचा अखेरचा प्रयत्नही व्यवस्थीत हाताळला, जेणेकरून न्यायव्यवस्थेवर कोणी बोट ठेवू नये. येवढं असतानाही, न्यायसंस्थेवर आणि निर्णयावर काही लोक शंका घेतात ह्याचा खेद वाटतो.
-अनामिक
मुद्दे मान्य आहेत
न्यायसंस्थेवर शंका नाही हे आधीच लिहिले आहे. निर्णयांच्या अंमलबजावणीची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्या हेतूंबाबत शंका आहे.
>>नवीन पुरावे प्रकाशात
>>नवीन पुरावे प्रकाशात आल्यानंतर (उदा. बी रमण यांचा लेख) त्याची हाताळणी कशी केली जाते याबाबत मला माहिती नाही.
बी.रमण यांचा लेख पुरावा म्हणून मानला जाऊ शकतो का? आणि मुख्य म्हणजे कुठल्याही सरकारी अधिकार्याला/संस्थेला एखाद्या आरोपीला तुला कठोर शिक्षा (या ठिकाणी फाशी) होणार नाही असे आश्वासन देता येते काय? तसे आश्वासन दिले असल्यास ते कायदेशीर मानले जाते काय?
>>श्रीकृष्ण आयोगाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे काय झाले? न्यायदान हे केवळ राजकीयदृष्ट्या सोयीस्कर पद्धतीने होते आहे अशी प्रतिमा होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
श्रीकृष्ण आयोगाचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा किंवा एकंदर न्यायसंस्थेचा संबंध कसा आला हे कळाले नाही. श्रीकृष्ण आयोग माझ्या माहितीनुसार सरकारनेच नेमलेला चौकशी आयोग होता. अशा आयोगांचे सोयीस्कर नसलेले चौकशी अहवाल, केवळ ते स्वीकारणे बंधनकारक नाही म्हणून, न स्वीकारण्याची परंपरा आपल्या देशात खूप जुनी आहे.
दंगलीसंदर्भात
मुंबई दंगलीत एकहजारापर्यंत लोक मेले. त्याबाबत श्रीकृष्ण आयोग वगळता इतर माध्यमातून (विशेष न्यायालय इ.) काही शोधाशोध झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे श्रीकृष्ण आयोगाचे उदाहरण घेतले.
याकुबला शिक्षा झाली. OK .
याकुबला शिक्षा झाली. OK . न्याय झाला.
बाबू बजरंगी , माया कोडनानी आणि साध्वी प्रज्ञा यांना कधी शिक्षा (खरी !) होतेय या प्रतिक्षेत आहे. सध्या तिघही जामिनावर सुटून नॉर्मल लाइफ जगत आहेत.
+१
राजीव व इंदिरा गांधींच्या मारेकर्यांनाही कधी शिक्षा होतेय याच्या प्रतीक्षेत. झालं हे छानच, आता हे बाकीचंही आटपा म्हणावं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
इंदिरा गांधी? श्योर?
इंदिरा गांधी? श्योर?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
माझ्या प्रतिसादातं
चूक असू शकते. तसं वाचनात आल्यासारखं आठवतंय खरं. किमान राजीव गांधीचे मारेकरी तरी जिवंत आहेत, रैट्ट? शिवाय पंजाब विधानसभेतूनही कडवा विरोध वगैरे झाला होता असे वाचल्याचे आठवते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
इंदिरा गांधी नाही बिएंत सिंग
पंजाबचे मुख्यमंत्री बियंत सिंग यांच्या हत्येच्या आरोपींना दिलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्यासाठी पंजाबच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रयत्न केले होते.
http://www.ibnlive.com/news/politics/alerts-rajoana-459966.html
धन्यवाद. गफलत झाली.
धन्यवाद. गफलत झाली.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बाबू बजरंगी , माया कोडनानी
यांना फाशी का नाही आणि याकुब मेमनला का हे खरच समजत नाही. पण साध्वीवर मोक्का लावता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने देखील म्हटलं होतं. तिच्यावरचा गुन्हा अजून शाबित झालेला नाही बहुधा.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
देशभक्तांचा उन्माद बघवत
आपले मत वाचून सुन्न झालो आहे!!
देशद्रोह्यांच्या उन्मादाचे काय? १२ मार्च ९३ ला मुंबईच्या एका रुग्णालयात काम करीत होतो. त्यावेळी आलेल्या जखमींना नेमकं काय झालंय ही देखील कळत नव्हतं.(अजून आपल्याला बाँबस्फोटांची 'सवय' झालेली नव्हती).
याकूबची चूक नव्हती..जे मेले- जखमी झाले त्यांचीच चूक असावी बहुतेक! त्यांच्या आप्तेष्टांना मनातल्या मनात समाधान देखील वाटू नये का?
कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||
याकूब निर्दोष आहे असे मी म्हटले नाही
याकूब निर्दोष आहे असे मी म्हटलेले नाही. महेश भट्ट किंवा मार्कंडेय काटजू वगैरे मंडळी सोडून द्या पण सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एच एस बेदी यांनीही अशी मागणी केली होती. मेननच्या अपीलावरील चर्चेत विद्यमान न्यायाधीशांमध्येही मतभेद झाल्याने नवीन बेंच स्थापन करुन निकाल करावा लागला. दुर्मिळात दुर्मिळ अशा खटल्यामध्ये (उदा. निर्भया किंवा कसाब खटला) या स्वरुपाच्या शंका इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होत नाहीत.
मेननच्या अपीलावरील चर्चेत
हा मतभेद कोणत्या मुद्द्यावरुन होता याची काही कल्पना आहे का? म्हणजे तथ्यांवरुन होता की प्रोसिजर वरुन होता?
अगदी अगदी. केवळ प्रोसीजरवरून,
अगदी अगदी. केवळ प्रोसीजरवरून, क्युरेटीव्ह पिटिशनला आम्हाला का बोलावलं नाही यावरून मतभेद होते. यावरून फाशीबाबत मतभेद होते असं म्हणणं चूक आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मुळात त्याच न्यायाधीशांच्या
मुळात त्याच न्यायाधीशांच्या खंडपीठाने फेरविचार याचिकाही फेटाळली होती हे सांगायला सगळे विसरले. मुळात हे माहिततरी होते का हा प्रश्न आहे.
१. शंभर गुन्हेगार सुटले तरी
१. शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण..... अशा तत्त्वावर चालणार्या न्यायव्यवस्थेत शिक्षा झालेली आहे.
२. याकुब मेमण हा बॉम्बस्फोटांचे लॉजिस्टिक्स सांभाळत होता असे सिद्ध झाले आहे असे न्या. कोडे यांनी म्हटले.
अशावेळी फाशी देण्याविरोधात एकमेव मुद्दा हा असू शकतो की टाडा कायदा अस्तित्वात नसता तर याकुब मेमणला फाशी झाली असती का? म्हणजे टाडा कायद्यातील काही (उदा. प्रिझम्प्टिव्ह) तरतुदींमुळे मेमणला फाशी झाली आहे का?
अदरवाइज त्याला फाशी दिले गेल्याबद्दल काही दु:ख व्हायचे कारण नाही.
--------
अवांतर: फाशीची शिक्षा असूच नये या मताला माझा पाठिंबा नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
माफीचा साक्षीदार?
मला एक प्रश्न आहे. याकूब माफीचा साक्षीदार होता. 'माफीचा' म्हणजे त्यात नक्की काय प्रमाणात माफी अभिप्रेत असते? अशा साक्षीदारांना न्यायव्यवस्थेत काही संरक्षण असतं का? जोशी अभ्यंकर खून खटल्यात एक माफीचा साक्षीदार होता. त्याला फाशी झाली होती की जन्मठेप की आणखी काही? कारण ते आयबीमधले रमण म्हणून आहेत त्यांच्या लेखात तसा काही सूर वाटला -
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
जोशी अभ्यंकर खून खटल्यात एक
होय मुनवर शहा. त्याचे "आय अॅम गिल्टी" पुस्तक मी लहानपणी वाचलं होतं.
नाही
जोशी अभ्यंकर खून खटल्यात सुहास चांडक हा माफीचा साक्षीदार होता, मुनवर शहा न्हवे.
मुनवर शहाचे "आय अॅम गिल्टी" पुस्तक मी पण लहानपणी वाचलं होतं, ज्याच्यावर सरकारने नंतर बंदी घातली होती. ती बंदी योग्यच होती असे माझे मत ते पुस्तक वाचल्यावर झाले होते, ते पण आठवते.
अधिक माहितीसाठी:
http://web.archive.org/web/20120312021955/http://www.rahulchandawarkar.c...
ओह असू शकते. या पुस्तकात
ओह असू शकते.
या पुस्तकात जक्कल-सुतार यांच्या मनोवृत्तीचे लहानपणीचे अत्यंत विकृत व क्रूर उदाहरण - मांजराचे हाल करणे वगैरे दिल्याचे स्मरते.
शंभर गुन्हेगार सुटले तरी
हे तत्त्व कुठे आहे?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
लेखात उन्मादा बद्द्ल म्हटलेलं
लेखात उन्मादा बद्द्ल म्हटलेलं ठिकाय पण 'संजय दत्तच्या तुलनेत याकुबचा गुन्हा किरकोळ ठरतो' हे विधान, किंवा राजीव गांधीच्या मारेकर्^यांबद्द्लचे विधान आश्चर्यकारक आणि बेजबाबदारपणाची आहेत.
असं वाटतय की सूडाच्या साखळीतील एक कडी वाढवली गेलीय .
राजकीय पाठिंबा
????????????
काहीच कळलं नाही.
फाशी कशी मॅन्यूप्यूलेट करत असावेत राजकारणी?
आणि हे होत असेल तर बाकीच्या कोणत्याही न्यायादानाला मॅनिप्यूलेशन मानता यावं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तुम्ही मुद्दामहून वेड पांघरता
तुम्ही मुद्दामहून वेड पांघरता की खरोखरच निरागस आहात, असा प्रश्न पडतो मला अनेकदा. असो. हे काही पॉलिटिकली करेक्ट विधान नव्हे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
लूज एंड
आवेश, उन्माद, क्रोध, खवचटपणा, *, *, *, इ भाव जे माझ्या प्रतिसादांत असतात त्यांमागे कोणती स्किमिंग नसते. I want to be as blunt as I can be in expressing myself. संवादाचे सामाजिक संकेत पाळत जर शिष्ट संवाद केले तर जी उथळ मते ऐकायला मिळतील ती मला अगोदरपासूनच माहित आहेत. त्यासाठी उगाच ऐसीवर टाइप करत बसायची गरज नाही.
आपल्याला अनेक विचारसरणींची नावड असते. पण अशा विचारसरणीत आस्था असणारा बेअक्कल असेल असे मानून चालणे मला माजोरडेपणाचे वाटते. म्हणून जेव्हा रोचक मतांतरे आढळतात तेव्हा मी त्यांचा आधार जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. यातून कधी आपले मत बदलते. कधी अधिकची माहिती नि पर्स्पेक्टीव मिळतात. कधी मत कमी कडवट बनते. कधी मत अगदी किंचितही नाही बदललं तरी समोरच्याने मांडलेला पक्ष एक प्रकारचा वैचारिक परिणाम करून जातो.
पण चर्चा चालू करण्यासाठी, चालू ठेवण्यासाठी, समोरच्याला पोलिटिकली करेक्ट, शिष्ट मोडमधून बाहेर काढण्यासाठी, थोडे प्रयत्न लागतात. यातला एक म्हणजे समोरच्याच्या विधानातला एक लूज एंड पकडणे. मग त्याने टिपिकल जालीय गुणगाण पद्धतीने केलेली व्यक्तिगत टिका दुर्लक्षून केवळ मुद्द्याचं बोलत राहणे. This is a mere dialogue tactics.
आता हे सगळं लिहिल्यानं अतिशहाणा (च्यायला, काय आयडी आहे.)माझ्या पोकिंगला बळी पडणार नाहीत. पण या निमित्तानं कोणी 'चांगल्या' देशांत न्यायपालिका राजकारण्यांपासून दूर कशी ठेवतात, ठेवू शकतात, एखादे उदाहरण जिथे न्यायपालिका जनभावना वा राजभावना नाकारून न्याय करू शकली, भारतीय घटनेत काय तरतूदी आहेत, त्या ढेपाळल्या आहेत का, कशा, किती, असल्यास दुस्रुस्तीसाठी पुढे काही करता येईल का यावर सदस्यांची मते त्यांच्या प्रतिसादांतून येऊ शकतात. हा प्रश्न विचारण्यामागचा मूळ उद्देश आहे.
-------------------------------------------
*** निरर्थकपणा, मूर्खपणा आणि विनोदीपणा as perceived by readers
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सर्वोच्च न्यायालयाच्या
हे थोडे विनोदी सादरीकरण नव्हे काय?
अगदी शेवटी एकमत झाले नसते तरी चालले असते हो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हाच न्याय पंजाब, तमिळनाडूतील
पंतप्रधाना, मुख्यमंत्र्यांपेक्षा जनतेच्या प्राणाचे मोल अधिक आहेत असे सर्वोच्च न्यायालयास वाटत असावे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सर्वोच्च न्यायालय नाही
शिक्षेस स्थगिती देण्याचे मूळ कारण तमिळनाडू आणि पंजाबमधील विधानसभांची मागणी हेच आहे. याच न्यायाने हिंदू-शिख दहशतवाद्यांच्या प्राणाचे मोल हे मुसलमान दहशतवाद्यांपेक्षा अधिक आहे असे मानावे काय?
नथूराम गोडसेने (अगदी मराठवाडा
नथूराम गोडसेने (अगदी मराठवाडा मुक्ती संग्रामात भाग घेऊनही, जिथे त्याला दंगा करायला फूल स्कोप होता) एका मुसलमानास चापट देखिल मारलेली नाही आयुष्यात. शिवाय त्या मूर्खाला राष्ट्रप्रेम म्हणजे नक्की काय याबद्दल बरेच भ्रम झालेले असले तरी त्याला ज्या मूल्यात अंतिम आस्था होती ते राष्ट्रप्रेमच होते. १९४७ च्या दंग्यांत किती लोक मेले? दंग्यांत खूनाखूनी करणारे किती जण फासावर गेले? तरीही त्याला पहिली फाशी झाली. मग पुणेरी ब्राह्मण दहशतवाद्याच्या प्राणाचे मोल अजूनच कमी आहेत का? आज अगदी नथूरामाचे सिंपथायझर असलेले पुणेरी ब्राह्मण "सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टीने विविध जातींच्या प्राणांचे तौलनिक मोल" या विषयावर चर्चा करतात कि काय? आणि नको नको ते अर्थ काढतात?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
शिक्षेस स्थगिती देण्याचे मूळ
माझं आतापर्यंत आपणांस दोनदा विचारून झालं आहे. न्यायपालिका आणि विधानपालिका यांच्यातलं सेपरेशन नक्की कुठे बोंबललं?
एकतर तुम्ही काहीच्या काही विधान करत आहात वा देश कसा चालतो त्याबद्दल आम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग नाही. नक्की काय?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सहमत आहे
सहमत आहे.
मला वाटते दोन्ही
अशाच अर्थाचा स्क्रोलमधला
अशाच अर्थाचा स्क्रोलमधला गिरीश शहाणेंचा लेख.
The message is clear: The BJP is against terrorists only if those terrorists are Muslim
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
>>The BJP is against
>>The BJP is against terrorists only if those terrorists are Muslim
बीजेपीला खास सिंगलौट करायचे कारण नाही. आधीच्या सरकारनेही राजीव गांधींच्या मारेकर्यांना फाशी दिले नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+१
मान्य आहे. स्क्रोलमधील लेखाचा आशय योग्य असला तरी केवळ बीजेपीवर आरोप करणे चुकीचे वाटले.
शीर्षकाचा मुद्दा मान्य. पण
शीर्षकाचा मुद्दा मान्य.
पण राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना फाशी झाली नाही हा मुद्दा शहाणेंच्या विधानाला पुष्टी देणारा आहे. मारेकरी मुस्लिम नाहीत, फाशी झाली नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ती फाशी का झाली नाही असे
ती फाशी का झाली नाही असे आपणास वाटते?
लेखातलं उद्धृत - Rajiv
लेखातलं उद्धृत -
Rajiv Gandhi’s killers were spared the noose on grounds of inordinate delay, even though Patil rejected their mercy plea.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मग इथे त्यांच्या धर्माचा
मग इथे त्यांच्या धर्माचा मुद्दा कुठे आला?
आख्खा लेख इथे चिकटवू का
आख्खा लेख इथे चिकटवू का पुन्हा लेखाचा दुवा दिलेला पुरेल?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तुम्हाला राग आला असेल तर माफ
तुम्हाला राग आला असेल तर माफ करा पण मला कळत नाहीये म्हणुन विचारतो आहे की सर्वोच्च न्यायालयाने जर राजीव गांधींच्या मारेकर्यांची शिक्षा फाशी वरुन जन्मठेप केली असेल तर धर्माचा मुद्दा कसा काय आला?
(केलं माफ, तुम भी क्या याद
(केलं माफ, तुम भी क्या याद करोगे किस दिलदार से पाला पडा था.)
धर्माचा मुद्दा ढळढळीतपणे समोर येतो असं शहाणेंचं म्हणणं असल्याचं मलातरी दिसत नाही. गुन्हेगार, विशेषतः खुनी, दहशतवादी लोक मुस्लिम असतील तर त्यांच्या मागे राजकीय बळ उभं राहत नाही. सारख्या गुन्ह्यांसाठी हिंदू, शीखांना जन्मठेप होते आणि मुसलमानांना फाशी असं चित्र उभं राहतंय असा शहाणेंचा दावा आहे.
अशाच प्रकारचा युक्तिवाद मांडणारा, गेल्या महिन्यातला न्यू यॉर्करमधला लेख. Revenge Killing - Race and the death penalty in a Louisiana parish. (या लेखातल्या संबंधितांशी भारतीय, मराठी लोकांचे राजकीय-सामाजिक लागेबांधे नसल्यामुळे कदाचित हा युक्तिवाद अधिक संयुक्तिक वाटेल. कदाचित नाही. किंवा कसंही.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
राजकीय फायदे
काही अंदाज
१. राजीव गांधींच्या हत्येस जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे असा मतप्रवाह जनतेत दिसला नाही. उदा. राजीव गांधींची हत्या करणाऱ्यांपेक्षा 'अमर जवान' ज्योतीला लाथ मारणारे अधिक देशद्रोही आहेत असा एक साधारण मतप्रवाह दिसतो. (महात्मा गांधी, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांना आपआपल्या कर्माची फळे मिळाली असे मानणारे अनेकजण ओळखीचे आहेत त्यामुळे त्यात आश्चर्य वाटत नाही)
२. गुन्हा काय आहे याचबरोबर गुन्हेगार कोण आहे यावरही शिक्षा ठरवावी असा अनेकांचा कल दिसतो.
२. तमिळनाडूतील पक्षांचा (द्रमुक किंवा अद्रमुक) या हल्लेखोरांना असलेला पाठिंबा व मध्यंतरीच्या काळात केंद्रातील सर्वच विविध सत्ताधाऱ्यांना या पक्षांचा आवश्यक असलेला आधार
३. हल्लेखोरांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांना माफी दिल्याने अधिक राजकीय फायदे होऊ शकतात अशी काँग्रेसची अपेक्षा
मुद्दा क्र. ३ रोचक आहे.
मुद्दा क्र. ३ रोचक आहे. त्यामुळे धर्माचा मुद्दा निकालात निघतो.
एनीहाऊ, राजीव गांधीच्या मारेकर्यांना फाशी दिली तर मोदी सरकारचा फायदाच आहे की. काँग्रेसची अजूनच जळेल. ते कोडनानी वगैरेंबद्दल मौन पाळूनही फक्त इतके केले तरी फायदाच आहे असे वाटते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मोदी करतील असे वाटत नाही
जयललिता आणि मोदींचा बंधुभाव लक्षात घेता मोदी असे काही करतील याची शक्यता शून्यवत आहे.
राजीव गांधींच्या मारेकर्यांची
राजीव गांधींच्या मारेकर्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बदलली आहे.
त्यासंबंधीची बातमी
युपीए सरकारने क्युरेटिव्ह पेटिशन दाखल केली होती त्यावरच्या निकालासंबंधीची बातमी.
त्यामुळे काँग्रेस सरकारने फाशी दिली नाही असे म्हणणे कितपत बरोबर आहे?
शिक्षा का बदलली आहे?
तुमच्याच दुव्यात कोर्टाने शिक्षा का बदलली याचे उत्तर आहे. काँग्रेस सरकारने फाशी दिली नाही आणि दयेच्या अर्जावरील निकाल लांबवत ठेवला यामुळे कोर्टाने फाशीची शिक्षा बदलली.
एस नलिनी हीची शिक्षा बदलण्याचे कारण सोनिया-प्रियांका गांधी उभयतांनी केलेली विनंती
काय धर्माचे तुणतुणे लावले आहेत?
काय धर्माचं तुणतुणं लावलं आहेत. राजीव गांधी हत्याप्रकरणी पहिल्या न्यायालयाचा निकाल आला १९९८ मध्ये. त्यानंतर सुप्रीम कोर्टात अपीले वगरे पूर्ण झाली २००० पर्यंत. त्यानंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज गेला. असा दयेचा अर्ज आल्यावर राष्ट्रपती तो गृह मंत्रलयाकडे अभिप्रायासाठी पाठवतात.गृहमंत्रालयाचा अभिप्राय आल्याशिवाय राष्ट्रपती काही निर्णय घेऊ शकत नाहीत. हा दयेचा अर्ज फेटाळला प्रतिभा पाटील यांनी २०११ मध्ये. http://indiatoday.intoday.in/story/president-pratibha-patil-rejects-merc...
२००० ते २०११ या काळात या दयेच्या अर्जावर नक्की कोण झोपून होते-- गृहमंत्री की राष्ट्रपती हे मला माहित नाही. ते त्या काळातले गृहमंत्री अडवाणी, शिवराज पाटील आणि चिदंबरम आणि राष्ट्रपती नारायणन, कलाम आणि प्रतिभा पाटील यांनाच माहित. त्यातील नारायणन आणि कलामसाहेब तर गेलेच. शेवटी कोर्टाने म्हटले की २००० ते २०११ म्हणजे ११ वर्षे दयेच्या अर्जावर निर्णय घ्यायला लागणे हे त्या कैद्यांच्या दृष्टीने क्रौर्य झाले. आणि ते बरोबरही आहे म्हणा. एकतर या दयेच्या अर्जावर त्या व्यक्तीचे जीवन-मरण अवलंबून असते.आणि अशा परिस्थितीत ११ वर्षे कोणालाही टांगून ठेवणे हे क्रौर्यच झाले. म्हणजे दररोज सकाळी उठताना--आज आपला अर्ज नामंजूर होणार तर नाही ही टांगती तलवार आणि दररोज रात्री झोपताना-- उद्या आपला अर्ज नामंजूर तर होणार नाही ही टांगती तलवार ११ वर्षे टांगून ठेवणे हे नक्कीच क्रौर्य आहे. या कारणासाठी सुप्रीम कोर्टाने फाशी रद्द केली.
भुल्लरच्या केसमध्येही तेच झाले. राष्ट्रपतींनी दयेच्या अर्जावर निकाल द्यायला उशीर केला म्हणून कोर्टाने फाशी रद्द केली. राजोना प्रकरण मी फॉलो केलेले नाही. त्यात काय चालले आहे हे मला माहित नाही.
म्हणजे गृहमंत्री-राष्ट्रपती यांनी केलेल्या उशीरामुळे हे सगळे झाले. तरीही तुमच्यासारखे म्हणणार की ते धर्मामुळे. आणि यातला बराचसा काळ जगातील सर्वात सेक्युलर युपीए सरकार सत्तेत होते.तरीही त्यांनी धर्मावर आधारित निर्णय का घेतला हा प्रश्न तुम्ही ज्याचा लेख इथे चिकटवला आहेत ते (अती)शहाणे कधीच विचारणार नाहीत. आणि ऑफ ऑल द थिंग्ज ब्लेम करायला मोदी आणि भाजपा. मजा आहे बुवा. हे लेकाचे दयेच्या अर्जावर ८-१० वर्षे झोपून राहणार आणि मग इतरांवर दोष ढकलणार.
आणि धर्माचेच तुणतुणे लावायचे असेल तर इतर अनेक गोष्टी अशूसिंचन करण्यासारख्या आहेत. उदाहरणार्थ काश्मीर व्हॅलीतून तीन लाख हिंदूंना नेसत्या वस्त्रानिशी हाकलून देणे, घरवापसीवरून हिंदू संघटनांवर टिका करणे पण त्याचवेळी मुस्लिम-ख्रिश्चन धर्मांतरे चालू आहेत त्याविषयी काहीही न बोलणे इत्यादी.
आणि धर्माचेच तुणतुणे लावायचे
अहो घरवापसी चिंताजनक असते, बाकी धर्मांतरे मात्र 'माय चॉईस' वाली असतात. कुंथनाचे फॉर्म्युले विसरू नका बरे हत्तीजी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
छ्या! ट्रोल.इन कडून फारच
छ्या! ट्रोल.इन कडून फारच अपेक्षा तुमच्या!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
बीजेपीला खास सिंगलौट करायचे
एक काँग्रेसी, सेक्यूलर म्हणून नितिन थत्तेंचा विरोध करणे अन्य अंध सेक्यूलरांचा विरोध करण्यापेक्षा का चांगले आहे त्याचा प्रत्यय देणारा प्रतिसाद.
Here a debate about Congress and BJP may not be relevant. It could be more about the general orientation of the Indian state towards Muslims irrespective of which political philosophy is in power.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
The BJP is against terrorists
Political parties other than BJP are interested in protecting the human rights of convicted terrorists only if those convicted terrorists are muslims. - हे वाक्य सुद्धा खरे वा खोटे आहे हे पडताळून पहावे का ? पॉलिटिकल पार्ट्या तसे करतातच असे माझे म्हणणे नाही. त्या तसे करतात का ते तपासून पहावे का ? असा माझा प्रश्न आहे.
याकुब मेमन 'माफीचा साक्षीदार'
याकुब मेमन 'माफीचा साक्षीदार' होता????!!
मला वाटते लेखातील चुकांची सुरुवात इथूनच करावी लागेल.
माफीचा साक्षीदार होण्यासाठी गुन्हा कबुल करावा लागतो. याकुब मेमनने गुन्हा कबुल केला होता का?
शिवाय माझी एक शंका आहे. माफीच्या साक्षीदाराची मदत घेऊन मुख्य गुन्हेगाराला पकडतात. मुख्य गुन्हेगाराला माफीचा साक्षीदार करता येइल?
सर्वोच्च न्यायालयाने धनुर्धारी - बाण (archer - arrow) अशी उपमा दिली होती.
?
म्हणजे, दाऊद, टायगर मेमन हे याकुबचे 'उप' का?
-Nile
नाही. दाउद, टायगर आणि याकुब
नाही. दाउद, टायगर आणि याकुब या सर्वांचा गुन्हा एकाच पातळीचा होता. त्यामुळे सरकारी पक्षाने याकुब मेमनला माफीचा साक्षीदार होण्याची परवानगी तरी दिली असती का हा माझा प्रश्न आहे. जर अशी परवानगी सरकारी पक्षच देणार नसेल तर याकुब मेमनच्या माफीच्या साक्षीदाराचा मुद्दा दोन्ही बाजुनी निकालात निघतो.
याकुब मेमनने स्वतः गुन्हा कबुल केला नाही त्यामुळे तो माफीचा साक्षीदार होउ शकत नाही आणि तो मास्टरमाइंड असल्याने त्याला माफिचा साक्षीदार केल्यास सरकारी पक्षाने प्रॉसिक्युट कुणाला करावे?
दाउद, टायगर आणि याकुब या
काय केलं असेल वगैरे बद्दल मला माहित नाही. पण दाऊद हा याकुबपेक्षा मोठा मासा आहे. त्यामुळे जरी याकुब बाँबस्फोटात एकाच पातळीचा असला तरी पण त्याने दाऊदचे इतर गुन्हे उघड पाडण्यास वगैरे मदत करण्याची तयारी दाखवली असेल तर त्याला माफिचा साक्षीदार करणे आश्चर्यकारक वाटत नाही.
-Nile
पाकिस्तान
दाऊद-टायगरपेक्षाही पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडे पाडण्यासाठी भारताने याकुबची माफीचा साक्षीदार होण्याच्या विनंतीवर विचार केला नसेलच असे वाटत नाही.
बाकी श्रीकृष्ण आयोगाच्या निकालाच्या अंमलबजावणीबाबत किंवा पंजाबातील अतिरेक्यांना दिलेल्या शिक्षेबाबत तुमचे काय मत आहे?
याकुबने अशी विनंती केली होती?
याकुबने अशी विनंती केली होती?
नक्की कल्पना नाही
नक्की कल्पना नाही मात्र त्याचा शरण येण्याचा विचार सुरु होता असे बी रमण यांच्या लेखावरुन दिसते. बाकी श्रीकृष्ण आयोगाबाबत काहीतरी बोला. मधुकर सरपोतदार, बाळासाहेब ठाकरे हे आयोगाने ठपका ठेवलेले आरोपी शिक्षा न भोगता स्वर्गवासी झाले सुद्धा!
कोर्टाला तसे सांगितले होते का
कोर्टाला तसे सांगितले होते का की माफीचा साक्षीदार होण्याचा विचार आहे?
बाकी श्रीकृष्ण आयोगाचा रीपोर्ट वाचला नाही. लिंक असेल तर कृपा करुन द्यावी. उत्तर देण्याचा जरुर प्रयत्न करेन. धन्यवाद.
मुस्लीम समाजाला वोट बँक
मुस्लीम समाजाला वोट बँक समजणार्या तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी (मूर्ख लोक- केवळ टीआरपी आणि वोट मिळण्याची शक्यते साठी) माध्यम याकूब मेमनला निर्दोष ठरविण्यात व्यस्त आहे. यातच केवळ थोड्या वेळासाठी हित साध्य होणार आहे. मग त्याचे परिणाम काही हो. बाकी सिने सृष्टीचे म्हणाल तर ती दाऊदच्या इशार्यावर नाचते. आपल्या मालकाला खुश करण्यासाठी मेमनला निर्दोष मानणे आवश्यक होते.
आता मुस्लीम समाजाला हि वाटू लागले आहे, याकूब निर्दोष होता, मोदी सरकारने त्याचा खून केला आहे. (१५००० लोक मुंबईत त्याच्या अंतिम यात्रेत शामिल होते). याचे परिणाम भविष्यात मुंबईकरना लवकरच भोगावे लागतील.
+१
बाकी काही असले तरी त्याच्या अंत्ययात्रेतील लक्षणीय उपस्थिती चिंताजनक आहे खरी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
त्याच्या अंत्ययात्रेतील
का ?
मरणान्ते च वैराणि - हे संस्कृत मधे आहे म्हणून फक्त हिंदूंसाठीच अॅप्लिकेबल असावे का ?
की मरणा नंतर वैर संपले म्हणून काय लगेच मैत्री/सौहार्दपूर्ण संबंध स्थापित झाले का ? ----- असा मुद्दा आहे तुमचा ?
(व्होट बँक पॉलिटिक्स चा फॅन / डेव्हिल्स अॅडव्होकेट नव्हे ... खुद्द डेव्हिल) गब्बर.
कारण ऑब्व्हियस आहे- याकूबला
कारण ऑब्व्हियस आहे- याकूबला इतकी सिम्पथी मिळणे हे चिंताजनक आहे.
तदुपरि मरणान्तानि वैराणि हा कैक केसेसमध्ये एक साफ वेडपट प्रकार आहे असे माझे मत आहे. असो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तदुपरि मरणान्तानि वैराणि मी
मी चुकीचे लिहिलेले दिस्तेय.
मला "करेक्शन फॅसिलिटीत" ठेवावे लागेल काहि दिवस - असे दिसते.
ज्या लोकांनी फाशी देऊ नये असे
ज्या लोकांनी फाशी देऊ नये असे म्हटले त्यांनी याकुब मेमणला "निर्दोष सोडून द्यावे" असे म्हटले नाही एवढे नोंदवून मी माझे दोन शब्द संपवतो.
("तुम्ही दिवसाला ३२रु खर्च करता? मग तुम्ही श्रीमंत आहात" या वर्तमानपत्री मथळ्याची आठवण झाली).
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+१
सहमत
१५,०००?
खरंच? कुठे बरं आली आहे बातमी?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बळेच पेडगाव ट्रिप
http://www.firstpost.com/politics/yakub-memons-funeral-convicted-terrori...
नेमका आकडा नसला तरी 'हजारो' असा शब्द इथे आलेल आहे. आता हे वर्तमानपत्रही संघी लोकांनी बळकावलेले आहे असे लिहिलेले पाहिले की बातमीचीस सत्यता कळून चुकेल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काही मूलभूत अडचणी
इथे काही मूलभूत गोष्टी स्पष्ट करायला हव्यात.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हेच लिहिणार होतो. धन्यवाद
हेच लिहिणार होतो. धन्यवाद टंकनश्रम वाचवल्याबद्दल.
बाकी "याचे परिणाम भविष्यात मुंबईकरांना लवकरच भोगावे लागतील" असलं काही वाचल्यावर हसावे कि रडावे कळत नाही. किती जहरी द्वेष.
दुरितांचे तिमिर जाओ अशी अल्लाहकडे दुआ.
"१५००० च्या गर्दीचे" काही फोटो
फेसबुकावर "१५००० च्या गर्दीचे" काही फोटो बघितले. आज आणखी अपडेट्स पाहिले. उदाहरणार्थ हे -
This particular photo is from a 2012 Bishwa Ijtema in Bangla Desh Not Thursday the 30th 2015
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बाकी "याचे परिणाम भविष्यात
बरोबर आहे. द्वेष हा शब्द फक्त एकाच विशिष्ठ कम्युनिटी च्या मनात दुसर्या कम्युनिटीबद्दल असतो. दुसर्या कम्युनिटीच्या मनात पहिल्या बद्दल फक्त प्रेम, आदर, ममत्व असंच असतं. नैका ?? व नुसते टीकात्मक शब्द जरी उच्च्चारले तरी ती द्वेषाची परमावधी असते. तो जहरी असतो. नैका ??
अंत्ययात्रा नव्हती.
याकुबची अंत्ययात्रा निघाली नव्हती. माहीम खाडीच्या आसपासचा आणि किल्ला, कॉज़वे, बांद्रा मशीद, बझार रोड, बेहरामपाडा हा भाग हा पूर्णपणे मुस्लिमबहुल आहे. तिथे लाखो मुस्लिम राहातात. शवपेटी आली तेव्हा तिथलेच मुस्लिम बहुसंख्येने तिथे दर्शनाला जमले होते. क्रॉफर्ड मार्केट ते पार भायखळ्यापर्यंत मुस्लिम वस्तीची घनता आहे. त्यामुळे चरनी रोडला बड्या कब्रस्तानातदेखील लोक जमले होते पण ते यात्रेने आले नव्हते. अंत्यदर्शनाला आले होते. शवपेटी विमानातून आलीच होती. माहीमला शवपेटी उघडली गेली नाही. माहीमला फक्त प्रार्थना झाली. चरनी रोडलासुद्धा अगदी जवळचेच लोक शवपेटीपर्यंत पोचू शकले.
पोलिस बंदोबस्त उत्तम होता. वांद्र्यापलीकडे दुकानदारांनी जोखीम नको म्हणून दुपारनंतर दुकाने बंद ठेवली होती.
अच्छा, म्हणजे लोक जमले हे तरी
अच्छा, म्हणजे लोक जमले हे तरी मान्य आहे तर. हे चिंताजनक नाही असे म्हणायचे असेल तर असूदे. मिलिटंट उदारमतवादाचा विजय असो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
लोक जमले यात चिंताजनक काय आहे
किती लोक जमले वगैरे माहिती नाही. जमलेले लोक निव्वळ बघे होते की विशिष्ट हेतूने जमले होते याबाबतही काही कल्पना नाही. मात्र निव्वळ काही लोक जमले यात चिंताजनक काय आहे? शिवसेनाप्रमुखांच्या अंत्ययात्रेला किती लोक जमले याची कोटीच्या कोटी उड्डाणे अनेक दिवस सुरु होती. (बी.एन. श्रीकृष्ण यांनी ठाकरेंबाबत दंगलीच्या काळात मिलिटरी जनरलप्रमाणे सैन्याला आदेश दिले असे रिपोर्टात स्पष्ट म्हटले आहे.) पंजाबातील भारताविरुद्ध लढणाऱ्या शिक्षा झालेल्या अनेक अतिरेक्यांना भारतातून ऑपरेट करणाऱ्या अकाल तख्तने शहीद म्हणून घोषित केले, त्यांचे शहीद दिन प्रतिवर्षी साजरे केले जातात. शिरोमणी अकाली दलासारखे सत्ताधारी पक्ष या सर्व कार्यक्रमांत जाहीरपणे सहभागी होतात. तमिळनाडूतही अशी उदाहरणे मिळतीलच.
आमेन!
१. 'काही' लोक हा शब्द फसवा
१. 'काही' लोक हा शब्द फसवा आहे. फर्स्टपोस्टची बातमी पाहता हजारो लोक दिसतात. त्याच्या सत्यतेबद्दल काय मत आहे?
२. ठाकरे आणि याकूब हे खरेच कंपॅरेबल आहेत का? आणि समजा इथल्या विचारवंतांच्या लेखी ते कंपॅरेबल असले तरी याकूबसाठी जमलेल्या गर्दीचे समर्थन कसे होऊ शकते हे सांगा. आचारस्वातंत्र्यातच जिम्मा करावयाची असेल तर प्रश्नच मिटला. घटं छिन्द्यात् वगैरे वगैरे.
३. पंजाब आणि तमिळनाडूवाल्यांची उदाहरणे देऊन याकूबसाठीच्या गर्दीचे समर्थन होते का? हे म्हणजे उजव्यांचीच टॅक्ट झाली. अगोदर 'त्यांना' सांगा छाप. सो ड्याम्न्ड प्रेडिक्टेबल, क्लिशे आणि सोयीस्कर दुर्लक्ष करणे.
मुद्दा हा आहे की याकूबसाठी जमलेली मोठी गर्दी चिंताजनक आहे. ते सोडून ती गर्दी अंत्ययात्रेची होती की नव्हती या टेक्निकॅलिटीत अडकणार्यांची कीव येते आणि काळजी तर वाटतेच. एरवी इतरांची काळजी करणारे लोक्स आज स्वतःच काळजीच पात्र झालेले पाहून अजूनच काळजी वाटली.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
समर्थन नाही
याकूबसाठी जमलेल्या गर्दीचे समर्थन करायचे नसून, तशी भारतीय परंपरा आसेतुहिमाचल असल्याचे दाखवून द्यायचे होते. किंबहुना मुंबईतल्या मुंबईतच असा प्रकार काही महिन्यांपूर्वीच घडला होता हेच दाखवायचे होते.
गर्दी जमली असेल तर चिंताजनक वाटते कारण मुसलमानांमध्ये दुजाभाव दाखवल्याची भावना असू शकते. याचा फायदा आयसिस, आयएसआय वगैरे हितशत्रू घेऊ शकतात.
ग र्दी जमली असेल तर चिंताजनक
ग
खरय
गिरीश शहाणेंच्या लेखातलं
गिरीश शहाणेंच्या लेखातलं शेवटचं वाक्य -
I understand why people feel threatened by Islamist terrorism and extremism, but when they adopt double standards as a consequence, it only causes disaffected Muslims to be drawn to identity politics of the kind peddled by the Owaisis, or something far worse.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तशी भारतीय परंपरा आसेतुहिमाचल
त्याने बाकी काही साध्य न होता प्रसंगाचे गांभीर्य जाते. बाकी समानता वगैरे श्वानं युवानं मघवानमाह चालूदे. प्रसंगाचे गांभीर्य वगैरे सिलेक्टिव्हली पाळायचे असते याची आठवण करून दिल्याबद्दल अनेक आभार.
श्रेणीदात्यास वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कारण मुसलमानांमध्ये दुजाभाव
हो? दुजाभाव दाखवल्याच्या भावनेने जे मुसलमान तत्काळ देशद्रोही ठरणार आहेत त्यांचा कल तिकडेच आधीपासून असणारच अन मग काहीही हपा कारणाने हे लोक आयएसआय ला जाऊन मिळणारच. असल्या फडतूसांना कठोरात कठोर शिक्षा देऊन जरब दाखवायची की "नको रे पुता, नको रे बाबा. आम्ही काहीच असे करत नाही जे तुझ्या (काविळी)पीतदृष्टीला दुजाभाव वाटेल, तर तू आयेसाय ला जाऊन मिळू नकोस. In short we will walk on eggshells." म्हणून चुचकारत रहायचं?
काळच ठरवेल...
"कुछ याकुब, कुछ अफजल, कुछ कसाब ले गया...
वक्त सारे सेक्युलरोंकी, नकाब ले गया..."
(आंजा वरून)
कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||
मला वाटतं याकूब निर्दोष होता
मला वाटतं याकूब निर्दोष होता असं कोणीही म्हटलेलं नाही . अगदी ओवैसींनीही नाही. 'तो या कटाचे धागेदोरे उलगडण्यात महत्वाचा साक्षीदार असतानाही ही शिक्षा का?' अश्याच आशयाचा/जवळचा प्रश्न अनेकांनी केला आहे. अर्थात परिणाम भोगावे लागणार आहेत हे उघड आहे म्हणूनच ही तेढ वाढतील असे निर्णय व्यवस्थेने घ्यावेत का? न्याय- व्यवस्था साक्षी पुराव्यांवर चालते हे कितीही खरं असलं तरी परिणामांचा विचार करुच नये असे काही नाही.
वा! जीव ओवाळून टाकलेले
वा! जीव ओवाळून टाकलेले (हाराकिरी स पेटलेले) काही युवक सर्रास असेच बॉम्बस्फोट घडवून आणतील व सो कॉल्ड माफीचे साक्षीदार बनून फाशी न होता जन्मठेप भोगतील . मज्जाच की मग. ते तर मृत्युस तयार होते पण त्यांना फक्त जन्मठेप मिळाली. मजा होइल त्यांची.
जन्मठेप मिळाल्यास "मज्जाच"
जन्मठेप मिळाल्यास "मज्जाच" कशी काय? [सावरकरांना तर डबल मिळाली होती]. उलट जिवंत राहिल्यास त्या ७२ अप्सरा वगैरे फोरफीट होणार ना?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
जे हाराकीरी (जीवावर उदार)
जे हाराकीरी (जीवावर उदार) करण्यास तयार होते त्यांना फक्त जन्मठेप मिळाली हा त्यांच्याकरता आनंदाचाच भाग असेल. हाराकीरी करण्यास जर बोटावर मोजण्याइतके युवक तयार होत असतील तर ...... फक्त जन्मठेप मिळेल हे ऐकून (ते युवक + अन्य काही समाजविघातक युवक) तयार होतील ......... का तर भारत सहिष्णू आहे बाबा. फक्त माफीचा साक्षीदार व्हायचं अन तुरुंगात रहायचं.
जण्रली जन्मठेप मिळायची खात्री
जण्रली जन्मठेप मिळायची खात्री वगैरे वाटली तरी सामान्यातले कोणी हाराकिरी करायला तयार होणार नाही. शिक्षाच होणार नाही/पकडले जाणार नाही असं वाटलं तर तयार होतील.
जे धर्मासाठी जिवावर उदार होणार असतील त्यांना जन्मठेप मिळण्याचा आनंद होईल असे वाटत नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
;)
जन्मठेप ही सजाच असते मजा नाही
जन्मठेप ही सजाच असते मजा नाही आणि माणसाला थेट मारुन त्याला हुतात्मा व्हायची संधी देण्यापेक्षा जन्मठेप का देउ नये? बाकी तो कितपत दोषी आहे हे ठरवणं आपल्या मर्यादेपलीकडचं आहे. पण याकूबने काय केलं आणि तो कसा पकडला गेला किंवा शरण आला वैगेरेच्या कथा गेल्या आठवड्यात एवढ्या चघळल्या गेल्या की गेल्या बावीस वर्षांमध्ये मिळूनही तेवढ्या ऐकण्यात आल्या नव्हत्या. जन्मठेप झाली असती तर ती बातमी एका दिवसाला पुरवून दूरचित्रवाहिन्या दुसरा मसाला शोधायला धावल्या असत्या.
काही ठिकाणी या स्फोटात सापडलेल्यांचे नातेवाईक तावातावाने म्हणत होते "आमच्या अश्रुंचे काय?" यावर निर्दयी वाटलं तरी हेच उत्तर आहे की या शिक्षेने तुमची दुरावलेली माणसे परत तर येणार नाहीत पण अजून कोणाची ना कोणाची जवळची माणसे मरावीत याची सोय मात्र झालेली आहे.
पण अजून कोणाची ना कोणाची
काय बोलतेस? हे माथेफिरु परत सूडाने कोणाला मारतील या भीतीतून याकूबला फाशी व्हायला नको होती????
शुचिमामी, तुम्ही तरी कुठे
शुचिमामी, तुम्ही तरी कुठे माथाफोड करताहात? भूतदया वगैरे शब्द फक्त विशिष्ट वेळीच उच्चारायचे असतात, झालंच तर एका क्रूरकर्म्याला असलेल्या पाठिंब्याकडे दुर्लक्ष करून तिसर्याच विषयाबद्दल निरर्थक आत्मरंजन करायचे असते हे लिबरल सेकुलर विचारवंतांचे गुणविशेष अजून लक्षात कसे आले नाहीत म्हणतो मी.
आता हेच बघा की. आमचा एक तद्दन फडतूस प्रतिसाद या लोकांना निव्वळ सत्य सांगत असल्यामुळे झोंबलेला दिसतोय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
निव्व्ळ भिती नाही; मग तर मी
निव्व्ळ भिती नाही; मग तर मी जन्मठेपही देऊ नये या मताची असते. दंगल ही काय असते ह्याचा प्रत्यक्ष नाही तरी जवळच्यांकडूनचा अनुभव ऐकलेला आहे. परेल स्टेशनजवळ जळत असलेला माणूस येऊन पडलेला पाहिलाय माझ्या आईने. ह्या अश्या परिस्थितीला परत सामोरं जाण्याची इच्छा नसेल तर केवळ सूडचक्र गतीमान ठेवण्यात काहीही अर्थ नाही. उत्पल यांचे सुधारगृहाचे मत मलाही पटलेले नाही परंतू गुन्हेगाराला हीरो होता येईल अशी शिक्षा देण्याची गरज नव्ह्ती एवढच मला म्हणायचय.
( अवांतर: अश्याच धाडसी लोकांनी, एका अतिरेक्याला संरक्षणमंत्र्यानी स्वतः कंदाहारला नेउन सोडले ते ही आठवावे. आपल्या अंगाशी काही येत नाही तोवरचा शूरपणा असतो हा. हे अवांतर असल्याने यावरच्या चर्चेला मी तरी प्रतिसाद देणार नाही )
'याकुबची फाशी' हा लगेच मत
'याकुबची फाशी' हा लगेच मत द्यावे इतके सोपे प्रकरण वाटत नाही.
जितके आपल्याला माहित आहे त्याहून कितीतरी प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे अजून ५-१०-२० वर्षांनी अधिकाधिक संबंधीत मंडळी पुस्तके लिहितील, काही अधिक माहिती समोर येईल तेव्हा यावर जरातरी एक बाजु घेऊन बोलता यावे. तोवर न्यायव्यवस्थेकडे आपल्याहून अधिक विदा आहे त्यामुळे त्यांचा निकाल योग्यच असेल हे गृहितक ठेवणे मला सुयोग्य वाटते.
==
कोणाचाही त्याच्या परवानगीविना अनैसर्गिक मृत्यू झाल्यावर मला आनंद होत नाही. दु:ख होतेच असे नाही पण असा मृत्यू मनाला आनंद व/वा समाधान खचितच देत नाही.
===
याकुब मुसलमान नसता तर सिस्टीमला तितक्याच त्वरेने योग्य ते पुरावे शोधुन न्यायव्यवस्थेपुढे आणायला प्रोत्साहन मिळाले असते का? यावर ठामपण हो म्हणवत नाही इतके मात्र खरे. राजकीय नेते/राजकीय व्यवस्था दूर राहिली, सामान्य लोकांकडूनही "आधी 'त्यांच्या'तल्यांना शोधा की! तिथे फाटते ना?" अशीच विधाने कानावर अधिक ऐकू येतात.
ओवैसी बंधु बोलतात ते घातक आहेच पण लोकांचे असे वागणे/ असा उन्माद त्यांचे बोलणे काही लोकांच्या गळी उतरवण्यास मदत करतो हे ही खरेच
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
उत्पल यांच्या फेसबुक
उत्पल यांच्या फेसबुक भिंतीवरून त्यांनी लिहिलेली प्रतिक्रिया-
याकूब मेमनबाबत प्रेम वाटायचं काही कारण नाही. (मला स्वतःला कसाब, याकूब मेमन किंवा धर्मामुळे अंध होणाऱ्यांबद्दल कुणाहीबद्दल वाईट वाटतं. कारण धार्मिक कट्टरता म्हणजे विवेकाचा मृत्यू. धर्म एक चांगला माणूस वाया घालवतो.) दुखरी बाजू आहे ती उन्मादाची. अमेरिकेने ओसामाला मारल्यावर अमेरिकन जनतेने उन्मादी वर्तन केलं होतं का हे मला माहीत नाही. पण तसं केलं नसेल तर ती समंजसपणाची खूण आहे. गुन्हेगाराला शिक्षा होणं हा न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग आहे. पण त्याकडे तटस्थपणे 'प्रक्रिया' म्हणून बघता न येणं ही आपली अडचण आहे. कुणाला तरी मारल्यावर कुणाला तरी आनंद होणे हे मला काहीसं विचित्र वाटतं. नथुराम गोडसेने गांधींना मारलं हे मला माहीत आहे. माझ्यावर गांधींचा मोठा प्रभाव आहे. पण म्हणून गोडसेला फाशी दिल्याचा मला आनंद वगैरे अजिबात होत नाही. ती एका कृत्याची परिणती होती आणि त्या फाशीकडे मी न्यूट्रल मनःस्थितीतून पाहतो. त्याचा आनंद व्यक्त करावा किंवा दुःख व्यक्त करावं यापैकी काहीच मला वाटत नाही. आणि झालंच तर मला या फाशीचं दुःखच होतं. ज्या माणसाकडे गांधींना मारण्याइतपत मानसिक ताकद आहे त्या माणसाने गांधींना विरोध करत ही ताकद रचनात्मक कामात वापरली असती तर कदाचित देशाचं अधिक भलं झालं असतं असं वाटतं.
उन्माद हा एकूणातच आपल्याला मिळालेला शाप आहे. मग तो गांधीवादामुळे किंवा मार्क्सवादामुळे येणारा उन्माद असला तरी. मला त्याची अडचण वाटते. विचार करणे याचा एक मुख्य अर्थ समोर जे जे बरं-वाईट घडतं आहे त्याचं भावनिक न होता आकलन करण्याची क्षमता असणं. याकूब मेमनला फाशी दिल्यामुळे ज्यांना पराकोटीचा आनंद होत आहे त्यांचं वस्तुस्थितीचं किंवा दहशतवादाच्या उग्र प्रश्नाचं आकलन काय आहे? त्यांच्या आकलनाची क्षमता काय आहे? टीव्ही बघून दहशतवादाचा प्रश्न समजून घेता येतो का? देश म्हणून विचार करताना कठोरपणे निर्णय घ्यावे लागतातच आणि ते घ्यावेतच. देहांत शासनाच्या शिक्षेबाबत मतभेद आहेत आणि माझं व्यक्तिगत मत फाशीच्या बाजूने नाही. पण सध्या न्यायव्यवस्थेत फाशीची तरतूद आहे त्यामुळे माझं व्यक्तिगत मत बाजूला ठेवून मला आहे ते स्वीकारावं लागेल. आणि हे मी तटस्थपणे करणं अपेक्षित आहे. त्यामुळे जे निर्णयप्रक्रियेचा भाग नाहीत त्यांच्यासाठी हा आनंदाचा भाग कसा होऊ शकतो हे मला कळत नाही.
याकूब मेमनची केस किंवा अजमल कसाबची केस वृत्तपत्रातून गाजली, टीव्हीवरून गाजली कारण त्याला दहशतवादाचं परिमाण आहे. त्यांनी केलेले गुन्हे थेट स्वरूपाचे, भीषण होते. कुणाचाही जवळचा माणूस जाणं हे भयंकर आहे आणि त्याची तीव्रताही खूप आहे. 'तुमच्या घरातला माणूस गेला असता तर तुम्हाला कळलं असतं' असा एक युक्तिवाद असतो आणि त्यात तथ्य आहेच. पण मला इथे असा प्रश्न पडतो की आपल्या जवळच्या माणूस गेला की ज्याने ते केलं त्याला मारावसं वाटणं ही प्रतिक्रिया, सूडभावना झाली. ती न्यायभावना असते का? आणि सूडाची भावना असली तर त्यात काही गैर आहे असंही नाही. (पुन्हा एकदा, व्यक्तिशः मला सूड घ्यावासा वाटत नाही. पण ते माझ्याबाबतीत झालं. कारण हा वैचारिक भूमिकेतला फरक आहे. माझ्या घरी काही वर्षांपूर्वी सुमारे लाखभर रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. चोर सापडला नाही आणि खरं तर मी त्याकरता प्रयत्नही केले नाहीत. मला भुरट्या चोरांचा राग येत नाही. उलट त्यांना भेटून त्यांच्याशी सखोल बोलावसं वाटतं. माणूस चुकीचा वागतो त्यामुळे त्याचा राग येण्याऐवजी तो असा का वागतो, त्यात आपल्याला काही बदल करता येईल का याचा शोध घेण्यात मला समाधान मिळतं. आता यावर असा प्रश्न येईल की चोरी ही साधी गोष्ट झाली. तुझ्या आईला, वडिलांना किंवा बायकोला कुणी मारून टाकलं तर तुम्हाला काय वाटेल? या प्रश्नाचं उत्तर 'मी तरीही सूड घेऊ इच्छिणार नाही. उद्या न्यायालयाने त्याला फाशी दिली तरी माझी इच्छा त्याला सुधारगृहात ठेवावं ही आहे' असं आहे. पण अर्थातच हे उत्तर ग्राह्य धरता येणार नाही कारण माझ्याबाबतीत तसं घडलेलं नाही.) तर व्यक्तिगत ते सामाजिक अशा विविध पातळ्यांवर या दोन्ही संकल्पनांमध्ये काय फरक पडत जातो हे आपल्याला तपासता येईल. (हा खरोखर एक रोचक प्रश्न आहे. मीही आत्ता न्याय आणि सूड या संकल्पनांच्या गोंधळात पडलो आहे.)
न्यायाची निकड हजारो-लाखो लोकांना आहे, मग एका माणसाला फासावर देऊन जी 'शांती' मिळते ती न्याय झाला म्हणून मिळालेली शांती असते की इतर काही असतं? आणि जर ही न्यायामुळे मिळालेली शांती असेल तर ते मला कोड्यात टाकणारं आहे. म्हणजे मग आपल्याला अजून बरंच पुढे जायचं आहे असं म्हणावं लागेल. याचं कारण असं की न्यायाची भूक जर एवढी मोठी आहे तर तर ती फक्त ताजवरील हल्ल्यापुरती मर्यादित का? मग सामाजिक न्यायासाठी झगडणारे लोक विकासाचे विरोधक कसे होतात? गोध्रामध्ये मारली गेलेली माणसं, नंतर गुजरातमध्ये मारली गेलेली माणसं, इतर दंगलीत मारली गेलेली शेकडो माणसं या सगळ्यांना न्याय मिळाला का? ज्या बायकांना हुंड्यासाठी जाळलं गेलं, ज्यांच्यावर बलात्कार झाले त्या सगळ्यांना न्याय मिळाला का? आजवर धरणांमुळे विस्थापित झालेल्यांना, जमिनीसाठी नागवल्या गेलेल्या आदिवासींना न्याय मिळाला का? व्यापम मधल्या मृतांना न्याय मिळेल का? याकूबच्या फाशीसाठी कोर्ट मध्यरात्री सुरू होतं याचंही कौतुक झालं आहे. त्याला फाशी द्यायची घाई का होती हे मला माहीत नाही. त्यात राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने काही मुद्दे गुंतले असतील किंवा काही इतर महत्त्वाचे मुद्दे असतीलही. पण मग मला असाही प्रश्न पडतो की पंधरा-वीस वर्षं चालणारे खटले रोज किंवा आठवड्यातले दोन दिवस अधिक काम करून निकालात का काढले जात नाहीत? तिथे तर कदाचित जीवन-मरणाचाही प्रश्न नसेल. मालमत्तेचे किंवा तत्सम इतर वाद असतील. मग न्यायव्यवस्था तिथे तत्परता का दाखवत नाही?
तुम्ही म्हटलं आहे - याकुब मेमन, कसाब यांच्यासारख्या 'मानव' या संज्ञेस पात्र नसणाऱ्या, अमानुष गुन्ह्यात सहभाग असणाऱ्या पिशाच्चांप्रती अशी 'मानवता' प्रदर्शित करणे हा मानवतेचा अपमान आहे. तसेच अशी सौम्य शिक्षा ही त्याने घेतलेल्या बळींच्या आप्तांच्या जखमेवर फुंकर घालण्यासाठीही अपुरी आहे. या पाप्याला हालहाल करून, अर्धमेल्या अवस्थेत जिवंत ठेवणे हीच शिक्षा त्याच्यासाठी योग्य ठरेल.
यावर मला असं वाटतं - गोळीला गोळी हा जर न्याय असेल तर त्या न्यायाने कसाबला खरं तर गोळ्या घातल्या पाहिजेत. पण समजा आपण तुम्ही म्हणता तशी अधिक भयंकर शिक्षा त्यांना दिली तर त्याने काय साध्य होईल? जखमेवर फुंकर घातली गेली की जखम बरी होते का? जखम औषधानेच बरी होते. आणि त्या औषधात जखम करण्यापेक्षा बरं करण्याची शक्ती अधिक असावी लागते. दुसरी जखम करून पहिली जखम बरी होईल का? मी इथे पुन्हा एकदा तुमचं लक्ष वैचारिक भूमिकेकडे वेधू इच्छितो. राग येणं, सूड घ्यावासा वाटणं या स्वाभाविक भावना आहेत. पण माणूस म्हणून आपला प्रवास कुठे असला पाहिजे? (अफजलखानाला मारल्यावर शिवाजीमहाराजांनी शत्रू मेला आणि वैर संपलं अशा आशायाचे उद्गार काढले होते असं वाचल्याचं अंधुकसं आठवतं.)
गोध्रामधील घटनेची प्रतिक्रिया म्हणून जर गुजरातमधील दंगली मान्य करायच्या असतील तर मग बाबरी मशीद पाडल्याची प्रतिक्रिया म्हणून मुंबईमधील बॉम्बस्फोट मान्य का करू नयेत असं कुणी विचारलं तर? इथे लक्षात घ्यावं लागेल की त्यांनी दोन मारले की आपण चार मारू याने प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न डोक्याचा वापर करूनच सुटू शकतात. आणि धर्म किंवा प्रतिक्रियात्मक विचार डोक्याचा वापर करायला शिकवत नाहीत. (धर्म तर माणसांची बुद्धी खाऊनच जगतो, एवढंच नव्हे तर चांगला धष्टपुष्ट होतो!)
राष्ट्रप्रेम म्हणजे नक्की काय? मुळात राष्ट्र म्हणजे काय? एकजिनसी लोकांचा समूह म्हणजे राष्ट्र म्हणावं तर मी आणि माझे शेजारी यांच्यातच इतका फरक आहे की ते मला कधीकधी एलियन वाटतात. (त्यांनाही मी एलियन वाटत असेन!) मला युरोपात जन्मलेला एखादा विचार आवडला की मी राष्ट्रद्रोही होतो का? फाशीचा आनंद होणं हा राष्ट्रप्रेम सिद्ध करण्याच्या मार्गांपैकी एक मार्ग आहे का? किंवा एखाद्याला फाशीमुळे काही प्रश्न पडले आणि ते त्याने विचारले तर तो राष्ट्रप्रेमी नाही असं म्हणायचं का? माझं देशावर प्रेम आहे असं म्हणणारे अनेक जण सिग्नल तोडतात, रस्त्यावर थुंकतात, बायकोवर आपला अधिकार गाजवतात, कसलाही अभ्यास करत नाहीत, विरोधी विचार ऐकून घेत नाहीत, विश्लेषण करू शकत नाहीत, झेंडे उचलून मोर्चा काढतात पण स्वतः सीमेवर जात नाहीत. आता अशा लोकांचं राष्ट्रप्रेम श्रेष्ठ की संयतपणे प्रश्न विचारणं अधिक बरं?
त्रुटी प्रत्येक विचारपद्धतीत असू शकते. म्हणूनच मला असं वाटतं की आपल्याला कशामुळे आनंद होतो यावर आपली आत्मिक उंची ठरते. मला ज्याचा आपण अभिमान बाळगावा असं, अंतिम असं काहीही सापडलेलं नाही. आणि तसं काही सापडेल असं मला वाटत नाही. जैन तत्त्वज्ञानात 'अनेकांतवाद' सांगितला आहे. त्याचं मुख्य सूत्र असं की भिन्न दृष्टीकोनांमधून पाहिलं तर सत्य आणि वास्तव वेगवेगळं दिसतं. मला ही मांडणी जवळची वाटते. एखाद्याला फाशीचा आनंद होणं आणि तुम्हाला तो न होणं याच्या मुळाशी कदाचित हेच असेल. त्यामुळे मला जे दिसतं ते मी विस्तृतपणे तुमच्यापर्यंत पोचवणं एवढंच माझ्या हातात आहे. त्यापलीकडे काहीच नाही.
तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्त बहुधा इतरही बरंच लिहिलं गेलं. विषयांतर झालं बहुधा. पण ओघात जे वाटलं ते लिहीत गेलो. त्याबद्दल माफ कराल…:)…
शेवटची महत्त्वाची गोष्ट. तुम्हाला माझं म्हणणं पटलं नाही तरी चालेल, पण कटुता बाळगू नका आणि संवाद थांबवू नका.
(चुकून या लेखनाचं श्रेय सतीश तांबे यांना दिलं होतं. ही प्रतिक्रिया उत्पल यांची आहे.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
+१
+१
तुझ्या आईला, वडिलांना किंवा
रियली? आय बेग- यु थिंक ट्वाइस.
गोध्रामधील घटनेची प्रतिक्रिया
यात डाउट असायचं कारण नाही. मुंबै स्फोटांमागे बाबरीचा बदला हा हेतू होताच.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
एक गोष्ट समजत नाही.
एक गोष्ट समजत नाही. राष्ट्रवाद म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय वगैरे प्रश्न विचारणार्या लेखकास उन्माद म्हणजे काय हा प्रश्न विचारावासा वाटला नाही का? सध्याच्या थोर पुरोगामी काळात आपल्या मताविरूध्द कोणी मत मांडले तर ते उन्माद म्हणून खपून जाते. म्हणजे कायद्याच्या कक्षेत याकूब मेमनला फाशी झाली असली आणि त्याच कायद्याची अंमलबजावणी करा असे म्हणणे उन्माद म्हणून म्हटले जाते. असे म्हणणारे लोक एक गोष्ट लक्षात घेत नाहीत. टाडा कोर्टाने बर्याच मला वाटते १० पेक्षा जास्त लोकांना फाशीची शिक्षा दिली होती. सुप्रीम कोर्टापर्यंत ती संख्या १ वर खाली आली. मग उरलेल्या ९ लोकांच्या फाशीचा कोणी आग्रह धरत नाही पण कोर्टाने फाशी दिलेल्याच एकाच्या (आणि तो ही इतक्या वर्षांनंतर) फाशीचा आग्रह लोक धरतात याचाच अर्थ विवेक वगैरे म्हणतात तो प्रकार लोकांना आहे याचेच ते लक्षण नाही का? तो उन्माद कसा? पण हे स्वयंघोषित पुरोगामी आणि विवेकवादी लोकांना सांगणार कोण?
प्रतिसाद आवडला
प्रतिसाद आवडला
लव्ह अॅड लेट लव्ह! मला बाँड
मला बाँड चा "लिव्ह अँड लेट डाय" हा सिनेमा फार आवडतो. रॉजर मूर चा पहीला बाँडपट.
?
गल्ली चुकली का?
ऋ ची तळटीप बरेच दिवस
ऋ ची तळटीप बरेच दिवस डोळ्यांना खुपत होती, पण प्रतिक्रीया द्यायची राहुन जात होती. आज दिली.
तसेही कुठलीही गल्ली मला आपलीच वाटते.
मी भारतात नसल्याने उन्माद
मी भारतात नसल्याने उन्माद पाहीला नाही ना अनुभवला नाही. परंतु भावनांच्या प्रकटीकरणावर हा जो आक्षेप आहे उन्माद्/उद्वेग्/उच्छाद हा चांगला नव्हे, कोणाला मारल्याने आनंद का व्हावा वगैरे ही अपेक्षा मला अनाठाई वाटते. पाश्चात्य लोक बाह्यजगात भावना अजिबात प्रकट करत नाहीत. त्यांच्याकडे मृत्युनंतर शोक व्यक्त करतानाही अतिशय संयत रीतीने व्यक्त केला जातो, काळे कपडे परीधान करुन, मृत व्यक्तीचे अनेक हितचिंतक काही आठवणी शेअर करतात याउलट आपल्याकडे रडारड क्वचित भागात्/जातीत छाती पिटणे आदि थोड्याशा अंगावर येणार्या वर्तनातूनच अभिव्यक्ती होते. याचा अर्थ लग्गेच पाश्चात्य ते सुसंस्कृत अन आपण असंस्कृत असा होतो का? Why can't we accept ourselves as emotional even little primal people?
.
पाश्चात्यांचं सर्व ते चांगलं अन आपलं ते वाईट का तर आपण न्याय मिळाल्याने अति-उन्मादी-आनंदी होतो अशी काहीशी भावना मला एकंदर काही प्रतिक्रियांतून जाणवली. काहीजण तर या पातळीला गेले आहेत की माझ्या मुलीला/बायकोची कोणी निर्घृण हत्या केली (= त्यांना तडफडत, सडत, दु:खात अन अतृप्त असा मृत्यु आला) तरी मी हत्येकर्याला फाशी व्हावी असे म्हणणार नाही. त्याला सुधारण्याचा प्रयत्न करेन. ही तर मला चक्क सायकॉलॉजिकली सप्रेस्ड अन गांधीवादी भूमिका वाटली.
.
असे कोणी म्हणू शकते म्हणजे .... काय बोलणार. त्या व्यक्तीत संतापाचे स्फुल्लिंगच नाही, ठिणगी नाही की अंगार नाही एवढेच मी म्हणेन. इतके महान, थोर मलातरी बनता येणार नाही. किंबहुना इतक्या थोर लोकांनी संसाराच्या मायापाशात रहाणं हेच मला नवलाईचं वाटतं कारण ते तर पार बुद्ध झालेले आहेत.
.
जो उन्माद झाला तो योग्यच होता. उन्माद = वाईट अन स्थितप्रज्ञता = फार चांगले अशी काही भावना मला जाणवली म्हणूनच - जिथे आनंदाला उन्माद हे नाव देले गेले, तिथे स्थितप्रज्ञतेला निव्वळ षंढ किंवा सप्रेस्ड मनोवृत्ती अॅट बेस्ट आणि ढोंग अॅट वर्स्ट म्हणण्यात मला लाज वाटत नाही.
जिथे आनंदाला उन्माद हे नाव
सणासुदीचा आनंद, सानिया मिर्झा आणि लिअँडर पेस दुहेरीत विंबल्डन जिंकल्याचा आनंद यांना कोणीही उन्माद म्हणत नाही. मात्र पाकिस्तानला क्रिकेट मॅचमध्ये हरवलं की पाकिस्तानी झेंडा जाळणं किंवा सणाच्या नावाखाली स्पीकरच्या भिंती उभारून लोकांचे कान फाटेस्तोवर गाणी लावणं हे उन्मादाच्या पातळीवर जातं.
याकूबला फाशी देणं हा न्याय होता का नव्हता इथपासून शंका उपस्थित होत आहेत, ते ही सोडून देऊ. निदान काही लोकांना क्लोजर मिळालं असेल. दुःखद घटना मागे टाकून सर्वसाधारण आयुष्य सुरू करण्यासाठी या घटनेमुळे त्यांना मदत झाली असेल. या पार्श्वभूमीचा विचार न करता आनंद साजरा करणं हा उन्मादच. असा आनंद मलेशियन एयरलाईन्सच्या ३७० विमानाचा पंख मिळाल्यावर साजरा होत नाही म्हणून तो उन्माद अधिक चिंताजनक वाटतो.
ज्या समाजात मर्दानगी म्हणजे कायदा हातात घेणं, कोणीतरी राज्य करणार, हुकुमत गाजवणार, तारणहार येणार यांचे सोहोळे चालतात, याबद्दल उत्साह असतो त्या समाजात मी षंढपणा मिरवायला तयार आहे. त्यावरून मी माझ्या मनोवृत्ती दाबून ठेवते, ढोंगी आहे असं कोणाला म्हणायचं असेल तर म्हणू देत. इतरांना स्पष्टीकरण देण्यासाठी कोणीही बांधील नसतं, स्वतःशी प्रामाणिक असणाऱ्या लोकांनी या फंदात पडूच नये.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
त्या समाजात अगदी अगदी. समाजच
अगदी अगदी. समाजच खराब आहे आपला. आनंद काय मिरवायचा - याकूबला फाशी दिल्याबद्दल. त्याला तर "सुधारण्याची" संधी द्यायला हवी होती की बाबा रे तुला बालपणी काही ट्रॉमा झाला होता का, आर यु अ ब्रोकन पर्सन की तू दाऊदशी हात मिळवणी करुन फडाफडा सिरीअल बॉम्बिंग करण्याचा, ऐन गर्दीत लोकांचे हात-पाय तोडण्याचा, कुणाच्या बापाच्या, कुणाची मुलीच्या चिंध्या करण्याचा बेत आखलास? तू सु-धा-र. आमचे लोक तर परत येणार नाही. पण तू सुधारु शकतोस हेही नसे थोडके.
.
खरं तर पिशच्च्वत ही उपमा कायच्या काई वाटते. शेवटी तो माणूस आहे आपण नाही समजून घेणार तर कोण घेणार?
त्याला तर "सुधारण्याची" संधी
जन्मठेप अशी असते याची कल्पना नव्हती.
देहदंडाची शिक्षा काही लोकांना अतिशय टोकाची आणि कधीही वापरू नये अशी वाटते; त्याजागी जन्मठेप द्यावी या गोष्टी मान्य करणं लांबच, पण समजून घेण्यासाठीही फार कठीण आहेत का? कितीही भीषण गुन्हा केला असेल तरीही गुन्हेगाराला मारून टाकण्याजागी तुरुंगात बंद करून ठेवावं, असा विचार करणं हा गुन्हा किंवा मानसिक आजार असल्याचं आत्तापर्यंत कोणी अभ्यासकाने शोधलेलं नाही. आपण तरी असं का समजावं?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तुझ्या आईला, वडिलांना किंवा
या वाक्याकडे माझा रोख होता.
तुझ्या आईला, वडिलांना किंवा
ज्यांचे असे विचार आहेत, त्यांच्यासाठी दु:ख हे सूडाच्या भावनेपेक्षा जास्त परिणामकारक असावं.
पण म्हणून ज्यांना सूड (मारेकर्याचं मरण) हा पर्याय चांगला वाटतो, त्यांनी उपरोक्त लोकांना ढोंगी का म्हणावं?
==================
भूतकाळातील आस्वल्य.
आनंदाला उन्माद/उच्छाद
आनंदाला उन्माद/उच्छाद म्हणालात म्हणून त्याच मोजपट्टीवर हा पोकळ "जर-तर" चा बडेजावा ढोंग आहे किंवा .... किंवा.... आईला, वडिलांना किंवा बायकोला कुणी मारून टाकलं तरी तुम्ही पेटत नाही, अॅट बेस्ट मानसिक क्लैब्य आहे. अन उन्माद हे जर हिणवणं असेल तर ढोंग हेदेखील हिणवणं समजा.
___
अवांतर वरच्या क्षमाशीलतेच्या मोजपट्टीवर तर शिवाजी महाराजांनी सुभेदाराच्या सूनेवर बलात्कार केला म्हणून पाटलाला त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा केली - कुठेतरी जरब गरजेची असते. फक्त देवधर्म अन पोथ्यांनी, अहिंसेनी, क्षमाशीलतेनी काम चालत नाही
____
अदितीने उल्लेखलेला उत्पल यांचा प्रतिसाद वाचला अन मला पटला नाही. मला ते एक टोक वाटले म्हणून हे दुसरे टोक. बस्स.
अच्छा. तसं. जशास तसे वगैरे,
अच्छा. तसं. जशास तसे वगैरे, मग ठीके.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
तत्वतः ही फालतूची क्षमा अन
तत्वतः ही फालतूची क्षमा अन सुधारवणं याला विरोधच आहे. पण म्हणून अन्य वेळी क्लैब्य/ढोंग वगैरे वेचक विशेषणे लावली नसती. But if you can get judgemental so can others. खाली कोणीतरी म्हटल्याप्रमाणेच तुमच्या अभिव्यक्तीचा आदर आहे पण मग सुनावणारे सुनावणारच.
>>>मात्र पाकिस्तानला क्रिकेट
>>>मात्र पाकिस्तानला क्रिकेट मॅचमध्ये हरवलं की पाकिस्तानी झेंडा जाळणं
याची पाच-दहा उदाहरणे द्याल, प्लीज?
पाकिस्तानने भारताला क्रिकेट मॅचमध्ये हरवलं की मग कायकाय केलं जातं तेही सांगाल, प्लीज?
प्रतिसादांचा उन्माद
लोकसत्ताचा अग्रलेख ब-याच जणांना न पटणारा होता. त्यावर आलेल्या काही प्रतिसादांना प्रिंट मिडियामध्ये आज प्रसिद्धी दिली गेली. एखाद्याचे विचार न पटल्यास त्यास शांतपणे प्रतिवाद करता येतो, अशा काही प्रतिसादांबरोबर थेट संपादकांची अक्कल काढण्य्यासारख्या प्रतिसादांनाही खास ग्रे-शेड मध्ये प्रसिद्धी दिली. हे कुठेतरी असांस्कृतिक आहे, उन्माद आहे, असं मला वाटतं. मध्यंतरी शृती सेठ आणि नेहा धुपिया यांच्यावरच्या ट्विटर हल्य्यावर पण हेच दिसलं. उन्मादाच्या भरात 'बेटी बचाव बेटी पढाव' ह्या कल्पनेमागच्या हेतूलाच कसा हरताळ फासतोय हे आक्रमक प्रतिसाद देणा-यांना कळलेच नाही. असे उन्मादी प्रतिसाद फेसबुक, ट्वीटर, लेखांवरच्या प्रतिक्रिया इ. सर्व ठिकाणी दिसतात. कदाचित, अभिव्यक्त होणं आजकाल जास्त सोपं झालयं म्हणून का?
याकूब मेमन्स घोस्ट या लेखातले एक वाक्य:
But social media managed to create the postmodern equivalent of a medieval lynch mob, an almost cowardly but Talibanesque hounding of anyone who disagreed with the hanging. - See more at: http://indianexpress.com/article/opinion/columns/yakubs-ghost/#sthash.74...
याकूब ला फासावर लटकवण्यात आले
याकूब ला फासावर लटकवण्यात आले त्याबद्दल जो उन्माद दिसला (सोशल मिडियात असो वा इतरत्र कुठेही) त्याचे मी थेट समर्थन करतो. हा इष्टच होता, सुयोग्यच होता. उन्माद ही एक भावना आहे. तिच्या अस्तित्वावरच आक्षेप घेणे मला पटत नाही. उन्मादावर टीका अवश्य करा. तुमच्या अभिव्यक्तीचा भाग आहे तो. पण उन्माद चालू राहणारच. त्याचे पुन्हा एकदा सहर्ष समर्थन.
मागे चार एक वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी "प्रजातंत्र मे उन्माद के लिये कोई स्थान नही है" - अशी काहीतरी विधानं केलेली होती. कैच्याकै होती.
. उन्माद ही एक भावना आहे.
अगदी.
गेल्या काही दिवसांत या
गेल्या काही दिवसांत या विषयासंदर्भात याकूबला फाशी देणं ही चूक आहे असं म्हणणारं बरंच लेखन वाचनात आलं. फाशीच्या समर्थनार्थ भावनातिरेकापलिकडचं काही लेखन कुणाच्या वाचनात आलं का? पटलं असेलच असं नाही, पण बुद्धीप्रामाण्यवादाची थोडीतरी कास धरणारं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हे वाचून बघा.
हे वाचून बघा.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
असल्या रिकामटेकड्या लेखकांना फाट्यावर मारावे
या असल्या लेखकांना टाडा कोर्ट, हाय कोर्ट, सुप्रीम कोर्टातले मुळातली सुनावणी करणारे आणि क्य्रेटिव्ह पिटीशनची सुनावणी करणारे न्यायाधीश, राष्ट्रपती आणि राज्यपाल या सगळ्यांपेक्षा जास्त अक्कल आहे असे वाटत असावे.पण सत्य परिस्थिती तशी नाही हे कायद्याने सुनावलेल्या शिक्षेतून आणि त्याची अंमलबजावणी झाल्यामुळे समजतेच. कसाबपण प्यादे आहे, त्याला का फाशी द्या असले म्हणणारे महाभागही होतेच. या असल्या रिकामटेकड्या लेखकांना फाट्यावर मारावे.
इथेच तर स्वयंघोषित पुरोगामी आणि विवेकवादी लोकांच्या बेसिकमधला लोच्या असतो. भावनातिरेक, बुद्धीप्रामाण्यवाद इत्यादींच्या व्याख्या करणार कोण आणि कशा? या पुरोगामी लोकांच्या मतांशी सहमत असलेलीच मते बुध्दिप्रमाण्यवादी आणि भावनातिरेक टाळणारी असतात असे त्यांना वाटते त्याचे काय?
वर हे वाक्य वाचलं न्यायाची
वर हे वाक्य वाचलं
हे प्रत्येकाला दिसत असतं. पण चिडचिड तेव्हा होते जेव्हा अशा गुन्हेगरासाठी पहाटे ३ ला न्यायालय बसतं. पण इतरांच्या केसेससाठी जे वकील सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचे असतात ते झुंडीनी अशा वेळेस एकत्र येतात. यात दुटप्पीपणा दिसत नाही काय? या अशा दुटप्पीपणामुळे उन्मादाला खत मिळत नाही काय?
याकूबला फाशी देणं हा न्याय होता का नव्हता इथपासून शंका उपस्थित होत आहेत, अस वर म्हणतायत लोक. सुप्रीम कोर्टाने देखील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे नीट असं म्हटल आहे. तुम्हाला डाउट होते तर आधी का नाही तुम्ही समोर आणल्या शंका? २२ वर्ष केस चालू आहे. आत्ताच कशाकाय आल्या या शंका?
जन्मठेप का देत नाही असाही प्रश्न दिसला. भारतात जन्मठेप १४ वर्षात संपू शकते ( किंवा शकायची) हे माहिती आहे काय?
फाशीची शिक्षा हवी का नको हा जेनुइन डिबेट आहे. त्यावर चर्चा व्हावीच. पण फाशी नको म्हणणारे लोक कोडनानी बजरंगीला फाशी कधी होणार हेही विचारतात. हे मजेशीर आहे.
असो, कोणाचा मृत्यु ही सेलीब्रेट करण्याची घटना मला वाटत नाही.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
रात्री तीन वाजता
>>जेव्हा अशा गुन्हेगरासाठी पहाटे ३ ला न्यायालय बसतं.
I think it was the other way round. याकुबने रिव्यू/क्युरेटिव्ह पिटिशन केली आहे पण त्याचा शेवटचा निकाल (पिटिशन डिसमिस करणारा) आजच द्या कारण उद्या फाशी द्यायचीच आहे. यासाठी न्यायालय रात्री तीन वाजता बसवण्यात आले. त्याला सोडवण्यासाठी नाही. त्याला सोडवायची/वाचवायची इच्छा असती तर न्यायालयाने सरळ स्थगिती दिली असती आणि सावकाशीने हिअरिंग घेतले असते.
>>भारतात जन्मठेप १४ वर्षात संपू शकते
भारतात कच्चा कैदी रिमांडवर साताठ वर्षे तुरुंगात राहतो असेही होऊ शकते.
-----------------------
डिसक्लेमर: फाशी देणे अयोग्य होते असे माझे मत नाही. हे मी पहिल्या दुसर्या प्रतिसादातच सांगितले आहे. तेव्हा तो वाद माझ्याशी घालू नये. मी एकच शंका व्यक्त केली होती. टाडा कायद्याच्या* अनुपस्थितीत हीच केस चालली असती तर मेमणचा गुन्हा सिद्ध झाला असता का? त्याला फाशी होऊ शकली असती का? सामान्यतः फाशी होऊ शकली नसती तर मग फाशी देणे अयोग्य आहे.
*सामान्यत: जे साक्षीपुरावे ग्राह्य मानले जात नाहीत ते टाडा किंवा तत्सम कायद्याखाली ग्राह्य मानले जातात असे अनेकदा असते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
भारतात कच्चा कैदी रिमांडवर
सहमत आहे. म्हणूनच या पार्श्वभूमीवर वकिलांचं वागणं क्युरिअस वाटतं.
वाद तुमच्याशी असा अजिबात नाही, किंबहुना हा वादच नाही. केवळ माझं मतप्रदर्शन आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
+१
अगदी हाच मुद्दा मनात आला होता.
अगदी
'पहाटे न्यायालय बसतं'..
मलाही अगदी असंच वाटतं.
रच्याकने, सुप्रीम कोर्टाकडून
रच्याकने, सुप्रीम कोर्टाकडून या केसमधल्या इतर बर्याच (मुस्लीम!) आरोपींची फाशी जन्मठेपेत बदलली गेली आहे ही देखील फॅक्ट आहे. याकूबचा गुन्हा तेवढा सिरियस होता म्हणून त्याला फाशी दिलेली आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हे अनुल्लेखाने मारतील सगळे
हे अनुल्लेखाने मारतील सगळे सेकुलर लोक्स.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जे चुकीचं आहे त्याविरोधातच
जे चुकीचं आहे त्याविरोधातच बोलणार. जे बरोबर झालंय त्याविरोधात कसं बोलतील?
तुमचा आशावाद स्पृहणीय आहे.
तुमचा आशावाद स्पृहणीय आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
याकुब मुस्लिम होता म्हणून
याकुब मुस्लिम होता म्हणून त्याला फाशी झाली या आरोपाच्या पार्श्वभूमीवर अनेक मुस्लीम आरोपींची फाशी रद्द करून जन्मठेप दिली आहे हे दुर्लक्षित राहू नये म्हणून ते लिहिलं. त्यातले अनेक आरोपी ते होते ज्यांनी पाकिस्तानात जाउन प्रशिक्षण घेतलं, इथे बाँब बनवले, ते लावले. हे एवढ सगळं थेट करून त्यांना फाशी झालेली नाही. त्यांना फाशी द्या अशी कोणी (भाजपा वगैरे) मागणी केली नाही. तरी याकूब मुसलमान आहे म्हणून त्याला मारायचा मागे आहेत सगळे हे आरोप अनाकलनीय आहेत.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
सुप्रीम कोर्टाकडून या
या प्रकरणात कोणत्या धर्माच्या लोकांना काय शिक्षा मिळाली असा मुद्दा लोकांनी मांडलेला नसून, भारतभर कधीही, कुठेही घडलेल्या अतिरेकी, दहशतवादी कारवायांसाठी फाशीची शिक्षा मिळणं आणि त्या शिक्षेची अंमलबजावणी होणं यात धर्माचा संबंध काय या अर्थाचं विधान आहे. त्यामुळे या खटल्यात कोणत्या धर्माच्या लोकांना काय प्रकारच्या शिक्षा झाल्या हा मुद्दा इथे महत्त्वाचा नाही.
त्यातही मुसलमान आहे म्हणून त्याच्या मागे कोणताही राजकीय पक्ष उभा राहत नाही, (जसं राजीव गांधी आणि बियंत सिंग यांच्या मारेकऱ्यांच्या मागे राजकीय बळ उभं राहिलं), त्यामुळे एकाच बाजूने फाशीचा आग्रह धरणारे 'जिंकतात' अशा प्रकारचं ते विधान आहे.
"याकूब मुसलमान आहे म्हणून त्याला मारायचा मागे आहे", अशा अर्थाचं विधान माझ्या वाचनात आलं ते ऐसीवरच्या चर्चेतल्या प्रतिसादांमध्येच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हे बघा वरील एक वाक्य. ओवेसीचे
हे बघा वरील एक वाक्य. ओवेसीचे विधान देखील असेच आहे.
का उभं रहावं? सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यावर त्यात धार्मिक्/प्रादेशिक अस्मिता आणणं चूक आहेच. कोठल्याच पक्षाने यात पडू नये. पडायचं असल्यास खटला चालू असताना पडावं. आत्ता ओवेसीची पार्टी यात उतरली आहे. वर इतर ज्या दोन खटल्याचा उल्लेख झाला आहे तिथे राजकीय हस्तक्षेप हा संधीसाधूपणा होता. तिथे असं केलं म्हणून सगळीकडे केलं पाहिजे का? हा कसला संतूलनाचा आग्रह?
१. फाशी फक्त मुस्लिम अतिरेक्यांना होते का? चूक. इंदिरा गांधींच्या मारेकर्यांना फाशी झालेली आहे.
२. मुस्लिम अतिरेक्यांना फक्त फाशीच होते का? चूक. याच खटल्यातल्या इतर गुन्हेगारांना फाशी झालेली नाही.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
इतर ज्या दोन खटल्याचा उल्लेख
हे सगळीकडे झालं पाहिजे असा आग्रह नाही. संतुलनाचा हट्टही नाही. फक्त असं होण्यातून काय विपरीत घडू शकतं आणि ते टाळावं याचा आग्रह आहे.
अलिकडच्या काळात, शहाबानो प्रकरण, बाबरी मशीद पाडण्यानंतर धार्मिक ध्रुवीकरण अधिक प्रमाणात होऊ लागलं. त्यानंतरचे रेकॉर्ड उत्साहवर्धक नाहीत.
"मुस्लिम अतिरेक्यांना फक्त फाशीच होते का?" असं (तुम्ही सोडून) कोण म्हणतंय?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अलिकडच्या काळात, शहाबानो
इंदिरा गांधींच्या मारेकर्यांना फाशी ८९ साली झाली. शाहबानो प्रकरण ८६ सालचं आहे.
याकूब मुस्लिम आहे म्हणून त्याला फाशी झाली या विधानाचे दोन पदर निघू शकतात. दोन्ही चूक आहेत हे दाखवलं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
उभ्या उसाला
उभ्या उसाला लागलेल्यातलं
लंगडं कोल्हं एक घावलं
फुकटचा तमाशा बघायला
सगळं गाव धावलं
नरड्याला त्याच्या आवळून
सुळाला जित्तं टाचलं
आचक्यांच्या त्याच्या तालावरती
आख्खं गाव नाचलं
सांजच्याला गावच्या वेशीवर
कोल्ह्यांदेखताच कापलं
रातच्याला परत झोपण्याआधी
राखणीच्या कुत्र्यांनी चापलं.
न्याय
म.टा.च्या शुक्रवारच्या अग्रलेखात 'कोर्ट हे उपलब्ध पुराव्यांनुसार (वर्डिक्ट) निवाडा किंवा निकाल देते.' असे एक वाक्य आहे. पुढे अशा अर्थाचे भाष्य आहे की निवाडा हा न्याय असतोच असे नाही. विद्यमान परिस्थितीत, विद्यमान पुराव्यांनिशी ती एक शक्य असलेली सर्वात चांगली निवड असते. न जाणो वीसबावीस वर्षांनी आणखी कोणी एखादा गुप्तहेरखात्याचा अधिकारी आपल्या आयुष्याच्या शेवटी शेवटी आणखी काही गुपिते उघड करेल. 'रॉ'च्या फायली उघडतील. आणि तपशीलवार माहिती बाहेर येईल.
याकुब दोषी होता की नव्हता हा प्रश्न बहुधा लोकांच्या मनात नव्हता. पण गुन्ह्याच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्यासाठी आणि पाकिस्तानी यंत्रणेचा सहभाग नि:संशयरीत्या उघड होण्यासाठी याकुबला कायकाय कबूल केले गेले होते याबद्दल लोकांच्या मनात शंका आहे. आणि प्रॉसीक्यूशनने उपलब्ध सर्व तथ्ये/पुरावे कोर्टासमोर ठेवली होती का याबद्दलही.
माफीचा साक्षीदार हा नेहमी दुय्यम आरोपीच असतो. त्याच्या मार्फत मुख्य आरोपीपर्यंत पोचण्याचा सरकारपक्षाचा प्रयत्न असतो. मुख्य आरोपीलाच (जर तो यदाकदाचित हातांत सापडला तर) सहसा माफीचा साक्षीदार बनवले जात नाही.
पुसटसे
काही वर्षापूर्वी पोलीसांना हवे तसे पुरावे सेटप करुन गुन्हा सिद्ध झालेल्या एका गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली होती. तो यमसदनी पोचल्यावर त्या केसवर काम करणाऱ्या इन्सपेक्टरला सद्सदविवेकाची बोच असह्य झाली आणि त्याने आत्महत्या केली. तत्पूर्वी त्या गुन्हेगाराला कसे अडकवले हे त्याने लिहून ठेवले होते.
अर्थात ही घटना पुसटशी आठवते आहे.
मात्र तेव्हापासून फाशीच्या शिक्षेच्या आवश्यकतेबाबत नेहमी शंका मनात येते. द ग्रीन माईल हा चित्रपटही मृत्यूदंडाबाबत मतपरिवर्तन करणारा ठरला आहे. (पोलीस त्यांना हवे तसे पुरावे सेटप करु शकतात. अमेरिकेत निरपराध कृष्णवर्णीयांच्या खुनाचे जस्टिफिकेशन करण्यासाठी मारलेल्या व्यक्तीचा हात वापरुन बंदुकीवर ठसे घेणे, ती मृतदेहाजवळ व्यवस्थित सेट करुन ठेवणे असे प्रकार झाले आहेत. भारतात फारसे वेगळे असेल असे वाटत नाही.)
याकूब निर्दोष होता असे मला म्हणायचे नाही. त्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. मात्र मृत्यूदंडाची अंमलबजावणी एकदा झाली की त्यात दुरुस्ती करता येत नाही. त्यासाठी जन्मठेपेसारखा दुसरा पर्याय आहे.
सर्वात शेवटी सुटका झाली किंवा
सर्वात शेवटी सुटका झाली किंवा जन्मठेप झाली तरी दुरुस्ती करता येत नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
द ग्रीन माईल हा चित्रपटही
हा दोन मिनिटांचा व्हिडिओ अवश्य पहा. देहदंडाच्या विरोधी आर्ग्युमेंट करणारा. अर्थात यात काही सरप्रायझिंग नवीन आर्ग्युमेंट आहे असे नाही. पण "शेवटी पुन्हा एकदा थोडक्यात ठळक बातम्या".
चुकीच्या तुलना आणि काही सुटलेले संदर्भ
याकूब मेमनच्या शिक्षेच्या अंमलबजावणीची तुलना करता येईल अशी व्यक्ती नाहीये. करताच आली तर बाबू बजरंगीला जर फाशी (सर्वोच्च न्यायालय+माफी फेटाळणे) झाली तर त्याच्यासोबत करता येईल. राजकीय व्यक्तींच्या मारेकऱ्याबरोबर याकूबची तुलना योग्य नाही. गुन्हे वेगळ्या प्रकारचे आहेत.
पण बाबू बजरंगी ह्या देशद्रोही ठरणार नाही, पण याकूब देशद्रोही ठरतो. त्यामुळे इथेही खरंतर योग्य तुलना येत नाही.
महाराष्ट्र सरकारला फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीचे कर्तुत्व करायची निकड झाली होती असं समजून चालू. मग त्यांनी रेणुका शिंदे आणि सीमा गावित ह्या २००१ पासून फाशीची वाट पहात असलेल्या आणि दयेचा अर्जही फेटाळला गेलेल्या गुन्हेगारांना का फाशी दिली नाही? त्यांचा गुन्हा आहे - १३ बालकांचे अपहरण, त्यांना भिक मागायला प्रवृत्त करणे आणि त्यातील ५ जणांना मारणे.
म्हणजे वरील प्रकारच्या (मानवी वर्तनातील पाशवी/विकृत(?) भाग असलेल्या) गुन्ह्यापेक्षा दहशतवाद हा सरकारला अधिक गांभीर्याने घेण्याचा प्रकार वाटतो आहे. ठीके. मग आता त्यांनी बाकी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्याची वाट पाहणाऱ्या गुन्हेगारांकडे लक्ष वळवावं.
ऐसीवरील विचारजंतांना फाट्यावर मारावे
आजच सरकारने म्हटले आहे की १९९१ पासून फाशी दिलेल्या २६ जणांमध्ये चारच जण मुसलमान आहेत. त्या चौघांमध्ये कसाब आणि अफजलचाही समावेश होतो बरं का. आणि तरीही ऐसीवरील दीडशहाणे विचारजंत असे म्हणत फिरणार की याकूबला फाशी म्हणजे मुसलमानांनाच जास्त त्रास होतो याचे उदाहरण आहे.
या असल्या विचारजंतांना फाट्यावर मारावे
आजच सरकारने म्हटले आहे की
अगदी २६ च्या २६ फाशी गेलेले मुसलमान असतील किंवा सर्व हिंदू असतील तरी सुद्धा काही तक्रार करायची गरज नाही. कोर्टांच्या अनेक पायर्यांवरुन जाउन जर कोणाला फाशी होत असेल तर त्यात धर्म आणि जात आणायचीच गरज नाही.
ह्या बद्दल चर्चा सुद्धा करणे म्हणजे फाशी मधे पण लोकसंख्येप्रमाणे रीझर्व्हेशन असावे असे म्हणण्यासारखे आहे.
सहमत
सहमत. फाशी देताना कोर्टाच्या निर्णयानुसार फाशी द्यावी. पॉलिटिकल कंपल्शन आहेत म्हणून विधानसभेत माफीचे ठराव पास करुन घेणे वगैरे पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग करु नये. ज्यांना पॉलिटिकल सपोर्ट मिळण्याची शक्यता कमी आहे त्यांना फाशी देऊन न्यायाचे निष्पक्ष पुरस्कर्ते असल्याचा आव आणू नये.
तत्वतः सहमती आहे. पण
तत्वतः सहमती आहे. पण राष्ट्रपती/राज्यपालांकडे माफीचा अर्ज गेल्यावर तो गृहमंत्र्यांकडे जातो - जी सहसा राजकीय व्यक्ती असते (आणि असावीच). त्या व्यक्तीनेही राजकीय फायद्या-तोट्याचा विचार करू नये असे व्हायला ती व्यक्ती बरीच परिपक्व हवी. - आतापावेतो स्वतंत्र भारताचा प्रत्येक गृहमंत्री तितकाच परिपक्व होता का हा वादाचा मुद्दा आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
>>आतापावेतो स्वतंत्र भारताचा
>>आतापावेतो स्वतंत्र भारताचा प्रत्येक गृहमंत्री तितकाच परिपक्व होता का हा वादाचा मुद्दा आहे.
परिपक्व नव्हते अशी शंका घेण्यास काही आधार आहे का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पाने