उस सिक्सर की गूंज!
पाक विरूद्ध सचिनने सेन्च्युरियन वर मारलेल्या त्या प्रसिद्ध सिक्सला व त्या विजयाला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल काही आठवणी...
गेली अनेक वर्षे भारत-पाक मॅचेस म्हणजे जोरदार टीआरपी असलेले इव्हेण्ट्स झाले आहेत. पण सध्याच्या तुलनेत पूर्वीच्या मॅचेस म्हणजे अमर अकबर अँथनी च्या तुलनेत एखादा युरोपियन आर्ट मूव्ही! काही तुरळक अपवाद वगळता १९८५ पर्यंत फारसे काही इंटरेस्टिंग नव्हते.
आधी मुळात १९८३ मधे वर्ल्ड कप जिंकेपर्यंत कोणी वन डे पाहातच नव्हते (आणि दूरदर्शनही दाखवत नव्हते, लोकांना काडीचा इंटरेस्ट नसलेल्या इतर अनेक गोष्टी होत्या त्यांना दाखवायला ). टेस्ट्स सोडा, पहिल्या दर्जाच्या क्रिकेटमधेही ज्यांची रेकॉर्ड्स धरली जात नसत (अजूनही नाहीत) असे हे सामने, त्याची वेगळी रेकॉर्ड्स नंतर ठेवली जातील असे कोणाला वाटलेही नसेल. भारत-पाक काही सामने झाले पण कोणाच्या खिजगणतीतही नव्हते. ८३ नंतर लोक जागे झाले. मग प्रत्येक कसोटी दौर्यात ३-४ वनडे ही होऊ लागले. आत्तासारखे बोलर्सना जखडून टाकणारे नियम नसल्याने लोक २२५-२३० धावा करत. ५ चे अॅव्हरेज म्हणजे एकदम सेफ!
त्यात भारत पाक म्हणजे एकदम तुल्यबळ! कारण दोन्हीही संघ तितकेच वाईट होते. अनेक ढेरपोटे, आरामशीर खेळणारे खेळाडू, अफाट क्षेत्ररक्षण कौशल्य, "एकवेळ जिंकलो नाहीतरी चालेल, पण हरता कामा नये" या मनोवृत्तीतून खेळलेल्या डिफेन्सिव्ह मॅचेस वगैरे त्यामुळे बघायलाही मजा येत नसे. ऑस्ट्रेलियाने डेनिस लिलीच्या बोलिंगवर ९ खेळाडून स्लिप मधे लावले ते आक्रमकतेमुळे. आपण कपिलच्या किंवा पाक ने इम्रानच्या वेळेस असे ७-८ लावले असते तर ते कोणीच दुसरीकडे फिल्डिंग करायला तयार नसल्याने असते
पण १९८५ मधला ऑस्ट्रेलियातील बेन्सन अॅण्ड हेजेस कप आला, आणि मॅचेस चे कव्हरेज किती सुंदर असू शकते हे दिसले. तेव्हा मॅचेस पाहिलेल्यांना पहाटे उठून ५ वाजल्यापासून अतिशय स्पष्ट व सुंदर प्रक्षेपणात भारताने मिळवलेले विजय आठवत असतील. वर्ल्ड कप फायनल प्रमाणे महत्त्व आलेल्या त्या मॅच मधे भारताने पाक ला दणदणीत हरवले, लगेच शारजा मधे फक्त १२५ रन्स जिंकायला हवे असताना पाकला ८७ मधे उखडून मॅच जिंकली. असे एक दोन लक्षात राहण्यासारखे सामने सोडले तर विशेष काही नव्हते.
मात्र शारजामधे झालेल्या मॅचेसच्या लोकप्रियतेमुळे तेथे अजून स्पर्धा भरवल्या जाऊ लागल्या. त्यातीलच एक- एप्रिल १९८६ ची ऑस्ट्रेलेशिया कप स्पर्धेची फायनल.
अजून ती मॅच आठवत आहे. आपण मारलेल्या २४५ तेव्हाच्या जमान्यात बर्यापैकी होत्या. त्याला उत्तर देताना पाकी गडबडले होते आणि आस्किंग रेट नेहमीच जास्त होता. पण नेहमीप्रमाणे मियाँदाद आउट होत नव्हता. तो आपल्याविरूद्ध तेव्हा चांगला खेळत असे हे खरे पण त्यात तेव्हाचे आपले कॅप्टन्स त्याला तसाच ठेवून दुसरीकडचे लोक आउट करायच्या मागे लागत (१९९२ च्या वर्ल्ड कप मॅच मधे मियाँदाद सहज रन आउट होउ शकत असताना- बहुधा तो पोहोचला असेल हे गृहीत धरून- किरण मोरेने खाली सलीम मलिकला आउट करायचा प्रयत्न केलेला खालच्या लिन्कमधे दिसेल, ). त्यामुळे त्याला बराच मोकळा सोडला जाई.
या मॅच मधे शेवटच्या ओव्हरपर्यंत मागे मागे राहून सुद्धा मियाँदाद खेळत राहिला आणि पळून रन्स काढत राहिला. ११६ मधले तब्बल ८६ रन्स त्याने पळून काढलेले आहेत! कपिलचे प्लॅनिंग गडबडल्यामुळे शेवटची ओव्हर चेतन शर्माकडे आली आणि शेवटच्या बॉलला ४ रन्स हवे आहेत अशी अवस्था झाली. खरे म्हणजे अगदी त्या ओव्हर पर्यंत भारतच जिंकणार याची खात्री होती, पण शर्मासाहेबांनी तो बॉल फुलटॉस दिला, मियाँदादने तो बाउण्ड्रीबाहेर मारला आणि पुढच्या अनेक वर्षांसाठी भारतीय खेळाडूंवर "मनोवैज्ञानिक दबाव" टाकला!
नंतर पुढचा काळ भारत-पाक क्रिकेट म्हणजे 'राजा शिवछत्रपती' मधल्या "तीनशे वर्षांची काळरात्र" वाचताना जसे पुढे अनेक पाने काही सुखद वाचायला मिळणार नाही असे वाटते तसे काहीसे होते. त्या एका सिक्स ने तोपर्यंत असलेला भारत-पाक सामन्यांचा बॅलन्स पार उधळला. त्यानंतर अनेक वर्षे आपण त्यांच्याविरूद्ध जिंकू असे कधीच वाटले नाही. पुढच्या काही सिरीजमधे तर त्यांची अवस्था कितीही अवघड असली तरी कोणीही येउन बॅटी फिरवून किंवा विकेट्स काढून त्यांना जिंकून देई आणि आपले लोक हताश अवस्थेत पाट्या टाकत. मला ८६ च्या दौर्यातील एक मॅच आठवते- ती भारताच्या खिशात असताना सलीम मलिकने उभे आडवे पट्टे फिरवून साधारण ३६ बॉल्स मधे ७२ मारले आणि कोणताही बोलर ते थोपवू शकला नाही - प्रेक्षक आणि फिल्डर्स यात काही फरक नव्हता तेव्हा तेथे. साधारण असेच चालू होते. अपवाद फक्त वर्ल्ड कप मॅचेसचा - तेव्हा जणू वेगळाच संघ पाक विरूद्ध खेळत असे. त्याव्यतिरिक्त एखादा ढाक्यातील १९९८ चा ३१५ चेस करून जिंकलेला विजय व टोरांटो मधले काही सामने सोडले तर भारत पाक मॅचेस बघायला बसणे म्हणजे उगाच दिवस वाया घालवण्यासारखेच होते.
या मॅच नंतर पुढच्या १७ वर्षांत भारताचा पाक विरूद्ध स्कोर २२ विजय व ४४ पराभव. याचा परिणाम कसोटीतही झाला होता. बहुतेक मॅचेस म्हणजे वाघ वि. शेळी असेच सामने!
मग एप्रिल १९८६ च्या त्या षटकारानंतर खूप नवीन खेळाडू आले, जुने निवृत्त झाले तरी ९० च्या दशकात यात फारसा फरक पडला नाही. वासिम अक्रम, वकार, सकलैन मुश्ताक, अकीब जावेद व नंतर शोएब अख्तर... सारखे बोलर्स किंवा सईद अन्वर, आमिर सोहैल, इजाज अहमद, सलीम मलिक, इंझमाम सारखे बॅट्समन... कोणीहे सहज मॅचेस फिरवत असे. २००० पर्यंत आपले लोक त्यांच्याविरूद्ध दबूनच खेळायचे.
त्यानंतर २००० पासून २००३ पर्यंत मधे मॅचेसच झाल्या नाहीत. २००३ ची १ मार्चची लढत सुमारे एक वर्ष आधीपासूनच माहीत होती लोकांना, कारण सचिनच्या म्हणण्यानुसार तो जेथे जाईल तेथे लोक त्याला आठवण करून देत. तोपर्यंत भारताने ३ पैकी ३ वेळेस पाक ला वर्ल्ड कप मधे हरवले होते, यावेळेस काय होणार याची उत्सुकता होती. सुरूवातीला चाचपडणारा आपला संघ या मॅचपर्यंत स्थिरावला होता, तर पाक या मॅचपर्यंत इतर मॅचेस हरल्याने 'हरले तर बाहेर' स्थितीत होता, म्हणजे जास्त डेंजरस, ते "कॉर्नर्ड टायगर्स" वगैरे!
पाक ने पहिल्यांदा बॅटिंग करून २७३ मारल्यावर त्यांच्या कोणीतरी भारताला उद्देशून काहीतरी कॉमेंट मारली आणि ते ऐकल्यावर नंतर बॅटिंग ला जाताना "I am going to get these guys" म्हणून खेळायला गेलेला तेंडुलकर त्यादिवशी शोएबला तीन वर्षांनंतर खेळत होता. त्याअधी त्याने कलकत्यात सचिनला पहिल्या बॉलला काढले होते. तेव्हाच्या एक दोन सिरीज मधे आपले लोक शोएबला भलतेच घाबरून खेळले होते. तेव्हा होत असलेल्या पाठदुखीमुळे सचिनही आक्रमक खेळला नव्हता १९९९-२००० मधे. मात्र या मॅचमधे ते सगळे भरून निघाले. येथे सचिन वेगळ्याच अवतारात होता. पहिल्या दोन तीन ओव्हर्सनंतरच पाकची हवा निघून गेल्याचे दिसू लागले. नंतर सेहवाग व गांगुली लागोपाठ आउट झाल्यावर निर्माण झालेली आशा सचिनने आणखी झोडपून घालवली. पाकला इतके निराश क्वचित पाहिले होते त्याआधी. शोले मधला सुरूवातीचा गब्बर व शेवटी भेदरून ठाकूर कडे बघणारा गब्बर, एवढा फरक.
ही मॅच जिंकण्यात सचिन इतकाच द्रविड-युवराज च्या भागीदारीचाही हात होता हे नक्की. अर्थात सचिन आउट होईपर्यंत पाक टीम मानसिकरीत्या पूर्ण खचली होती हे अगदी दिसत होते. पण तेव्हा अजून १०० रन्स करायचे होते आणि पूर्वी पाकला अशा वेळेस १५-२० रन्स सुद्धा पुरत :).
ही मॅच हरल्यावर पाक स्पर्धेतून बाहेर गेले. या मॅचनंतर शोएबची बद्दलची सगळी भीतीच गेली. सेहवाग पासून इतर सर्व जण त्याला हुकमी मारू लागले. तो पुन्हा भारताविरूद्ध उठून दिसण्याएवढा यशस्वी कधीच झाला नाही. अक्रम व वकार दोघेही निवृत्त झाले. अब्दुल रझ्झाक व सकलैन मुश्ताक- ज्यांनी पूर्वी भारताविरूद्ध एकहाती मॅचेस जिंकून दिल्या होत्या, ते ही नंतर कुचकामी ठरले.
ज्यांनी ८० च्या दशकात भारत पाक मॅचेस पाहिलेल्या असतील त्यांना चांगले लक्षात असेल की "एकवेळ इतर कोणत्याही संघाला आपण त्यांच्या घरी हरवू शकतो पण पाकला कधीच नाही", असेच नेहमी वाटायचे. कधी त्यांचे खेळाडू, कधी अंपायर्स व बहुतेक वेळेस कसलाच किलर इन्स्टिंक्ट न दाखवणारे आपले खेळाडू (या मॅच मधे साधारण २८-२९ मिनीटांमधे श्रीनाथला फोर मारल्यावर त्याची बॉडी लँग्वेज पाहा) यामुळे तेथे जाऊन आपण कधी जिंकू असे वाटलेच नाही. या मॅच नंतर पुढच्याच वर्षी आपण तेथे कसोटी व वन डे मालिका जिंकल्या. आता पाक विरूद्ध मॅच म्हणजे काहीच दडपण दिसत नाही. युवराज, कोहली सारखे लोक तर उद्या एखाद्याने उर्मटपणा केला तर आणखी दुप्पट उर्मटपणा करतील असे आहेत.
८६ मधल्या मियाँदादच्या सिक्सची सचिनच्या २००३ मधल्या सिक्सने तितकीच जोरदार परतफेड केली! एखादी मॅच पूर्ण संघाच्या मनावर किती जोरदार परिणाम करू शकते हे २००१ च्या कोलकत्याच्या मॅचमुळे आपल्याला माहीत आहे, माझ्या मते २००३ ची ही मॅचही तशीच होती!
प्रतिक्रिया
शेवटी फारएण्ड तो फारएण्डच.
शेवटी फारएण्ड तो फारएण्डच. क्रिकेटबद्दल लिहीणारे काही कमी नाहीत, पण असे मोती अन्यत्र कसे सापडणार?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एक्झॅक्टली
पण मियांदादच्या ईटचा जवाब तेंडुलकरने पत्थराने दिला आणि शोएबच्या एका ओव्हरमध्ये १८ रन लुटल्या ते अजूनही आठवतंय. मला वाटतं त्यावेळी तो ८७ का ९३ वर आउट झाला. पण तोपर्यंत मॅच पूर्ण फिरली होती...
दूरदर्शनचाच विषय निघाला म्हणून, त्या काळी दूरदर्शनवर 'श्वेतांबरा' नावाची तेरा भागांची सीरियल निघाली होती. त्यातलं बाकी काही आठवत नाही, फक्त एक बया पांढऱ्या साडीतल्या दुसऱ्या बयेला 'मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक' असं खूप वेळा म्हणत होती, एवढंच आठवतंय
९८ वर आउट झालेला गधडा.
९८ वर आउट झालेला गधडा.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
ओ तेंडल्याला कै बोलायचं काम
ओ तेंडल्याला कै बोलायचं काम नै हाँऽ!!!!!!!
ब्याटिंग की कला जाती, इंडिया पाक से हारती |
अगर सचिन न होतो तो गच्छंति होत सबकी ||
(कडवा सचिनभक्त) बॅटमॅन.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
गल्ली चुकलासा तुमी.
गल्ली चुकलासा तुमी.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
सहमत
ब्याट्याशी तत्त्वत:, व्यक्तिशः, शक्तिशः आणि बर्याचशा शः सहमत.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
माझ्या निष्ठा जगजाहीर आहेत.
माझ्या निष्ठा जगजाहीर आहेत. गैरसमज नसावा.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
आणि तेव्हा आमचाही कवनकंडु
आणि तेव्हा आमचाही कवनकंडु शमनार्ह झाला होता इतकेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मस्त!
मस्त!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अप्रतिम लेख!!!!!! निव्वळ _/\_
अप्रतिम लेख!!!!!! निव्वळ _/\_
दिल एकदम क्रिकेट क्रिकेट हो गया बघा. गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मस्त. आवडले.
मस्त. आवडले.
मस्त
लेख. तो षटकार ज्याला 'वॉटरशेड मोमेंट' म्हणावं असा होता, यात वादच नाही.
त्याच सामन्यात अक्रमच्या बोलिंगवर मारलेला एक ड्राईव्हही लाजवाब. डोळ्यांचं पारणं फेडणारा - http://youtu.be/-fSVmRneeas?t=3m40s
आमाला तर बॉ याबाबतीत दौड मधला
आमाला तर बॉ याबाबतीत दौड मधला पिँकी आवडतो...
अग्ग्ग्ग्दी खरं.
१९८५ मधला ऑस्ट्रेलियातील बेन्सन अॅण्ड हेजेस कप आला, आणि मॅचेस चे कव्हरेज किती सुंदर असू शकते हे दिसले. तेव्हा मॅचेस पाहिलेल्यांना पहाटे उठून ५ वाजल्यापासून अतिशय स्पष्ट व सुंदर प्रक्षेपणात भारताने मिळवलेले विजय आठवत असतील.
............अग्ग्ग्ग्दी खरं. आमच्याकडे पहिलावहिला टी.व्ही. आला तो या बेन्सन अॅण्ड हेजेस सामन्याञ्च्या थोडा आधी. अविश्वसनीय चित्रण, पाण्ढरा चेण्डू (जो आकाराने डोळ्याला लाल चेण्डूपेक्षा मोठा दिसत असे), रङ्गीत कपडे आणि स्लो-मोशनमध्येही करकरीत स्पष्टता. त्याआधी दूरदर्शनवरचे सामने पाहताना अधुनमधून हाताने 'व्यत्यय'ची पाटी टाकतानाचे चित्रण आले नाही तर काहितरी चुकल्याचुकल्यासारखे वाटे.
त्या मियाँदादी षटकार सामन्यानन्तर बिचार्या चेतन शर्माची मुलाखत कोणी घेतली होती का ते माहीत नाही. त्याच्या मनात नक्की काय आडाखे होते, काही विचार केला होता की नाही, वगैरे काही वाचायला मिळाले नाही.
त्याच मालिकेत किरण मोरेविरुद्धच्यामियाँदादच्या माकडउड्या कोण विसरेल ?
उत्तर - प्रत्युत्तरात १९९६ सालची आमीर सोहेल आणि वेङ्कटेश प्रसाद याञ्ची जुगलबन्दीही आठवते. त्या दिवशी आमीर बाद झाला नसता तर निकाल वेगळा लागला असता असे वाटते.
मस्तच....
अजून एक वाचनखूण.
प्रतिसादही भारी सर्वांचे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
गूंज?
मला पहिल्यांदा (अशुद्ध) ऊस, सिक्सर की गूंज (पानातील गुंजपाला किंवा वजनमापनातील गुंजा) असे (तीन पर्यायांपैकी एक निवडा असा अर्थ असलेले) शीर्षक वाटले. हिंदीतच शीर्षक देण्याचा अट्टाहास असलाच तर निदान गूंज हा शब्द गूँज असा लिहावा असे वाटते. गूंज असा शब्द हिंदी शब्दकोषात सापडला नाही. मात्र गूँज हा शब्द सापडला.
समजा पर्यायी मराठी शीर्षक द्यायचे झाल्यास कोणते पर्याय इतर सदस्यांना सुचत आहेत हे वाचायला आवडेल.
उदा. त्या षटकाराचा फटकारा
असेच म्हणतो...
तो एक चपराकी षटकार !
किंवा त्या षट्काराची
किंवा
त्या षट्काराची चपराक
किंवा
एक सिक्सर साला नजारा बदल देता है.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
गूँज
तसा लिहीतात हे मला माहीत आहे. मला तो लिहीता आला नाही तसा आणि (तसा हिन्दीती अर्धचंद्र व अनुस्वार एकत्र देता) येतो ही कल्पना नव्हती. ऊस बद्दल मात्र नक्की माहीत नव्हते. "उस" हेच बरोबर वाटले मला. 'कर्मा' मधे अनुपम खेर चा प्रसिद्ध संवाद आहे त्यावरून हे वाक्य बेतलेले होते. त्याला चपखल मराठी पर्याय तेव्हा सापडला नाही.
मस्तच लेख बाकी तेँडुलकरबद्दल
मस्तच लेख
बाकी तेँडुलकरबद्दल काय बोलावे
अ क्लास इटसेल्फ
.
छान लेख!
२००३ चा pivotal point मस्त पकडलाय.
अगदी १००%. १९९६ ला लंकेविरुद्ध सचिन गेल्यावर ९८-१ पासून १२०-८ चा विदारक प्रवास आणि २००३ मध्ये पाकविरुद्ध सचिन गेल्यावरही द्रविड-युवराजने अ़क्षरशः आरामात २७३ पर्यंत झालेला आपल्या संघाचा प्रवास ह्यात मला गांगुलीचा फार महत्त्वाचा वाटा वाटतो. लीडर कसा असावा हे पहिल्यांदा तिथे बघितलं. संघाने आक्रमकरित्या(आवेशाने नव्हे, तर खेळाद्वारे) कसं असावं, हे गांगुलीने आपल्याला शिकवलं.
युवराजसारख्या तेव्हाच्या युवा खेळाडूला सपोर्ट करून, जशास तसे प्रकारची वृत्ती मैदानावर दाखवून आणि संघाचा कप्तान म्हणजे बोटं चावणारा एक माणूस ह्यापेक्षा खूप काही जास्त असतो -हे आपल्याला गांगुलीमुळे समजलं असावं.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
त्या म्याचबद्दलची अजून दोन
त्या म्याचबद्दलची अजून दोन निरीक्षणे: वश्या आक्रम म्हणाला होता म्याचच्या अगोदर, म्हणे ही आमच्यासाठी प्रॅक्टिस मॅच असणारे. घे तेच्यायला.
(यद्यपि डावरी फास बॉलर म्हणून आक्रमच्या बॉलिंग अॅक्षनचे आपण जबरी फ्यान होतो अन कायम तीच वापरायचो- भले मग बॉल कुठेही जावो.)
आणि त्या म्याचीत रावळपिंडी एक्स्प्रेसची पार रावळपिंडी लाईट न्यारोगेज लोकल करून टाकली तेंडल्यानं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हेच ते अस्मितांचे दुखणे,
हेच ते अस्मितांचे दुखणे, तेंडूलकरचा विषय निघाल्यावर त्याच्या फलंदाजी करिअरचे वस्तुनिष्ठ पंचनामे करत ब्रायन लारा कसा श्रेष्ठ होता(तसा तो होताच) किंवा कांबळीला कसं खाली दाबलं वगैरे बोलावं म्हणजे तुम्ही वैचारीक वगैरे होता.