दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२५ जून
जन्मदिवस : लेखक जॉर्ज ऑर्वेल (१९०३), अणूकेंद्राचे शेल-मॉडेल सुचवणारा नोबेलविजेता हान्स येन्सन (१९०७), संगीतकार मदन मोहन (१९२४), पंतप्रधान व्ही. पी. सिंग (१९३१), लेखक व संशोधक सदानंद मोरे (१९५२), अभिनेत्री करिश्मा कपूर (१९७४), अभिनेता आफताब शिवदासानी (१९७८)
मृत्युदिवस : कवी, इतिहासाभ्यासक सत्येंद्रनाथ दत्त (१९२२), किसान चळवळीचे नेते समाजसुधारक सहजानंद सरस्वती (१९५०), रासायनिक खत उद्योगाचे शिल्पकार गोविंद पांडुरंग काणे (१९९१), अणुभंजनाचा पहिला प्रयोग करणारा नोबेलविजेता अर्नस्ट वॉल्टन (१९९५), समुद्रसंशोधक व ऑस्करविजेता सिनेदिग्दर्शक जॅक-इव्ह कूस्तो (१९९७), गायक, नर्तक मायकल जॅक्सन (२००९)
---
स्वातंत्र्य दिन : मोझांबिक (१९७५), स्लोव्हेनिया, क्रोएशिया (१९९१)
१७४० - बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवेपदी विराजमान.
१९३५ - भारताचा पहिला कसोटी क्रिकेट सामना सुरू.
१९४७ - 'ॲन फ्रँकची डायरी' प्रकाशित झाली.
१९५० - उत्तर कोरियाचे दक्षिण कोरियावर आक्रमण. हे युद्ध १९५३पर्यंत चालले. २० लाख मृत. शीतयुद्धादरम्यानचा महत्त्वाचा संघर्ष. अद्यापही दोन देशांत डी-मिलिटराइझ्ड झोन.
१९६७ - कृत्रिम उपग्रहाद्वारे पहिला सार्वजनिक कार्यक्रम प्रक्षेपित.
१९७५ - भारताचे राष्ट्रपती श्री.फक्रुद्दीन अली अहमद यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफारसीवरून देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.
१९७८ - 'समलैंगिक स्वातंत्र्य दिन परेड'मध्ये सर्वप्रथम सप्तरंगी झेंडा झळकला.
१९८३ - भारताने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचा विश्वचषक जिंकला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
चित्र छान आहे. व्यंग लक्षात
चित्र छान आहे.
व्यंग लक्षात आले नाही (आकलनशक्तीच्या मर्यादेमुळे )
http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/
उत्कृष्ट संकल्पना.
उत्कृष्ट संकल्पना. न्यूयॉर्करमधल्या तरल कार्टूनांच्या जातकुळीची. ती पेलून घेणारं चित्रही समर्थपणे काढलेलं आहे.
दोन बैल भरपेट जेवण करून तट्ट झालेले आहेत. आणि त्यातला एक दुसऱ्याला म्हणतो 'पान खाणार?' बैलांचं जेवण म्हणजे गवत, पानं. त्यामुळे त्यानंतर पान खाणं हे गमतीदार आहे. द. मा. मिरासदारांची एक कथा आठवते. त्यात एक दूध, दही, लोणी, तूप विकणारा माणूस पैज लावून एक किलोभर लोणी खायला तयार होतो. सुरूवात ठीक होते. पण जसजसं तो जास्त जास्त लोणी खातो तसतसं त्याला कसंतरी वाटायला लागतं. (हे मी एका वाक्यात लिहिलेलं असलं तरी मिरासदारांनी याचं वर्णन जबरदस्त केलेलं आहे.) शेवटी तो जेव्हा ते संपवतो तेव्हा त्याला अजीर्ण होतं. तो वैद्याकडे जातो. वैद्य त्याला पोट ठीक करण्यासाठी औषध देतो, आणि म्हणतो 'हे कडू आहे. तेव्हा लोण्यात मिसळून खा.' हे ऐकूनच त्याची जी अवस्था होते की विचारायला सोय नाही. थोडासा त्या प्रकारचा विनोद इथे आहे.
पण... पण...
पण... पण... हे कळायला दुर्बोध आहे हो! (मलाही कळले नाही!)
अवांतर: विनोदाचे गाइड काढण्याची गरज पडू लागली, तर 'विनोद फसला' असे म्हणता यावे काय? की विनोदाच्या साटल्याचे कौतुक व्हावे? (पहिले कोणत्या परिस्थितीत व्हावे, नि दुसरे कोणत्या परिस्थितीत व्हावे?)
फसला असे नाही.
पण सामान्यतः सरदार लोकांना जोक्स समजवून सांगावे लागतात असा प्रवाद आहे![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
खुलाशाबद्दल धन्यवाद.
खुलाशाबद्दल धन्यवाद.
http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/
चित्र मस्त काढलय.
चित्र मस्त काढलय.
त्या बैलाच्या खुरावरले पान पाहून
मिले खुर मेरा तुम्हारा
तो खूऽर बने हमारा..
असं गाणं गावंसं वाटाया लाग्लं बा.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
(No subject)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!