लोक समारंभानं लग्न का करतात?
मी ज्याला लोक जनरली 'माणूसघाणी' म्हणतात, त्या प्रकारात मोडते. पण एवढ्यात काही लग्नसमारंभांना उपस्थिती अनिवार्य ठरली. केवळ बोअर होण्यापलीकडे काही प्रश्नही पुन्हा नव्यानं पडले. त्याबद्दल लोकांची मतं आणि अनुभव ऐकायला आवडतील, म्हणून हा चर्चाप्रस्ताव.
लोकसंपर्कः बहुतांश पाहुणे हे 'क्वचित' भेटणारे लोक या सदरात मोडतात. मग ते नातेवाईक असोत वा परिचित. असे लोक येतात. वधुवरांना भेटतात. कितींदा तरी ज्या माणसाच्या बाजूनं हा पाहुणा आला असेल, त्यालाही हा माणूस आपल्याकडून आला आहे की पलीकडून, याचाही पत्ता नसतो. मग गप्पा लांब राहिल्या. बरं, नवरानवरी स्टेजवर नटून-ताटकळून-सदैव सस्मित आणि मागे जेवायला वा कटायला उत्सुक लोकांची भली मोठी रांग, अशा अवस्थेत अर्थपूर्ण बोलणं असं कितीसा वेळ होणार, किंवा तेव्हा सांगितलेली नावं तरी किती काळ लक्षात राहणार? एक हस्तांदोलन, नावांची देवाणघेवाण आणि एक फोटो. बास. या प्रकाराला नक्की काय अर्थ आहे? हे असं का करावंसं वाटतं लोकांना?
खर्चः हॉल्सची उपलब्धता आणि त्यांची भाडी याबद्दल अधिक काय लिहिणे? निरनिराळे कपड्यांचे सेट्स (जे पुन्हा कधी घातले जातात देव जाणे), देण्याघेण्याचे कपडे - मानापानाप्रमाणे निरनिराळे, सोनं (आणि इतर मौल्यवान धातू किंवा दगड), येणंजाणं-अहेर-आमंत्रणपत्रिका-धार्मिक विधी. या खर्चांतून नक्की काय निष्पन्न होतं? किंवा जे काही निष्पन्न होतं, त्याचा होणार्या खर्चाशी काही मेळ बसतो का?
जेवणः एकतर नीट एकाजागी बसून जेवू देत नाहीत. जागेअभावी ते एक ठीक. पुन्हापुन्हा हावर्यासारखं जावं लागलं तरी एकवेळ चालवून घ्यावं माणसानं. पण किती पदार्थ समोर ठेवाल? चायनीज, चाट, पंजाबी, गुजराती-मारवाडी, मराठी पदार्थ / पक्वान्नं आणि केक्स-आइस्क्रीम्स-सॅलड्स नि तर्हातर्हांचे मुखवास वा विडे. अरे? 'गरिबांना मिळत नाही...' प्रकारची दटावणी राहू द्या, पण त्या अन्नाला धड न्याय तर देता आला पाहिजे?
बूट लपवणे-मेंदी-पार्लरः एकतर यांतलं काहीच परंपरेचा भाग नाही. त्याला फक्त हिंदी सिनेमाचा काय तो आधार आहे. त्यात भर नवरानवरीला उचलून घेऊन त्यांना एकमेकांना हार घालणं यथाशक्ती अशक्य करण्याची. आता तर तिथल्या तिथे नवरानवरीनं पकडापकडी खेळण्याचीच बाकी आहे, अशी धुमशान उचलाउचली हल्ली करतात. मंडळी हौशी नि भटजी शिस्तीचा असेल, तर अजूनच सावळा गोंधळ. भटजी बोंबलतोय नि लोकांची वेगळीच कबड्डी चाललीय, असं बरेचदा दिसतं. यात काय गंमत असते? की हिंदी सिनेमात गंमत येते असं दाखवतात, म्हणून आपल्यालाही ती येतेच, असं लोक परस्पर समजून घेतात?
या सगळ्यात घरातल्या लोकांनाही प्रचंड दमायला होतं, नवरानवरीबद्दल तर बोलायलाच नको. वेळ+शक्ती+पैसा खर्च होतो. त्यातून सामाजिक दबाव आणि मिरवामिरवी यापलीकडे काय साधतं? त्या दबावाचा लग्न वाचवण्यात किती वाटा असतो, नि तो असला तरी असल्या दबावांपोटी लग्नं टिकवणं बरं का? अशा लग्नांत मजा तरी येते का? कुणाला? हे सगळं वाचवावं, याला काहीतरी पर्याय शोधावा, काही गोष्टींना ठामपणे नाही म्हणावं, असं कुणालाच वाटत नाही का? पुरोगामी-सनातनी, आधुनिक-परंपरावादी, गरीब-श्रीमंत, सवर्ण-अन्य जातीय यांतले कुणीच त्याला अपवाद नसावेत? की यातून साधणार्या, मिळणार्या काही गोष्टींबद्दल मी अनभिज्ञ आहे?
व्याप्तिनिर्देशः
१. हा चर्चाप्रस्ताव लग्नसंस्थेविषयी नसून लग्नसमारंभाविषयी आहे.
२. धार्मिक विधींचा उल्लेख मुद्दामहून टाळून त्याबद्दलच्या आस्तिक-नास्तिक-स्त्रीवादी-स्त्रीपुरुषसमतावादी-पारंपरिक-आधुनिक वादांना बगल देण्याचा क्षीण प्रयत्न केला आहे.
इशारा:
'तुला कळणार नाही' किंवा 'तू लग्न करशील तेव्हा तुला कळेल' प्रकारची उत्तरं मिळाल्यास त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं जाईल.
मी लग्न केलं आणि ते
मी लग्न केलं आणि ते समारंभपूर्वक केलं
कारण?
१. कोणतेही कर्ज न काढता दोन्ही बाजूंना सहज परवडत होतं
२. लग्नाचा खर्च समाजाला वहावा वगैरे वाटले नाही
३. दोन्ही घरात पहिले लग्न असल्याने + दोन्ही 'जॉईंट फ्यामिलीज असल्याने बरीच मजा येणार याची ग्यारंटी होती (आणि तशी आलीही - दोन्ही एकत्र कुटुंबे असल्याने व बराच मोठा गोतावळा असल्याने अधिकच धमाल आली. लग्न टु लग्न भेटणारे असतातच.. त्यांचे महत्त्वही तितकेच)
बाकी घरच्यांची आवड/उत्साह/इच्छा हे ही कारण असावं असं पश्चातबुद्धीने वाटतं.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
खुलासे
काही खुलासे (या प्रतिसादानंतर चक्क व्यनी आल्याने - माझ्याकडून फारच बॉ अपेक्षा ) जाहिरः
-- आहेर घेतला नव्हता (दोन्ही बाजुने) केवळ माझ्या आमंत्रण पत्रिकेसोबत एक कोरे कार्ड दिले होते त्यावर शुभेच्छा लिहून द्यायच्या होत्या त्या हॉलमध्ये पिन-अप केल्या होत्या. त्या लेखी शुभेच्छा, त्यातील लोकांचे इनोव्हेशन, लिहिलेले धमाल मेसेजेस वाचताना अजूनही मजा येते.
-- भटजी/फोटोग्राफर वगैरे दुय्यम माणसे मंडळी दोघात एक होती.
-- बुट लपवणे, मुला मुलीला उचलणे, वरात नी बँडबाजा वगैरे अजिबात झाले नाही.
-- मी व बायकोने उपास वगैरे न करता खाऊन घेतले होते त्यामुळे दमण्याचा प्रश्नच नव्हता.
-- फक्त आम्हाला आवडतात अशीच मंडळी बोलावल्याने आमच्यावर हसायची सक्ती नव्हती
लग्न खरोखर आनंदाने पार पडले असे लग्नानंतर चार वर्षांनीही वाटते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हां, हे इंट्रेष्टिंग आहे...
हां, हे इंट्रेष्टिंग आहे... म्हणजे 'सगळे जण करतात' त्याहून निराळं काहीतरी करून / न करूनही समारंभ करता येतो. अशा समारंभात कदाचित मजा येईलही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मिरवणं
मिरवणं मिरवणं म्हणतात ते हेच्च.
आपला शहाणपणा ह्या प्रतिसादातून मिरवला अजतोय.
इतरांना जे करायचे होते, ते आम्ही कसे यशस्वीपणे केले हेच तुम्ही दाखवताय
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
लोकसंपर्क आणि खर्चाबद्दल
लोकसंपर्क आणि खर्चाबद्दल बोलायचे झाले तर "होऊ दे खर्च, लग्न आहे घरचं" या एका वाक्याने निकाल लावता येईल. अर्थ कै नसतो, पण कूल पॉइंट्स मिळत नाहीत तसे केले नै तर. त्यामुळे करतात. शिवाय झालेला खर्च काही प्रमाणात भेटींद्वारे रिकव्हर करण्याचा प्रकारही काहीजण करतात. किळसवाणा प्रकार असतो तो.
बाकी ते बूट लपवणे आणि पकडापकडी, उचलाउचली याबद्दल मात्र सहमत आहे. वेडझव्यांचा बाजार आहे नुसता. मध्ये बातमी आली होती, लग्नात वधूला उचलले होते नेहमीप्रमाणे आणि वराच्या गळ्यात टाकायचा हार नेम चुकल्याने भटजीच्या गळ्यात पडला होता.
आमची बारी येईल तेव्हा या मूर्ख प्रकाराला पूर्ण विरोध करू हेवेसांनल. मिरवण्याला तादृश विरोध नाही पण ते बूट लपवणे इ.इ. प्रकार मात्र आजिबात नाही म्हणजे नाहीच. उचलाउचलीवाली लग्ने पाहिली आहेत आणि त्या प्रकाराला केलेला विरोध फाट्यावर मारल्या जातो तेही पाहिले आहे. त्यामुळे त्याबद्दलचा तिटकारा अजूनच दृढ झालेला आहे. वेडझवे ते वेडझवेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आमची बारी येईल तेव्हा या
छ्या बॅट्या.. तूही ?? सीतोपलादि की कायम की त्रिफळा ?
चूज युवर ओन पॉयजन पण मला अशा
चूज युवर ओन पॉयजन
पण मला अशा प्रकारांचा तिटकारा आहे. नाचणे वैग्रे मजेला विरोध नाही पण मजेच्या नावाखाली अनावश्यक थैल्लर्य आजिबात पटत नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तुम्ही मांडलेले मुद्दे हे
तुम्ही मांडलेले मुद्दे हे अत्यंत निरुत्साही मनुष्याला सुचणारेच आहेत.
एक गोष्ट शंभर टक्के मान्य.. की स्वतः, खुद्द नवरा नवरीला हा दिवस अत्यंत तणावाचा आणि धावपळीचा जातो. त्याच्या जवळच्या नातेवाईकांनाही. पण पाहुणे म्हणून आलेल्या लोकांना काही त्रासबीस होत नाही हा... मस्तपैकी खाणे पिणे, टाईमपास, त्या निमित्ताने बाहेरगावहून आलेल्या लोकांचे साईटसीईंग, फुकट राहण्याची सोय, लहान मुलांना तर खेळायला अभूतपूर्व क्राउड मिळतो अन्य भावंडांचा आणि उभयपक्षी ओळखी / अनोळखी अन्य पोरांपोरींचा. अशा लग्नात एकदम घट्ट मैत्री झाली आणि नावही धड माहीत नाही, किंवा परत कधी भेटही नाही अशा अनेक बालमैत्र्या होतात. कार्यालयात पळाय-खेळायला भरपूर जागा.. पसरलेल्या गाद्यांवर गुडधिंगा..
खरंच असं काही केलं नाहीत का बालपणी?
मोठेपणीही इतरांच्या लग्नात जाऊन व्यवस्थित मज्जा करता येते.. आपलं लग्न नसल्याने टेन्शन, रुसवेफुगवे, अन्न कमी पडलं का?, केटरर मंडपवाल्याला पकडा, अण्णांना ताक गोडच लागतं, आत्तेला वातूळ चालत नाही वगैरे यापैकी काही काही ताप आपल्या डोक्याला नसताना उगीच कायतरी एकांतप्रिय माणसासारखे मुद्दे काढून विरोध कशाला? हिंदी सिनेमा पाहून त्यातल्या गोष्टी करुन सगळे खळखळून हसत असतील तर कशाला त्यावर आक्षेप..??
आपण फारतर अशा गदारोळात जाऊ नये..
पण समारंभच कशाला ?? असं कशाला..??!
जे करतात त्यांना मजा येतेच.. याउपर लग्न झालं ते शंभरदोनशे लोकांदेखत झालं हे एक परिमाणही त्या समारंभाला असतं.
त्याचा मेनू.. लोक कसे खूष झाले होते... या कहाण्या म्हातारपणीदेखील विशेषतः बायका आठवून आठवून सांगतात..
असू दे हो....
बह्वंशी सहमत, पण ते उचलाउचली
बह्वंशी सहमत, पण ते उचलाउचली कै पचनी पडत नाही. म्हणजे मजा येते म्हणून चालूदे इतकाच पॉइंट असेल तर स्ट्रिप क्लबमध्येही लग्न करा, कोण नको म्हणतंय.
(उदाहरण कैच्याकै आहे याची कल्पना आहेच, पण होप यू गेट द पॉइंट. अर्थातच, वैयक्तिक मतच असल्याने चूक-बरोबर सांगणारे तरी आम्ही कोण?)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
माझा आक्षेपबिक्षेप नाहीये
माझा आक्षेपबिक्षेप नाहीये हां, (माझ्या आक्षेपाला विचारतो कोण?!) पण मला सिरियसली पडतात हे प्रश्न. नि 'एकांतप्रिय'पेक्षा मी सिलेक्टिव्ह-माणूसप्रिय असा शब्द वापरीन. नि 'निरुत्साही'पेक्षाही 'आळशी'.
पण हे तुमचं झालं. सगळ्यांना अशीच - याच प्रकारची मजा येते?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मला अजिबात येत नाही. मी
मला अजिबात येत नाही. मी बालपणानंतर कधीही लग्नांना वगैरे अजिबात जात नाही. बाहेरगावच्या तर मुळीच नव्हे.. अगदीच जवळपास, सोयीच्या दिवशी अन वेळी असेल तर पुख्खे झोडायला जातो. पुण्यातले दुपारचे पेठीय कार्यालयातले लग्न हा मात्र माझा जीव की प्राण आहे. कार्यालय लवकर सोडायचे असल्याने विधीची लांबड नाही.. भिंतभर सूचनांच्या कारणाने वाद्यांचा किंवा स्पीकरचा गोंगाट नाही.. अक्षता पडल्या की तत्क्षणी पहिली पंगत सुरु.. जेवण बहुधा एकाच केटररकडून आल्याप्रमाणे स्टँडर्ड.. अळूची पातळभाजी, बटाट्याची लग्न स्पेशल उकडलेली भाजी, तोंडलीवाला मसालेभात, टॉमॅटो सार ..आय हाय.. अल्टिमेट.. एकदम आशीर्वादच निघतो तोंडातून ढेकरेसोबत..
बाकी दिवसेंदिवस चालणार्या लग्नसमारंभांना मी जात नाहीच. पण इतरजण जातात त्यांना मजा येते हे समजतं इतकंच..आणि मला तिथे कोलाहल होतो किंवा बुफे झेपत नाही म्हणून मी जात नाही. पण मेजोरिटी लोकांना त्यात मजा येते ही माहिती झालेली आहे..
अवांतर
पेठीय कार्यालयावरून एक अवांतर मुद्दा आठवला. मिरजेतल्या कार्यालयांच्या जेवणाचा मी पंखा आहे. दत्त बंद झालं पण गोरे अजून सुरू आहे. आमटी अन अन्य पदार्थ मस्त असायचे. लहानपणी अगणित लग्ने अटेंड केली असतील त्या दोन ठिकाणी.
अलीकडे काही लग्ने तिथे अन कोल्हापुरात अटेंड करण्याचा योग आला. कै समाधान झाले नै. चव ठीक होती पण इतकीपण खास नै. मुख्य म्हणजे क्वांटिटी, भेंदी पोटच भरायला तयार नै. सांगली अन इचलकरंजीतही हीच रड. मागितले तर देतात पण द पोर्शन्स मेक इट लुक लैक सम अॅनोरेक्सिक'स डाएट. पुण्यात लग्ने अटेंड केली तिथेही फार कै वेगळी परिस्थिती नव्हती. प्वाट कै समाधान होईस्तवर भरायला तयार नै.
तुलनेने लातूरला एका लग्नासाठी गेलो होतो, तिथे मात्र मजा लै आलेली. कार्यालय वैग्रे भानगड नाही, आपलंच आवार अन आपलाच मांडव अन आपलाच स्वयंपाकी. लिंगायत पद्धतीचे जेवण, पोटभर अन लै चविष्ट!!!! वधूवर अन बसवेश्वरांना पोटभर दुवा देत उठलो. तीच गोष्ट नातेपुत्यातल्या एका लग्नाची. तिथेही सगळं काही दाबून होतं.
कार्यालयांतील पंगतीतले जेवण अलीकडे कमी होतेय का? असा प्रश्न पडतो त्यामुळे. की आमचीच भूक वाढलीये कुणास ठाऊक.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अळूची पातळभाजी, बटाट्याची
येक्जॅट्ली.... माझा पण तोच जीव की प्राण आहे. बाकी (उत्सवमूर्ती तुम्ही नसताना कोणी तुमच्याकडे बघत नाही हे माहित असताना सुद्धा)सजणे, नटणे आणि निरूद्योगी पणे खुर्चीवर बसणे याचा मला भारी कंटाळा आहे. आता लहान मुलगी असल्याने तिला सांभळावे लागते/उचलावे लागते इ. कारणाने जड साड्या आणि दागिने यांना फाट्यावर मारायला आयते कारण मिळाले आहे.
अर्थात चिवट पनीरच्या तेलकट भाज्या, चायनीज इ. असलेल्या समारंभांना जाण्यात काहीच अर्थ नाही असे माझे मत आहे(चाट वगैरेचा स्टॉल मला स्वतःला पोटभर पाणिपुरी जी एरवी खाता येत नाही ती मिळते म्हणून चालतो - पण तो मला समारंभात जाण्यासाठी प्रवॄत्त वगैरे करण्याइतका आवडता नक्कीच नाही)
बाकी परवाच दुपारी ऑफिस मधून एका लग्नात अर्धा तास जाऊन अत्यंत उत्कृष्ट "अळूची पातळभाजी, तोंडलीवाला मसालेभात,खमंग काकडी, आम्रखंड-पुरी" मन भरून खाल्ल्याने अंतरीचा तळीराम गार झाला आहे. भरल्यापोटी आम्ही वधू-वरांस मनापासून आशिर्वाद्/शुभेच्छा देऊन आलो.
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
सोशल डॉक्युमेंटेशनसाठी???
यावरून एक (कोठेतरी कधीतरी वाचलेला) किस्सा आठवला. (नक्की संदर्भ लक्षात नाही.)
कोण्या गावात म्हणे पूर्वीच्या काळी व्यवहारनोंदणीची सोय नसताना घर/जमीन/शेत-खरेदी-विक्री-क्लोज़िंग किंवा इतर तत्सम व्यवहारांच्या वेळी लोक काय करायचे, तर म्हणे गावातले कोठलेतरी एक रँडम पोर पकडून त्याला सार्वजनिकरीत्या यथेच्छ बदड-बदड-बदडून काढायचे. का, तर म्हणे व्यवहाराचा पुरावा राहतो म्हणून. म्हणजे, मोठे झाल्यावरसुद्धा ते मूल चांगलेच लक्षात ठेवेल, की अमक्यातमक्याने तमक्याढमक्याला आपले शेत विकले होते, त्यावेळी मला खरपूस बदडले होते म्हणून. हो, गरज लागली कधी पुढेमागे, तर साक्ष काढायची सोय झाली.
(म्हणजे, धोंडो भिकाजी जोशींचा जन्म कोणत्यातरी एकादशीला झाला होता, हे आईबापांस पडलेल्या कडकडीत उपासामुळे चांगलेच लक्षात राहावे, त्यातलाच प्रकार.)
===================================================================================================================
(सोशल डॉक्युमेंटेशनसाठीच करायचे असेल, तर (वधूवर वगळता) तमाम उपस्थितांस जेवू घालण्याऐवजी बडवून काढले तर? म्हातारपणीच कशाला, चांगले मरेपर्यंत लक्षात राहील. शिवाय, लग्नखर्चाला, आमंत्रितांच्या अमर्याद संख्येला आवर घालण्याची मागणीही समाजात वाढीस लागेल, हा बोनस फायदा आहेच.)
(उपस्थितांमध्ये वरवधूपालकांसही गणण्यास प्रत्यवाय नसावा. बरेचदा तेच लेकाचे वाढीव आमंत्रणयादी इन्स्टिगेट करतात.)
पुर्णपणे पटले.
मी या सर्व गोष्टींना सपेशल नकार दिला होता. पण माझ्यावरती सर्व प्रकारचे(बिपी वाढणे, लग्नच राहुदे, आम्ही येत नाही, म्हातारी आज्जी, माझ्याकडे सपेशल दुर्लक्ष) द्बावतंत्र वापरले. पण शेवटी बायकोच जेव्हा म्हणाली कि यातल्या काहि गोष्टी तिलापण हव्याच आहेत तेव्हा मी तडजोडीस मान्य झालो. कारण लग्न हे दोघांचे आहे.
पण तडजोडीतही पुर्ण टोकाच्या गोष्टी करण्यात आल्या. शेवटी मी एकटा विरुध्द सगळे जग अशी स्थिती आली तेव्हा नाद सोडुन दिला.
माझी रजिस्टर्ड लग्ना ऐवजीची तडजोड हि होती कि एका ठिकाणी ५०-१०० लोकं कमीत कमी विधींचे लग्न. पण शेवटी ३ ठिकाणी (१ लग्न + २ रिसेप्शन), ५००० लोक, प्रचंड पैशाच चुराडा असे लग्न संपले.
निषेध म्हणुन मी स्वत:हून कोणालाही लग्नाला बोलावले नाही. पण शेवटी फरक शुन्य पडला.
मलापण स्वत:ला जाणुन घ्यायला आवडेल कि फक्त लोक काय म्हणतील आणि बॉलिवुड/मेडियाच्या मते 'हाच तो आनंद' हि कारणे सोडता अजून काही आहे का? आणि फक्त एव्हड्यासाठी इतक्या वेळ/पैशाचा चुराडा का करावा?
घालावा आवर कसा वेगळाच सूर माझा
माझ्या तहानेच्यासाठी वेगळा पाऊस माझा.
मलापण मजा नाही येत अशा
मलापण मजा नाही येत अशा कुठल्याही समारंभात लग्न, बारसं, वाढदिवस. बोअर होत. पण फॉर्मलीटी म्हणुन जायच :-(. जेवणाला न्याय देऊ शकत नाही हा अजुन एक टर्न ऑफ...
.
समारंभ केला की हॉलवाले (आणि त्यांचा स्टाफ), फूलवाले, केटरर्स (आणि त्याचा स्टाफ व त्यांची सप्लाय चेन, सुब कॉण्ट्रॅक्टर), भटजी (आणि त्याचा/त्याचे अॅप्रेंटिस), सोनार/कपड्यांचा व्यापारी (आणि त्यांचे स्टाफ), वाजंत्री/ब्यांडवाले यांना रोजगार मिळतो, पाहुणे लोकल किंवा औटस्टेशन प्रवास करून येतात त्यामुळे टॅक्सी, रिक्षावाले, क्वालिस/इनोव्हा/सुमोवाले यांचा धंदा चालतो. देशाचा जीडीपी वाढतो. (हे सर्व गंमतीत आहे पण खरेही आहे).
तरीही समारंभ न केल्यास ते अधिक खर्चिक + त्रासदायक होईल असे वाटते. म्हणजे लग्नानंतर बहुतेक नातेवाइकांकडे इन्डिव्हिज्युअली जाणे, मग तेथे भेटवस्तूंची देवाणघेवाण वगैरे.
हौसेला मोल नसते हे तर सगळे जाणतातच.
पाइंट इज- कर्जबाजारी होत नसतील तर समारंभ करण्यास प्रत्यवाय नसावा. होम हवन फेरे वगैरे नाही केले तरी चालतील.
बुफेबाबत- खयाल अपना अपना...
बूट लपवणे, वराला/वधूला उचलणे- सहमत आहे. वर आणि वधूंनी आधीच ठरवून ठेवावे आणि उचलून घेतल्यास हार घालण्याचा आटापिटा करूच नये. बूट लपवणे ही मराठी पद्धत नाहीच.
त्याहून वाईट प्रथेचा चर्चाप्रस्तावात उल्लेख नाही. लग्नाच्या आदल्या रात्री वराचे नातेवाईक वराला आणि वधूचे नातेवाईक वधूला झोपू न देण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर लग्नाच्या दिवसभराची गडबड संपल्यावर वधुवर अत्यंत दमलेल्या अवस्थेत सुहागरात "साजरी" करतात. दोघे समजूतदार नसतील तर त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा बट्ट्याबोळ होऊ शकतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
एक शंका
लग्नाच्या आदल्या रात्री वराला झोपू न देणे हे फारसे कधी पाहिल्यागत आठवत नाही. काही लग्नात वधूपक्षाचे असलो तरी वधूच्या केबिनपर्यंत अॅक्सेस नसल्याने तिथल्या स्थितीबद्दल बोलू शकत नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
लग्नाच्या रात्री न झोपू देणे
लग्नाच्या रात्री न झोपू देणे मात्र भरपूर पाहिले आहे.
मित्राच्या लग्नानंतर ते दोघे नवपतीपत्नी बिचारे रंगोटी धुवून एकदाचे झोपायला गेले (अन्य काही इच्छा होणं त्या ताटकळण्यानंतर शक्यच नव्हतं..हास्य पकडून पकडून जबडे आखडले होते..) तरी त्यांच्या खोलीत वांड मित्रमंडळींनी पंधरावीस वेगळाली गजराची घड्याळे, मोबाईल आदिंची पेरणी करुन ठेवून दहा दहा मिनिटांच्या अंतराचे अलार्म सेट करुन ठेवले होते. दर दहा मिनिटांनी पिक पिक पिक.. ट्रिइइइन्ग... टुंग टुंग.. असे वेगवेगळे अलार्म्स.. आणि कपाटात, कपड्यांमधे, गादीखाली, लॉफ्टवर आणि कुठेकुठे ठेवलेली उपकरणं शोधून त्यांचे अलार्म विझवण्यात वैतागले बिचारे नवविवाहित.
मित्र हेच शत्रू असतात.
रोचक.
मित्रांचा शिरकाव एका मर्यादेपलीकडे घडू दिला की असेच होणार. पण वरती थत्तेचाचा नातेवाईक असा शब्दप्रयोग वापरताहेत म्हणून म्हणालो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हो मी पाहिले आहे. नवरा मुलगा
हो मी पाहिले आहे. नवरा मुलगा (किंवा नवरी मुलगी) एकटा त्यांच्या तावडीत पुन्हा सापडणे नाही म्हणून त्याला पिडून घेण्याचा प्रयत्न असतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
'तू लग्न करशील तेव्हा तुला कळेल'
तू लग्न करशील तेव्हा तुला कळेल
ओह् नो!
हे थोडे दिवस आधी का नाही सांगितलस . आता मनोबा म्यारिड झालेत.
now you can have only second best!
"...म्हणून सांगते शेखर मला विसरुन जा" च्या श्टायलीवर वाचावं. (पौष्टीक जीवन, निर्विकार पोष्टमनच्या हाताखाली असणआरय अनेक प्रकारांपैकी एक भावनिक उमाळायुक्त पत्राचा प्रकार.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
'हाय रे दैवा! काय रे हे करून
'हाय रे दैवा! काय रे हे करून बसलास मनोबा? आता मी उर्वरित आयुष्य जर...तर... करत घालवावं काय?'
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
लोक समारंभानं लग्न का करतात?
लोक समारंभानं लग्न का करतात?
समजलं नाही .
लोक समारंभानं लग्न करताना मला का बोलावतात?
किम्वा
लोक समारंभानं लग्न का करायला लावतात?
लोक समारंभानं लग्न का करायला भाग पाडतात?
हा प्रश्न सयुक्तिक वाटला असता.
कुणी किती उधळावे, खर्चावे, वाचवावे, गुंतवावेत हा ज्यांचा त्यांचा प्रश्न तुम्ही - मी कोण नाक खुपसणारे?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सहमत. आणि अगदी उधळपट्टीचा
सहमत.
आणि अगदी उधळपट्टीचा मुद्दा घेतला तरी, कोणाच्यातरी झगमगण्यातूनच इतर अनेकजण जगतात आणि त्याहून जास्त किमान तगतात.
जगाचा आर्थिक गाडा चालायचा तर तगणे-जगणे यापुढे झगमगणे ही पायरी आलीच पाहिजे..
माझी तक्रार
माझी तक्रार इतकीच आहे की दोन्ही बाजूच्यांनी नाही नाही म्हणत प्रत्यक्षात जरा जास्तच ताण घेत लग्न लावलं.
प्रामुख्याने काही काकू आणि मावशी मंडळींनी खालील प्रेमळ पण अधिकाराचे संवाद ऐकवले:-
"इतकं तर करावच लागतं बेटा"
"अरे पद्धतच असते ती"
"एकदाच तर करतो"
"संस्कार असतात ते. ते तर व्हायलाच पाहिजेत."
"अरे करतोय तर त्यात लाजायचं काय. कळू देत की आख्ख्या गावाला. धुमधडाक्यात बार उडवूया."
"तुला काही पैशाची अडचण असेल तर खुशाल मला माग की. आम्ही काय परके आहोत काय" ( मग घराच्या डाउन पेमेंटला पंधरादिवसापुरतीही रक्कम का नाही दिलीत? छदामही उडवला नाहित आमच्या दिशेने? )
.
.
माझं लग्न कसं लावावं ह्यावर माझं व्हर्च्युअली काहीही नियंत्रण नव्हतं.
म्हटलं माझं झालं ते झालं; निदान पुढल्या पिढीला त्यांच्या मनासारखं करु देत(अर्थात ही "बाजारात तुरी..."सारखी केस झाली.)
असं चुकून म्हणालो तर डायरेक "अरे त्यांना काय कळतय. पोरवयाचे ते. तुम्हीच मोठ्या हातानं पुढाकार घेउन (ते धुमधडाक्याला नको म्हटले मनोबासारखेच तरी) लग्न लावून द्या." असं म्हणून आता पासून माझा ब्रेनवॉश सुरु झालेला आहे. पुढील पिढी वयात येइपर्यंत ब्रेनवॉश संपूर्ण यशस्वी होणयची शक्यता आहे.
आमचं रॅगिंग सिनियर्सनी केलं; म्हणून आम्ही ज्युनियर्सचं करणार. गुड.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
बगावतीचे झेंडे खांद्यावर
बगावतीचे झेंडे खांद्यावर आहेत. बघू काय होतं ते. शिवाजी होणार नसलो तरी राणाप्रताप किंवा गेलाबाजार विलियम वॉलेस तरी नक्की नै होणार ही खात्री आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नुसत्या सह्या करणे
"नुसत्या सह्या करुन मोकळे व्हावे" असे तुझ्या डोक्यात आहे का?
असेल तर;-
च्यालेंज/बेट लाव तुझा प्लान तडिस जाणे अशक्य आहे.
अगदि परधर्मीयाशी जरी विवाह केलास तरी आपले थोर्थोर ज्येष्ठ नेउन घोड्यावर बसवतीलच. जनरेटा किती जबरदस्त असू शकतो ते पाहिलं आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
"नुसत्या सह्या करुन मोकळे
नाही. पण एकूण समारंभाबद्दल काही ठाम मते आहेत. खर्च झाला तर फार कै किरकिर नाही यद्यपि कमी खर्च करण्याकडे कल राहील.
परधर्मीयाशी लग्न करणे अन घोड्यावर बसणे हे एक्स्क्लूझिव्ह असू नये मला घोड्यावर बसायला आवडते त्यामुळे ती जबरदस्ती नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वधुपित्यांनो लक्ष द्या -
वधुपित्यांनो इकडे लक्ष द्या.
घोडी मालकांनो
घोडी मालकांनो लक्ष ठेवा.
टेंडर तयार ठेवा.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
चर्चाप्रस्ताव
मला असे चर्चाप्रस्ताव खुप खुप आवडतात. त्यासाठी डाय्रेक मताची पिंक टाकून मोकळं होता येतं.
स्वतःला ग्लोरिफाय करायची संधीही त्यातून मिळते.
शिवाय इतरत्र काही एक अभ्यास किंवा जाण असण्याची अपेक्षा असते; तशीही अशा चर्चा प्रस्तावात नसते.
म्हणून मला ह्या धाग्या सदृशचे चर्चाप्रस्ताव आवडतात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अरेरेरे, हे कै बरोबर नै.
अरेरेरे, हे कै बरोबर नै. मनोबाची प्रामाणिक प्रतिक्रिया म्हणून आम्ही मार्मिक श्रेणी दिली तर लगेच खवचटीकरण केलेत त्याचे!! कुठे फेडाल ही पापं? (कुठेही फेडा, आम्हाला काय त्याचे? पण दक्षिणा वैग्रे द्या, इतकेच.)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
लोक समारंभानं लग्न का
समारंभ करायचा कि नाही हे कोण ठरवतं हे सांगा. म्हणजे उत्तर द्यायचं दायित्व माझ्याकडे आहे का ते कळेल.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तुम्ही केला असेल समारंभ तर
तुम्ही केला असेल समारंभ तर तुम्हांला ठाऊक असेलच की. नसलं तर बसून मजा बघा. दायित्व वगैरे कुठे काढता आता? वर मनोबांनी म्हटलंच आहे, यात काही विद्वत्तेचीबिद्वत्तेची अपेक्षा नाही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
सहानुभूती
पॉझिटिव्ह अर्थाने. बहुतांश मुद्द्यांच्या संदर्भात.
Marriage is a public declaration of a private intention हे खरेच, पण पब्लिक साली अशा वेळी नको तितका भाव खाऊन जाते, नि अक्षरशः हात धुवून घेते. म्हणजे, इंटेन्शन कोणाचे, नि मिरवतेय कोण, असा प्रश्न पडावा, इतके. It's a mob.
बाकी ते बूट लपविणे वगैरे फालतूपणाबद्दल सहमत. तो 'लग्नाची वीडियोक्यासेट' म्हणून गणला गेलेला कुठलासा थर्डरेट पिच्चर आला होता ना, तेव्हापासून बहुधा हे खूळ महाराष्ट्रात सुरू झाले असावे. बादवे तो पिच्चर मी खूप उशिरा पाहिला. म्हणजे स्वतःचे लग्न झाल्यानंतर बर्याच वर्षांनी. ती रेणुका शहाणे (रेणुका शहाणेच ना ती? एक कानफटात ठेवून द्यावी, असे वाटायला लावणारी?) जिन्यावरून पाय घसरून धडधडत पडून मरते, हा त्या पिच्चरमधला एकमेव सुखावह शीन. (तो शीन पाहून असुरी आनंद झाला होता, असे आठवते.) बाकी टॉर्चर. त्या रेणुका शहाणे(च्या क्यारेक्टर)चा पाय लग्नाअगोदरच घसरता१, तर कित्ती कित्ती छान झाले असते२, असे वाटावयास लावणारा पिच्चर. असो.
=================================================================================================================
१ जिन्यावरून.
२ म्हणजे, पिच्चर लवकर आटोपला असता, किंवा (त्याहूनही उत्तम) 'ना रहेगी रेणुका शहाणे (की क्यारेक्टर), ना बनेगी पिच्चर' या न्यायाने, मुळात बनलाच नसता, अशा अर्थी. (उलटपक्षी, रेणुका शहाणे(च्या क्यारेक्टर)चा पाय (लग्नाअगोदर) जिन्यावरून घसरण्याऐवजी लाक्षणिक अर्थाने घसरता, तर पिच्चर अधिकच लांबता. त्यामुळे तो तसा (पक्षी: लाक्षणिक अर्थाने. जिन्यावरून नव्हे.) घसरला नाही, हे (एका अर्थी) बरेच झाले. असो.)
तो पिच्चर कसाही असला तरी
तो पिच्चर कसाही असला तरी (तेव्हाची) दीक्षितांची माधुरी त्यात खूप सुंदर वगैरे दिसल्याने आणि गाणी उत्तम असल्याने त्याला अज्जीच टाकवत नाही. असो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
क्षमस्व
माफ करा, पण 'दूल्हे की सालियों, ओ हरे दुपट्टे वालियों, जूते दे दो, पैसे ले लो' ही आपली 'उत्तम गाण्या'ची कल्पना असल्यास, 'अवर टेस्ट्स डिफर' म्हणून सोडून देणे मला भाग पडते. इतके भिकार गाणे आजवर मी दुसरे कोठलेही ऐकलेले नाही. किंबहुना, या गाण्याहून भिकार असे गाणे त्रिभुवनांत शोधले, तरी सापडेल, किंवा कसे, याबद्दल व्यक्तिशः साशंक आहे.
बाकी माधुरी दीक्षितांबद्दल बोलायचे तर, त्या कदाचित कोणाला आवडू शकतील, हे मी समजू शकतो, परंतु का कोण जाणे, पण त्या माझा चहाचा कप नाहीत. असो.
मग
वाईनचा ग्लास तरी? चहा!!! अरेरे!
-Nile
अपग्रेड
ठीक. 'थंड' चहा. -चा ग्लास.
खूष?
आह्
You mean iced tea? I almost thought you are अरसिक!
-Nile
आह्
You mean iced tea? I almost thought you are अरसिक!
-Nile
वाईनचा ग्लास वगैरे
वाईनचा ग्लास वगैरे सुचविण्याअगोदर, टायटलमध्येच सूचना केलीत की हो निळोबा- "मग".
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पण "दीदी तेरा देवर दीवाना",
पण "दीदी तेरा देवर दीवाना", "आज हमारे दिलमे अजब ये उलझन है" ही गाणी मला मस्त आवडतात. टैटल साँगही तितकेच आवडते. "दूल्हे की सालियों" इतके नसले तरी ठीकठाक आवडते. ते एक असोच. शिवाय त्रिभुवनातल्या भिकार गाण्याबद्दल साशंक असलो तरी त्रिभुवनातला महाभिकार ड्यान्स व्हिडिओ पहावयाचा असल्यास हा पहा.
http://www.youtube.com/watch?v=LYUBL4cWSO8
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
राग
राग पिच्चरवर आहे का लग्नांवर?
(माझा लग्नावर अजिब्बात राग नाही; फक्त बायकोवर आहे!! )
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
या निमित्ताने
मिसेस मनोबांना ऐसीचे सदस्यत्व दिल्या जावे असा प्रस्ताव मांडतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सहमत. आणि त्यांनी लॉगैन
सहमत. आणि त्यांनी लॉगैन करताच त्यांना हाच प्रतिसाद दिसेल* अशी व्यवस्था करावी.
*पर्सनलायझेशन हो !! बाकी कै नै.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अगदी अगदी. अन मनोबांच्या
अगदी अगदी. अन मनोबांच्या निमित्ताने उनकला एक नवीन मेंबरही मिळेल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आयडी बनला
आयडी बनला.
मनोबांच्या better half, सुमन ह्यांचा आय डी बनला आहे.
वेलकम!
मनोबा घरी पण इतके प्रश्न विचारतात का हो?
वेलकम करने का ये अपुनका स्टाईल है!
-Nile
+१.
असेच म्हणतो.
झालंच तर मनोबांचे लिखाणही वाचावे ही विनंती
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
डु
हा मनोबांचाच डु आयडी वाटतो. (हलके घेणे)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आयडी
आयडी मीच घेउन दिला आहे.
जसं जसं कम्फर्टेबल वाटेल तसा तसा वावर/वापर होइल अशी अपेक्षा.
बाकी, एखादा आयडी माझाच आहे, हे सिद्ध करणं माझ्यासाठी फारच सोपं.लॉग इन करुन प्रतिसाद द्या; झालं.
पण एखादा आय्डी माझा नाही; हे सिद्ध करणं भलतच अवघड.
(तीन प्रकरच्या ट्यांकचा ज्योक(गर्म पाणी, थंड पाणी आणि रिकामे टब) माहित असेल्च.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
व्वा! (उखाण्यातून) नाव घेताना
व्वा! (उखाण्यातून) नाव घेताना पूर्वी क्रियेटिव्हिटी दाखवली जायची.. आता बदलत्या जमान्यात सदस्यनाम घेताला क्रियेटिव्हिटी! मस्त!
सु मन यांचे स्वागत आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
उखाणा घ्या
ऐसीवर स्वागत, सुमनबाई!
आता (मनोबांच्या नावाचा) एक उखाणा घ्या पाहू.
...
दोन्हींवर. काय म्हणणे आहे?
(पुढचा प्रश्न?)
======================================================================================
बाकी, माझ्या बायकोवर मला राग आहे किंवा कसे (आणि व्हाइसे व्हर्सा), हा मी आणि माझी बायको यांच्यातला खाजगी मामला असल्याकारणाने, Don't think that I'm gonna fall for that bait.
(बाकी चालू द्या.)
संस्थळावरचे शतकी धागे आणि समारंभ
संस्थळावरचे शतकी धागे आणि समारंभ - सगळेच फटकेबाजी करत असतात, वर उल्लेख आल्याप्रमाणे विचार/अभ्यास वगैरेची गरज फारशी नसते, संपादक मंडळ मात्र एवढ्या फटकेबाजीला कसं सावरायचं ह्या विचारात मग्न असतात, शतकी धाग्यात रुसवे/फुगवे, स्कोर-सेटलिंग वगैरे प्रकार असतात, चेपणारे चेपुन जातात, खपणारे खपतात, वेग-वेगळ्या रंगातले अनेक सदस्य आणि त्यांचे प्रतिसाद, कंपुबाजी जोरात असते, मिरवणारेही बरेच असतात, कडक म्हातारे आणि छळणार्या म्हातार्या असतातच. दुसर्या दिवशी भर ओसरल्यावर कालचा गोंधळ कसा होता ह्याचे खरडवही किस्से चालुच रहातात. काही जण 'आता ह्या संस्थळावर राम राहिला नाही, आमच्या वेळेस बरं होतं' असं म्हणणारे असतात. काही जण 'पुढच्या वेळेस तिला/त्याला कोपर्यात घेऊ' वगैरे बाता मारत असतात, ज्यांचं अपत्य असतं(धागा-जनक) ते आपले कोपर्यात बिलं फाडत बसलेले असतात(कधी-कधी ते पण झकास एंजॉय करतात).
हे असले(म्हणजे मी वरच्य परिच्छेदात नमुद केलेले) धागे 'कधी-कधी' झडले म्हणजे एंजॉय करता येतात तसचं समारंभाचं आहे, काय?
ठ्या
कडक म्हातारे आणि छळणार्या म्हातार्या असतातच. दुसर्या
ठ्ठो....
कसं कसं सुचतं हो तुम्हाला असं चपखल वर्णन?
.
.
.
म्हातार्अयंचय छळाला वैतागलेला
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
ठ्ठो!!!!!!!!!!!! मज्जा
ठ्ठो!!!!!!!!!!!!
मज्जा
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
खरं आहे. तूर्तास सगळेच जण
खरं आहे. तूर्तास सगळेच जण फटकेबाजीच्या मुडात आहेत. पण मी एका उत्तर भारतीय सहकार्याला हा प्रश्न उद्विग्नपणे विचारला होता एकदा.
माझ्या खवचट आणि निरुत्साही प्रश्नावर तो म्हणाला, "तू शिकलीसवरलेली आहेस. पैसे कमावतेस. लग्न करून मोडायची वेळ आलीच, तर स्वतःच्या पायावर ठामपणे उभी राहशील, कुणालाही भीक न घालता. आमच्याकडे, नि विशेषतः गावांत असं नसतं. लग्नात येणारे लोक एका मोठ्या दबावगटाचं काम करतात. दोघांपैकी कुणीही (लोकांच्या मते आलतूफालतू कारणासाठी) लग्नाला फाट्यावर मारायचं ठरवलं, तर 'इतक्या लोकांच्या साक्षीनं आपण लग्न केलंय' असा एक धाक असतो, विच वर्क्स. जोवर सगळे लोक इतके पुढारलेले असत नाहीत, तोवर तोच एक बरा मार्ग नाही का?"
माझ्याकडे आजही याचं समर्पक, हुशार उत्तर नाही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
ऑन सिरिअस नोट - मध्यमवर्गीय
ऑन सिरिअस नोट - मध्यमवर्गीय समाजात सामाजिक देण्या-घेण्याचा हिशोब, आनंदाचं सेलिब्रेशन, रितसर लग्न(रितसर न झालेल्या लग्नामागचे संकेत) वगैरे कारणं असतात. एंजॉय करणं शिकलं नाही तर दुसर्या दिवशी 'दोन घोट' घ्यावे लागतात अशी स्थिती होते.
ते 'एक्ष्प्लनतिओन' खरंच
ते 'एक्ष्प्लनतिओन' खरंच पटण्यासारखं आहे. जसा समाज तशा प्रथा. त्याला इलाज नाही हे खरेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पुरवणी
----------------------------------------पुरवणी-------------------------------
काही जण मात्र स्वतःचा प्रांत(लग्न) नसताना, ऐकिवपांडित्यावर (बहुतेक वेळा मित्राचाच आणलेला सुट/सफारी(भयंकर फॅशन सेन्स) घालुन) मिरवित असतात, अशा ट्रोलांची भाऊगर्दी असते, त्यांना पान आणि श्रेण्यांमधे(फेटे) स्वारस्य असते,(पान खाऊन) इथे जीव खाऊन(दुसर्याचा) पिंका टाकत असतात. हुशार (सुंदर) सदस्य (पोरी) मात्र काय (ध्यान) प्रतिसाद आहे असं म्हणुन 'हा' नको अशी खुणगाठ बांधत असतात.
----------------------------------------------------------------------------
काही कारणं
१. काही लोकांकडे फार पैसा असतो.
२. काही लोकांना गावात/पाहुण्यांत 'सर्वात भव्य लग्न' स्पर्धा चालू आहे असे वाटत असते.
३. पारंपारिक समारंभ केला नाही तर या लग्नाला समाजमान्यता मिळणार नाही असे बरेच लोकांना वाटते. (बरेच लोक समारंभच काय लग्नच यासाठी करतात असेही असावे.)
४. समारंभ न करण्याचे ऑप्शन लोकांना माहित नाही, कारण ही प्रथा आहे.
ही मूलभूत कारणं आहेत, यांची अनेक उपकारणं होऊ शकतात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मंडळी मंडळी, हा धागा 'लोक
मंडळी मंडळी, हा धागा 'लोक समारंभानं लग्न का करतात?' असा आहे, 'लोक समारंभानं लग्न का अटेंड करतात?' असा नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
उं हूं
मंडळी मंडळी, हा धागा 'लोक समारंभानं लग्न का करतात?' असा आहे, 'लोक समारंभानं लग्न का अटेंड करतात?' असा नाही.
हो. धाग्याचं शीर्षक तसच दिसतय.
पण धागाकर्तीचं कंटेंट दुसरीकडेच झुकलेलं दिसतय.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
खरे आहे
माझ्या लहानपणी सिमांतपुजन [चुकला बहुतेक?? का असेच कायसेसे पाद्य पूजन म्हणायचो मी वरमाईचे पाय धुणे व पाच इकडचे व पाच तिकडचे भेटी व नारळ-पाकीट-भेटवस्तू आदानप्रदान, मग कढीभात का ताकभात स्पेशल जेवण] आदल्या रात्री व दुसर्या दिवशी लग्न असे दोन जेवण, एक नाश्ता प्रकरण होते. लग्न वधूकडच्यांनी लावून द्यावे असा रिवाज होता. लग्न झाल्यावर वधू फॅमीली जाम दमलेली दिसायची. मी स्वता लग्नाचा होइस्तोवर रजिस्टर मॅरेज + रिसेप्शन असे पॅकेज फॅशन मधे होते... मधे तर ऐकले की लव्ह-इन वगैरे शिस्तीत सुरु झाले आहे...
पण आता... काळाची उलटी चक्रे...
आजकाल कित्येक लग्न ऐकतोय एक रात्र जनरल मेहेंदी, दुसरी रात्र संगीत, तिसरी रात्र वधू हळद / मेहेंदी, चौथी सिमांत पुजन आणी नेक्स्ट डे लग्न [रात्रच हवी तर सुहाग घ्या] शिवाय बरेचदा [शक्यतो दुसर्या गावी देखील] रिसेप्शन....
शेवटचे दोन समारंभ वगळता आदले तीन व्हेन्यु छोटे हॉल, ते मंगल कार्यालय वेगळा. स्पेशल डान्स वगैरे बसवला असतो. ऑडीओ-व्हिडिओ प्रेसेंटेशन शिवाय हौशी लोकांनी बसवलेला लग्न कसे ठरले वगैरे ड्रामा असते. अगदी लग्नाच्या दिवशी पण डान्स वगैरे प्रमुख कलाकारांचा [वर-वधू त्यांचे आई बाप, भावंडे, आज्ज्या] तसेच चारही प्रसंगात खाणे-पिणे वगैरे जोरदार...
मराठी लग्नाचे ते देखील पुण्यातले स्वरुप बदलत आहे. लोक प्रचंड हौशी असतात व मीच दिवसेंदिवस <हौशीलेस?? तत्सम शब्द> होतो आहे की काय असे वाटतेय
अपूर्ण
>>आजकाल कित्येक लग्न ऐकतोय एक रात्र जनरल मेहेंदी, दुसरी रात्र संगीत, तिसरी रात्र वधू हळद / मेहेंदी, चौथी सिमांत पुजन आणी नेक्स्ट डे लग्न [रात्रच हवी तर सुहाग घ्या] शिवाय बरेचदा [शक्यतो दुसर्या गावी देखील] रिसेप्शन....
शिवाय एक संध्याकाळ डीजे राहिला सहजराव.
(विधीविरहित लग्न करण्यात अयशस्वी) नितिन थत्ते
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
फास्ट ट्रॅक
आम्ही सगळे अर्ध्या दिवसात आटपले!
सगळ्यांनाच दुपारच्या जेवणाचे निमंत्रण.
संध्याकाळी ४ वाजता हॉल रिकामा. नो रिसेप्शन-बिसेप्शन!! सहा-साडे सहाला नवरी नव्या घरी दाखल!!!
(फास्ट ट्रॅक) सुनील
शहरी क्राउड
उल्लेख केलेल्या केसमध्ये शरी क्राउड अधिक होता काय?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
१००%
जवळपास १००%
भलतीच
भलतीच घाई ब्वॉ तुम्हाला! (ह.घे.)
-Nile
हॅ हॅ
ड्राय रॉक
लोकांना असे म्हणण्यापूर्वी स्वतःचा गाढवपणा* विसरू नये.
*मौजे -अमेरिका, तारिख - १४-०२ -२०&&
अगदी पाश्चात्य ललनांना प्रसंगावधानाचे शस्त्र काढावे लागते असे स्वतः वागता आणि ...
...लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण कुठला
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
निळोबांनी स्वतःतल्या मेलेल्या
निळोबांनी स्वतःतल्या मेलेल्या मध्यमवर्गीयाची तरी आठवण ठेवावी
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
प्रश्न- लोक समारंभानं लग्न का
प्रश्न- लोक समारंभानं लग्न का करतात?
उत्तर- माणुस समाजशील प्राणी आहे.लग्न ही आनंदाची गोष्ट आहे. आनंदात इतरांना सहभागी करुन घेतले कि तो बहुगुणित होतो. तसेच लग्न आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे. त्यानिमित्त समारंभ केला कि परस्परांमधील नाती दृढ होतात. तसेच सर्वांच्या साक्षीने लग्न केल्यामुळे आपण या सामाजिक बंधनात व्यवस्थित राहिले पाहिजे असा एक प्रकारे मनोवैग्यानिक दबाव तयार होतो............. वगैरे वगैरे. आता लोक समारंभाने हनिमून का करीत नाही असा प्रश्न ईचारू नका.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
छे हो...
माणुस समाजशील प्राणी आहे.
हां; हे खरं असेलही; एकमेकांच्या मुच्युअल/उभय फाय्द्यातून समाजशीलता वगैरे बनली असावी; कळपही तसेच बनले असावेत.
.
पण
लग्न ही आनंदाची गोष्ट आहे.
"लग्नसोहळा" हा शब्द अधिक चपखल बसेल. शिवाय कुणासाठी आनंददायी ; हे ही महत्वाचे.
पाहुणे, नातेवाई, वधूच्या घरचे - सख्खे आप्त; वराकडील सक्खे आप्त. हे सगले वेगवेगळे स्टेकहोल्डर्स आहेत.
.
आनंदात इतरांना सहभागी करुन घेतले कि तो बहुगुणित होतो.
छे छे. स्वतः आनंदात असताना इतरांना खिजवायला मजा येते. हा मूळ मनुष्यस्वभाव आहे. संस्कृतीनं त्याला जरा मवाळ केलय इतकच.
फेसबुकवर सगळे फेसाळते चषक हाती घेउनच फटु कसे असतात? "आम्ही लै खुश आहोत" हे मिरवण्यात एक आनंद आहे. ते "मिरवणे" आहे. "सहभागी" करुन घेणे नाही. किम्वा हल्ली बोलताना उल्लेख होतो ना, "इतक्या मोठ्या प्रमाणात करुन दाखवीन " यंव अन् त्यंव.
त्यात्ला "करुन दाखवीन" हा क्लॉज महत्वाचा. काहीतरी "प्रूव" करण्यासाठी सगळी धडपड.
.
.
तसेच लग्न आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे.
नक्कीच. प्रत्येक लग्न हा आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे
.
.
त्यानिमित्त समारंभ केला कि परस्परांमधील नाती दृढ होतात.
सर्वात बिन्डोक रुसवे फुगवे, मानपमानाचे प्रयोग लग्न नामक समारंभातच होतात.
.
तसेच सर्वांच्या साक्षीने लग्न केल्यामुळे आपण या सामाजिक बंधनात व्यवस्थित राहिले पाहिजे असा एक प्रकारे मनोवैग्यानिक दबाव तयार होतो
हो . काही लोक तसे घेतात खरे दबाव. मग नीट राहिले पाहिजे म्हणून ते नीट रहातात असे नसून दबावाखाली नीट राहतात्.अर्थात तेही फार चूक नाहीच म्हणा. तोही एक नॉर्मच झाला म्हणायचा.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
तेहेतीस
तेहेतीस वर्षांपूर्वी माझी ही अशीच जहाल मते होती. माझ्या साधेपणाच्या आग्रहामुळे समोरच्यांनी एक लग्न मोडलेही. नंतर वरिष्ठांचा दबाव वाढला, तरीही मी सासर्यांना सांगितले की तुम्हाला समारंभ करायचा आहे ना ? मग करा, पण माझे कोणीही नातेवाईक मी बोलावणार नाही. रिसेप्शन करायचे नाही. त्यांनी या अटी कबूल केल्या. लग्नात फक्त हिच्या बाजूनेच आहेर घेतला गेला कारण आमच्या बाजूचे फक्त आई-वडील, बहिणी आणि मेव्हणे एवढेच होते. लग्न त्यांच्या गांवी केल्याने आमच्या सर्वांचा तिकीटांचा हिशोब तिथेच करुन त्यांना पैसे घ्यायला लावले. तरी रजिस्टर लग्न करण्याचे स्वप्न भंगल्यामुळे मन उद्विग्न झाले. त्यांत आधी बढाया मारुन ठेवल्यामुळे, पुण्याच्या सदाशिवपेठी नातेवाईकांकडून कुत्सित शेरे ऐकावे लागले. असे काहीतरी होणार अशी मला अंतरंगात कुणकुण लागली होती बहुधा. कारण त्याच्या कितीतरी आधी मी लग्नावर एक कविता करुन ठेवली होती.
बसलो होतो गंमत पहात
चारचौघांची दशा प्रवाहात
सगळे तसलेच रडतराऊ
आपल्या वेळेस पाहुन घेऊ
वेळ केंव्हा गेली बरे ?
चार म्हणतात तेच खरे!
अशा वागण्याने नांव पडले तिरशिंगराव माणूसघाणे!
समारंभपूर्वक लग्न का करतात
समारंभपूर्वक लग्न का करतात याची काही उत्तरं घाटपांडेंनीही दिलेली आहेत. समाजात आनंदी घटनांनिमित्त काही ना काही समारंभ करणं हे लग्नाव्यतिरिक्त इतरही बाबतीत होताना दिसतं (वाढदिवस, मुंज, सण, इ. इ.) सामाजिक पातळीवर असे समारंभ अधूनमधून अचानक आणि ठरलेले सण असले की लोकांसाठी एक काहीसं आनंद करण्याचं वेळापत्रक तयार होतं. तीनशे दिवस काबाडकष्ट आणि पासष्ट दिवस आनंद-उत्सव. ही प्रथा झाली की सगळ्यांनाच 'लग्न म्हणजे या या गोष्टी आल्याच पाहिजेत' असे अलिखित नियम पडतात.
मला दुसरा पैलू दिसतो तो अर्थकारणाचा. पक्वान्नांचं जेवण एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असेल तर ते किफायतशीर ठरत असावं (मी आजकालचे केटर्ड इव्हेंट्स, बफे वगैरे म्हणत नाही - तर पूर्वीची गावजेवणं माझ्या डोळ्यासमोर आहेत) उदाहरणार्थ, एक बकरा मारून खाणं कुठच्याच कुटुंबाला परवडत नाही. पण आख्ख्या गावाला जेवणासाठी जो स्वयंपाक बनतो त्यात हे सगळे ओव्हरहेड्स कमी होतात.
हे थोडंसं भिशीसारखंही आहे. यावेळी भिशी जिला कोणाला लागेल तिने जोशीबाईंना पैसे द्यायचे कारण त्यांना गरज आहे वगैरेप्रमाणे. आईवडील समजा शंभर लोकांना बोलवून शंभर रुपये खर्च करतात. शंभर लोकांना ते जेवण, तो उत्सव, सोहळा यातून मिळणारा आनंद दीडशे रुपयाच्या इक्विव्हॅलेंट असतो (गविंनी मांडलेले मुद्दे). हे दीडशे रुपये लोक अहेराच्या स्वरूपाने नवीन जोडप्याला देतात. म्हणजे ज्यांना खरोखर गरज असते त्यांच्यापर्यंत अधिक पैसे पोचतात. अर्थात प्रत्येकाच्याच घरात काही ना काही सोहळा कधी ना कधी असल्याने शेवटी हिशोब तोच होतो.
बरं, आलेल्या शंभरांपैकी प्रत्येकच जण दीड दीड रुपया अहेर देत नाही. ते आपल्याला परवडेल तितकाच देतात. गरीब १ रुपया अहेर देईल श्रीमंत २ देईल. त्यामुळे एक प्रकारची वेल्थ रिडिस्ट्रिब्यूशनही होतं.
या प्रथेमागे एवढा गहन विचार कोणी केला आहे. पण असे अप्रत्यक्ष फायदे असल्यामुळे ती टिकून राहायला, भक्कम व्हायला मदत झाली इतकंच.
प्रश्न खरा तर असा आहे की आजच्या काळात ही सगळी समीकरणं थोडी कमी लागू व्हायला लागली आहेत. तरीही लोक समारंभांवर इतका खर्च का करतात...
"प्रश्न खरा तर असा आहे की
"प्रश्न खरा तर असा आहे की आजच्या काळात ही सगळी समीकरणं थोडी कमी लागू व्हायला लागली आहेत. तरीही लोक समारंभांवर इतका खर्च का करतात..."
एक्झॅक्टली. दबावगटाची गरज नाही, त्यासाठी कायदे आहेत. तुम्ही म्हणता तेही फायदे सध्या गैरलागूच आहेत. तरी लोक अशी लग्नं का करतात?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
शक्यता
>>प्रश्न खरा तर असा आहे की आजच्या काळात ही सगळी समीकरणं थोडी कमी लागू व्हायला लागली आहेत. तरीही लोक समारंभांवर इतका खर्च का करतात...
खरं तर मी पुढे जे सांगणार आहे ते जुन्या काळाला लागू नाही तर नव्या काळाला लागू आहे. (जुन्या काळात जोडप्याचा वेगळा संसार उभा करायचा नसेल).
नव्या जोडप्याला लागणार्या संसारोपयोगी वस्तूंना आणि नंतरच्या काळासाठी समजा ५०-६० हजार रुपये लागणार असतील तर आहेराच्या मार्गाने ते (वस्तू+रोख) जमा होत असतील. आता कुणी म्हणेल की ५० हजार रुपये समारंभावर खर्चून आहेर रूपाने ५० हजार रुपये नवपरिणित जोडप्याला मिळण्यापेक्षा पालकांनी ५० हजार सरळ जोडप्याला द्यावे. पण तसे होण्याची शक्यता कमी आहे कारण ५० हजार रु जोडप्याला द्यायच्या वेळी अ, ब आणि क या वस्तू लगेच घेतल्या नाहीत तरी चालेल असा विचार होण्याची बरीच शक्यता आहे. समारंभ केला की ५० हजार खर्चायला पर्यायच रहात नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नाही,
पण ह्या केसमध्ये खर्च स्ट्रीम लाइन्ड रहात नाही. तुम्हाला खरोखर कशाची गरज आहे तेच आयटम्स तुम्हाला मिळतील ह्याची शाश्वती नाही.
बहुसंख्य आयटमची तेच तेच असतात. उदा:- पन्नास साठ भिंतीवरील घड्याळे. बाउल्-वाट्या -काचेचे भांडे ह्यांचे दोन्-तीनशे सेट्स, शोभेच्या दीड्-दोनशे वस्तू.
मला खरोखर काय हवे; माझे प्राधान्यक्रम काय आहेत हे माझ्याशिवाय इतर कुणालाही माहित असणे ठाउक नाही.
तस्मात, थेट रक्कम देणेच बरे. खरोखर ज्याची गरज असेल, ते ती व्यक्ती घेण्याचा प्रयत्न तरी करेलच.(माझे स्वतःचे उदाहरणः- घरातील एका सदस्याला हिवाळा असल्याने गीझर असणे अगत्याचे वाटते. )
रिपीट झालेल्या वस्तूंचे करायचे काय हा ही प्रश्न उभा असतोच.
माझ्या चिमुकल्या घरात पाच पन्नास राधा-कृष्ण ह्यांचे शो पीस, किम्वा फोटोफ्रेम मी कुठे कुठे ठेवू समजत नाही.
आम्हा मित्रांच्या ग्रुपमध्ये एक संकेत आम्ही पाळतो. आम्ही सरळ सरळ रोख रकमेची पाकिटे भेट म्हणून देतो. क्वचित गिफ्ट कार्डसुद्धा दिले आहेत.
गिफ्ट कार्ड समजा सात आठ हजार रुपायाचे दिले तर त्या सात आठ हजारात काय काय घ्यायचे हे स्वतः होस्टला ठरवता येते.
गेस्ट ला भेटावस्तू दिल्याचे समाधान मिळते.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
+
रोख/गिफ्टकार्डची प्रथा उत्तम.
किंवा मग वेडिंग रजिष्ट्री. परंतु ही प्रथा भारतात रुजेल तर सोडाच, रुचेल किंवा कसे, याबाबत साशंक आहे. (व्यक्तिशः मलाही फारशी रुचत नाही. पण याचे प्लसेस आणि मायनसेस असू शकतात. त्याबद्दल सविस्तर पुन्हा कधीतरी.)
हो.
फक्त लगन्च नव्हे तर लहान बालकाच्या वाढदिवसालाही ह्यासदृश संकल्पना पाश्चात्त्य(की पाश्चिमात्य?) जगतात रुळल्यात असे ऐकून आहे.
म्हणजे, समजा एखाद्या चिरंजीवांचे वआढदिवसाचे आमंत्रण आले असेल तेव्हा तुम्ही प्रेफरन्स लिस्ट पैकी काही मिलण्याची तरतूद करु शकता किम्वा त्याच्या खात्यावर अमुक एक रक्कम जमा करु शकता.
ती रक्कम बालक सज्ञान झाल्यावरच काढू शकते. त्याचे पालकही त्यापूर्वी काढून घेउ शकत नाहित.
अर्थात ही सारीच ऐकिव माहिती आहे.
आपल्याकडे असं काही आणलच तर लोकांच्या पचनी पडण्यास बराच वेळ लागेल.
.
.
संपूर्ण अवांतर :-
हल्ली "आहेर नको" असे पत्रिकेवरच छापलेले असते. पण होते काय की कित्येक लग्नात पुढील संवाद ऐकू येतात :-
"बास का आता? माझ्याकडूनही घेणार नाही का आता?"
"अरे आहेर नको लिहिलय ते बाहेरच्यांसाठी. आम्ही तर घरचेच की रे"
"असं कसं ; असं कसं; न घेउन कसं चालेल? नै तर हे बघा इथेच रुसुन बसतो आम्ही. तुम्ही हे घेतलं नाहित तर तुमच्या लग्नात जेवणारच नाही;
आणि वर सगळ्या गावभर तुम्ही लग्नात बोलावूनही जेवू दिलं नाहित हे सांगत फिरु. ख्या ख्या ख्या" (???!!!)
असे प्रेमळ आग्रह, इमोशनल ब्लॅकमेलिंग(भावनिक पेच) करुन उरावर बसले जाते. बरे ही "आम्ही घरचेच " म्हणणारी मंडळी खरोखर घरच्यासारखी असती तर
त्यांनी अडचण तरी समजून घ्यायला हवी. ते आपले समोरच्याचा भिडस्त स्वभाव व प्रसंगातील नाजूकपणा ह्यांचा फायदा घेत आपली बाजू रेटित राहतात.
खरोखरिच गह्रच्यासारखे संबंध असते तर लग्नापूर्वी केळवण वग्रेच्या वेळी केव्हातरी किम्वा लग्नसमारंभ उरकल्यावर नंतर कधीतरी ही मंडळी त्यांचा हक्काचा/प्रेमाचा आहेर देउ शकतातच की.
मुद्दाम तिथे असलेल्यांना अडचणीत पकडून नक्की काय साध्य होतं ते कळत नाही.
शिवाय, "आहेर नको" हे वाचून काही लोकांनी खरोखरच काहिच आहेर आणलेला नसतो. त्यामुळे त्यांच्यासमोर हा आहेर/भेटवस्तू स्वीकारावा तर पंचाइत.
तो त्यांचा अपमान झाल्यासरखं त्यांना वाटू शकेल. शिवाय भेटवस्तू स्वीकारायच्याच होत्या तर "नाही नाही, नको नको, कशाला उगीच" म्हणण्याचा आवतरी कशाला आणलात असा रास्त सवाल
आहेर न आणलेल्यांनी विचारणं चूक ठरत नाही.
असं का होतं? भारतीय समाज शहरीकरणाच्या मोठ्या स्थित्यंतरातून जातोय. ते ट्रान्स्झिशन अजून पूर्ण झालेलं नाही.
मग काही त्या शहरीकरणाच्या लाटेत आधुनिक जीवनशैली,विचारशैली आत्मसात केलेले असतात; तर काही जण अजूनही ग्लोबलायझेशनच्या जमान्यातही मागच्या काळात राहून गेलेले असतात.
त्यांच्यासाठी ही कालची मूल्ये म्हणजे जीव की प्राण.
जोवर एका इक्विलिब्रिअमला भारतीय पब्लिक येत नाही तोवर हा गोंधळ राहणारच.
ज्यानी त्यानी आपापला मार्ग ह्यातून शोधावा.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
या प्रथेमागे एवढा गहन विचार कोणी केला आहे.
या प्रथेमागे एवढा गहन विचार कोणी केला आहे. पण असे अप्रत्यक्ष फायदे असल्यामुळे ती टिकून राहायला, भक्कम व्हायला मदत झाली इतकंच.
हीच नाही, संस्कृतीच्या इतरही घटक संकल्पना नागरीकरणासोबत हळूहळू विकास पावल्या असाव्यात.
काही शे लोकांचा एकमेकांना अनोळखी गट अॅट रंडम एखाद्या सर्वस्वी नवीन भूमीवर जरी सोडला तरी आपोआप त्यांच्यात हे व्यवहारांचे सेंकेत, कन्वेन्शन तयार होतीलच.
म्हणजे, हे कुणी एकट्यानं बसून एखादं बांधीव सिमेट्रिकल आकृती बनवण्यासारखं नाहिये; पण फ्री मार्केट सारखं आहे..
ह्यात लोकव्यवहारातून आपोआप एक इक्विलिब्रिअम साधला जातो ; काही संकेत आपोआप बनतात; रुळतात.
खूपच व्हेग लिहित आहे; पण समजून घ्याल अशी आशा.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
दिवाळी अंक
या धाग्याच्या निमित्ताने एक गोष्ट आठवली. पंधरावीस वर्षांपूर्वी पुण्यातल्या कुणीतरी 'पुस्तकांचं रुखवत' अशी कल्पना काढली होती. तिने कितपत मूळ धरलं ते ठाऊक नाही, पण जर तसं काही अजून चालू असेल तर मेभुंनी अशा लग्नांना आवर्जून जाऊन तिथे 'ऐअ' चा दिवाळी अंक रुखवतात ठेवून यावा अशी मी त्यांना विनंती करतो. समारंभ वैतागवाणा असला तरी यामुळे त्यातून थोडंफार चांगलं काहीतरी निष्पन्न होईल. बाकी चालू द्या…
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
ट्रॉलीचिकित्सा
इथे प्रतिसाद द्यायाला जमतोय म्हणजे लॉगैन करण्यात अडचनी नाहित.
मग स्वतःच्याच http://www.aisiakshare.com/node/2250 "ट्रॉलीचिकित्सा" ह्या धाग्यावर पुन्हा फिरकला का नसावात बुवा?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
?
वरील प्रतिसादात भडकाउ काय आहे ते श्रेणीदात्यानं सांगितलं तर उपकार होतील.
श्रेनी द्यायला प्रॉब्लेम नाही; मनोबा थर्ड क्लास लिहित असतील तर त्यास थर्ड क्लास म्हणणे रास्तच आहे.
पण तुम्ही तसे का म्हणता हे जानून घेउ इच्छितो/कुतूहल आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
लोक समारंभानं लग्न का
लोक समारंभानं लग्न का करतात?
कारण समारंभ न करताही लग्न करू शकतो हेच त्यांना माहित नसतं. समारंभ नाही म्हणजे 'ते कसलं लग्न म्हणायचं' असे अनेकांना वाटते. कोर्ट/रजिस्टर्ड लग्नाची पुरेशी जाहिरात झालेली नाही.
पण ज्यांना माहिती आहे ते तरी
पण ज्यांना माहिती आहे ते तरी बहुसंख्येने कुठे करतात कोर्ट म्यारेज?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
'समारंभ नाही म्हणजे 'ते कसलं
'समारंभ नाही म्हणजे 'ते कसलं लग्न म्हणायचं' असे अनेकांना वाटते.'-त्यातले असावेत असे लोक.
सहमत.
सहमत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वेटिंग पीरियड
कोर्ट/रजिष्टर्ड लग्नात, लग्नापूर्वी किमान एका महिन्याची नोटीस देणे आवश्यक असते, असे काहीसे ऐकून आहे. ज्यांना यामुळे काहीही अडचण येत नाही (आणि, (१) बहुतांश निवासी भारतीयांना यामुळे काही अडचण येण्याचे काही कारण नसावे, आणि (२) या तरतुदीमागे काही लेजिटिमेट कारणमीमांसा असू शकेल, हे दोन्ही मुद्दे आगाऊ मान्य आहेत), अशांसाठी हा पर्याय चांगलाच आहे.
मात्र, याच कारणास्तव, हा पर्याय सर्वांसाठी उपयुक्त असेलच असे नाही.
होय किमान एका महिन्याची नोटिस
होय किमान एका महिन्याची नोटिस द्यावी लागते. पण त्यात गैरसोय काय आहे? नोटिस द्यायला दोघांनी जायची गरज नसते- किमान काही वर्षांपूर्वी तरी नक्कीच नव्हती (स्वानुभव).
मी स्वतः सर्व धार्मिक विधींना फाटा दिला आणि पूर्णपणे फक्त भेटीगाठी-आणि चांगले जेवण सगळ्यांसोबत करण्यासाठी रिसेपशन केले. रिसेपशन हॉल मिळाला त्यादिवशी केले (लग्नांचे मूहूर्त नसलेला वीकांताचा दिवस हा आमचा 'मुहूर्त' असल्याने महिन्याच्या आत हॉल मिळू शकला हे आमचं नशीब)-लग्नाच्या शपथा त्यानंतर काही दिवसांनी घेतल्या !
गैरसोय
वधू/वरसंशोधन करून, लग्न करून त्यापुढील सोपस्कार (बोले तो, व्हीज़ा वगैरे) करून सहकुटुंब भारताबाहेर घरी परतणे या सर्व प्रक्रियेस जर एका महिन्याहून कमी अवधी उपलब्ध असेल, तर अडचण आहे. (And there can be legitimate circumstances where this may inevitably be the case, हे स्वानुभवाने सांगू शकतो.)
अर्थात, ही अडचण एकूण लोकसंख्येच्या फार थोड्या भागास असणार, हे आगाऊ मान्य, आणि कदाचित या थोड्याशाच कॉन्स्टिट्यूअन्सीकरिता नियम बदलणे वाजवी नसेलही कदाचित, तसे नियम बदलावेत अशी अपेक्षाही नाही, आणि त्या नियमांमागे आपापल्या जागी काही वाजवी कारणमीमांसा असेलही; त्याविरुद्ध दावा नाही. फक्त, हा पर्याय सर्वांनाच उपलब्ध असेल, सर्वांकरिताच feasible असेल, असे नाही, एवढेच मांडावयाचे आहे.
ओके...भारताबाहेर असणार्यांचा
ओके...भारताबाहेर असणार्यांचा विचार अर्थातच माझ्या डोक्यात आला नाही.
'विधी केले की महिन्याची नोटिस देण्याची गरज नाही' हे 'विधी न करता एका महिन्याच्या आत लग्न' करायचे आहे त्यांच्यासाठी अन्यायकारक होते. खरतर भटजीच्या जागी नोटरीला बसवले तरी चालेल अशी सोय हवी.
'वधू/वरसंशोधन करून, लग्न करून त्यापुढील सोपस्कार (बोले तो, व्हीज़ा वगैरे) करून सहकुटुंब भारताबाहेर घरी परतणे या सर्व प्रक्रियेस जर एका महिन्याहून कमी अवधी उपलब्ध असेल, तर अडचण आहे. '
वधू/वरसंशोधन ते व्हीज़ा- परदेशी परतणे हे सगळे एका महिन्याच्या आत होते ! माहित नव्हतं.
गरज
गरज असली, तर होऊ शकते.
आणखी काही प्रश्न
लोक कुठल्याही प्रकारचा समारंभच का करतात? इतर लोकांना आपल्या घरी का बोलावतात ? दुसर्यांच्या घरी का जातात ? किंवा एखाद्या हॉलवर का जमतात ? नवे कपडे का घालतात ? अलंकार का घालतात ?
या सगळ्यात लोकांना प्रचंड दमायला होतं, वेळ+शक्ती+पैसा खर्च होतो. त्यातून सामाजिक दबाव आणि मिरवामिरवी यापलीकडे काय साधतं? त्या दबावाचा समारंभ यशस्वी करण्यात किती वाटा असतो, नि तो असला तरी असल्या दबावांपोटी समारंभ करणं बरं का? अशा समारंभात मजा तरी येते का? कुणाला? हे सगळं वाचवावं, याला काहीतरी पर्याय शोधावा, काही गोष्टींना ठामपणे नाही म्हणावं, असं कुणालाच वाटत नाही का? पुरोगामी-सनातनी, आधुनिक-परंपरावादी, गरीब-श्रीमंत, सवर्ण-अन्य जातीय यांतले कुणीच त्याला अपवाद नसावेत? की यातून साधणार्या, मिळणार्या काही गोष्टींबद्दल मी अनभिज्ञ आहे?
पुढील पोस्टमधे :
निरनिराळ्या सामाजिक प्रथा का असतात ? सामाजिक संबंधच का असतात ? समाजच का असतो ?
या सगळ्यात लोकांना प्रचंड दमायला होतं ....|| ध्रु ||
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
:-)
'समाज नावाची गुंतागुंत' नामे शब्दप्रयोग ऐकला होता तो हाच प्रकार काय?
थत्तेचाच्यांनी विचारलेला एक
थत्तेचाच्यांनी विचारलेला एक प्रश्न इथे विचारते: असं असेल, तर मग कधी कशावर चर्चाच करायला नको, नाही का?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
एक्झॅक्टली
चर्चा नकोच.
शहाणी माणसे आपापली कामे करतात.
जालावर येउन असल्या रिकाम्या चर्चा झोडित नाहित.
(माझं तर असय की बुवा कळतय पण वळत नाही.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
माझंपण!दे टाळी.
माझंपण!दे टाळी.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
तुमचा युक्तिवाद आवडला. माझे
तुमचा युक्तिवाद आवडला.
माझे लग्न समारंभाने झाले.
मला वाटतं सोशल सिग्नलिंग (That we are married) हा एक (एकमेव नव्हे) उद्देश असावा ... इतक्या लोकांना एकत्र बोलवायचा. नव्या स्मृती निर्माण करणे हा दुसरा उद्देश असावा. Do you remember laughing together ? असा प्रश्न विचारला जातो त्याचे गमक हेच आहे.
समारंभ, बचत आणि जीडीपी
देशाचा जीडीपी वाढत नाही. लग्नसोहळ्यासाठी मागील काही वर्षांची बचत वापरली जाते म्हणून त्यावर्षी जीडीपी वाढला आहे असे फाल्स इंप्रेशन पडते. पण २००० ते २०१० पर्यंत बचत केली आणि २०१० मधे लग्न केले, आणि या दशकाकडे एकच वर्ष म्हणून पाहिले तर हा सर्व वाढलेला जीडीपी अगोदरच उत्पन्न म्हणून मोजलेला आहे. वाढीव जीडीपी तेव्हाच म्हणता येईल जेव्हा दोन्ही उत्पन्न आणि खर्च दिलेल्या कालखंडात वाढलेले असेल.
दिलेल्या समारंभाने, खर्च ख असेल तर
१. २००० ते २०१० मधे देशाचा जीडीपी सोडळ्याच्या खर्चाइतका वाढतो. २०१० मधे लग्न असल्याने कुटूंबीय या काळात जास्त कष्ट करून तो ख ने वाढवतात. लग्नापर्यंत तो कुटूंबाच्या नावे असतो , नंतर हॉलवाला, इ च्या नावे.
२. २०१० मधे कुटूंबाचा जीडीपी ख ने कमी होतो, हॉलवाल्यांचा इ, ख ने वाढतो.
३. कुटुंबीयांनी समारंभ न करता पैसा बँकेतच ठेवला असता तर (देशाच्या) जीडीपीत काहीच फरक पडला नसता, पण कमावण्याच्या कृतीमागची प्रेरणाच लग्न होते असेल (ते नसते तर कुटुंबाने ख रु कमी कमावले असते असे असते तर) समारंभामुळे जीडीपी वाढला असे म्हणता आले असते.
अजून थोडे सोपे करायचे असले तर -
मी माझी सगळी पगार देऊन जर शेतकर्याकडून मला मूळीच कामाची नसलेली एक गवताची पेंडी घेऊन आलो, तर देशाचा जीडीपी त्या रकमेने वाढत नाही. माझा पगार मोजला तेव्हा तो अगोदरच पकडला होता.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
३१ मार्च २०१३ रोजी मी विकत
३१ मार्च २०१३ रोजी मी विकत घेतलेल्या सोन्याच्या हाराची किंमत २०१२-१३ च्या जीडीपीत आणि त्या पैशाने सोनाराने १ एप्रिल २०१३ रोजी घेतलेल्या घड्याळाची किंमत २०१३-१४ च्या जीडीपीत धरली जातो असे वाटते.
अक्षय पूर्णपात्रे खुलासा करतील अशी अपेक्षा आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
३१ मार्च २०१३ रोजी मी विकत
हे खरे आहे.
मला असे म्हणायचे कि कोणतीही उत्पन्नदर्शक घटना एकदाच मोजता येते. मागच्या वर्षीचे पैसे यावर्षी खर्च केले तर जीडीपी दुप्पट होत नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
होतो
जीडीपी दुप्पट धरला जातो अशी माहिती आहे.
म्हणून तर अमेरिका कीम्वा इतर प्रगत अर्थव्यवस्थांत सर्विस सेक्टारचे कौतुक आहे.
केली काउन्सिलिंग, घे चार्ज आणि मोज जीडीपी.
केला टीपी, दे त्याला श्रमदानाचं नाव; वाढव जीडीपी.
हे असे उद्योग तिथे चालतात.
.
असो ते अवांतर होइल.
पण उदाहरणच द्यायचे तर थत्ते किंवा राजेश घासकडवी ह्यांनी एक केस दिली होती त्याची आटह्वण होते.
आपण मोलकरणीस पैसे देतो, तेव्हा ते जीडीपीत धरता येतात.(त्याची रीतसर नोंद होते हे गृहित धरुन)
पण त्याइअवजी घरी मोलकरीण नसली आणि जोडप्यापैकी घरी थांबलेल्या जोडिदाराने घरगुती कामांची जिम्मेदारी घेतली( "गृहिणी " ह्या शब्दात रुढार्थानं अपेक्षित आहे तशी)तर घरी कमावून आणणार्या जोडिदाराने घरी थांबलेल्या जोदिदारास पैसे दिले तर ती जीडीपीतील वाढ म्हणून गणली जात नाही.(नवर्याने हाउअवाइफ पत्नीस पैसे दिले तर ते जीडीपीमध्ये मोजले जात नाहित.)
जीडीपी ही फारच ढोबळ ढोबळ संज्ञा आहे. ती काही काटेकोर वगैरे अजिबात नाही.
सरासरी जीवन्मान सुधारलं का? ह्या प्रश्नाचे जीडीपीखेरिज इतर बरेच आर्थिक, सामाजिक निर्देशांक अधिक अचूक माहिती देउ शकतात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मला वाटतं मला नक्की काय
मला वाटतं मला नक्की काय म्हणायचं आहे ते सांगता येत नाहीय (माझी मर्यादा, भाषेची नाही)
समजा दोन माणसे आहेत. एकाकडे एक रुपया आहे आणि दुसर्याकडे एक बैल* आहे. एका रुपयाला एक बैल असा रेट आहे. प्रत्येक वर्षी ते रुपया आणि बैलाची अदलाबदल करतात. समजा त्या देशात तेवढी एकच आर्थिक क्रिया आहे. असे त्यांनी वीस वर्षे केले. तुमचे म्हणणे असे आहे वीस वर्षे त्या देशाचा जीडीपी प्रत्येक वर्षी १ रुपया मानण्यात यावा. माझे म्हणणे असे आहे कि केवळ ज्या वर्षी बैलाचे मूल्य ० ते १ रुपया झाले (असे त्या वीस वर्षांतच झाले असले, पूर्वी नव्हे) तर त्या वर्षीचा जीडीपी १ रु, बाकी सर्व वर्षी शून्य.
वेल्थ रिडीस्ट्रीब्यूशन वेगळे आणि अॅडिशनल प्रॉडक्शन/सर्विस वेगळे. पैकी दुसरे म्हणजे अधिकचा जीडीपी.
कोणकोणत्या सेवांचा जीडीपीत अंतर्भाव करावा यांचे काही देशांत भिन्न मानक आहेत ( ते सरळ करूनच तुलना केली जाते) पण जीडीपीची संज्ञा काटेकोर असते.
स्वीडनमधे का कुठे गृहिणीच्या कामाचे मूल्य जीडीपीत मोजतात. पण तो विषय नाही. वरच्या उदाहरणात जर दोन जण एकमेकांची हेअर कटींग करतात असे उदाहरण घेतले तर तो दरवर्षीचा जीडीपी ठरेल कारण प्रत्येक वेळी नवा एफर्ट आहे. जीडीपी वाढायला नवा शब्द फार आवश्यक आहे. व्यवहार पैसा-सेवा असो कि पैसा - उत्पाद असो, तो पहिल्यांदाच पकडायचा.
नक्की कसं लिहायचं मला अजूनही कळत नाहीय पण समारंभ केला नसता तर ते अधिकचे पैसेच कमावले नसते अशी केस असती तर वाढलेल्या जीडीपीचे श्रेय समारंभाला देता येईल, पण अन्यथाही तेव्हढेच पैसे कमवून लोक दुसरं काहीतरी करणारच होते असं असेल तर जीडीपी वाढण्यासाठी समारंभ असायची गरज नव्हती. अजून समर्पक वाक्य सुचले तर लिहिन.
* ऐसीवर हा नामाचा एक नविन प्रकार आहे. अश्या शब्दांना आव्हानात्मक नाम म्हणतात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
money exchange
money exchange, currency exchange घडतो कुठल्याही अॅक्टिव्हिटीमध्ये.
ह्यालाच बाजरातील तरलता वाढणे किंवा लिक्विडिटी वाढणे म्हणतात.
जि९थे मनी एक्स्चेंज आला तिथे जीडीपी वाडह्तो अशी आपली माझी समजूत आहे.
जाणकार मंडळींनी अधिक प्रकाश टाकवा.
अर्थशास्त्री गब्बर कुठाय? सर्वज्ञानी न वी बाजू कुठाहेत?
इतरजण सांगत नाहियेत, तर निदान ह्यांनी तरी सांगावं जीडीपीबद्दल.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
रियल आणि नॉमिनल
नॉमिनल जीडिपी म्हणजे एखाद्या मर्यादित कालावधीत देशात उत्पन्न झालेल्या सेवा आणि वस्तु यांची एकूण बेरीज. या वस्तु/सेवा निर्माण करतांना कच्च्या मालाच्या निर्मात्यापासून ते फॅक्टरी कामगारांपर्यंत (किंवा फ्लेक्स छापणार्यापर्यंत किंवा कर सल्लागारापर्यंत वगैरे) सर्वांना काही मोबदला मिळतो. तसेच या वस्तु/सेवा विकत घेतांना लोक खर्च करतात. म्हणून या तीन राशी: एका ठराविक कालावधीत निर्माण झालेल्या वस्तु/सेवा यांच्या किंमतीची एकूण रक्कम, एका कालावधीत अर्थव्यवस्थेतील प्रत्येकाला मिळणार्या मोबदल्याची (वेतन, नफा वगैरे) एकूण बेरीज आणि अर्थव्यवस्थेतील प्रत्येक ग्राहकाने एका कालावधीत केलेला खर्च या सारख्याच असायला हव्यात. पण प्रत्यक्षात या राशींमध्ये थोडे-फार फरक पडतात कारण अर्थव्यवस्थेत असे मोजमाप करणे अर्थातच अवघड आहे.
एका कालबिंदुपाशी असलेल्या किंमती नॉमिनल जीडिपीवर परिणाम करतात. उदा. आंब्याचे एकच झाड, एक बापू, एक राधा आणि गारंबी हे एकच गाव असलेल्या अर्थव्यवस्थेत एका दिवशी राधेने दोन गोड शब्दांच्या मोबदल्यात बापूने त्या दिवशी जमा केलेल्या चार आंब्यांपैकी दोन आंबे घेतले. दुसर्या दिवशी चार गोड शब्दांच्या मोबदल्यात बापूने पाडलेल्या दहा आंब्यांपैकी एकच आंबा घेतला. म्हणजे पहिल्या दिवशी एका आंब्याची किंमत एक गोड शब्द तर दुसर्या दिवशी पाव गोड शब्द. आता जीडिपी गोड शब्दांमध्ये मोजल्यास पहिल्या दिवशी जीडिपी चार गोड शब्द तर दुसर्या दिवशी अडिच गोड शब्द पण आंबे तर चाराचे दहा झालेले आहेत. (शब्दांना काहीच इन्ट्रिसिक मूल्य नाही असे येथे गृहितक आहेत, राधेला तिच्या शब्दांचे काहीच पडलेले नाही पण बापू स्विकारतो म्हणून तिच्या शब्दांना महत्त्व आहे. थोडेफार फियाट करन्सी किंवा बिटकॉइनसारखे किंवा सोन्यासारखे किंवा काडीपेट्यांवरच्या चित्रांसारखे किंवा वगैरे)
रियल जीडिपी हा बदलणार्या किंमतींच्या परिणामाला नियंत्रित करून मोजला जातो. उदा. १९४७ आणि १९५० सालातील वस्तु/सेवांना फक्त १९४७च्या किंमतींमध्ये मोजणे व तुलना करणे. म्हणून १००% किंमती वाढल्या आणि वस्तु/सेवांच्या निर्मितीत वाढ झाली नाही तर नॉमिनल जीडिपीकडे पाहून कोणी आर्थिक वाढीचा दर १००% असल्याचे म्हणत नाही.
माझ्या ओळखीच्या एका मुलीची ची
माझ्या ओळखीच्या एका मुलीची ची गोष्ट. ती सरदार (शीख) आहे व लग्न पंजाबात झाले. लग्नात तो लेहंगा घातला होता. लेहंगा घालून डोलीत बसायचे होते. डोली ५ तासाचे अंतर पार करून मुलाच्या घरी गेली. रिक्वायरमेंट अशी आहे की डोलीचा पर्दा दूर करून मुलाकडच्यांना मुलीचा चेहरा बघायचा (मूह दिखाई ... का काय ते.).
समस्या ही की एकदा तो विशिष्ठ लेहंगा घातला की मुलीस बाथरूमला सुद्धा जाता येत नाही. म्हंजे टेक्निकली इट इज नॉट पॉसिबल टू गो टू बाथरूम वन्स शी हॅज पुट द लेहंगा ऑन.
५ तास तर पाच तास .... ती जवळपास १२ तास बाथरूम ला जाऊ शकली नाही.
वैतागली होती. पण तिची ष्टोरी ऐकल्यानंतर मी ही वैतागलो होतो. म्हंटलं काय डोक्याला त्रास आहे ?????
सहानुभूती. पण पण तिची ष्टोरी
सहानुभूती.
पण
डोक्याला त्रास?
आय मीन मला ही ते वैताग-जनक
आय मीन मला ही ते वैताग-जनक वाटले होते. मुली कसे सहन करतात ... ते देवच जाणे.
सहमत. फार वैतागजनक आहे.
सहमत. फार वैतागजनक आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
घोळ
कायतरी घोळ असावा.
एखाद्या वस्त्रात अगदि नैसर्गिक विधीसही जाणे अशक्य ठरत असेल तर ते वस्त्र इतके प्रचलित कसे?
व्यवहारातून आधीच बाद नसते का झाले?
नक्की लेहंगा म्हणतात तसाच लेहंगा होता ना?
हल्ली शिवून घेतलेल्या धोतर, सोवळे ह्यांची फ्याशन आली आहे.
थोडक्यात, हे धोतर-सोवळे सदृश प्रकार असतात.
पण प्रत्यक्षात ह्यांचे फायदे-तोटे हे धोतर-सोवळयपेक्षा फार वेगळे असतात.
हा त्या स्टाइलचा एखादा लेहंगा सदृश वेश आहे का?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
कपड्यांचा घोळ नसेल अस
कपड्यांचा घोळ नसेल अस वाटतय.
लग्नाचे पवित्र(किँवा जड, किमती) कपडे घालुन या विधीपासुन त्या विधीपर्यँत छी छी ठिकाणी जायच नाय असे काहीतरी असावे.
बहुदा डोलीमध्ये "ती" सोय
बहुदा डोलीमध्ये "ती" सोय नसावी हे कारण अधिक प्रोबॅबल आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
उरलेले ७ तास?
डोलीचा प्रवास फक्त ५ तासांचा. मग उरलेल्या ७ तासांचे काय?
हे हे डोलीत ५ तासच होती टोटल
हे हे डोलीत ५ तासच होती टोटल १२ तास लिहीलय..
खुळे आहात तुम्ही सगळे
भारतीय 'विश्रांतीगृहांत', तेही लग्नातल्या 'रेलचेलीत', तेही उत्तरेकडच्या 'शौकिन' लोकांच्या उपस्थितीत, स्पेश्शल लेहंगा घालून गेल्यास तो लेहंगा परत घालायच्या लायकीचा उरेल का?
भारतात राहून सुद्धा शिंपल गोष्टी समजत नाहीत तुम्हा लोकांना, उपेग काय तुमचा?
-Nile
अगदी साधेसेच कपडे घाललेले
अगदी साधेसेच कपडे घाललेले असले तरी ठाण्यातल्या अनेक लग्न-कार्यालयांमधे जाण्याची सोय बरी नव्हती. अगदी प्रवेशासाठी टिच्चून दीडशे रूपये घेणाऱ्या, पुण्यातल्या 'अभिरुची' नामक हॉटेलातली सोयही गचाळ होती.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
थोडक्यात........
थोडक्यात सकाळी उठून शौचमुखमार्जनादि कार्ये करुन मग आहार, निद्रा, भय आणि मैथुन याकडे लक्ष देणे यापलिकडे फारसे काही जगात महत्वाचे नाही असे दिसते. चालुद्या.
चर्चा...
चांगल्या चर्चेचं एक उदाहरण....
बरं झालं धागा वर काढलास! सु
बरं झालं धागा वर काढलास!
सु मन हा क्रियेटिव्ह आयडी पुर्ण विसरलो होतो!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हां! हाच धागा वाचून (आणि
हां!
हाच धागा वाचून (आणि त्यातलं "व्याप्तिनिर्देश" वगैरे वाचून) ऐसीवरच्या चर्चा अशाच शिस्तशीर पद्धतीने चालतात की काय असं वाटलं होतं. मला मिपावरच्या रावडी चर्चांची (पॉपकॉर्नधारक प्रेक्षक म्हणून का होईना) सवय.
देन आय लर्न्ट. आय रूळ्ड**.
**म्हणजे मी रुळलो.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
मला मिपावरच्या रावडी चर्चांची
मलाही!
(रावडी चर्चांचा फॅन) बॅटमॅन.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तसेच सर्वांच्या साक्षीने लग्न
करिश्मा कपूर च्या लग्नाची केसेट यूटयुब वर आहे. एवढा गाजावाजा करुन देखील "दबावाचा" काही उपयोग झाला नाही असे वाटते.
आता
२०१३ साली सुरु केलेली ही चर्चाच आता कालबाह्य वाटत आहे.
लोकांनी समारंभाने लग्न केले
लोकांनी समारंभाने लग्न केले नाही तर लग्न स्पेशल अशा चांगल्याचुंगल्या डिशेस खायला मिळणार नाहीत, सबब समारंभाने लग्न केले पाहिजे. बाकी कशात खर्च करा न करा पण खाण्यापिण्यावर अवश्य खर्च केलाच्च्च पाहिजे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
समारंभाने लग्न न करण्याचा
समारंभाने लग्न न करण्याचा जोडप्यांचा निर्णय घरातील मोठे नेहमीच हाणून पाडतात.
माझ्याहीबाबतीत (अर्थातच) तसेच झाले होते.
पण ज्यांच्याबाबतीत असे(च) झाले अशी समदु:खी माणसे इथे भेटल्याने जरा दु:ख कमी झाले.
(किंवा कदाचित हे वाचल्याने जुन्या जखमेवरची खपली निघाली.. )
ऋताने मागे लिहिलं होतं,
ऋताने मागे लिहिलं होतं, आयुष्यात काही करायचं राहून गेलं या धाग्यावर. 'लग्न न करायचं राहूनच गेलं'. त्याची आठवण झाली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.