भ्रामक मायाजाल
नुकत्याच दोन बातम्या आल्या
साध्वी प्रज्ञा यांच्या वरचे आरोप NIA मागे घेणार http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-12-28/india/45651589_1_...
2009 मडगाव स्फोट खटल्यातून सनातन साधकांची निर्दोष मुक्तता http://www.deccanherald.com/content/377725/court-acquits-sanatan-sanstha...
काही महिन्यापूर्वी झालेल्या दाभोळकर हत्येबाबतही सनातन वर भरपूर गरळ मीडियातून ओकण्यात आले ,परंतु आजतागायत एकाही सनातन कार्यकर्त्या विरुद्ध ठोस पुरावे पोलिसांना मिळालेले नाहीत , त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी पोलिसांनी केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोणत्याही धार्मिक संघटनेचा हात या कृत्यात नाही, असे स्पष्ट करण्यात आलेले होते .
गुजरात मध्ये गोध्रा हत्याकांडांनंतर उसळलेल्या दंगलीत तेथील स्थानिक हिंदूंनी स्व-संरक्षणार्थ केलेल्या प्रतिकारास " अल्पसंख्यांका वरील हल्ले" ठरवून गेली 14 वर्षे हेच ढोंगी सेक्युलरवादी अन मीडिया ,नरेंद्र मोदींना "मौत का सौदागार " ठरवून ढोल बडवत आहेत . पण परवाच मोदींनाही क्लीन चिट मिळालेली आहे .
आदरणीय शंकराचार्य यान्च्यावर असलेले हत्येचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सिद्ध झालेले आहे .
एकंदरीत सर्व प्रकरणांचा आढावा घेता ढोंगी सेक्युलरवादी आणि मीडिया हे साप साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार करत असल्याचे लक्षात येते . दिग्गी भाऊनी आणि सुशील कुमारनी तर "भगवा आतंकवाद" वगैरे पर्यन्त मजल मारली होती.याचा अर्थ येनकेन प्रकारेण खोटेनाटे आरोप करून भगव्या संघटनांना / नेत्यांना "मारेकरी" ठरवून बदनाम करायचे आणि लांगूलचालन करून निवडणूकात मतांची पोळी भाजून घ्यायची ,असे साधे सोपे "व्होट-बँक पॉलिटिक्स " या सगळ्या प्रकारामागे आहे हेच सिद्ध होते .
प्रश्न हा आहे की सामान्य जनता या ढोंगी सेक्युलरवादी आणि मीडिया यांनी फेकलेल्या भ्रामक मायाजालातून बाहेर पडून सामान्य जनता खरे मुद्दे काय आहेत ते समजून घेईल का ? आणि येत्या निवडणुकीत Good Governence आणि विकास हे मुद्दे सातत्याने लावून धरणार्या पक्षाला निवडून देईल का?
चिंता नसावी. जनता सूज्ञ आहे.
येत्या निवडणुकीत Good Governence आणि विकास हे मुद्दे सातत्याने लावून धरणार्या पक्षाला निवडून देईल का?
जनतेने बाबरी मशीदीच्या पतनानंतर झालेल्या एक दोन निवडणुकांपुरता हे मुद्दे न लावता हिंदुत्त्व किंवा तत्सम भावनिक मुद्दे लावून धरणाऱ्या पक्षांना निसटता का होईना पण कौल दिला होता. मात्र आपली चूक समजून आल्यावर नंतर जनतेने उपरोल्लिखित मुद्दे सातत्याने लावून धरणाऱ्या पक्षांनाच निवडून दिले आहे. त्यामुळे चिंता नसावी. ज्या पक्षाला निवडून यायचे आहे त्याला हिंदुत्त्व किंवा समान नागरी कायदा वगैरे बोगस मु्द्दे न मांडता आपसूक विकासाचा मुद्दा धरावा लागणार आहे.
???
समान नागरी कायदा हा मुद्दा बोगस का वाटतो?
समान नागरी कायदा नाही ते बरेच आहे असे आपणास वाटते काय?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सध्या समान नागरी कायदाच आहे
सध्या समान नागरी कायदाच आहे. उदा. करयोजना, गुन्हेगारांना शासन, महसूल शिक्षण इ. (क्रिमिनल लॉ, टॅक्सेशन, रेवेन्यू वगैरे वगैरे) साठी सर्व नागरिकांना समान कायदेच आहेत. ज्याला वैयक्तिक कायदा म्हणतो (विवाह, वारसाहक्क, घटस्फोट वगैरे) त्यासाठी हिंदू. मुसलमान वगैरे धर्मीयांसाठी स्वतःचे कायदे आहेत. तथाकथित हिंदुत्ववाद्यांना अपेक्षित समान नागरी कायद्यात हे अध्याहृत आहे की हिंदूंचा वैयक्तिक कायदा मुसलमान व इतर धर्मीय मान्य करतील. उद्या मुसलमानांचा कायदा हिंदूंना लागू करुन तो समान नागरी कायदा म्हणून लागू केला तर चालेल का?
हिंदुत्वाचा मुद्दा बोगस? वाह
हिंदुत्वाचा मुद्दा बोगस? वाह रे वाह!
मोदीसेठ
मोदीसेठ, तमारु हिंदुत्व शुं छे?
हिंदुत्वाचा मुद्दा ... त्यास
हिंदुत्वाचा मुद्दा ... त्यास "बोगस" हे विशेषण लावता येते की नाही ते मला माहीती नाही. पण हिंदुत्वाचा मुद्दा गोविंदाचार्यांनी विवेचन केला तोच व तसाच जर अभिप्रेत असेल तर विसंगतीने भरलेला आहे. व सरकारने त्यातल्या ५ पैकी किती तत्वे आपल्या अखत्यारीत ठेवावीत व त्यावर पॉलिसी बनवावी हे देखील समस्याजनक आहे.
एकच गंमत वाटते की जर हे
एकच गंमत वाटते की जर हे मतांसाठी होते तर नेमके निवडणूकांच्या आधीच सरकारी पिंजर्यातील पोपटाने या मंडळींना निर्दोष कसे ठरवले?
का आता CBI सरकारी पिंजर्यातील पोपट नाहीये? कधी मुक्त झाला?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मुद्दा रास्त आहे. पण - हु
मुद्दा रास्त आहे.
पण - हु केअर्स अबाऊट हू वॉज कन्व्हिक्टेड ? ऑर नॉट.
आरोप करायचे, लोक पकडायचे, आरोपपत्र दाखल करायचे नाही, केलेच तर आरोपपत्र कमकुवत ठेवायचे.
विंडो ड्रेस्सिंग. They have to show that they are doing SOMETHING.
हु केअर्स अबाऊट हू वॉज
इफ नोबडी केअर्स, असे धागेच निघाले नसते, नै का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
दहशतवादाला धर्म नसतो
ढोंगी सेक्युलरवाद्यांचं काय ते माहित नाही. पण धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी लोक 'हिरवा दहशतवाद' आणि तत्सम लेबलं ऐकली की "दहशतवादाला धर्म नसतो" म्हणून कंठशोष करत असतात. तेव्हा तुम्हीही या दगडांवर डोकं आपटायला. येणार ना?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
शंका
नरेंद्र मोदींना "मौत का सौदागार " ठरवून ढोल बडवत आहेत . पण परवाच मोदींनाही क्लीन चिट मिळालेली आहे .
शंकराचार्य प्रकरणातही त्यांच्यावर असलेले हत्येचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सिद्ध झालेले आहे .
हा काय प्रकार आहे? आजकाल नवनवी माहिती समोर येत आहे. शंकराचार्य प्रकरणात मोदींवर हत्येचा आरोप केव्हा झाला होता?
मंदार कात्रे साहेब जया अंगी
मंदार कात्रे साहेब
जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण
- मुक्ताबाई, ताटीचे अभंग
यातच सारे सामावले आहे. या देशात ८०% टक्के जनता उर्वरित २० टक्क्यांच्या भीतीने रहावी म्हणून राज्यकर्ते काहीही करतील, केलेले आहे, करत आहेत. तेव्हा देशासाठी जे योग्य ते करणार्या लोकांनी यातनांची तयारी ठेवावी, पण केव्हा ना केव्हा मोठेपणावर टाकलेला सर्कारी पडदा दूर होईलच, जसा या बाबतीत होत आहे.
'फेकू' नका!
नमोशेठ,
मुक्ताबाई, ताटीचे अभंग? प्लीज 'फेकू' नका! नमो म्हटल्यावर नेहमीप्रमाणेच चुकीचाच दाखला दिला पाहिजे असे नाही. जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण ही ओळ तुकाराममहाराजांच्या अभंगातील आहे.
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण
तुका म्हणे बर्वे जाण व्हावे लहानाहुनी लहान
ए फुकणीच्या, गप. मोठी माणसे
ए फुकणीच्या, गप. मोठी माणसे चर्चा करत आहेत तू मधे मधे करु नको शेंबड्यापोरागत.
आभार
मोदीशाही कधी जर हिदुस्थानात अवतरलीच, तर पुढे काय वाढून ठेवलेले आहे, त्याची झलक दाखवून दिल्याबद्दल मंडळ मनःपूर्वक आभारी आहे.
आम्ही आंधळा विरोध करत
आम्ही आंधळा विरोध करत नसतो.
काँग्रेसप्रणिग भोंदू सेक्युलरवाद आल्यावर काय होतंय ते दिसतंच आहे. मोदी राज्य आल्यावर खरा सेक्युलरवाद येईल.
हैऽऽऽऽल नमो!
Sieg Heil! नमो नमः|
काहीही. याच काँग्रेसी वृत्ती
काहीही. याच काँग्रेसी वृत्ती देशाचा घात करतील एखाद दिवस
तुकाराम तर तुकाराम. पण
वा, गुगल मारलेलं दिसतंय
चला माहिती आहे तर (ज्ञान नसेनाका).
त्या वाक्यामागले भाव लक्षात घ्या. जौद्या तुम्हाला नाही जमायचं.
तेवढं तरी करा
वा, गुगल मारलेलं दिसतंय (जीभ दाखवत)
दाखला देण्यापूर्वी निदान तेवढं तरी करा.
F(Insecurity) = Tribalism + Violence + ….
भांडारकर इण्स्टीट्युट ला एक अभ्यासू फ्रेंच गृहस्थ आले होते भारतीय संस्कृती ची माहिती गोळा करायला, तेव्हा ते म्हणाले की मुस्लिम जनतेने भारतात अजूनही टोळीवाद(tribalism) सोडलेला नाही.
मला हा मुद्धा पटतो. अजूनही मुस्लिम भारतात सगळीकडेच सुमुहाने राहताना दिसतात.
अजूनही भरपूर कारणे आहेत पण
F(Insecurity) = Tribalism + Violence + …. हे पण एक कारण असू शकत काय?
असल्यास काय करता येईल?
टोळीवाद व समूहाने राहणे हे
टोळीवाद व समूहाने राहणे हे एकच आहेत असे नाही असे मला वाटते.
आर्मेनियन लोक अमेरिकेत लॉस एन्जेलिस परिसरात एकत्रित झालेले आहेत. ज्यू लोक न्यू यॉर्क, शिकागो, डेट्रोईट या भागात समूहाने राहतात. अमेरिकेत भारतीय सुद्धा समूहाने राहतात.
थॉमस शिलिंग यांनी नाणी (विविध प्रकारची) वापरून यावर एक थियरी मांडली होती.
मुंबईतही दाक्षिणात्य, गुजराती समूहाने राहतात ह्याची कैक उदाहरणे आहेत.
घेट्टो = ट्रायबल्स हे चूक
घेट्टो = ट्रायबल्स ; हे गृहितक चूक.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
समुह Insecurity मुळे तयार
समुह Insecurity मुळे तयार झाला असल्यास टोळी हा शब्द समर्पक वाटतो काय?
अमराठीच कशाला?
मराठीदेखिल ...
कोळीवाडा, भोईवाडा, आग्रीपाडा ...
अय्या हो?????????? पण ते
अय्या हो?????????? पण ते दहशतवादाला देखील मदत करतात का हो?
स्वयंपूर्णतेचा व सुरक्षिततेचा अभाव.
मुळात जगात कुठेही संख्येने बर्यापैकी परंतू ताकदीने कमी अशा अल्पसंख्य समुहाने एकत्र, एकमेकांना धरून राहण्यात नवीन असे काहीच नाही. पाश्चात्य परदेशांतील 'चायना टाऊन्स' काय,भारतातील मुहल्ले काय किंवा पूर्वीचे घेट्टोज काय, हेच दर्शवतात
जस जसे हे समाज प्रगती करतात, विशेषतः डिसिजन मेकिंगमध्ये तसेच आर्थिक ताकद (पॉवर या अर्थी) कमावतात, एक व्यक्ती/कुटुंब म्हणून स्वयंपूर्ण होतात तस तसे हे घेट्टोकरण - घोळक्याने रहाणे कमी होऊ लागते.
अमेरिकेसारख्या देशात आता भारतीय मूळ असलेला समाज आर्थिकदृष्ट्या स्वायत्त, स्थिर आणि स्वयंपूर्व होऊ लागल्यावर विखुरला जाऊ लागले आहेत. मात्र त्यांच्याहून संस्ख्येने अधिक असलेला तरीही तितकी स्वयंपूर्णता न मिळवू शकलेला चीनी, हिस्पॅनिक कामगार वर्ग टाउन्समध्ये रहाताना दिसतो. भारतात मुस्लिमच नव्हे तर ख्रिश्चन, नवबौद्ध, कामगारवर्ग असाच घोळक्याने राहतो. हे घोळके त्याला सुरक्षा देतात. अल्पसंख्यांना असे घोळक्याने रहावे लागणे हा खरंतर बहुसंख्यांच्या आत्मपरिक्षणाचा व काही प्रसंगी चिंतेचा विषय आहे.
समांतरः (हेच लॉजिक लाऊन पूर्वीची एकत्र कुटुंबपद्धती टिकण्यामागे आर्थिक ताकदीचा अभाव आपली भुमिका निभावत होताच. आता एकट्या व्यक्तीमध्ये अधिक आर्थिक स्वातंत्र्य, स्वयंपूर्णता आल्यावर ही व्यवस्था आपोआप मोडकळीस येऊ लागली)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
?
उदा. सदाशिवपेठ हे ट्रायबलिझम आहे का? आजकाल शाकाहाऱ्यांसाठी वेगळ्या सोसायट्या काढल्या जातात तो ट्रायबलिझम आहे का? (त्यातीलच काहींचे violence हेही एक लक्षण दिसेल पण ते असो) अगदी अमेरिका, इंग्लंडची उदाहरणे कशाला. महाराष्ट्रातील गावांमध्ये अजूनही महारवाडा, मांगवाडा, कुंभारवाडा, सुतारगल्ली, सोनारगल्ली, वगैरे वगैरे अजूनही ठळकपणे दिसतात. आणि तिथे विशिष्ट जातीचे लोक समूहाने राहताना दिसतात. त्यामागे अनेक कारणे आहेत केवळ ट्रायबलिझम किंवा व्हायोलन्सच असेल असे नाही.
दणकट प्रतिसाद. सिलिकॉन व्हॅली
दणकट प्रतिसाद.
सिलिकॉन व्हॅली सुद्धा अशीच एकत्र राहणार्या लोकांची बृहद्गल्ली आहे असे म्हणायचे धाडस करतो. मायकेल पोर्टर सायबांनी क्लस्टर ची संकल्पना मांडली होती.
एकत्र राहणे आणि झुंडशाही करणे
एकत्र राहणे आणि झुंडशाही करणे यात काहीच फरक नाही काय?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
फर्क है. और यही मुद्दा मैने
फर्क है. और यही मुद्दा मैने मांडा है.
फरका आहेच. भारतात झुंडशाही
फरका आहेच. भारतात झुंडशाही अनेक टोळ्यांद्वारे राबवली जातानाही दिसते.
पण वर टोळीवाद - (ट्रायलिझम) बद्दल मुद्दा होता म्हणून प्रतिसाद तिथेच सिमीत राहिला - ठेवला
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ट्रायबलिझमबाबत
आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतील अनेक मुसलमानांना प्रतिष्ठित हिंदू वस्त्यांमध्ये जागा मिळत नाही/घेऊ दिली जात नाही हे अगदी दोनतीन ठिकाणी चौकशी केल्यावरही कळेल. काही वर्षापूर्वी माझे सख्खे काका घर विकत घेत असताना बिल्डरने 'मोठे बिल्डर कोणालाही घर विकतात, मात्र आम्ही छोटे बिल्डर असल्याने दाढीवाल्यांना विकतच नाही, त्यामुळे अॅडिशनल सेक्युरिटी मिळते' हा एक सेलिंग पॉईंट सांगितला होता. असो काही वर्षापूर्वी इमरान हाशमीला मुस्लिम असल्याने भाड्याने घर मिळाले नव्हते ही बातमी आठवली.
http://www.huffingtonpost.com/2009/08/04/emraan-hashmi-bollywood-s_n_250...
त्याचे कारण शोधले आहे का? ते
त्याचे कारण शोधले आहे का? ते शोधा.
त्यामुळे अॅडिशनल सेक्युरिटी मिळते'>> हेच ते कारण. हे पारशी माणूस शेजारी आहे म्हटल्यावर का नाही येत इन्सिक्युरिटी? शीख माणूस आहे म्हटल्यावर का नाही येत? वाचा आणि विचार करा.
अरे वा
यालाच जालावर आजकाल कोणीतरी गिल्ट बाय असोसिएशन वगैरे म्हणत असते. असो... अॅडिशनल सेक्युरिटी याच कारणासाठी आम्हाला सनातनी जहाल हिंदू आमच्या जवळपास नको असे म्हटले तर चालेल का?
याच कारणासाठी आम्हाला सनातनी
याच कारणासाठी आम्हाला सनातनी जहाल हिंदू आमच्या जवळपास नको असे म्हटले तर चालेल का?
रास्त मुद्दा. चालायला हवे.
पण प्रॉपटी भाड्याने किंवा विकत कोणाला द्यायची हा मालकाचा प्रश्न (अधिकार) मुख्यत्वाने असायला हवा. सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलाय की कोणत्याही धर्माच्या लोकांना - फक्त त्यांच्या धर्मीयांसाठी - गृहनिर्माण सोसायट्या काढून त्यात फक्त त्यांच्याच धर्मीयांना रहायला जागा द्यायचा अधिकार आहे. (मला वाटते की तो अल्पसंख्यांकांसाठी विशेषत: दिला होता. पण हा निर्वाळा फक्त अल्पसंख्यांकासाठी असेल तर तो बहुसंख्यांकांवर अन्याय आहे.)
--
मला नेमके काय म्हणायचे आहे ते स्पष्ट मांडतो - प्रॉपर्टी मालकास भाडेकरू नाकारायचा पूर्ण अधिकार असायला हवा. कोणत्याही कारणास्तव. उदा. गब्बर सिंग च्या (केवळ) केसांचा रंग आवडला नाही म्हणून त्याला भाडेकरू म्हणून घेणार नाही - असे सांगायचा तुम्हाला अधिकार असायला हवा.
--
शबाना आझमींनी सुद्धा अशाच स्वरूपाची तक्रार केली होती २००७ मधे. ती तक्रार चुकीची आहे.
व्यक्तिस्वातंत्र्य
व्यक्तिस्वातंत्र्याची टोके सांभाळायला गेलो तर दूरगामी पडलेली सामाजिक भगदाडे वाढत जातील; सामाजिक अभिसरण कमी होइल; अशी चिंता वाटते.
माणसाला व्यक्तिस्वात्म्त्र्य हवे ;वगैरे सगळे ठीकच आहे हो, पण माणूस वाघाइतका एकाकी,एकटे आयुष्य कढणार्या प्राण्यांसारखा नाही.
सिंह किंवा घोडा समूहात राहतात; थोडेफार त्याच धर्तीवर मानवाचा स्वभाव आहे.
समाजात सलोखा असणे त्यामुळे अवश्यमेव ठरते.
समाजघट्कांचा परस्पर द्वेष जितका कमी करता येइल तितका करावा.
जमेल तितक्यांना ही द्वेशपूर्ण क्रुती करण्यापासून परावृत्त करावे असे आपले माझे मत.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
भारतीय न्यायव्यवस्था ही
भारतीय न्यायव्यवस्था ही अत्यंत परफेक्ट आहे असं वाटायला लागलं आहे हे निर्णय पाहून.