दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२१ मे
जन्मदिवस : लेखक दांते अलिघिएरी (१२६५), चित्रकार आल्ब्रेख्त ड्यूरर (१४७१), कवी अलेक्झांडर पोप (१६८८), तुरुंगातील कैद्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून धडपडणाऱ्या एलिझाबेथ फ्राय (१७८०), 'कोरियलिस परिणाम' शोधणारा गास्पार-गुस्ताव द कोरीयलिस (१७९२), पुराजीवशास्त्रज्ञ मेरी अॅनिंग (१७९९), चित्रकार आँरी रूसो (१८४४), व्यावहारिक ECG शोधणारा नोबेलविजेता विलम आईंथोवन (१८६०), रशियन हायड्रोजन बॉंब बनवणारा, शांततेचा पुरस्कर्ता नोबेलविजेता आंद्रेई साखारॉफ (१९२१), कलासमीक्षक, लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी (१९२८), हिंदी लेखक व पत्रकार शरद जोशी (१९३१), अभिनेता मोहनलाल (१९६०), मॉडेल अदिती गोवित्रीकर (१९७६)
मृत्युदिवस : भारताचे पहिले जलदगती गोलंदाज अमरसिंग (१९४०), लेखक क्लाऊस मान (१९४९), अणूंमधला पुंजवाद दाखवणाऱ्यांतला नोबेलविजेता जेम्स फ्रँक (१९६४), मुद्रक, प्रकाशक बाळकृष्ण ढवळे (१९७३), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९९१), अभिनेता जॉन गिलगुड (२०००)
---
राष्ट्रीय दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस.
आंतरराष्ट्रीय "सुसंवाद व प्रगतीसाठी सांस्कृतिक विविधता" दिवस
स्वातंत्र्यदिन - मॉंटेनेग्रो (२००६)
१८५१ : कोलंबियातून गुलामगिरी हद्दपार
१९०४ : पारी (पॅरिस) मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना (FIFA) ची स्थापना
१९२७ : अटलांटिक पार करणारे पहिले विमान घेऊन वैमानिक चार्ल्स लिंडबर्ग पारीमध्यल्या ले बोर्जेमध्ये उतरला.
१९३२ : विमानातून अटलांटिक पार करणारी पहिली महिला वैमानिक अमेलिया एअरहार्ट उत्तर आयर्लंडमध्ये उतरली.
१९४० : आचार्य अत्रेंच्या 'साप्ताहिक नवयुग'चा पहिला अंक प्रकाशित.
१९७९ : सॅन फ्रान्सिस्कोमध्ये समलिंगींच्या हक्कांसाठी झगडणारा लोकप्रतिनिधी हार्वे मिल्क याच्या खुन्याला शिक्षा; शहरात दंगली.
१९९१ : माजी पंतप्रधान व काँग्रेसचे अध्यक्ष राजीव गांधी यांची निवडणूक प्रचारादरम्यान आत्मघातकी तमिळ वाघांकडून हत्या.
२०११ : सौदी अरेबियातल्या जनआंदोलनामुळे आर्थिक सवलती आणि २०१५ मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार घोषित.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- गवि
- 'न'वी बाजू
प्रतिक्रिया
कथा लिहिण्याचा प्रयत्न आवडला.
कथा लिहिण्याचा प्रयत्न आवडला. पण एखाद्या चांगल्या कथेची रूपरेखा असावी अशी मांडणी वाटली.
या विषयावरची उत्तम कादंबरी म्हणजे 'राग दरबारी'. त्यामधल्या व्यक्ती जिवंत होतात, प्रवृत्ती जिवंत होतात, व्यवस्था कशी सडलेली आहे याबद्दल कारुण्य भरलेला काळा विनोद येतो. तुमची कथा थोडी फुलवून त्या दिशेला नेता आली तर पुन्हा वाचायला आवडेल. बघा प्रयत्न करून.
कथासुत्र व शैली छान
कथासुत्र व शैली छान
पण लेखनाची बांधणी विस्कळीत आहे, त्यामुळे अनेकदा रसभंग होतोय. जरा अधिक फुलवून, एका योग्य दिशेला हीच कथा न्यावी या राजेश रावांच्या मताशी सहमत.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
धन्यवाद,अगदी तासाभरात
धन्यवाद,अगदी तासाभरात खरडल्याने तशी विस्कळीत व छोटी कथा वाटते. आपल्या सूचनेचा विचार करुन पुढच्या कथेत बदल करेन.
™ ग्रेटथिंकर™
नावीन्य जाणवले नाही
या विषयावर असंख्य लेख व चित्रपट येऊन गेल्यामुळे हे लेखन कंटाळवाणे किंवा तेच ते या स्वरूपाचे वाटले. अशोक सराफ आणि/किंवा मोहन कोठीवान यांच्या भूमिका असलेल्या दोन चित्रपटांची कथा एकत्र वाचल्याचा भास झाला. नावीन्य जाणवले नाही.
विटलो.
सत्ताधारी स्वतः श्रीमंत असण्यात काय चूक आहे? पुराव्यानिशी पैसे खाल्ले माहित असेल तर बोला. बोलेरो, कारखान्याला पाणी, बंगला शब्द असे वापरले आहेत जणू अधम लोकच हे बाळगतात. अशा जळकट गरीबांचा दृष्टीकोन सांगणार्या कथा हजारोनी आहेत. कथेत किमान एकतरी नाविन्य असायला पाहिजे होते (संकल्पना, पात्राचा स्वभाग, भूगोल, इ). किमान भाषिक सौख्य मिळायला पाहिजे होते (एखादा भारी वाक्प्रचार इ).
कथा देखिल कॉग्रेस, भाजप आणि आम आदमी पक्षाची आहे. सो कॉमन. काही ग्रेट थिंकिंग यात आहे असं वाटलं नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
निरागस
सत्ताधारी स्वतः श्रीमंत असण्यात काय चूक आहे?
प्रश्न निरागसपणे विचारलेला दिसतो. सध्या कुणी इतकं निरागस असेल ह्यावर विश्वास बसणे कथीण आहे.
सत्तधारी श्रीमंत असण्यात चूक नाही, ते कसे श्रीमंत झाले ह्यात आहे.
ते कसे झाले हे उघड गुपित आहे.
पुराव्यानिशी पैसे खाल्ले माहित असेल तर बोला. बोलेरो, कारखान्याला पाणी, बंगला शब्द असे वापरले आहेत जणू अधम लोकच हे बाळगतात.
तांत्रिकदृष्ट्या बरोबर पण भंपक विधान.
खरं खोटं काय आहे ह्याची सगळ्यांना कल्पना आहे.
पण आपापला स्वार्थ म्हणा, हातबलता म्हणा, सगळे गप्प आहेत.
पुरावे, सिद्ध होणे हा इथे ज्योक झालेला आहे.
मी उलट विचारतो. पुराव्यानिशी काहीही आजवर सिद्ध झालेले नाही म्हणून सर्व व्यवस्था धुतल्या तांदळाची आहे असे आपणास वाटते का ? आय मीन धिस इझ टू मच.
इथे ऐसिवर पोक्त व प्रोग्रेसिव्ह म्हणवणारे काय आणि तिकडे गंभीरपणे मोदिंचे कौतुक करणारे काय "कोर्टाचं म्हणणं आहे की..."
कीम्वा "अजून सिद्ध झालेलं नाही..." स्टाइल खेळ खेळतात.
ज्याला सद्य परिस्थितीचे भान व संवेदशनशीलता आहे असा कुणी ह्या क्लॉजेसने वाक्य सुरु करेलसे वाटत नाही.
ग्राउंड रिअॅलिटी सगळ्यांना ठाउक आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
ज्याला सद्य परिस्थितीचे भान व
Politicians are a better lot than the populace they represent. सध्यातरी असेच आहे असे माझे मत आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
Politicians are a better lot
बरोबर, नैतर ते पॉलिटिशियन झालेच नसते.
पण बेटर इन व्हॉट सेन्स? रूलिंग? कंट्रोलिंग? असेच कैतरी असले पाहिजे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
राज्यव्यस्थेची जी उद्दिष्टे
राज्यव्यस्थेची जी उद्दिष्टे आहेत, ती पूर्ण करण्यात बहुतांश राजकारणी सकस योगदान देतात. बहुतांश लोक त्याला पूरक योगदान देत नाहीत. म्हणून सार्या योजना बारगळतात. आणि खापर राजकारण्यांच्या माथी पडते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ओके
ओके
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अगदी असेच नसावे. उदा. पुणे
अगदी असेच नसावे. उदा. पुणे मेट्रो योजना काय किंवा दशकानुदशके रखडलेली कृष्णा खोरे योजना काय, लोकांचे असे काय योगदान अपेक्षित होते की ज्याअभावी ती रखडली? लोकांची इच्छा असून, त्यांनी पाठपुरावा करूनही सरकारदरबारी कामे रखडतात तो दोष कुणाचा?
लोक म्ह. कोण अपेक्षित आहे ते स्पष्ट केले तर चर्चा अजून नेमकी होईल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पुणे मेट्रो - लोकदळिद्रता
मेट्रोचा प्रकल्प आपण खरोखरच फॉलोप केला असेल तर असे निदर्शनास येईल कि विलंबाचे ९५% (बहुतांश शब्द न वापरता आकडा टाकला आहे) खापर जनतेच्या माथी पडावे. झाडे तोडू नका, पाणी वळवू नका, पूल बांधू नका म्हणून हजारो केसेस केल्या गेल्या गेल्या. अनाधिकृत झोपड्यांचे राजकारण झाले. आणि भूमिअधिग्रहणाचे तर बोलूच नये. सरकारकडून सगळी कामे वेळेवर झाली असताना केवळ लोक नालायक आहेत म्हणून प्रकल्प रखडला. मी सरकारमधे असतो तर अशा हजारो केसेससाठी कोर्टात जाण्यापेक्षा प्रकल्प कँसल केला असता. पण सद्य राजकारणी धीराचे आहेत.
पुणे मेट्रो लोकांच्या दळभद्रीपणाची क्लासिक केस आहे. त्यावर मराठीत आणि इंग्रजीत खूप साहित्य आहे. वाचा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
यातले ज्ञान आपल्याइतके नाही.
यातले ज्ञान आपल्याइतके नाही. पण पेपरांतून पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांमधील सवतासुभा यायचा तो खोटाच की काय मग? त्या भांडणामुळे प्रकल्प पुढे जाईना असे वाचले होते. मग हा लोकांचा दोष कसा? दिल्ली मेट्रोवाली संस्था अन महाराष्ट्र शासन यांनी आपापली कामे वेळेवर केलेली आहेतच. पण महापालिका लेव्हलवर हे किती काळ भिजत घोंगडं पडलं होतं?
शिवाय अजून एक उदा. देतो. पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. बीआरटी हा एक जोक झालेला आहे. यात लोकांचा दोष कसा?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शिवाय
शिवाय संरक्षणक्षेत्रात कॉन्फिडेन्शालिटी नावाचे कवच आहे. तिथे कुणी मधे नाक खुपसत नाही. त्या आघाडीवर काय चित्र आहे?
भारतीय बनावटीच्या बंदुका , विमान तोफा आजही जागतिक दर्जाच्या नाहित, वापर करता येण्या जोग्या नाहित.
(उपग्रह्,अंतराळ क्षेत्रात आपण डॉन असल्याचं बोललं जातं; मी इतर बाबींत म्हणत आहे.)
कोळशाचय खाणीसमोर उभे राहून "दाखव इथे काय काळे आहे" असे कुणी विचारले तर मी हतबुद्ध होतो.
अरे कुठे कुथे दाखवू काय काय काळे आहे ते?
बाय डिफॉल्ट सारेच काळे आहे.
जे काळे नाही; तेच निर्देश करुन दाखवणे सोपे आहे.
.
अवांतर :-
राजेश घासकडवी - अरुण जोशी - ऋषिकेश असा अक्ष बनू पाहतोय.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मनोबाशी सहमत.
मनोबाशी सहमत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
भारतीय बनावटीच्या बंदुका ,
यात राजकारण्यांचा काय दोष? त्यांच्या देशातील लोकांची एखाद्या क्षेत्रातील क्षमता कमी असेल तर राजकारण्यांनी काय करावे?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मेलोय
अधिक वादाची आता माझी क्षमता नाही.
यात राजकारण्यांचा काय दोष? त्यांच्या देशातील लोकांची एखाद्या क्षेत्रातील क्षमता कमी असेल तर राजकारण्यांनी काय करावे?
ह्या वाक्याने तर्काला गारद केलय.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अजून एक तर्क
कोणताही देश आर्थिक दृष्ट्या intrinsically गरीब वा श्रीमंत नसतो. त्या देशातले लोक कसे वागतात यावर त्या देशाचा विकास अवलंबून आहे. नैसर्गिक स्रोत, जमिन, सुरक्षा, इ चा परिणाम असतो पण इतका नाही. देशाचे कल्याण व्हायला लोक सद्वर्तनी आणि कष्टाळू असणे गरजेचे आहे. भारतीय लोकांची मूल्यव्यवस्था अप्रभवनशील झाली आहे. अशा स्थितीत जेलर कितीही चांगला असला तर तो कैद्यांमधे सुधार घडवून आणू शकत नाही. शिक्षक कितीही चांगला असला तरी चांगले विद्यार्थी घडवू शकत नाही. चेअरमन कितीही चांगला असला तरी कंपनी बुडते.
लोकांच्या इतक्या शिव्या खाऊनही राजकारणी लोक लोकांसाठी देश चालवतात हा लोकांवर मोठा उपकार आहे असे मला बर्याचदा वाटते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मग भारतातले बिनडोक लोक
मग भारतातले बिनडोक लोक अमेरिका इ. देशांत गेल्यावर मात्र बुद्धिमान होतात याचे कारण काय असावे बरे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
विकास आणि लोक
When the best of the Indians migrate to developed countries, they constitute the 'average people' there. फार तर फार अॅवरेज प्लस. असो.
पण मला भारतीयांची जैविक क्षमता कमी आहे, इ म्हणायचे नाही. भारतीय लोकांचा स्वभाव दळीद्र आहे असे म्हणायचे आहे. केवळ निक्के निक्के लोक तिकडे घेतल्याने इकडची परिस्थिती अजूनच वाईट होते. म्हणून तुमचा तर्क पटत नाही. आणि मला खात्री आहे कि 'सगळेच' भारतीय अमेरीकेत घुसडले तर परिस्थिती पूर्ववत करणे त्यांना अशक्य होऊन बसेल. अर्थातच माझी खात्री खोटी ठरो अशी इच्छा आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
When the best of the Indians
अमेरिकेतले सर्वांत श्रीमंत समाज पाहिले तर त्यांत इंडियन्स बरेच आहेत-दळभद्री स्वभाववाले असूनही त्यांना तिथे कसे काय जमते कुणास ठाऊक.
अन स्वभाव दळिद्र असेल तर राजकारणी दळिद्रच निपजणार, नाही का? मग ते कसे काय चांगले होतात बरं? त्यांची पैदास कुठल्या वेगळ्या दवाखान्यात होते का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पुण्यात सार्वजनिक वाहतूक
पी एम टी चे चालक लहान मुलाला खेळणे तोडायची जी घाई असते त्या घाईने बस तोडतात. त्यांची बस चालवायची पध्हत पहा. ती आपली बस आहे, तिच्यावर आपला रोजगार अवलंबून आहे याची काहीतरी तमा त्याला असते का? सरकारने चांगले ड्रायवर कूठून आणायचे?
जगात सगळीकडे बीआरटी नीट चालते. आपल्याकडेच तिचा ज्योक होतो. विकसित जगाच्या लोकांसारखी लायकी इथल्या लोकांची नसावी.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ओके. बस ड्रायव्हरचे रफ
ओके.
बस ड्रायव्हरचे रफ ड्रायव्हिंग हा प्रकार पुण्याचाच नाही तर अख्ख्या भारतभरचा रोग आहे. मी कोलकात्यास २ वर्षे राहिलो आहे आणि पुणेरी ड्रायव्हरपेक्षा तिथल्यांचे ड्रायव्हिंग रफ असते हेही चांगलेच जवळून अनुभवलेले आहे. तरीही तिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम आहे. त्यामुळे रफ ड्रायव्हिंग हा बोजवार्याचा निकष होऊ शकत नाही.
अख्ख्या भारतात फक्त पुण्याचे ड्रायव्हर बस वाईट चालवतात असे वाटते का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
प्रश्न पुणे विरुद्ध इतर शहरे
प्रश्न पुणे विरुद्ध इतर शहरे असा नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
राजकारण्यांमुळे बोजवारा
राजकारण्यांमुळे बोजवारा उडालेले पुण्यातले एक उदाहरण दिले, इतकेच. अखिल भारतभरचे बसवाले रफ ड्रायव्हिंग करत असूनही पुण्यातच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इतकी वाईट का, या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. जनतेचा असा काय सहभाग यात अपेक्षित होता, ते कळू शकेल का? सकाळने एकदा एक बस डे आयोजित केला होता त्याला लोकांचा दाबून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बस फ्रीक्वेन्सी उत्तम असेल तर लोकांची इच्छा बस वापरण्याचीच आहे हेदेखील अधोरेखित झाले. मग पीएमटी विभाग असा का गंडला आहे? शहराच्या व्यवस्थेतील अतिमहत्त्वाचे हे अंग दुर्लक्षिण्यास जबाबदार कोण?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पुण्यातच सार्वजनिक वाहतूक
भारतात सर्वत्रच वाहतुक व्यवस्था वाईट आहे. त्याला एकही अपवाद नाही. कोणत्या निकषावर पुण्यात जास्त वाईट आहे हे कळले नाही.
पुणे फार बरे आहे. भारतात ३५ च्या आसपास शहरे १० लाखाच्या आसपास लोकसंख्येची आहेत. जवळजवळ ५० शहरांत बससेवा आहे आणि अजून १५ त येऊ घातली आहे. तिथेही हीच हालत होणार.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
छे सामान्य माणसे फारच पैदास
छे सामान्य माणसे फारच पैदास करत आहेत, त्यामुळे व्यवस्थेवर बोजा पडून ती इतरांना वापरण्यास योग्य रहात नाही. हे काही बरे नाही.
बस फ्रीक्वेन्सीचा निकष लावला
बस फ्रीक्वेन्सीचा निकष लावला तर मुंबै, कोलकाता, हैदराबाद, बेंगळूरू आणि चेन्नै यांपेक्षा तरी पुणे वाईट्टच आहे. सगळीकडे तसलेच मठ्ठ भ्रष्ट इ. लोक असूनही हे पुण्यातच का आहे हे मला समजले नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
निष्कर्ष
पुण्यातील लोक मठ्ठ नाहीत, असा निष्कर्ष काढता येतोय की!
अन विशेषतः ते बेटर लॉट इ.इ.
अन विशेषतः ते बेटर लॉट इ.इ. वाले तरी आजिबात मठ्ठ नैत
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अर्थातच पुणेकर विशेष मट्ठ
अर्थातच पुणेकर विशेष मट्ठ आहेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बहुतांश लोक त्याला पूरक
सहमत आहे. हे कारण अनेकदा दिसते.
अर्थातच! त्यात गैर काय? ते नुसते प्रशासक नाहियेत त्याच बरोबर ते (हो ह्हो त्याच त्याच कामचुकार वगैरे) जनतेचे प्रतिनिधीही आहेत. जनता नीट वागत नसेल तर जनतेतील प्रत्येकाला जाऊन बोलता येत नाही, तर त्या जनतेने जो प्रतिनिधी दिलाय त्यालाच बोलणार नै का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
दगड
न्नो.
तसे शिवाजी नामक अवलियाबद्दल आणि केमाल अतातुर्क बद्दल म्हणता येइल.
सध्या फारतर "जनता स्वतःच वाईट आहे. ही लोक जनतेइतकीच वाईट आहेत." इतकच म्हणता यावं.
अर्थात ह्यावर प्रचंड मारामार्या होउ शकतात. कारण ह्यासाठी नक्की काय measurements, metrics ठेवायचे, काय मूल्यमापन करायचं ह्याचच कॉमन अंडारस्टॅण्डिंग नाही.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
एक उदाहरण घ्या. उत्तर
एक उदाहरण घ्या. उत्तर प्रदेशात कायदा सुरक्षा व्यवस्था चांगली नाही म्हणून समाजवादी पक्षाला धारेवर धरले जाते. पण मास स्केल जमा होणारे दंगेकरी सामान्य लोकच आहेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ओके
ओके.
पण वरती संरक्षणव्यवस्थेबद्दलही कुणी बोला की.
चूक असेल तर चूक आहे म्हणा.
नाहितर मान्य आहे म्हणा.
नाहितर कल्पना नाही असं तरी सांगा बुवा.
माझं म्हणणं आहे की काही बाबतीत संरक्षन व्यवस्था ब्येक्कार गंडलेली आहे.
हे त्या रहिमतदिल गणेशाचे आभार की अजून ती देशाच्या शत्रूंकडून तितकी exploit केली गेली नाहिये.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सहमत. जन्ता काय ती धुतल्या
सहमत.
जन्ता काय ती धुतल्या तांदळागत अन राजकारणी सगळे कोळशागत हे चूक असले तरी राजकारणी लोकांच्या आपसातील साठमारीमुळे लोकांची वाट लागते हे नाकारण्यात काय प्वाइंट आहे ते कळत नाही.वर मनोबा म्हणतोय तसे लष्कर खात्यात तुमचामाझा असा काय सहभाग असतो? तिथेही होतोच ना भ्रष्टाचार? की तिथे 'जसे लोक तसे राजकारणी' हे अर्ग्युमेंट लावून बाकी ठिकाणी मात्र राजकारणी हा बेटर लॉट आहे असे म्हणणार? अनेक पदरांपैकी एकाला नाकारण्यात अर्थ काय आहे, ते कळत नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
लष्कर खात्यात (संबंधित) किती
लष्कर खात्यात (संबंधित) किती राजकारणी असतात? हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतील. तुमचा भ्रष्टाचाराचा आकडा भागिले दहा करणार का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अहो राजकारणी जमात वेगळी असते,
अहो राजकारणी जमात वेगळी असते, दे आर सिविलाईज्ड सायकोपॅथ्स..
™ ग्रेटथिंकर™
बोफोर्सच्या भ्रष्टाचारात
बोफोर्सच्या भ्रष्टाचारात राजकारणीच होते की अजून कोण, हे पहायला आवडेल.
लष्करात किती राजकारणी असतात हा मुद्दा नसून तिकडे होणार्या भ्रष्टाचारांत त्यांचा हात असतो असा मुद्दा आहे. काणाडोळा नक्की कुठे कुठे करणार याची एक लिस्ट दिली तर बरे पडेल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
लेखनाची प्रत सुधारण्याबद्दल
लेखनाची प्रत सुधारण्याबद्दल राजेशशी सहमती. "सगळ्यांना माहित्ये" अशा संकल्पनेबद्दल लिहीताना बाकी बराच मालमसाला घालता येईल. त्यातून ओसाडवाडी म्हटल्यावर चिंवि आठवतात आणि पर्यायाने विनोदी लिखाण फुलवलं असेल अशी अपेक्षा तयार होते.
ललित लेखनाबद्दल पुरावे मागणं आततायी वाटलं. कल्पनेतला राजकारणी धुतल्या तांदळासारखे असतील तर त्या लिखाणाला स्वप्नील कल्पना म्हणता येईल, पैसे खाणारे असतील तर वास्तवतावादी. पण जे लोक प्रत्यक्षात अस्तित्त्वात नाहीत त्यांच्या लाचखाऊपणाचे पुरावे का द्यायचे?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.