भारतीय शाकाहार आणि भूतदया
व्यवस्थापकः सदर प्रतिसाद मुळ ललित लेखनात प्रतिसाद म्हणून काही सदस्यांच्या वाचनात अवांतर व/वा रसभंग ठरू शकेल मात्र स्वतंत्र चर्चेसाठी वेगळा विषय म्हणून या प्रतिसादाचे महत्त्व लक्षात घेऊन धागा वेगळा करत आहोत. श्री अरूण जोशी यांना आवश्यक वाटल्यास अधिक तपशीलात हे लेखन विस्तारू/संपादित करू शकतील, शिवाय योग्य ते शीर्षकही देऊ शकतील.
===========
सिगारेट, दारू नि तंबाखू यांना विज्ञान नि परंपरा हे दोघेही त्याज्य मानतात.
----------
त्यावरून व्यक्तिचे पूर्ण व्यक्तिमत्व कळत नाही पण इतकेच निकष कोणाला महत्त्वाचे वाटू शकतात.
-----------------
@बॅटमॅन - शाकाहारी व्यक्तित भूतदयेचा भाव जास्त असू शकतो. बरेचदा असतो (हे मी पाहिलेले आहे). त्याकारणाने शाकाहारी व्यक्ति जास्त दयाळू असू शकते. (मांसाहार करणार्या प्रत्येकास स्वतः बकरी वा बैल कापायला सांगीतला, फक्त हे पाहायला कि त्यांचेत मानसिक विरोध होतो का, तर जितक्या सहजतेने नि आवडीने ते मांस खातात तितक्या सहजतेने नि आवडिने ते कापाकापी करणार नाहीत (हे ही भारतात प्रचंड पाहिलेले आहे). अपरोक्ष गोष्टींत काय होतं याचा मानवता फार विचार करत नाही.
खासकरून जी व्यक्ति परंपरागत रित्या मांसाहारी आहे, पण नंतर तिचे शाकाहार स्विकारला आहे (जसे जॉर्ज बर्नॉड शॉ.) ती विशेष भूतदयावादी असते.
----------------
भूतदयावाद (नि म्हणून एक मानवी चांगुलपण) नि आहारपद्धती यांचा संबंधच नाही हे विधान भारतीय परिप्रेक्ष्यात गैरलागू आहे.
@बॅटमॅन - शाकाहारी व्यक्तित
मांसाहारी = क्रूर आणि हरामखोर हे एकदा ठरवले की बोलणार तरी काय म्हणा. वैसे तो मी दारुडे = हरामखोर असेही म्हणेन. पण त्याने सिद्ध काय होतं, घंटा?
शिवाय भूतदयेचा इतका उमाळा असेल तर प्राण्यांबद्दलच का बरे येते ही भावना? झाडे, गवत, इ. बद्दल ही भावना कुठे (तेल लावत इ.इ.) जाते? भूतदयेच्या या भावनेत जर प्राणी-बिगरप्राणी अशी वर्गवारी असेल तर हा शुद्ध दांभिकपणा आहे. 'मी व्हेज खातो म्हणून मी मॉरली सुपीरिअर आहे' ही भावना घेऊन कैक शाकाहारी लोक वायझेडपणे मांसाहार्यांना तुच्छ लेखत असतात. पण त्यांची मने मांसाहार्यांइतकीच किडलेली असतात. पण ते तुम्हांला दिसणार नाही, कारण तुमच्या मनात तो बायस फिट्ट बसलेला आहे.
मांसाहारी जसे अन्नासाठी कुणाचा तरी जीव घेतात, तसेच शाकाहारी लोकही करतात. पण लोकांनी दिमाग वापरण्यावर बंदी केल्यामुळे ही बिनडोक भावना तयार झालेली आहे. तस्मात, बिनबुडाच्या, बायस्ड भावना उरापोटी बाळगायच्या हक्कास एक लाल सलाम करून माझे भाषण संपवतो.
मांसाहाराचा विजय असो!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अवांतर :- मांसाहार
एक अवांतर मुद्दा माम्डायचा आहे .
मांसाहार करणार्यांवर बाहेरुन कुणी आरोप करण्याची गरज नसावी.
किमान काही मांसभक्षक व्यक्ती ह्या त्यांच्यासमोर कोंबडी ,बोकड/बैल्/हत्ती वगैरे मारला जात असेल तर " नको नको" म्हणतात.
तितक्या वर्गापुरताच विचार केला तर आपण करीत आहोत हे चूक आहे, हे बाहेरुन सांगण्याची गरज नाही, त्याचा गिल्ट आतूनच येत असतो.
ज्यांना असे होत नाही, ते थोर होत. सुसंगत होत. त्यांच्याबद्दल काहीही म्हणणे नाही.
शाकाहारी व्यक्तीस समोरच झाडाची फळे तोडून खायला दिली तर तो खाइल.
शेतातल्या कापणीच्या वेळीही तो उपस्थित असला तर त्याला काही वाटणार नाही.
सुसंगत आचरण असण्याचं प्रमाण/टक्केवारी शाकाहारी लोकांत अधिक आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मी अशी विसंगत प्रतिक्रिया
मी अशी विसंगत प्रतिक्रिया दिल्याचे उदा. मला माहिती आहे. पण तेवढ्यावरून पूर्ण वर्गाबद्दल अशी टक्केवारी काढणं कठीण आहे.
शिवाय- झाडे/गवत तोडण्याचा गिल्ट येत नाही तरी ती गोष्ट तुमच्याच (शाकाहार्यांच्या) लेखी चूक आहे त्याचे काय? ही विसंगती कुठे नेऊन घातलीत, मालक? तर्कटेच लावायची तर कुठपर्यंतही लावता येतील.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
झाडे, फळे, भाज्या तोडण्याचा
झाडे, फळे, भाज्या तोडण्याचा गिल्ट येत नाही कारण ती धडपड, आवाज, तडफड आचके इत्यादि करत नाहीत. शांतपणे मरतात.
याला शाकाहारी लोक जास्त सुसंगत वागणे म्हणत असतील तर म्हणोत बापडे.
यग्जाक्टली!!!!!! उद्या जर
यग्जाक्टली!!!!!! उद्या जर कुणी जेनेटिक काड्या करून तसली झाडं बनवली तर या दांभिकांची रिअॅक्शन पाहण्यासारखी असेल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आत्याबाई
आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं.
(तिला मिशा असत्या तर ती आत्या राहिली नसती.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
भूतदयेच्या या भावनेत जर
मांसाहार म्हणून माणसे खायची मांसाहार्यांची मनोमन तीव्र विशुद्ध भावना नसेल तर तो देखिल एक महादांभिकपणा आहे. माणसाचं मांस चविष्ट असतं. लहान बाळांचं अजूनच. (मंजे आंही खेकडे, बेडूक. कूत्री, कासव, साप खात नाही, गिजगिळ वाटतं हा भाव इथे चालणार नाही.)
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मांसाहार म्हणून माणसे खायची
बर्रे सापडलात अजो. थँक्स!
व्हेज म्हणून शेवाळ, कुठल्याही झाडाचा पाला, रस्त्याकडेला उगवणारे कुठलेही गवत, झाडाचे खोड, काटक्या, त्याची साल, कुठलेही कडू-तेलकट कसलेही फळ, कसलेही फूल, इ. खायची तीव्र इच्छा नसेल तर शाकाहारीही तितकेच दांभिक.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
उपलब्ध
आता इतर धान्य उपलब्ध असताना हे कुणी खाणार नाही.
पण काहिच उपलब्ध नाही म्हटल्यावर नावड असलेलं फळंही नाइलाजानं खाल्लं जाउ शकतं.
पण शाकाहारी व्यक्तीस हे सुद्ध मिळाला नाही तर तो जीव देइल (थेट आत्महत्या (समुद्रात उडी मारणे वगैरे)) किंवा उपाशी राहून मृत्यूस कवटाळेल.
मांसाहारी व्यक्तीस अत्यंत अवघड अशा परिस्थितीत मानवी प्रेत मिळाल्यास मांसाहारी व्यक्ती ते खाण्यास तयार्/उत्सुक वगैरे असेल काय ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मांसाहारी व्यक्तीस अत्यंत
हो आणि नाही. नाही वाला पर्याय येण्याचे कारण म्ह. कैक मांसाहारी लोक असे करू शकणार नाहीत इतकेच. उरलेले करू शकतील. मग ठरवा बरं कोण दांभिक ते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
...
माझ्यापुरतेच बोलायचे झाले, तर (बहुधा) नाही. (माझी खात्री कोणी द्यावी, नाही का?)
पण त्याचबरोबर, मी रस्त्यावर मरून पडलेली गाय/बकरी/डुक्कर, गाडीखाली सापडलेली कोंबडी/ससा वा भरतीबरोबर किनार्याबरोबर वाहत येऊन ओहोटीनंतर किनार्यावरच देव-जाणे-कधीपासून पडून राहिलेले मासेसुद्धा खाणार नाही.
बहुतांश मांसाहारी व्यक्ती या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रेडेटर्स असाव्यात, स्कॅवेंजर्स नसाव्यात, असे वाटते. (चूभूद्याघ्या. सामाजिक हतबलतेमुळे स्कॅवेंजर्स बनलेल्या जमाती अलाहिदा. इतरही अपवाद असणे अशक्य नसावे, परंतु मला त्यांजबद्दल खात्रीलायक माहिती नाही, इतकेच.)
मांसाहारी व्यक्तीस अत्यंत
http://en.wikipedia.org/wiki/1972_Andes_flight_disaster
(अवांतर)
- समुद्राहार्यांमध्ये खेकडे हा जीव ओवाळून टाकण्यालायक प्रकार समजला जातो.१
- बेडूक - विशेषतः बेडकाच्या तंगड्या - हा प्राणी आग्नेय आशियात नि चीनमध्ये आवडीने खाल्ला जातो, नि (खाद्योपयोगासाठी) मोठ्या प्रमाणात निर्यातही होतो.२
- कासव हा प्रकारही बहुधा खाल्ला जात असावा, असे वाटते. (मॉक टर्टल सूप जर असू शकते, तर वरिजनल टर्टल सूपही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.)
- गोगलगाय (रादर, गोगलगायीच्या काही जाती) हा प्रकार फ्रान्समध्ये डेलिकसी मानला जातो.३
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ आम्ही तो प्रकार एकदोनदाच करून पाहिला आहे, परंतु सहसा त्या वाटेस जात नाही. म्हणजे, मांस रुचकर लागते खरेच, परंतु त्या मांसापर्यंत पोहोचण्यासाठी जी तंगडतोड नि डोकेफोड१अ करावी लागते, तितके कष्ट घेण्याची आमची सहसा तयारी नसते. ("कारण शेवटी आम्ही भटेंच! त्याला काय करणार?" - पु.ल.) त्यामुळे, आमची धाव क्र्याबकेक नि क्र्याब रंगूनपर्यंतच.
१अ वेल, नॉट एक्झॅक्टली. बोले तो, फुटते ते बहुधा डोके नसावे; चूभूद्याघ्या.
२ हा प्रकार आम्ही एकदाच खाल्ला आहे. आवर्जून खाण्यासारखा वाटला नाही. थर्माकोल (अमेरिकन बोलीत 'स्टायरोफोम') चावून खावयास ज्यांस आवडते, त्यांनी जरूर खाऊन पाहावा.
३ हा प्रकार आम्ही उभ्या आयुष्यात केवळ दोनदाच खाल्ला आहे. रुचकर लागतो, याची ग्वाही देऊ शकतो, परंतु क्वांटिटीच्या मानाने खिशास जड जातो. परवडला कधी, तर पुन्हाही खाऊच.
कासव हा प्रकारही बहुधा खाल्ला
सुमो पैलवान त्यांच्या कुस्तीच्या म्याचआधी कासवाचं रक्त पितात असं पाहिल्याचं स्मरतय.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
+१
डिस्कव्हरी की न्याशनल जॉग्रफिकच्या डॉकुमेंट्रीत हे पाहिल्याचे आठवते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कासवाऐवजी
कासवाऐवजी माणसाचं रक्त प्यायला काही माणसं उत्सुक असतील का ?
नियमित काही प्रमाणात स्वतःहून रक्त विक्री करणारी मंडळी असतील तर त्यांना परवानगी द्यावी का ?
मानवी रक्त - विक्री - सेवन्/प्राशन ही साखळी उपलब्ध असावी का ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
नक्की सिद्ध काय करू पाहताहात
नक्की सिद्ध काय करू पाहताहात तेवढे सांगा अगोदर. यांपैकी कुठली गोष्ट उपलब्ध नसेल तर मांसाहारी लोक दांभिक इ. ठरतील?
अन वैसेभी, तुम्ही ब्लडी शाकाहारी लोक व्हेगन असल्याशिवाय बाता करूच नका कसल्या. लॅक्टो व्हेजिटेरियन म्हणजे स्यूडो व्हेजिटेरियन!!!! ब्लडी दांभिक!
आणि शाकाहारी लोक खालील बातमीत उल्लेखिलेला पदार्थ खाऊ शकतील का?
http://www.dailymail.co.uk/news/article-1360225/Shop-sells-breast-milk-i...
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
उद्दीष्टांवर शंका
उद्दीष्टांवर शंका घेणे म्हणजे मूळ शंकेस उत्तर नव्हे.
बाकी मानवी दुधाबद्दल :- नाही. तसे करणार नाही.
जमल्यास गाय्-म्हैस ह्यांचे दूधही स्वतः वापरणे बंद करीन म्हणतो.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मूळ शंकाच 'कशी जिरवतो' छाप
मूळ शंकाच 'कशी जिरवतो' छाप आवेशात विचारलेली असल्याचे जाणवते, सबब उत्तरही तसेच येणार.
तदुपरि- काही मांसाहारी लोक करतील, उरलेले करणार नाहीत. बिग डील?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आवेश
आवेश असण्याचा आरोप अमान्य आहे.
सरळ भाषेत सरळ शंका विचारली आहे.
खवचटपणाचा काही अंश अथवा दुसर्याच एखाद्या चर्चेचा संबंध किंवा इतर काही खवचटपणाचे नमुने त्यात नाहित.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मग सरळ उत्तरही दिलेच आहे की.
मग सरळ उत्तरही दिलेच आहे की. अजून कशाची अपेक्षा आहे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हा हा हा, नेमके!!!! वर उल्लेख
हा हा हा, नेमके!!!!
वर उल्लेख केलेले सर्व पदार्थ डेलिकसी समजले जातात कैक ठिकाणी हे अजो विसरले- चालायचंच. शाकाहार्यांचे दौर्बल्य
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मी दिलेली बहुतांश डेलिकसीच
मी दिलेली बहुतांश डेलिकसीच आहेत. पण संस्कृतीसापेक्ष. मीठाचे पाणी पाजवून उकडले जाणार्या जीवंत कासवाचे उदाहरण ऐसीवरच कोनी दिले होते.
--------------
बाय द वे, मुनुष्याचे (मृत अर्भक) बाळ ही देखिल एक वास्तविक डेलिकसी आहे जगात.
-------------------
सर्वसाधारणपणे, हे का खात नाहीचे उत्तर "अजागळ आहे" असे दिले जाते. सबब माणूस "अजागळ" या सदराखाली टाळला जाऊ शकत नाही इतकेच लिहायचे होते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सर्वसाधारणपणे, हे का खात
मग त्याच न्यायाने, कुठलेही जंगली फळ, कुठल्याही झाडाचा कसलाही पाला, खोड, फूल, इ.इ. देखील त्या किंवा अन्य सदराखाली टाळता येऊ शकत नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅटोबा, येड पांघरून पेडगावला
बॅटोबा, येड पांघरून पेडगावला जाऊ नकोस.
---------
शाकाहारी जेव्हा कोणते पाला, फळ, खोड खात नाहीत तेव्हा ते गुणात्मक नकार देतात. माणसाच्या मांसात न खाण्यासारखं काही नाही. किमान शंभरपैकी ५ लोकांना नाही आवडलं तरी ९५ ना आवडावं इतकं चविष्ट असतं. मग शाकाहारी जी रेषा प्राणी व वनस्पती यांच्यात ओढतात तीच रेषा मांसाहारी मनुष्य व अन्य प्राण्यांमधे ओढतात. दोघांची रिजनॅबिलिटी तितकीच गंडलेली असते. पण माणूस हा बुद्धीमान प्राणी आहे. प्राणी जसे आपले सजीवत्व व्यक्त करतात तसे वनस्पती नाही. म्हणून शाकाहारी हे सजीवतेच्या वरच्या पातळींना तरी आदरतात. मांसाहारी मात्र सजीवतेच्या वरच्या पातळींनाही आदर देत नाहीत. सबब ते भूतदयेत शाकाहार्यांपेक्षा कनिष्ठ वाटतात.
-----------
अमिबा (सौजन्य - आडकित्ता)ते मनुष्य असा ऑर्गेनिक फूड स्पेक्ट्रम घेतला तर यातले काहीही निवडणारा तो दांभिक अशी (आज बायनरी) भूमिका तू घेत आहेस. अमिबा खाली आणि माणूस वर असे मानून जितक्या वर तुमची खद्यसीमारेषा तितकी तुमची भूतदया जास्त असे मी म्हणत आहे. तुझ्या म्हणण्याचा टोकाचा अर्थ काढला तर एकतर माणसे भूतदयावादी असतात वा जिवंत असतात असा होतो. मिनरल्स आणि पाणी खाऊन आपण जगू शकत नाही. शेवटी प्रत्येक खाद्याचा स्रोत ऑर्गेनिक असतो.
----------
आपण जसजसे "आपल्यांच्या" जवळ पोहोचतो, तसतसे त्या कृतींत भेद मानला जातो. माणूस मारण्यापेक्षा बाप वा लेकरू मारणे अधिक हीन मानले जाते. तसेच जे जितके जास्त आपल्यासारखे तितके ते मारण्यासाठी जास्त क्रौय लागते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
शाकाहारी जेव्हा कोणते पाला,
शाकाहारी लोक झाटभराचं गुणात्मक कारण देत नाहीत. तुमच्याच टक्केवारीच्या भाषेत बोलायचं तर कुठल्याही पाना-फळा-फुलात १०० पैकी ९० आवडावे असे काहीतरी अस्तेच, तरी तुम्ही ते खात नाही. सबब तुमचं रीझनिंग गंडलेलं आहे.
न खाण्यासारखं काही नसणं आणि १०० पैकी ९५ ना आवडावं इतकं चविष्ट असणं या दोनी गोष्टी एक आहेत हे पेडगावला जाऊन सिद्ध केल्याबद्दल अभिनंदन. मांसाहारी लोक हरामखोर आहेत हे बेसिक अॅझम्प्शन घेऊनच तुम्ही बोलताय, सबब मांसाहार्यांबद्दल काही बोलूच नका. तुमचे लाडके शाकाहारी कसे दांभिक आहेत ते पहा अगोदर. स्वतःला भूतदयाळू म्हणताना आणि गायीकडून तिचं दूध हिसकून जबरदस्तीने ओढताना काही लाज तर वाटतच नाही. इतकंच नव्हे, तर कैक झाडेही निर्दयपणे उपटून काढतात त्यांच्याबद्दल मात्र बोलायचं नाही.
मला जे म्हणायचे नाही ते माझ्या तोंडी घातल्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन. लोकांनी काय पायजे ते खावं, अगदी उत्सर्जन प्रॉडक्ट्स खाल्ले तरी मला काय त्याचे? फक्त माझ्याप्रमाणे जे करत नाहीत ते हरामखोर असे म्हणणार्या विचारसरणीला माझा आक्षेप आहे.
टोकाची उदा. देऊन परत एकदा मांसाहार्यांना शिव्या घातल्याबद्दल अभिनंदन. हे क्रौर्य नसतं तर माणूस जिवंत राहिलाच नसता, पण ते एक असो. तुमच्या क्रौर्याच्या व्याख्येत प्राणी मारून खाणे अपेक्षित आहे, पण प्राणी नुस्ता मारणे अपेक्षित नाही. त्यामुळे सोयीस्कर व्याख्या देऊन समोरचा पक्ष कसा हरामखोर आहे हे सिद्ध करण्याचा तुमचा निरर्थक आटापिटा प्रचंड विनोदी वाटतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मांसाहार म्हणून माणसे खायची
नॉट नेसेसरिली. प्रत्येक गोष्टीत दांभिकपणा असतोच असं नाही..
-वाघाने कीटकभक्षी नसणे,पण मांसाहारी असणे.
-फुलपाखरातल्या काही जातींनी कुजलेल्या लाकडाचा रस आवडीने प्राशणे पण इतर काही जातींनी पुष्परसाचे शोषण करणे.
-तरस आणि गिधाडांनी मृत मांसच खाणे
-विंचवाच्या पिल्लांनी त्यांच्या स्वतःच्या आईचे शरीर जिवंतपणी खाणे
-कोळी (स्पायडर)च्या काही जातीच्या माद्यांनी संभोगानंतर नराला खाणे, पण त्यांनी इतर कोळी न खाणे.
हे सर्व दांभिक म्हणता येत नाही.
मुळात कॅनिबलिझम हा गुण काही प्रजातींत दिसतो, काहींत नाही.
तत्सम माझ्या स्पेसीजचा प्राणी खाणे नकोसे असण्यामागे माझी केवळ मनुष्यप्राणी असण्याच्या एका धाग्याने इतर मनुष्यप्राण्यांशी इतकी किमान मानसिक बांधिलकी असेल तर त्यात दांभिकपणा आहे असं म्हणता येत नाही.
आपली प्रजाती टिकून रहावी अशी इन्स्टिंक्ट या ना त्या मार्गाने बहुतांश प्रजातींत असते.
कॉम्पिटिशन नको म्हणून स्वजातीयांना मारणे म्हणजे आहार नव्हे. ते तर मनुष्यप्राणीही करतोच.
जाऊ द्या हो गवि. सूक्ष्म
जाऊ द्या हो गवि. सूक्ष्म बारकावे कुणाला सांगताय? अगोदरच निष्कर्ष काढून बसलेल्यांना काही उपयोग नाही सांगून. मांसाहारी हे क्रूर आणि हरामखोर असतात हे त्यांचं लाडकं तत्त्व आहे ते त्यांना गोंजारू द्या. तेवढीच अज्ञानमूलक का होईना करमणूक होईल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एक शंका
एक शंका, मध खाताना वा दूध पिताना शाकाहार्यांना काही विरोधाभास जाणवतो का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
... आणि.. जाणवत नसेल तर
... आणि.. जाणवत नसेल तर बिचार्या अंड्याने काय मोठा फरक जाणवतो?
पोल्ट्री अंडे हे सर्व दृष्टींनी पिल्लाचे अन्न (सान्स पिल्लू) म्हणजे पूर्णपणे दुधाशी तुलनीय आहे.
म्हणून
म्हणून तर कैक जण अंडी खातात, पण कोंबडी, बकरी वगैरे वगैरे खात नाहित.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मध, दूध खाताना डायरेक कुणाला
मध, दूध खाताना डायरेक कुणाला मारलं जात नाही. दुसर्याचं अन्न पळवलं जातं. जे फळं आणि भाज्यांच्या बाबतीतही म्हणता यावं. पोल्ट्री अंड कोणाचं अन्न नाही कारण त्यात पिल्लु नसतं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
फळात बिया असतात. एका नव्या
फळात बिया असतात. एका नव्या वृक्षाचा जीव. तो योग्य रितीने पचून जमिनीला परत मिळाला तरच झाडाची लाईफसायकल चालणार असते. पण बहुतांश वेळा हा भागही चावून किंवा न रुजणार्या जागी (कचरापेटीत) फेकून नष्ट केला जातो.
पोल्ट्री अंड्यात फक्त अन्न असते, पण नराशी मीलन न झाल्याने जीव तयार झालेला नसतो. तस्मात कोणाच्याही तोंडचे अन्न पळवलेले नसते अथवा जीवही मारलेला नसतो.
गायीच्या बाबतीत प्रत्यक्ष पिल्लू झाल्याशिवाय दूध उत्पन्न होत नाही. त्यामुळे कमीजास्त प्रमाणात तोंडचे काढूनच हे दूध मिळवले जाते.
यातले काहीही वाईट नाही, पण उगीच हे बरे आणि ते वाईट अशी चर्चा होतेय म्हणून प्रतिपादिले.
प्रकाटाआ
.
@ मध, दूध खाताना डायरेक
@ मध, दूध खाताना डायरेक कुणाला मारलं जात नाही. >>
डायरेक म्हणजे काय? इनडायरेक चालतं का?
मायक्रोस्कोपखाली दह्यातले मायक्रो-जीव पाहिल्यावर काही जणांनी दही खाणे सोडल्याचे आठवले. बायदवे, दही चालतं का हो शाकाहारात?
डायरेक म्हणजे काय? इनडायरेक
मला काय चालतं आणि नाही चालत त्याचा काय संबंध इथे. मी फक्त एवढं म्हटलं की मध, दूध खाताना कुठल्या प्राण्याचा जीव जात नाही.
दह्यात कुठला प्राणी नसतो बहुदा. ब्याक्टेरिआ असतात हे माहित आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
बॅक्टेरिया हा मायक्रो जीव
बॅक्टेरिया हा मायक्रो जीव आहे, तुम्ही दही गट्टम करता तेव्हा तुमचे पोट त्याचे मृत्यूस्थान असते.साध्या डोळ्याने दिसत नाही म्हणून त्याचे सजीवत्व नाकारू नका!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
बॅक्टेरिआ सजीव नाही असं कोणी
बॅक्टेरिआ सजीव नाही असं कोणी म्हटलय. प्राणी नाही असं म्हणतोय.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
(अवांतर) ओपन शंका
दह्यातले बॅक्टेरिया (कढी बनवून उकळून मारलेले असल्याखेरीज१) माणसाच्या पोटात गेल्यावर नक्की मरतात का?
नाही म्हणजे, माणसाच्या आतड्यात लक्षावधी गट फ्लोरा कायमस्वरूपी मुक्कामास असतात, इतकेच नव्हे, तर तेथे काही विधायक कार्यही करतात, असे ऐकून होतो, म्हणून शंका आली, इतकेच.
...................................................................
१ केवढे हे क्रौर्य!
@ मला काय चालतं आणि नाही चालत
@ मला काय चालतं आणि नाही चालत त्याचा काय संबंध इथे. >>
प्रश्न वैयक्तिक तुम्हाला नाही हो. जन्रल सगळ्याच शाकाहार्यांना आहे.
@ दह्यात कुठला प्राणी नसतो बहुदा. ब्याक्टेरिआ असतात हे माहित आहे >>
बॅक्टेरिया हे जीवच असतात ना? जर 'जीवा'चा आकार कमी असेल तर त्यांना खाल्ले तर चालते का? म्हणजे अमिबा खाल्यास २ एकक पाप लागते आणी बोकड खाल्यास ३४० एकक वगैरे. रच्याकने, पाप मोजायचे एकक काय? पुर्वी पापाचे रांजण असायचे म्हणतात.
@ मी फक्त एवढं म्हटलं की मध, दूध खाताना कुठल्या प्राण्याचा जीव जात नाही. >>
पोटात गेल्यावर त्याचे काहीही होवो, खातेवेळेस जीव जात नसेल तर त्याला मांसाहारी म्हणायचे नाही. असं कसं असं कसं?
जीवंत अळ्या खाणारे बहाद्दर आहेत भारतात. ते मांसाहारी नाहीत का मग?
असो
मी पूर्वी मांसाहारी होतो. आता स्वेच्छेने शाकाहारी झालो आहे. मात्र मांसाहारी क्रूर आणि शाकाहारी सात्विक अशी मांडणी फारच विनोदी वाटते. गुजरातेत गोध्रानंतर झालेल्या दंगलीत बहुसंख्य शाकाहाऱ्यांनी मनसोक्त हिंसाचार केला होता असे वाटते.
बाकी ज्याला काय खायचे प्यायचे ते खाऊ पिऊ द्यावे असे वाटते.
शंका
ही शंका अन्नबद्दलची नाही.
अन्नाबद्दलच्या भारतीय (किंवा निदान ग्रामीण धार्मिक महाराष्ट्रिय ) समाजमनाबद्दल आहे.
काही ठिकाणी लोक "आता दारु चिकन-मटन सोडलं ब्वा" असं म्हणतात माळ वगैरे घातल्यावर किंवा अजून एखादं स्वतःबद्दलच सकारात्मक स्थित्यंतर
(positive transformation) सांगताना.
आता मुदलात दारु हा इडली , दही वगैरेच्या धर्तीवर आंबवलेला पदार्थ म्हणता यावा. मूळचा विविध धान्य्-फळे वगैरेपासून बनवलेला.
पण त्याला हायफनेट करतात मांसाहारासोबत.
आणि सोडायचच असेल तर मांसाहार का सोडतात ?
शाकाहार किम्वा शाकाहारातलं एखादं variant का सोडत नाहित ?
म्हणजे असं कल्पून पहा :-
"दारु आणि प्रसादाचा शिरा अगदि बंद म्हणजे बंद केला बघा आम्ही म्हाराजाचा वसा घेतल्यापासून"
किंवा
"दारु आणि गुळाची आमटी/पंचामृत/दूध अगदि बंद म्हणजे बंद केला बघा आम्ही म्हाराजाचा वसा घेतल्यापासून "
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
चातुर्मास असताना कांदा लसुणही
चातुर्मास असताना कांदा लसुणही वर्ज्य असते की. झालंच तर जैन आहार आहेच.
का जितके "कडक" नियम तितके थोर्थोर?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
दुसरीकडे जितकी नीssssट तितकी
दुसरीकडे जितकी नीssssट तितकी थोर्थोर हे देखिल आहेच.
------
मिथिल अल्कोहोल एक घोट पिले तर माणूस मरतो. इथिल अल्कोहोल देखिल अपायकारकच आहे, इष्ट आणि रिकमेंडेड अन्न नाही.
-------
मॉडर्न लाइफ मधे फ्रस्तेशन जास्त आहे म्हणून थोडा वेळ चिल होण्याकरिता पिनारे जास्त आहेत. असं खर्या जीवनापासून पळण्यापेक्षा थोडासा, मर्यादेत अपाय न करणारा नशा करून पाहू असं म्हणणारे कमी आहेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
खरंतर शरीराला अपायकारक
खरंतर शरीराला अपायकारक प्रमाणित काहिही तितकेच वाईट
मग ती दारू असो, चहा व/वा अगदी साखर. यात कशातही "वैट्ट" काही नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तुम्हाला मानसिक आजार झाला तर
तुम्हाला मानसिक आजार झाला तर डॉक्टर दारू सोडा म्हणतो, दही राहू द्या म्हणतो.
-----
दारू चढते, दही नाही. दारू चढवून गाडी चालवायची नसते, दही खाऊन चालवली तर चालते.
---------
पदार्थांची तुलना करताना योग्य तो निकष निवडावा. इथे निर्माण प्रक्रिया कोठून आली? परिणाम पहा ना.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हे विनोदीच आहे ---- मला खोकला
हे विनोदीच आहे
----
मला खोकला झाला की वैद्य म्हणतो दही सोडा (दारु चालते)
===
एकदा मला उलट्या झाल्या तर डॉक्टर म्हणाले दूध व फळे बंद करा. (दारू बद्दल काही नाही)
===
माझ्या परिचिताला एकदा ट्रेकला प्रचंड थंडी वाजत होती. ट्रेकसोबत असणार्या फिजिओने उलुशी ब्रँडी दिली, दुध नाही (याचा उपयोग मानसिक का शारीरीक हे इथे गैरलागू)
तर सांगायची गोष्ट काय?
आता योगय निकष कोणता हे ही तुम्हीच ठरवायचे ठरवले आहे तर चालु दे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
छान आहे. पाण्याजागी दारू
छान आहे.
पाण्याजागी दारू प्यायला सांगतो का तुमचा डॉक्टर तुम्हाला? काहीही बोलायला लागले. विषाचा अँटीडोट वीष असते. मग ते तुम्हाला टोचले मंजे डॉक्टरने वीष प्या म्हटले म्हणून सांगत सुटणार का?
-------
अवघड आहे ब्वॉ ऐसीचं. सात्विकतेचं प्रचंडच वावडं दिसतं इथे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अवघड आहे ब्वॉ ऐसीचं.
रॅशनॅलिटीचं वावडं असलं की असे विचार येतात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
या शाकाहार्यांना एक बेशिक
या शाकाहार्यांना एक बेशिक प्रश्न आहे. गेली शतकानुशतके बैल किंवा तत्सम प्राण्यांच्या बळावर शेती करून पिकवलेले धान्य खात खात हे लोक जगले. बैलाला शेतीस जुंपायला म्हणून त्याचे वृषण फोडले जातात, गायीकडून तिचं दूध जबरदस्तीने घेतलं जातं. निव्वळ प्राणी मारून खात नाही म्हणजे त्यांच्यावर उपकार करतो अशी समजूत असेल तर त्यांच्या बिनडोक अॅझम्प्शनला एक सलाम. असले अत्याचार करणं तुमच्या भूतदयेच्या व्याख्येत बसतं का? वर तोंड करून मांसाहार्यांना काही बोलण्याअगोदर तुमच्या शेतीचा हा शोषणाधारित पाया बघा अन मग बोला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
भूतदया
एक डिस्क्लेमर :-
भूतदयेचा मुद्दा मी उपस्थित केलेला नाही. तत्संबंधी चर्चेत मी उतरणार नाही.
(मी प्रो-शाकाहर, प्रो-भूतदया वगैरे बोलतोय असे वाटू शकेल असे वाटल्याने डिस्क्लेमर देत आहे.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
एक डिस्क्लेमर :- भूतदयेचा
स्पष्टीकरण कशाला देतोस? ज्यांनी मुद्दा उपस्थित केलाय त्यांनी उत्तर द्यावं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
(हत्या सोडून) अन्याय करणे हे
(हत्या सोडून) अन्याय करणे हे हत्या करण्यापेक्षा वाईट आहे म्हणणे ...
-----
या प्रकाराला बॅट्यानी वर लावलेली सारी विशेषणे लावा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
म्हणजे "प्राण्यांना फक्त
म्हणजे "प्राण्यांना फक्त मारणार नाही. बाकी हजारो अत्याचार केले तरी चालतील, असं केलं तर ते कमी क्रौर्याचं" या धारणेला ती विशेषणे लावा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मी काय लिहिले आहे ते पुन्हा
मी काय लिहिले आहे ते पुन्हा लिहितो. सारेच अन्न (पाणी, मिनरल्स, सूर्यप्रकाश, हवा सोडून) ऑर्गॅनिक असते. फोटोसिंथेसिस, अनॅरोबिक रीस्पायरेशन सोडले तर जवळजवळ सगळेच सजीव दुसरे सजीब खातात. माणसाला एकतर तर "शुद्ध बॅटीय अदांभिक शाकाहारी" असणे किंवा जिवंत असणे हे दोनच पर्याय आहेत. कारण दांभिकपणा सोडला कि माणूस मरतो. त्याची नैसर्गिक रचना तशी आहे.
---------
भूतदया असणारा माणूस तसा हे त्याने स्वत:ला मारून (मरू देऊन) सिद्ध करायला पाहिजे असं बॅट्योबा म्हणतात. त्यानं (शाकाहारी माणसानं) काहीही खाल्लं कि "दुसरं काही (मंजे मांस)" खाणारे मनुश्य जे काय खातात ते योग्य ठरते असे त्यांचे म्हणणे आहे.
------
तर बॅटमॅन, मांसाहारी सर्व प्रकारचे मांस का खात नाहीत आणि शाकाहारी सर्व प्रकारचे वृक्ष का खात नाहीत हा विषय नाही. त्याचा आणि भूतदयेचा संबंध नाही. प्रशन आहे कि खाद्य पदार्थांची जी रेंज आहे त्यात आपण कुठे थांबतो? जितक्या स्वतःच्या जवळ (आपल्यासारख्या जीवाच्या हत्येच्या जवळ) तितकं क्रौर्य जास्त. शाकाहारी पाडसाचे दूध घेतात, पण गाय आणि पाडस जिवंत राहतात. मांसाहारी दोघांना खातात. सबब, शाकाहारी अधिक (संपूर्न नव्हे) भूतदयावादी ठरतात.
-------
आपल्या जवळची स्पेसिसला अर्थ आहे का? असावा. माणूस मारणे अपराध आहेच, पण पोटचे पोर मारणे अजूनच विकृत मानले जाते. नाते जितके समीप येते तितके चांगले जास्त वागायचे असते. प्राणी वनस्पतींपेक्षा माणसाला जास्त निकट आहेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
माझा अगोदरचा प्रतिसाद पुन्हा
माझा अगोदरचा प्रतिसाद पुन्हा चिकटवतो.
या शाकाहार्यांना एक बेशिक प्रश्न आहे. गेली शतकानुशतके बैल किंवा तत्सम प्राण्यांच्या बळावर शेती करून पिकवलेले धान्य खात खात हे लोक जगले. बैलाला शेतीस जुंपायला म्हणून त्याचे वृषण फोडले जातात, गायीकडून तिचं दूध जबरदस्तीने घेतलं जातं. निव्वळ प्राणी मारून खात नाही म्हणजे त्यांच्यावर उपकार करतो अशी समजूत असेल तर त्यांच्या बिनडोक अॅझम्प्शनला एक सलाम. असले अत्याचार करणं तुमच्या भूतदयेच्या व्याख्येत बसतं का? वर तोंड करून मांसाहार्यांना काही बोलण्याअगोदर तुमच्या शेतीचा हा शोषणाधारित पाया बघा अन मग बोला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
(जो हत्या नाही असा)अन्याय
(जो हत्या नाही असा)अन्याय करणे हे हत्या करण्यापेक्षा अधिक भूतदयावादी आहे.
----------
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
एकदा अत्याचार होताहेत
एकदा अत्याचार होताहेत म्हटल्यावर कमी अन जास्त अशी वर्गवारी करणे हास्यास्पद नाही काय?
या न्यायाने एखाद्या स्त्रीवर वर्षानुवर्षे बलात्कार करणेही तुलनेने भूतदयेचेच उदा. ठरावे, नै? काही झालं तरी तिला ठार जर मारत नसू तर दोष काये, नै का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मी काय कमी भूतदया आणि काय
मी काय कमी भूतदया आणि काय जास्त भूतदया याबद्दल बोलत आहे. (१००% भूतदया बद्दल लिहून झालं आहे.)
--------
शाकाहारात सुस्पष्ट जास्त भूतदया आहे. संपूर्ण नसेल पण मांसाहारापेक्षा जास्त आहे.
--------
ज्यांना आपण मृत म्हणतो त्या सबअॅटोमिक पार्टिकल्सना देखिल एका प्रतलावर जाणिव (शब्द चूक आहे, पण सजीवत्वसूचक गुणधर्म असे म्हणायचे आहे.), इ असू शकते, म्हणून अगदी वनस्पतीदेखिल शुद्ध शाकाहारी नसाव्यात. शिवाय मानवाची पारंपारिक सजीवतेची भावना ही वनस्पतींशी निगडीत नाही. त्यांना माहित नव्हतं.
---------
बलात्कारबाबतीत म्हणाल तर यस्स. तसं आहे. कायद्यातील बलात्कार व मृत्यू यांच्या शिक्षेसाठी जी प्रावधाने आहेत त्यांतील फरक पाहिला तर काय अधिक वाइट हे सहज कळते. (आजचे कोर्ट जास्त पुरुषप्रधान आहे आणि शिक्षा उलट्या प्रमाणात व्हायला हव्या होत्या म्हणालात तर मग कशालाच अर्थ उरणार नाही. किमान आपल्या चर्चेला नाही.)शोषण आणि हत्या यांपैकी हत्या वाईट्च.
--------
बाकी दूध काढल्याने नि नांगराला जुंपल्याने हत्येपेक्षा वाईट अन्याय होतो हे रोचक वाटले.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
शाकाहाराची व्याख्याच
शाकाहाराची व्याख्याच "प्राण्यांना न खाणे" अशी असल्यामुळे त्यात प्राण्यांवर भूतदया येणारच. पण मग फक्त प्राणीगटावरच भूतदया वाटण्याला काही अर्थ नाही.
त्यामुळे ओव्हरऑल भूतदयेबद्दल न बोलता फक्त प्राण्यांबद्दलच बोलावे.
अत्याचारांची वर्गवारी लावली तर बैलाला नपुंसक बनवणे हाही एक मोठाच अपराध आहे. कारण एक बैल नपुंसक बनला तर त्या जातीची पुढील पिढी येण्याची शक्यता तितकी कमी होते. ही अप्रत्यक्ष हत्याच आहे.
एखाद्या प्राण्याला ठार मारणे आणि तो प्राणी पुनरुत्पादन करूच शकणार नाही अशी तजवीज करणे या दोन्हीत सारखेच क्रौर्य आहे. हे लक्षात न येणे रोचक वाटले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आयला, या हिशेबाने सिगारेटी
आयला, या हिशेबाने सिगारेटी पाजवून, लोकांचा स्पर्म काउंट कमी करून, आय टी सी देखिल थोड्या फार डीग्रीने भयंकर क्रूर असे काही करत आहे हे लक्षातच आले नव्हते.
----------
जीव वाचवण्यासाठी कॅंसर झालेला गर्भाशय काढून टाकतात. पण त्याने ती स्त्री प्रजोत्पादन करू शकणार नाही असे होते. तर अशा ऑपरेशनचे क्रौर्य आणि प्रत्यक्ष स्त्रीला मारण्याचे क्रौर्य सारखेच म्हणायचे तुमच्या हिशेबाने!
----------
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
जीव वाचवण्यासाठी कॅंसर झालेला
त्या स्त्रीला कुठल्यातरी कामाला जुंपायचे म्हणून गर्भाशय काढून टाकत असतील तर ही तुलना ठीक होती. पण तसे नाही हे माहिती असूनही तुम्ही तुमचाच मुद्दा रेटणार हे माहितीये हो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
स्त्रीला उपयोजन मूल्य नाही
स्त्रीला उपयोजन मूल्य नाही असं नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
वा! आता कसं!
वा! आता कसं!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
जीव वाचवण्यासाठी कॅंसर झालेला
किती निरर्थक आणि विरोधाभासी वाक्य आहे हे. पहिल्या वाक्यात तुम्हीच म्हणताय ना "जिव वाचवण्यासाठी" आणि दुसर्या वाक्यात क्रौर्य - क्रौर्य ओरडता आहात. अता तिची गर्भ पिशवी काढली नाही आणि ती मेली तर ती स्त्री ऐनीवेज काय घंटा 'स्त्री प्रजोत्पादन' करणारे का??? काहीही उदाहरणं देतात ब्वा!
शाकाहारी इगो
हल्ली एक शाकाहारी इगो सगळीकडे आलाय असे वाटते आहे. मागे काही वर्षांपूर्वी एका जैन आणि एका मारवाडी विभूतींबरोबर काही दिवस राहणे आले, म्हणजे बघा अनुक्रमे ६ आणि २ वर्ष. हे लोक पराकोटीचा शाकाहारीपणा जोपासतात. येता जाता ह्या कबुतराला दाणे दे, त्या मांजराला कुरवाळ. घरात एक चिलट मारायचे नाही वगैरे वगैरे. पण धंदा करताना समोरचा कितीही बरोबर असेल तरी आपली बाजू लावून धरायची. मग तो समोरचा मेला तरी चालेल. त्याचे कितीही नुकसान होवून त्याला मानसिक त्रास झाला तरी चालेल. बर आपल्यामुळे बाकीच्यांना त्रास होतो हे पण मान्य नाही. मग शाकाहारी असल्याचा काय फायदा?
अगदी सहमत. हा दुटप्पीपणा खरेच
अगदी सहमत. हा दुटप्पीपणा खरेच रोचक आहे.
शाकाहार केला तर बाकी कुठलेही पाप माफ असल्याच्या थाटात हे दुटप्पी ***चे लोक जेव्हा बोलतात तेव्हा यांचे अहिंसक पद्धतीने हाल करावेत असे सात्विक विचार मनात येतात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आमच्या समोरच्यांनी बरं का
आमच्या समोरच्यांनी बरं का उंदीर पिंजर्यात पकडले अन मारायचे नाहीत म्हणून कॉलनीत खाली नेऊन सोडले. आईची जय!!!
घरात मारले तर डिस इन्फेक्टंट
घरात मारले तर डिस इन्फेक्टंट इ. चा त्रास नको म्हणून त्यांची कृती योग्यच आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मारायचे ना सोडून कशाला दिले?
मारायचे ना सोडून कशाला दिले?
आता ते मला काय माहिती का
आता ते मला काय माहिती का सोडून दिले ते?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अन मारणार तरी कसे म्हणा?
अन मारणार तरी कसे म्हणा? डोक्यात दगड घालायचा म्हटलं तरी ते पळणारच
उंदराचा सापळा कधी पाहिला नैत
उंदराचा सापळा कधी पाहिला नैत की काय?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ओह येस विषारी गोळ्या घालून
ओह येस विषारी गोळ्या घालून मारता आलं असतं.
हिम्सक
अशा कमालीच्या हिंसक वृत्तीस मंगळ कारणीभूत असतो (उच्चीचा मंगळ का साधावाला मंगळ ते ठौक नै.)
झालच तर रवि वगैरे उग्र मंडळींचीही सटकलेली असेल तर ते व्यक्तीला असे हिंसक बनवू शकतात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हाहाहा स्वस्थानीचा मंगळ
हाहाहा स्वस्थानीचा मंगळ
एका प्रकारे चांगले वागायचे
एका प्रकारे चांगले वागायचे असे ठरवलेल्या व्यक्तिने सर्व प्रकारे चांगले वर्तन केले नाही म्हणून त्या एक प्रकारच्या चांगुलपणाला अर्थ नाही असं काहीसं आपलं म्हणणं दिसतंय. मी भरतनाट्यम उत्तम केले आणि भांगडा मला जमला नाही किंवा करत नाही किंवा आवडत नाही किंवा तिरस्कार आहे म्हणून माझे भरतनाट्यम येणे निरर्थक कसे? शाकाहार माझ्या मते चांगला आहे, म्हणून मी तो पाळतो, पण म्हणून मी इतर सगळेच सद्गुण पाळावेत किंवा नाही पाळले तर मी जे चांगले गुण पाळतो ते ही चांगले नाहीत याला काय अर्थ?
-------
तुम्हीच म्हणत आहात ना, कि एकिकडे शाकाहार चांगला म्हणतात नि दुसरीकडे मानसिक ताप देतात. मंजे शाकाहार चांगले मूल्य आहे हे तुम्हाला अंतर्मनात मान्य दिसते.
-----------
लोक शाकाहार कसा पाळतात हा भिन्न मुद्दा आहे. मुळात शाकाहारच जास्त भूतदयाबादी नाही हा मुद्दा विचित्र आहे.
---------
मांजरा, कबुतरांना अवश्य प्रेम करावे. चिकन खाण्यापेक्षा कबुतराला दाणे घालणे चांगले.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पुन्हा पेष्ट
शाकाहारी लोकही उंदीर, साप, डास, वाघ/बिबट्या इ. कैक प्राण्यांची हत्या करतात. बैल नकोसा झाला तर त्याला मारायला कसायाकडेही देतात.
त्यामुळे ठार मारणे हाच सर्वोच्च गुन्हा मानला तर तेही हे गुन्हे करतातच. मग निव्वळ मारलेले प्राणी खातात म्हणून मांसाहार्यांची भूतदया कमी अन शाकाहार्यांची जास्त कशी ठरते?
त्यामुळे तुमचा बिनबुडाचा बायस पुन्हा एकदा अधोरेखित झालेलाच आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नविनच ऐकलं. शाकाहारी लोक असं
नविनच ऐकलं. शाकाहारी लोक असं करतात नव्हे, त्यांना तसं करावं लागतं. आणि शाकाहारी लोक बिबटे, इ बरं. लोकं काही सापं, उंदरं, बिबटे शोधत फिरत नाहीत मारायला. मारले तर खात नाहीत.
--------
"तुमच्या पाहण्यातले शाकाहारी" कसे वागतात याबद्दल तुमचा बायस दिसतोय. त्यांना नक्कीच उंदराचे नि बिबट्याचे रक्त पाहिल्याशिवाय झोप येत नसणार. खायचे नाही पण बाकी सगळे पंगे घ्यायचे असे शाकाहारी तुम्हाला भेटलेले दिसतात.
मारायला जगात हजारो प्राणी आहेत. हे लोक तिथे जाऊन मारत बसतात का? त्यांच्याकडून होणार्या प्राणीहत्यांतील प्रेरणा भूतदया नसणे ही असते का? नसते? मूळात उंदीर मारणे, मारावे लागणे दुर्दैवी, पण ... असा विचार ते करतात. मांसाहारी चिकनच्या बाबतीत अपाथेटिक असतात. म्हणून कमी भूतदयावादी.
---------
क्षणभर "अन्न म्हणून प्राणी न खाणे, त्यांची अन्नासाठी हत्या न करणे, अन्यथाही हत्या टाळणे" असा जन्विन विचारही मांसाहार्यांपेक्षा समान वा कमी भूतदयावादी आणि मूर्खपणाचा आहे हे तुमच्या बोलण्यावरून प्रतीत होत आहे. त्यात काय राम नाय.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
शाकाहारी लोक असं करतात नव्हे,
साफ असहमत. जनावर मोठे असले तर ट्रँक्विलायझर मारून बेशुद्ध करता येते किंवा मोठा जमाव घेऊन हाकलता येते. पण तसे न करता ते मारतात. म्हणजे अपरिहार्य नसूनही जीवहत्या करायची ती करायची अन वर मांसाहारी लोकांना फक्त ते खाण्यासाठी जनावरे मारतात म्हणून वर तोंड घेऊन प्रवचनही करायचे. रोचक मामला आहे एकूण.
मुद्दा असा आहे- की या ना त्या कारणाने जीवहत्या करूनच्या करून शाकाहार्यांना मॉरल कूल प्वाइंट का द्यावेत? की कृती महत्त्वाची नसून हेतू महत्त्वाचा आहे? जर कृती महत्त्वाची नसेल तर आजवर कळतेपणी एकही जीव न मारलेल्या शाकाहार्यानेच मांसाहार्यांना बोलावं. मी त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार आहे. बाकीच्यांचं नाही.
उपकारच आहेत की नै त्यांचे असा विचार करतात म्हणून? या विचारांचा त्या उंदरास काही फायदा नै झाला तर या वांझोट्या विचारास तिथेच गाडणे उत्तम. भूतदयेचा फुकट टाहो फोडू नये.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
थोडा असहमत
बरेचदा असतो (हे मी पाहिलेले आहे). त्याकारणाने शाकाहारी व्यक्ति जास्त दयाळू असू शकते. >> हे तुम्ही म्हणालात म्हणून उदाहरण दिले. हाच अनुभव गुज्जू लोकांचा पण आहे. म्हणजे दयाळू वगैरे दाखवणे आणि खरोखर दयाळू असणे ह्यात फरक आहे आणि तो मला नाही वाटत जेवणावर अवलंबून आहे. एखाद्याला वाटले तर तो चांगला कसाही दयाळू पण दाखवू शकतो असे माझे तरी मत आहे.
दुसरा मुद्दा असा आहे की शाकाहारी, डिस्क्लेमर मी मास, मच्छी खात नाही, लोक बाकीच्यांना तुच्छ लेखातात आणि मला हे अजब वाटते. मागे रामटेकेह्यांच्या ब्लॉग वर वाचले होते की बैलाच्या गोट्या काढल्या जातात. आता हल्ली ट्राकटर आल्याने बैकांची गरज कमी झाली असावी. पण तरीही बरेच लोक अजूनही वापारातच असतील की. पण तो प्रकार म्हणजे बैलाला नपुसंक करणे आणि त्याला शेतात जुंपणे झाले. आता हे मलातरी माहिती नव्हते. आणि गेली कित्येक शतके चालू आहे. मग काय बोडक्याचा शाकाहारी भूतदया प्रकार हो.
शाकाहारी लोकही उंदीर, साप,
शाकाहारी लोकही उंदीर, साप, डास, वाघ/बिबट्या इ. कैक प्राण्यांची हत्या करतात. बैल नकोसा झाला तर त्याला मारायला कसायाकडेही देतात.
त्यामुळे ठार मारणे हाच सर्वोच्च गुन्हा मानला तर तेही हे गुन्हे करतातच. मग निव्वळ मारलेले प्राणी खातात म्हणून मांसाहार्यांची भूतदया कमी कशी ठरते?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
त्याहूनही भयानक म्हणजे
त्याहूनही भयानक म्हणजे म्हातारे ऊंट जुहूला सोडून देतात
आता म्हणा एकदा अन निनो आला कि
आता म्हणा एकदा अन निनो आला कि समिंदरात जी काय उलथापालथ व्हेते ती बघीटली कि आमचा मावसाहार कूठून झाला क्रूर. करोडो प्रानी फुगटच मरत्यात. हामी कमित कमी खाताव तरी.
--------
बाकीचे प्राणी शिकार करतात आणि मनुष्य मांस खातो म्हणून माणूस क्रूर तर प्राणी सुद्धा क्रूर...मग त्याच हिशेबाने ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स सुद्धा सुधारू. शेवटी दोघेही सारखेच ना!! तोच हिशेब लावू.
---------
बाय द वे, बैलाच्या नव्या पिढ्या काय (त्यांना पुनरुत्पादनाचा चान्स न देता वॄषण ठेचले तर) दरपिढी नव्याने उत्क्रांत होतात का? आणि ही वेदना त्यांना सतत असते का? मग वेसण देखिल सतत छळते का? माणसाला चष्मा सतत टोचतो का?
--------
मारून नष्ट करणे वेगळे आणि काही काळ त्रास देणे वेगळे. ब्रिटीशांनी, युरोपीयांनी आफ्रिकन पिग्मी माणसांना आणि अमेरिकन रेड इंडीयनना संपवले. भारतीयांना त्रास दिला. हू इज बेटर ऑफ?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बाकी तर जाऊदेच. शाकाहारी
बाकी तर जाऊदेच. शाकाहारी लोकही प्राणी मारतातच की. उंदीर काय, साप काय, वाघबिबटे काय. किंवा जनावरे कसायाला विकतातसुद्धा. म्हणजे ही हत्याच झाली.
प्राणी मारलेले चालतं, त्यांचं मांस तेवढं खाण्या न खाण्याने फरक काय पडतो ते सांगा बघू मग.
अन वेसण-वृषण ही तुलना करणे तर प्रचंड हास्यास्पद आहे, पण ते एक जाऊदे. त्याचं नंतर पाहू.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शाकाहारी लोक जनावरे कसायाला
आमुचा प्रणाम घ्यावा!!! राम राम देखिल घ्यावा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
भूतक्रौर्यवाद्यांना
भूतक्रौर्यवाद्यांना भूतदयावादी म्हणत, न जाणो कोणत्या लोकांबद्दल निरीक्षण नोंदवले आहे देव जाणो. मंजे, एकदा भूतदयावादी हेच मांसाहारी आहेत हे गृहित धरले कि संपले.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तुमचेच लॉजिक तुम्हांला लावले
तुमचेच लॉजिक तुम्हांला लावले की कशी रिअॅक्शन येते हे आता कळले असेल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
.
आंतरजालावरुन साभार. फाईनलीचोप्ड ब्लोगवरुन.
अरसिकेषु कवित्वनिवेदनं शिरसि
अरसिकेषु कवित्वनिवेदनं
शिरसि मा लिख मा लिख मा लिख!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पुन्हा असहमत
मारून नष्ट करणे वेगळे आणि काही काळ त्रास देणे वेगळे. ब्रिटीशांनी, युरोपीयांनी आफ्रिकन पिग्मी माणसांना आणि अमेरिकन रेड इंडीयनना संपवले. भारतीयांना त्रास दिला. हू इज बेटर ऑफ? >> अहो तसे बघायला गेले तर मग भारतीय आणि जाती व्यावास्थेपायी काय काय लोकांनी सहन केले. शाकाहारी अन्न सेवन करणे चांगले आणि त्यामुळे जास्त भूतदया येते असा मुद्दा मलातरी तुमच्या चर्चा प्रस्तावातून वाटला. बाकी माणूस कुठेही गेला तरी कोणानाकोणावर सतत अत्याचार करताच असतो. कितीही आव आणला तरी स्वार्थ कोणालाही चुकला नाही. त्यामुळे हू इज बेटर ऑफ? हा प्रश्न इथे थोडा अप्रस्तुत आहे असे मला तरी वाटते.
शाकाहारी अन्नात
शाकाहारी अन्नात भूतदयावादासाठी लागणारी संप्रेरके उत्सर्जित करावयाची जास्त क्षमता आहे काय याबद्दल मी काहीही निरीक्षण मांडलेले नाही. उगाच गैरसमज नको.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
http://www.aisiakshare.com/node/3267
http://www.aisiakshare.com/node/3267
.
.
.
http://www.misalpav.com/node/1740
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
गुजराती
सलील यांच्या प्रतिसादावरून आठवलं. मद्रासला असताना सुटीकरता घरी परतणे म्हणजे रेल्वेप्रवास. सुटीच्या तारखा ठरलेल्या असल्याने नेहमीच अगोदर रिझर्व्हेशन करून खिडकीची जागा मिळवने तसे सोपे असायचे. या प्रवासांत गुजराती लोक आजूबाजूला यावेत असं मला नेहमी वाटायचं. तिरुपतीला जाणारे चिक्कार गुजराती असल्याने बर्याच वेळेला तसं व्हायचंही. पाच-सहाचं कुटुंब ते २०-२५ लोकांचा गट असे अनेक प्रकार या प्रवासात भेटायचे. या गटांमध्ये दोन तीन तरी अजस्त्र देह नाहीतर वयस्कर आजी-आजोबा असल्याने खालची अन म्हणून खिडकीची बर्थ यांना हवी असायाची. तसंही मला सर्वात वरची बर्थच हवी असायची, हवं तेव्हा वर जाऊन बसायचं लोकांची कटकट नाही. तर, आमची बर्थ खालची असल्याने आम्ही या गुज्जु लोकांना एकदम जवळचे वाटायचो. मग प्रेमाने आम्ही आमची खालची सीट बार्टर करून वरची बर्थ घ्यायचो, म्हणजे दिवसा खिडकी अन रात्री वरची बर्थ. सोने पे सुहागा. या बदल्यात गुज्जु लोकांच्या बरोबर आणलेल्या खाकरे, ठेपले, पुरी वगैरे अमर्याद खाण्यामध्ये आम्हाला न मागता वाटा मिळायचा. आमच्याप्रती एव्हढे उदार झालेले हे गुजराती मात्र येणार्या फेरीवाल्यांशी इतकी हुज्जत घालायचे की विचारू नका! भारतीय रेल्वेच्या प्रवासांतील गमतीजमतींना पर्याय नाही!
-Nile
आत्तपर्यंतचा स्कोर नेहमीचे
आत्तपर्यंतचा स्कोर
नेहमीचे यशस्वी कलाकारः
बॅटमॅन - ३०( का ३१? मोजायचा कंटाळा आला) प्रतिसाद
अजो - १८
मनोबा - १६
थोडे चवीला
गवि - ९
अपर्णा - ७
सलील - ४
मग बाकी प्रतिसाद - उरलेली मंडळी
लगे रहो!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
लोकांच्या उत्साहावर दह्यातले
लोकांच्या उत्साहावर दह्यातले बॅक्टेरिआ एकेए विरजण टाकण्याचा निषेध!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
धाग्याचा विषय मानव हा
धाग्याचा विषय मानव हा शाकाहारी आहे कि मांसाहारी आहे, जैविक निकषांवर हा नाही.
धाग्याचा विषय मानवाला जैविक गरजा भागवण्यासाठी शाकाहार जास्त सुयोग्य आहे कि मांसाहार हा नाही.
धाग्याचा विषय सुबुद्ध, प्रगत, विवेकी, विचारशील, सुसंस्कृत, (काय माणुसकी हाय का नाय असे कधी म्हणणारा) शाकाहारी आणि मांसाहारी मनुष्य यांत कोण अधिक भूतदयावादी आहे हा आहे.
------------
शुद्ध जैविक प्रेरणा पाहिली तर माणूस कपडे घालतो का नाही याने फरक न पडावा. कपडे न घालणारा पुरुष वा स्त्री जैविक निकषांवर तितकेच सुयोग्य वर्तन करते, कदाचित जास्त, जितके घालणारा. शिवाय एखाद्याने कपडे काढले तर असे काय दिसते ज्याचा इतका बाऊ करावा? काय दिसणार हे सर्वसाधारणपणे माहितच असते. मग कपडे न घालणे, कमी घालणे, सूचक घालणे, उत्तान घालणे, दिखावा करणे हे कमी सुसंस्कृत का मानतात? (मी फक्त भारताबद्दल बोलतो. आईसलँडमधे लोक राष्ट्रपतींकडून पदक घ्यायला नागडे जात असतील तर कल्पना नाही.) तर त्या वर्तना निगडीत अनेक भाव आहेत. वाईट हा आरोप कपड्यांवर नसून त्यामागील त्या भावांवर्/तत्त्वज्ञांनावर असतो.
-------------
मानवतेचा सजीवतेचा आदर हा एक हिस्सा आहे. मानवाने ऑर्गॅनिक मॅतर खायचे नाही म्हटले तर मरणे हाच एक पर्याय उरतो. मग सजीवतेच्या स्पेक्ट्रममधले जे उच्चजीव आहेत ते जास्त चविष्ठ आहेत अस्सोनही वनस्पती खाणे हे जास्त भूतदयावादी ठरते. जो प्राणी मनुष्यतेच्या जितका जास्त जवळ तितकी ती हत्या भीषण वाटते. माणसे मारणारी माणसे क्रूर असतातच, पण त्यातही स्वतःच्या बापाला मारनारी माणसे जास्त लॉजिकल म्हणवली जात नाहीत, विकृत म्हणवली जातात, मारणाराला इस्टेट लगेच मिळत असली तरी असेच म्हणतात. काय खायचे यात माणसाला क्रूर असण्याशिवाय पर्याय नाही, पण आपल्या किती निकटचा सजीव संपवायचा याचा सुसंस्कृत चॉइस मानवाची भूतदया दर्शवतोच दर्शवतो.
----------
पर्यायांच्या उपलब्धतेप्रमाणे आणि भारतीय संस्कृतीची प्रेरणा पाहिली तर, दिवसरात्र रेनडिअर खाणारा, त्याचेच दूध वापरणारा, बर्फाळ प्रदेशात राहणार दक्षिण न्यूझिलँडचा वासी भारतीय बटर चिकन खाणारापेक्षा जास्त भूतदयावादी ठरतो. प्रश्न किती मांस खाल्ले हा नाही, एकूण पार्श्वभूमीवर तुम्ही कसे वागत आहात हा आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
पुन्हा ये रे माझ्या मागल्या. शाकाहारीच्या अगोदर इतकी विशेषणे, मांसाहारींनी काय घोडं मारलंय (एक्स्क्यूज द पन) ????
तर -
म्हणजे जैविकदृष्ट्या खरे तर यात काही अर्थ नाही, परंतु (निव्वळ आर्बिट्ररी) अशा सांस्कृतिक मान्यतेनुसार मांसाहारी हरामखोर ठरतात हे का बरे? थोडक्यात एकदा ठरवायचेच आहे हरामखोर तर किती मार्गांनी ठरवता येईल हे दिसते आहे. हीच ती गोबेल्स नीती. धादांत असत्यही अनेकवेळा आरडाओरडा करून सांगितले की लोकांना सत्य वाटू लागते.
कॅनिबलिझम आणि मांसाहार यांची लिंक लावायची तर शाकाहार आणि कुजलेल्या वनस्पती खाणे यांची लावा. एकूण काय, स्वतःला लॉजिकल अर्ग्युमेंट करवत नाय तर 'असे असे म्हटले जाते ते चूक कसे' छाप नॉन्सेन्सिकल कनेक्शन्स जोडून आपला मुद्दा अधोरेखित करू पाहण्याची ही केविलवाणी युक्ती आहे.
आणि व्हॉट इज सुसंस्कृत चॉईस? इज देअर समथिंग कॉल्ड असंस्कृत चॉईस? अन हे ठरवणारे तुम्ही कोण (नेहमीची विशेषणे)? त्याला आधार काय? तुमच्या लाडक्या हिंदू संस्कृतीत एके काळी किती मांस चापत होते लोक याची तुम्हांला कल्पना नाही म्हणून या बाता चालल्या आहेत.
तुमची भूतदया फक्त खाण्यापुरती मर्यादित आहे. शाकाहार्यांनी प्राणी मारले तरी चालतं, कसायाला गायी विकल्या तरी चालतं, प्राण्यांवर अजूनही अत्याचार केले तर चालतं, पण फक्त मांस खातात म्हणून मांसाहारी कमी भूतदयावादी!!!! इतके रोचक लॉजिक आजवर पाहिले नाही. हे म्हणजे एखाद्या माणसाला ठार मारलं तरी चालेल पण त्याच्यापासून आर्थिक फायदा घेणे नको म्हटल्यापैकी आहे. तथाकथित मॉरल सुपीरिऑरिटीचा बिनबुडाचा अहंगंड कसा असतो ते दाखवून दिल्याबद्दल अनेक आभार.
तुमचा प्रॉब्लेम हा आहे की ऑल सेड & डन, तुम्हांला कबूलच करवत नाही की जगात हजारो वर्षे (यात भारतही आला- आणि हो तुमचे उदगीरही आले) मांसाहार होतो आहे. अख्ख्या भारतातही प्युअर व्हेज जाती किती आहेत हिंदूंत तेवढे बघा अन मग बोला. विदा नाही आणि नुसतेच अंदाधुंद निष्कर्ष काढणे सुरू आहे. पण तुमच्याकडून ती अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे कारण तुम्हांला जे प्रूव्ह करायचे आहे ते तुम्ही सत्य म्हणून अगोदरच मानून टाकले आहे. शिवाञ स्वतः बायस्ड आहोत असे एकदा कबूल केले की पायजे ती मुक्ताफळे कशीही उधळायचे लायसन्स मिळतेच, नाही का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
माझ्यामते तर जगातले सर्व
माझ्यामते तर जगातले सर्व "खाण्यासाठी" मारणारे प्राणी अत्यंत प्रामाणिक आणि जस्टिफायेबल आहेत.
दिवाणखान्यात मुंडके टांगणे, शवाच्या छातीवर पाय ठेवून फोटो काढणे, कोंबड्यांची झुंज लावून ती पाहात टाळ्या पिटणे, बैलांच्या तोंडाला फेस येऊन बेशुद्ध पडेपर्यंत शर्यती लावून गंमत पाहणे, फ्लॉवरपॉटमधे डोळ्यांच्या षोकाखातर फूल तोडून त्याचे शव खोचणे, रोपाची छाटणी करकरुन कायमच खुजे ठेवण्याची "कला", डौलदार दिसावा म्हणून कुत्र्याची शेपटी तोडणे, बैलाने शांत रहावे म्हणून त्याचे वृषण ठेचणे, नागाचे दात पाडून त्याला दूध पाजून ठार मारणे, पोपटांना पंख कापून उडता येणार नाही असे बनवणे आणि शोभेला कोंडून ठेवणे..
यापेक्षा खाण्यासाठी प्राणी / वनस्पती मारणे हा हेतू जास्त शुद्ध प्रामाणिक आणि रास्त वाटतो. मारताना वेदना कमीतकमी वेळ होतील अश्या रितीने मारणे हा विचार नक्कीच वाढायला हवाय. यातही दांभिकपणा नसून अपरिहार्य गोष्टीतला कटु भाग कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न आहे.
अगदी अगदी. प्रचंड
अगदी अगदी. प्रचंड मार्मिक.
अरुणजोशींना शिकार केलेली चालते, प्राण्यावर अत्याचार केलेले चालतात, काय पाहिजे ते चालते. फक्त मारलेल्या प्राण्याचे मांस खातो म्हटले तर भूतदया बुडते. मूर्खपणा आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शंका
"शाकाहार लै भारी आहे " असा अजोंचा दावा असल्याचे क्षणभर मानू.
अरुणजोशींना शिकार केलेली चालते, प्राण्यावर अत्याचार केलेले चालतात, काय पाहिजे ते चालते. फक्त मारलेल्या प्राण्याचे मांस खातो म्हटले तर भूतदया बुडते. मूर्खपणा आहे.
पण शाकाहार करुन चांगली भरपूर शिकार मनोरंजनासाठी करावी, प्राण्यांवर अत्याचार करावेत; असे अजो कुठे म्हणतात ते समजले नाही.
i am trying to figure out the corelation
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
पण शाकाहार करुन चांगली भरपूर
मी तो मुद्दा इतक्यासाठीच अधोरेखित केला की अजोंना मांसाहारावर आक्षेप आहे कारण त्यात प्राणी जिवानिशी मरतात.
मग त्यावर प्रश्न होता की प्राणी जिवानिशी मरतात असे अन्य कोर्स ऑफ अॅक्शन देखील आहेत जे शाकाहारी लोकही नेहमी अवलंबतात. फक्त प्राणी मारल्यावर खात नाहीत इतकेच.
मग जर प्राणी मरणे हा फोकस असेल तर ती बाब दोन्हीकडे कॉमन आहे. मग भूतदया कमीजास्त कशी असा प्रश्न होता. प्राणी नुस्ताच मारणे अन त्याला मारून खाणे या दोहोंत भूतदयेत काय फरक पडतो तेवढे मज पामरास कृपा करून सांगावे. या दोहोंपैकी अजोंचा मारून खाण्यावर आक्षेप आहे, पण त्याच बरोबरीने नुस्त्या मारण्यावर आक्षेप नाही. सबब नक्की आक्षेप कशावर आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न आहे इतकेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आरे म्हणे हे सगळं शाकाहारी
आरे म्हणे हे सगळं शाकाहारी लोक करतात. काय संबंध? बिबटे मारणारे लोक शाकाहारी असतात म्हणे. संबंध आहे का? किती शिकारी शाकाहारी असतात?
वॄषण ठेचणारे शाकाहारी? काय संबंध?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हे सगळं करणारे लोक शाकाहारीही
हे सगळं करणारे लोक शाकाहारीही असतात.
घरात निघालेला साप मारणारे, उंदीर मारणारे शाकाहारी असतात. तुम्हांला शाकाहारी लोक प्राण्यांचा जीव घेतात हे सत्य बघवत नाही.
शाकाहारी शेतकरी काही वेळेस का होईना कसायाला जनावरे विकतात. ही हत्याच आहे. रक्त स्वतःच्या हातांना लागले नाय म्हणून काय झालं? स्वतः खून नै केला पण सुपारी दिलीच की. आणि म्हणे मी निर्दोष
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
माझ्यामते तर जगातले सर्व
मनुष्य सोडून सर्व - विधान पर्फेक्ट
असे करणारे लोक शाकाहारी असतात आणि शाकाहारीच असतात हा जावईशोध आहे. मांसाहारी कसे वागतात ते शाकाहारी वागत आहेत म्हणून मग शाकाहार चूक आहे म्हणण्यात काय हशील?
बाय द वे, प्रतिसादातील वैज्यानिक जोक बाजूला असू देत (उद्या गवि पोपटाने तोडून आणलेल्या पेरूला शव म्हणतील), हे कशावरून की बैलाचे वृषण ठेचणारे शाकाहारी असतात? आता महाराष्ट्रात जास्तीत जास्त शेतकरी मराठा असावेत. आणि जास्त्तीत जास्त मराठे शाकाहारी नसतात. जी कृती मांसाहारी करतात म्हणून साइट करता येईल ती शाकाहार्यांचे नावे खपवायची मंजे काय?
हेच्च केव्हाचा म्हणतोय. जैविक प्रेरणा वा उपलब्ध अन्न यामधे प्राणी खाणे हेच ऑप्शन उरले असेल तर खा ना. पण तसं आहे का? लोक भूतदया काँप्रो करून मांस खातात. म्हणून मांसाहारी भूतक्रूर आहेत.
-----
समजा तुमच्या मित्राचा, किंवा कोणाचा हात किंवा टांग तुटली तर शुद्ध, प्रामाणिक आणि रास्तपणे तुम्ही त्याच्यासमोर ती खायला हवी. चविष्ट अन्न वाया घालवणे वाइट असते. मग खाल का? का फरक करता नातेवाईकाच्या मांसात आणि प्राण्याच्या मांसात?
--------
आपली चव पुरवण्यात काही वाईट नाही, पण जो मनुष्य चव पुरवणे आणि दया करने यांत दया करणे निवडतो तो श्रेष्ठ मनुष्य.
--------
रिपिट -माणसाला जिवित राहण्यासाठी जैविक पदार्थच खावे लागतात.
रिपिट - घाण वनस्पती न खाण्यात "दया" या अंगाचा संबंध येत नाही.
--------
भारतीय संस्क्रुती (लोक काहीही खाओ) शाकाहार श्रेष्ठ मानते. या बाबतीत आपली संस्कृती अन्य देशांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याचे व्यवहार्य तोटे आहेत, पण ते असो.
आणि मेल्याचा क्षणिक त्रास आणि वृषण फुटण्याचा क्षणिक त्रास याचीच तुलना करा ना.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
असे करणारे लोक शाकाहारी असतात
असे करणारे लोक शाकाहारीही असतात हे तुम्हांला पटत नाही.
कोणी कधी काय खावे हे डिक्तेट करून त्यांना कूर/दयाळू ठरवण्याचा तुम्हांला हक्क नाही.
पुन्हा तोच वायझेडपणा. तुमच्या समोर मानवी दुधाचा पदार्थ आला तर तुम्ही तो त्या स्त्रीसमोर खायला हवा. पोषक दूध वाया घालवणे वाईट असते. मग प्याल का? का फरक करता गाईच्या अन कुणा स्त्रीच्या दुधात?
हे बोलण्याचा तुम्हांला अधिकार नाही. प्राण्यांवरील दयेपोटी वनस्पतींचा जीव घेणारा माणूस श्रेष्ठ नव्हे तर तेवढाच कनिष्ठ आहे.
आता तर मस्तच सापडलात. लोक काहीही खाओ पण भारतीय संस्कृती शाकाहार श्रेष्ठ मानते असा दावा आहे ना? भारतीय संस्कृती श्रेष्ठ मानते याचाच अर्थ धार्मिक मान्यतेनुसार शाकाहार श्रेष्ठ असाच घेतला पाहिजे. अन धार्मिक मान्यता म्हणजे धर्मग्रंथ. अन धर्मग्रंथ म्हणजे वेद, पुराणे, रामायण, महाभारत. बरोबर ना?
हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा....
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅट्योबा, बहुतांश
बॅट्योबा, बहुतांश ऐसीकरांप्रमाणे "भारतीय संस्कृती" या शब्दासमोर एखादे चांगले विशेषण घालते तर माझ्या अंगावर पाल पडल्यासारखे मला होत नाही. उगाच वेद, यूं त्याँ करू नगंस.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मग अगोदर 'भारतीय संस्कृती'
मग अगोदर 'भारतीय संस्कृती' शाकाहार श्रेष्ठ मानते म्हणजे नक्की कोण श्रेष्ठ मानते ते सांगा की. भारतीय संस्कृतीनुसार अमुक गोष्ट अशी आहे की नै हे तपासायचं असेल तर काय करायचं? मी हा प्रश्न विचारतो आहे कारण मूळ प्रतिसादात तुम्ही भारतीय संस्कृती आणि लोकांचं आचरण वेगळं मानलेलं आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती याचा अर्थ मी धर्मग्रंथांतली वर्णने असा घेतो आहे. तो बरोबर की चूक तेवढं सांगा अगोदर.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
उत्तर गविंनी द्यायचे आहे.
उत्तर गविंनी द्यायचे आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
म्हणजे मी उत्तर दिले तर
म्हणजे मी उत्तर दिले तर तुम्ही बघणार नाही असंच का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
होय. कारण माझ्या
होय. कारण माझ्या युक्तिवादातली नक्की लाईन काय आहे ते तुला दिसत नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हा हा हा. तुमची नेमकी लाईन मी
हा हा हा. तुमची नेमकी लाईन मी ओळखली आहे, तेव्हा ते एक सोडाच.
भारतीय संस्कृती चा नक्की तुम्हांला अभिप्रेत असलेला अर्थ सांगा अगोदर.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
Popular notion among people
Popular notion among people by legacy.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मग यानुसार जत्रेत देवाला
मग यानुसार गावच्या जत्रेत देवाला नॉनव्हेजचा नैवेद्य दाखवणे ही भारतीय संस्कृती नव्हे का? तिथे तर ३.५% वाले आडवे येत नाहीत ना? आता कुठे गेला शाकाहार आँ?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तिखटाचा नैवेद्य!
जत्रा कशाला?
कोकणात गणपतीबरोबर येणार्या गौरीला अनेक घरी 'तिखटाचा' नैवेद्य लागतो!
त्यांना कोकण चालत नाही म्हणून
त्यांना कोकण चालत नाही म्हणून देशावरची उदा. दिली, इतकेच!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
न्नो
अजो ट्रॅप मध्ये येण्यापूर्वी माझा एक प्रयत्न.
आता तर मस्तच सापडलात. लोक काहीही खाओ पण भारतीय संस्कृती शाकाहार श्रेष्ठ मानते असा दावा आहे ना? भारतीय संस्कृती श्रेष्ठ मानते याचाच अर्थ धार्मिक मान्यतेनुसार शाकाहार श्रेष्ठ असाच घेतला पाहिजे. अन धार्मिक मान्यता म्हणजे धर्मग्रंथ. अन धर्मग्रंथ म्हणजे वेद, पुराणे, रामायण, महाभारत. बरोबर ना?
न्नो.
फक्त धर्मग्रंथच असेच काही नाही.
पांपरिक समजुती. सद्य लोकाचरण व अलिकडच्या काळातील प्रचलित समज.
(मांसाहार करणारेही अमुक अमुक काही झालं की मांसाहार सोडीन म्हणतात.
उदा:- विपश्यनेच्या धाग्यावर विपश्यना केल्यापासून मांसाहार सोडल्याचं विधान विलासराव ह्या आय डी नं केलय. ते प्रातिनिधिक म्हणता यावं.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
फक्त धर्मग्रंथच असेच काही
पारंपरिक समज नक्की कुठल्या काळातले? अन तेच व्हॅलिड का धरावेत? सर्वमान्य असे हिंदू धर्मातील जे ग्रंथ आहेत ते तपासले तर चूक नसावी.
बाकी, ते ग्रंथ सोडून पाहिलं तर हजारो वेगवेगळ्या माण्यता भारतभर आहेत. त्यामुळे निव्वळ त्यांचा हवाला देऊन भागत नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ग्रंथ ब्रिंथ ३.५%
ग्रंथ ब्रिंथ ३.५% ब्राह्मणांपैकी १०% ब्राह्मण वाचत असतील (इतरांपैकी नगण्य) फार तर.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पण त्या ग्रंथांमध्ये तत्कालीन
पण त्या ग्रंथांमध्ये तत्कालीन परंपराच संकलित झालेल्या होत्या. शिवाय त्यांचा हवाला देऊन लोक बोलत असत. त्यामुळे भारतीय संस्कृती म्हणजे ग्रंथ सोडून नक्की काय अभिप्रेत आहे ते सांगा की. लोकाचार जर त्यापासून वेगळा काढला तर संस्कृती म्हणजे काय बॉ????
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अहो, ग्रंथवाले, तुमच्या
अहो, ग्रंथवाले, तुमच्या ग्रंथातून आज काय सत्य ते कळत नाही. मागचे जाऊच द्या.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ग्रंथ न वाचता, एक पानही न
ग्रंथ न वाचता, एक पानही न उलटता असली बिनबुडाची विधाने करताना तुम्हांला काही चूक करतोय असे वाटत नाही का? एकीकडे असली अँटि-ग्रंथ मुक्ताफळे अन दुसरीकडे ग्रंथातल्या एका बहुपतीकत्वाच्या मुद्यावरून तो तत्कालीन समाजास मान्य होता असा निष्कर्ष काढणे हा विरोधाभास रोचक आहे. पण सोयीस्कर निष्कर्ष काढू पाहणार्यांना त्याचे काय होय! ग्रंथ स्वतः वाचायची इच्छा नसल्याने त्यांना मोडीत काढण्याची ही प्रवृत्ती सार्वत्रिक आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हे सर्व लोक शाकाहारी असतात
हे सर्व लोक शाकाहारी असतात असं म्हणणं नाहीच. किंबहुना बरेचसे मांसाहारीदेखील असू शकतील. मी फक्त खाण्यासाठी मारण्यातला सरळपणा आणि अन्य कारणांनी प्राण्यांना वेठीला धरणे यातला फरक सांगत होतो आणि खाणे हा अधिक शुद्ध हेतू आहे असं म्हणत होतो. मांस खाण्यासाठी प्राणी मारणे यापेक्षा अधिक शुद्ध असे अनेक हेतू जगात असू शकतील पण खाण्यासाठी मारणे हे जस्टिफायेबल आहे इतकेच.
वनस्पतींपेक्षा प्राणी आपल्याला अधिक जवळचे आहेत हा परसेप्शनचा भाग आहे. प्राण्याच्या स्पेसीजवर त्याची उतरंड ही जीवशास्त्राच्या दृष्टीने योग्य असेलही, पण हत्या करुन खाणे या दृष्टीने तो पिरॅमिड तसाच्या तसा लागू पडत नाही. याबाबत आपला व्यक्तिगत धागा कोणत्या जिवाशी जुळला आहे हा रुलिंग फॅक्टर ठरतो. महिनोमहिने पाळलेली कोंबडी जर लळा लावून बसली असेल तर किंवा बकर्याला पिल्लू असल्यापासून पाळले असेल तर त्याला मारुन खाणे बर्याचजणांना अशक्य होईल. पण मारण्यासाठीच वाढवलेला बकरा त्याच्याशी लळा लागेल असे कोणतेही साहचर्य ठेवलेले नसताना इतर कोणाच्यातरी हाती मारुन खाणे सहज शक्य असेल. पोल्ट्री / मटणशॉप इथून आणलेल्या मांसाबाबत हेच होत असते. त्यात आपल्याला लळा / प्रेम / अटॅचमेंट उत्पन्न न झालेला खाण्यासाठीच कोणीतरी पोसलेला प्राणी हा पाळीव प्राण्यापेक्षा कनिष्ठ ठरतो.
इथे अलगी, कीटक, सर्प, वनस्पती, तृणभक्षी, शिकारी अश्या प्राण्यांच्या मनोर्यावर जवळीक अवलंबून नसते तर आपला त्या प्राण्याशी किती संबंध आलेला आहे त्यावर असते.
स्वतः पाळलेली कोंबडी मारण्याचे कठीण झाल्यास ती दुसर्याला देऊन बदली कोंबडी आणण्याचीही पद्धत आहे. दांभिकपणा म्हटला तर आहे, पण वट्टात शाकाहारात तो कमी आहे आणि मांसाहारात जास्त आहे असं नव्हे. आपल्या आवडत्या व्यक्तीने अंगणात प्रेमाने लावलेला पारिजातक दहा वर्षांनी तिथे रूम बांधण्यासाठी तोडायचा म्हटले तर डोळ्यात पाणी येईलच. अटॅचमेंट ही सहवासाने येते, जीवशास्त्रीय नियमांनी नव्हे.
मनुष्यप्राण्यात स्वजातीयांना न खाण्याची इन्स्टिंक्ट आहे. बहुतांश मनुष्यलोक आपल्या जातीच्या लोकांना खात नाहीत. तसे न खाणे यात अप्रामाणिकपणा नाही. प्रत्येकाचा एक धारणेतून घडलेला चॉईस असतो. त्यात बकरा खाईन पण गाय नाही, साप खाईन पण कुत्रा नाही असे अनेक भाव असू शकतात. प्रत्येक गोष्ट तर्ककर्कशपणे एकाच नियमात बांधता येत नाही.
आणि एकूण शाकाहार संपला आणि आता इतर काहीच मिळत नाही असे झाले तरच मांसाहाराकडे वळणे याविषयी जे म्हटलं आहेत त्यावर काय बोलू?
शाकाहाराची उपलब्धता जगातल्या अत्यंत अल्पांशांचीच भूक भागवू शकेल. विदा हाती नाही, पण मिळवण्याचा प्रयत्न करता येईल.
सध्या बहुसंख्य लोक मांसाहार करताहेत म्हणून शाकाहार पुरवठ्याला येतो आहे. सर्वांनी आधी जगातला उपलब्ध शुद्ध शाकाहार १००% पूर्ण कंझ्यूम करुन मगच नाईलाजाने मांसाहाराकडे वळायचे ठरवले तर एकदोन आठवड्यात तुमच्यासकट आपणा सर्वांनाच कीटकापासून जे मिळेल ते खाण्याची वेळ येईल.
प्राण्यांच्या मनोर्यावर जवळीक अवलंबून नसते
इथे अलगी, कीटक, सर्प, वनस्पती, तृणभक्षी, शिकारी अश्या प्राण्यांच्या मनोर्यावर जवळीक अवलंबून नसते तर आपला त्या प्राण्याशी किती संबंध आलेला आहे त्यावर असते.
हे वाचलं.
ह्यात "जवळीक " शब्दापूर्वी "मांसाहार्यांना वाटणारी " हा क्लॉज जोडला तर प्रतिसाद मान्यच आहे.
.
.
सध्या बहुसंख्य लोक मांसाहार करताहेत म्हणून शाकाहार पुरवठ्याला येतो आहे. सर्वांनी आधी जगातला उपलब्ध शुद्ध शाकाहार १००% पूर्ण कंझ्यूम करुन मगच नाईलाजाने मांसाहाराकडे वळायचे ठरवले तर एकदोन आठवड्यात तुमच्यासकट आपणा सर्वांनाच कीटकापासून जे मिळेल ते खाण्याची वेळ येईल.
ही भीती आतिशयोक्त आहे. माझ्याइथून मिपा उघडत नाही.
खालील दुव्यावर विक्षिप्त अदितीने वरील वाक्याचा प्रतिवाद केलेला आहे.(हे माझ्या आठवणीनुसार सांगत आहे, चुभू द्या घ्या)
http://www.misalpav.com/node/1740
तिचे तिथले प्रतिसाद पहावेत.
माझा अंदाज :-
सध्या जितकं मांस कन्झम्पशन होतं , त्याच्या चाळीस पन्नास टक्क्यांपर्यंत किंवा त्याहून कमी ते करता यावं.
सध्या grains--धान्य खूप ठिकाणी पशूखाद्य म्हणून वापरतात. आणि मग पशूंना मारुन खातात.
ते डायरेक मानवतेकडे वळवता आलं तर तितक्याच धान्यात अधिक माणसं जगू शकतात; असं काहीतरी गणित असल्याचं ऐकलय.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
इथल्या 'मैफिली'त काड्या
इथल्या 'मैफिली'त काड्या घालण्याचा उद्देश नाही. पण मनोबाने उल्लेखलेला मुद्दा पुन्हा थोडा वाढवून लिहायला ना नाही.
सध्या आपण (मानवजात) जो प्राणिज आणि/किंवा मांसाहार करतो तो मुद्दाम वाढवलेल्या प्राण्यांचा असतो, दूध, मध, अंडी, कोंबडी, बकरे, गायी, इ. सगळंच. मत्स्याहारासाठी शेती हा प्रकार फारच कमी असावा (असा बातम्या वाचून केलेला अंदाज).
तर या सगळ्या शेती केलेल्या प्राण्यांना वाढवण्यासाठी आधी मुळात पाणी, जमीन, पशूआहार इ. गोष्टी खर्च कराव्या लागतात. यात सूर्याची ऊर्जा फुकट मिळते म्हणून मोजली नाही तरी वीजही वापरावी लागते. सरकी, फळांचे रस काढले की उरलेला चोथा, अशा प्रकारच्या अन्यथा फुकट गेल्या असत्या अशा गोष्टीही वापरल्या जातात. पण त्याशिवाय अधिक जास्त पोषण कोंबड्या, बकरे, गायींना घालावं लागतं. ते मुळात आधी बनवावं लागतं. आपलं अन्न अन्नसाखळीत जेवढ्या वरच्या पातळीवरून येतं तेवढा त्यात पाणी, जमीन, धान्य-गवत असा खर्च जास्त. वनस्पतीजन्य आहार सगळ्यात स्वस्त, शाकाहारी प्राणी त्यापेक्षा महाग आणि मांसाहारी प्राणी आणखी महाग. त्यातही कमीतकमी प्रोसेस केलेला आहार सगळ्या दृष्टीने स्वस्त (साधारणतः असं जेवण आरोग्यकारकही असतं).
मांसाहार ज्यांना सोडायचा असेल किंवा मुळात मांसाहार का नको वाटतो याचं आणखी एक कारण देता येईल - हरितगृह परिणाम.
Cow 'emissions' more damaging to planet than CO2 from cars
सवयीमुळे मी शक्यतोवर शाकाहारी आहे. एकवेळ मी मध खाणं सोडू शकते, पण दूध आणि दुग्धोत्पन्न पदार्थ सोडू शकत नाही. कधीमधी गंमत, कुतूहल, नाईलाज अशा वेगवेगळ्या कारणांमुळे मी कोंबडी, मासे यांना सद्गति देण्यासाठी मदत करते. अगदी पूर्ण व्हीगन असते तरीही मांसाहार सोडा, असं कोणालाही सांगितलं नसतं. ज्यांना जे खायचं आहे (आणि पचतं, परवडतं आहे) त्यांनी ते खा. माझा आहारच श्रेष्ठ असं काही मला वाटत नाही. एकेकाळी फोडणी-बिडणी दिलेलं भारतीय जेवण कित्ती कित्ती थोर अशा गैरसमजात मी सुद्धा असायचे; पण वेळेत पास्ता, टाको, केक, पाय, चीज, अशा विविध गोष्टींशी ओळख झाली. एकंदरच आपलं काय तेवढंच फक्त थोर आणि बाकीचं वाईट, फालतू, नाकारण्यासारखं, दुरित असा दृष्टिकोन गळायला सुरूवात झाली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माझा आहारच श्रेष्ठ असं काही
धाग्याशी निव्वळ असंबंद्ध.
---------
आहार कोणता श्रेष्ठ याचे कितीतरी निकष असू शकतात. शिवाय सर्व ठिकाणी एकच आहार वा आहारपद्धती श्रेष्ठ असू शकत नाही.
-------
लेख भारतीय परिस्थितींत मांसाहार नि भूतदया या विषयावर आहे.
--------------
आपला दुरित दृष्टीकोन गळाला ही आनंदाची बाब आहे. इतरही अजून असे काही दृष्टीकोन असले तर गळोत अशी शुभकामना.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
धाग्याशी निव्वळ
तीनशे करायचे असतील तर याला इलाज नाही मिस्टर जोशी, इलाज नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
समजा तुमचा तुमच्या कुत्र्याशी
समजा तुमचा तुमच्या कुत्र्याशी लै लळा लागला. आता तुम्हाला दोन पर्याय आहेत - तो कुत्रा खाणे आणि अपरिचित नातेवाईक (माणूस ज्याच्याशी लळा नाही.) खाणे. काय निवडाल? काय खावे काय नाही याची समीकरनेच नाहीत, रँडम आहेत, व्यक्तिशः वेगळी आहेत याला एका सीमेतच अर्थ आहे.
--------
जे लोक स्वतःस मांसाहारी म्हणतात ते सगळे कच्चे मांस खात नाहीत. प्लेटीत शाकाहारच जास्त भरतो. किमान भारतात* तरी.
------------------
कोणता आहार योग्य, उचित हा विषय नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
परंतु (निव्वळ आर्बिट्ररी) अशा
माणसात आर्बिट्ररी नसलेले कोणते फरक आहेत? हे सगळे आर्बिट्ररी फरक काढले कि माणसात नि जनवारात फरक उरत नाही.
---------
देशप्रेम देखिल अस्सेच आर्बिट्ररी आहे. तुम्ही देशप्रेमी नाहीत. "आपल्या देशातले" कोण नि परके कोण याने तुम्हाला फरक पडत नाही. भारतीय, पाकिस्तानी, अमेरिकन, चीनी, मंगळवासी, सगळे सारखे. उद्या काही झालं तर तुम्ही सगळ्यांची सारखी काळजी घेणार. भारतीयांना प्राधान्य नाही. म्हणून तुम्ही कमी देशप्रेमी. तसेच कमी तुम्ही काय खावे काय नये हे पाहत नाही म्हणून कमी भूतदयावादी.
--------
भूतदयावाद देशप्रेमासाअरखा आर्बीट्ररी आहेच वा नाहीच बद्दल काही नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
माणसात अन जनावरात एक डोक्याचा
माणसात अन जनावरात एक डोक्याचा साईझ वगळला तर फरक जवळपास शून्य आहेत.
अन मांसाहारी लोक काय खावे हे पाहत नाहीत हा वायझेड समज तुम्ही करून घेतलेला आहे. तुम्हांला झेपत नाही म्हणून बाकीच्यांना शिव्या कशाला घालता?
शिवाञ गविंच्या प्रतिसादाला उत्तर द्या आधी. बाकीची मुक्ताफळे नंतर.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
इथे कृपया शाकाहारी माणसे
इथे कृपया शाकाहारी माणसे देखिल "हे" खातातच ना असे म्हणू नका. या धाग्यावर ते व्हॅलिड आर्ग्यूमेंट नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
का नाही ते स्पष्ट करा ना.
का नाही ते स्पष्ट करा ना. शाकाहाराची नेमकी व्याख्या दिली नाही आणि तरीही अंदाधुंद गोळीबार सुरू आहे हे योग्य नाही- जरी नेहमीचेच असले तरीही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शेवटी अरुणजोशींना वाटते
शेवटी अरुणजोशींना वाटते म्हणून मांसाहारी हे कमी भूतदयावादी आहेत इतकंच निष्पन्न होणार आहे.
या दाव्याला ना शेंडा ना बुडखा. ना विदा ना लॉजिक. नुस्तीच निरर्थक बडबड. योग्य प्रतिवादाचा प्रतिवाद नसल्याने असं होतं हे बाकी त्यातून अधोरेखित झालेलंच आहे.
तर मग-
गे/लेस्बियन, एनाराय, शहरी, नास्तिक, आणि आता मांसाहारी.... आता नेक्स्ट टाईम टिकोजीरावी लॉजिकने रद्दीत काढले जाण्याचा नंबर कुणाचा असेल ते पाहणे रोचक ठरेल.
स्वतःच्या बिनबुडाच्या पूर्वग्रहांचे तितक्याच निरर्थकपणे आणि आग्रहीपणे समर्थन सोडलं तर यात काय आहे हे कुणीतरी सांगा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
माझ्या सगळ्या प्रतिसादांत एक
माझ्या सगळ्या प्रतिसादांत एक लिमिटेड आर्ग्यूमेंट आहे. एक कंसिस्टेंत लाईन ऑफ थॉट आहे. तू मी अजून वाईट विशेषणे वापरू शकतो. पण व्यक्तिगत वर्णन करण्यात मला रस नसतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
लिमिटेड नाही, विनोदी अन
लिमिटेड नाही, विनोदी अन बिनबुडाचे अर्ग्युमेंट.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एन आर आय? काय संबंध ? मी
एन आर आय? काय संबंध ? मी कधीही एन आर आय लोकांबद्दल एकही निगेटीव विधान केले नाही. ते दुष्ट असतात वा वागतात असे. प्लीज.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अरुण जोशींशी सहमत आहे.
अरुण जोशींशी सहमत आहे. मांसाहारी लोकांना ठेचलं पाहिजे. हलाल करून हाणलं पाहीजे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अशी मांसाहारी माणसे ठेचून
अशी मांसाहारी माणसे ठेचून मारली की त्यांची भुते होतील. मग त्या भुतांवर दया म्हणून शेंडा बुडखा नसलेल्या लॅाजिक चा मारा बंद करा. मग अशा शाकाहारी व्यक्ती "भूत"दयावादी म्हणवल्या जातात.
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
इथे माझ्या विपरित मत
इथे माझ्या विपरित मत मांडणार्या लोकांना भारतात वा जगात "प्राणीहत्या हे भूतदयेच्या विरूद्ध जाते म्हणून आम्ही मांसाहार करणार नाही" असे मानणारे लोक शून्य आहेत असे वाटते का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
"प्राणीहत्या हे भूतदयेच्या
सहमत आहे. व्हीगन होण्यामागे भूतदया ही प्रेरणा असते.
आता मांसाहार सोडून शाकाहारी(भाज्या + दूध + मध वगैरे खाणं) होणं ही एक पायरी आहे. त्याची पुढची पायरी म्हणजे व्हीगन होणं ही आहे. एखाद्यानी सुरुवात पहिल्या पायरी पासून केली तर लगेच "तु दुसरी पायरी का नाही चढत रे?" हे म्हणण्यात हशील नाही.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
'वनस्पतीहत्या ही भूतदयेच्या
'वनस्पतीहत्या ही भूतदयेच्या विरुद्ध असते' असं म्हटलं तर जैविक प्रेरणा आड येते अन प्राणीहत्या म्हटलं तर भूतदया!!!!! कमाले विनोदाची.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
थकलो माझ्या राजा. अरे दोन्ही
थकलो माझ्या राजा. अरे दोन्ही भूतदया येते. मी प्रमाणाबद्दल बोलतोय.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मग त्या दुसर्या मुद्याचं
मग त्या दुसर्या मुद्याचं उत्तर द्या की.
शाकाहार्यांनी गायी कसायाला विकणे, बिबटे मारणे, साप-उंदीर-पाली यांचा जीव घेणे ही जीवहत्या मांसाहार्यांनी खाण्यासाठी केलेल्या जीवहत्येपेक्षा कमी क्रूर कशी ते काही मला समजत नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
१. मांसाहार्यांनी हत्या करून
१. मांसाहार्यांनी हत्या करून मांस खाणे
२. मांसाहार्यांनी इतरांकडून हत्या करून घेऊन मांस खाणे
३. मांसासाठी प्राणी विकणे
४. मांसासाठी प्राणी विकणे
५. त्रासदायक, हानीकारक उंदरांचा पालींचा जीव घेणे
६. प्राणघातक ठरू शकणार्या सापाला मारणे
७. बैलाचे वृषण ठेचणे
८. गायीचे दूध पिणे
९. शुद्ध शाकाहारी असणे
१०. अगदी वनस्पती देखिल न खाता मरूनच जाणे
या भूतदयेत विशुद्ध शाकाहार श्रेष्ठ ठरतो. बाकी कोनी ऑडर इकडे तिकडे करेल, पण पर्याय असताना मांस खाणार्या लोकांपेक्षा चव मारून दयेसाठी शाकाहारी राहणारे लोक जास्त भूतदयावादी.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
एकदा प्राणी मेला की त्याला
एकदा प्राणी मेला की त्याला खाणे न खाण्यावरून भूतदयेची वर्गवारी ठरवणे हा केविलवाणा, निरर्थक, बिनबुडाचा आणि तितकाच मूर्ख प्रकार आहे. ज्यांना लेबले लावायची घाई झालेली असते असेच लोक असले खेळ खेळतात. पण त्यातून सिद्ध काहीच होत नाही. लहानपणी शाळेत एकमेकांना चिडवताना असले हास्यास्पद निकष वापरले जायचे त्याची आठवण झाली.
इतकी भूतदया म्हणून मिरवल्या जाते तिचा केंद्रबिंदू जो प्राणी, तो तर दोन्हीकडे मेलाच. हे म्हणजे माणूस मेल्यावर मंत्राग्नी की भडाग्नी? विधी की बिगरविधी? दहन की दफन? इ. च्या आधारे श्रेष्ठत्व ठरवण्याचा प्रकार वाटतो. तितकाच हास्यास्पद इफ नॉट मोर हास्यास्पद.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
प्रतिसाद कळला नसावा. असो.
प्रतिसाद कळला नसावा. असो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
भूतदयेची वर्गवारी ठरवायला
भूतदयेची वर्गवारी ठरवायला खाणे हा एकमेव निकष ठरवणे हा ट्रोलपणा आहे. अन्यही निकष हवेत तरच तो प्रकार बॅलन्स्ड होईल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एकमेव
एकमेव निकष नाहिच्चे की.
वन ऑफ द निकष आहे तो.
बाकीचे मुद्दे तुम्ही इतरत्र अकय वागता, इतरांना कसे वागवता वगैरे वगैरे.
पण मुळात हा एक निकश असू शकतो; असे मान्य आहे काय?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
एकटा तोच नाही. त्यासोबत इतर
एकटा तोच नाही. त्यासोबत इतर अनेक गोष्टी घेतल्या तरच त्याला काही अर्थ आहे, नपेक्षा नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एक प्रश्न
अरुणभाऊ प्राण्याला मारून खाणे तसे त्रासदायक वाटते हे कोणीही अमान्य करणार नाही. पण मुदलात वनस्पतींची तोड होताना त्यातुन रक्त येताना दिसत नाही. वनस्पती टाहो फोडत नाहीत म्हणून ते खाताना त्रास होत नाही. उद्या असे दिसून आले की वनस्पतीनाही तेवढाच त्रास होतो मग काय करणार बुवा? बर तसे सिद्ध झाले नाही तरीही बेसुमार जंगल तोड होतेच. स्वतःच्या फायद्यासाठी मोठ मोठ्या इमारती आणि घरे बांधून लोक राहतात. परिसराची तशीही प्रचंड हानी करतात मग कसली आली भूतदया. अजून एक प्रश्न हे शाकाहारी लोक काय कमी त्रास देतात का लोकांना? समोरच्याला न मारता भरपूर मानसिक छलवणूक करणारेही भरपूर असतात. तेंव्हा खाण्यावर अवलंबून असते असे काही मला वाटत नाही. ज्याला भूतदया दाखवायची तो कसाही दाखवेल. मुदलात गरज नसताना मारू नये हे सूत्र पाळले तर काय बिघडते. आणि हाच प्रकार सगळीकडे लागू होतो. असो जालिय चर्चेतून मत बदलत नाही तर आपल्यावर हल्ला झाला असे समजून आपली मते जास्त घट्ट धरून ठेवली जातात अशी आपली तरी एक थेयरी आहे बुवा. आता ह्याला काहीही शास्त्रीय आधार नाही. हे आपले माझे स्वतःचे अनुभव ह्यावर बेतलेले आहे.
पाने