आनंदाचा क्षण आणि ....
त्याचा आईचा फोन आला, तू बाप झाला, मुलगी झाली आहे. हि आनंदाची बातमी कळताच तो तडक दिल्लीला निघाला. दुसर्या दिवशी सकाळीच आपल्या नवजात परीला बघायला तो बी एल कपूर हॉस्पिटल वर पोहचला.
त्याला बघताच बायकोच्या चेहर्यावर मंद स्मित पसरले, तिने पाळण्याकडे इशारा केला. पाळण्यात ती चिमुकली परी शांत झोपलेली होती. त्याने अलगद त्या चिमुकल्या परीला उचलले. अचानक त्याला हसू आले. असे हसता काय, बायकोने विचारले. तो हसतच म्हणाला कशी डोळे वटारून पाहते आहे अगदी तुझ्या सारखी. आता तुला मैत्रीण मिळाली, तुम्ही दोघी मिळून माझ्या डोक्यावर किती मिरे वाटणार या कल्पनेनेच मला हसू आले. बायको म्हणाली, तुमच्या जिभेला काही हाड... 'नाहीच आहे, हो न परी', म्हणत तो जोरात खळखळून हसला. त्याचा आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण.
तो बेंच वर वार्डच्या बाहेर बसला होता. एक वयस्क बाई त्याच्या शेजारी येऊन बसली. तिने त्याला विचारले, क्या हुआ 'काके'. 'लक्ष्मी आई है घर में', तो उतरला. ते ऐकून तिचा चेहरा काळवंडला, त्याच्या पाठीवर हात फिरवत सांत्वन करत म्हणाली, चिंता मत कर काके, अगली बार लड़का होगा. तिचे सांत्वन करणारे शब्द ऐकून त्याचे डोके सटकले 'मला मुलगी झाली, मी खुश आहे, हिला कशाचे दुःख'. चांगले सुनावले पाहिजे हिला. पण तो थबकला. दोन दिवस अगोदरच त्या बाईच्या मुलीला, मुलगी झाली होती. अद्याप हि सासरहून कुणी ही भेटायला आले नव्हते, तिचा नवरा सुद्धा......
काके = पोरा (मुलगा)
प्रतिक्रिया
सुन्न झालो
दुर्दैवाने भारतात बर्याच ठिकाणी अजूनही अशीच परिस्थिती आहे.
एक वास्तविक सत्य!
एक वास्तविक सत्य!
जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी
वास्तव
दुर्दैवी, पण सत्य.
दुर्दैवाने ही परिस्थिती आहे.
दुर्दैवाने ही परिस्थिती आहे. विशेषतः आज जे आजी आजोबा आहेत, किंवा ज्यांच्या घरी शिक्षणाची परंपरा नाही, मुलींनी नोकऱ्या करण्याची परंपरा नाही त्यांच्या घरी मुलगी म्हणजे आपत्ती असा विचार होण्याची शक्यता आहे खरी. तरीही नव्वद टक्क्यांवर पालक मुलींना जन्मू देतात, वाढवतात, शिकवतात ही गोष्ट भविष्याच्या दृष्टीने आशादायी आहे.
मुलींनी नोकरी भलेही केली तरी
मुलींनी नोकरी भलेही केली तरी त्यांचे लग्न होऊन त्या सासरी जातातच. तेव्हा त्यांनी कमावलेल्या पैशाचा कितपत फायदा आई-वडीलांना होतो हा प्रश्नच आहे. अजुन एक मुद्दा हा आहे की सासरी गेल्यानंतर किती टक्के मुली आईवडीलांना पैसी पाठवतात, त्यांच्या आजारपणाचा खर्च उचलतात?
___
हे स्त्रीभ्रूणहत्येचे समर्थन अज्जिबात नाही. पण एवढच विचारायचे आहे की तुमच्या पहाण्यातील किती मुली कमावून अथवा कसेही, आई-बापाला आधार देतात?
?
आरओआय वगैरे मोजायला मुलं म्हणजे इन्वेस्टमेंट आहेत की काय!
अवांतरः मी पाहिलेल्या सर्व उदाहरणात मुलांपेक्षा मुलींनी (नवऱ्याचा विरोध न मानताही!) आईवडिलांना चांगला आधार दिला आहे असं दिसलंय. त्यामानाने मुलांना (बायकोचा विरोध शिरोधार्य मानून) आईवडिलांपेक्षा सासुसासऱ्यांची काळजी जास्त करावी लागते असं दिसतं.
रिटर्न ऑफ इन्व्हेस्ट्मेन्ट
रिटर्न ऑफ इन्व्हेस्ट्मेन्ट नाही तर मग कोणत्या कारणासाठी मुली नको असतात?
(१) वंशाचे नाव पुढे चालणार नाही
(२) मुलींचे शील (तेजायला) जपावे लागते म्हणून
मुख्य दृष्टीकोन "रिटर्न ऑफ इन्व्हेस्ट्मेन्ट " हाच असावा.
माझ्या पहाण्यात (जे की अतिमर्यादित आहे) मुली अज्जिबात मदत करत नाहीत उलट आई-आई वेडेपणामुळे त्यांच्या आयांचा हस्तक्षेप सासरी होताना दिसतो.
___
कदाचित नव्हे नक्कीच तुमचा आणि माझा नीरीक्षण गट वेगळा आहे.
रिटर्न ऑफ इन्व्हेस्ट्मेन्ट
शुचीतै - मला वाटते आर्थिक परीस्थिती हे एक कारण असु शकेल पण ते वेगळ्या लोकांत. पण भारतातली एकुणातली परीस्थिती बघता मुलीला जन्माला घालणे हे एक पाप तर करत नाही ना अशी शंका सुजाण आई बापांना येऊ शकते. मागच्याच आठवड्यात एका IAS महीला अधिकार्याने "ह्या देशात मुलीला जन्माला घालूच नये" अश्या प्रकारचे वक्तव्य केले होते तिच्या स्वताच्या अनुभवावरुन.
मध्यम्/उच्च मध्यमवर्गीय मराठी ( टीपीकल ब्राह्मणी ) कुटुंबात आर्थिक किंवा नंतर म्हातारपणी कोण सांभाळ करेल हे प्रश्न दुय्यम आहेत कींवा नाहीतच. पण मुलीला ह्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत पूर्ण शंख असलेल्या जनावरांच्या देशात कसे वाढवायचे आणि कायम कीती काळजी करत रहायचे हा फार महत्वाचा प्रश्न आहे. इथे पुण्यासारख्या ठीकाणी भरदिवसा सुद्धा बस चा प्रवास बाई साठी भयंकर अनुभव असतो.
स्वताच्या अनुभवावरुन सांगते, मुली पेक्षा मुलगा असता तर खुप निर्धास्त वाटले असते.
. इथे पुण्यासारख्या ठीकाणी
आय हेट पुणे फॉर दॅट रीझन.
शुचीतै - पुणे दिल्ली पेक्षा
शुचीतै - पुणे दिल्ली पेक्षा बरे म्हणुन पुणे लिहीले.
माझ्या प्रतिक्रीयेचे सार इतकेच होते की स्त्रीयांची एकुणच परीस्थीती बद्दल जर पुढारलेले देश ते अगदी खाली जाउन आयसीस च्या ताब्यातील सिरीया अशी जर रेष मारली तर भारत मधे कुठे तरी येइल. आणि गेल्या ६५ वर्षात त्याची घसरण वाईट, अजुन वाईट अश्या दिशेने होत आहे.
किस्सा प्रॅक्टिकल आहे. ही
किस्सा प्रॅक्टिकल आहे.
ही मानसिकता समाजमानस बदलल्याशिवाय सुधारणार नाही.