दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२२ मे
जन्मदिवस : समाजसुधारक राजा राममोहन रॉय (१७७२), संगीतकार रिचर्ड वाग्नर (१८१३), नेत्रशल्यशास्त्राची पायाभरणी करणारा आल्ब्रेख्त फोन ग्राफ (१८२८), चित्रकार मेरी कसाट (१८४४), शेरलॉक होम्सचा 'निर्माता लेखक आर्थर कॉनन डॉयल (१८५९), संस्कृत-मराठी भाषांतरकार विष्णू वामन बापट (१८७१), टिनटिन’चा जनक हर्जे (१९०७), अभिनेता लॉरेन्स ऑलिव्हिए (१९०७), सिनेनिर्माते व दिग्दर्शक होमी वाडिया (१९११), क्रिकेटपटू इरापल्ली प्रसन्ना (१९४०), टेनिसपटू नोव्हाक जोकोविच (१९८७)
मृत्युदिवस : लेखक व्हिक्टर ह्युगो (१८८५), लेखक लँग्स्टन ह्यूजेस (१९६७), कलासमीक्षक बाळकृष्ण दाभाडे (१९७९), RNA शोधणारा नोबेलविजेता आल्बेर क्लॉड (१९८३), कॉम्रेड श्रीपाद डांगे (१९९१), समीक्षक, संपादक, लेखक डॉ. मधुकर आष्टीकर (१९९८), हृदरोगतज्ज्ञ डॉ. नीतू मांडके (२००३), गणितविषयक लेखक मार्टिन गार्डनर (२०१०)
---
आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस.
हार्वे मिल्क दिवस (कॅलिफोर्निया)
१८४८ : मार्टिनिकमधून गुलामगिरी हद्दपार.
१९०६ : राईट बंधूंना त्यांच्या "उडणाऱ्या यंत्रा"चे पेटंट देण्यात आले.
१९३९ : जर्मनी व इटलीत पोलादी तह.
१९५८ : श्रीलंकेत वांशिक भेदाचे बीज असणारे, ३०० तमिळ लोकांचा बळी घेणारे वांशिक दंगे सुरू
१९६० : आजतागायत नोंदण्यात आलेला सगळ्यात तीव्र भूकंप (९.५ रिश्टर) चिले (चिली) देशात झाला.
१९७२ : सिलोनचे नाव बदलून श्रीलंका केले; नवीन संविधान अंगिकारले.
१९८० : पॅकमॅन या खेळाचा जन्म.
१९८७ : मीरत शहरात हाशिमपुरा हत्याकांडात ४२ मुस्लिम तरुणांचा बळी; २१ मार्च २०१५ला सर्व आरोपींची पुराव्यांअभावी मुक्तता.
१९८७ : रग्बीचा पहिला विश्वचषक सुरू झाला.
१९८९ : 'अग्नी' या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण.
१९९० : उत्तर यमन व दक्षिण यमन 'यमन प्रजासत्ताक' या नावाने एकत्र झाले.
१९९० : विण्डोज-३.० बाजारात आले.
२००३ : अनिका सोरेनस्टाम गोल्फच्या पीजीए टूरमध्ये खेळलेली पहिली स्त्री ठरली.
२०१० : एअर इंडियाच्या विमानाला मंगलोर विमानतळावर अपघात, १५८ बळी, ८ लोक वाचले.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
एका वाक्यात
महंमद रफी हा स्वर्गातील गंधर्व. हेमंत कुमार, मन्ना डे, तलत वगैरे यक्ष, किन्न, इत्यादी.
एका वाक्यात लेखाचा दर्जा ध्यानात आला. पुढचा लेख वाचण्याचे कष्ट घेतले नाहीत.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
धन्यवाद.
धन्यवाद.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
दळ
अशा दळभद्री प्रतिक्रिया देऊ नयेत संजोप्या.
चालायचंच
चालायचंच,
कोणाला श्रीदेवी; जी.एं सारखी वाटते, तर कोणाला रफी गंधर्वांसारखे !
कशाकशाचा दर्जा मोजायचा ?!
किशोरकुमार
आभासकुमार या खर्या नावाऐवजी किशोरकुमार हे नाव का घेतले असावे? श्रद्धांजली आवडली.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
'दु:खी मन मेरे, सुन मेरा
'दु:खी मन मेरे, सुन मेरा कहना' या नंतरची ओळ आहे 'जहां नहीं चैना, वहां नहीं रहना'. तसंच 'दिल आज शायर है, गम आज नगमा है' या गाण्याच्या शेवटी 'लेकिन लगाया है जो दांव हमने, वो जीत कर आयेंगेही' हा दुर्दम्य आशावाद आहे.
ह्यात किशोर कुमारचं योगदान किती? त्याने ही गाणी लिहिलेली आहेत का? नसतील तर मग त्याने फक्तं आवाज दिलाय, आणि संगीतकाराला अपेक्षित असलेलेल भाव गाण्यात उतरवलेत.
बाकी त्याच्या उत्कृष्ठ गायक असण्याबद्दल वाद नाहीच!
-अनामिक
<<ह्यात किशोर कुमारचं योगदान
<<ह्यात किशोर कुमारचं योगदान किती? त्याने ही गाणी लिहिलेली आहेत का? नसतील तर मग त्याने फक्तं आवाज दिलाय, आणि संगीतकाराला अपेक्षित असलेलेल भाव गाण्यात उतरवलेत.>>>
काव्याचे बोल कितीही सुंदर, अर्थपुर्ण असले तरी जोपर्यंत त्याला साजेसा संगीतसाज चढवला जात नाही, जोपर्यंत ते समर्थ गळ्यातून गायले जात नाही तोपर्यंत त्यातली अर्थवाहीपणा जसाच्या तसा, तितक्याच समर्थपणे रसिकांपर्यंत पोहोचवता येत नाही. ते काम किशोरने समर्थपणे केलय त्याच्या गाण्यातून. गाण्यातला तो दुर्दम्य आशावाद आपल्या आवाजातून स्पष्ट आणि सिद्ध केलाय किशोरने.
छान लेख रे मंदार !
अनुमोदन विशाल
अगदी हेच लिहीणार होतो.
थोडी भर घालतो. गायक निवडताना त्या गाण्यांचे शब्द काय असावेत याचाही विचार केला जात असावा (आधी चाल मग शब्द या बाबतीत), किंवा अमुक शब्द असतील तर ते कुठल्या गायकाच्या गळ्यातून ते समर्थपणे पोहोचतील याचाही विचार केला जात असणारच. असो.
किशोर कुमार बद्दल लिहु तितकं
किशोर कुमार बद्दल लिहु तितकं कमीच..
असो.. त्याला श्रद्धांजली काय वहायची, रोजच अवतरत असतो तो!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ठंडी हवा ये चांदनी सुहानी....
"त्याला श्रद्धांजली काय वहायची, रोजच अवतरत असतो तो!....."
~ सुंदर.
'मॉर्टल' असल्याने देह या ग्रहावरून नष्ट झाला तरी किशोरकुमारचा आवाज 'इम्मॉर्टल' असल्याने तो कधीच अस्तंगत होऊ शकणार नाही. सबब श्रद्धांजली ही संज्ञा निदान अशा 'अमर' आवाजाच्याबाबतीत फसवी होऊ शकते. ..... इतकेच काय, पुढे जाऊन असेही म्हणता येईल की ज्याची आठवण श्रद्धांजली अर्पण केल्यामुळे (च) राहाणार असेल तर एका अर्थी आपण त्या गायकाला विसरत चाललो आहोत....किशोरच्याबाबतीत तर हे केवळ अशक्य.
हे लिहित असतानाच शेजारी 'ठंडी हवा हे चांदनी सुहानी....ऐ मेरे दिल सुना कोई कहानी...' उलगडत आहे.....नजरेसमोर आले आहेत... पडद्यावर गाणारा खुद्द किशोर आणि ते गाणे गॅलरीत उभे राहून तन्मयतेने ऐकणारी मधुबाला.
त्याकाळी आजच्या सारखा
हे आणि
हे
यात काही संबंध आहे का? म्हणजे तुम्ही सांगितलेली ही कथाही दंतकथाच असावी वगैरे? एखाद्या व्यवहारी व कंजूष व्यक्तीने एका मित्राच्या मित्राकडून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून मिळत आहेत त्यापेक्षा कमी पैसे का घ्यावेत हे समजले नाही.
संपूर्ण परिच्छेद वाचला आहे का?
अतिशहाणा, तुम्ही संपूर्ण लेख वाचला आहे असे गृहित धरतो. वर सांगितलेली कथा ही लोकसत्तामधे काही वर्षांपुर्वी छापून आलेली आहे. त्यामुळे ही दंतकथा नव्हे. मला ती घटना ऑनलाईन सापडली नाही कारण तेव्हा लोकसत्ताची ऑनलाईन आवृत्ती नसावी. पण ही कथा संपूर्ण सत्य आहे.
<<यात काही संबंध आहे का?>>
तिसरा परिच्छेदात ती घटना आणि मग चौथ्या परिच्छेदात कारणमिमांसा दिलेली आहे. त्यामुळे संबंध अर्थातच आहे. कारण त्या घटनेमुळे किशोरदांविषयी खरे काय ते स्पष्ट होते तर त्यामुळे आश्चर्यचकित झालेल्यांची "बोटे तोंडात का गेली?" या प्रश्नाचे उत्तर किंवा कारणमिमांसा चौथ्या परिच्छेदात दिली आहे. (हुश्श).
दुसरे म्हणजे
<<एखाद्या व्यवहारी व कंजूष व्यक्तीने एका मित्राच्या मित्राकडून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून मिळत आहेत त्यापेक्षा कमी पैसे का घ्यावेत हे समजले नाही.>>
वर श्रद्धांजलीपर लिखाणात अतिशय स्पष्ट लिहीले आहे की मिळत आहेत म्हणून कमी पैसे त्यांनी घेतले नाहीत — तर दिलेले पैसे योग्य मोबदल्यापेक्षा अधिक होते म्हणून जास्तीचे पैसे परत केले. आधी गायलेल्या मराठी गाण्यासाठी जेवढे घेतले होते तेवढेच घेणे त्यांना योग्य वाटले म्हणून बाकीचे जास्तीचे परत केले. (हुश्श).
आता लेख लिहील्यावर कशाचा संबंध कशाशी कसा आहे यावरही लेख लिहावा लागणार की काय?