दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
९ मे
जन्मदिवस : सम्राट राणा प्रताप (१५४०), मराठी व्याकरणकार, लेखक व धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर (१८१४), 'ओपल' कारकंपनीचा संस्थापक, अभियंता ॲडम ओपल (१८३७), 'पीटर पॅन'चा लेखक जे.एम. बॅरी (१८६०), स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक गोपाळकृष्ण गोखले (१८६६), तुतेनखामेनची कबर शोधणारा पुरातत्वज्ञ हॉवर्ड कार्टर (१८७४), विचारवंत ओर्तेगा इ गॅसे (१८८३), कामगार चळवळ कार्यकर्ते लेखक वसंत नीळकंठ गुप्ते (१९२८), नोबेलविजेता जैवरसायनशास्त्रज्ञ मॅन्फ्रेड आयगन (१९२७), गायक, संगीतकार व पियानोवादक बिली जोएल (१९४९)
मृत्युदिवस : लेखक फ्रीडरिक शिल्लर (१८०५), कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक (१९१९), प्रकाश निर्वात पोकळीतून प्रवास करतो हे सिद्ध करणाऱ्यांपैकी अल्बर्ट मायकलसन (१९३१), 'रयत शिक्षण संस्थे'चे संस्थापक व समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील (१९५९), एडमंड हिलरीबरोबर एव्हरेस्ट सर करणारा शेर्पा तेनसिंग नोर्गे (१९८६), सिनेदिग्दर्शक अनंत माने (१९९५), गायक तलत मेहमूद (१९९८), गायक पं. फिरोज दस्तूर (२००८)
--
जागतिक थॅलेसिमिया दिवस
स्वातंत्र्य दिन : रोमानिया
मुक्ती दिन : जर्सी, गर्न्सी व ईतर चॅनेल द्वीपे.
१८७३ : जागतिक महामंदीची व्हिएन्नात सुरुवात. ही मंदी पॅरिस, बर्लिन व न्यू यॉर्कपर्यंत झपाट्याने पसरली व तिच्या झळा जगभर लागल्या. ती १८९६पर्यंत चालली.
१८७४ : मुंबईत प्रथम घोड्यांची ट्राम सुरु झाली.
१९४१ : एका जर्मन बोटीतले 'एनिग्मा' सांकेतिक संदेशयंत्र ब्रिटिशांच्या हाती पडले. अॅलन ट्यूरिंग आणि इतर संशोधकांनी त्याद्वारे जर्मन संदेशांचे कोडे उकलले.
१९५० : युरोपियन युनियनची सुरुवात होण्यासाठी महत्त्वपूर्ण 'शूमन डिक्लरेशन' सादर झाले.
१९५५ : शीतयुद्ध - प. जर्मनीचा नाटोमध्ये प्रवेश. त्याच वर्षी सोव्हिएत रशियानं वॉर्सॉ करारांतर्गत नाटोविरोधात आपली फळी उभारली.
१९५८ : अल्फ्रेड हिचकॉकचा 'व्हर्टिगो' चित्रपट प्रदर्शित.
१९६० : अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या विकण्यास परवानगी. तोंडावाटे घेण्याच्या संततीनियमनाची प्रथम विक्री.
१९७० : व्हिएतनाम युद्धाविरोधात अमेरिकेच्या राजधानीत एक लाखापर्यंत लोकांनी निदर्शने केली.
१९७६ : 'बादर-माइनहॉफ गँग' ह्या विद्रोही टोळीची सदस्य युलरिक माइनहॉफ हिनं तुरुंगात आत्महत्या केली.
२००१ : जगातील सर्वात लांब घरगुती वापराच्या गॅसची लाइन जामनगरपासून लोणीपर्यंत घालण्यात आली. याची लांबी १२४० किलोमीटर आहे.
२००२ : भारतातील अभिमत विद्यापीठांची संख्या ५५पर्यंत पोहोचली.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
मूल हवे असेल तर लग्न कारावेच.
मूल हवे असेल तर लग्न कारावेच. कारण "सिंगल पेरेंटींग" अवघड असावे असा कयास.
काही संभाव्य फायदे.
सर्वसाधारणपणे लोक लग्न कायदेशीर फायद्यांसाठी करतात असे वाटत नाही.
१) भाड्याच्या घरात रहाणे एखाद्या अर्थव्यवस्थेत अधिक आर्थिक सूज्ञपणाचे आहे हे माहित असूनही जेंव्हा लोक स्वतःचे घर घ्यायचा निर्णय घेतात यामागचे मुख्य कारण असते 'स्थैर्य'! असेच स्थैर्य लग्नसंस्थेच्या मुळाशी आहे असे मला वाटते. पुढे गरजा बदलतील त्याप्रमाणे नवीन घर घेण्याचा पर्याय असतोच पण भाड्याच्या घरात रहाताना घरमालकाच्या मर्जीप्रमाणे करार वाढवून मिळणार की नाही, भाड्याचा दर वगैरे जी अनिश्चितता असते ती स्वतःचे घर घेण्यात नसल्याने अनेक जण तो पर्याय निवडतात पण या निर्णयात बांधिलकी असते पण अनेकांसाठी ही बांधिलकीच महत्वाची असते. खालील अनेक मुद्द्यातही हा मूळ मुद्दा महत्वाचा ठरतो.
२) मुले जन्माला घालायची असतील तर त्यांना सुरक्षित बालपण देता यावे यासाठी ज्या नात्यात बांधिलकी आहे असे नाते निवडणे अनेकांना महत्वाचे वाटते. एखाद्याशी लग्न करताना निदान सुरवातीला तरी आता आपण कायमचे एकत्र राहू अशी वचने जाहीरपणे एकमेकांना दिली जातात आणि ज्यांची असे करण्याची तयारी असते तेच लग्न करतात अशी धारणा असल्याने लग्न हा अधिक स्थैर्य देणारा पर्याय म्हणून अनेकांना सोयीचा वाटतो.
३) मुले असल्यास एकत्र रहाणारे आईवडील हा आर्थिक दृष्ट्या सर्वात किफायतशीर पर्याय असतो, अर्थात लग्न न करताही एकत्र रहात असल्यास तेच साध्य होते पण लिव्हीन नात्यात विभक्त होणे अधिक सोपे असते.
४) दोघांच्या नावावर अर्धे कर्ज घेऊन मोठे घर विकत घेणे शक्य होते जे मुले असलेल्या जोडप्यांसाठी महत्वाचे असते. हा मुद्दा दोघेही कमावते असलेल्या स्त्री-पुरुषांसाठी लागू आहे. लग्न न करता असे कर्ज घेण्यात कायदेशीर अडचणी येऊ शकतात. नाते संपल्या वर त्या एकत्र घराचे काय करायचे आणि आर्थिक व्यवहार कसे वेगळे करायचे हे त्रासदायक काम होते. लग्न संपल्यावरही हेच प्रश्न तयार होतात पण वर लिहिल्याप्रमाणे लग्न संपण्यापेक्षा लिव्हिन संपण्याच्या शक्यता अधिक असतात.
५) 'लग्न कायमचे' अशी धारणा असल्याने वृद्धापकाळातही आपल्या बरोबर कोणीतरी असेल आणि शारीरिक आकर्षण संपले तरी सहजीवन कायम असेल ही कल्पना अनेकांना सुरक्षितता देते.
६) याचप्रकारच्या सुरक्षिततेतून मानसिक स्वास्थ्य मिळाल्याने असेल पण विवाहित स्त्रीपुरुष अधिक जगतात असे अलिकडे वाचल्याचे आठवते.
एकूण काय तर मुले नको असतील,सुरक्षितता ओव्हररेटेड वाटत असेल, बांधिलकी नको असेल, नात्यांच्या कायमपणावर विश्वास नसेल किंवा जोडीदाराबद्दल खात्री नसेल तर लग्नाच्या भानगडीत न पडलेलेच चांगले पण या गोष्टी हव्या असतील तर लग्न करणे हाही एक चांगला पर्याय असू शकतो. पोटगी, वारसाहक्क वगैरे गोष्टी आता फक्त लग्नापुरत्याच मर्यादित आहेत असे वाटत नाही.
अनेक मित्रमंडळी लग्न न करता एकत्र रहातात, काहींना मुलेही आहेत. काही मित्रमंडळींनी मुले होण्याआधी लग्न केले आहे. काहींनी मुले आहेत पण ते आता विभक्त झाले आहेत. त्यांच्यातली नाती केवळ त्यांनी लग्न केले आहे किंवा नाही आणि केले असल्यास का केले आहे वगैरेवरून न जोखण्याचा शहाणपणा आला आहे. दुसर्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे तुम्हाला काय हवे यात स्पष्टता हवी.
मूळ प्रश्नात "नोकरी करणार्या
मूळ प्रश्नात "नोकरी करणार्या स्त्रीला" असा जो सरसकटपणा आहे त्याचे भाग पाडायला हवेत असे वाटते म्हणजे जी काय उत्तरे येत आहेत त्यावरून एखादी स्त्री स्वतःचे इंडिपेण्डंट आर्थिक स्थैर्य विचारात घेऊन लग्न संस्थेचे मूल्यमापन करू शकेल.
[व्हाईट कॉलर व्यवसाय/नोकर्याच इथे धरल्या आहेत].
-छोट्याश्या ऑफिसमध्ये ५ हजार पर्यंत पगार
-कंपनीत १० ते १५ हजार पर्यंत पगार
-छोटा स्वतःचा व्यवसाय १५-२० ह्जारापर्यंत मासिक उत्पन्न
-व्यवसाय/नोकरी ३०-४० हजार पर्यंत उत्पन्न
-व्यवसाय नोकरी ५० हजार ते १ लाख दरम्यान उत्पन्न
-१लाख ते २ लाख उत्पन्न
-२ लाखापेक्षा जास्त उत्पन्न
या गटांमध्ये पालकांचा लग्न करणे/ न करणे याला संपूर्ण पाठिंबा असणे आणि नसणे हे उपगट होतात.
असे गट पाडल्यावर असे लक्षात येईल की प्रत्येक गटाच्या नोकरी करणार्या स्त्रीला वेगवेगळ्या प्रकारे विचार करावा लागेल. प्रत्येक गटातल्या स्त्रीचे आर्थिक स्वातंत्र्य/ताकद वेगवेगळी आहे आणि त्यामुळे लग्न करणे आणि लिव्ह इन करणे या पर्यायांचे इव्हॅल्युएशन रत्येक गटासाठी वेगळे येईल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
प्रतिसाद आवडला. मुळ शंका
प्रतिसाद आवडला. मुळ शंका विचारताना माझ्यासमोर अशी स्त्री होती जी प्रोस्पेक्टीव पुरुषाइतकीच कमवतेय, स्वतःची प्रॉपर्टी आहे आणि घरखर्च, बाकीचे खर्च बरोबरीने शेअर करायला तयार आहे, एकमेकांच्या मालमत्तेचे आकर्षण नाहीय. आता तिला लग्न करण्याने नक्की फायदे काय मिळणार?जर कायदेशीर फायदे दिसत नसतील तर त्यांनी लग्न का करावे? लिव्ह इन का करु नये? म्हणजे मग जसजशा मुली शिकु कमवु लागतील तशी लग्नसंस्था रिडंडंटच होत जाइल ना?
किंवा लग्नाशी संबंधित
किंवा लग्नाशी संबंधित कायद्यांमधे सुधारणा तरी होतील.
उदाहरणार्थः पत्नीच्या संमतीशिवाय शरीरसंबंध ठेवणे हा तूर्तास लग्नात गुन्हा नाही. ते कलम सुधारलं की लग्न नि लीव्हइनमधली एक गॅप मिटली.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
+
>>मुळ शंका विचारताना माझ्यासमोर अशी स्त्री होती जी प्रोस्पेक्टीव पुरुषाइतकीच कमवतेय,
पुरुषाइतकी कमावणारी असली तरी दोघे १०००० च कमावतात असे असेल तर वेगळा विचार आणि दोघे १००००० कमावतात तर वेगळा विचार होईल (स्वतःची प्रॉपर्टी असली तरी.
दोघे १००००च कमावत असतील तर सहसा खर्च वाटून घ्यायला तयार नाही अशी शक्यता निर्माणच होत नसावी.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
जोडिदार
जोडिदार कायदेशीर रित्या स्त्रीला बांधला जातो. तो इतर स्त्रीकडे जाउ शकत नाही ही कायदेशीर सोय नाही का?
(नेहमी आपल्या दावणीला बांधलेला नवरा. नवर्याची हक्कने घेतलेली भक्ती/एकपत्नीव्रतता)
.
.
वरच्या कोर्टाच्या उदाहरणात बाहेरचे जोडिदार दिसतात. पण त्या खूप स्पेसिफिक केसेस असाव्यात.
इतरत्र नवर्याचे बाहेर अफेअर आहे हे कळले तर कायदेशीर काएअवाई शक्य असावी.
नसली, तरी बाहेर अफेअर असणे हे घटस्फोटास पुरेसे कारण असल्यने, आणि घटस्फोटानंतर अधिकांश वेळा पैसे/संपत्ती देण्याची वेळ
पतीवरच येत असल्याने तो असले दु:साहस करण्याची शक्यता कमी होते.कॉस्ट्-बेनिफिटचा विचार करुन आहे त्या बायकोतच चालवून घेण्याची
भूमिका पतीला घ्यायची वेळ येते. कुरकुरणारी चाके कुरकुरत त्याच गाडीला जोडलेली राहतात त्याप्रमाणे.
हा मुद्दा वर आला असणे शक्य आहे. मला पुन्हा सगळी चर्चा वाचणे अशक्य आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
जोडिदार कायदेशीर रित्या
स्त्रीपेक्षा "एकमेकांना बांधले जातात" हे अधिक योग्य ठरावे. (स्त्रीचे बाहेरचे संबंधसुद्धा घटस्फोटाला पुरेसे कारण आहे, अश्यावेळी हे संबंध सिद्ध झाल्यास प्रसंगी पोटगीतून सुट मिळू शकते)
अन् होय ही लग्नाची 'प्रॉपर्टि' आहे. सोय/गैरसोय ते तुम्हीच ठरवा बॉ!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
या विषयावर एक मजेशीर कोटेशन
या विषयावर एक मजेशीर कोटेशन वाचले होते - माझ्या व नवर्याच्या घटस्फोटाचे मूळ धार्मिक विचार्भिन्नतेत होते. त्याला वाटे तो देव आहे, पण मला तसे वाटत नसे.
पाने