Skip to main content

कथा

A Midsummer Night's Dream

A Midsummer Night's Dream
संध्याकाळचे पाच वाजले कि माझी पाउलं शेट्टीच्या हॉटेलकडे वळतात. शेट्टीच्या हॉटेलमध्ये माझे एक खास टेबल आहे. शेट्टीला हे माहित आहे. मी येईपर्यंत तो त्या टेबलावर रिझर्वडची पट्टी लावून ठेवतो. त्या टेबलावरून मला रस्त्यावरची रहदारी पहायला आवडते. तसेच हॉटेलात बसलेल्या काही लोकांचेही दर्शन होते. त्यांना पाहून विचारांची गाडी स्वैर धावू लागते. किती शिकला असेल, कुठे नोकरी करत असेल, आपल्या आयुष्यात हा सुखी समाधानी असेल का?
ह्या विचारांना काही अंत नाही.

ललित लेखनाचा प्रकार

पाकिस्तान- १२

युद्धात शस्त्रापेक्षा शस्त्र कोण चालवत आहे हे महत्त्वाचे असते. जेव्हा पाकिस्तानी लष्कराने लाहोर आघाडीवर हल्ला करायला सुरुवात केली तेव्हा भारतीय लष्कराकडे कोणता पर्याय होता? त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले होते, तसेच रस्तेही बंद करण्यात आले होते. त्याचवेळी त्यांना अखनूर (काश्मीर) वाचल्याची बातमी मिळत होती. पाकिस्तानी वायुसेना लाहोर आघाडीवर जोरदार हल्ला करत होती, त्यामुळे भारतीय लष्कर आपली पोझिशन बदलत होते. पाकिस्तानच्या युद्ध इतिहासात मेजर जनरल निरंजन प्रसाद यांच्या पलायनाचे चित्रण मोठ्या चवीने केले जाते.

ललित लेखनाचा प्रकार

पाकिस्तान - ११

लाहोर भारतासाठी विशेष महत्त्वाचे नव्हते. लाहोर जिंकणे हा ना कधी अजेंडा होता ना सैन्याने कधी प्रयत्न केले.

ललित लेखनाचा प्रकार

पाकिस्तान -१०

.
चार वर्षा आधी (2020), इम्रान खानच्या एका विधानाने ट्विटरवर वादळ उठले होते. तो म्हणाला होता, “जेव्हा भारतीय क्रिकेट संघ खेळायला आला होता, तेव्हा नाणेफेक करताना मला त्यांच्या कर्णधाराची कीव यायची. त्याला पराभवाची भीती वाटायची.”

ललित लेखनाचा प्रकार

पाकिस्तान-८

“आम्ही काश्मीरसाठी हजार वर्षे लढू. आम्हाला गवत खावे लागले तरी चालेल. आम्ही अणुबॉम्ब बनवू.”

- झुल्फिकार अली भुट्टो.

ललित लेखनाचा प्रकार

पाकिस्तान- ७

.

“पाकिस्तानने भारताला सहज पराभूत केले आणि केवळ संयुक्त राष्ट्रांच्या युद्धविरामामुळे युद्ध थांबले."
- जेम्स विनब्रँड (1965 कच्छ रण युद्धासंबंधी. पाकिस्तान आणि मध्य आशिया तज्ञ)

"कोण जिंकतो आणि कोण हरतो याने काय फरक पडतो? त्यांना कश्मिर हवे होते. ते मिळाले का? नाही. आम्ही आमच्या सीमांचे रक्षण केले. आम्ही तर हल्लाही केला नव्हता की जिंकणे महत्त्वाचे ठरले असते.”
- ब्रिगेडियर चित्तरंजन सावंत.
.

ललित लेखनाचा प्रकार

राधेभय्या आणि कंपासबॉक्स मधली भूमिका चावला

आठवीत आमच्या क्लासमध्ये "राधेभय्या" होता. म्हणजे त्याचं खरं नाव काहीतरी कृनाल की कुणाल होतं पण त्याला सगळेच राधेभय्याच म्हणायचे. तो दिसायला अप्सरा पेन्सिल सारखा सरळसोट. हडकुळा. अंगावर कुठेही उंचसखलता नाही. बेंबीच्या खालपर्यंत पॅन्ट घालायचा. पोटाच्याखाली दोन बाहेर आलेल्या टोकदार हाडांवर ती पॅन्ट लोंबकळायची. व्यवस्थित धुतलेल्या आणि इस्त्री केलेल्या त्याच्या शर्टचा एक भाग बाहेर आणि एक आत राहायचा. चालताना पाठीला किंचित बाक आणून चालायचा. दर महिन्याला नवीन कुठल्यातरी हटके रंगाचा गॉगल घेऊन यायचा. कधी टायच्या नॉट मध्ये तर कधी बेल्टला गॉगल अडकवायचा.

ललित लेखनाचा प्रकार