Submitted by गोल्डन ब्राऊन on रविवार, 22/09/2019 - 14:37
मी शिक्षण घेतलेल्या कोर्सची मुलं नव्वद पंचाण्णव टक्के सरकारी नोकरीत जात असत. माझंही शिक्षण पूर्ण झाल्यावर मला सरकारी नोकरी मिळाली. माझे क्लासमेट उच्च पदांवर वेगवेगळ्या खात्यात क्लास थ्री पासून ते सुपर क्लास वन अधिकारी बनले होते.
मी एका तालुक्याच्या ठिकाणी नोकरी करत होतो. सोबतच शेजारच्या गावचा माझा बॅचमेट व जवळचा मित्र नोकरी करत होता.
Submitted by बिपीन सुरेश सांगळे on गुरुवार, 19/09/2019 - 21:40
ठाकठोक
मी तसा ओके आहे .
फक्त एक गोष्ट सोडता . मला जास्त आवाज आवडत नाही . सहनच होत नाही.
पण वरच्या मजल्यावरची ती जीवघेणी ठाकठोक ! ती बाई हे सारं मुद्दाम करते .
मला त्रास द्यायला. छळायला.
यावर काहीतरी उपाय काढायलाच हवा; नाहीतर मी मरून जाईन असं वाटतं.
Submitted by अविनाशकुलकर्णी on बुधवार, 18/09/2019 - 21:03
एका फेसबुक्याचा मृत्यू -एक काल्पनिक कथा
-------------------------------------------------
तसा रूढ अर्थाने तो लेखक नव्हता
वाचन अनुभव प्रवासा मुळे त्याचे व्यक्तिमत्व बहुगामी बनलं होते
तो फेसबुकावर आला अन त्यानं एक कथा पोस्ट केली
लोकांना ती आवडली
कॉमेंट्स व लाईक्स चा वर्षाव झाला
कॉमेंट्स व लाईक्स च्या वर्षावाने त्याचा आत्म विश्वास वाढला
व तो नियमाने लेखन करू लागला
अनेक समुह होते त्यात पण त्याने सदस्यता घेतली व लिहू लागला
तिथे पण त्याचे लेखन आवडू लागले
त्याचा आत्मविश्वास पक्का झाला
Submitted by अविनाशकुलकर्णी on बुधवार, 18/09/2019 - 20:58
चिन्मय चित्रे हा एक स्वछदि मुक्त जीवन जगणारा तरुण होता
आई जानकी चित्रे सरकारी कार्यालयात ऑफिसर होती व नुकतीच सेवानिवृत्त झाली होती
चिन्मय फेसबुक वॅट्स अप चे मित्रमंडळ या मध्ये रमला होता
पार्ट्या सहली खाणे पिणे मजेत आयुष्य जगत होता
आयुष्य मजेत जगायचं हे त्याचे जीवन विषयक तत्वज्ञान होता
कामिनी साने ची प्रोफाइल त्याने फेसबुकावर पाहिली अन तो बेहोष झाला
तिने अप लोड केलेले फोटो तो तास न तास बघत बसत असे
कामिनी सौंदर्य वती होती
कधी जीन व स्लिव्हलेस टॉप कधी गर्भ रेशमी साडी -तर कधी ड्रेस - असे फोटो ती अप लोड करत असे
Submitted by नील on मंगळवार, 17/09/2019 - 02:02
आज मला कसंतरीच होतंय.
बऱ्याच वर्षांनी आज कोणतरी खास मित्र/ बायको/ गर्लफ्रेंड/ भाऊ-बहीण/ आई-बाबा पाहिजे होतं असं राहून राहून वाटतंय.
म्हणजे खरंतर लहानपणापासून बरीच वर्षं मी एकटाच राहिलोय.
आई मला जन्म देतानाच गेलेली, आणि बाबूजी मी पाच वर्षांचा असतानाच गेले... आत्महत्या केली त्यांनी.
नंतर सगळं शिक्षण पाचगणीला बोर्डिंग मध्ये... अमेरिकेत ग्रॅज्युएशन.. रिसर्च...
एव्हढी सगळी वर्षं एकटाच तर होतो मी.
आणि एकटेपणाची खतरनाक सवय होते हो...
आख्खच्या आख्ख डेअरी-मिल्क एकट्यानी खायची,
घरी नागडं फिरायची,
Submitted by देवदत्त on सोमवार, 16/09/2019 - 19:43
मह्या आणि मी छोट्या शिशुपासूनचे दोस्त, पण काल मी पळून गेलो नसतो तर त्याने मला जाम बदडला असता.
थोडी लांब स्टोरी आहे भेंजो. पाच नंबर बिल्डिंगमधली निकिता मह्याला आवडते. म्हणजे दुरून उसासे टाकण्याइतपत. (साला तिचं नाव बोलता यावं म्हणून इतिहासाच्या पुस्तकातला ख्रुश्चेव्हचा पॅरा घोकत बसायचा - निकिता ख्रुश्चेव्हनी स्टॅलिनचा पंथ संपवला का कायतरी.) तर तिला इम्प्रेस कसं करायचं? मह्या तसा चारचौघांसारखा. शिक्षण, नोकरी सगळं ठीकठाक पण शाईन मारण्यासारखं काही नाही. हां, पठ्ठ्या क्रिकेट मस्त खेळतो भेंजो. कव्हर ड्राईव्ह अगदी उजव्या हातानी खेळणाऱ्या लारासारखा. आणि ऑफस्पिनपण बरी टाकतो.
Submitted by गोल्डन ब्राऊन on शुक्रवार, 13/09/2019 - 19:22
मधुरा ही आमच्या गल्लीतल्या बाळू भटाची मुलगी. बाळू बामणाला बापू आणि मधुरा ही दोन मुले. मधुरा बापूपेक्षा पाच वर्षांनी मोठी होती. बाळू भट गावात व आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये सत्यनारायणाची पूजा, श्राध्दं, पंचांग सांगणं, भुमीपुजनाचे मुहूर्त काढून देणं, लग्न लावणं अशा कामांसाठी डिमांड असलेलं व्यक्तिमत्व होतं. भाग सधन शेतकरी, व्यापारी लोकांचा असल्यानं लोकंही भरपूर दानदक्षिणा द्यायचे. पैसे आणि शिधा वेगळा. कधी कापड, भांडी सुध्दा मिळायची.
Submitted by सामो on मंगळवार, 10/09/2019 - 13:42
.
Submitted by अविनाशकुलकर्णी on गुरुवार, 08/08/2019 - 08:23
दर्पण
..........
गावात स्वामी आल्याची बातमी हळुहळु पसरु लागली.
नगरी च्या बाहेर असलेले भग्न शिवमंदीर..तेथे फारशी वर्दळ नसायची..
त्याच परिसरात स्वामी नी एक पर्ण कुटी बांधली होति..बाजुलाच एक झरा वहात होता.
त्याने तो परिसर स्वछ्य केला...व तिथेच त्याचा मुक्काम होता..
बाजुलाच एक विशाल वट्वृक्ष होता.. बाजुला बांधलेला पार खचायला आला होता...
त्या वर बसुन त्या वृक्षाखाली त्याची साधना चालु असे.
स्वामीचे व्यक्तिमत्व पण गुढ पण आवडावे असेच होते....
गोरापान देह..चेहे~यावर मार्दव व डोळ्यात अपार करुणा ..
मात्र हसणे निश्किल असे होते...
Submitted by अविनाशकुलकर्णी on गुरुवार, 08/08/2019 - 07:59
लग्न..एक लोक कथा..
एकाचे लग्न परगावातील मुली बरोबर ठरले....
व-हाड मुलीच्या गावाला निघणार असते..घरात लगबग चालू असते..
घरात म्हातारी आज्जी असते..लग्नाच्या धामधुमीत तिच्या कडे कोण लक्ष देणार? त्यांतून परमुलुख..त्या मुळे आज्जी ला तुला प्रवास झेपणार नाही..वय झाले असे सांगून घरी ठेवण्याचे ठरते..
घरात एक किशोर वयीन नात असते तिचे आज्जी वर खूपं प्रेम असते..
तिच्या सारे लक्षात येते..ती आज्जी ला पोत्यात लपवते .व व-हाडा संगे बरोबर घेते...
व-हाड वेशी पर्यंत येते...मुलीकडचे लोक्स स्वागता साठी /सिमांत पूजांना साठी हजर असतात.....
पाने