इतिहास

भारत-पाक १९६५ युद्ध....त्रोटक आणि विस्कळित माहिती

१९६५ चे भारत पाक युद्ध सुरु कसे झाले?

पार्श्वभूमी:-
१९६०चे दशक एक वेगळेच समीकरण जागतिक राजकिय पटलावर मांडत होते. शीतयुद्धाला रंग चढत होता. NATO च्या छत्राखाली अमेरीकन समर्थक देश व कम्युनिस्टांच्या लेबलखाली तत्कालीन USSR म्हणजे रशियाचे समर्थक अशी कधी छुपी तर कधी उघड स्पर्धा सुरु होती. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळताच अमेरिकेने स्वतः मैत्रीचा हात पुढे करत भारतात अमेरिकन तळ मागावायचा प्रयत्न केला. भारताने तो फेटाळुन लावल्यावर राजकिय दृष्टीने अमेरिकेच्या मनात भारताविषयी अढी निर्माण झाली ती पुढे कित्येक दशके वाढतच गेली. इतरही कारणे त्यास होतीच.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

मुंबईतील काही रस्त्यांची आणि जागांची नावे - भाग १

सॅम्युएल टी. शेपर्ड नावाच्या इंग्रज लेखकाने लिहिलेले 'Bombay Place Names and Street Names’ अशा नावाचे आणि आणि १९१७ मध्ये छापलेले एक पुस्तक माझ्यासमोर आले. मुंबईच्या रस्त्यांची आणि जागांची २०व्या शतकाच्या दुसर्‍या दशकात काय नावे होती आणि त्या नावांमागे काय इतिहास दडलेला आहे अशी बरीच मनोरंजक माहिती त्यामध्ये आहे. बहुतेक माहिती दक्षिण मुंबई आणि जवळचे भायखळ्यासारखे भाग येथील रस्त्यांबाबत आहे कारण पुस्तकाच्या इंग्रज लेखकाचे राहणे-फिरणे ह्याच भागात होत असणार. ह्या माहितीपैकी बारीकसारीक गल्ल्याबोळ सोडून सर्वसामान्यत: कोणाहि वाचकास परिचित वाटतील अशा माहितीचे संकलन करून एक लेखमालिका लिहिण्याचा विचार आहे आणि त्यातील पुढील लेख पहिला असून इंग्रजी आद्याक्षरे अ आणि ब इतकी त्याची व्याप्ति आहे. लेखाची तयारी करतांना संदर्भासंदर्भाने अन्य पुस्तके, विशेषत: डॉ.जे.गर्सन दा कुन्हा ह्यांचे Origin of Bombay, एस.एम.एडवर्ड ह्यांचे The Rise of Bombay ही दोन पुस्तक आणि जालावरील समोर आलेली माहिती ह्यांचाहि उपयोग येथे करण्यात आला आहे.

शेपर्ड ह्यांनी आपल्या पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी रावबहादुर पी.बी.जोशी आणि आणि आर.पी.करकारिया अशा दोन माहितगार हिंदुस्तानी व्यक्तींच्या माहितीचा हवाला दिला आहे. ह्यांपैकी रावबहादुर पी.बी.जोशी ह्यांच्याविषयक त्रोटक उल्लेखांशिवाय काहीच माहिती गूगलशोधात मिळाली नाही परंतु सिद्धेश्वरशास्त्री चित्राव ह्यांनी संकलित केलेल्या अर्वाचीन चरित्रकोशाच्या खंड २, पान २९९ येथे ह्यांच्याबाबत थोडीफार माहिती मिळते. पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी (१८५६-१९३०) हे मुंबईमधील एक अभ्यासू इतिहाससंशोधक गृहस्थ आणि मराठी लेखक होते. बर्‍याच अन्य संशोधकांनी त्यांच्याकडून मिळालेल्या साहाय्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केल्याचे आढळते. ह्यांना एशिऍटिक सोसायटीने ’कॅंबेल मेडल’ देऊन गौरविले होते. ह्यांची स्वत:ची राहण्याची जागा ’बनाम हॉल लेन’ मध्ये होती असा उल्लेख शेपर्ड ह्यांनी त्या लेनच्या संदर्भात केलेला आहे हे पुढे ’बनाम हॉल लेन’शी संबंधित भागामध्ये येईलच. रुस्तुमजी पेस्तनजी करकारिया हे असेच एक पारशी माहितगार गृहस्थ. ह्यांचीहि विशेष माहिती मिळत नाही पण ह्यांनी लिहिल्या बर्‍याच पुस्तकांचे त्रोटक उल्लेख गूगलशोधात दिसतात. स्वत: शेपर्ड ह्यांनी लिहिलेल्या 'The Byculla Club 1833-1916' आणि 'Bombay' अशा नावांच्या अन्य दोन पुस्तकांचा उल्लेख गूगलशोधामध्ये दिसला.

पुस्तकातील माहिती येथे संकलित करतांना मी दोन चाळण्या लावलेल्या आहेत. ब्रिटिश सत्तेखालील मुंबईतील हॉर्नबी, मेडोज, फ्रेअर अशी रस्त्यांची नावे स्वातन्त्र्योत्तर काळात बहुतेक बदलली गेली आहेत आणि त्या जुन्या नावांचा उल्लेख आताच्या वाचकाला बुचकळ्यात टाकतो. रस्त्यांना नावे देणारे हे पूर्वकालीन प्रतिष्ठित कोण होते ह्याची माहितीहि शोधू पाहणार्‍यास सहज जालावर सापडते. ह्या कारणांसाठी अशा रस्यांची नावे येथे वगळली आहेत. जुन्या किल्ल्याच्या उत्तर भागातील भुलेश्वर-भायखळा-परळ अशा भागातील लहानसहान रस्ते त्या परिसराशी परिचय असणार्‍यांनाच माहीत असतात, इतरांना त्या त्या नावांवरून काहीच बोध होत नाही. अशी नावेहि येथे वगळण्यात आली आहेत. आजहि वापरात असलेल्या आणि मुंबईची सर्वसामान्य ओळख असणार्‍या व्यक्तीस माहीत असू शकतील अशाच स्थानांच्या वा रस्त्यांच्या नावांना ह्या संकलनात जागा दिली आहे. मुंबईचे माहितगार वाचक ह्यामध्ये अजून भर घालू शकतील.

१) अल्टामॉंट वा अल्टामाउंट रोड आणि ऍन्स्टी रोड- खंबाला हिलवरील उच्चभ्रू वस्तीच्या अल्टामॉंट वा अल्टामाउंट रोड ह्या रस्त्याचे नाव त्यावर एकेकाळी असलेल्या ’अल्टामॉंट’ नावाच्या बंगल्यावरून पडलेले आहे. हा बंगला कोणी बांधला, तेथे कोण राहत असे, बंगल्याचे पुढे काय झाले अशी काही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही पण १८६५ पर्यंत तो जागेवर होता. जेम्स डग्लसलिखित Glimpses of Old Bombay ह्या पुस्तकात पान ४७ वर हा बंगला १८६५ साली रु.१००० भाडयाने दिला गेल्याचा उल्लेख आहे.

मुंबईतील जुने प्रख्यात वकील टी.ई.ऍन्स्टी (१८१६-७३) ह्यांचे नाव ऍन्स्टी रोड ह्या रस्त्यास मिळाले आहे.

२) अलेक्झॅंड्रा, लॅबर्नम आणि सिरस (Cirrus) मार्ग - ह्या तिनांपैकी लॅबर्नम रोड प्रसिद्ध आहे आणि शेजारच्या चित्रात दिसत आहे. त्याच्याच जोडीला अलेक्झॅंड्रा आणि सिरस अशा नावाचे त्याला समान्तर असे दोन रस्ते होते. हे तिन्ही रस्ते बॉंबे इंप्रूवमेंट ट्रस्टने ह्या भागाची नव्याने आखणी करतांना निर्माण केले आणि त्यांना तीन फुलझाडांची नावे दिली. पैकी अलेक्झॅंड्रा आणि सिरस ही नावे कोठल्या फुलझाडांसाठी आहेत हे लवकरच विसरले गेले कारण ही फुलझाडे इतकी प्रसिद्धहि नव्हती. स्वातन्त्र्यानंतरच्या नावे बदलण्याच्या लाटेत ह्या दोन रस्त्यांना वाच्छागांधी आणि काशीबाई नवरंगे ह्यांची नावे मिळाली. (काशीबाई पं. रमाबाईंसारख्याच ख्रिश्चन शैक्षणिक चळवळीत होत्या आणि तो भाग ह्या कार्यासाठी आजहि प्रसिद्ध आहे.) तिसर्‍याचेहि नाव बदलले जायचे पण लॅबर्नम म्हणजे अमलतास अथवा बहावा. हे नाव कोठल्या साहेबाचे नाव नसून एका फुलाचे आहे हे वेळीच लक्षात आल्यामुळे तेवढे मात्र वाचले!

३) अपोलो गेट/बंदर - मुंबईच्या किल्ल्याच्या दक्षिणेस असलेल्या गेट आणि बंदराला हे नाव का पडले असावे ह्याबाबत अनेक तर्कवितर्क आहेत. Bombay City Gazetteer Vol I मधल्या अंदाजानुसार जुन्या काळात ’पाल-पालव’ नावाच्या देशी नौका तेथे नांगरलेल्या असत त्यावरून हे नाव पडले असावे. गर्सन दा कुन्हा ह्यांनाहि हाच अर्थ जाणवतो.

४) ऍंटॉप हिल - ह्या नावाच्या उगमाबद्दल मतमतान्तरे आहेत. रा.ब. जोशींच्या मते ’अंतोबा’ हे नाव मुंबईच्या जुन्या रहिवाशांमध्ये लोकप्रिय होते आणि ह्या टेकडीचा भाग कोणा अंतोबाच्या मालकीचा असावा. नंतर पोर्तुगीज काळात हे सूत्र विस्मरणात जाऊन नावाचा कालान्तराने ’ऍंटॉप हिल’ असा अपभ्रंश झाला.

५) ऍश लेन, ओक लेन आणि टॅमरिंड लेन - तीन झाडांची नावे ह्या तीन छोटया रस्त्यांना मिळाली आहेत. त्यांपैकी ओक लेन नक्की कोठे होती हे आता गूगलला समजत नाही, जरी त्या भागाच्या पोस्टमनांना ते माहीत असावे कारण अनेक जागांच्या पत्त्यांमध्ये अजूनहि तिचा उल्लेख गूगलशोधामध्ये दिसतो. बाकीचे दोन रस्ते शेजारच्या चित्रात दिसत आहेत.

त्यांपैकी ऍश लेन ह्या नावाचे कोडेच आहे कारण त्या भागात कधीकाळी एखादे ऍशचे झाड असल्याचा उल्लेख नाही. तसेच ऍश हे झाड मुंबईच्या दमट हवेत वाढू शकेल काय ह्याचीहि खात्री नाही. टॅमरिंड लेन ह्या नावाला मात्र निश्चित कूळकथा आहे.लेनच्या थोडया उत्तरेला असलेल्या सेंट थॉमस कॅथीड्रल आणि बॉंबे ग्रीन ह्यांच्या मध्यावर एक चिंचेचे झाड होते. तेथे आधी चिंचेची बरीच झाडे होती पण अखेर एकच उरले होते आणि त्याच्या सावलीत सार्वजनिक लिलाव चालत असत. भाडयाने गाडया चालवणार्‍यांच्या शब्दात त्या जागेला ’आमली आगळ - चिंचेसमोरची जागा’ असे नाव होते. (’आमली आगळ’चा ह्याच अर्थाने उल्लेख गर्सन दा कुन्हा ह्यांच्या Origin of Bombay ह्या पुस्तकाच्या पान ५९ वरहि मिळतो.) हे शेवटचे झाड नोवेंबर १८४६ मध्ये तोडले गेले. त्याची आठवण आता केवळ रस्त्याच्या नावात उरली आहे.

६) बॅरक रोड/स्ट्रीट २९ आणि मरीन लाइन्स ९८. शेपर्ड ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार बॅरक स्ट्रीट नावाचा रस्ता बझार गेट स्ट्रीटपासून मिंट रोडच्या मध्ये होता. ईस्ट इंडिया कंपनीकडे स्वत:चे नेटिवांतून भरती केलेले सैनिक होतेच पण ब्रिटनमधील राजाचे गोरे सैनिकहि त्यांचा खर्च देऊन कंपनी आपल्याकडे ठेवत असे. अशा सैनिकांच्या राहण्याच्या जागेला ’King's Barracks' असे म्हणत असत आणि ही जागा किल्ल्याच्या भिंतीभाहेर एस्प्लनेड मैदानाच्या उत्तर अंगाला होती. त्यांचे नाव ह्या रस्त्यास मिळाले आहे. सध्याच्या गूगलमधील नकाशात एक बॅरक रोड दिसत आहे पण तो बझार गेट स्ट्रीटच्या जवळपास कोठेच नाही. अशी शक्यता वाटते की कंपनीच्या स्वत:च्या चाकरीत असलेल्या नेटिव सैनिकांच्या बॅरक्स येथे असू शकतील.

१८३० सालापर्यंत कंपनीची ’बॉंबे मरीन्स’ नावाची लढाऊ नौसेना होती आणि नंतर तिचेच वेळोवेळी इंडियन नेवी, रॉयल इंडियन नेवी असे नाव बदलत गेले. ह्या नौसैनिकांच्या बॅरक्सवरून त्या भागाला मरीन लाइन्स हे नाव पडले आहे.

७) बॅंक स्ट्रीट - हॉर्निमन सर्कल (जुने एल्फिन्स्टन सर्कल) येथून दक्षिणेकडे निघणारा रस्ता. १८६५ च्या कापूस घोटाळ्यात जुनी बॅंक ऑफ बॉंबे बुडाली. पुनर्रचित बॅंक ऑफ बॉंबे आपल्या नव्या इमारतीत १८६६ साली गेली. ती इमारत ह्या रस्त्यावर होती आणि रस्त्याला ’बॅंक स्ट्रीट’ हे नाव मिळाले. १९२१ साली नव्या इंपीरियल बॅंकेत ही बॅंक १९२१ मध्ये विलीन झाली. इंपीरियल बॅंकेचा पुढचा अवतार म्हणजे सध्याची स्टेट बॅंक ऑफ इंडिया होय.

८) बाबुला टॅंक, बाबुला टॅंक रोड आणि डोंगरी जेल - बाबुला टॅंक नावाची जागा अजूनहि खाली दाखविलेल्या गूगल मॅपच्या तुकडयामध्ये भुलेश्वर-उमरखाडी भागात दिसत आहे पण तेथे सध्या कोठलाच तलाव नाही. शेजारच्या १८८२ सालच्या सर्वे नकाशात मात्र तलाव दिसत आहे आणि तलावाजवळ एक जेल आणि जेल रोडहि दिसत आहे. त्यापैकी जेल आता तेथे नाही कारण त्याच्या जागी ’आशा सदन’ ही स्त्रियांसाठीचे आसराघर दिसत आहे. कोल्हापूरचे कारभारी माधवराव बर्वे ह्यांनी गुदरलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात निकाल विरुद्ध जाऊन मराठा आणि केसरीचे मुखत्यार अनुक्रमे आगरकर आणि टिळक ह्यांना १८८२ साली जेथे १०१ दिवस तुरुंगवासात काढावे लागले तेच हे डोंगरी जेल. टिळकांची १९०८ साली मंडालेला पाठवणी झाली तेव्हाहि तेव्हाहि त्यांना पुण्याहून आणून येथेच ठेवले होते. हा भाग थोडा उंचवटयाचा असल्याकारणाने त्यास डोंगरी म्हणत असत.

बाबुला टॅंक हा तलाव कोणा उदार व्यक्तीने १८४९ साली मुंबईकर रहिवाशांना पाणी पु्रवण्यासाठी खोदला आणि १९०७ पर्यंत तो तेथे होता. १९०७ साली तो बुजवण्यात आला आणि आता त्याचे नावच काय ते उरले आहे. त्या भागात एकेकाळी असलेल्या बाभळीच्या झाडांवरून त्या तलावास हे नाव पडले असे दिसते. १८८२ च्या नकाशात बाबुला टॅंक रोडहि दिसत आहे त्याचे आता रामचंद्र भट मार्ग असे नामकरण झाले आहे असे दिसते.

९) बाबुलनाथ मंदिर आणि बाबुलनाथ मार्ग - बाबुलनाथ मंदिराला ते नाव का पडले ह्याबद्दल आर.पी. करकारिया ह्यांचे मत असे की बाबुल नावाच्या एका सुताराने येथे शिवलिंगाची स्थापना केली आणि त्यावरून देवळाचे नाव बाबुलनाथ असे पडले. मंदिराच्या पुजार्‍यांचा ह्याला पाठिंबा आहे. उलटपक्षी रा.ब. जोशी म्हणतात की बाबलजी हिरानाथ नामक सोमवंशी क्षत्रिय ज्ञातीतील गृहस्थाने हे देऊळ निर्माण केले आणि त्याच्या नावावरून देवळास बाबुलनाथ म्हणतात. मूळचे देऊळ १७८० चे असून सध्याचे देऊळ तेथेचे १९०० साली बांधण्यात आले आहे. देवळावरून जाणारा बाबुलनाथ रस्ता इंप्रूवमेंट ट्रस्टने १९०१ साली बांधून कॉर्पोरेशनच्या ताब्यात दिला.

१०) बापू खोटे स्ट्रीट आणि किका स्ट्रीट - बापू खोटे हे नाव हिंदु माणसाचे वाटते पण ह्या रस्त्याचे बापू खोटे हे त्या भागातील बर्‍याच मालमत्तांचे मालक असलेल्या एका कोंकणी मुसलमान व्यक्तीवरून पडले आहे. ते प्रसिद्ध हकीमहि होते अशी समजूत आहे. जगजीवन किका ह्यांच्याबद्दल नावापलीकडे काही अन्य माहिती उपलब्ध नाही.

११) बलराम रोड आणि बॅप्टी रोड - बलराम रोडचे नाव रा.ब. येल्लप्पा बलराम (१८५०-१९१४) ह्या तेलुगु व्यक्तीवरून वरून पडले आहे. त्यांचे राहते घर ह्या रस्त्यावर होते. मुंबई-पुणे-कराची येथील इंग्रज सैन्याला घाऊक प्रमाणावर दूध पुरवण्याच्या व्यवसायातून ह्यांचे आजोबा आणि वडील मुंबई-पुण्याकडे आले. येल्लप्पा ह्यांनी दुधाचा व्यवसाय बंद करून बांधकाम कंत्राटे घेण्यास सुरुवात केली. १८५६-६० ह्या काळात विहार तलाव बांधल्यानंतर मुंबईला पाणी पुरविण्यासाठी शहरातील उंच ठिकाणांवर साठवणीचे तलाव बांधून तेथपर्यंत विहारचे पाणी पंपाने पोहोचविण्याची सोय करण्यात आली. त्यांपैकी एक तलाव माझगाव भागातील भंडारवाडा टेकडीवर निर्माण करण्यात आला. त्याचे बांधकाम हे येल्लप्पा बलराम ह्यांचे विशेष काम मानले जाते. (ह्या तलावाच्या जागी आता जोसेफ बॅप्टिस्टा उद्यान उभे आहे.)

बॅप्टी रोडचे नाव जेम्स बॅप्टी ह्यांच्यावरून पडले आहे. ह्या भागात त्यांची पिठाची गिरणी आणि केकसाठी प्रसिद्ध असलेली बेकरी होती.

१२) बनाम हॉल लेन - रा.ब.जोशींचे राहते घर ह्या गल्लीतच होते. तिच्या नावाबाबत त्यांनी पुरविलेली मनोरंजक माहिती अशी. ह्या जागी प्रथम असलेल्या नारळांच्या वाडीमध्ये एक घर होते आणि त्याला ’वन महाल’ अथवा ’बन महाल’ असे ओळखत असत आणि त्या घरावरून गल्लीला बन महाल लेन असे ओळखत असत. मुंबईचे कमिशनर ऍकवर्थ (१८९०-९५) हे रजेवर इंग्लंडला गेले होते आणि ते माल्वर्न गावात आपल्या ’बेनहम हॉल’ नावाच्या घरात राहात होते. तेव्हा त्यांच्याकडे मुंबईहून काही पत्रे आली ज्यावर ह्यावर ह्या गल्लीचा पत्ता होता. गल्लीच्या आणि त्यांच्या घराच्या नावातील साम्यामुळे त्यांना असे वाटले की ह्या गल्लीचे नाव बेनहम हॉलवरून ठेवावे. त्यांची सूचना अर्थातच (!) मंजूर होऊन गल्ली ’बेनहम हॉल लेन’ झाली आणि त्याच नावाचे रूपान्तर देशी लोकांच्या बोलण्यात ’बनाम हॉल लेन’ असे झाले.

गूगल मॅप्सला ही गल्ली दिसत नाही पण बर्‍याच जागांच्या पत्त्यांमध्ये हिचा उल्लेख सापडतो म्हणजे पोस्टमनांना ती निश्चित माहिती आहे. गिरगावातील डी.डी. साठे मार्गाच्या आसपास ती असावी असे वाटते.

१३) बझार गेट स्ट्रीट, गनबो स्ट्रीट, अग्यारी लेन, बोरा बझार स्ट्रीट - १८६२ साली किल्ल्याची भिंत पाडण्याच्या वेळी जमीनदोस्त झालेल्या दरवाज्याच्या नावावरून बझार गेट स्ट्रीट हे नाव पडले आहे. किल्ल्याच्या उत्तर सीमेपलीकडे नेटिवांची वस्ती, म्हणजेच ’बझार’ (Black Town) आणि भिंतीमध्ये बझार गेट नावाचे दार - खरे तर तीन दारे, एक मोठे व दोन लहान, नेटिव त्याला ’तीन दरवाजा’ म्हणत असत - होते.

गनबो स्ट्रीटबाबत दोन गोष्टी उपलब्ध आहेत. एकीनुसार जगन्नाथ शंकरशेट ह्यांचे एक पूर्वज गणबा ह्यांच्या मालकीची जमीन ह्या भागात होती आणि त्याचे नाव ह्या रस्त्यास मिळाले आहे. दुसरीनुसार गनबावा नावाच्या मुस्लिम फकिराच्या नावाची विहीर ह्या परिसरात होती. गनबावाच्या नावावरून रस्त्याला हे नाव मिळाले आहे. गनबावाची विहीर नंतर केव्हातरी बुजविण्यात आली पण आपण ती पाहिली असल्याचे दिनशा वाच्छा ह्यांनी आपल्या मुंबईच्या आठवणींमध्ये नोंदवले आहे.

अग्यारी लेन हे नाव माणकजी नौरोजी सेठ ह्यांनी १७३३ साली तेथे बांधलेल्या अग्यारीवरून आलेले आहे. मुंबईच्या पूर्व किनार्‍याकडील ’नौरोजी हिल’ ह्या नावाने ओळखली जाणारी आणि ’डोंगरी’ अशा मूळच्या नावाची उंचवटयाची जागा ह्यांच्याच मालकीची होती. अग्यारीची पुनर्बांधणी १८९१ मध्ये करण्यात आली.

बोरा बझार स्ट्रीट हे नाव मुळात बोहरा बझार स्ट्रीट असे आहे आणि त्या भागात मोठया प्रमाणात राहणार्‍या बोहरा जमातीवरून ते नाव पडलेले आहे.

१४) बोरी बंदर - जी.आय.पी रेल्वे रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा ह्या भागातील समुद्रातील खडक आणि वाळूचे उथळ भाग काढून टाकून रेल्वेच्या कामासाठी इंग्लंडहून येणारे जड लोखंडी सामान उतरवून घेण्यासाठी एक बंदर १८५२ साली तयार करण्यात आले आणि ह्या जागी मूळच्या असलेल्या रानवट बोरीच्या जंगलावरून त्याला बोरीबंदर असे नाव पडले. नंतर ह्याच जागी रेल्वे गाडया सुटण्याचे जे स्टेशन तयार झाला त्यालाहि तेच नाव चालू राहिले. नंतर येथेच एक नवी भव्य इमारत उभारून १८८७ साली ती वापरात आणण्यात आली आणि विक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाच्या ५०व्या वर्षाच्या प्रसंगाने तिला विक्टोरिया टर्मिनस - VT - हे प्रसिद्ध नाव मिळाले. तत्पूर्वी वापरात असलेल्या मूळच्या बोरीबंदर स्टेशनाचे चित्र येथे दर्शवीत आहे.

१५) बॉंबे - मुंबई - ह्या शब्दाच्या उगमाबाबत आता फारसा वाद उरलेला नाही असे वाटते. मुंबईचे मूळचे रहिवासी कोळी ह्यांची देवी मुंबा अथवा मुंबाई हिच्या नावावरून १६व्या शतकापासून उपलब्ध युरोपीय भाषांमधील उल्लेखांमध्ये ह्या गावाचे नाव Bombaim अथवा त्याचीच रूपान्तरे Mombayn (1525), Bombay (1538), Bombain (1552), Bombaym (1552), Monbaym (1554), Mombaim (1563), Mombaym (1644), Bambaye (1666), Bombaiim (1666), Bombeye (1676), Boon Bay (1690) असे उल्लेखिलेले सापडते. (संदर्भ विकिपीडिया http://en.wikipedia.org/wiki/Mumbai)

ह्या Bombaim शब्दाच्या उगमाबाबत दोन परस्परविरोधी मते आढळतात. पहिले मत म्हणजे हा शब्द ’मुंबाई’ ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. दुसरे मत म्हणजे ब्रिटिशांपूर्वी ह्या बेटांवर अधिकार असलेले पोर्तुगीज ह्या जागेस Bom Bahia (Bombahia) (Good Bay) असे म्हणत असत आणि त्याचे अपभ्रष्ट रूप म्हणजे ’मुंबई’. १९व्या शतकातील एक अधिकारी अभ्यासक डॉ. जे. गर्सन दा कुन्हा ह्यांनी ह्या दोन मतांची विस्तृत चर्चा आपल्या Words and Places in and about Bombay (Indian Antiquary, Vol III, 1874, p. 248) ह्या लेखामध्ये केली आहे आणि शब्दाचा उगम ’मुंबाई’कडे लावला आहे. Bombahia विरुद्ध त्यांचा प्रमुख आक्षेप असा आहे की Bom हे विशेषण पुल्लिंगी असून Bahia हे नाम स्त्रीलिंगी आहे आणि त्यामुळे Bombahia हे व्याकरणात बसणारे रूप नाही. ते Boabahia असे असावयास हवे होते पण तसा उपयोग कोठेच आढळत नाही.

मुंबादेवी मंदिर चित्र.

१६) ब्रीच कॅंडी, हॉर्नबी वेलार्ड आणि लव ग्रोव - १७७१ ते १७८४ ह्या काळात मुंबईचे गवर्नर असलेल्या विल्यम हॉर्नबी ह्यांनी लव ग्रोव ते महालक्ष्मी ह्या भागातून आत घुसणारे समुद्राचे पाणी थांबविण्यासाठी बांधलेल्या बांधास हॉर्नबी वेलार्ड असे नाव होते. बांध अशा अर्थाच्या vallado ह्या पोर्तुगीज शब्दाचे हे इंग्रजी रूप आहे. सध्या ह्याचे नाव लाला लजपतराय मार्ग असे आहे. हा बांध घालण्याच्या पूर्वी भरतीचे पाणी आत शिरून पूर्वेकडील उमरखाडीपर्यंत खारी दलदल निर्माण करीत असे. तिच्या जागी पक्की जमीन करण्याच्या विचाराने हॉर्नबी ह्यांना हा बांध घालावयाचा होता पण लंडनमधील कंपनीचे डिरेक्टर बोर्ड त्या खर्चाला तयार नव्हते. आपल्या मुदतीच्या अखेरच्या दिवसात हॉर्नबी ह्यांनी हे काम सुरू केले आणि बोर्डाकडून त्याला मिळालेली नामंजुरी मुंबईत पोहोचण्यापूर्वीच ते पूर्णहि केले.

ह्याच्या उत्तरेला असलेला लव ग्रोव भाग तेव्हा मुंबईपासून दूर आणि एकान्ताचा असल्याने प्रेमी जोडप्यांना तेथे जाऊन निवान्तपणे प्रेमालाप करता येत असत ह्यावरून त्या भागास लव ग्रोव हे नाव पडले. नंतर सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी तीच जागा योग्य म्हणून निवडली गेल्याने तिच्या जुन्या रोमॅंटिक संदर्भाला काही अर्थ उरलेला नाही.

ब्रीच कॅंडी ह्या नावाच्या उगमाविषयी निश्चित असे काही सांगता येत नाही पण महालक्ष्मीच्या देवळाबाहेरील समुद्र खडकाळ असल्याने त्या भागात समुद्रकिनारा तुटल्यासारखा होता म्हणून त्यास ’ब्रीच’ म्हणू लागले अशी उपपत्ति बहुतेक ठिकाणी दिलेली आढळते. ’कॅंडी’चा संबंध ’खिंड’ ह्या मराठी शब्दाशी जोडला जातो.

१७) भायखळा - ह्या नावाचे दोन अर्थ सुचविण्यात आले आहेत. अन्य लेखकांच्या आधारे गर्सन दा कुन्हा ह्या नावाचा उगम बहावा - बावा (कुणबी भाषेत) - भाया (कोळी अपभ्रंश) आणि खळे (जागा) असा दाखवतात. बहावा म्हणजे अमलतास, Cassia fistula. येथे असलेल्या बहाव्याच्या झाडांवरून भायखळे हे नाव पडले असावे. रा.ब.जोशी हा अर्थ अमान्य करीत नाहीत पण ’भाया नावाच्या व्यक्तीच्या मालकीची जागा’ असा अन्य अर्थ सुचवितात. ह्या झाडाचे चित्र खाली दर्शवीत आहेत.

मुंबईची वाढ होऊ लागल्यानंतर तेथील प्रतिष्ठित उच्चपदस्थांची घरे भायखळ्यात उभी राहू लागली. भायखळ्याला एक प्रशस्त स्टेशनहि बांधण्यात आले खाली चित्र येथे दाखविले आहे. Byculla Club हा इंग्रजांसाठी राखीव क्लब १९१६ साली बंद पडेपर्यंत येथेच होता.

१८) भेंडी बझार - ह्या भागात एकेकाळी मोठया संख्येने असलेल्या भेंडीच्या झाडांवरून ह्या भागाला भेंडी बझार हे नाव निर्माण झाले आहे. भेंडीच्या झाडाचे वनस्पतिशास्त्रीय नाव Thespesia populnea असे आहे. ते समुद्र जवळ असलेल्या जागी चांगले वाढते आणि एक शोभेचे झाड मानले जाते. त्याला मोठी पिवळी फुले येतात. Indian Tulip, Portia, पारस पिंपळ ही त्याची अन्य काही नावे. (खायची भेंडी ही नव्हे.) पुढे भेंडी बझार रस्त्याचे एक जुने चित्र आणि भेंडीच्या झाडाचे एक चित्र अशी दोन चित्रे दर्शविली आहेत.

(चित्रश्रेय - येथील रंगीत चित्रे विकिपीडियावरून घेण्यात आली आहेत आणि नकाशे गूगल मॅप्सवरून. उर्वरित चित्रे प्रताधिकारमुक्त जुन्या पुस्तकांमधून मिळवलेली आहेत.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 

दोन नैसर्गिक आपत्ती आणि भारत-पाकिस्तान सीमा

भारत आणि त्याच्या पश्चिमेला असलेला पाकिस्तान यांच्यामध्ये 700 पेक्षा जास्त किलोमीटर लांबीची व उत्तर-दक्षिण पसरलेली सीमा आहे. या पैकी जम्मू-कश्मिर मधला प्रत्यक्ष ताबा रेषेचा भाग सोडला तर बाकीची सीमा 1947 मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या देशाच्या फाळणीमुळे झालेली असल्याने ती नद्या किंवा पर्वतराजी या सारख्या नैसर्गिक भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार धरून आखलेली सीमा नाही. मात्र याच सीमारेषेचा नैऋत्येकडचा, पूर्व-पश्चिम असा पसरलेला भाग मात्र फाळणीच्या किमान एक शतकापासून तरी अधिक काळ नैसर्गिक आपत्तींमुळे अस्तित्वात आलेला आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

१९४३ची मुंबई.

जालावर http://cbi-theater-10.home.comcast.net/ ह्या संस्थळावर मला १९४३ सालच्या दक्षिण मुंबईची त्रोटक माहिती देणारे एक ३०-पानी पुस्तिका मिळाली. येथे ती पूर्ण दाखवीत आहे.

दुसर्‍या महायुद्धातील CBI Theatre म्हणजेच China-Burma-India Theatre ह्या भागातील युद्धामध्ये भाग घेण्यासाठी आणण्यात आलेले अमेरिकन, ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड मधील सैनिक मुंबई बंदरात उतरल्यावर त्यांचे मुंबईतील काही दिवसांचे वास्तव्य सुरळित पार पडावे अशा हेतूने त्यांना दक्षिण मुंबईची तोंडओळख करून देणे हा ह्या पुस्तिकेचा हेतु आहे. पुस्तिकेची निर्मिति तेव्हाचे मुंबई इलाख्याचे गवर्नर रॉजर लम्ली ह्यांची पत्नी कॅथेरीन अध्यक्ष असलेल्या Hospitality Committee ने केली आहे आणि मुंबईत व्यवसाय करणार्‍या काही कंपन्यांनी त्या पुस्तिकेचा खर्च केला आहे. पुस्तिकेच्या प्रारंभालाच गवर्नमेंट हाउसच्या स्टेशनरीवर लिहिलेले आणि अध्यक्षबाईंची स्वाक्षरी असलेले पत्र पुस्तिकेचा हेतु स्पष्ट करते.

पुस्तिका चाळणे म्हणजे ६०-७० वर्षापूर्वीच्या काळात डोकावण्याची खिडकी उघडण्यासारखे आहे. दक्षिण मुंबईतील सैनिकांना उपयुक्त जागा (Services Rest Room, Seamen's Institute, Green's Restaurant, Shandy Tavern), सिनेमाची थिएटरे (Capitol, Empire, Excelsior, Metro, Regal - बहुतेक आजहि चालू आहेत), पोहण्याचे तलाव (ब्रीच कॅंडी फक्त युरोपियनांसाठी!), ट्रॅम-बसचे मार्ग, प्रेक्षणीय स्थळे (हॅंगिंग गार्डन - बस रूटस् E,H, विक्टोरिया गार्डन्स - बस रूटस् A,G, प्रिन्स ऑफ वेल्स म्यूजियम - बस रूटस् A,B,C,D) असे आता विसरलेले बरेच तपशील येथे दिसतात. वस्तूंच्या किंमती पाहण्यासारख्या आहेत. गोल्ड-फ्लेक, प्लेयर्स आणि वुडबाइन सिगरेट्सची १० ची पाकिटे ४॥, ३॥ आणि २ आण्यांना, अर्ध्या बाह्यांचा खाकी शर्ट २रु १५आ, बसचे तिकीट २ मैलांना १ आणा, टॅक्सी मैलाला ८ आणे अशा आज विश्वास ठेवता येणार नाही अशा किंमती पाहण्यास मौज येते.

पुस्तिकेच्या शेवटास दक्षिण मुंबईचा नकाशा जोडला आहे. क्रुकशॅंक रोड (महापालिका मार्ग), कारनॅक रोड (लोकमान्य टिळक मार्ग), क्वीन्स रोड (महर्षि कर्वे मार्ग), हॉर्नबी रोड (दादाभाई नौरोजी मार्ग), जीआयपी रेल्वे ( सेंट्रल रेल्वे), बीबीसीआय रेल्वे (वेस्टर्न रेल्वे) अशी विस्मृतीत गेलेली नावे तेथे दिसतात. (ह्यात मला एक गोष्ट बुचकळ्यात टकणारी दिसते. रस्त्यांची सर्व नावे जुनीच असतांना जुन्या एस्प्लनेड रोडलाच केवळ महात्मा गांधींचे नाव कसे? १९४३ साली ब्रिटिश सत्ताधारी मुंबईतील एका मोठया रस्त्याला गांधींचे नाव, आणि तेहि महात्मा ह्या पदवीसह देतील हे शक्यच नव्हते. माझ्या समजुतीनुसार हा नावाचा बदल १९४७ नंतर लगेचच करण्यात आला पण तेव्हा अन्य नावे बदलली नव्हती. म्हणजेच हा नकाशा १९४७ नंतरचा असून कोणीतरी पुस्तिकेला जोडून दिल्यामुळे पुस्तिकेबरोबरच येथे उपलब्ध झाला आहे. नकाशा सैनिकी वापरासाठी तयार करण्यात आला आहे हे उघड आहे कारण दक्षिण मुंबईच्या उत्तरेकडील सर्व भागास 'Out of bounds' करण्यात आले आहे. कॅंटोनमेंटच्या पलीकडील सर्व ’नेटिवां’च्या भागातील वेश्यावस्तीपासून सैनिकांना दूर ठेवण्यासाठी त्याच्या हद्दीवर Out of bounds च्या पाटया लावण्याची ब्रिटिश पद्धतच होती.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक २

भाग १
पुजालोच्या खाजगी आयुष्याबद्दलः-
त्याने शाळा अर्धवट सोडली होती. अनेक लहानमोठी कामे तो शिकला होता. कधी हार्डवेअरच्या दुकानात काम कर तर कधी पोल्ट्री फार्म शिक असे त्याचे सुरु होते. वडलांनी मागे थोडिफार संपत्ती सोडली होती. पण स्पॅनिश युद्धादरम्यानच्या काळात तिथल्या कामगारांनी ताब्यात घेतली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक १

सत्य कल्पना करु शकाल त्याहून थरारक, विचित्र असतं असा एक वन लायनर फार पूर्वीपासून ऐकत आलोय. त्या फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत असे पूर्वी वाटे. पण एक सत्यकथा हाताला लागली आणि काहीही तिखट मीठ न लावता जे जसं आहे ते तसं मांडलं तरी ते किती थरारक, रोमांचकारक, विचित्र आणि धम्माल गंमतीशीरही असू शकतं हे अनुभवलं. एक बरचसं अनवट, अल्पपरिचित किंवा अपरिचित असलेलं भूतकाळातलं पान जे जसं आहे ते जवळपास जशाला तसं भाषांतरीत करतोय विकिपिडियातून.
.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

संस्कृत दिनाच्या शुभेच्छा!

कालिदास-भासादि कवीनां-
काव्यसृष्ट-मधुघटमाला
यत्पानेन च मुग्धा रसिका
मधुरसदात्री सखिबाला

जीवशिवैक्यं दर्शयमाणा
सद्य:परनिर्वृतयेsर्हा
कृत्वा पानं तृप्ता भवन्तु
संस्कृत भाषा मधुशाला||

अनुवाद:

कालिदास औ' भास-बाण की
काव्यसृष्ट मधुघटमाला
पीकर रसीया छलक उठे; यह
मधु वितरती साक़ीबाला

जीव और शिव एक दिखाती
त्वरित हर्षप्रद होती है
पियो जी भर आप इसे; यह
संस्कृत भाषा मधुशाला ||

धाग्याचा प्रकार निवडा: : 

ऊर्जेची गणिते ४: धोक्याची घंटा - २

कधी ढगफुटी होते. नदीला पूर येतो. पाण्याचा महाप्रचंड लोंढा घोंघावतो. आणि आपल्या वाटेत येणाऱ्या हजारो लोकांना वाहवून नेतो. काही काळ प्रलय होतो, आणि नंतर पुन्हा पूर्ववत प्रवाह सुरू होतो. पाण्याचे लोंढे डोळ्याला दिसतात. त्यांचा आवेग जाणवतो. रौद्र रूपाची भीती वाटते. ढगफुटी - पाण्याचा प्रवाह - गेलेले जीव ही साखळी स्वच्छपणे मांडता येते. तीवर कोणी शंका घेऊ शकत नाही. कधी कधी मात्र विचारांची ढगफुटी होताना दिसते. आणि त्यांच्या प्रवाहात लाखो जीव वाहून जातात. अठराव्या शतकाच्या अंतकाळात जी विचारधारा उगवली तिने असेच अनेक बळी घेतले. आता तो प्रवाह पुन्हा पूर्ववत झालेला आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - इतिहास