गद्य

लग्ने अशी होत.

महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय समाजातील - म्हणजे मुख्यत्वेकरून बामणं आणि ’ती’ मंडळी, म्हणजे सीकेपी, सारस्वत इत्यादि - ह्यांचे लग्नसोहळे गेल्या दीडदोनशे वर्षांमध्ये कसे बदलत गेले हे पाहणे हा मोठा मनोरंजक विषय आहे. अगदी जुन्या काळातली, म्हणजे १००-१५० वर्षांपूर्वीची ७-७ दिवस चालणारी लग्ने, त्यातील हुंड्यांच्या, रुसव्याफुगव्यांच्या गोष्टी, लग्नातले विधि, अंगावर चुळा टाकण्यापासून दातांनी लवंग तोडण्यापर्यंतचे आंबटशोकीन प्रकार येथून प्रारंभ करून सध्याची ’हम आपके है कौन’ धर्तीची संगीत, जिजाजींचे जोडे लपविणे, फेटे बांधणे, बारात असल्या थेरांनी साजरी होणारी पंजाबी स्टाईल लग्ने येथपर्यंत सर्वांचे सिंहावलोकन करून कोणी सिद्धहस्त लेखक उत्तम पुस्तक तयार करू शकेल पण तितका वकूब माझ्यात तरी नाही.

मी गेल्या ७०-७५ वर्षांमध्ये पाहिलेले बदल नोंदवून ठेवण्याचे कामच मी येथे करणार आहे. ही नोंदहि खूपच अपुरी असेल ह्याची मला खात्री आहे. इतरांनीहि आणखी भर घातल्यास एक मनोरंजक जंत्री तयार होईल अशा अपेक्षेने ही लेखनकामाठी मी करत आहे. माझी माहिती ही जवळजवळ दळिद्री ते खाऊन-पिऊन सुखी, चाळकरी ते वाड्यातले भाडेकरू इतपत मगदूराच्या मध्यमवर्गीय कुटुंबांमधील लग्नांसंबंधी आहे. मला आठवणार्‍या काही जुन्या गोष्टी:

१) घरचेच पूजा सांगणारे भटजी, काही ढालगज भवान्या, रिटायर्ड पेन्शनर प्रकारचे लोक मध्यस्थी करून नावे सुचविणे, टिपणे इकडून तिकडे देणे अशी अगदी पहिल्या टप्प्यावरची कामे उरकत असत. मुलगी गृ.कृ.द. (गृहकृत्यदक्ष), मुलगा सालस स्वभावाचा, नाकासमोर पाहून चालणारा, सरकारी कायम नोकरीवाला आहे असे निर्वाळे दिले-घेतले जात. हे मुलगा/मुलगी सांगून येणे. (हिंदीमध्ये ’बात चलाना’.)

२) तदनंतर ’मुलगी पाहणे’ हा कार्यक्रम उभयता आईवडिलांकडे वा कोणा नातेवाइकाकडे होई. पहिल्याच फटक्यात जमले असे नशीब बहुश: कोठल्याच मुलामुलीचे नसे. दोनचारापासून डझनावारी वेळा ह्यातून जावे लागे. अगदी जुन्या काळात ’मुली, चालून दाखव पाहू’ येथपासून चाचपणी केली जाई. मुलाचे हस्ताक्षर पाहिले जाई. ’चहापोहे हिनेच केले आहेत’ किंवा ’समोरचा बाळकृष्ण हिनेच भरला आहे’ असा मुलीच्या पाककौशल्याचा वा गृ.कृ.द. पणाचा पुरावा दाखवून दिला जाई.

३) ह्यानंतरचे महत्त्वाचे पाऊल म्हणजे देण्याघेण्याच्या बैठकीचे. दोन्ही पक्ष आपापले मुत्सद्देगिरीसाठी नाव कमावलेले कोणी काका, मामा, मावसोबा ह्यांना Chief Negotiator म्हणून नेमत असत. पुढच्या खोलीत पुरुष आणि उंबर्‍यापलीकडे स्त्रीवर्ग असे पक्ष आमनेसामने उभे राहात. काहीवेळ आमचे घराणे कसे नावाजलेले आहे, आमचे अमुकतमुक नातेवाईक कसे उच्च सरकारी अधिकारी - म्हणजे बहुधा मामलेदार, प्रान्त वा तत्सम असे ’भाऊसाहेब’ ह्या सार्वत्रिक उपाधीने ओळखले जाणारे - आहेत अशी खडाखडी झाल्यावर मुख्य कुस्ती सुरू होई. हुंडा देण्याची कितपत ऐपत आहे असा अंदाज घेऊन आपली मागणी वरपक्ष मांडत असे आणि ’नाही हो, आमची इतकी उडी नाही’, ’ऐपत नव्हती तर मुलगी दाखविलीच कशाल” असे वार एकमेकांवर टाकल्यावर आणि अखेर हुंडा आणि वरमाईचा मान, अन्य नातेवाईकांचे मानापमान, आमची इतकी पाने, तुमची किती असल्या हुलकावण्या देऊन झाल्या की याद्या होत. ज्यावर दोन्ही बाजूचे मुत्सद्दी आणि आईवडील सह्या करत. लगोलग गुरुजींना विचारून, कार्यालय कसे उपलब्ध आहे, सुट्या कशा आहेत वगैरे तपशील तपासून लग्नाची जागा आणि तारीख-मुहूर्त ठरत असे.

४) आता लग्नाचे कापडचोपड, दागिने, निमंत्रणे पाठविण्यासाठी पत्ते जमा करणे, निमन्त्रणपत्रिका छापून घेऊन त्या पाठविणे, लग्नाचा फराळ तयार करणे अशी कामे घरातल्या घरातच पार पडत. ओळखीचा आचारी बोलावून ’इतक्या माणसांच्या स्वैपाकाला काय साहित्य लागेल’ असा अंदाज घेण्यात येई. TurnKey पद्धतीची मंगलकार्यालये उघडण्यापूर्वी लहान गावातील लग्ने घरच्याघरी मांडव घालून आणि पुण्यासारख्या शहरांमधून छोट्यामोठ्या वाड्यांमधून निघालेल्या Cottage Industry वजा कार्यालयांमधून होत असत. स्वैपाकाला आचारी आणि मेहनतीला एखादा गडी ह्यांच्या मदतीने घरातीलच महिलामंडळ जेवणावळी उठवत असे.

५) लग्नाच्या पत्रिका हा मजेदार प्रकार होता. सर्वात वर छापखानेवाल्याकडे असतील ते छपाईच्या ब्लॉकवरील गणपति. आत्तासारखे designer गणपति कोणालाच ठाऊक नव्हते. एकंदरच पत्रिका ठराविक मजकूराच्याच असायच्या. समोरासमोर घडी घातलेली दोन पाने आर्टपेपरवर छापलेली आणि छोट्या पाकिटात बसतील इतकीच. काही कल्पक लोक पाकिटालाहि फाटा देऊन पत्रिकेवरच तिकीट चिकटवत असत. हातकागदाच्या, designer, तीनचार पानांच्या पत्रिका कोणी पाहिल्याच नव्हत्या. पत्रिकेमध्ये डाव्या बाजूस 'सौ बाईसाहेब ह्यांस' असा मायना आणि अखेरीस 'लेकीसुनांसह लग्नास अवश्य यावे अशी विनंति बायकांच्या बाजूने असे. उजव्या बाजूस मुख्य पत्रिका. त्यामध्ये घरातील सर्वात वडिलधार्‍या व्यक्तीने निमंत्रण पाठविले आहे असा सूचक मजकूर. शेवटी सह्यांमध्ये विवाहित मुलगे आणि त्यांच्या बायका इतकेच असायचे. लहान मुलांना वगैरे तेथे स्थान नसे. केवळ एका पत्रिकेत 'बाबांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वांनी लग्नाला यायचं हं' अशी छोट्या मंडळींची आर्त विनवणी वाचली आहे. हे निमंत्रण ’इष्टमित्रांसह’ असे पण म्हणून त्यावरून चार टवाळ मित्र गोळा करून कोणी लग्नाला गेला असे ऐकलेले नाही. वधूच्या मागे ’चि.सौ.कां.’ (चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी) असे उपपद, ती ’सौ. होण्यापूर्वीचे म्हणून, लावत असत. दुसर्‍या युद्धापासूनतरी भारतात एकच Standard Time चालू आहे. तत्पूर्वी रेल्वेचा 'मद्रास टाइम' हा मुंबईच्या वेळेहून अलग असे. त्याची स्मृति मुहूर्ताच्या वेळेपुढे 'स्टँ.टा.' अशा अक्षरांमधून बरीच वर्षे नंतरहि टिकून होती. अगदी गरीब घरांमध्ये वेगळी पत्रिका छापून न घेता बाजारातील तयार पत्रिका, सुमारे १००-१२५ इतक्या, विकत घेऊन त्यामध्ये हाताने fill in the blanks मार्गाने मुलगा-मुलगी, आईवडील, लग्नाची तारीख आणि वेळ असा आवश्यक मजकूर हाताने भरून पाठवलेल्या पत्रिकाहि पाहिल्या आहेत. पत्ते लिहितांना योग्यतेनुसार चि., ती.स्व., रा.रा.’सौ., गं.भा., ह.भ.प., वे.शा.सं. इत्यादि उपपदे आठवणीने लिहिली जात.

६) निमंत्रण केवळ लग्नमुहूर्ताचेच असे. ज्यांना जेवणाचे आमंत्रण असेल ते प्रत्यक्ष भेटीतूनच अक्षता द्यायच्या वेळीच मिळे.

७) लग्नसोहळा एकूण सकाळ ते संध्याकाळ इतकाच. तेवढ्यातच 'श्रीमंतपूजना'पासून - सीमान्तपूजन - ते वरात आणि लक्ष्मीपूजन बसवून घेतलेले असे. 'वाङ्निश्चय' नावाचा मिनिसोहळा दुसरे लहान कार्यालय घेऊन करण्याइतके पैसे बहुतेक वधूपित्यांकडे नसतच. प्रत्यक्ष लग्नाच्या धार्मिक बडबडीमध्ये कोणालाच स्वारस्य नसे. धूर डोळ्यात जाऊन बेजार झालेले वरवधू आणि भटजी, आणि स्वरचित मंगलाष्टके म्हणण्यासाठी उत्सुक हौशी कवि/कवयित्री इतकेच जण काय चालले आहे ते पाहात असत. बाकी निमंत्रित मांडवात बसून ’नेहरूंचे काय चुकले’ टाइपच्या चर्चांनी कालक्रमणा करीत असत. दोन्ही पक्षांचे गोंडस ’राजू’ मांडवात धुमाकूळ घालून शिवाशिवी, लपंडावात करमणूक मिळवत असत. बायका एकमेकींच्या दागिन्यांचा आणि साड्यांचा लेखाजोखा मांडत बसलेल्या असत.

८) जेवणाखेरीजच्या निमंत्रितांना लग्नापाठोपाठ 'पानसुपारी' दिली जाई. त्यामध्ये कोठल्यातरी गोड सुपारीचे पुडे, झिरमिरीत कागदात गुंडाळलेला पेढा आणि एक कसलेतरी फूल इतकेच मिळे. घारातल्याच चुणचुणीत मुलांकडे हे काम सोपवले जाई.

९) लग्न लागताच आहेर देणार्‍यांची रांग उभी राही. नव्या जोडप्यामागे कोणी विश्वासू नातेवाईक सर्व आहेरांची वहीत नोंद करत बसलेला दिसे.

१०) लग्नाच्या मुख्य जेवणाच्या वेगळ्याच कथा. जवळजवळ १९६० पर्यंत रेशनिंग आणि अनेक गोष्टींच्या टंचाईमुळे, शास्त्रींच्या काळात आठवड्यातील एक दिवस उपास करण्याच्या आवाहनामुळे निमंत्रितांची संख्या मर्यादित असे. चाट ते चायनीज स्टॉल्स लावून कुंभमेळा भरविण्याची रीत अजून दूरच होती. मुख्य पक्वान्न अगदी जुन्या काळात केवळ बुंदी/मोतीचूर लाडू हे असे. नंतर जिलब्या आल्या. ७५-८० नंतर फ्रूट सॅलड आले. अजून कालान्तराने गुलाबजाम, आमरस ह्यांच प्रवेश झाला. दोन किंवा तीन पंक्ती बसत असत. पहिली लग्न लागताच ऑफिसला जायची घाई असलेल्यांसाठी, दुसरी सर्वसामान्य आणि तिसरी खाशांची. पंगत जमिनीवर पाट मांडून होई. सुरुवातीला दोन जण जेवणार्‍यांच्या कपाळावर तांबडे गंध लावण्याचे काम करीत असत. ह्यासाठी घरांमधून दोन चांदीच्य साखळ्या असत. एकाने ओला लेप हिंडवायचा आणि दुसर्‍याने त्यामध्ये साखळ्ञ बुडवून जेवणार्‍याच्या कपाळावर गंधाच्या दोन ओली लावायच्या. उभे वा आडवे असा option विचारला जाई. घरातील शाळकरी मुले पाणी वाढण्याच्या कामावर असत तर पोक्त बायका भात, वरण, आमटीभाजी, कोशिंबिरी, लाडूजिलब्या वाटण्याच्या कामावर. एकदा नव्या जोडप्याने पंक्तीमधून फिरून एकेक आग्रहाची जिलबी/लाडू प्रत्येक पानात घालण्याची पद्धत होती आणि तेव्हाच ’नाव घेणे’ हाहि नामांकित प्रकार होई. मुलीपाठोपाठ अन्य वडीलधार्‍या बायकाहि आपली ही हौस पुरवून घेत. त्याच पाणीवाल्या मुलांनी सुसंगति सदा घडॊ, हरीच्या घरी शेवया तूपपोळ्या, न मरे यास्तव नेला पर्वतशिखरासि लोटिला खाली, जगन्नाथे केले मज सकळ लोकांत बरवे असे श्लोक म्हणून आपल्या चुणचुणीतपणाचा पुरावा दाखवून द्यावा अशीहि अपेक्षा असे. पंगत संपता संपता तीच मुले पानापुढे विडे ठेवण्याच्या कामावर लावली जात.

११) ’Event Managemaent' हे शास्त्र अद्यापि जन्मले नव्हते. त्यामुळे ’Event Manager' वर सर्व धावपळ सोपवून दोन्ही पक्षाच्या बायकापुरुषांनी लग्न enjoy करायचे ही कल्पनाहि निर्माण झाली नव्हती. जवळजवळ सर्व कामे घरातीलच पुरुषबायका, ’नारायण’ टाईपचे लोक उरकत असत.

१२) संध्याकाळी 'रिसेप्शन' नावाचा प्रकार असे. मुख्य जेवणाचे आमंत्रण नसलेल्यांची ही सोय. तेथे बहुधा गोल्डस्पॉट सारखे पेय पहिल्या दिवसांत, नंतर आईसक्रीम असे बदल झाले. येथे आहेरहि १०-१५ रुपयांच्या मर्यादेतील असत. त्यामुळे ठराविक निरुपयोगी भेटवस्तूंचे चारचार सेट येऊन पडत - उदा. लेमन सेट, सुपारी-लवंग ठेवण्यासाठी लाकडी तबकात तबला-डग्गा.

१३) रिसेप्शन झाले की नव्या जोडप्याला कोणी वडीलधारी मंडळी जवळच्या देवळात नेऊन देवाच्या पाया पडण्याचा कार्यक्रम आवरून घेत.

१४) हे झाले की लग्नघरी दोन्ही पक्षाची निवडक मंडळीच उरत. तदनंतर हमसाहमशी रडून निरोप देण्याघेण्याचा ’जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा’ लाइनचा पाठवणीचा कार्यक्रम आणि तदनंतर ’ते कसे ग ते कसे, देव्हार्‍यातिल देव कसे असे गाणे जन्मभर गुणगुणण्यास ’नववधू’ (प्रिया मी बावरते फेम) सज्ज होई अणि एका नव्या कुटुंबाची पायाभरणी संपन्न होई.

ललित लेखनाचा प्रकार: 

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि

"तू फेसबुकवर जी कॉमेंट लिहिली आहेस, त्यामुळे तुझ्यावर बदनामीचा दावा ठोकता येऊ शकतो." एक मित्र मला फोनवर म्हणाला.
"बरोबर आहे तुझं. पण आता त्यानेच फेसबुकवर मेसेज टाकून आपल्या कृत्याची कबुली दिलेली आहे. तो प्रश्नच नाही. पण ही कॉमेंट लिहिताना मला ट्रंपवर आरोप करणाऱ्या बारा स्त्रियांबद्दल प्रचंड आदर वाटला. त्यांनी ज्या माणसावर आरोप केला तो माणूस प्रचंड श्रीमंत आहे आणि अमेरिकेतच राहतो. मी ज्याच्यावर आरोप केला तो माझ्याच आर्थिक गटातला आहे आणि भारतात राहतो. त्याने माझ्यावर दावा गुदरण्याची शक्यता किती, असा विचार मी मनात केला होता. असली 'गणितं' माझ्या डोक्यात कायमच होत असतात." मी उत्तर दिलं.

ललित लेखनाचा प्रकार: 

हम सब चोर हैं (आपण सर्व चोर)- एक जाणीव

आपल्या देशात ९४ टक्के आर्थिक व्यवहार रोख होतो. देशात फक्त १ टक्के लोक आयकर भारतात. त्यात हि ९० टक्के आयकर देणारे संगठीत क्षेत्रातले कर्मचारी आणि मजबूरी में इमानदार सरकारी बाबू आहेत. काय करणार सरकार न विचारता पगारातून आयकर कापून घेते. बाकी अधिकांश थोक आणि फुटकर व्यापारी आपला धंधा रोख करतात. मला आठवते, २०१३ मध्ये मुलीचे लग्न ठरले, चांदणी चौक येथे एका मित्राच्या ओळखीच्या दुकानात कपडे विकत घ्यायला गेलो. ज्या दुकानात रोज २५-३० लाखांचा व्यवहार होत होता, त्या दुकानदाराने डेबिट कार्ड नाकारले. ATM मधून पैशे काढून नगदी द्यावी लागली. निश्चितच हा दुकानदार आयकर भरत नसणार.

ललित लेखनाचा प्रकार: 

नोटा व्हाईट...दारु वाईट.....

दि. ८ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ८.४५
मन्याचा व्हाटसपवर मेसेज
५०० आणि हजारच्या नोटा बंद झाल्या.
मी: गप्पे कडू. फोटोशॉप आहे ते.
.
अर्ध्या तासात ५० मेसेज. वेगवेगळ्या चॅनेलचे.
च्यायला एवढे फोटोशॉप कोण करणार नाही.
खिशात पाहिले. ५०० च्या ४ आणि हजारची एक आहे फक्त.
रात्री तर काही करता येणार नाही नोटाबाबत आपल्याला.
जाउ द्या, जे सगळ्यांचे होईल ते आपले पण.
जास्त विचार करण्यात अर्थ नाही.
.
रात्री कन्फर्म मिळाली बातमी.
वाचून निवांत झोपलो विचार न करता.
.
दि. ९ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ७.००
पेपरमध्ये डिट्टेलच स्टोरी.
आता कॉमेडी मेसेज येताहेत. बारामती मेन टार्गेट. सेकंड मल्ल्या.
.

ललित लेखनाचा प्रकार: 

पुरोगाम्यांचा भयाण इतिहास

इस्लामबाबत पुरोगामी बोटचेपी भूमिका घेतात हा गंभीर आरोप असून त्यात तथ्य आहे असे आमचे मत होतेच. पण आता त्यात केवळ तथ्य नसून भयानक, दिल को दहला देनेवाल्या स्वरूपाचे तथ्य आहे याविषयी आमच्या मनात कुठलीही शंका नाही. हे प्रकरण वाटते तितके साधे सरळ नाही. अमेरिकेवरील हल्ल्यापूर्वी ओसामा बिन लादेन स्वतः पुण्यात येऊन गेल्याचे पुरावे अलिकडेच आढळले आहेत. इस्लामचे लांगूलचालन करणाऱ्या पुरोगाम्यांच्या मदतीनेच त्याने अमेरिकेवरील हल्ल्याची योजना आखली हे लवकरच सिद्ध होईल.

ललित लेखनाचा प्रकार: 

चिव काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट

ललित लेखनाचा प्रकार: 

समाजवाचक विधानांच्या शोधात

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत एका अँब्युलन्सला लोकांनी वाट करून दिली याचा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपवर कुणीतरी फॉरवर्ड केला होता. त्याचं कौतुक केलं होतं. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वेळीही अँब्युलन्सला लोकांनी वाट करून दिली याचं कौतुक वाचनात आलं. आम्ही मूळचेच नतद्र्ष्ट असल्याने यात कौतुक करण्यासारखं काय आहे असा प्रश्न आम्हाला पडला. अँब्युलन्सला वाट करून देणं तर अपेक्षितच आहे. याचं कौतुक होणार असेल तर लाल सिग्नलला जे उभे असतात त्यांचाही सत्कार करावा किंवा आजवर एकही बलात्कार न केलेल्या पुरुषांचा सत्कार करावा असं सुचवावंसं वाटलं. तरीही आम्ही प्रयत्न करून पाहिला.

ललित लेखनाचा प्रकार: 

डॉक्टर ए.आर. शहाणे आणि श्राद्धाचा ब्राम्हण

(रुपक कथा)

ललित लेखनाचा प्रकार: 

आतंकवाद अणि कठपुतली बाहुल्या (फ़िल्मी सितारे)

ललित लेखनाचा प्रकार: 

धूसर

जो तुफ़ानी दर्या से बगावत कर जाये वो इश्क
भरे दरबारमे जो दुनिया से लड जाये वो इश्क
जो मेहेबूब को देखे तो खुदा को भूल जाये वो इश्क

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य