Skip to main content

विज्ञान

हिरोशिमा नंतर ७० वर्षे

६ ऑगस्ट २०१५ पासून ७० वर्षांपुर्वी १९४५ साली जपान च्या हिरोशिमा शहरावर (अमेरिकेच्या कपटी हेरी ट्रुमन या राष्ट्राध्यक्षांनी परवानगी दिल्यावर) 'little boy' हा Uranium आणि ९ ऑगस्ट रोजी 'fat man ' हा plutonium बॉम्ब नागासाकी शहरावर टाकला. विध्वंस जास्तीत जास्त व्हावा यासाठी little boy हा जमिनीच्या वर २,००० फुटावरच फुटेन असा time केला होता आणि अपेक्षेप्रमाणे प्रचंड विध्वंस झाला. याबद्दल बरेच वाचनात आले असेल सगळ्यांच्या.
पण आता ७० वर्षांनतर काय परिस्थिती आहे?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

30 मीटर व्यासाच्या दूरादर्श प्रकल्पात भारताचा सहभाग

आंतर्राष्ट्रीय सहभागाने अंतरिक्ष निरीक्षणासाठी एक विशाल दूरादर्श अमेरिकेतील हवाई राज्यामधील सर्वात उंच म्हणून गणल्या गेलेल्या मौना की (Mauna Kea) या पर्वतावर स्थापन करण्यासाठी एक प्रकल्प नुकताच कार्यान्वित झाला आहे. या दूरादर्शामधील अंतर्गोल आरशाचा व्यास 30 मीटर एवढा विशाल होणार असल्याकारणाने या प्रकल्पाचे नामाभिधान "30 मीटर दूरादर्श" (TMT) असे करण्यात आले आहे. अशी अपेक्षा आहे की या दूरादर्शामधून शास्त्रज्ञाना 1300 कोटी (13 billion) प्रकाश वर्षे पूर्वीचे विश्व, बघणे शक्य होणार आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

भारतीय अध्यात्मावरील चालू संशोधन

अध्यात्मावरचे संशोधन सध्याला बंद झालेले आहे (आणि अध्यात्म केवळ भूलथापा देणार्‍या प्रतिगाम्यांचे बाहुले म्हणून उरले आहे ) असा काहीसा सूर ऐसीवर दिसला.
त्यावर उत्तर म्हणून मी स्वतः काही न वाचता जनरल गुगल लिंक दिली. या धाग्यावर स्वतः वाचलेल्या ऐकलेल्या लिंका देत आहे.

सध्याला या लिंक मधे वि़ज्ञानाकडे आणि अध्यात्माकडे पाहण्याचा दृष्टीकोन आय आय टी मद्रासच्या या लिंकमधल्या भाषणात आहे. ते मी स्वतः ऐकले आहे. स्लो आणि रटाळ आहे. पण विज्ञान आणि अध्यात्म यांचेकडे पाहण्याचा दृष्टीकोन समत्ववादी कसा असावा याचे हे उत्तम आहे. शिवाय अध्यात्माकडे हिनतेने का पाहू नये हे देखिल कळेल.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अ‍ॅकलेशिया कार्डिया - सुटका-४

लिक्विड डाएट वर घरी पाठवल्यावर आपण यावर चार आठवडे कसे काढणार असे वाटत होते. कारण खालचा अर्धवट घसरलेला स्टेंट अर्धा अन्ननलिकेत आणि अर्धा जठरात लोंबत होता. त्यामुळे जठरावरचा वॉल्व्ह कायमचा उघडाच राहिला होता. काहीही द्रव पदार्थ प्यायला की थोड्याच वेळांत गॅसेस होऊन ते वर येऊ लागत. अर्ध्या तासात ते कमी होत. त्यानंतरच पलंगावर आडवे होता येत असे. रात्रीच्या वेळी तर, दर दोन तासांनी जाग येऊन उठून बसावे लागे आणि दोन घोट पाणी प्यायल्यावर ढेकरा कमी झाल्यावर परत झोपता येत असे. तर अशा तर्‍हेने, चार आठवड्यांनंतर या क्षेत्रांतील एका तज्ञ डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळाली.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अ‍ॅकलेशिया कार्डिया -रोग व उपचार-३

अ‍ॅकलेशिया कार्डिया (Achalasia Cardia) हा एक अन्ननलिकेचा व त्याच्या जठरावरील जोडणीच्या मधे जो स्नायुंचा वॉल्व्ह असतो त्याच्या क्रिया नीट न चालण्याचा रोग आहे. साधारणपणे लाखांत एका माणसाला हा होतो. अन्ननलिकेच्या खालच्या व जठरावरच्या वॉल्व्हला Lower Esophagal Sphincter (LES) असे म्हणतात. आपल्या अन्ननलिकेची व या एलईएस ची हालचाल मोटर सेन्सर नर्व्हसमुळे होत असते. म्हणून आपण कुठलीही खाद्यवस्तु चावून गिळली की त्या घासाची अन्ननलिकेतली हालचाल खालच्या दिशेने आकुंचन्-प्रसरण या तत्त्वावर होते. त्याचवेळेस, खालचा वॉल्व्ह उघडतो आणि खाऊन झाल्यावर आपोआप बंद होतो. त्यानंतर जठराचे काम चालू होते.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अ‍ॅकलेशिया कार्डिया-एक जिवंत अनुभव-२

पूर्वसूत्रः - कोणीतरी परफोरेशन असे म्ह्टल्याचे ऐकू आले.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

HARRY HARLOW ची माकडं आपल्याला काय शिकवितात!

हॅरी हार्लो ची थोडी पार्श्वभुमी

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (12)

आपल्या विश्वाच्या शेवटाची सुरुवात कशी असेल?

मानवी अस्तित्वाच्या अंताबद्दल भाकीत करताना आपल्या विश्वाचा मृत्यूसुद्धा त्यास कारणीभूत ठरू शकेल असे म्हणावे लागते. हे विश्व कशाप्रकारे कोसळून जाईल याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुळात यांची चाचणी कशी घ्यावी, त्यांची शहानिशा कशी करावी याबद्दलच अनेक शंकाकुशंका आहेत. उत्सुकता शमवण्यापोटीच हा मुद्दा उपस्थित केला जातो असेही वाटण्याची शक्यता आहे. हे विश्व पूर्णपणे गोठून जाईल (deep freeze), की कृष्णविवरात नाहीसे होईल की अस्टेरॉइड्सच्या माऱ्यामुळे तुकडे तुकडे होऊन ब्रह्मांडात सामावून जाईल की….आणखी काही तरी ?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

जागतिक तापमानवाढ सर्वेक्षणाचे निकाल

जागतिक तापमानवाढ हा सगळ्यांवरच परिणाम करणारा व सगळेच कमी-अधिक प्रमाणात जबाबदार असणारा असा सर्वसमावेशक आणि म्हणूनच जटिल विषय आहे. सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला, वाढती अर्थव्यवस्था असणारा, भारत हा जगातला तिसरा सगळ्यांत जास्त कार्बन उत्सर्जित करणारा देश आहे. जागतिक तापमानवाढीच्या तीव्र परिणामांना तोंड देणारा एक मोठा देश म्हणून भारताची या विषयात खूप मोठी भूमिका आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स